हातसडीचा अस्सल (इंद्रायणी) तांदूळ
आजकाल ऑरगॅनिक म्हणून भरपूर किंमत वसूल करून शेवटी फसवणूक करण्याची वृत्ती वाढली आहे
सामान्य माणूस फसवलाच जात आहे .
म्हणून हा विषय घेऊन चर्चा अपेक्षित
हातसडीचा अस्सल (इंद्रायणी) तांदूळ -
१) किमान ओळख (पारख) कशी करावी ?
२) साधारणतः योग्य किंमत काय असावी ?
३) आरोग्यदायी फायद्यासाठी तांदूळ किती जुना असावा ?
४) किफायतशीर नि घरपोच मिळू शकेल असा काही संपर्क कोणाकडे आहे का ? (खात्रीशीर आणि चोख व्यवहार अपेक्षित.)
>>>>त्यांच्या आया आज्ज्यांनी रांधलेल्या बिर्याण्या झोडल्याशिवाय समजायचे नाही पंत!१००% सहमत ! बाकी मित्रांचे आणि त्यांच्या घरचे जेवण म्हणाल तर राजेहो आयुष्यातील सुरुवातीची ६ वर्षे हॉस्टेल आणि रूम वर काढलीयेत त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास (अधिक उणे) सगळ्या जिल्ह्यात मित्र असल्याने त्या त्या ठिकाणी त्यांच्या घरच्या जेवणाची समृद्ध चव अजूनही जिभेवर आठवते.मयूर पान हाउस में मीनाक्षी पान खाना नक्को भूलो। समझें ,बड़े भाई?वाह मियां क्या यादें निकाले तुम, मयूर पान हॉउस की .... चौकशी करता समजले कि जवळपास ८० हुन अधिक प्रकारची रेंज आहे यांची यातील मी ट्राय केले ते १) मीनाक्षी पान २) नवरतन ३) मीठा लड्डू ४) चन्दन आणि मागच्या धावत्या हैद्राबाद भेटीत मेंगो रोल घेतले ....वा वा वा ! सुप्पर एकदम फाकडू टेस्ट !तरीही खाजेपायी हिमालयातूनही वाइल्डराईस तांदूळ मिळवणेस माझी हरकत नाही.फक्त शेवट मात्र जबरा केलात ! (नसता केलात तर अधिक छान वाटलं असत) उत्तम राहणे उत्तम खाणे उत्तम वागणे याबरहुकूम आमचे जीवन आहे आपण याला 'खाज' समजत असाल तर तुमची विचारसरणी तुम्हाला लखलाभ. बाकी या कधी नगरला आलात तर ....मस्त बिर्याणी / पुलाव चा बेत करतो (पण ते तुमचं हिमालयाचं वाईल्ड राईस नसेल हो कारण आम्ही बासमती /आंबेमोहोर/इंद्रायणी वाले ----हातसडीचे शोधतोय अजून ) आपल्यासारखाच अति भातप्रेमीबादवे तांदळाची चर्चा आणि >> रेठरा बासमती चे नाव आले नाही याचे आश्चर्य वाटले.रेठऱ्यात राहिलाय का कोणी बासमतीच पीक घेणारं आता ? साधारण ४-५ वर्षांपूर्वी तिकडील एक फौजी बंदा रेंट ने राहायला होता आमच्या सोसायटीमध्ये त्याच्या बायकोने आणून दिले होते एकदा रेठरा बासमती (विकत) ...छान चव होती पण परत काही मिळाला नाही तो वाण. कृष्णेचं पाणी मानवत म्हणे बासमतीला .... थोडं विस्ताराने सांगितले तर ज्ञानात भर पडेल.