Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

22 जानेवारीचा ऐतिहासिक दिवस: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा

व
वेडा बेडूक
Tue, 01/02/2024 - 11:26
🗣 199 प्रतिसाद
भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आले आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली. तीच बाबरी मशीद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता. १८५३ साली पहिल्यांदा हिंदू समुदायातील लोकांनी बाबरी मशीद आहे ती जागा राम मंदिराची होती आणि तिथे बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधले जावे अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली आणि त्याबाबत खटला देखील कोर्टात दाखल केला. तेंव्हा पहिल्यांदा अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद या वादावरून दोन समुदायात दंगल झाली. १८५९ साली ब्रिटिश सरकारने अयोध्येतील वादग्रस्त जागेला कुंपण घातले आणि मशिदीत मुस्लिम लोकांना तर बाहेर रिकाम्या जागेत चौथऱ्यावर हिंदूंना पूजा करण्याची परवानगी आली. फेब्रुवारी १८८५ मध्ये महंत रघुवर दास यांनी फैजाबाद उपजिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल करून वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याची परवानगी मागितली. पण बांधण्यासाठी अनुमती देण्यास कोर्टाने नकार दिला. २३ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त जागेवर प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आढळून आल्याने या वादाने नवे वळण घेतले. अयोध्येत राम प्रकट झाले असा दावा हिंदूंनी केला तर मुस्लिम लोकांनी यावर आक्षेप घेत कोणी तरी रात्रीच्या अंधारात मूर्ती आणून तिथे ठेवल्याचा दावा केला. तो वाद वाढू लागला म्हणून तत्कालीन सरकारने ‘वादग्रस्त वास्तू’ म्हणून शिक्का लावला आणि मशिदीला टाळे लावले. १६ जानेवारी १९५० रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसेच कोणत्या ही अडथळ्या शिवाय मुर्त्यांची पूजा सुरू ठेवण्यात यावी, अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली. न्यायालयाने मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील. जनता बाहेरून दर्शन घेईल, असे आदेश दिले. सन १९५९ मध्ये निर्मोही आखाड्याने कोर्टात मंदिर उभारणीसाठी दावा दाखल केला तर सन १९६१ मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही कोर्टात मशिदीचा दावा दाखल केला. सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली. १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयात वादग्रस्त ठिकाणी लावण्यात आलेले टाळे उघडून हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार बहाल करण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयाला विरोध करत बाबरी मशीद संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि राजीव गांधी पंतप्रधान होते. १९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराच्या दाव्या विषयक आणखीन एक खटला न्यायालयात दाखल केला आणि नोव्हेंबर १९८९ मध्ये केंद्र सरकार म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या परवानगीने बाबरी मशिदीच्या काही अंतर दूर राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सन १९९० साली भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली. त्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने बिहारमध्ये ही रथरात्रा रोखली आणि लाल कृष्ण अडवाणी यांना अटक केली. सन १९९१ मध्ये रथयात्रेचा भाजपला मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आले आणि देश भरातून राम मंदिर उभारणीसाठी विटांची मोहीम सुरू झाली. ३० ते ३१ ऑक्टोंबर १९९२ रोजी धर्म संसदेत कारसेवेची घोषणा करण्यात आली आणि नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं. ६ डिसेंबर १९९२ रोजी लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले ते ११:५० वाजता मशिदीच्या घुमटावर चढले जवळ पास ४:३० वाजेपर्यंत मशीद उदध्वस्त करण्यात आली. घाईघाईत एक लहान मंदिर तिथे उभारण्यात आले. बाबरी मशीद पाडली आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. या दंगलीत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एम.एस लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली. १ जानेवारी २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अयोध्या विभागाची स्थापना केली. हिंदू मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधण्याची व वाद मिटवण्याची जबाबदारी अयोध्या विभागावर सोपवली. वादग्रस्त जागेवर मंदिर कधी अस्तित्वात होते का? याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयाने पुरातत्व विभागाला सन २००३ मध्ये उत्खनन करण्याचे आदेश दिले. बाबरी मशीद पाडली तिथे उत्खनन करण्यात आले, जिथे मशीद पाडली तिथे दहाव्या शतकातील राम मंदिराचे अवशेष आढळून आले व तेथे राम मंदिर होते हे पुराव्या साहित सिद्ध झाले आणि तसा अहवाल भारतीय पुरातत्व खात्याने कोर्टात सादर केला. ३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात समसमान वाटण्याचा निर्णय दिला. या निर्णयाला सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ रोजी स्थगिती दिली. सन २०१७ लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या सह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. ८ फेब्रुवारी रोजी सुन्नी वक्फ बोर्डा तर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी नियमित व्हावी अशी विनंती केली. ती विनंती कोर्टाने फेटाळली. १९९४ मध्ये इस्माईल फारुखी विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खटल्यात दिलेल्या निकलाचा फेरविचार व्हावा व हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावे अशी मागणी राजीव धवन यांनी केली. ती मागणी देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल देत संपूर्ण वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी दिली. सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जमिनीपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारणीसाठी देण्याचा निर्णय दिला. ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहित १७५ जणांना सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. अशा प्रकारे प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत त्यांचे मंदिर उभारले जात आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. "हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार दूर होवो आणि लौकरच रामराज्य येवो ही प्रार्थना! ||जय श्रीराम||

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 59953 views

🗣 चर्चा (199)
र
रंगीला रतन Tue, 01/02/2024 - 12:18 नवीन
घंटा, थाळी वाजवणे दिवे लावणे ज्याना आवडत नाही त्याना फाट्यावर मारुन २२ जानेवारिला दिवे लावणार ||जय श्रीराम||
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/03/2024 - 09:38 नवीन
हिंदू घरात तसाही रोज दिवा लावला जातो. पंतप्रधानांनी सांगीतलं तरच हिंदू दिवे लावतील असं काही नाहीये.
स
सुजित जाधव Mon, 01/08/2024 - 15:48 नवीन
फक्त दिवेच नाही तर प्रत्येक हिंदू कुटुंबात पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जाईल..
र
रंगीला रतन Mon, 01/08/2024 - 17:13 नवीन
+०८०१२०२४
म
मुक्त विहारि Tue, 01/02/2024 - 12:29 नवीन
ह्या निमित्ताने आठवलेली अजून तीन व्यक्तिमत्वे.. K.k.Nayar (https://en.wikipedia.org/wiki/K._K._Nayar) आणि शकुंतला नायर. (https://en.wikipedia.org/wiki/Shakuntala_Nayar) वरील दोघांनी , राम मंदिरासाठी प्रयत्न केले... आणि परमपूज्य नेहरू यांनी, नायर यांना, ह्या प्रकरणा वरून त्रास दिला... ------- Let's remember K.K.Nair, the hero who was responsible for us to get the land of Sri Rama in Ayodhya. Kandangalam Karunakaran Nair known as K.K.Nair was born on September 7, 1907 in a small village called Gutankadu, Alappuzha, Kerala. Before India's independence, he went to England and at the age of 21, became a barrister and succeeded in the ICS examination before returning home. He worked in Kerala for some time and was known for his honesty and bravery and earned a reputation as a servant of the people. In 1945 he joined Uttar Pradesh state as a civil servant. He served in various posts and was appointed Deputy Commissioner and District Magistrate of Faizabad on June 1, 1949.Following a complaint that the child Ram Vigraham was suddenly kept in Ayodhya the then Prime Minister Nehru ordered the state government to investigate and submit a report. The Chief Minister of the state, Govind Vallabh Pant, requested K.K.Nair to go there and make enquiries. Nair asked his subordinate, Shri Guru Dutt Singh, to investigate and submit a report. Singh went there and presented a detailed report to KK Nair. His report said that Hindus worshiped Ayodya as the birthplace of Lord Rama (Ram Lalla). But the Muslims were creating problems claiming there was a mosque. His report reiterated that it was a Hindu temple. He suggested that a big temple should be built there. His report said that the government should allocate land for it and Muslims should be banned from going to that area. Based on that report Nair issued orders prohibiting Muslims from going within a radius of 500 meters of the temple. (It is noteworthy that neither the government nor the court has been able to lift this ban till date). Hearing this, Nehru fretted and fumed and got upset. He wanted the state government to order the immediate evacuation of the Hindus from the area and removal of the infant Ram Lalla. The Chief Minister Govind Vallabh Pant ordered Nair to immediately evacuate the Hindus and remove the idol of the infant Ram Lalla. Nehru vs, Nair But Nair refused to implement the order. On the other hand, he issued another order stating that daily pooja should be performed to baby Rama. The order also said that the government should bear the cost for the pooja and the salary of the priest who performed pooja. Terrified by this order, Nehru immediately ordered Nair’s removal from service. When dismissed, Nair went to the Allahabad court and himself argued successfully against Nehru. The court ordered that Nair should be reinstated and allowed to work in the same place. The court's order was like smearing Nehru’s face with black ink. Hearing this order, the residents of Ayodhya urged Nair to contest in the elections But Nair pointed out that being a government servant he could not stand for elections. The residents of Ayodhya wanted Nair's wife to contest. Accepting the people's request, Mrs. Shakuntala Nair entered the fray as a candidate in Ayodhya during Uttar Pradesh's first Legislative Assembly elections. At that time, the Congress candidates won all over the country. In Ayodhya alone, the Congress candidate who contested against Nair's wife lost by a margin of several thousands. Mrs. Shakuntala Nair joined the Jana Sangh in 1952 and started developing the organisation. A shocked Nehru and the Congress started pressurising Nair. He resigned from his post and started working as an advocate in the Allahabad High Court. When the elections for the Parliament was announced in the year 1962, the people succeeded in persuading Nair and his wife to contest. They wanted him to speak about Ayodhya before Nehru. The people helped the Nair couple to win both Bahraich and Kaisarganj constituencies. It was a historic achievement.. (वरील सर्व माहिती, विकिपीडिया कडून कॉपी पेस्ट केली आहे.)
म
मुक्त विहारि Wed, 01/17/2024 - 17:17 नवीन
https://www.tv9marathi.com/national/kk-nair-took-issue-with-pandit-nehru-for-the-idol-in-the-ram-temple-in-ayodhya-marathi-news-1116644.html ------- काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, कधीच हिंदुंची बाजू घेणार नाहीत... हे माझे वैयक्तिक मत आहे...
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/17/2024 - 17:40 नवीन
काका राजकीय कमेंट्स नको. त्यावर बंदी आहे.
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/18/2024 - 17:42 नवीन
प्रश्न जेंव्हा धर्माचा येतो, तेंव्हा, राजकीय वगैरे बघायचे नसते...
क
कंजूस Wed, 01/03/2024 - 09:50 नवीन
आता जानेवारीतल्या मुख्य सण तारखा १४,२२,२६.
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/03/2024 - 11:45 नवीन
मंदिर पुर्ण व्हायला अजून दोन वर्षे आहेत. पुर्ण व्हायच्या आधीच ऊद्घाटन होणारे राममंदीर हे ईतिहासातील पहिलेच मंदिर ठरेल. मेट्रोच्या बाबतीत पुणे मेट्रो ने नाव कमावलेय. तीचे आतापर्यंत दोन वेळा ऊद्घाटन झालेय.:)
स
स्वरुपसुमित Sun, 01/07/2024 - 17:43 नवीन
कधी नगर ला याच
व
वामन देशमुख Wed, 01/03/2024 - 12:03 नवीन
मंदिर उभारणी कार्यातील सर्व ज्ञात-अज्ञात हिंदूंना धन्यवाद. जय श्रीराम! _/\_
च
चौथा कोनाडा Wed, 01/03/2024 - 13:38 नवीन
वेडा बेडु़क. तुमचं सदस्य नाम आवडलं. तुमचा मागचा आदिपुरुष हा अल्पधागा वाचला होता. हा लेख बराच मोठा दिसतोय. सवडीने वाचतो अन प्रतिक्रिया देतो. रुमाल टाकून ठेवलेला आहे. (एक शणखा: हा लेख कायप्पावर वाचल्यासारखा आठवतोय)
न
नठ्यारा Wed, 01/03/2024 - 19:26 नवीन
वेडा बेडूक, अर्ध्या सहस्रकाच्या अथक संघर्षानंतर अयोध्येत राममंदिर उभारलं जाणार याचा आनंद आहे. मात्र काळ सोकावू नये ही इच्छा. खरंतर बाबरी मशीद नामे कोणतीही वास्तू कधीही अस्तित्वात नव्हती. मीर बांकी यास बांधकाम करायची अक्कल नव्हती. त्याने जे काही केलं त्यास जुनं राममंदिर बाटवणे म्हणतात. ते जुनं राममंदिर हिंदूंनी इ.स. १९८९ साली पाडलं. पाडलेल्या वास्तूची असंख्य छायाचित्रे उपलब्ध आहेत. त्यावरून ती मशीद नक्कीच दिसंत नाही. हिंदूंचं मंदिर हिंदूंनी पाडलं, तर मग मुसलमानांना मशीद बांधायला पाच एकर कसले मिळताहेत? विनाकारण अयोध्येत मुस्लिमांची उपस्थिती का सहन केली जातेय? इजाज प्रांती मक्केच्या बाहेर हिंदू मंदिर बांधायला परवानगी देतील काय? अयोध्येत मशिदीच्या निमित्ताने काळ सोकावू नये, बस इतकंच. -नाठाळ नठ्या
B
Bhakti गुरुवार, 01/04/2024 - 06:01 नवीन
माझा काका त्यावेळी अयोध्याला गेला होता.काकू ,आजी सतत रेडिओ ऐकत होत्या.आज त्याला ते मानाचे २२ तारखेचे आमंत्रण आहे.अभिमान वाटतोय.रामाला वनवासही प्रिय होता,त्याला मंदिराची गरज नाही..पण आम्हाला त्या रामाची नितांत गरज होती , आहे,राहणार!
उ
उनाड गुरुवार, 01/04/2024 - 13:59 नवीन
की मोदीजींची ?
व
विवेकपटाईत Sun, 01/07/2024 - 14:04 नवीन
धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतारी पुरुष जन्म घेतात. त्रेता युगात श्रीराम आणि हनुमान, द्वापर युगात कृष्ण आणि अर्जुन आणि कलयुगात मोदीजी आणि योगी जी.
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 01/07/2024 - 14:50 नवीन
दुरूस्ती, धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतारी पुरुष जन्म घेतात. त्रेता युगात श्रीराम आणि हनुमान, द्वापर युगात कृष्ण आणि अर्जुन आणि कलयुगात नेहरूजी आणि वल्लभभाई पटेल.
अ
अहिरावण Wed, 01/10/2024 - 06:34 नवीन
कलयुगात नेहरूजी आणि वल्लभभाई पटेल. छे छे संजय गांधी आणि सज्जनकुमार
व
विवेकपटाईत गुरुवार, 01/11/2024 - 06:18 नवीन
गुड जोक.भगवंताचे कार्य करणारे अवतारी पुरुष असतात. इतिहासात मोदी योगी रामकाज करून अमर होणार,हे त्रिकाळ सत्य आहे.
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 01/11/2024 - 06:29 नवीन
आजिबात नाही. तसा तुमचा गैरसमज आहे.
च
चौथा कोनाडा Fri, 01/12/2024 - 10:31 नवीन
यात माननिय भगवंत मान आणि महोदय अरविंद केजरीवाल यांचा मानभंग करताय असं नाही का वाटत तुम्हाला ?
अ
अहिरावण Fri, 01/12/2024 - 15:15 नवीन
सहमत आहे. तसेच अजून काही जोड्या मुलायम आणि लालू अखिलेख आणि नितीश उद्धव आणि संजय शरद आणि जितेंद्र
क
कपिलमुनी Sat, 01/20/2024 - 07:04 नवीन
असले चाटे लोक सरकारी नोकरीत राहून ठराविक पक्षाची चाटूगिरी करत असतील तर देशाचे अवघड आहे
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 01/20/2024 - 08:14 नवीन
खरं आहे.
न
निनाद Sat, 01/06/2024 - 02:55 नवीन
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादवचे वडिल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी अयोध्येत कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश दिले होते. अनेक कारसेवकांनी यासाठी बलिदान दिले आहे. लक्षात ठेवले पाहिजे की २०१६ मध्ये हेच मुलायम सिंह म्हणाले होते की, अयोध्येतील गोळीबारात फक्त सोळा लोकांचे प्राण गेले, मी यापेक्षा अधिक जरी मारले गेले असते तरी ते मला चालले असते. असे हिंदू विरोधी लोक परत कधीही सत्तेमध्ये येऊ नयेत! असो, भारताच्या हरवलेल्या इतिहासाला पुन्हा जीवित करण्याच्या दिशेने श्रीराम मंदिर हे एक प्राथमिक पाऊल आहे असे मी मानतो. अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे हे विसरता कामा नये. भारतात किमान २५ हजार मंदिरे पाडली गेली होती (श्री गोयल यांनी ग्रथीत केलेल्या यादी नुसार). ही सर्व मंदिरे आणि त्या सभोवताली असलेली ज्ञान आणि विज्ञानाची परंपरा परत उभी करणे किंवा त्यासाठी सदैव प्रयत्न करत राहणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 01/06/2024 - 05:03 नवीन
मंदिरांपेक्षा ऊत्तम दर्जाची इस्पितळे, पायाभूत सुविधा, शाळा महत्वाच्या आहेत. नाहीतर भारतीयांना ओस्ट्रेलीया वगैरे देशात जावं लागतं हे सर्व मिळवायला. :)
व
विवेकपटाईत Sun, 01/07/2024 - 14:11 नवीन
हज सबसिडी देताना, हजारों मदरस्यांना अनुदान देताना शाळा हॉस्पिटल्स आठवत नाही. इमानदार मुख्यमंत्री तर प्रति मस्जिद चार लोकांना पगार देतो. बाकी देशांत हजारों शाळा विद्यापीठ हॉस्पिटल्स मंदिरांच्या ट्रस्ट चालवतात. करोना काळात मंदिरानीं कोट्यावधी लोकांच्या जेवणाची सोय केली. आरएसएस वाले देशांत २०००० हून जास्त शाळा आणि ३५००० एकल विद्यालय चालवतात. त्यांच्या शाळांत ५०००० हून जास्त मुस्लिम विद्यार्थी ही शिकतात.
स
सर टोबी Sun, 01/07/2024 - 16:25 नवीन
दर काही वर्षांनी होणारे कुंभ मेळे, महाराष्ट्रात पंढरपूर वारीसाठी तयार होणारा खास रस्ता, विविध हिंदू सणांसाठी होणारा पोलीस बंदोबस्ताचा खर्च हे दिसत नाही? घरात आपण कुणा एकावर होणाऱ्या खर्चाची चर्चा करीत नाही. तोच न्याय देशपातळीवर असायला हवा ना? ते तारतम्य सुटलं की असे एकमेकांच्या कसोट्याला हात घालण्याचे प्रकार होतात.
स
सुबोध खरे गुरुवार, 01/18/2024 - 07:54 नवीन
चौसष्ट कोटींची हज सबसिडी तुमच्या डोळ्यात खुपतेय? @सर टोबी हज सबसिडी मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते ते सांगा. किती लोकांना रोजगार मिळतो? कुंभ मेळा किंवा पंढरपूर वारी साठी तयार झालेला रस्ता यासाठी केलेला खर्च हा भारतातील लोकांच्यावरच खर्च होतो. Kumbh Mela: Let's talk business According to the latest report by the Confederation of Indian Industries (CII), the Ardha Kumbha Mela is expected to generate over 1.2 lakh crore Indian rupees (about 16.8 billion U.S dollars) in revenues. The economic activities associated with the festival will generate employment for over 600,000 workers across various sectors, as per the CII report. https://news.cgtn.com/news/3d3d414d324d6a4d32457a6333566d54/index.html#:~:text=Kumbh%20Mela%3A%20Let's%20talk%20business&text=According%20to%20the%20latest%20report,billion%20U.S%20dollars)%20in%20revenues. केवळ द्वेषासाठी द्वेष सोडून द्या आणि डोळे उघडून पहा
स
सर टोबी गुरुवार, 01/18/2024 - 08:46 नवीन
तुम्ही ज्या देशात रहात आहात तिथे तुम्ही एका बहुसंख्य धर्मात जन्म घेतला आहे. जर तुमच्या धर्माच्या परंपरा पालनामध्ये सरकार सहाय्यभूत होत असेल तर दुसऱ्या धर्माची देखील तशी अपेक्षा असणार ना? आणि हे असं सहाय्यभूत होणे याची फुटपट्टी तुम्ही बहुसंख्य ठरवणार का? बाय द वे: हज सबसिडी बंद केल्यानंतरही ती उगाळायची कारण काय म्हणे?
व
वामन देशमुख गुरुवार, 01/18/2024 - 12:21 नवीन
तुम्ही बहुसंख्य ठरवणार का?
त्यात चूक ते काय? लोकशाहीत बहुसंख्यांकांच्या मतानेच कारभार चालतो.
जर तुमच्या धर्माच्या परंपरा पालनामध्ये सरकार सहाय्यभूत होत असेल
ते सरकारचे कामच आहे. शाळेतील प्रतिज्ञा वाचून पहा.
तर दुसऱ्या धर्माची देखील तशी अपेक्षा असणार ना?
कोणत्या धर्माची? भारत हा सेक्युलर देश आहे. धर्माधारित नाही.
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 01/18/2024 - 12:28 नवीन
कोणत्या धर्माची? भारत हा सेक्युलर देश आहे. धर्माधारित नाही. म्हणून धर्म हा आपल्या घरी ठेवावा, धर्माचा बाजार मांडू नये.
स
सर टोबी गुरुवार, 01/18/2024 - 13:14 नवीन
मिपावर बुद्धिमापन आणि नीतीमान ठरवणारी कसोटी असावी का?
स
सुबोध खरे गुरुवार, 01/18/2024 - 14:22 नवीन
चौसष्ट कोटींची हज सबसिडी तुमच्या डोळ्यात खुपतेय? बाय द वे: हज सबसिडी बंद केल्यानंतरही ती उगाळायची कारण काय म्हणे? हायला हि दोन्ही वाक्यं आपलीच आहेत ना? आपणच उगाळायचं आणि हात दुखायला लागल्यावर रडारड ही करायची
स
सर टोबी गुरुवार, 01/18/2024 - 16:58 नवीन
दुसऱ्यांच्या संभाषणात चोम्बडेपणा केला कि असा गोंधळ होतो. चौसष्ट कोटींची सबसिडी आणि तिचं आता नसणं हे संदर्भ पटाईत यांच्यासाठी होते. त्यांचा वकूब आणि वृत्ती बघता ते याचं उत्तर देतील याची शक्यता नाही. मलापण थांबावं लागेल. तुम्ही किती हिणकस वागू शकता याचा बहुदा तुम्हालाही अंदाज नसेल.
स
सुबोध खरे Fri, 01/19/2024 - 05:12 नवीन
दुसऱ्यांच्या संभाषणात चोम्बडेपणा केला श्री पटाईत यांच्याशी संभाषण तुम्ही खाजगीत/व्य नि त करायचं. इथे सार्वजनिक मंचावर केल्यास त्यावर उत्तर येणारच लिपस्टिक लावून नटून थटून खिडकीत बसलं तर खालून कुणीतरी शुक शुक करणारच. मग रडारड करायची नाही.
व
वामन देशमुख Fri, 01/19/2024 - 05:31 नवीन
लिपस्टिक लावून नटून थटून खिडकीत बसलं तर खालून कुणीतरी शुक शुक करणारच.
Image removed.
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 01/14/2024 - 19:48 नवीन
तुमचा सल्ला योग्य आहे, पण आता उशिर झाला आहे, तेव्हा आता अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या मशिदीच्या जागेवर एखादे इस्पितळ उभारले जावे या करता प्रामाणिक प्रयत्न करा पैजारबुवा,
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 01/15/2024 - 05:08 नवीन
चमकेगीरी करनार्यांना सांगा.
क
कर्नलतपस्वी Mon, 01/15/2024 - 06:25 नवीन
पैजारबुवा म्हणतात की मंदिर तर बनले पण मशीद अजून बनायची आहे. त्या जागी शाळा किवां दवाखाना बनवता येईल का बघा. आमची काही ना नाही.
स
सर टोबी Sat, 01/06/2024 - 06:05 नवीन
पुन्हा जीवित करण्याचे काही सर्वज्ञात विज्ञान आहे कि कपटनीती (कॉन्स्पिरसि थिअरी) पुरेशी असते? इंग्रज आणि लांगुलचालन करणाऱ्या काँग्रेसने लपवलेल्या इतिहासाचे काही असे दिव्य किस्से आमच्या वाचनात येतात कि विचारू नका.
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 01/09/2024 - 14:21 नवीन
ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या चारही धर्मपिठप्रमूख शंकराचार्यानी बहिष्कार टाकलाय, राष्ट्रपतीही येणार नाहीयेत. मग हा कार्यक्रम धार्मीकही नाही आणी भारत सरकारचाही नाही असं दिसतंय. मग ऐतिहासीक कसा?
व
विवेकपटाईत गुरुवार, 01/11/2024 - 06:24 नवीन
राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येतात.ते जाताच कार्यक्रम संपतो. इथे हे शक्य नाही. नंतर दर्शनाला त्या निश्चित येतील. .फक्त स्वरूपानंद द्वारा नियुक्त दोन शंकराचार्य येणार नाहीं. बाकी विभिन्न पंथांचे ४००० प्रमुख साधू संत ही येणार. त्यांच्या न येण्याने त्यांची प्रतिष्ठा कमी होईल.दुसरी काही नाही .
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 01/11/2024 - 06:39 नवीन
राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येतात.ते जाताच कार्यक्रम संपतो. इथे हे शक्य नाही.
का शक्य नाही?? शक्य आहे तरीही राष्ट्रपतींनी बोलावले नाहीये. संसद ऊद्घाटनावेळीही तसंच केलं होतं. हा राष्ट्रपतींचा तसेच घटनेचा अपमान आहे.
फक्त स्वरूपानंद द्वारा नियुक्त दोन शंकराचार्य येणार नाहीं.
चारही पिठाचे चारही प्रमूख येनार नाहीयेत. बाकी विभिन्न पंथांचे ४००० प्रमुख साधू संत ही येणार. हिंदू धर्मात चार पिठांच्या शॅकराचार्यांना महत्व आहे. असे कितीही साधू आले तरी त्यांना तितकं महत्व नाही मग चार हजार येवोत की आठ हजार. महत्वाचे मात्र शंकराचार्य. त्यांच्या न येण्याने त्यांची प्रतिष्ठा कमी होईल.दुसरी काही नाही . धर्मपिठप्रमूख गेले नाहीत तर त्या महत्वाच्या धार्मीक कार्यकर्माला काहीही महत्व राहनार नाही. तीने कार्यक्रम आयोजक नी कार्यक्रमाची प्रतिष्टा कमी होणार आहे. धर्मपिठप्रमूख नसल्याने हिंदूंनाही हा कार्यक्रम धार्मीक वाटत नाहीये. एकंदरीत जेवढा गवगवा केला तेवढा हा कार्यक्रम ऐतिहासीक वगैरे नाहीये. तिथे ना आम्हा हिंदूंचे धर्मपिठप्रमूख येणारेत ना आमच्या भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती. एकंदरीत हा कार्यक्रम ना हिंदूंचा ना भारतीयांचा.
T
Trump Fri, 01/19/2024 - 08:11 नवीन
हिंदू धर्मात चार पिठांच्या शॅकराचार्यांना महत्व आहे. असे कितीही साधू आले तरी त्यांना तितकं महत्व नाही मग चार हजार येवोत की आठ हजार. महत्वाचे मात्र शंकराचार्य.
श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे जे शंकराचार्यांबद्दल नवीन प्रेम उफाळुन आले आले ते भयंकर विनोदी आहे. त्या शंकराचार्यांची जन्माधारीत जातीव्यवस्थेबद्दल काय मते आहेत ती जाणुन घेतली का? तुम्ही सतत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास इ. संताचे दाखले देत असता, ते कोणते शंकराचार्य होते ??
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 01/19/2024 - 08:23 नवीन
त्यांची जातीव्यवस्थेबद्दल काहीही मते असली तरी अपुर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा हा त्यांचा दावा खोटा ठरत नाही.
स
सुबोध खरे Fri, 01/19/2024 - 15:35 नवीन
नावडतीचे मीठ अळणी आणि आवडतीचा शेम्बूड गोड
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 01/19/2024 - 15:56 नवीन
आवडतीचा शेम्बूड गोड हे आवडलं. सध्या देशात असंच वातावरण आहे. आवडतीच्या शेंबडासाठी लोक चक्क शंकराचार्यांनाही विरोध करताहेत.
व
विवेकपटाईत गुरुवार, 01/11/2024 - 06:28 नवीन
कार्यक्रम श्रीराम मंदिर निर्माण समितीचा आहे ( VHP चा आहे). सरकारी नाही. ५०० वर्षानंतर श्रीरामाची पुन्हा स्वगृही येणार. त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा