परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.
23 may 2024 : ध्यानाचा चौथा दिवस
सकाळी नेहमीप्रमाणे योग आसने ध्यानाचा वर्ग झाला. आता हे सारं अंगवळणी पडत चाललं आहे. ध्यानातील अनुभव इतके वैयक्तिक आणि खोलवरचे आहेत की ते लिहुन ठेवणं मला गरजेचे वाटत नाही. बस्स माऊलींच्या ओव्या , समर्थांचे श्लोक , तुकोबांचे अभंग आठवत राहतात.
दुपारी ज्योतिषशास्त्रावरील व्याख्यानात नवग्रह आणि त्यांचे परिणाम ह्यावर भाष्य झाले. दुपारी आयुर्वेदावरील सेशनमध्ये वात पित्त कफ ह्यावर चिंतन झाले. माझ्या मनात मात्र सकाळाच्या ध्यानाच्या वेळीस आले तेच विचार फिरत होते:
वाणीच्या चार लेव्हल आहेत : वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा.
वैखरी म्हणजे बडबड. जे लोक करत असतात . अखंड. निरर्थक. पण कोणतीही बडबड करायच्या आधी आपण आपल्या मेंदुत विचार करतो, शब्दांची जुळवाजुळव करतो ही झाली मध्यमा वाणी. मध्यमा म्हणजे फक्त विचार. म्हणजे आता समजा उदाहरण द्यायचे झाले तर आपण शांतपणे बसलो तर आपल्याला इथें पक्षांचा किलबिलाट ऐकु येतोय, ही त्यांची वैखरी झाली जी की आपल्याला कळत नाही. पण तेही काहीतरी विचार करत आहेत, घरटे बंधत आहेत, अन्नाचा शोध घेत आहेत , आपल्या प्रियकर प्रेयसीला शृंगारासाठी साद देत आहेत, अर्थात ते विचार करत आहेत, ही झाली मध्यमा .
ह्याच्याही पुढची लेव्हल म्हणजे - पश्यंती . पश्यंति म्हणजे पाहणे. इथे पाहणे हा शब्द समजुन उमगुन घेणे ह्या अर्थाने आहे. म्हणजे जी वणी केवळ पाहत आहे , अनुभवत आहे, अजुन शब्दांनाही उद्गम नाही. म्हणजे कसे की इथे हे प्रचंड वृक्ष आहेत जंगल आहे, ह्यातील झाडे बोलत नाहीत त्यांना वैखरी नाही, ते विचारही करत नाहीत अर्थात त्यांना मध्यमाही नाही, पण ते "पहात" आहेत. त्यांना "कळतं" की सुर्यप्रकाश कोठुन येत आहे, तिकडे त्यांच्या फांद्या वाढतात , पाने पसरतात, जमीनीत पाणी आहे तिकडे मुळे वाढतात. उन्हाळा आला की ती झाडे पानगळ करत आहेत, हिवाळा आला की ह्या झाडांच्या साली भेगाळत आहेत. झाडामध्ये जी चेतना आहे ते बस हे सर्व पहात आहे. ही झाली पश्यंति.
आणि परा म्हणजे त्याच्याही पलीकडे. "मी आहे" बस्स ही जी जाणीव आहे ती परा. तिथे काहीही पहायची गरज नाही , काही विचार करायची गरज नाही, काहीही बोलुन दाखवायची गरज नाही. बस्स "मी आहे" !
ह्याला मी पुर्वी एक सुंदर उपमा दिली होती - आपण आंबे खाताना उत्स्फुर्तपणे म्हणतो - "अहाहा क्या बात है कसला गोड आहे हा आंबा" ही झाली वैखरी. पण हे बोलायच्या आधी आपण आपल्या मनात विचार करतो , शब्द जुळवतो, ही झाली मध्यमा. पण ह्याच्याही आधी जेव्हा आपण आंबा खातोय तेव्हा आपण त्याची गोडी अनुभवत आहे , तिथे अजुन विचारंचाही जन्म झालेला नाही, बस्स निखळ आस्वाद आहे, ही झाली पश्यंति. आणि ह्याच्याही आधी नुसतं आंबा समोर दिसल्यावर आपल्याला माहीत आहे त्याचा गोडवा तिथे अजुन अभिव्यक्ती नाही, विचार नाही , आस्वादही नाही , बस्स "आहे" . ही झाली परा.
माऊली म्हणतात :
Can you see it ?
संध्याकाळी स्वामीजींच्या सेशनमध्ये मात्र बेकार conspiracy theories वर चर्चा झाली. जगात कसे सॅटॅनिक कल्ट्स आहेत, ते कल्ट काय काय काम करतात वगैरे. मी आधीच जेफ्री एप्स्टिन विषयी वाचलेले असल्याने मला कल्पना होती की ह्या जगात काहीही होऊ शकते, मला काही जास्त धक्का बसला नाही, पण अन्य अनेक लोकं अंतर्बाह्य हादरुन गेले होते. कित्येकांना तर झोपही लागली नसेल.
संविधानिक सुचना : ज्यांना शांत चित्ताने झोपायचे आहे त्यांनी हा माणूस कोण होता आणि त्याचे मित्र कोण कोण होते , आणि त्यांन्नी काय काय आसुरी कृत्ये केलेली आहेत हे इन्टरनेटवर शोधु नका. हे सारे एक अत्यंत वाईट दु:स्वप्न असल्यासारखे आहे, असे काही प्रत्यक्षात घडू शकते ह्यावर विश्वास बसत नाही आणि शिवाय हे केवळ हिमनगाचे टोक आहे, अजुन कित्ती काय काय चालले आहे ह्या जगात ह्याच्या विचाराने देखील एखादा संवेदनशील माणुस अंतर्बाह्य हादरुन जाईल. सीरीयसली, नका सर्च करु. अज्ञानात खरेच सुख असते.
असो. हे काही मला पटले नाही. आता आहेत जगात वाईट गोष्टी. त्यांच्या मला उल्लेखही करावासा वाटत नाही. ह्या गोष्टी ज्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्याला काय करणार. तुमच्याकडे चॉईस आहे, तुम्ही हिमालयात राहून ह्या असल्या बाष्कळ गोष्टीत मन गुंतवून ठेवू शकता किंवा अगदी शहरात राहून अलिप्त राहू शकता. तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवे ते!
नंतरच्या दिवसात स्वामीजींनी स्वतःच सांगितले की ते हे असे आजच्या काळातील घडामोडींसंदर्भातील सेशन का घेतात - जगात हे असे आसुरी वृत्तीचे लोकं आहेत, ते त्यांची साधना निरंतर आणि अत्यंत जोमाने करत आहेत. मग जे सात्विक लोकं आहेत त्यांनाही साधना करत रहायला हवेच , तुमच्या साधनेचा प्रकाश हा तुमच्या पुरता मर्यादित न राहता , तुमच्या घरात , तुमच्या आसपास, तुमच्या समाजात पसरणार आहे. जितके जास्त लोकं ध्यानधारणा , साधना करतील तितकाच समाज जास्त सात्विक होत जाईल आणि सत्वगुण वाढला की आपोआप तमोगुण नियंत्रणात राहील.
आणि ध्यान धारणा करायला आधी शरीर सुदृढ हवे म्हणुन आयुर्वेदानुसार जीवनशैली. साधनेसाठी उत्तम दोषमुक्त स्थान हवे म्हणुन वास्तुशास्त्र, साधनेत अन्य प्रापंचिक अडथळे येऊ नयेत म्हणुन ते आधीच जाणुन घेण्यासाठी म्हणुन ज्योतिष. असे हे सर्व कनेक्टेड आहे !
योगासने + ध्यान + आयुर्वेद + वास्तु + ज्योतिष +...... सर्व काही इंटिग्रेटेड !
_______________________________________________________________
२४ में २०२४: ध्यानाचा ४था दिवस.
आज सकाळचे ध्यान निवांत झाले. माझा एकूणच असा अनुभव आहे की संध्याकाळचे ध्यान जास्त रिलॅक्सिंग असते.
दुपारी वास्तू आणि आयुर्वेदच सेशन झालं.
आज संध्याकाळचे ध्यान अफलातून झालं. आज पहिल्यांदा मी जागृत स्वप्न सुषुप्ती अन् तुर्या अवस्थेमधील स्थित्यंतर पाहिलं. अहाहा. मजा आली.
बाकी संध्याकाळचे conspiracy theories सेशन मात्र नेहमी प्रमाणे बोरिंग. स्वामीजी इन जनरल जगात असलेल्या फूड पॉईझनिंग विषयी बोलले. प्लॅस्टिक्स, मारक्रोप्लास्टिक्स, अर्सेनिक , मर्क्युरी पॉईझनिंग , हझार्डस ऑफ मायक्रोव्हेव्ह.
नंतर ओघाओघाने फार्मासुटिकल्स इंडस्ट्री , त्यातील करप्शन , लॉबियिंग वगैरे वगैरे विषय आले . त्यातील एक गोष्ट मात्र अत्यंत रोचक वाटली, आणि नंतर मी ही वेरिफाय पण केली -
mRNA-1273 Vaccine Patent Landscape (For NIH-Moderna Vaccine) अर्थात मोडर्नाने कोव्हिडच्या एम. आरेने वॅक्स्सिन चे पेंटंट हे १२ जुन २०१९ अर्थात कोव्हिडचा सो कॉल्ड ऑट ब्रेक होण्याच्या जस्ट ६ महिने आधी काढलेले आहे !!!!
Patent/Published Application : US 10,703,789 Filing Date: June 12, 2019
आणि कोव्हिडच्या टेस्ट चे प्रोव्हिजनल पेटंट तर चक्क २०१५ मध्ये फाईल करण्यात आलेले आहे !
_______________________________________________________________
25 May 2024 : ध्यानाचा ६ वा दिवस
आज सकाळी ध्यान करताना मजेशीर अनुभव आला, ध्यानाच्या deep अवस्थेत असताना, एक मुलगी अचानक बेंबीच्या देठापासुन किंचाळली - जय गुरुदेव.
मलातरी - it's right over there ऐकू आले. =)))) पण खूप खराब वाटलं. बिचकलो बेकार.
पण नंतर लगेच लक्षात आलं की हे स्ट्रेस पॉकेट्स रीलीझ होत आहेत , चला किमान कोणीतरी मन लाऊन ध्यान करत आहे !!
ध्यानानंतर एक रम्य संध्याकाळ :
बाकी नंतर आज दुपारी गुरुजींनी छोटीशी परिक्षा घेतली, गुरुदेवांचा एक व्हिडीओ दाखवुन त्यावर आधारित काही प्रश्न ही विचारले. मला आले बऱ्यापैकी उत्तर देता : त्याचा सारांश खालील प्रमाणे.
What Maharshi said is essentially the theory of creation from Vaidik perspective. It's so different than Abrahamic perspective or modern science perspective of big bang.
The consciousness is Nirgun - Niraakar, omnipresent, ever-existent.
We don't believe in परिणामवाद , i.e. transformation of things, we believe in विवर्तवाद, the consciousness doesn't transform, the different things that we see is our illusion, Maya.
Maharshi gave example of the flower - it appears red with green leaves but if you go deeper, the basic rasaas are colorless, odorless.
It's सर्प रज्जू न्याय. We see rope and get afraid that it's a snake. But the moment we understand the reality that it's a rope, the illusion disappears. It is still there, only our perspective has changed.
That's how , आधिभौतिक सत्ता is created from अध्यात्मिक... And in between what happens is - आधीदैविक सत्ता. So if we want to make changes in आधिभौतिक, we need to work on empowering आधीदैविक. And how do we do that, by studying Vedas. Once आधीदैविक is sorted and our consciousness becomes pure and clear, the Vedas will "appear" to us. Vedas are not in books which you can read. Vedas are Shruti, you will hear them .
स्वामीजी म्हणाले - You explained it the best. आणि नंतर गालातल्या गालात हसत म्हणाले - It took me 20 years to understand this and you got it in just 7 days' shivir !
त्यांच्या हसण्यात "कळणं " ही एक गोष्ट आहे , "अनुभवणं " ही दुसरी गोष्ट आहे आणि "त्या अनुसार जगणं" ही त्याहुन वेगळीच तिसरी गोष्ट आहे असा काहीसा मतितार्थ होता असे मला वाटले.
पण किमान पहिली लेव्हल तरी टच करु शकलो ह्या विचाराने मी भरुन पावलो.
:)
_______________________________________________________________
26 May 2024
अशा रितीने काल सहा दिवसांचे शिबिर संपूर्ण झाले.
आपण काय शिकलो ?
ध्यानाचे महत्व ! पतंजलीचा अष्टांग योग हा अष्ट अंग योग आहे , त्यातील आठ ही अंगे आहेत , स्टेपस नाहीत , तस्मात ते एकानंतर एक असे करायचे नसुन सर्व एकत्रच सुरु करायचे आहे. होय होय. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. सर्व एकत्र . आणि जसे बाळ सर्वच आंगाने समान रितीने विकसीत होत जाते तसे तसे आपला योग विकसीत होत जाईल !
हे सर्व करत असताना सात्विक आयुर्वेदानुसार जीवनशैली , नित्य साधना हवीच . शिवाय नियंत्रणाबाहेरील प्रतिकुल गोष्टींवर उपाय म्हणुन आपण वास्तु आणि ज्योतिषाचा आधार घेऊ !
पण
मनाशी हे ठाम असु दे की -
A true vedanti will not push anything away. People try to push away what they perceive as bad and want only what is perceived as good. But for a true vedanti, there is no duality, bad and good, so he will not do that.
A true vedanti can not push anything away, because, good, bad ugly, is all Brahman, how it can be pushed away!
The only thing true vedanti can do is to see his own detachment with bad things on materialistic levels but on a spiritual level he still has constant realization, it's still Brahman.
So embrace the good things, and be detached with bad things ,but always remember, they are equal.
ही साधना आहे, हळु हळु जमेल. चरैवति चरैवति !
चालत रहा , चालत रहा :
आता बस ध्यानाचा अवस्थेत खोल खोल उतरत जा. वैखरी , मध्यमा , पश्यंति, परा.... बस्स आता अजुन काय बोलणार . शब्दातीत ... भावातीत .... केवळ मौन अशी अवस्था आणि अनुभव अनुभाव्य आणि अनुभाविक ही त्रुपुटीही नाही अशी अवस्था !
आम्हां आम्ही आता वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ।।१।। फावला एकांत एकविध भाव । हरी आम्हांसवें सर्व भोगी ।।२।। तुका म्हणे अंगसंग एकें ठायीं । असों जेथें नाहीं दुजे कोणी ।।३।।आश्रमाकडे निर्देश करणारा एकमेव फलक :
दुपारी ज्योतिषशास्त्रावरील व्याख्यानात नवग्रह आणि त्यांचे परिणाम ह्यावर भाष्य झाले. दुपारी आयुर्वेदावरील सेशनमध्ये वात पित्त कफ ह्यावर चिंतन झाले. माझ्या मनात मात्र सकाळाच्या ध्यानाच्या वेळीस आले तेच विचार फिरत होते:
वाणीच्या चार लेव्हल आहेत : वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा.
वैखरी म्हणजे बडबड. जे लोक करत असतात . अखंड. निरर्थक. पण कोणतीही बडबड करायच्या आधी आपण आपल्या मेंदुत विचार करतो, शब्दांची जुळवाजुळव करतो ही झाली मध्यमा वाणी. मध्यमा म्हणजे फक्त विचार. म्हणजे आता समजा उदाहरण द्यायचे झाले तर आपण शांतपणे बसलो तर आपल्याला इथें पक्षांचा किलबिलाट ऐकु येतोय, ही त्यांची वैखरी झाली जी की आपल्याला कळत नाही. पण तेही काहीतरी विचार करत आहेत, घरटे बंधत आहेत, अन्नाचा शोध घेत आहेत , आपल्या प्रियकर प्रेयसीला शृंगारासाठी साद देत आहेत, अर्थात ते विचार करत आहेत, ही झाली मध्यमा .
ह्याच्याही पुढची लेव्हल म्हणजे - पश्यंती . पश्यंति म्हणजे पाहणे. इथे पाहणे हा शब्द समजुन उमगुन घेणे ह्या अर्थाने आहे. म्हणजे जी वणी केवळ पाहत आहे , अनुभवत आहे, अजुन शब्दांनाही उद्गम नाही. म्हणजे कसे की इथे हे प्रचंड वृक्ष आहेत जंगल आहे, ह्यातील झाडे बोलत नाहीत त्यांना वैखरी नाही, ते विचारही करत नाहीत अर्थात त्यांना मध्यमाही नाही, पण ते "पहात" आहेत. त्यांना "कळतं" की सुर्यप्रकाश कोठुन येत आहे, तिकडे त्यांच्या फांद्या वाढतात , पाने पसरतात, जमीनीत पाणी आहे तिकडे मुळे वाढतात. उन्हाळा आला की ती झाडे पानगळ करत आहेत, हिवाळा आला की ह्या झाडांच्या साली भेगाळत आहेत. झाडामध्ये जी चेतना आहे ते बस हे सर्व पहात आहे. ही झाली पश्यंति.
आणि परा म्हणजे त्याच्याही पलीकडे. "मी आहे" बस्स ही जी जाणीव आहे ती परा. तिथे काहीही पहायची गरज नाही , काही विचार करायची गरज नाही, काहीही बोलुन दाखवायची गरज नाही. बस्स "मी आहे" !
ह्याला मी पुर्वी एक सुंदर उपमा दिली होती - आपण आंबे खाताना उत्स्फुर्तपणे म्हणतो - "अहाहा क्या बात है कसला गोड आहे हा आंबा" ही झाली वैखरी. पण हे बोलायच्या आधी आपण आपल्या मनात विचार करतो , शब्द जुळवतो, ही झाली मध्यमा. पण ह्याच्याही आधी जेव्हा आपण आंबा खातोय तेव्हा आपण त्याची गोडी अनुभवत आहे , तिथे अजुन विचारंचाही जन्म झालेला नाही, बस्स निखळ आस्वाद आहे, ही झाली पश्यंति. आणि ह्याच्याही आधी नुसतं आंबा समोर दिसल्यावर आपल्याला माहीत आहे त्याचा गोडवा तिथे अजुन अभिव्यक्ती नाही, विचार नाही , आस्वादही नाही , बस्स "आहे" . ही झाली परा.
माऊली म्हणतात :
कां न सज्जितां विणा । तो नादु जो अबोलपणा । तया तेणेंचि जाणा । होआवें लागे ॥ ५-४१ ॥वीणा झंकारली नाही तरी त्याचाही आधी नाद आहे , जो अबोल आहे, तो कळायला तुम्हाला जाणकारच व्हावे लागेल ! आपण पश्यंति लेव्हलला राहू शकतो, आणि पराला जाण्याचा प्रयत्न करू. Can you hear it?
Can you see it ?
संध्याकाळी स्वामीजींच्या सेशनमध्ये मात्र बेकार conspiracy theories वर चर्चा झाली. जगात कसे सॅटॅनिक कल्ट्स आहेत, ते कल्ट काय काय काम करतात वगैरे. मी आधीच जेफ्री एप्स्टिन विषयी वाचलेले असल्याने मला कल्पना होती की ह्या जगात काहीही होऊ शकते, मला काही जास्त धक्का बसला नाही, पण अन्य अनेक लोकं अंतर्बाह्य हादरुन गेले होते. कित्येकांना तर झोपही लागली नसेल.
संविधानिक सुचना : ज्यांना शांत चित्ताने झोपायचे आहे त्यांनी हा माणूस कोण होता आणि त्याचे मित्र कोण कोण होते , आणि त्यांन्नी काय काय आसुरी कृत्ये केलेली आहेत हे इन्टरनेटवर शोधु नका. हे सारे एक अत्यंत वाईट दु:स्वप्न असल्यासारखे आहे, असे काही प्रत्यक्षात घडू शकते ह्यावर विश्वास बसत नाही आणि शिवाय हे केवळ हिमनगाचे टोक आहे, अजुन कित्ती काय काय चालले आहे ह्या जगात ह्याच्या विचाराने देखील एखादा संवेदनशील माणुस अंतर्बाह्य हादरुन जाईल. सीरीयसली, नका सर्च करु. अज्ञानात खरेच सुख असते.
असो. हे काही मला पटले नाही. आता आहेत जगात वाईट गोष्टी. त्यांच्या मला उल्लेखही करावासा वाटत नाही. ह्या गोष्टी ज्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्याला काय करणार. तुमच्याकडे चॉईस आहे, तुम्ही हिमालयात राहून ह्या असल्या बाष्कळ गोष्टीत मन गुंतवून ठेवू शकता किंवा अगदी शहरात राहून अलिप्त राहू शकता. तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवे ते!
नंतरच्या दिवसात स्वामीजींनी स्वतःच सांगितले की ते हे असे आजच्या काळातील घडामोडींसंदर्भातील सेशन का घेतात - जगात हे असे आसुरी वृत्तीचे लोकं आहेत, ते त्यांची साधना निरंतर आणि अत्यंत जोमाने करत आहेत. मग जे सात्विक लोकं आहेत त्यांनाही साधना करत रहायला हवेच , तुमच्या साधनेचा प्रकाश हा तुमच्या पुरता मर्यादित न राहता , तुमच्या घरात , तुमच्या आसपास, तुमच्या समाजात पसरणार आहे. जितके जास्त लोकं ध्यानधारणा , साधना करतील तितकाच समाज जास्त सात्विक होत जाईल आणि सत्वगुण वाढला की आपोआप तमोगुण नियंत्रणात राहील.
आणि ध्यान धारणा करायला आधी शरीर सुदृढ हवे म्हणुन आयुर्वेदानुसार जीवनशैली. साधनेसाठी उत्तम दोषमुक्त स्थान हवे म्हणुन वास्तुशास्त्र, साधनेत अन्य प्रापंचिक अडथळे येऊ नयेत म्हणुन ते आधीच जाणुन घेण्यासाठी म्हणुन ज्योतिष. असे हे सर्व कनेक्टेड आहे !
योगासने + ध्यान + आयुर्वेद + वास्तु + ज्योतिष +...... सर्व काही इंटिग्रेटेड !
_______________________________________________________________
२४ में २०२४: ध्यानाचा ४था दिवस.
आज सकाळचे ध्यान निवांत झाले. माझा एकूणच असा अनुभव आहे की संध्याकाळचे ध्यान जास्त रिलॅक्सिंग असते.
दुपारी वास्तू आणि आयुर्वेदच सेशन झालं.
आज संध्याकाळचे ध्यान अफलातून झालं. आज पहिल्यांदा मी जागृत स्वप्न सुषुप्ती अन् तुर्या अवस्थेमधील स्थित्यंतर पाहिलं. अहाहा. मजा आली.
बाकी संध्याकाळचे conspiracy theories सेशन मात्र नेहमी प्रमाणे बोरिंग. स्वामीजी इन जनरल जगात असलेल्या फूड पॉईझनिंग विषयी बोलले. प्लॅस्टिक्स, मारक्रोप्लास्टिक्स, अर्सेनिक , मर्क्युरी पॉईझनिंग , हझार्डस ऑफ मायक्रोव्हेव्ह.
नंतर ओघाओघाने फार्मासुटिकल्स इंडस्ट्री , त्यातील करप्शन , लॉबियिंग वगैरे वगैरे विषय आले . त्यातील एक गोष्ट मात्र अत्यंत रोचक वाटली, आणि नंतर मी ही वेरिफाय पण केली -
mRNA-1273 Vaccine Patent Landscape (For NIH-Moderna Vaccine) अर्थात मोडर्नाने कोव्हिडच्या एम. आरेने वॅक्स्सिन चे पेंटंट हे १२ जुन २०१९ अर्थात कोव्हिडचा सो कॉल्ड ऑट ब्रेक होण्याच्या जस्ट ६ महिने आधी काढलेले आहे !!!!
Patent/Published Application : US 10,703,789 Filing Date: June 12, 2019
आणि कोव्हिडच्या टेस्ट चे प्रोव्हिजनल पेटंट तर चक्क २०१५ मध्ये फाईल करण्यात आलेले आहे !
_______________________________________________________________
25 May 2024 : ध्यानाचा ६ वा दिवस
आज सकाळी ध्यान करताना मजेशीर अनुभव आला, ध्यानाच्या deep अवस्थेत असताना, एक मुलगी अचानक बेंबीच्या देठापासुन किंचाळली - जय गुरुदेव.
मलातरी - it's right over there ऐकू आले. =)))) पण खूप खराब वाटलं. बिचकलो बेकार.
पण नंतर लगेच लक्षात आलं की हे स्ट्रेस पॉकेट्स रीलीझ होत आहेत , चला किमान कोणीतरी मन लाऊन ध्यान करत आहे !!
ध्यानानंतर एक रम्य संध्याकाळ :
बाकी नंतर आज दुपारी गुरुजींनी छोटीशी परिक्षा घेतली, गुरुदेवांचा एक व्हिडीओ दाखवुन त्यावर आधारित काही प्रश्न ही विचारले. मला आले बऱ्यापैकी उत्तर देता : त्याचा सारांश खालील प्रमाणे.
What Maharshi said is essentially the theory of creation from Vaidik perspective. It's so different than Abrahamic perspective or modern science perspective of big bang.
The consciousness is Nirgun - Niraakar, omnipresent, ever-existent.
We don't believe in परिणामवाद , i.e. transformation of things, we believe in विवर्तवाद, the consciousness doesn't transform, the different things that we see is our illusion, Maya.
Maharshi gave example of the flower - it appears red with green leaves but if you go deeper, the basic rasaas are colorless, odorless.
It's सर्प रज्जू न्याय. We see rope and get afraid that it's a snake. But the moment we understand the reality that it's a rope, the illusion disappears. It is still there, only our perspective has changed.
That's how , आधिभौतिक सत्ता is created from अध्यात्मिक... And in between what happens is - आधीदैविक सत्ता. So if we want to make changes in आधिभौतिक, we need to work on empowering आधीदैविक. And how do we do that, by studying Vedas. Once आधीदैविक is sorted and our consciousness becomes pure and clear, the Vedas will "appear" to us. Vedas are not in books which you can read. Vedas are Shruti, you will hear them .
स्वामीजी म्हणाले - You explained it the best. आणि नंतर गालातल्या गालात हसत म्हणाले - It took me 20 years to understand this and you got it in just 7 days' shivir !
त्यांच्या हसण्यात "कळणं " ही एक गोष्ट आहे , "अनुभवणं " ही दुसरी गोष्ट आहे आणि "त्या अनुसार जगणं" ही त्याहुन वेगळीच तिसरी गोष्ट आहे असा काहीसा मतितार्थ होता असे मला वाटले.
पण किमान पहिली लेव्हल तरी टच करु शकलो ह्या विचाराने मी भरुन पावलो.
:)
_______________________________________________________________
26 May 2024
अशा रितीने काल सहा दिवसांचे शिबिर संपूर्ण झाले.
आपण काय शिकलो ?
ध्यानाचे महत्व ! पतंजलीचा अष्टांग योग हा अष्ट अंग योग आहे , त्यातील आठ ही अंगे आहेत , स्टेपस नाहीत , तस्मात ते एकानंतर एक असे करायचे नसुन सर्व एकत्रच सुरु करायचे आहे. होय होय. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. सर्व एकत्र . आणि जसे बाळ सर्वच आंगाने समान रितीने विकसीत होत जाते तसे तसे आपला योग विकसीत होत जाईल !
हे सर्व करत असताना सात्विक आयुर्वेदानुसार जीवनशैली , नित्य साधना हवीच . शिवाय नियंत्रणाबाहेरील प्रतिकुल गोष्टींवर उपाय म्हणुन आपण वास्तु आणि ज्योतिषाचा आधार घेऊ !
पण
मनाशी हे ठाम असु दे की -
A true vedanti will not push anything away. People try to push away what they perceive as bad and want only what is perceived as good. But for a true vedanti, there is no duality, bad and good, so he will not do that.
A true vedanti can not push anything away, because, good, bad ugly, is all Brahman, how it can be pushed away!
The only thing true vedanti can do is to see his own detachment with bad things on materialistic levels but on a spiritual level he still has constant realization, it's still Brahman.
So embrace the good things, and be detached with bad things ,but always remember, they are equal.
ही साधना आहे, हळु हळु जमेल. चरैवति चरैवति !
चालत रहा , चालत रहा :
आता बस ध्यानाचा अवस्थेत खोल खोल उतरत जा. वैखरी , मध्यमा , पश्यंति, परा.... बस्स आता अजुन काय बोलणार . शब्दातीत ... भावातीत .... केवळ मौन अशी अवस्था आणि अनुभव अनुभाव्य आणि अनुभाविक ही त्रुपुटीही नाही अशी अवस्था !
झाला देवोचि भक्तु । ठावोचि झाला पंथु । होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥ ९-३५ ॥:) पांडुरंग पांडुरंग ! इति श्रीकृष्णार्पणमस्तु ! _______________________________________________________________ संपुर्ण. कर्ता करविता श्रीराम समर्थ || _______________________________________________________________
अज्ञानातून विज्ञानाकडे, सुखदुखातून आनंदाकडे, असत्यातून सत्याकडे, आणि अशुद्ध ज्ञानातून शुद्ध ज्ञानात प्रवेश करण्याचा शास्त्रोक्त, आणि तर्कशुद्ध राजमार्ग हा फक्त आपल्या भारतात, आणि फक्त भारतीय अध्यात्मशास्त्रात, आणि संत साहित्यात. हे ग्रंथ प्रत्यक्ष स्वताच्या डोळ्यांनी याच जन्मात वाचल्याशिवाय प्रत्यक्ष अनुभव हा कधीही येणार नाही, नाही, आणि नाही. -फडके एस.एम.एनएका सुंदर अनुभव घनाचा आनंद मिळाला, प्रगो अभिनंदन! आता त्या वर्षा मध्ये सतत सुख अनुभवत राहा.