कोणती गाडी घ्यावी आहे. सल्ला हवा आहे
या मार्च मधे जुनी चार चाकी बदलून नवी घ्यायच्या विचार करतोय.
बजेट साधारणतः अकरा लाखांच्या आसपास.
प्रवास फारसा नाही. मात्र महिन्यातून एकदा गावी जाताना ५५० किमी चा प्रवास होतो. ( सलग ३०० किमी)
मुम्बईत महिन्याभरात साधारण तेवढाच प्रवास होतो.
काही ऑप्शन समोर आहेत.
टाटा नेक्सॉन ( पेट्रोल)
ह्युंदाई क्रेटा
महिंद्रा एक्स्युव्ही ३००
रेनॉल्ट कायगर
किया सॉनेट
सध्याची वापरतोय त्या ह्युंदाई अॅसेंट ने बारा वर्ष खूपच उत्तम सेवा दिली. खरेतर ही गाडी अजूनही उत्तम आणि स्मूथ चालते रिपेअरिंग चा अगदी किरकोळ आहे.
( काढावी असे वाटत नाही पण फक्त फक्त १२ वर्षे झाली या कारणास्तव काढतोय).
वाहनाचा वापर मर्यादित आहे. त्यामुळे इच्च्छा असूनही टाटा सफारी वा तत्सम एस यु व्ही घेणे टाळतोय.
ईव्ही च्या बाबतीत अजूनही बॅटरी ची रेंज एका चार्जिंगवर २०० किमी च्या वर मिळत नाहीये.( हीच अडचण आहे)
किम्मत,कम्फर्ट , बूट स्पेस आणि देखभालीचा त्रास या मुद्द्यांवर यातली कोणती गाडी चांगली वाटते ते सांगा.
जसजशी विजेवरील वाहने स्वस्त आणि लोकप्रिय होतील तसतशी जुन्या गाड्यांचा बाजार देखील वाढेल. पेट्रोल / डिझेल वरील अवलंबित्व कमी झाले तर अरब देश त्यांचे तेलाचे भाव कमी करतील काय ? आणि त्यायोगे पेट्रोल / डिझेल वरील वाहने वापरणे स्वत होईल काय ?ईलेक्ट्रीक वाहने यशस्वी होनार नाहीयेत. व्हायचे तर ते आतापर्यंत जश्या सीएनजी गाड्या रस्त्यांवर फिरताहेत तश्या फिरताना दिसल्या असत्या. तसेच पेट्रोल डिझेल आताही महाग नाहीये. केंद्र सरकारचा प्रचंड कर लिटर मागे ३३ रूपये) त्यानंतर राज्य सरकारचाही जवळपास तेवढाच ह्यामुळे पेट्रोल जिझेलचे भाव प्रचंड आहेत. नाहीतर पेट्रोल/डिझेल वराल वाहणे वारणं आजही खुप स्वस्तच आहे.