प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना जीवन गौरव पुरस्कार
प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना जीवन गौरव पुरस्कार
प्रा. अद्वयानंद गळतगे सरांच्या मराठी भाषेतील वाङ्मय सेवेचा गौरव करण्यात यावा या उद्देशाने सरांच्या ९२व्या वाढदिवसाला जीवन गौरव पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
आधुनिक विज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. बुद्धिप्रामाण्यवाद, नियतिवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान? याचे स्पष्टीकरण त्यांच्या लेखनातून मिळते.
या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे? कानडी भाषिक असूनही त्यांनी मराठी भाषेत या विषयांवर विपुल लेखन केले आहे. नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या प्रज्ञालोक या त्रैमासिकात गेली २५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.
दि.११ डिसेंबर २०२२रोजी भोज येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपण भूषविले आहेत. याशिवाय करवीर पीठाचे जगदगुरू शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या शुभहस्ते आपला यथोचित सत्कार सन्मान झाला आहे.
रविवारी, दि ६ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात गौरव समितीच्या विद्यमाने कार्यक्रम पार पडेल. त्या वेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत, पूर्णवाद याचे अभ्यासक डॉ लक्ष्मीकांत पारनेरकर, महाराष्ट्र साहित्या परिषदेचे अध्यक्ष आणि मराठीचे डॉ मिलिंद जोशी आणि रमल विद्या प्रवीण श्री चंद्रकांत शेवाळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जुन्या मिपाकरांना प्राचार्य अद्वयानंद गळतगे हे व्यक्तिमत्व परिचित आहे. परंतु नव्या मिपाकर सदस्यांना कदाचित गळतगे सरांच्या विपुल साहित्य निर्मितीची ओळख नसावी. म्हणून काही जुने धागे सादर करत आहे.
या कार्यक्रमात गळतगे सरांची पुस्तके विक्रीला ठेवली जातील. ७० रुपये इतक्या अल्प किमतीत अजब प्रकाशन कोल्हापूर यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत.
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी
वरील विषयावरील प्रकरणे आता ईबुक म्हणून प्रकाशित झाली आहेत.
प्रा. अद्वयानंद गळतगे सरांच्या मराठी भाषेतील वाङ्मय सेवेचा गौरव करण्यात यावा या उद्देशाने सरांच्या ९२व्या वाढदिवसाला जीवन गौरव पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
आधुनिक विज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. बुद्धिप्रामाण्यवाद, नियतिवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान? याचे स्पष्टीकरण त्यांच्या लेखनातून मिळते.
या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे? कानडी भाषिक असूनही त्यांनी मराठी भाषेत या विषयांवर विपुल लेखन केले आहे. नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या प्रज्ञालोक या त्रैमासिकात गेली २५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.
दि.११ डिसेंबर २०२२रोजी भोज येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपण भूषविले आहेत. याशिवाय करवीर पीठाचे जगदगुरू शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या शुभहस्ते आपला यथोचित सत्कार सन्मान झाला आहे.
रविवारी, दि ६ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात गौरव समितीच्या विद्यमाने कार्यक्रम पार पडेल. त्या वेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत, पूर्णवाद याचे अभ्यासक डॉ लक्ष्मीकांत पारनेरकर, महाराष्ट्र साहित्या परिषदेचे अध्यक्ष आणि मराठीचे डॉ मिलिंद जोशी आणि रमल विद्या प्रवीण श्री चंद्रकांत शेवाळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जुन्या मिपाकरांना प्राचार्य अद्वयानंद गळतगे हे व्यक्तिमत्व परिचित आहे. परंतु नव्या मिपाकर सदस्यांना कदाचित गळतगे सरांच्या विपुल साहित्य निर्मितीची ओळख नसावी. म्हणून काही जुने धागे सादर करत आहे.
या कार्यक्रमात गळतगे सरांची पुस्तके विक्रीला ठेवली जातील. ७० रुपये इतक्या अल्प किमतीत अजब प्रकाशन कोल्हापूर यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत.
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी
वरील विषयावरील प्रकरणे आता ईबुक म्हणून प्रकाशित झाली आहेत.
प्राचार्य अद्वयानंद गळतगे जीवन गौरव पुरस्कार सभेचा अहवाल
जीवन गौरव पुरस्कार माझ्या गुरूंचा असून त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा मी भारवाहक आहे ! - प्रा. अद्वयानंद गळतगे