"राहुल द्रविड- The Unsung Hero Of Indian cricket"
Cricket Is a Gentleman's Game" असं नेहमी बोललं जातं... हे नाव सार्थ करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपल्या दि वॉल म्हणजेच राहुल द्रविडच नाव अग्रक्रमी ठेवावं लागेल. बघा ना १९९६-२०१३ अशी १७ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द आणि एकही controversy (वाद) नाही.. कोणीही कितीही टीका करुदेत राहुल मात्र नेहमी शांत असायचा. तो फक्त आणि फक्त बॅटनेच उत्तर द्यायचा..
संघ कोणत्याही संकटात असुदे.. मग ते संकट मैदानावरच असुदे अथवा मैदानाबाहेरच राहुल द्रविड संघासाठी नेहमी धावून यायचा... नेहमीचा सलामी फलंदाज जखमी असताना सलामीला कोण जाणार किंवा संघातील यष्टिरक्षक फलंदाज आऊट ऑफ फॉर्म आहे तर आयत्या वेळेस यष्टीरक्षण कोण करणार असे पेचप्रसंग जेव्हा जेव्हा निवडसमिती समोर उभे ठाकायचे तेव्हा डोळ्यासमोर एकच चेहरा यायचा.. तो म्हणजे राहुल द्रविड.. ज्या वेळी भारताची फलंदाजी ढेपाळायची किंवा एका भक्कम भागीदारीची गरज असायची तेव्हा तेव्हा तो भिंत बनून मैदानावर उभा राहायचा आणि भारताचा डाव सुस्तिथीत पोहोचवायचा, त्यामुळेच त्याला 'दि वॉल' आणि 'मिस्टर डीपेंडेबल' अशी ओळख मिळाली.
२००८ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात त्याने चाळीस चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव काढली होती, त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला Standing Ovation दिलं होत. फक्त एक धाव काढल्यानंतर Standing Ovation मिळणारा राहुल द्रविड एकमेव क्रिकेटपटू असेल.
कारकिर्दीच्या सुरवातीला द्रविड वर कसोटी प्लेअर असा शिक्का बसला होता.. अनेकदा टीका पण झाली. अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात द्रविडची प्रतिमा फक्त एक चांगला कसोटी खेळाडू अशीच आहे. एवढच काय तर १९९७-१९९८ च्या दरम्यान क्रिकेट मधील जाणकार मंडळी द्रविडचा जन्म वनडे क्रिकेट साठी झालेलाच नाही असं उघड बोलायचे. त्याला कारणही तसच होतं, वनडे कारकिर्दीच्या सुरवातीला द्रविड थोडा धीमाच खेळायचा. पण त्यांनतर द्रविड ने त्याच्या फलंदाजी तंत्रावर प्रचंड मेहनत घेतली आणि धावा काढण्याच्या गतीमध्ये सुधार केला. हाच द्रविड १९९९ च्या विश्वचषकातील सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. याच राहुल द्रविडने पुढे जाऊन एकदिवसीय क्रिकेट मध्ये २२ चेंडूत अर्धशतक केले. तो एकच टी-२० सामना खेळला पण त्या सामन्यात त्याने सलग तीन षटकार मारले होते. कसोटी आणि वनडे अश्या क्रिकेट च्या दोन्ही प्रारूपात दहा हजार पेक्षा जास्त धावा काढणारे फक्त सात खेळाडू आहेत आणि त्या सातपैकी एक राहुल द्रविड आहे.
राहुल द्रविडने २५ कसोटी आणि ७९ एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व सुद्धा केलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या ७९ एकदिवसीय सामन्यांपैकी ४२ सामन्यांत भारत विजयी झाला आहे.
साऊथ आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जैक कैलिस एकदा म्हणाला होता, “जर राहुल द्रविडचा जन्म भारताऐवजी दुसऱ्या देशात झाला असता तर त्याला सचिन तेंडूलकर पेक्षा जास्त प्रसिध्दी मिळाली असती." सचिन च्या प्रभावाखाली राहुल द्रविडचे भारतीय संघासाठीचे योगदान नेहमीच झाकोळले गेले... कसोटी क्रिकेट मध्ये १६४ सामन्यांत ५२.३१ च्या सरासरीने १३२८८ धावा, ३६ शतके आणि ५ द्विशतके...विक्रमी २१० झेल... ३४४ एकदिवसीय सामन्यांत ३९.१७ च्या सरासरीने १०८८९ धावा १२ शतके व ८३ अर्धशतके.. हीच कामगिरी त्याने दुसऱ्या देशासाठी केली असती तर तिथले क्रिकेट प्रेमी त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते...आपण तरी काय करणार त्याच नशिबच इतकं बेकार होत की त्याने ज्या कालावधीत भारतासाठी हे योगदान दिले त्यावेळेस क्रिकेटचा देव पण त्याच संघाकडून खेळत होता.
कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यापासून नेहमी त्याच्या वाट्याला साईड हिरोचीच भूमिका आली. त्याने कसोटी पदार्पणात क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ९५ धावा काढल्या पण दुर्दैवाने सौरव गांगुलीची पण ती डेब्यू (debut) मॅच होती आणि गांगुली ने त्या सामन्यात १३१ धावा केल्या... 2001 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ दिवस मैदानावर तग धरून त्याने ३५३ चेंडूत १८० धावा केल्या पण दुर्दैवाने त्याच सामन्यात व्ही. व्ही. एस लक्षमणने २८१ धावा काढल्या.. १९९९ च्या विश्वचषकात त्याने १२९ चेंडूत १४५ धावा काढल्या हीपण खेळी कुणाच्या लक्षात राहिली नाही कारण त्या सामन्यात गांगुलीने १८३ धावा काढल्या होत्या.
२०१३ मध्ये त्याने क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर तो प्रशिक्षक म्हणून पुन्हा मैदानात उतरला. २०१५ ते २०१९ या कालावधीत तो भारताच्या १९ वर्षाखालील आणि इंडिया A संघांचा प्रशिक्षक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०१८ चा अंडर -१९ विश्वचषक जिंकला. बेंगलोर स्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणूनही त्याची नियुक्ती केली गेली. रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शुभमन गिल अश्या नव्या पिढीतील रत्नांना पैलू पडणारा कलाकार म्हणून राहुलच नाव घेतलं जातं. गतवर्षी राहुल द्रविडला भारताच्या मुख्य संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले. सध्याचा भक्कम संघ आणि राहुल द्रविड सारखा मार्गदर्शक यामुळे डिसेंबरला होणाऱ्या टी -२० विश्वचषक आणि पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची विजेतेपदाची दावेदारी आणखी बळकट झाली आहे.
मला राहुल द्रविड आवडण्यापाठीमागचे मुख्य कारण म्हणजे त्याचे साधे राहणीमान... मुलांच्या शाळेत इतर पालकांसोबत रांगेत उभं राहणं, बेंगलोर च्या रस्त्यांवर रिक्षाने केलेला प्रवास, बंगळुरू विश्व विद्यालयाने दिलेली डॉक्टरेट नाकारणे या सगळ्या गोष्टी त्याला इतर क्रिकेटपटूंपासून वेगळ्या करतात. शतक झाल्यानंतर खास असं सेलिब्रेशन नाही की मीडिया मध्ये उथळ प्रतिक्रया नाही किंवा कुणावरही अनावश्यक टीका नाही. खेळाडू, प्रशिक्षक, सेलिब्रिटी या पलीकडे तो एक व्यक्ती म्हणून इतर खेळाडूंपेक्षा खूप वेगळा आहे आणि म्हणूनच तो अनेकांसाठी 'रोल मॉडेल' आहे.
काही प्रसिद्ध खेळाडूंनी राहुल द्रविड बद्दल काढलेले उदगार:
धन्यवाद ..!
७-८ महिन्यांपूर्वी मी महेंद्रसिंह धोनी बद्दल एक लेख लिहला होता तोपण नक्की वाचा. दुवा खाली देत आहे:
https://www.misalpav.com/node/49669
कारकिर्दीच्या सुरवातीला द्रविड वर कसोटी प्लेअर असा शिक्का बसला होता.. अनेकदा टीका पण झाली. अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात द्रविडची प्रतिमा फक्त एक चांगला कसोटी खेळाडू अशीच आहे. एवढच काय तर १९९७-१९९८ च्या दरम्यान क्रिकेट मधील जाणकार मंडळी द्रविडचा जन्म वनडे क्रिकेट साठी झालेलाच नाही असं उघड बोलायचे. त्याला कारणही तसच होतं, वनडे कारकिर्दीच्या सुरवातीला द्रविड थोडा धीमाच खेळायचा. पण त्यांनतर द्रविड ने त्याच्या फलंदाजी तंत्रावर प्रचंड मेहनत घेतली आणि धावा काढण्याच्या गतीमध्ये सुधार केला. हाच द्रविड १९९९ च्या विश्वचषकातील सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. याच राहुल द्रविडने पुढे जाऊन एकदिवसीय क्रिकेट मध्ये २२ चेंडूत अर्धशतक केले. तो एकच टी-२० सामना खेळला पण त्या सामन्यात त्याने सलग तीन षटकार मारले होते. कसोटी आणि वनडे अश्या क्रिकेट च्या दोन्ही प्रारूपात दहा हजार पेक्षा जास्त धावा काढणारे फक्त सात खेळाडू आहेत आणि त्या सातपैकी एक राहुल द्रविड आहे.
राहुल द्रविडने २५ कसोटी आणि ७९ एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व सुद्धा केलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या ७९ एकदिवसीय सामन्यांपैकी ४२ सामन्यांत भारत विजयी झाला आहे.
साऊथ आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जैक कैलिस एकदा म्हणाला होता, “जर राहुल द्रविडचा जन्म भारताऐवजी दुसऱ्या देशात झाला असता तर त्याला सचिन तेंडूलकर पेक्षा जास्त प्रसिध्दी मिळाली असती." सचिन च्या प्रभावाखाली राहुल द्रविडचे भारतीय संघासाठीचे योगदान नेहमीच झाकोळले गेले... कसोटी क्रिकेट मध्ये १६४ सामन्यांत ५२.३१ च्या सरासरीने १३२८८ धावा, ३६ शतके आणि ५ द्विशतके...विक्रमी २१० झेल... ३४४ एकदिवसीय सामन्यांत ३९.१७ च्या सरासरीने १०८८९ धावा १२ शतके व ८३ अर्धशतके.. हीच कामगिरी त्याने दुसऱ्या देशासाठी केली असती तर तिथले क्रिकेट प्रेमी त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते...आपण तरी काय करणार त्याच नशिबच इतकं बेकार होत की त्याने ज्या कालावधीत भारतासाठी हे योगदान दिले त्यावेळेस क्रिकेटचा देव पण त्याच संघाकडून खेळत होता.
कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यापासून नेहमी त्याच्या वाट्याला साईड हिरोचीच भूमिका आली. त्याने कसोटी पदार्पणात क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ९५ धावा काढल्या पण दुर्दैवाने सौरव गांगुलीची पण ती डेब्यू (debut) मॅच होती आणि गांगुली ने त्या सामन्यात १३१ धावा केल्या... 2001 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ दिवस मैदानावर तग धरून त्याने ३५३ चेंडूत १८० धावा केल्या पण दुर्दैवाने त्याच सामन्यात व्ही. व्ही. एस लक्षमणने २८१ धावा काढल्या.. १९९९ च्या विश्वचषकात त्याने १२९ चेंडूत १४५ धावा काढल्या हीपण खेळी कुणाच्या लक्षात राहिली नाही कारण त्या सामन्यात गांगुलीने १८३ धावा काढल्या होत्या.
२०१३ मध्ये त्याने क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर तो प्रशिक्षक म्हणून पुन्हा मैदानात उतरला. २०१५ ते २०१९ या कालावधीत तो भारताच्या १९ वर्षाखालील आणि इंडिया A संघांचा प्रशिक्षक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०१८ चा अंडर -१९ विश्वचषक जिंकला. बेंगलोर स्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणूनही त्याची नियुक्ती केली गेली. रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शुभमन गिल अश्या नव्या पिढीतील रत्नांना पैलू पडणारा कलाकार म्हणून राहुलच नाव घेतलं जातं. गतवर्षी राहुल द्रविडला भारताच्या मुख्य संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले. सध्याचा भक्कम संघ आणि राहुल द्रविड सारखा मार्गदर्शक यामुळे डिसेंबरला होणाऱ्या टी -२० विश्वचषक आणि पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची विजेतेपदाची दावेदारी आणखी बळकट झाली आहे.
मला राहुल द्रविड आवडण्यापाठीमागचे मुख्य कारण म्हणजे त्याचे साधे राहणीमान... मुलांच्या शाळेत इतर पालकांसोबत रांगेत उभं राहणं, बेंगलोर च्या रस्त्यांवर रिक्षाने केलेला प्रवास, बंगळुरू विश्व विद्यालयाने दिलेली डॉक्टरेट नाकारणे या सगळ्या गोष्टी त्याला इतर क्रिकेटपटूंपासून वेगळ्या करतात. शतक झाल्यानंतर खास असं सेलिब्रेशन नाही की मीडिया मध्ये उथळ प्रतिक्रया नाही किंवा कुणावरही अनावश्यक टीका नाही. खेळाडू, प्रशिक्षक, सेलिब्रिटी या पलीकडे तो एक व्यक्ती म्हणून इतर खेळाडूंपेक्षा खूप वेगळा आहे आणि म्हणूनच तो अनेकांसाठी 'रोल मॉडेल' आहे.
काही प्रसिद्ध खेळाडूंनी राहुल द्रविड बद्दल काढलेले उदगार:
"If I have to put anyone to bat for my life, it'll be Kallis or Dravid" - Brian Lara
"All things going around is not called aggression. If you really want to see aggression, look into dravid's eyes." - Mathew Hyden
"When I am done with my profession. I wish I could go with the reputation that Rahul Dravid earned" - Harsha Bhogale
"Even though Sachin is great, I have always found Rahul more strong and hard to get out. " - shoaib Akhter
"Try to take his wicket in first fifteen minutes, if you can't then only try to get reamaning wickets."- Steve Waugh
"Sachin is God. Saurav is the God on off side. Laxman is the God of 4th innings. But when the doors of the temple are closed, even Gods are behind THE WALL."- A Fan
धन्यवाद ..!
७-८ महिन्यांपूर्वी मी महेंद्रसिंह धोनी बद्दल एक लेख लिहला होता तोपण नक्की वाचा. दुवा खाली देत आहे:
https://www.misalpav.com/node/49669
९९% हे सचिन नाही तर सुनिल गावस्कर म्हणला होता...१९७८ मध्ये पाकिस्तानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात सुनीलने पहिल्या डावात १११ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात सुनील यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला होता. परंतु कोणी अपीलच केले नाही. सुनील सुद्धा शांतपणे पुढचा चेंडू खेळायला तयार झाला. नंतर त्याने १३७ धावा केल्या.