बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?
"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?"
प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उहापोह करण्यासाठी हा लेखनप्रपंच!
कौतुक :
सर्वप्रथम बकरी ईदनिमित्त होणाऱ्या कत्तलीपासून तब्बल १२४ बोकडांचा जीव वाचवणाऱ्या 'गुरू संजीव, चिराग जैन आणि त्यांच्या चमूचे' हार्दिक अभिनंदन!
मौज :
सदर बातमीतील,
"धरमपूर परिसरातील नया जैन मंदिरात बकरी ईदच्या दिवशी उत्साह दिसून आला. कसाईच्या तावडीतून वाचलेल्या बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी चांदणी चौकातील जैनांनी येथे गर्दी केली होती. हा दिवस बकरी दर्शनाचा दिवस होता. बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी मंदिरात होत होती. काहींनी त्यांच्या चाऱ्यासाठी पैसेही दान केले."वरील वाक्ये वाचून मौज / गंमत वाटली! पवित्र गोमातेचे दर्शन घेणे, धार्मिक विधी / मंगल कार्याच्या प्रसंगी तिला 'गोग्रास' अर्पण करणे, गाईचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमुत्र अशा पाच गोष्टींचा समावेश असलेले 'पंचगव्य' प्राशन करणे अशा रूढी / परंपरा हिंदू धर्मात प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. जैन धर्माविषयी मनात आदर आहे आणि जैन धर्मियांचा अवमान् करण्याचा किंचितही हेतु नसला तरी, वरिल प्रमाणे पवित्र 'बकरी दर्शन', गोग्रासाप्रमाणे 'बग्रास', बकरीचे दूध, दही, लेंड्या आणि मूत्र अशा (बकरीच्या दुधापासून तूप तयार करता येत नसल्याने) पाचच्या ऐवजी चार गोष्टींचा समावेश करून तयार केलेले 'चौगव्य' प्राशन करण्याच्या नव्या रूढी / परंपरा जैन धर्मात सुरु होतील कि काय असा एक फाजील विचार मनात येऊन हसूही आले. व्यावहारिक 'चिंता' : बातमीतील पुढची माहिती वाचत असताना सुरुवातीला मनात 'भावनिक' पातळीवर निर्माण झालेल्या कौतुक आणि मौज/गंमत अशा भावना ओसरल्या आणि मेंदूत 'व्यावहारिक' विचारमंथन सुरु झाले. शेळीपालनात एका प्रौढ बोकडासाठी १५ ते २० चौ. फूट जागा बंदिस्त निवाऱ्यासाठी आणि त्याच्या १० पट मोकळी जागा उपलब्ध असणे हि आदर्श परिस्थिती मनाली जाते. त्यावर आधारित १२४ बोकडांसाठी गणित केल्यास किमान अर्धा एकर क्षेत्रफळ आवश्यक असल्याने, लोकवर्गणीतून जमा झालेल्या पंधरा लाखांपैकी जवळपास साडे बारा लाख रुपये खर्चून मंडईतून खरेदी करून आणलेल्या बोकडांना 'मंदिरातील धर्मशाळेचे अंगण आणि विवाहसोहळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या हॉल मध्ये ठेवण्यात आल्याचे वाचून चमकलो होतो, पण बातमीच्या शेवटी त्यांची रवानगी 'जैन-संचलित गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये' करण्यात येणार असल्याचे वाचल्यावर हायसे वाटले. “आम्ही रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून कपडे विकत घेत आहोत असे वाटले. बकऱ्या एकत्र कुस्करल्या गेल्या. या सजीव, श्वास घेणाऱ्या प्राण्यांबद्दल कोणतीही संवेदनशीलता नव्हती” असे दिल्लीच्या मंडईचे विदारक वर्णन विवेक जैन ह्यांनी बातमीत केले आहे. माझ्या काही मोजक्याच पण अतिशय जवळच्या अशा मुस्लिम मित्रांबरोबर 'हा काय प्रकार असतो' ह्या उत्सुकतेपोटी' बकरी ईदच्या आदल्या दिवशी 'कुर्बानीचे बोकड' खरेदी करण्यासाठी मुंबईतील 'देवनार' आणि कल्याण-भिवंडी रोडवरील 'कोन गाव' अशा दोन 'बकरा मंडी'ना दिलेल्या भेटीत अशी मन विदीर्ण करणारी दृश्ये प्रत्यक्ष पाहिली असल्याने त्यांनी केलेले वर्णन अगदी चपखल असल्याचे जाणवले आणि त्यावरून एक गंभीर शंका मनात आली आणि "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी? हा प्रश्न पडला! 'ईद मार्केट' साठी व्यापाऱ्यांनी विक्रीकरीता आणलेले विविध जातींचे, वयाचे आणि हमखास चांगला चांगला भाव मिळवून देतील असे 'खास शारीरिक वैशिष्ठ्यांचे' 'कुर्बानीचे' बोकड हे केवळ त्या त्या तालुका, जिल्हा किंवा राज्यातील शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आणलेले नसून, वेगवेगळ्या राज्यांतील लहानमोठे 'शेळीपालक शेतकरी' आणि व्यावसायिक 'गोट फार्म्स' मधूनही खरेदी केलेले असतात. खरेदी केल्यापासून फारतर आठ-दहा दिवसांत हे बोकड 'हलाल' केले जाणार असल्याने प्राणघातक ठरू शकणाऱ्या काही आजार आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी त्यांचे नियमित 'लसीकरण' झालेले आहे किंवा नाही ह्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. बकरा मंडीत तात्पुरत्या उभारलेल्या ताडपत्रीच्या शेड्समध्ये बांबू आणि शेडनेटचे पार्टीशन्स टाकून शेकड्यांनी तयार केलेल्या चार-पाचशे चौ. फुट आकाराच्या एकेका गाळ्यात, वेगवेगळ्या ठिकाणांहून ट्रकमध्ये अक्षरशः कोंबून कोंबून आणलेले हे बोकड दाटीवाटीने ठेवलेले असतात. वर म्हंटल्याप्रमाणे हे बोकड आठ-दहा दिवसांत 'हलाल' केले गेले असते तर गोष्ट वेगळी होती, पण इथे परिस्थिती वेगळी आहे. चिराग जैन आणि त्यांच्या टीमने खरेदी केलेले १२४ बोकड हे 'जातिवंत' आणि ज्यांच्या किमती २५ हजारांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत असतात असे खास 'ईद मार्केट' साठी तयार केलेले बोकड नसून साधारण एक वर्ष वयाचे, तीस-बत्तीस किलो वजनाचे आणि दोन दातांचे 'रेग्युलर मीट मार्केट' साठी विक्री होणारे 'गावरान' बोकड असल्याचे त्यांच्या 'सरासरी १० हजार रुपये प्रति बोकड' ह्या किमतीवरून सहज लक्षात येतंय. ह्या वाचवलेल्या बोकडांचे नियमित लसीकरण झालेले असेल का? ते झालेले नसल्यास भिन्न वातावरणात आणि परिस्थितीत वाढलेल्या असंख्य 'परक्या' बोकडांच्या सहवासात आल्याने त्यांच्यापैकी काहींना किंवा सर्वांना पी.पी.आर. सारख्या प्राणघातक संसर्गजन्य रोगाची लागण/बाधा झाली असेल का? संसर्गजन्य रोग एकवेळ बाजूला ठेऊ, पण बकरा मंडीत बोकड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी त्यांना पसंत पडल्याने बाजूला काढलेल्या अनेक बोकडांमधून एक किंवा त्यापेक्षा जास्तीची निवड करताना त्यांच्या वयाची खात्री पटवण्यासाठी बोकडाचे तोंड धरून दोन बोटे तोंडात खुपसून, जबडा फाकवुन त्याचे दात दाखवले जातात. हि क्रिया वारंवार केली जात असल्याने त्या व्यापाऱ्याच्या किंवा त्याच्या कर्मचाऱ्याच्या बोटांना लागलेली एका बोकडाची लाळ दुसऱ्याच्या जिभेला, दुसऱ्याची तिसऱ्याच्या जिभेला लागणे असे चक्र सुरु राहते आणि त्यातला एक जरी बोकड आजारी/बाधित असेल तर त्याच्या लाळेवाटे अन्य बोकड बाधित होण्याची शक्यताही वाढत जाते. दुर्दैवाने वरीलपैकी काही होऊन त्यांच्यातला एक, अनेक किंवा सर्व बोकड बाधित झाले असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करणे आले नाहीतर "कत्तलीपासून वाचवले, पण आजाराने मेले" अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे काही होऊ नये हि सदिच्छा, पण हे पाऊल उचलताना ह्या गोष्टींचा विचार त्यांनी केला होता/असेल का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे आणि त्याचे उत्तर मिळवण्यासाठी पुढच्या अपडेट्स साठी बातमीचा पाठपुरावा करणे आले! बातमीत म्हंटल्याप्रमाणे ह्या बोकडांची रवानगी गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यांची क्षमता, क्षेत्रफळ, उत्पन्नाचे स्रोत आणि तिथे ह्या बोकडांच्या चारा-पाण्याची काय सोय आहे हे देखील पाहावे लागेल. सर्वसाधारणपणे एका प्रौढ शेळी/बोकडाच्या आहारासाठी आजघडीला प्रतिदिन सरासरी ३० ते ३५ रुपये खर्च येतो. त्याच्या जोडीला त्यांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेले मिनरल मिक्श्चर, लिव्हर टॉनिक अशा गोष्टी, जंतांसाठीचे 'डिवर्मिंग', 'नियमित लसीकरण' आणि अन्य पशुवैद्यकीय खर्च, निवाऱ्यासाठी शेड, वीज, पाणी, औषधे आणि देखभालीसाठी लागणारे मनुष्यबळ ह्यावर होणारा खर्च वेगळा. हे विचारांत घेता ह्या १२४ बोकडांना पोसण्यासाठी, एका बोकडावर प्रतिमाह १००० रुपये असा किमान खर्च गृहीत धरला तर तो जवळपास सव्वा लाख रुपयांच्या घरात भरतो, गणिताच्या सोयीसाठी आपण तो आणखीन कमी करून १ लाख रुपये धरून चालू. ह्या हिशोबाने त्यांच्या एक वर्षाचा खर्च १२ लाख रुपये मात्र. शेळी/बोकडाचा आयुष्यकाल सरासरी १२ ते १५ वर्षांचा असतो, तोही आपण सोयीसाठी कमी करून १० वर्षे गृहीत धरून गणित केल्यास दहा वर्षांत त्यांच्यावर होणारा खर्च १ कोटी २० लाख रुपयांच्या घरात जातो (ह्यात भविष्यात वरील गोष्टींच्या किमतीत होणारी वाढ धरलेली नाही) हा खर्च भागवण्यासाठी त्या गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांचे स्वतःचे काही उत्पन्नाचे स्रोत असल्यास आनंदच आहे, आणि लोकांकडून देणग्या गोळा करून हा खर्च भागविण्यात येणार असल्यास आनंदी-आनंदच आहे! कोणातरी गुरूच्या सांगण्यावरून आणि आंतरिक उर्मीने लोकवर्गणीतून सुमारे साडेबारा लाख रुपयांना खरेदी केलेले हे उपयोगशून्य बोकड आणि त्यांना पोसण्यासाठी भविष्यात प्रतिवर्षी खर्च होणाऱ्या जवळपास सव्वा कोटी रुपये अशा एकंदरीत सुमारे दीड कोटी रुपयांच्या ह्या अनावश्यक खर्चाचे समर्थन कशाच्या आधारावर करायचे हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. बरे ह्यावर्षी झालाय हा प्रकार इथपर्यंतच मर्यादित राहिला तर एकवेळ ठीक आहे, पण ह्या चिराग जैन आणि मंडळींकडून दरवर्षी, आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य काही मंडळींनी असे प्रकार सुरु केले तर देशभरात प्रतिवर्षी किती नवीन 'बकरशाळा' उघडतील आणि त्यांवर किती अब्ज रुपये खर्ची पडतील ह्या विचाराने मेंदूला मुंग्या आल्या. असो, भूतदया आणि मानवतावादी दृष्टिकोनातून ह्या बातमीतील घटनेकडे पाहिल्यास हा उपक्रम नक्कीच स्तुत्य वाटतो, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यातला फोलपणा प्रकर्षाने जाणवतो. जय हिंद! जय महाराष्ट्र!
💬 प्रतिसाद
(122)
स
सर टोबी
Fri, 06/21/2024 - 14:53
नवीन
“आपण” नव्यानेच जवळ गेलो त्या इस्राईलमध्ये देखिल हलालच मांस चालते म्हणून जरा मुस्लिमांबद्दल कमी ओरड झालीय. नाही तर काही खरं नव्हतं. बाकी झटका बरा की हलाल हे एकच प्राणी सांगू शकतो तो म्हणजे दोन्ही प्रकारे कत्तल झालेला बोकड आणि तत्सम. पण त्याला बोलता येत नाही ही पण एक अडचणच आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 06/21/2024 - 16:32
नवीन
दोन्ही प्रकारे कत्तल झालेला बोकड आणि तत्सम
मुळात मेलेला बोकड कसे काय सांगणार हा प्रश्न अधिकच मूलभूत आहे.
त्याला बोलता येते का नाही हा प्रश्न दुय्यम आहे.
कारण बोकडाची भाषा जाणणारे असू शकतील
पण मेल्यावर बोकड बोलू शकत नाही हे सत्य
LOL
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Fri, 06/21/2024 - 19:47
नवीन
compartmentalization आणि rationalization याचा लगेच प्रत्यय आला. आपले आदर्श नेते, पुज्यनीय असलेली विचारसरणी याचा पुरस्कार करण्यासाठी कितीही हीणकस वागायचं म्हटलं तरी आपण मागे हटत नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 06/22/2024 - 17:09
नवीन
@सर टोबी
कोणत्याही धाग्यावर किंवा विषयावर मोदी द्वेषाची गरळ ओकल्याशिवाय आपल्याला अन्न पचन होत नाही का?
- Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड
Fri, 06/21/2024 - 16:48
नवीन
समझा आपण (म्हणजे वाचक) ह्याना मरणासाठी दोन पर्याय दिले. हलाल आणी झटका. तर कुठला पर्याय निवडाल?
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Fri, 06/21/2024 - 18:20
नवीन
माझ्यासारख्या मांसाहार वर्ज्य नसला तरी त्याची विशेष आवड नसलेल्या माणसाला 'हलाल' आणि 'झटका' अशा कुठल्याही पद्धतीने कत्तल झालेल्या कोंबडी. बोकड किंवा अन्य कुठल्या प्राण्याचा मांसाच्या चवीत काय फरक असतो किंवा तसा काही फरक असतो कि नसतो वगैरे बद्दल अजिबात ज्ञान नाही. पण ह्या दोन्ही पैकी कुठल्या पद्धतीने कत्तल केली असता त्याला कमी वेदना होतात ह्याविषयीचा एक रिसर्च पेपर मागे वाचनात आला होता त्याचा सारांश काहीसा असा होता...
'हलाल' आणि 'झटका' अशा दोन्ही पद्धतीने विविध प्राण्यांची कत्तल केली जात असताना त्यांच्या शरीराला जोडलेल्या ECG आणि कुठलया कुठलया वैद्यकीय उपकरणांवर झालेल्या अनेक नोंदींचा अभ्यास केल्यावर हलाल पेक्षा झटका पद्धत हि कमी वेदनादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.
हलाल पद्धतीत सूरी फिरल्या फिरल्या सुरु झालेला रक्तस्त्राव, प्रतिक्षिप्तक्रियेने मेंदूकडून रक्तस्त्राव थांबवण्यासाठीच्या दिल्या गेलेल्या संकेतांमुळे रक्त गोठणे/साकळण्याची प्रक्रिया सुरु होऊन प्राण्याची शुद्ध हरपण्यास लागणारा कालावधी काहीसा वाढून त्याचे प्राण जाण्यासही थोडा विलंब होत असल्याने त्याला अधिक काळ वेदना सहन कराव्या लागतात. लहान प्राण्यांपेक्षा मोठ्या प्राण्यांमध्ये हा कालावधी आणखीन वाढतो.
त्याउलट झटका पद्धतीत मेंदू आणि शरीराच्या बाकी अवयवांचा संपर्क तात्काळ तुटल्याने वर उल्लेख केलेल्या गोष्टींसाठी लागणारा कालावधी कमी होत असल्याने प्राण गमावताना त्या प्राण्याला वेदनाही कमी होतात अशी काहीशी त्यामागची कारणे/निरीक्षणे त्यात दिली होती. आता सर्व गोष्टी नीटशा आठवत नसल्याने तपशिलात कमतरता तर आहेच पण काही चूकभूलही झाली असल्यास त्यासाठी क्षमस्व!
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Fri, 06/21/2024 - 19:42
नवीन
कुमार१ यांनी या दोन्ही प्रकारची तुलना करून वेदना कमी होण्यासाठी कोणतीही पद्धत आदर्श वा अतिशय क्रूर असा काही फरक करता येणार नाही असं काहीसं वाचल्याचं आठवतंय. बाकी नविन आणि आदर्श मित्राला आवडतंय म्हटल्यावर विरोध कमी होतोय हा युक्तिवाद मान्य असल्याबद्दल बरे वाटले.
“एक बार इज़राइल जाके देखना है ऐसा क्या है उस मिट्टी में की एक भी देशद्रोही पैदा नहीं होता” हे पण एक कारण असावे.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Fri, 06/21/2024 - 20:18
नवीन
कुमार सरांच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही, त्यांनी असे लिहिले असल्यास त्यात नक्कीच तथ्य असेल. मी जे वाचले होते आणि त्यातले जेवढे आठवले तेवढे प्रतिसादात लिहिले, तसेच तपशिलात कमतरता असल्याचे आणि चूकभूल होण्याची शक्यता असल्याचेही मान्य केलेले आहे. आणि हलाल असो कि झटका त्यात मला काडीचाही रस नसल्याने त्याविषयी अधिक माहिती मिळवण्याचा कधी प्रयत्न केला नाही, आणि पुढेही करण्याची शक्यताही नाही!
बाकी आपलया प्रतिसादातील पुढची वाक्ये पार डोक्यावरून गेली. त्याविषयी थोडे इस्कटून सांगितलेत तर समजायला सोपे जाईल म्हणतो!
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Sat, 06/22/2024 - 06:51
नवीन
इस्राईलचा उल्लेख मी नविन मित्र म्हणून करतोय. ज्यु लोक देखील हलालचे नियम कडकपणे पाळतात आणि म्हणून बकरीदसाठी होणाऱ्या कुरबनीची चर्चा थोडया सौम्य पद्धतीने होतीय.
इस्राईल भारतातील विद्यमान राजवटीच्या समर्थकांचा आदर्श आहे. त्यासाठी फेसबुक मधून आलेली ओळ मी शेवटी उधृत केली आहे.
बाकी मेंदू रक्त साकळण्याचा संदेश देतो हे अविश्वसनीय आहे. हवेशी संपर्क झाला की रक्त साकळते. काही तरी जीवघेणं घडलंय आणि तिथून पळ असा संदेश मेंदू देईल की रक्त साकळण्याचा संदेश देईल?
- Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड
Sat, 06/22/2024 - 07:26
नवीन
ज्यु लोक देखील हलालचे नियम कडकपणे पाळतात कोशर
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Sat, 06/22/2024 - 07:43
नवीन
अच्छा म्हणजे नको असलेली राजवट कितीही आटापिटा करूनही तिसऱ्यांदा आल्याच्या दुःखातून, राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या धागाचर्चेत राजकीय संदर्भ आडून आडून घुसवून, तसेच हलाल आणि झटका ह्याबद्दलच्या माझ्या अज्ञानाचा आणि त्या प्रतिसादातील कमतरता, चूकभूल ह्यांचा वारंवार उल्लेख करूनही पुन्हा त्याच विषयीच्या कुशंका उपस्थित करून चर्चा भरकटवण्याचा कुटील हेतू अखेर उघडकीस आला म्हणायचा 😀
असो, उगाच खुसपटे काढत बसण्यापेक्षा तुमच्याकडे हलाल आणि झटका बद्दल काही शास्त्रीय/विश्वसनीय माहिती असल्यास ती जरूर द्यावी, मला त्यात काडीचाही रस नसला तरी ज्यांना असेल त्यांच्या तरी उपयोगी पडू शकेल.
धन्यवाद!
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 06/24/2024 - 11:07
नवीन
टर्मिनेटर भाऊ तुम्ही अगदी चागळे पकडले या जेड ला....इस्राएल जुना नवा मित्र याचा इथे काहीच संबंध नाही ...
" जेड" ला मोदीद्वेषाचे "येड" लागलाय असे आम्ही तूर्तास जाहीर करतो ....अ. बा . या व्यत्क्तिमत्वाची सावली दिसते जेड साहेबाच्यात
जिथे तिथे मोदी
असो
एकदा एका फार्म हौस वर ( पाश्चिमात्य देशात) एक शेतकरी बेकायदा मास विकायांचा आणि त्यावेळी त्या देशात बोकड/ शेळी चे मास सहजसहजी मिळत नसे ( मेंढी मेंढा भरपूर) म्हणून भारतीय लोक त्या फार्म हाऊस ला जायचे ,, तेवहा त्यातील काहीना हलाल पाहिलेज असल्याचने आणि बहुतेक चिनी हॉटेल वाले जे बीफ घ्य्याला यायःचे त्यांना काही फरक पडायचा नाही ,, तर "हलाल " पाहिजे असलेल्यां तो बोकड गळा चिरून ठवून द्यायचा आणि बैल मात्र बंदुकीने मेंदूत झटक्यात गोळी ने मारायाचा
दोन्ही प्रकारात जनावराला एकूण वातावरण बघून कत्तलीचा अंदाज आलेला..भेसूर अस्यायचे पण त्यातल्या त्यात गोळीने मारणे कमी क्रूर वाटायचे
पण एकूणच तो शेतकरी हे बेकायदा करीत असलयामुळे सगळेच वातावरण जास्त भयानक वाटायचे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 06/21/2024 - 17:03
नवीन
धंदेबाजी और फांदेबाजी मैं उनका धरम बीच मैं नही आता" आणि 'सब गंदा हैं पर धंदा हैं ये
इतर वेळेस पापभिरू असणारा माणूस टोकाची फसवाफसवी कशी करू शकतो याचे मानसशास्त्रीय दृष्ट्याविश्लेषण COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION (समर्थन) या दोन बाबींनी करता येते.
COMPARTMENTALISATION म्हणजेच माणूस मनाचे कप्पे तयार करतो. आणि या कप्प्यातील बाबी त्या कप्प्यात जाणार नाहीत याची काळजी घेतो.
यामुळे तो मनाचा आंतरिक संघर्ष टाळू शकतो आणि येणारी मानसिक अशांती थोडी फार तरी कमी करतो. यात धंदा आणि त्यासाठी करावी लागणारी फसवा फसवी हि मनाच्या एका कप्प्यात टाकून तो कुलूपबंद करतो म्हणजे बाकी व्यवहारात त्या विचारांमुळे येणार संघर्ष टाळता येतो.
बीफ निर्यात करणारा माणूस प्रत्यक्ष व्यवहारात मुंगी सुद्धा मारणार नाही शुद्ध शाकाहारी असून कांदा लसूण सुद्धा खाणार नाही रोज मंदिरात अनवाणी जाऊन पूजा करताना दिसतो. पण धंद्याच्या कप्प्यात गेलात तर आपला धंदा वाढवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या खून सुद्धा करू शकतो.
आणि यातूनच "सब गंदा हैं पर धंदा हैं ये" असे समर्थन करताना दिसते.
याशिवाय RATIONALISATION म्हणजेच तर्कसंगती लावणे किंवा समर्थन करणे हा त्याचाच उपप्रकार आहे.
यात बहुसंख्य भ्रष्ट सरकारी अधिकारी येतात. येणार पैसा तर हवा असतो पण तर्कसंगती लावून त्याच्या पापाची किंवा गुन्ह्याची तीव्रता कमी करून स्वतःचे मानसिक समाधान करण्याचा प्रयत्न असतो. उदा. सरकारी खात्यात असे करावेच लागते, मी नाही केलं तर दुसरा कोणी तरी करणारच आहे, इतर लोक करतात त्यापेक्षा मी कितीतरी कमी करतो. इ इ
तुम्ही कितीही गुन्हे केलेत तरी तुम्ही कलमा पद्धत असाल तर तुम्ही कोणत्याही काफ़िरांपेक्षा श्रेष्ठ आहात हे याच एक उच्च उदाहरण आहे. यामुळे मुस्लिम समाजात क्रूरपणा आणि गुन्हेगारीचे समर्थन मोठ्या प्रमाणात झालेले आढळते. ( हा मुद्दा अतिशय वादाचा आहे हे गृहीत धरूनच मी इथे लिहीत आहे)
अर्थात COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION हे आपल्याला सामान्य माणसे सुद्धा सहज करताना आढळतात.
सगळेच लोक करतात म्हणून मी खोटे मेडिकल सर्टिफिकेट देतो पासून इतर लोक हेल्मेट घालत नाहीत किंवा इतर लोक सुद्धा सिग्नल पाळत नाहीत किंवा सगळंच करतात म्हणून मी परीक्षेत कॉपी करतो हि RATIONALISATION ची सर्वत्र आढळणारी उदाहरणे आहेत.
माणूस आंतरिक (मानसिक) संघर्ष टाळण्यासाथ इया दोन गोष्टींचा उपयोग करतो. कारण सर्व धर्मांमध्ये खोटे बोलू नये दुसऱ्याला त्रास देऊ नये स्वार्थी पणा करू नये अशा शिकवणी दिल्या जातात. असे मानसिक संघर्ष प्राण्यांमध्ये नसतात.प्राणी हे प्रच्छन्नपणे स्वार्थी असतात. सिंह सुद्धा दुसर्यां प्राण्यानी केलेली शिकार (सिंहिणीने केलेली सुद्धा) कोणताही दुजाभाव न ठेवता बळकावताना दिसतो. बळी तो कान पिळी हाच जंगलचा कायदा आहे. दुसऱ्याच्या घरात बिळात जबरदस्तीने शिरणे दुसऱ्याची शिकार बळकावणे दुसऱ्या नराच्या मादीवर आपला हक्क सांगणे दुसऱ्या नराची पिल्ले मारून टाकणे अशा गोष्टी सर्रास कोणताही मानसिक संघर्ष न होता प्राणी करताना आढळतात
मुळात माणुस पण स्वार्थी आहे परंतु प्रामाणिकपणा सहिष्णुता निस्वार्थीपणा या गोष्टी सद्गुण आहेत हे शिकवले गेल्याने मानसिक संघर्ष उभा राहतो. मग यावर उपाय काय म्हणून मानवाने COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION असे काही मानसशास्त्रीय उपाय शोधून काढलेले आहेत.
क्रमश:
- Log in or register to post comments
B
Bhakti
Fri, 06/21/2024 - 17:45
नवीन
सुंदर विवेचन!
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Fri, 06/21/2024 - 18:38
नवीन
पहिला कुठल्याशा हिंदी डब्ड तेलगू चित्रपटातला एक संवाद आणि दुसरा 'कंपनी' ह्या हिंदी चित्रपटातील एका गाण्याचा मुखडा इथे काहीशा वेगळ्या संदर्भाने वापरला होता. पण हरकत नाही, आपण केलेले त्यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण छान आहे, आवडले 👍
पुढचा/पुढचे भागही लवकर येउद्यात! धन्यवाद.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 06/24/2024 - 11:13
नवीन
RATIONALISATION यातील एक अजून प्रकार जाणवलेला म्हणजे , "आम्ही गुरुवारी आणि शनिवारी ( उदाहरण ) अजिबात मासाला हात लावत नाही" ( पण बाकी दिवशी चोपून खातो ..) " नौरात्र कडक असते हो आमच्य्यात" पण सण संपला कधी एकदा बोकड आणायला जातोय असे होते ह्यांना
त्यामुले मी बऱयापैकी खादाड आणि मांसाहारी असलो तरी जे खरंच १००% शाकाहारी आहेत आणि त्याचा गवगवा करीत नाहीत त्यांना माझे कडून २ गुण जास्त असतात .. असो
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Fri, 06/21/2024 - 17:12
नवीन
उत्तम विवेचन केले आहे. 'क्रमशः' मुळे आणखी पुढले वाचायची इच्छा बळावली आहे. अनेक आभार.
- Log in or register to post comments
न
नठ्यारा
Fri, 06/21/2024 - 21:35
नवीन
टर्मीनेटर,
इथे युरोपात मेंढ्याचं रक्त पुडिंगमध्ये वापरतात. विशेषत: नाताळाच्या पुडिंगात. भारतात बोकडाचं रक्त वापरण्याजोगं असावं असा अंदाज आहे.
-नाठाळ नठ्या
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Sat, 06/22/2024 - 08:18
नवीन
युरोपात पुडिंगमध्ये मेंढ्याचं रक्त वापरतात? 😕
युक्स... आता पुन्हा तिकडे जाणे झाल्यास पुडिंग कधीही खाणार नाही!
माहितीसाठी आभारी आहे 🙏
- Log in or register to post comments
न
नठ्यारा
Fri, 06/21/2024 - 21:45
नवीन
प्याजे,
शब्द बरोबर आहे. त्यास रक्ती वा रत्ती म्हणतात. रक्त वाळवून भुगा करतात. मग त्यात बरंच बेसन आणि मसाले मिसळतात आणि वड्या थापतात. नंतर त्या बहुधा तळून वा भाजून काढतात. मला तो पदार्थ विशेष आवडला नाही.
-नाठाळ नठ्या
- Log in or register to post comments
र
रामचंद्र
Fri, 06/21/2024 - 22:28
नवीन
अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित समाजातील लेखकांच्या लेखनात तत्सम पदार्थांचे उल्लेख आढळतात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 06/22/2024 - 06:26
नवीन
अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित समाजातील
गरिबीमुळे मटण विकत घेणे परवडत नाही
पण चवीसाठी गरीब माणसं खाटिकाकडून साकळलेलं रक्त आणि हाडं अतिशय स्वस्तात विकत घेऊन जातात आणि त्यात बेसन ज्वारीचे बाजरीचे (गिरणीत इतस्ततः पडलेले पीठ अधिक स्वस्तात विकत घेऊन) पीठ मिसळून विविध पदार्थ तयार करून खातात.
याशिवाय खाटिकाकडून हाडं, खूर इ सामान्यतः टाकाऊ समजलेले पदार्थ स्वस्तात विकत घेऊन ते उकळून त्यात आलं लसूण मिरची घालून रस्सा बनवतात आणि तो भाकरी/ भाताबरोबर खातात.
गरिबी हा एक शाप आहे आणि शिक्षण हा त्यावरील एकमेव उ:शाप आहे
- Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड
Sat, 06/22/2024 - 07:28
नवीन
गरिबी हा एक शाप आहे आणि शिक्षण हा त्यावरील एकमेव उ:शाप आहे +१ :(
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Sat, 06/22/2024 - 08:21
नवीन
वाचुन अंगावर काटा आला!
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 06/24/2024 - 11:26
नवीन
या पेक्षा हि पुढचे म्हणजे
फिलिपिन्स मध्ये पण के एफ सी सारखया कोंबडीचे पदार्थ विक्रय दुकानातील उष्टे आणून त्याला उकळून परत पिठात कालवून तळुन विकले जाते अति गरीब वस्तीत .. त्याला "पग पग चिकन " असं म्हणतात
विडोओ ची लिंक देत नाही बघवणार नाही
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Sat, 06/22/2024 - 09:20
नवीन
आणी त्यावर झालेली सांगोपांग चर्चा वाचल्यावर मलातर असे वाटू लागले आहे की मी फक्त बकऱ्या सारखे गवत खावे जे कदाचित शुद्ध शाकाहारी असेल.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Sat, 06/22/2024 - 15:03
नवीन
कच्चे गवत थेट खाल्लेत तर ते "शुद्ध शाकाहारी" असण्याची शक्यता जवळपास शून्य राहील कारण त्यावर असलेले पण मानवी डोळ्यांना न दिसणारे अगणित सूक्ष्मजीव, जंतांची आणि अन्य कृमी-कीटकांची अंडी वगैरे वगैरे. त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते गवत नुसते धुवून काम भागणार नाही, त्यासाठी ते चांगले उकडून किंवा गेला बाजार ७० अंश से. तापमानावर सुमारे तासभर गरम करून मग खावे लागेल. अर्थात ह्या प्रक्रियेने ते गवत जीवजंतू आणि अंड्यांपासून मुक्त होईल, पण त्यात झालेल्या हिंसेतून कोट्यवधी सूक्ष्मजीवांच्या हत्येचे जे पाप लागेल त्याच्या परिमार्जनाचीही तयारी ठेवावी लागेल 😀
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Sat, 06/22/2024 - 15:33
नवीन
आसेच इतक्या पापांचे घडे भरले आहेत की यमलोकात न नेता परस्पर इहलोकातच पापक्षालन (की आणखी पाप करण्यास) करण्यास पुनर्जन्म मिळणार आहे.
खरे तर आजकाल अशा बातम्या येत आहेत की काय खावे याचाच प्रश्न पडलायं.
आईस्क्रीम सोडले. झोमॅटो,स्वीगी बंद केले.
घरच्या घरीच अंबेमोहर तांदळाचा भात,घरचे तुप आणी मेतकूट खातो.
आता बकऱ्यां बद्दल, नोकरीत असताना जिवंत, मृत दोन्हीशी संबध आला पण कधी खाल्ले नाहीत.
बिचारे बकरे....
त्यांच्यावर चार शब्द आपण लिहीलेत, नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुम्हांस भेटतील.....
- Log in or register to post comments
न
नठ्यारा
Sat, 06/22/2024 - 16:24
नवीन
अवांतर :
टर्मीनेटर,
माझ्या मते व्यभिचार', 'कामुकता', 'लंपटता', 'अश्लीलता', 'विषयासक्ति' वगैरे म्हणजेच अरबस्थानातलं living well आहे. अरबी स्वर्गाची एकेक वर्णनं ऐकली असतील तुम्ही.
-नाठाळ नठ्या
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Sat, 06/22/2024 - 17:06
नवीन
हा हा हा... Good Joke!
आपण कोट केलेल्या वाक्यांच्या पुढचा हा परिच्छेद वाचायचा राहिला का 😉
- Log in or register to post comments
न
नठ्यारा
Mon, 06/24/2024 - 14:40
नवीन
तुम्ही वेगळे ते सांगायचं राहून गेलं! मी तुम्हांस नेहमी व्हाईट नजरेनेच बघतो! ;-)
-ना.न.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Tue, 06/25/2024 - 07:56
नवीन
हे वाचून आनंद झाला 😀 असाच लोभ कायम असावा 😂
- Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे
Sun, 06/23/2024 - 10:51
नवीन
थांबून थांबून लिहिता पण आपण भारी लिहिता !
लेखन शुभेच्छा !
- Log in or register to post comments
स
सुरिया
Mon, 06/24/2024 - 09:50
नवीन
व्व्वा, छान.
व्यावहारीक आणि तर्क्कशुध्द विच्छेदन आवडले. भक्ती, श्रध्दा वगैरे पट्ट्यांवर ते टिकत नाही हे ही आहेच.
पण जैनांच्या काही प्रथा शब्दशः इतक्या सुप्परस्ठार (श्रेयः अल्लूर्जुन) असतात की बस्स. वाहन न वापरता रस्त्यावरुन चालत जाणे, अगदी वयोबृध्द साध्वी पण व्हील्चेअरवरुन लांब लांब अंतरे पार करणे मग त्यांना सोबत आणि एस्कॉर्ट म्हणून अगदी गर्भश्रीमंतांनी टप्प्याटप्प्याने साथ देणे, त्यासाठी रस्ता आडवणे. कृत्रिम प्रकाश नाही, त्यांच्या त्या दीक्षा, त्यासाठीची कारणे, त्यांच्या जीवनपध्दती, केशलुंचन, संथारणा आणि त्यांचे भक्त वगैरे एकेक नवलच आहेत.
ह्यातलेच एक नवल म्हणायचे अन काय.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Tue, 06/25/2024 - 08:01
नवीन
बिपीन सुरेश सांगळे । सुरिया
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
अगदी अगदी...
किशोर किंवा तरुणवयीन मुला-मुलींनी दीक्षा/संन्यास घेणे हे त्या समाजात तसे नवीन नाही, पण आता अशा दीक्षा सोहळ्याचाही भव्य दिव्य 'इव्हेंट' केला जाऊ लागलाय! सात-आठ महिन्यांपूर्वी एका गर्भश्रीमंत घरातील वीस-बावीस वर्षीय तरुणीने 'संन्यास' घेण्याचा निर्णय घेतल्यावर खास 'प्री-दीक्षा' फोटोशूट करून शहरभर तिच्या विविध भावमुद्रांचे दर्शन घडवणाऱ्या फोटोंसकट काव्यपंक्ती आणि दीक्षा सोहळ्याची तारीख, ठिकाण वगैरे माहिती देणारे मोठमोठे फ्लेक्स चौका-चौकांत झळकले होते. सोहळ्याच्या दोन-चार दिवस आधी एका संध्याकाळी तिची उघड्या जीपमधून भव्य मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यावेळी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भर रहदारीच्या वेळी 'रस्ता आडवणे' सारखी इतरेजनांसाठी 'निरुपद्रवी' गोष्टही झाली.
गमतीचा भाग म्हणजे फ्लेक्सवरच्या तिच्या साजशृंगारातल्या सुंदर सुंदर छब्या पाहून तिच्या संन्यासाविषयी कौतुक वाटण्यापेक्षा 'एवढ्या देखण्या मुलीला हि काय अवदसा सुचली' ह्या अर्थाचीच चर्चा शहरवासियांमध्ये जास्त रंगली होती, तर तरुण-अविवाहित मंडळी 'वेगळ्याच' कारणासाठी 'हळहळत' होती 😀
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 06/25/2024 - 09:35
नवीन
असे प्रकार पूर्वीही कानावर आलेले आहेत.
यात " कुछ तो गडबड है..." असे वाटते. म्हणजे कसले तरी 'फाऊंडेशन' स्थापित करणे यात बहुतेकदा काहीतरी आर्थिक गणित/सोय/झमेला असतो, तसे यातही असावे, असे आमच्या बालबुद्धीस वाटते.
-- कुणी आतली खबर देणारा मिळाला तर विचारले पाहिजे. एकदोन आहेत मनमोकळे मित्र, त्यांना विचारून बघतो. (अर्थात आपल्याला काय करायच्या आहेत नसत्या उचापती ? हेही खरेच)
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 06/27/2024 - 11:43
नवीन
गडबड रेहनेकी संभावना तो हैं...
पण,
ह्याचा काही उपयोग होइल असे वाटत नाही. काहीवेळा आम्ही मित्रमंडळी गमतीत बोलत असलो तरी मुस्लिमांपेक्षा अधिक धार्मिक कट्टरता त्या लोकांमध्ये पाहिली आहे!
+१००० 😀
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 06/27/2024 - 12:20
नवीन
तुम्ही आणि चित्रगुप्त काका एकाच पंगतीतले.
आपल्याला काय करायचे आहे?
काडीचा रस नाही.
वगैरे सर्वात शेवटी एक वैधानिक सिग्नेचर टाकून सर्व चालू..
;-)
- Log in or register to post comments
न
नठ्यारा
गुरुवार, 06/27/2024 - 14:31
नवीन
अवांतर :
यावरनं आपल्या अमरावतीतल्या खाबियादीदी आणि तलवारनानांची गोष्ट आठवली ( इंग्रजी दुवा ) : https://www.hindustantimes.com/india/jain-sadhvi-in-police-custody/story-HL12xtfEBbVsYJrBmJdk7K.html
-ना.न.
- Log in or register to post comments
र
रामचंद्र
गुरुवार, 06/27/2024 - 14:55
नवीन
दुनिया की निगाहों में भला क्या है बुरा क्या
ये बोझ अगर दिल से उतर जाए तो अच्छा।
- Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड
Tue, 06/25/2024 - 10:09
नवीन
माझ्या एका मित्राने गावाकडे त्याच्या चुलत भावाला ५० बकऱ्या १० लाखात (२०१४ साली) घेऊन दिल्या होत्या. चुलत भावाने फक्त सांभाळायच्या नफा निम्मा निम्मा.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 06/27/2024 - 11:33
नवीन
मस्त! गेल्या १० वर्षांत त्यांची झालेली प्रगती वाचण्यास उत्सुक आहे.
- Log in or register to post comments
प
पॅट्रीक जेड
गुरुवार, 06/27/2024 - 19:36
नवीन
तो कंपनीत कालीग होता. तो पर्यंत चांगला मित्र होता. नंतर संपर्कच राहिला नाही.
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 06/25/2024 - 13:43
नवीन
मार्केटमध्ये मांसासाठी विकला जाणारा एक साधारण बोकड (कुर्बानीचा नव्हे) दहा हजार रुपयांना सरासरी असतो ही माहिती नव्हती. बरेच आश्चर्य वाटले. त्यात विकणेबल मांस किती किलो निघत असेल आणि एकूण रिटेल विक्रेत्यांचे नफ्याचे गणित कसे बसत असेल हा विचार आला.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 06/27/2024 - 12:10
नवीन
सगळा वजनाचा खेळ असतो!
सर्वसाधारणपणे जीवंत बोकडाच्या वजनाच्या ४८ ते ५० टक्के विक्रीयोग्य मांस खाटिकास मिळते आणि बोकडाच्या वजनाचा भाव हा मटणाच्या किमतीच्या अर्धा असतो. अर्थात उर्वरीत ५०-५२ टक्के भागातील फारच थोडा भाग 'टाकाउ' असतो, बाकी कातडी, शिंगे, हाडे आणि मुंडी, आतडी (वजडी), पाय-खुर अशा अनेक गोष्टी ज्या मटणाच्या तुलनेत कमी अधिक भावात विकल्या जातात त्या सर्वांचे एकत्रीत गणित केल्यास सर्वसाधारणपणे ३० ते ३२ किलोचा, १० हजार रुपये किमतीत खरेदी केलेला बोकड कापुन विकल्यावर खाटकास १००० ते १२०० रुपये नफा मिळतो.
अर्थात हे झाले बाजारात सर्वात जास्त प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या, आणि शेतकऱ्यांनी आणि छोट्या-मोठ्या शेळीपालकांनी कमी खर्चात साधारण वर्षभर चरवलेल्या/पोसलेल्या गावरान बोकडांचे गणित, पण त्यात अजुन बरेच झोल-झाल आहेत, जसे की जास्त वजनाच्या बोकडांची पैदास होण्यासाठी आपल्या कळपातील शेळ्यांना 'आफ्रीकन बोअर' ह्या विदेशी किंवा मांसोत्पादनासाठी प्रख्यात असलेल्या देशी जातीच्या बोकडांशी क्रॉसब्रीड करणे वगैरे...
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 06/27/2024 - 12:22
नवीन
माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद शेठ.
- Log in or register to post comments
स
सुरिया
गुरुवार, 06/27/2024 - 12:37
नवीन
बोलाई (मेंढा) च्या मटणाचा अर्थिक व्यवहार अजुन वेगळा. लोकर धरुन उत्पन्न. ;)
त्यालाही धार्मिक किनार आहे. इकडे मावळ भागात ज्यांची देवी बोल्हाई ते बोकडाचे मटण खात नाहीत. त्यामुळे बोलाईचा प्रसार अधिक. मराठवाड्यात तुळजाभवानीचा अजाबली पण मेंढ्याचा असतो मात्र नेवेद्याला बोकड. तिकडे बोलाईचे मट्ण फक्त देवाच्या कंदुरीला. बाकी नेहमी बोकडाचेच. हडपसर भागात स्पेशल उस्मानाबादी बकरे कापणारे खाटिक(हिंदूच) आहेत.
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 06/27/2024 - 12:52
नवीन
बोलाईचे मटण मिळेल असे काही ठिकाणी लिहिलेले वाचले होते त्याचा अर्थ आत्ता कळला. धन्यवाद. युरोप आणि अन्य काही देशांत जिथे जाऊ शकलो तिथे मटण म्हणजे lamb चेच मुख्यतः असते असे दिसले. बकरी बोकड फार नसावेत. याचाच पुढचा भाग एका आहार तज्ञ व्यक्तीकडून ऐकला की रेड मीट या घाऊक नावाखाली आपले मटण देखील बदनाम झाले आहे. पण आपण खातो ते बोकडाचे मांस हे चिकनपेक्षा देखील अधिक चांगले असते (जे रेड मीटचे दुर्गुण सांगितले जातात त्याच्या उलट)
लीन मीट असा शब्द वापरता येईल.
असेच खूप पूर्वी रान म्हणजे मांडी असे कळले होते. अर्थात मराठी मुलखात नव्हे.
वजडी थाळी हा आवडता पदार्थ असून देखील अनेक वर्षे वजडी म्हणजे किडनी असे वाटत असे (कुठेतरी ऐकून). पण मग कळले की आतडी. आता कोणी येऊन अन्य काही सांगेपर्यंत खाणे चालू ठेवल्या जाईल. ;-)
आणि हो. कपुरा म्हणजे काय ते हल्ली तूनळी कृपेने कळले. हा मराठी शब्द आहे की त्याला मराठीत काही वेगळा शब्द आहे कोण जाणे.
- Log in or register to post comments
B
Bhakti
गुरुवार, 06/27/2024 - 13:15
नवीन
हो हे मी पूर्वीपण एका धाग्यात सांगितले आहे.बोकड जर गावाकडे वाढवला असेल ,चांगल्या गवतावर ,खाण्या पिण्याचे तर त्याला प्रेफरन्स द्या कारण ते शहरी प्रदूषणमुक्त अन्न खाल्ल्याने,विथाऊट स्टेरोईड/इतर औषधांशिवाय असेल जे चिकन मध्ये सर्रास शहरी पोल्ट्रीत केलं जातं.
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 06/27/2024 - 13:25
नवीन
मी गावातील बोकड, पोल्ट्री बोकड असे तूर्त म्हणत नसून इतर रेड मीट आणि बोकड (एकूणच एक प्राणी म्हणून) यातील फरक म्हणत होतो. त्यात पुन्हा नैसर्गिक खाद्य आणि परिसर यांना प्राधान्य हे आहेच योग्य.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »