मनात भाषांतर न करता
एक माहिती हवी आहे.
शहरात राहणार्या बहुतांश मराठी लोकहो! तुमच्या घरात हिंदीभाषिक कोणीही नसूनही,किंवा तुमच्या अवतीभोवती हिंदी भाषिकांचा घोळका सतत नसूनही आपल्याला सहजपणे हिंदीतून कसं काय बोलता येतं? विशेष परिश्रम न घेताही हिंदी शब्द कसे आठवतात? वाक्ये बरोबर कशी काय तयार होतात मनात? हिंदीतून बोलताना शहरी मराठी लोकांना(विशेषत: महानगरातल्या) मनात मराठी वाक्याचे हिंदीत भाषांतर करावे लागत नाही. सहजपणे बोलता येतं हे भाषांतर न करता सहजपणे एखादी भाषा बोलता येणं मानवी मेंदू कसं शक्य करतो? किंवा हे कशामुळे होतं? हिंदी आणि मराठीत बरेचसे शब्द समान आहेत किंवा हिंदी मालिका ,हिंदी सिनेमे यांच्या भडिमारानेच हे शक्य झालंय का? तसं असेल तर मराठीशी अजिबात मिळतीजुळत्या नसणार्या भाषेतील कार्यक्रम अनेक महिने ऐकले तर त्या भाषेत हिंदी येतं तितक्या सहजपणे बोलता येईल का? म्हणजे मनात मराठी वाक्याचं लक्ष्यित भाषेत भाषांतर न करता?
मात्र आपापसात बोलायची भाषा हिंदी होती त्यामुळे मराठी बरोबरच, गुजराती, कोकणी व हिंदी भाषा बोलायला सहजच शिकलो. पुढे नोकरीनिमित्ये गुजरातला गेल्यामुळे गुजराती बोलण्याबरोबर लिहू व वाचू देखील लागलो.तुम्ही महाराष्ट्रात राहून तुमच्या गुजराती मित्राशी हिंदीत बोलायचात ,पण गुजरातेत जाऊन गुजराती बोलूच काय लिहू नि वाचूही लागलात. छान! मराठीला शत्रूंची गरज नाही ते का म्हणतात हे कळाले.