कल्पकतेची ऐशीतैशी
कल्पकतेची ऐशीतैशी
===========
सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत. त्याला संबंधितांकडून प्रतिसाद मिळत आहेच, पण या सर्वाच्या मुळाच्या असलेल्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करायची गरज निर्माण झाली.
आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्या राजकीय नेत्यांची कमी नाही.
आपले खरे दुखणे कशात आहे, याचा जर थंड डोक्याने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर जे सत्य गवसते त्यामुळे रक्त उकळायला लागते.
काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा मी फोटोग्राफी करत असे. माझ्या फोटोग्राफीची नजर विकसित होण्यासाठी मी जगभर फोटोग्राफीमध्ये काय चालते याचा अभ्यास करत असे.
तर सांगत काय होतो, की मी माझ्या आजीला तिच्या शेवटच्या दिवसात भेटायला नाशिकला गेलो होतो. माझ्या आजीचा मुक्काम माझ्या मावशीकडे होता. जाताना मी माझा कॅमेरा बरोबर नेला होता. आजीला नमस्कार करून निघताना फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढला, तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की "आजारी माणसांचे फोटो काढत नसतात!"
या दोन मावशांनी आयुष्यात कॅमेरा हातात धरणं सोडा पण आयुष्यात कसलाही पराक्रम केलेला नाही, पण फोटो कशाचे काढावेत आणि नाहीत याबद्दल मात्र त्यांची ठाम मते होती. आणि मी त्यांचे ऐकले पाहिजे हा त्यांचा चमत्कारिक आग्रह मात्र अनाकलनीय होता.
भारतात कल्पकता रूजणं शक्य नाही याची कारणे वरील (प्रातिनिधिक) प्रसंगात द्डलेली आहेत. समाजातले अडाणी आणि निर्बुद्ध लोक (विशेषत: संस्कृतीरक्षक) जेव्हा कला, सर्जनशीलता यांची व्याख्या करायला लागतात तेव्हा त्या समाजात कल्पकता कधीच विकसित नाही.
आज ए०आय० अवतरल्यानंतर ट्रंप,पुतीन आणि पोप यासारख्या सारख्या जागतिक नेत्यांची यथेच्छ टिंगलटवाळी ए०आय० ने तयार केलेल्या चित्राद्वारे चालू आहे. पण यामुळे एकही जण कोर्टकचेर्यांची वारी करताना दिसत नाही. पण फक्त भारतात विडंबन हा गुन्हा ठरू शकतो. कुठेतरी असे वाचले आहे की ख्रिश्चन धर्म सर्वात टिंगलटवाळी झालेला धर्म आहे.
कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही.
मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?
कोणीहीफोटो काढत असेल तर मी विरोधच करेन. असा फोटो काढणे म्हणजे कल्पकता, सर्जनशीलता इ. समजूत असणाऱ्यांना _/\_.कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही.सिंगापूर, चीन वगैरे देश भरपूर विकसित आहेत. बाकी नेहमीच्याच दुगाण्या झाडणे सुरू राहू दे.आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्या राजकीय नेत्यांची कमी नाही.तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की . . .बथ्थड डोक्याच्या अश्याच काही ढुढ्ढाचार्यांमुळे अत्यंत कल्पक प्रकाशचित्रकार असलेल्या केविन कार्टरला आत्महत्या करावी लागली होती.तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ?अगदी बरोबर. कल्पकता हे फक्त अवगुंठन आहे, मूळ उद्देश मोदी, भाजप, हिंदू इ. विषयी गरळ ओकणे हाच आहे.कलाकाराने काय कलाकृती निर्माण करायची हे त्याच्या ऊर्मीवर ठरतं. ते समाजाने नाही.अर्धसत्य. एखाद्या अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे प्रकाशचित्र/चित्र त्या व्यक्तीच्या अनुमतीविना निर्माण करणे अयोग्य आहे. एखादी युवती स्नान करीत असताना तिचे प्रकाशचित्र टिपणे व कलाकाराची उर्मी, इतरांनी यात पडू नये असे सांगून त्याचे समर्थन करणे हे निव्वळ चूक नाही तर गुन्हा सुद्धा आहे. कलाकार असो वा अजून कोणी सोम्या गोम्या . . . समाजबंधने, वैधानिक बंधने पाळणे बंधनकारक आहे.तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची "ही उर्मी " , "हे प्रेशर" पाहून तुमच्या मावशींनी तुम्हाला मरणासन्न आज्जीच्या फोटोसेशन करण्यापासून का रोखले हे मला सुस्पष्ट कळले आहे.परफेक्टमोदी , भाजप, आणि सनातन हिंदू हे तीन ही शब्द माझ्या मूळ लेखात मी कुठेही वापरले नाहीत. पण कल्पकतेवर चर्चा करायची सोडून मला गरज नसताना नको ते शहाण्पण तुम्ही शिकवत आहात.संस्कृतीरक्षक, गाईचे शेण हे शब्द आपणच आपल्या लेखात आणले आहेत. कल्पकता हा विषय असता तर त्या विषयाला चिकटून लिहिले असते. पण मुळात या लेखाचा कल्पकता हा विषयच नाही. केवळ भाजप, सनातन हिंदू इ. विषयी गरळ ओकणे हा आणि केवळ हाच लेखाचा विषय आहे.माणूस जन्माला आला आहे तर म्हातारा होणार त्यात काय विशेष ! तुम्ही त्याला उगाचच कल्पकता, कलात्मकता , पीयूष गोयल, संस्कृती रक्षक आणि शेण वगैरे मध्ये मिसळून मिसळ करू नका.यांनी आपल्या "याचा बंदोबस्त कोण करणार" या चीनच्या नकाशाच्या धाग्यातही संपूर्ण अनावश्यक असलेले शेण, गोमूत्र इ. आणून आपला मूळ हेतू प्रकट केला होता. एकंदरीत यांना शेण, गोमूत्र इ. ची अतोनात आवड दिसते. काहीतरी विषय पकडायचा आणि त्यात पूर्णपणे अनावश्यक, असंबंधित असे शेण, गोमूत्र, हिंदू संस्कृती, भाजप इ. मुद्दे घुसडून शेणाने तोंड माखून घ्यायचे हे यांचे व्यवच्छेदक लक्षण असावे.