आत
आत मी, बाहेर कोण?
जगण्याच्या अवस्था किमान दोन.
कधी पाखरू, कधी मुंगी,
तरी उतरत नाही जगण्याची धुंदी.
वाटेने तुडवले, लाटांनी बुडवले,
पावसाने झोडपले, थंडीने थिजवले.
संकटांचा उन्हाळा दरवर्षी आला
निजलेलं माणूसपण जागवून गेला.
ध्यानाच्या समाधीतही चाचपडतो,
अंगावरून हात फिरवत स्वतःला शोधतो.
भर दुपारी सूर्य डोक्यावर घेतला
आतला अंधःकार तरी नाही मिटला.
माणसाचं अंतःकरण म्हणजे सिंहाची गुहा
स्वतःला जिंकलं तरच बाहेर यायची मुभा.
अंतरंगातला देव जसा चंदनाचा गाभा
ज्याला गवसला तो विटेवरी उभा.
💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 06/09/2022 - 05:42
नवीन
मिटर मधे बसवताना काही शब्द बहुतेक मागेपुढे झाले असावेत.
पण तरीसुध्दा वाचाविशी वाटली, जो विचार मांडायचा प्रयत्न केला आहे तो प्रयत्न आवडला.
लिहित रहा
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अनुस्वार
गुरुवार, 06/09/2022 - 14:13
नवीन
पुढच्या प्रयत्नात उपयोग होईल.
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
गुरुवार, 06/09/2022 - 05:50
नवीन
स्वतःचा शोध घेण्याची कल्पना सांगणारी कविता खूप आवडली.
- Log in or register to post comments
अ
अनुस्वार
गुरुवार, 06/09/2022 - 14:22
नवीन
आपल्याला कविता आवडली आनंद झाला.
- Log in or register to post comments