Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तमिळनाडूचा ईतिहास भाग - ४

अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 09/02/2022 - 08:13
💬 3 प्रतिसाद
ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर. हे मत प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, अजूनतर ही गोष्ट सुरूच होत होती ह्याची पुर्वपिठीका मी ह्या आधी “रिनैशां” पुस्तकात लिहीलीय की कसे ईंग्रज आले नी झोपलेला भारतीय समाज जागा झाला. आता पुढचा प्रश्न जास्त जटील परंतू सरळ निशाण्यावर आहे. बंगालातील तमाम समाज सुधारक भद्रलोकांतून (ऊच्च वर्णीय) आले, ते आपलं धोतर सांभाळत सुधारणा करत होते, राजा राम मोहन राय यांच्यासारख्या व्यक्तिनेही कधी जानवं काढून फेकलं नाही, पण दक्षीणेत हे आंदोलन ब्राम्हण आणी ब्राम्हणवादाविरोधात असे आक्रमक स्वरूपात प्रकट झाले, असं का झालं? जेव्हा रेवरंड (श्रध्देय पादरी) राॅबर्ट काल्डवेल चे “द्रविड व्याकरण” वर पुस्तक आले तर खळबळ माजली. “रेवरंड ने लिहीलंय की तमीळ चे मूळ संस्कृत नाही?” “बरोबर तर लिहीलंय. संस्कृतातीतल पितृ, मातृ आमच्या तमीळशी कुठे मिळतो? ईथे अप्पा- ताई बोललं जातं, पण फादर-मदर आणी मातृ-पितृत साम्य आहे. तमीळ भाषा भारोपीय आर्य शाखेहून पुर्नतः भिन्न आहे” “अजून काय लिहीलंय त्यांनी? आम्ही कुठून आलो?” “आम्ही कुठूनही आलेलो नाही. आर्य बाहेरून आलेत नी ब्राम्हण-क्षत्रिय-वैश्य जाती बनवल्या.” “आम्हाला ते काय म्हणायचे?” “म्लेच्छ, दष्यु, असुर, राक्षस…” “आर्य संस्कृत घेऊन आले तर त्या आधी आम्ही काय बोलायचो?” “भारतात अनेक प्रकारच्या मिळत्या जूळता भाषा होत्या. आजच्या तमीळ, मल्याळम, तुळू, तेलुगू आणी गोंड,ओरांव आदिवासी भाषा एकाच शाखेच्या आहेत. ह्यांचा संबंधं काळ्या समुद्राजवळील सिथीयनांशी जूळायची शक्यता आहे ते आर्यांहून भिन्न आहेत.” “आर्यांच्या आधी ऊत्तर भारतीय भाषासुध्दा तमीळ सारख्या असतील?” “रेवरेंड लिहीतात कि आर्यांचा प्रभाव ऊत्तर भारतात जास्त होता ज्याला ते आर्यावर्त म्हणायचे, ह्यामुळे तिथल्या भाषांत संस्कृतचा प्रभाव जास्त आहे, जसं जसं आम्ही दक्षीणेला जाऊ तसतशी संस्कृत कमी होत जाईल, तमीळ शाखेचे शब्द वाढत जातील.” “पण, येथील मंदिरे? पुजा-विधी?, ब्राम्हण? संस्कृत मंत्र? हे सगळे तर…” “रेवरेंडच्या सांगण्यानूसार मनु आणी रामायणाच्या अनुयायांनी आपला प्रभाव टाकणे सुरू केले होते, त्यांनीच ईथे ब्राम्हणांना पाठवले.” “याचा अर्थ तमीळ ब्राम्हण मूळात तमिळ नाहीयेत? ते संस्कृत-भाषी आणी आर्यांचे धर्मप्रचारक होते?” “धर्मप्रचारक तर रेवरंड सुध्दा आहे, त्याला ब्राम्हणशाहीची समस्या असेलच. पण विचार करून बघ, पुर्ण तमीळ प्रदेशात फक्त ३ टक्के ब्राम्हण आहेत. ना आपला रंग, न आपली भाषा, ते तर अजूनही आम्हाला म्लेंच्छ समजतात, लग्न तर सोडाच ते आम्हाला स्पर्शही करत नाहीत.” “रेवरंड ला काय हवंय? आपण ख्रिस्ती व्हायचं? आमचा धर्म काय असेल?” “नाही. असं काहीही लिहीलेलं नाही, पण आपण एक व्हावं ही ईच्छा तर आहे. तमीळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड, तुळू सगळे एकत्र व्हावेत, एक भाषा, एक रंग, एका संस्कृती चे लोक “द्रविड” म्हटले जायला हवेत.” “आणी ईथले ब्राम्हण? ते काय म्हटले जातील?” “त्याना वाटत असेल तर ते आम्हाला सहयोग देऊ शकतात, पण ते द्रविड नाहीयेत.” “हम्म… रेवरेंड एक ईंग्रज आहे, पंधरा वर्षांआधी बायबल प्रचारासाठी भारतात आला होता, त्याने हजार वर्षांच्या आधीची संपुर्ण दक्षीण संस्कृती आणी भाषेवर एक फूल एंड फायनल पुस्तक लिहीले? आणी आम्ही ते स्विकारायचं? थोडी घाई नाही होत का?” “तु स्वतः वाचून बघ, एक-एक गोष्ट तोलून मापून लिहीलीय.” “तोलून-मापून…हे पुस्तक आम्हा तमीळींचं बायबल नको बनायला.” “तमीळ नाही, द्रविड बोल” “थोडा वेळ दे, मी हे पुस्तक वाचून घेतो, तमीळहून द्रविड बनण्यात फक्त एका पुस्तकाचं अंतर आहे” ………………… आर्य आणी द्रविड शब्द आधीपासूनच होते पण ईंग्रजांआधी ह्यांचा ऊपयोग सामुहीक वंशासाठी केला जायचा? आर्य विरूध्द द्रविडच्या टाईमिंग वर एकदा लक्ष द्यायला हवे. १८३५ ला लाॅर्ड मकाले ने ते भाषण दिलं (रिनैशाॅ पुस्तकात अनूवाद केलाय). १८५६ ला पादरी राॅबर्ट काल्डवेल दिवारा द्रविड व्याकरण लिहीले गेले, आणी एका द्रविड वंशाची गोष्ट सांगण्यात आली. तोपर्यंत आर्य वंश रडारवर नव्हता. १८५७ ला भारतात क्रांती झाली, १८६१ ला पहिल्यांदा लंडन मध्ये मैक्समूलर नामक भाषातज्ञ एक वाक्य बोलले, “ आर्यांचे पुर्वज हे शेतकरी नी भटके होते” यानंतर ते ह्याच भाषणात आर्य भाषांवर चर्चा करू लागले. फक्त एका दशकात ह्या दोन शब्दांचं वर येणं एक योगायोग होता की मैक्समूलर चं “स्लिप ओफ टंग” होतं? ही गोष्ट ईतकी किचकट नाहीये. जे लोक “आर्य आक्रमण सिध्दांताला” खरं ठरवतात ते हा सिंध्दांत लिखीत स्वरूपात दाखवू शकतात? मैक्समूलरचं ते पुस्तकं तर खुलेआम ओनलाईन ऊपलब्ध आहेत, तिथे असा काही सिंध्दांत अस्तित्वात आहे का? नाही तर ह्या प्रकरणाची सुरूवात कधी झाली? मी आता तमीळनाडूतून पुन्हा युरोपच्या ईतिहासात काही वेळासाठी येतो, अश्या देशात जिथे काही काळासाठी आर्य शब्द स्फोटक सिध्द झाला. मैक्समूलर चा जन्म जर्मनीचा होता, जो तेव्हा प्रशिया नामक छोटा देश होता, त्या देशात एक स्वप्न पाहीलं जात होतं, जर्मन वंशाचं एक भव्य राष्ट्र बनवण्याचं, त्यानी जगातील ग्रंथात धागेदोरे शोधणे सुरू केले. काही भारतीय ग्रंथही खंगाळले. मैक्समूलर च्या आधीच जर्मनीत काही ऊपनिषदे, भग्वदगिता आणी कालिदासाच्या “अभिजाम शाकुंतलम” चे भाषांतर झाले होते. श्लेगल हे युरोपातील पहीले संस्कृत प्रोफेसर होते. आर्य शब्द सापडला होता आणी कमीतकमी दोन भाषातज्ञांनी हा तर्क दिला होता की भारताशी सांस्कृतीक धागेदोरे जूळताहेत. हा शब्द पारसी ग्रंथ “अवेस्ता”त वंशाच्या रूपात जास्त स्पष्ट होता, जिथे “आर्यनम वेजः” ला ईरानी पुर्वजांचं स्थान सांगीतलं. जेव्हा मैक्समूलर भाषांमधील साम्य दाखवून एक आर्य समुहाच्या भाषेबद्दल बोलले, तेव्हा ही शब्द काहींनी पकडला. फक्त जर्मनांनीच नाही कर भारतीयांनीही. भारतीय सवर्ण ह्याला वांशीक श्रेष्ठत्वाशी जोडू लागले, आणी दलित स्वतला आर्य आक्रमण पिडीत मूळ निवासी संबोधू लागले. जे ह्याला विरोध करत होते ते एका अश्या सिध्दांताला विरोध करत होते जो कधीच सिध्द केला गेला नव्हता. दयानंद सरस्वतींनी आर्य भारतीय- तिबेटी मूळाचे असल्याचे सांगीतले, तर बाळ गंगाधर टिळक सरळ स्कैंडिनेविया शी धागेदोरे जोडू लागले आणी ज्योतिबा फुलेंनी खालच्या जातींना मूळ निवासी मानण्यावर भर दिला. ब्रह्म समाजाचे बुध्दीजीवी जसे केशवचंद्र सेन आणी रामतनु लाहिरी ईत्यादी आणी ख्रिस्ती मिशनरींनी हे आर्य आक्रमण सिध्दांत स्थापण्यास सहयोग दिला. जेव्हा जर्मनी एक एकीकृत देश बनला, आणी तिथला वांशीक राष्ट्रवाद ऊचंबळू लागला तेव्हा मैक्समूलरना आपली चुकी स्विकारावी लागली. त्यांनी जर्मनीतील स्ट्रासबर्ग स्थित कैसर विल्यम विश्वविद्यालय ऊद्घाटन प्रसंगी सांगीतलं, “जर कोणी व्यक्ति आर्य वंश, आर्य रक्त, आर्य केश, आर्य डोळे ह्यांची गोष्ट करत असेल तो खुप मोठं पाप करतोय. तो भाषाविज्ञाला तोडफोड करून सादर करतोय (dolicocephalic dictionary and brachycephalic grammar). काळ्यातील काळा हिंदूसुध्दा एक गोरा स्कैंडिनैवियाई चा पुर्वज आहे. आता फार ऊशीर झाला होता. भलेही आर्य नामक वंश स्वतः मैक्समूलरच्या लेखी निराधार असेल पण भारतात आर्य- द्रविड, आर्य-शूद्र वंशवांद अनंत काळासाठी चालू राहील. भारत विशेषज्ञ मैक्समूलर कधीच भारतात आले नाहीत पण त्यानी खुप मोठी आग लावली होती आणी त्यात त्यांचा स्वतचा जर्मनी पहीले जळून राख झाला. (क्रमशः) मूळ लेखक - प्रविण झा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1850 views

💬 प्रतिसाद (3)
स
सुबोध खरे Fri, 09/02/2022 - 08:23 नवीन
गुगल भाषांतरावरअधिक संस्कार करणे आवश्यक आहे. जसेच्या तसे भाषांतर केल्यास वाचायला विचित्र वाटते. Don't come to conclusion who is right and who is wrong याचं ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर हे जसंच्या तसं भाषांतर वाटतंय
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 09/03/2022 - 20:21 नवीन
छान लेखमाला. नवी माहिती मिळते आहे. परंतु मराठी लेखमालेत "मैक्समूलर" आणि "स्कैंडिनैवियाई" हे हिंदी शब्द का वापरले आहेत? हिंदीचे मराठीवरील आक्रमण चिंताजनक आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/15/2022 - 07:49 नवीन
(( आर्य विरूध्द द्रविडच्या टाईमिंग वर एकदा लक्ष द्यायला हवे.)) हुशार लोक टायमिंग बरोबर साधतात !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा