पण कधीतरी अमेरिकेच्या / पाश्चिमात्यांच्या दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी
उपयोजक यांन्च्य्या धाग्यात :" पण कधीतरी अमेरिकेच्या (पाश्चिमात्यांच्या " दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी"
असे होते , त्यातून हि विचार मांडत आहे
आधीच क्षमा मागतो कि हे अमेरिके बद्दल नाही .. याच कारण कि "पाश्चिमात्य देश म्हणजे काही फक्त अमेरिका नव्हे "
कानडा , ऑस्ट्रेल्यात , न्यू झीलंड इत्यादी देश याशिव्या जुने इंग्लंड आणि आजकाल बरेच जण आयर्लंड ला हि स्थलांतरित होतात ... याशिवाय इंग्रजी भाषा ना बोलणारे काही इयूरोप मधील देश आणि सिंगापोर आणि जपान सारखया प्रगत देशात हि लोकं कायमचे राहायला गेले आहेत ...
पण खालील विचार मुखत्वे ऑस्ट्रेल्यात , न्यू झीलंड आणि कदाचित कानडा ला लागू होतील ...
तर दुसरी बाजू मांडताना हे नमूद केले पाहिजे कि हे एका भारतीय स्थलनातराच्या दृष्टितीने लिहिलेले आहे त्यामुळं भारताचा संधर्भ येणारच पण त्यामागे " भारतात कसे वाईट आणि परदेशी कसे चांगले असे मांडण्याचा कोणताही हेतू नाही आणि दुसरे कि हे जे मुद्दे आहेत ते प्रश्न आहेत कि कसे हे ज्याचे त्यांने ठरवायचे आहे.
जसे कि "स्वतःचे काम, संडास साफ करण्यापासून स्वयंपाक सर्व स्वतः करावे लागते इकडे " हा प्रश्न आहे कि " एक वैश्विक नागरिक म्हणून याचा उपयोग तुम्ही जगात इतरत्र वावरताना होईल" हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे
प्रत्येक प्रशान बरोबर त्याची पण दुसरीबाजू लिहिण्याची इच्छाच होती पण मग त्याचे रूपांतर परत " बघा अजून एक एन आर आय इकडे कसे सगळे चांगले आहे असे लिहीत आहे " तसे होऊ नये म्हणून ते टाळले आहे
१) पूर्ण वेळ ( ६ दिवस ) घरकाम + गाडी चालक हि गोष्ट फक्त "मेगा रिच" लोकानंच परवडते
२) वैद्यकीय तज्ञ एकदम भेटत नाही , त्याआधी सर्वसाधारण ( जी पी ) ची भेट घ्यावी लागते
३) नोकरी करणाऱ्याला आयकर वाचवण्यासाठी भारताच्या मानाने उपाय कमी आहेत
४) छोटे उद्योग काढताना जरी सरकार अडथळा कमी असला तरी सुरवातीचे विशेष करून कोणास नोकरी वर ठेवण्याचा खर्च खूप असतो ... त्यामुळे सुरवातीला तरी जास्तीचे रोख पैसे जवळ असावे लागतात
५) आयकर ४५% पर्यंत जाऊ शकतो
६) भारतापासून दूर पडते
७) वयस्कर लोकांनां किंवा तरुण पण ज्यांचे भारतात फारसे उत्पन्न किंवा स्थापित झालेली नोकरी नाही त्यांना व्हिझिट व्हिसा मिळण्यास कधी कधी अवघड होते
८) नेहमी पेक्षा इतर गोष्टी श्कियावया लागतात ( किरकोळ दुरुस्ती + संडास साफ ते स्वयंपाक )
९) छोट्या दुरुस्ती पासून ते स्प्लिट एयर कंडिशन बसवणे रस्ताही तंत्रांच्या कधी कधी लगेच मिळत नाही
१०) भारतीय उपहारगृहे जरी अनेक असली आणि भारतीय लोकसंख्या जरी बरिच असली तरी अंतरांमुळे म्हणा किंवा इतर कारणाने "घरगुती डबा पद्धतीचे जेवण अजून तरी सर्रास मिळत नाही, एक दोन ठिकाणी ( सिडनी मध्ये) कोणतरी टी फीन सेवा सुरु केली आहे असे ऐकले आहे
११) जरी बहुतेक सर्व आणि विविध राज्यातील भारतीय पदार्थ मिळत असले तरी स्वतः प्रवासी म्हणून असे पदार्थ आणण्यावर खूपच निर्बंध आहेत , विशेष करून करून ऑस्ट्रेलियात , ( इथे न्यूझीलंड ची सफरचंदे पण येऊ देत नाहीत तर भारतातील काय आणणार कप्पाळ )
१२) अनेकदा प्रयत्न करून हि हापूस आंबा यासास्वी रित्या आणि नेहमी प्रमाणे कोणी आयात करू शकले नाही ! आणि जखमेवर मीठ म्हणजे अ ) येथे पायरी सारखा आंबा मिळतो आणि हापूस ची चटक वाढते ब ) बहुतेकडं भारतात डिसेंबर जानेवारीतच यायला जमते त्यामुळे दरवर्षी भारतात येऊन सुद्धा हापूस नशिबी नाही ... बस आता लिहिवाट नाही .. बाजारात जाऊन हापूस सरखय दिसणाऱ्या आर २ नाईचं आंबीवर ताव मारण्याची वेळ झाली ( निदान फळ तर मोठे असेल तुक म्हणे त्यातलया त्यात !)
सध्या तरी एवढेच सुचतंय अजून सुचेल कि लिहीन अर्हताःत कोणास "अमेरिकेशिवाय इतर" फॉरेन मध्ये गम्य असले तर !
🗣 चर्चा
(76)
स
साहना
Tue, 01/24/2023 - 05:48
नवीन
> हे एवढे सोपे आहे का?
बहुतांशी होय. अमेरिकन स्थलांतर कायदा इतका क्लिष्ट आहे कि ह्याचे सर्व कंगोरे मी इथे लिहू शकत नाही.
पण थोडक्यांत अमेरिकन कायद्याप्रमाणे कुणालाही अमेरिकन सीमा पार करून सीमारक्षकाला भेटून आश्रय मागण्याचा अधिकार आहे. ह्यांत बेकायदेशीर काहीही नाही. व्हेनेझुएला, होंडुरास, हैती इत्यादी देशांतून अनेक लोक अश्या प्रकारे मेक्सिको मध्ये येतात आणि व्यवस्थित पणे सीमेपाशी येऊन शरणागती मागतात.
शरणागती मागणे महत्वाचे आहे. आपण उगाच येऊन गप्प राहिलात तर कायदा लागू होत नाही. बहुतेक आश्रय मागणारे लोक जास्त हुशार नसतात, इंग्रजी येत नाही किंवा अनेकवेळा प्रवास करण्यात इतक्या हालअपेष्टा खाल्ल्या असतात कि तिथे बॉर्डर रक्षक भेटला तर ह्यांच्या तोंडून शब्द सुटत नाही. मग अश्याना तात्काळ हाकलून लावले जाते आणि पुढच्या वेळी परत आले तर पुन्हा हाकलून लावले जाते.
एकदा व्यक्तीने स्पष्ट शब्दांत शरण मागितली मग अश्या व्यक्तीला शरणागती ऑफिसर पुढे नेण्यात येते. इथे शरणागतीची कारणे मागितली जातात. ह्याला "credible fear interview" असे म्हणतात. इथे कारण वैध आहे कि नाही ह्याचा निर्णय ऑफिसर पट्कन घेतो. आणि कारण पटले नाही तर हाकलले जाते आणि कारण पटले तर पुढे त्या व्यक्तीला कोर्टाच्या समोर नेण्याची प्रक्रिया सुरु होते पण ह्या दरम्यान व्यक्तीला देशांत कायदेशीर पद्धतीने राहून काम करण्याची मुभा असते. credible fear interview मध्ये आपण व्यवस्थित करणे देऊ शकता उदाहरणार्थ मला ठाऊक असलेल्या लोकांनी दिलेली करणे :
* मी अमुक तामिळ ब्राम्हण मी ह्या दलित मुलाशी लग्न केले म्हणून माझ्या आईवडिलांनी मला ठार मारण्याची धमकी दिली आहे. अश्या घटना माझ्या राज्यांत खूप घडलेल्या आहेत त्याची हि न्यूज पेपर कटिंग मी आणली आहेत, हे पहा न्यू यॉर्क टाईम्स ने लिहिलेली कथा. अम्नेस्टी इंटरनेशनल ने आणि अमेरिकन जस्टीस डिपार्टमेंट ने ह्यावर हा रिपोर्ट लिहीला आहे. (इथे अमेरिकन माध्यमे आणि खुद्द अमेरिकन सरकारने लिहिलेले रिपोर्ट्स वापरल्याने बाप दाखव नाही तर श्राद्ध कर न्यायाने ऑफिसर ला शरणागती नाकारता येत नाही) .
* मी अमुक सिंग, मी शीख अल्पसंख्याक आहे. माझ्या काकाला भारतीय पोलिसांनी गोळी घालून मारले. मला ठार मारण्याच्या धमक्या भारतीय पोलीस देत आहेत. अमुक वर्षी काहीही गुन्हा नसताना पकडून मला बडवले. माझ्या भावाने कॅनडात आश्रय मिळवला आहे. त्याशिवाय जस्टीस डिपार्टमेंट ने आधीच शिखांची परिस्थितीत कठीण आहे असा हा रिपोर्ट प्रकाशित केला होता.
* मी अमुक माझा बलात्कार भारतांत झाला, हा पहा FIR, रेपिस्ट माझ्या तोंडावर ऍसिड फेकून देण्याच्या धमक्या देत आहे. हा पहा त्याचा SMS.
आधी लोक व्यवस्थित बॉर्डर पेट्रोल ठाण्यावर येऊन शरणागती मागायचे. ट्रम्प सरकारने मॅक्सीकन सरकारशी संधान करून विनाकारण ह्या ठाण्यावर इतक्या लांब लाईन्स निर्माण केल्या कि लोकांना शरणागती मागणे मुश्किल झाले. म्हणून लोक इतर ठिकाणहून बॉर्डर क्रॉस करू लागले. तिथे सुद्धा पकडले गेल्यास ह्या व्यक्ती शरणागती मागतात. त्याशिवाय लहान मूल बरोबर असल्यास तुम्हाला सरकार हाकलू शकत नाही त्यामुळे अनेक व्यक्ती लहान मुलासोबत प्रवास करतात. म्हणून ट्रम्प सरकारने मुलांना वेगळे करण्याचे सत्र आरंभले.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 01/24/2023 - 06:15
नवीन
एकीकडे कायदेशीर रित्या येऊन चांगले शिक्षण घेऊन अमेरिकन अर्थव्यवसंस्थेला हातभा र लावणारे वर्षानुवर्षे कायमच्या व्हिसा साठी अडकतात आणि एकीकडे बहुतेक " इकॉनॉमिक रेफुजी " सुटताट .. हे राम .. अजब न्याय वर्तुळाचा
येथे हि हा प्रश्न येतो अधून मधून " तथाकथित" आखाती देशातील शरणागतांचा " ले काचे तिथून विमानाने इंडोनेशिया पर्यंत येतात ( ते पैसे असताट ) आणि मग तिथून बोटीने ऑस्ट्रेल्या च्या पश्चिम / उत्तरेला असलेलया ख्रिसमस आयलंड वर येतात .. आणि दाखवतात जणू काही आम्ही इराक पासून बोटीने निघून इकडे आलो .. मग काय येथील कनवाळू लोक भुलतात ...
तसं पहिला तर सीरिया च्या यादवी पेक्षा इंडोनेशिया राहायला काही एवढा वाईट नाही परत धर्म एकच! मग लेको राहा कि तिथे .. का करता कांगावा शरणागत असल्याचा !
एका सरकार ने काय केला कि त्यांना तसाच उचलून नारू नामक देशात पाठवून दिले ...
मागे सीरिया मधून जर्मनी ला जाणारे करावान ऑफ रेफुजी ना काही अरब देशांनी मदत केली पण स्वतःचं देशात घेतले नाही
- मलेशियाचे ला रोहणग्यांची काळजी पण स्वतःचं देशात घेतले नाही
जाऊदे ...
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 01/24/2023 - 07:43
नवीन
> एकीकडे कायदेशीर रित्या येऊन चांगले शिक्षण घेऊन अमेरिकन अर्थव्यवसंस्थेला हातभा र लावणारे वर्षानुवर्षे कायमच्या व्हिसा साठी अडकतात आणि एकीकडे बहुतेक " इकॉनॉमिक रेफुजी " सुटताट .. हे राम .. अजब न्याय वर्तुळाचा.
मोठ्या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या माझ्या ओळखीच्या काही उच्चशिक्षित भारतीयांनी आपले आंतरधर्मीय लग्न हे कारण पुढे करून विसावरून शरणागत स्टेटस मध्ये उडी मारली. आता ह्याचा मॅनेजर अजून आपलं विजा रिन्यू करत आहे आणि हा अमेरिकन नागरिक ह्या वर्षी बनेल.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 01/24/2023 - 07:56
नवीन
* रॉजर रॉस नावाचा एक माणूस आहे. हा स्वतः पाकिस्तानी मुस्लिम ह्याचे मूळ नाव कोण तरी शेख. हा लोकांना आपण नेपाळी आहे असे सांगतो. डोके दाढी वगैरे काढून आपण गोरा आहे असे दाखवतो आणि काहीतरी फुटकळ काम करण्यासाठी येऊन अमेरिकन नागरिक झाला. ह्याने USTECHWORKERS नावाची संघटना निर्माण केली जयंत नावाला सुद्धा एक सुद्धा tech वर्कर नाही. ह्याने स्वतःला ट्रम्प समर्थक घोषित करून अमेरिकन भारतीयांच्या विरोधांत आघाडी उघडली आणि गोऱ्या लोकांकडून बक्कळ पैसा उचलला.
* FAIR , CIS आणि NumbersUSA ह्या तीन भारतीय स्थलांतरित विरोधी संघटना अमेरिकेत कार्यरत आहेत. ह्यांना कुत्रे सुद्धा विचारत नव्हते. ट्रम्प काळांत ह्यांनी बाजी मारली आणि भरपूर पैसा केला. आपले लोक ट्रम्प ऍडमिन मध्ये चिकटवले. ट्रम्प हे पराकोटीचे स्थलांतरित विरोधी होते पण रिपब्लिकन पार्टी इतकी विरोधी नव्हती त्यामुळे स्थलांतरीत द्वेष्टे लोक आणावेत कुठून हा प्रश्न ह्या तिन्ही संघटनांनी सोडवला. त्यामुळे ह्या तिन्ही संघटना ट्रम्प साहेबांच्या खास समर्थक म्हणून प्रसिद्ध झाल्या.
ह्या तिन्ही संघटनाचे स्थापन करते समान होते. जॉन टेंटन हे डोळ्यांचे डॉक्टर होते पण प्रत्यक्षात ह्यांचा विषय होता युजेनिक्स. त्यांच्या मते अमेरिकेत बिगर गोर्या लोकांना मुले निर्माण करू देणेच चुकीचे होते आणि बिगर गोऱ्या लोकांची संख्या अमेरिकेत आणि पृथ्वी तलावर शक्य तितकी कमी करावी असे त्यांचे मत. अमेरिकेतील बिगर गोऱ्या स्थलांतरितांना त्रास करण्यासाठी वरील तीन संघटना आणि एक चौथी संघटना त्यांनी उभारली. हि चौथी संघटना कुठली ? तर planned parenthood ! हि डेमोक्रॅट लोकांनीही आवडती संघटना जिचे प्रमुख ध्येय अर्भकांना मारणे आहे. फक्त गर्भपात करून नाही तर प्रसूतीनंतर सुद्धा अर्भकांना मारण्याचे काम इथे होते. इतकेच नव्हे तर अर्भकांना माणूस म्हणून पाहू सुद्धा नये असे ह्यांच्या संबंधित लोकांचे मत आहे.
ह्या चारी संघटनांवर सर्वप्रथम कडाडून टीका करणारा रिपब्लिकन कोण ? तर टकर कार्लसन ! ह्याने १९९० मध्येच चारी संघटना किती घृणास्पद आहेत आणि अमेरिकन उजव्या लोकांच्या तत्वांच्या विरोधात आहेत ह्यावर मोठा लेख लिहिला होता. हाच माणूस आता ह्या तीन संघटनांचा आणि ट्रम्प चा सर्वांत मोठा समर्थक होऊन नाचतोय !
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 01/24/2023 - 00:22
नवीन
भारत आणि अमेरिका ह्यांची तुलना शक्य नाही , आणि करणे हे उचित हि नाही
बरोबर ..
भारताची तुलना चीन / इंडोनेशिया / मेक्सिओ बरोबर होऊ शकते
कानडा ची तुलना ऑस्ट्रेल्या बरोबर होऊ शकते
जर्मनी ची तुलना कदाचित फ्रांस किंवा इटली बरोबर होऊ शकते
सिंगापोर ची तुलना हाँग कोन्ग बरोबर होऊ शकते ( यु ए ई बरोबर सुद्धा नाही करता येणार कारण आखाती देशात कायमचे राहता येत नाही / सिंगापोर-हाँग कोन्ग ला येते )
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 01/24/2023 - 08:19
नवीन
भारताची तुलना चीन, मेक्सिको आणि इंडोनेशिया सोबत होऊ शकत नाही.
भारत काही बाबतीत तिन्ही पेक्षा खूप चांगला असला तरी एकूण राहणीमानाच्या बाबतित खूपच मागे आहे.
* इंडोनेशियाचे दर माणशी उत्पन्न भारताच्या दुप्पट आहे.
* मेक्सिकोचे दर माणशी उत्पन्न भारताच्या तिप्पट आहे.
* चीन चे दर माणशी उत्पन्न भारताच्या ४ पट आहे.
* ब्राझील चे दर मनाशी उत्पन्न भारताच्या तिप्पट आहे.
पण भारताची जमेची बाजू म्हणजे भारताची राज्य व्यवस्था जिथे विविध राज्यांना खूपच मोकळीक आहे त्यामुळे गोव्या सारखे राज्य हे पोलंड सारखे राहणीमान देऊ शकते, मुंबई सारखे शहर हे जागतिक नकाश्यावर आपले स्थान प्रस्थापित करू शकते तर बिहार ओरिसा सारखी राज्ये अत्यंत गरीब आणि येमेन सारख्या युद्ध आणि इस्लाम ग्रस्त राष्ट्रापेक्षा भिकार आहेत.
ह्या कमालीच्या असमानते मुळे भारत आणि इतर देशांची तुलना कठीण होते. मेक्सिको चे सर्वांत गरीब राज्य हे बिहार पेक्षा जास्त श्रीमंत आहे. तर मेक्सिको चे सरासरी दरडोई उत्पन्न साधारण गोवा सारखे आहे. भारताची एकूण लोकसंख्या जास्त असली तरी बहुतेक लोक हे उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा ह्या गरीब भागांत राहतात. त्यामुळे भारताची सरासरी खूपच कमी होत जाते.
ह्या असमानते मुळे भारतीय राज्यांची तुलना इतर देशांशी करणे जास्त चांगले आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
T
Trump
Tue, 01/24/2023 - 14:54
नवीन
श्री साहना, चित्राबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 01/25/2023 - 07:25
नवीन
भारताची नंबर दोनची अर्थव्यवस्था नबर एकच्या किमान दुप्पट मोठी आहे. याच मुळे करोंना काळात न भारतात मंदी आली न महागाईचा भडका उडाला. प्रती व्यक्ति आय ही प्रत्यक्षात चार पट पेक्षा ही जास्त .आणि जीडीपी ही अनेक पट जास्त असू शकते. कारण 90 टक्के लोक आपली आय कमी दाखवितात. भारतातील लोकांचे राहणी मन वर दिलेल्या अधिकान्श देशांपेक्षा अनेक पट उत्तम आहे. इथे फ्री शिक्षण, फ्री उपचार आणि फ्री राशन आहे. बहुतेक सर्वांनाच शीघ्र उपलब्ध आहे. बाकी साऊथ ब्लॉक (तिथे विदेश मंतरलायचे ही कार्यालय आहे ) मध्ये 17 वर्ष काम करताना विदेशांत अनेक वर्ष राहिलेल्या कार्मचार्यांचे देशांच्या बाबतील अनुभव ऐकल्यावर एकच निष्कर्ष निघतो. भारताची स्थिति अनेक आफ्रिकन किंवा यूरोपियन देशांपेक्षा कितीतरी पट उत्तम आहे. बाकी इथे 25 लाख पॅकेज मध्ये माणूस राजा सारखा राहू शकतो. धुणी-भांडी, साफ सफाई, कपड्यांची इस्त्री, भटकंती इत्यादि उत्तम रीतीने करता येते. स्वछता सोडल्यास भारताची स्थिति उत्तम आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 01/27/2023 - 06:09
नवीन
ह्या असमानते मुळे भारतीय राज्यांची तुलना इतर देशांशी करणे जास्त चांगले आहे असे वाटते.
बरं , तसे असेल तर इंडोनेशियाती जकार्ता आणि कदाचित हाऊ शकते आणि गोआ आणि बाली यांची तर नक्कीच होउ शकते
गोआ आणि बालीत फरक कदाचित कि बाली मध्ये अजूनही इतके प्रवासी करण होऊन सुद्धा तेथील वेगळ्याच संस्कृतीचा आत्मा अजून जीवनात आहे/ दिसतो , गोव्यात निसर्ग सोडला तर सगळं ब्रॅण्डिंग देशातील इतर शहरांसारखेच ... असो विषयांतर केले
- Log in or register to post comments
स
साहना
Fri, 01/27/2023 - 07:32
नवीन
जकार्ता चे दरडोई उत्पन्न ५७,००० डॉलर्स म्हणजे गोव्याच्या तिप्पट आहे (१९,०००). त्या मानाने बाली गोव्यापेक्षा गरीब आहे (१०,०००).
पण इतर विविध मापदंड जसे HDI पाहता गोवा आणि जकार्ता जवळपास आहेत असे समजू शकतो. जकार्ता मध्ये इंडोनेशियातील सर्व श्रीमंत लोक राहतात तर गोवा एक छोटे शहर सदृश्य राज्य आहे.
दिल्ली, गोवा आणि चंदिगढ ह्यांचे HDI ८० आहे म्हणजे म्हणजे साधारण थायलंड, मलेशिया, रशिया ह्यांच्या तोडीचे आहे. तर बिहार चे ५५ म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान ह्यांच्या बरोबरीचे आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 01/27/2023 - 10:17
नवीन
साहना मी लिहिताना थोडी चूक केली
मुंबई ची बालीशी तुलना असे म्हणायांचे नवहते ती जरा हि विचित्र तुलना होईल
मला म्हणायचं होते शहर ते शहर म्हणून मुंबई / जकार्ता ( आर्थिक राजधानी / प्रचंड लोकसंख्या इत्यादी
आणि मोठया देशातील छोटे राज्य / शहर म्हणून- गोआ / बाली ( टुरिसम / मायनिंग )
मी हे थोडेसे वरवर पण अनेकदा तिथे जाऊन राहून आलेल्या अनुभवातून बोलतोय .. आपल्यासारखा सखोल अभ्यासावर बेतलेले नाही
- Log in or register to post comments
T
Trump
Sun, 01/29/2023 - 20:32
नवीन
श्री साहना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
शेवटी तुम्ही माझ्या प्रतिवाद मान्य केला त्याबद्दल धन्यवाद.
https://www.misalpav.com/comment/1133244#comment-1133244
अजुन काही गोष्टी लिहिता येतील
- अभिव्यकती स्वातंत्र्यः कल्पनांचा / चुकांची चर्चा आपल्यापेक्षा अधिकाराने, वयाने मोठी असलेल्या व्यक्तीबरोबर करता येते. आपल्या विरोधी मते सहज स्वीकारली जातात, जाहीरपणे मांडायला कोणती अडचण नसते.
- सेवावृत्ती : विशेषाधिकार न मागणे. (भारतात साधा नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सरकारी अधिकारी, सैनिक असला तर लगेच विशेषाधिकारांची मागणी सुरु होतो.).
- सर्वोत्तमपणा: आपण जे करु ते सर्वोत्तम किंवा त्याच्या गुणवत्तेला आपण जबाबदार आहोत, त्यामुळे जर दुसर्याचे नुकसान झाले तर आपण जबाबदार असु ही भावना जनमाणसामध्ये रुजली आहे.. ज्या कामासाठी नियुक्ती केली आहे ते नीट करण्याची धडपड.
- व्यवहारीकपणा: इतरांना (देशांना, समाजांना इ.) न आवडणारे कठोर निर्णय घेण्याची क्षमता. उदा. दुसर्या महायुध्दानंतर शेजारी देशांनी जर्मन लोकांना हकलुन दिले होते. (जे आपण काही लोकांबद्दल संधी मिळुनही करु शकलो नाही.)
- वस्तुनिष्ठ विचार
- सर्वसामान्य माणसांना कायद्याप्रमाणे वागुन कोणत्याही मोठ्या माणसाला अडचणीत आणता येते.
----
श्री साहना यांनी पाश्चिमात्य लोकांच्या मुल्यांची सरमिसळ केली आहे. बहुतेक त्यांना समान समजण्याची गल्लत करतात. पाश्चिमात्य लोकांची स्वत:साठी असलेली मुल्ये आणि इतरांसाठीची मुल्ये वेगवेगळी आहेत. त्याची उदाहरणे श्री साहना यांनी स्वत:च दिली आहेत.
श्री हिटलर ह्यांनी पाशिमात्य तत्वापासुन कशी फारकत घेतली ते सांगाल काय?
पाशिमात्य लोक तत्वापासुन फारकत घेतात आणि त्यामुळे हिंसा होते हे चुकीचे अनुमान आहे. ती हिंसा अयुरोपियन लोकांना वेगळी तत्वे आणि पाशिमात्य लोकांच्या सर्वोच्चपणाच्या कल्पनेमुळे होतात.
हे तुमचेच उदाहरण श्री ट्रंप आणि श्री बायडेन जवळपास सारख्याच मनोवृत्तीचे असल्याचे दाखवते. फक्त काही लोक उघडपणे बोलतात, काही लोक गुपचूपमध्ये करतात.
इतर काही संबधित प्रतिसाद.
भारत म्हणजे Caste, Cow and Currry
https://www.misalpav.com/comment/1133683#comment-1133683
युरोपियन लोकांचे जे गुलाबी गुलाबी चित्र
https://www.misalpav.com/comment/1133880#comment-1133880
ट्रम्प ला मूर्ख आणि वंशभेदी
https://www.misalpav.com/comment/1133927#comment-1133927
श्री साहना यांची युरोपियन
https://www.misalpav.com/comment/1134484#comment-1134484
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 01/30/2023 - 00:08
नवीन
श्री साहना यांनी पाश्चिमात्य लोकांच्या मुल्यांची सरमिसळ केली आहे.
असहमत सरमिसळ ती कशी ?,,, हि मूल्ये बऱ्यापकी लागू होतात ( तुम्ही म्हणता तशी निदान त्यांच्या स्वतःचं देशात तरी, असे अनुभवले आहे )
पाश्चिमात्य लोकांची स्वत:साठी असलेली मुल्ये आणि इतरांसाठीची मुल्ये वेगवेगळी आहेत.
बऱयापैकी सहमत ... इतिहासात अशी उदाहरणे आहेत हे खरे कम्युनिसम ला असलेल्या कडव्याला विरोधापायी अफगाणिस्तानात धर्मांध्यांना पाठिंबा दिला ( रशिया कब्जा असतांना या) आणि नंतर आफत आली
असो मूळ धागा हा पाश्चिमात्यांच्यात काय प्रश्न , अडचणी आहेत हे मांडणे या हेतूने सुरु केला होता
तिथे काय चांगले आहे यावर चर्चा परत परत का घसरेत कोण जाणे !
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 01/30/2023 - 08:45
नवीन
पाश्चात्य ह्या विषयावरील आपला मुद्दा पटला ! पाश्चात्य हि संकल्पना भौगोलिक नसून तात्विक आहे. कायद्याचे राज्य, बहुतांशी मुक्त अर्थ आणि समाजव्यवस्था, वैयक्तीक स्वातंत्र्याला प्रमुख मानणे. बंधने सरकारवर ठेवणे इत्यादी.
हिटलर ची नाझी समाजवादी विचारसरणी नक्कीच पाश्चात्य (आधुनिक लिबरल) तत्त्वांपासून फारकत घेणारी होती. पहिली म्हणजे समाजवादी विचारसरणी हि पाश्चात्य विचारसरणी नाही. दुसरी म्हणजे पराकोटीचा राष्ट्रवाद ज्यांत वैयक्तिक आणि धार्मिक स्वातंत्र्याची पायमल्ली होते ती सुद्धा पाश्चात्य तत्त्वांत येत नाही. हिटलर हा पाश्चात्य मूल्यांचा पुरस्कर्ता नसून आर्यन वर्णचा पुरस्कर्ता होता.
> हे तुमचेच उदाहरण श्री ट्रंप आणि श्री बायडेन जवळपास सारख्याच मनोवृत्तीचे असल्याचे दाखवते. फक्त काही लोक उघडपणे बोलतात, काही लोक गुपचूपमध्ये करतात.
होय ट्रम्प आणि बायडन स्थलांतर ह्या विषयावर बहुतांशी एकसारखे आहेत. काही फरक आहेत पण ट्रम्प ह्यांच्याच पॉलिसी बायडन ह्यांनी गुपचूप पद्धतीने पुढे चालविल्या आहेत. title ४२, MPP आणि भिंत ह्या तीन गोष्टी.
- Log in or register to post comments
T
Trump
Wed, 02/08/2023 - 19:37
नवीन
तुम्ही हळु हळु शांतीप्रिय रिलिजनसारखे सुरु केले आहे. चांगले झाले ही रिलिजनचा भाग आणि काही मनासारखे नाही झाले की हा रिलिजनचा भाग नाही असे म्हणयाचे.
तुम्ही असे काही देश, खंड दाखवु शकता का, जिथे पाशात्य लोक गेले आणि मुळ लोकांचा संहार झाला नाही?
श्री ट्रंप यांना त्याच्या स्थलांतर धोरणांंमुळे वंशद्वेषी म्हटले जाते. जर श्री ट्रंप आणि श्री बायडेन यांची स्थलांतर धोरणे एकच / जवळपास समान असतील तर फक्त श्री ट्रंप हे वंशद्वेषी का?
चुक.
श्री हिटलर यांना अमेरीकन, ब्रिटिश, आणि फ्रेंच साम्राज्ये अनुकरनीय होती. जशी त्यांनी साम्राज्ये तयार केलीत तसे श्री हिटलर यांना पुर्व युरोपमध्ये तसे साम्राज्य तयार करायचे होते. श्री चर्चिल आणि श्री हिटलर यांच्यात साम्य दाखवणारी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत.
श्री हिटलर यांच्यामुळे बहुतेक गोरे लोक मेले, पाशात्य साम्राज्ये संपली, अगोरे स्वातंत्र झाले. जर श्री हिटलर यांच्यामुळे अगोरे मेले असते तर हेच पाशात्य लोक श्री हिटलर यांना डोक्यावर घेऊन नाचले असते.
अगोर्यासाठी श्री हिटलर हे सर्वसाधारण पाशात्य माणसासारखे आहेत. पाशात्य लोक श्री हिटलर यांचा द्वेष करतात म्हणुन इतरांना करायची गरज नाही.
ही काही वाचनीय उदाहरणे.
https://en.wikipedia.org/wiki/Churchill,_Hitler_and_the_Unnecessary_War
https://www.newyorker.com/magazine/2018/04/30/how-american-racism-influenced-hitler
https://www.misalpav.com/comment/1135059#comment-1135059
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 01/24/2023 - 00:15
नवीन
एकूण सामंत यावर भर असल्याने
समानतेवर असे वाचावे
- Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर
Tue, 01/24/2023 - 08:04
नवीन
माझे जपानमधील काही अनुभव.
घरकामासाठी मदत उपलब्ध होणे तीही ६ दिवस हे किमान जपानमध्ये तरी चैनीची परमावधी आहे. मागे एका प्रतिक्रियेत लिहिल्याप्रमाणे, माझी पत्नी गर्भवती असताना एका इंडियन स्टोरमध्ये विचारलं की तुम्ही रोज घरी येऊन पोळी भाजी करून द्याल का, तर त्यांनी सांगितलं २ तासांचे दररोजचे ३हजार येन घेईन.हे खचितच परवडणारं नाही. आपण राहतो त्या वॉर्ड मध्ये नोंदणी केली तर आठवड्याला एकदा येऊन असेल ते घरकाम करून देण्यासाठी मदत उपलब्ध होते पण तीही बाळंतपणानंतर २ महिनेच. त्या बायका येऊन जे असेल ते काम करतात. कपडे वाळत घालणे,भांडी घासणे, केरवारे करणे, स्वयंपाक इत्यादी. परंतु आपलं जेवण त्यांना येत नसल्याने स्वयंपाकाचा मुद्दा बाद ठरतो. कितीही कंटाळा आला तरी मुलं लहान असली की ओढाताण होतेच. त्यामानाने भारतात कुठलीही मदत लगेच उपलब्ध होऊ शकते.
माझी मुलगी जपानी सरकारी पाळणाघरात जाते. त्यांची विचित्र पॉलिसी म्हणजे आई बाप दोघेही नोकरी करत असतील तरच मुलाला ऍडमिशन मिळते. तेही वर्षातून २ दाच प्रवेश मिळू शकतो. मार्च किंवा ऑक्टोबरमध्ये. जर का आई किंवा बापाची नोकरी गेली तर त्या महिनाअखेरीस मुलाला पाळणाघरातून काढावं लागतं. मग तुम्ही भरमसाठ फिया असलेलं दुसरं खाजगी पाळणाघर शोधा किंवा घरी ठेवा मुलाला. तुम्ही राहत असलेला वॉर्ड सोडून जायचं असेल तर त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत मूल त्या पाळणाघरात जाऊ शकतं पण त्यानंतर एकतर पाळणाघर बदला, म्हणजे दुसऱ्या वॉर्डच्या पाळणाघरात घाला किंवा नाही मिळालं पाळणाघर तर बसा हरी हरी करत. आपल्या इथे पाळणाघरात मला नाही वाटत इतके जाचक नियम आहेत.
आयकर वाचवण्यासाठी कमी उपाय आहेत याबद्दल सहमत. किंवा असं म्हणू की, जे मार्ग आहेत त्या सगळ्यांसाठी जपानी उत्तम येणं गरजेचं आहे. तिथे खूप मर्यादा येतात.
फक्त जपानबद्दल बोलायचं झालं तर व्हिसिट व्हिसाला काहीही प्रॉब्लेम नाही येत, जर का कोणी तुमचे नातेवाईक असतील तर. फक्त ऍड्रेस प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट लागतं तेवढं व्हिसाच्या वेळेला प्रस्तुत करावं लागतं. पण जरी कोणी नसेल तरी हॉटेल बुकिंग आणि रिटर्न तिकीट दाखवलं तर विशेष अवघड नाहीये.
भारतीय जेवणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर टोकियोसारख्या शहरात बरेच पर्याय उपलब्ध आहेत किंवा उपलब्ध होत असतात. अगदी पूर्ण शाकाहारी उपहारगृहसुद्धा आहेत. बरेच भारतीय घरच्या घरी डबा बनवून विकायचा व्यवसाय करतात. पण थोडं बाहेर गेलं तर अडचण होऊ शकते. विशेषतः शाकाहारी लोकांना. पण आजकाल vegan फूडचं प्रस्थ पण वाढत चाललंय त्यामुळे काही ना काही पर्याय मिळतात.
अवांतर: वरती भाषेचा एक मुद्दा लिहिला होता त्यावरून एक किस्सा आठवला. माझ्या एका सहकाऱ्याला कुठलं तरी कर्ज काढायचं होतं. त्यांनी जी मेल केली ती यानी ट्रान्सलेट करून बघितली. त्यांनी लिहिलं होतं की, ते फोन करून नाव, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक विचारतील आणि त्यांची अट अशी होती की, कर्ज काढणाऱ्या व्यक्तीला जपानी यायला पाहिजे. हा पट्ठ्या मला म्हणे, मला शिकव कसा सांगायचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक वगैरे. मी त्याला म्हटलं, बाबा रे, मी तुला लाख शिकवीन पण ते काय बोलतायत हे तुला कळायला नको का? तर म्हणे नाही नाही तू सांग मी करीन मॅनेज. मी सांगितलं आणि त्याने पाठ पण केलं. फोन वर समोरच्या बाईनी सिक्वेन्स बदलला आणि नावाच्या आधी पत्ता विचारला आणि या भाईंनी नाव सांगितलं. त्या बाईनी ३ दा वेगवेगळ्या पद्धतीनी विचारलं की पत्ता काय आहे आणि याने प्रत्येक वेळेला वेगवेगळी उत्तरं दिली. त्यांना कळून चुकलं की या मनुष्याला काही जपानी येत नाहीये आणि नंतर मेल करून सांगितलं की आम्ही तुझं कर्ज नाकारलं आहे!! :)
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 01/24/2023 - 12:17
नवीन
हे बघा ऐका आणि सांगा काय वाटते.
- Log in or register to post comments
T
Trump
Tue, 01/24/2023 - 14:53
नवीन
थोडीच बघली. चांगली हजामत केली आहे.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 01/25/2023 - 07:27
नवीन
भारताची नंबर दोनची अर्थव्यवस्था नबर एकच्या किमान दुप्पट मोठी आहे. याच मुळे करोंना काळात न भारतात मंदी आली न महागाईचा भडका उडाला. प्रती व्यक्ति आय ही प्रत्यक्षात चार पट पेक्षा ही जास्त .आणि जीडीपी ही अनेक पट जास्त असू शकते. कारण 90 टक्के लोक आपली आय कमी दाखवितात. भारतातील लोकांचे राहणी मन वर दिलेल्या अधिकान्श देशांपेक्षा अनेक पट उत्तम आहे. इथे फ्री शिक्षण, फ्री उपचार आणि फ्री राशन आहे. बहुतेक सर्वांनाच शीघ्र उपलब्ध आहे. बाकी साऊथ ब्लॉक (तिथे विदेश मंतरलायचे ही कार्यालय आहे ) मध्ये 17 वर्ष काम करताना विदेशांत अनेक वर्ष राहिलेल्या कार्मचार्यांचे देशांच्या बाबतील अनुभव ऐकल्यावर एकच निष्कर्ष निघतो. भारताची स्थिति अनेक आफ्रिकन किंवा यूरोपियन देशांपेक्षा कितीतरी पट उत्तम आहे. बाकी इथे 25 लाख पॅकेज मध्ये माणूस राजा सारखा राहू शकतो. धुणी-भांडी, साफ सफाई, कपड्यांची इस्त्री, भटकंती इत्यादि उत्तम रीतीने करता येते. स्वछता सोडल्यास भारताची स्थिति उत्तम आहे.
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 01/25/2023 - 21:10
नवीन
> भारताची नंबर दोनची अर्थव्यवस्था नबर एकच्या किमान दुप्पट मोठी आहे.
हि दोन नंबरची अर्थव्यस्था GDP वर निगेटिव्ह परिणाम करते कारण दोन नंबर चे आय हे रेंट सीकिंग प्रकारचे आहे. त्याशिवाय ती दुप्पट वगैरे आहे हा शक्य नाही कारण दोन नंबर चा माल शेवटी क्षुल्लक प्लेयर लोकांचा आहे. रिलायन्स, अडाणी, इन्फोसिस ह्या कंपन्या काही अंशतः दोन नंबर मध्ये गुंतल्या असल्या तरी एकूण धंद्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी असतो. बिल्डर्स, राजकारणी आणि इतर लाचखाऊ आणि काही अत्यंत मोजके लोक सोडल्यास बहुतेक लोकांची दोन नंबर ची आय हि एक नंबर च्या आय पेक्षा खूपच कमी असते.
आणि निव्वळ गृहीतक म्हणून हे मान्य केल्यास सुद्धा इतर देशांत सुद्धा विशेषतः ब्राझील, मेक्सिको, इंडोनेशिआ इत्यादी देशांत सुद्धा तसेच असू शकते त्यामुळे तुलनेने भारत तिथे सुद्धा मागे पडतो.
> थे फ्री शिक्षण, फ्री उपचार आणि फ्री राशन आहे.
हे तर प्रत्यक्षांत मागासलेल्या समाजाचे लक्षण आहे. शिक्षण भिकार दर्जाचे, उपचार कुठल्या तरी कोपऱ्यांत कुणी डॉक्टर ने पाहिले तर पाहिले दर्जाचे आणि राशन तर फक्त अति गरीब सोडून कुणी खाणार सुद्धा नाही असले. "शिक्षण" हे सध्या देश सोडून जाण्याचे प्रथम कारण आहे.
एम्स सारख्या ठिकाणी आरोग्यव्यवस्था काय आहे ह्याबद्दल कोरियन मुलीने बनवलेला व्हिडिओ पहा :
https://twitter.com/YujungHwang3/status/1616548339595579393
> भारतीय आरोग्यव्यवस्था
भारतांत मेडिकल (खाजगी) व्यवस्था जगातील तुलनेने चांगली आहे पण फक्त तुम्हाला परवडत असेल तर. मुंबई, पुण्यात अनेक डॉक्टर्स आहेत त्यामुळे फक्त काही हजार रुपये खर्च करून डॉक्टर आणि औषधांचा खर्च होतो. बायपास, अँजिओग्राफी, गुढगे बदलणे इत्यादी गोष्टी मध्यमवर्गीयाला परवडू शकतात.
पण भारतीय आरोग्यव्यवस्थेचा समग्र आढावा घ्यायचा असेल सर्वसाधारण भारतीय म्हणजे बिहारी गांवात राहणारे, उत्तर प्रदेश, ओरिसा किंवा आपल्या इथे गडचिरोली, इत्यादी ठिकाणी राहणारे ह्यांची आरोग्यव्यवस्था कशी आहे हे पाहणे गरजेचे आहे.
बिहार मध्ये १००० मुलांनी जन्म घेतला तर त्यातील २७ मुले मरतात. हा एकदा २००१ मध्ये ६० होता आणि मागील २० वर्षांत कमी झाला आहे. तुलनेने हा आकडा बोत्सवाना सारख्या आफ्रिकन देशा प्रमाणे आहे. हाच आकडा मेक्सिको मध्ये १२ आहे.
गोव्यांत हाच आकडा ३ आहे. महाराष्ट्रात १६ आहे.
तात्पर्य :
भारताच्या सरासरी बद्दल बोलायचे झाले तर सर्व भारतीयांचा डेटा पाहूनच बोलले पाहिजे, कारण बहुतेकदा आपण इतर भारतीय आपल्याप्रमाणेच असतील अशी समजूत करून घेतो पण बहुतेक भारतीय आपल्या पेक्षा खूपच गरीब आहेत आणि त्यांचे आयुष्य आणखीनच कठीण आहे. भारतीय शिक्षण, आरोग्यव्यवस्था आणि तथाकथित फुकट राशन ह्यांत गर्व बाळगण्यासारखे काहीच नसून ह्या तिन्ही गोष्टी भारताच्या अधोगतीचीच साक्ष देतात.
> बाकी इथे 25 लाख पॅकेज मध्ये माणूस राजा सारखा राहू शकतो. धुणी-भांडी, साफ सफाई, कपड्यांची इस्त्री, भटकंती इत्यादि उत्तम रीतीने करता येते. स्वछता सोडल्यास भारताची स्थिति उत्तम आहे.
आधी लिहिल्या प्रमाणे तुम्ही किम जोंग ऊन असाल तर नॉर्थ कोरिया हे जगांतील सर्वांत उत्तम राष्ट्र आहे ह्यांत शंकाच नाही. किंवा तुम्ही अंबानी आणि अडाणी असाल तर भारत तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. पण इथे चर्चा सर्वसामान्य माणसाची आहे.
भारतीय रिपोर्ट्स प्रमाणे तुम्ही जर महिन्याला २५,००० पेक्षा जास्त कमावता तर तुम्ही देशांतील सर्वांत श्रीमंत १०% लोकांमध्ये येता. आता हा आकडा चुकीचा आहे असे धरले आणि प्रत्यक्षांत वरच्या १०% मध्ये येण्यासाठी महिन्याला १ लाख सुद्धा कमवायला पाहिजे असे धरले तरी १ लक्ष सुद्धा कमीच आहे. त्याशिवाय दोन नंबर चा पैसा हा श्रीमंत लोकांकडेच जास्त असतो म्हणजे देशांतील सर्वां गरीब ३०% लोकांकडे काहीच नाही असा अर्थ होतो. आणि हे ३०% लोक बहुतांशी जनावरां प्रमाणेच जगत आहेत असा अर्थ होतो.
भारतातील काही राज्यांची आणि शहरांची तुलना पूर्व युरोपिअन देशांशी होऊ शकते. गोवा, मुंबई, चंदिगढ, बेंगलोर, सिक्कीम इत्यादी. पण हे भाग म्हणजे भारत नव्हे. बहुतेक भारतीय हे उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा आणि बंगाल भागांत राहतात.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 01/30/2023 - 02:45
नवीन
येथील अजून काही अडचणी
१) एकूण लोकसंख्येतील घटणारी तरुणांची पिढी आणि वाढणारी वयस्कर पिढी ... (जपान) , ऑस्ट्रेल्या ला २६ मिलियन वरून ३० - पुढे ५० मिलियन वर लोकसंख्या न्यायाची आहे पण घाऊक स्थनतरीत घेणे हि एकदम परवडणारे नाही , दोन्ही दृष्टिने सुख सोयी आणी पाणी / वीज आणि वर्ण भेद / मिसळ या दृष्टीने !
https://www.aihw.gov.au/reports/australias-health/profile-of-australias-population#Future%20population
नाहीतर ऑस्ट्रेल्या आणि न्यू झीलंड ला " श्रीमंत आशियायी लोकांसाठी" हजारो किमी चे क्षेत्रफळ बाजूला काढून ९९९ वर्षे लीज वर देता येईल जिथे नियम ऑस्ट्रेल्याचे असतील पण बाकी व्यवहार आशियायी असतील प्रति सिंगापोरर निर्माण करता येईल !
२) श्रीमंती मुळे "हलकी" किंवा कमी पगाराची कामे ना करण्याकडे कल ( सिंगापुर मध्ये रेस्टारंट उद्योगात आज काळ सर्वत्र फिलिपिनो दिसतात .. पूर्वी ती संख्या कमी होती )
३) नामशेष होणारे "स्किल सेट " उदाहरण वाहन उत्पादन / बोट उत्पादन यातील तंत्र पॅसिफिक देशातून हरवून गेलाय ते आता कधी परत येण्याची शक्यता नाही
क्रमांक ३ मुळे देशाची वाढणारे परावलंबत्व .. आज भारतात ४ तरी उद्योग पंखे निर्माण करतात .. पॅसिफिक देशात एक पण नसेल
यातून निर्माण झालेलाल उप प्रश्न : एकाच (चीन) वर अवलंबून राह्यलमुळे झालेली पंचाईत ...
- Log in or register to post comments
म
मोदक
Mon, 01/30/2023 - 07:11
नवीन
चांगली चर्चा सुरू आहे.
जिज्ञासूंनी अपर्णा वेलणकर यांचे For Here or To Go हे मराठी पुस्तक जरूर वाचावे. १९४० पासून तिकडे गेलेल्या वेगवेगळ्या मराठी कुटुंबात राहून त्यांना आणि नंतरच्या पिढयांना त्यावेळी आलेल्या अडचणी, त्यांचे अनुभव, अज्ञानातून होणाऱ्या चुका (उदा. उपवासाला म्हणून खाल्लेले फ्राईज प्रत्यक्षात डुकराच्या चरबीत तळलेले असणे) आणि आज इंटरनेटच्या जमान्यात भारतातूनच सगळी माहिती मिळवून तिकडे जाणारी पिढी.. या सर्वांचा प्रवास छान टिपला आहे.
या पुस्तकात बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील...

- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 01/30/2023 - 14:14
नवीन
हे पुस्तक वाचलंय. काही वर्षे अमेरिकेत राहिल्याने पुस्तकातील प्रसंग परिचित वाटतात.
- Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक…
Mon, 01/30/2023 - 09:44
नवीन
मुळात उपवासाला तळलेले कार्बोहायड्रेट खाणेच हास्यास्पद आहे हो!
ते फ्राईज डुकराच्या चरबीत तळलेले असणे आणि ती 'चूक' असणे ही तर लै लांबची गोष्ट झाली.
जर अशा गोष्टी परदेशस्थ मराठी लोकांना, तेही 'अमेरिके'त गेलेल्या, चुका/समस्या वाटत असतील तर त्यांनी समुद्र वगैरे ओलांडून, मुळामुठेच्या काठाचा काही चौरस मैलांचा पवित्र परिसर सोडून स्थलांतर करून कशाला धर्म बुडवावा म्हणतो मी?
- प्रायोरिटी गंडलेला हणमंतअण्णा
- Log in or register to post comments
म
मोदक
Mon, 01/30/2023 - 11:29
नवीन
आता असे आहे.. मी पुस्तकाची माहिती लिहिताना १९४० पासून तिकडे गेलेल्या सगळ्या पिढ्यांचा उल्लेख केला आहे. त्यातल्या कुणीतरी या चुका केल्या असण्याची शक्यता अजिबात नाही असे का गृहीत धरत आहात?
आजच्या युगात सुशिक्षित मराठी लोकं काहीतरी कारणाने ओव्हरस्टे करतात, CBP च्या फॉर्ममध्ये बिनदिक्कत डिक्लेअर कारण्यासारखे काही आणले नाही असे लिहितात आणि ट्रॅफिक पोलिसाने गाडी थांबवली की गाडीतून उतरून त्याच्याकडे चालत जातात.. इतक्या गंभीर चुका आजही लोकं "अनावधानाने" करत असतील तर मी उल्लेख केलेली (आणि पुस्तकात लिहिलेली) चूक फारच निरुपद्रवी आहे.
जुन्या खोंडांना अनेक प्रथा, परंपरा आणि स्वतःच्या सवयी बदलणे सहज जमत नाही - हे सदासर्वकाळ भारतात / भारताबाहेर लागू आहे.
आणि हो... कुटुंबाला प्रायोरिटी म्हणून धर्म बुडाला तरी चालेल अशी धार्मिक प्रायोरिटी मुद्दाम गंडवून ठेवून समुद्र पार केलेले अनेक आजीआजोबा लोकं जवळून बघितले आहेत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2