[स्वैर] वाळवी वि० बुरशी
डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत...
ज्यांना समूहात आणि परंपरेत सुरक्षित वाटते ते सहसा उजवीकडे झुकलेले असतात. त्यांना मुक्तपणा म्ह० स्वैराचार वाटतो. त्यांना समूहाचा व्यक्तीच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे महत्त्व आणि भवितव्य घडवते. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. उजव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे. त्यामुळे मुक्त स्त्री त्यांना संस्कृती भ्रष्ट करणारी वाटते. मग मुलांची लग्ने होत नाहीत म्हणून स्त्रियांनी जास्त शिकू नये, कमी शिकलेला नवरा पत्करावा वगैरे, शहर सोडून खेड्यात जावे हे तत्त्वज्ञान उगाळले जाते.
नुकतेच वाचनात आलेले ताजे संशोधन असे सांगते की एखाद्या कुटुंबात एखादी व्यक्ती जितकी बुद्धीमान तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते. हा सहसबंध आहे, कार्यकारण भाव नाही. डाव्या बुद्धीमत्तेच्या श्रेष्ठत्वाचे उत्तम उदा० म्हणजे चीन.
मग लक्षात आले आतापर्यंत विकसित झालेले सर्व यशस्वी ए०आय० डावीकडे झुकलेले आहेत. उजवीकडे झुकलेला ए०आय० कसा असेल याची मला उत्सूकता आहे. मुळात उजवी कडे झुकलेला ए०आय० अस्तित्वात येईल का, याचीच शंका आहे.
तारतम्य मध्यममार्गात असते याचा डाव्यांना आणि उजव्यांना विसर पडलेला असतो.
मला जे प्रश्न जास्त भेडसावतात त्यावर मी प्राधान्याने बोलू इच्छितो. ज्या प्रश्नांचा माझा अभ्यास नाही त्यावर मी का बोलू?