Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी- डिसेंबर २०२१ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 12/16/2021 - 13:15
🗣 131 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, मागच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कुठ्ठाळीच्या (Cortalim) आमदार अलिना सालढाना यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्ष सोडायचा निर्णय घेतला आहे. अलिनांचे पती मथानी सालढाना युनायटेड गोअन्स डेमॉक्रॅटिक पार्टी या ख्रिश्चनांच्या पक्षाचे आमदार होते. २००५ मध्ये या पक्षाने मनोहर पर्रीकरांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यावर मथानींनी पक्षातून बाहेर न पडता पर्रीकरांची साथ दिली होती. पुढे २०१२ मध्ये ते भाजप उमेदवार म्हणून कुठ्ठाळीतून निवडून आले. पर्रीकरांनी त्यांना मंत्रीही केले. पण त्यांचे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन आठवड्यातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर अलिना सालढाना कुठ्ठाळीच्या जागेवरून निवडून येत होत्या. पक्षात गोंधळाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण (बेडलॅम) निर्माण झाले आहे असे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे. मुरगावचे आमदार आणि प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री मिलिंद नाईक यांनी सेक्स स्कॅन्डलमध्ये नाव आल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खाऊंटे यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. ते २०१७ मध्ये दुसर्‍यांदा गोवा विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले होते. गोवा विधानसभेवर दुसर्‍यांदा निवडून गेलेले ते आतापर्यंतचे एकमेव अपक्ष आमदार आहेत. ते मनोहर पर्रीकरांच्या मंत्रीमंडळात मंत्रीही होते. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बाणावलीचे आमदार आणि माजी हंगामी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लुईझिनो फालेरोंनंतर चर्चिल आलेमावांच्या रूपात तृणमूलला स्थानिक पातळीवर प्रभावी असा आणखी एक नेता मिळाला आहे. चर्चिल आलेमाव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकाही दक्षिण गोव्यातून तृणमूलचे उमेदवार म्हणून लढवल्या होत्या. पणजीतून मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर निवडणुक लढण्यासाठी उत्सुक आहेत. २०१७ मध्ये निवडणुक झाली तेव्हा मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री असल्याने त्यांनी विधानसभा निवडणुक लढवली नव्हती. त्या जागेवर भाजपचे सिध्दार्थ कुंकळ्ळीकर जिंकले होते. त्यांनी मनोहर पर्रीकरांसाठी आपली जागा मोकळी केली. ऑगस्ट २०१७ मध्ये त्या जागेवर मनोहर पर्रीकर पोटनिवडणुकीत जिंकले. पर्रीकरांच्या निधनानंतर त्या जागेवर २०१९ मध्ये काँग्रेसचे बाबुश मोन्सेराट यांनी भाजपच्या सिध्दार्थ कुंकळ्ळीकरांचा पराभव केला. मोन्सेराट जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या १० आमदारांसह भाजपमध्ये सामील झाले. पणजीमधून उत्पल पर्रीकरांसह आता सिध्दार्थ कुंकळ्ळीकर आणि बाबूश मोन्सेराट हे पण उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. तिथून भाजपमध्ये बंडखोरी व्हायची शक्यता मोठी दिसत आहे. तेव्हा गोव्यात आता भाजप विरूध्द काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती विरूध्द मगोप-तृणमूल युती अशी तिरंगी लढत होईल असे दिसते. मागे म्हटल्याप्रमाणे भाजप अडचणीत सापडलेला दिसतो. विरोधी पक्ष पुरेसे प्रबळ नाहीत याच कारणाने झाला तर भाजपचा विजय होईल. अन्यथा पक्षाचे कठीण दिसते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 39145 views

🗣 चर्चा (131)
न
निनाद Mon, 12/20/2021 - 04:25 नवीन
उ प्र मध्ये समाजवादी + आप असे सरकार येऊ शकेल. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशातील २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीत जागा वाटपाच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी समाजवादी पक्षासोबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अखिलेश यादव प्रांतातील अनेक प्रादेशिक आणि अल्पसंख्याक गटांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. अखिलेश आणि राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी मंगळवारी २०२२ च्या उत्तर प्रदेश अधिवेशनात जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. आप ने गेल्या दोन महिन्यांत नोएडा, आग्रा, अयोध्या आणि लखनौसह अनेक यूपी शहरांमध्ये तिरंगा यात्रांची मालिका सुरू केली आहे. आप चे सरकार सत्तेत आले तर ते शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे. कासगंज येथे अल्ताफच्या मृत्युनंतर आपचे यूपीचे प्रभारी राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी अल्ताफच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. कुटुंबाला एक कोटी रुपयांची भरपाई आणि सदस्याला सरकारी नोकरीसह घटनेची सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली. न्यायाच्या लढाईत अल्ताफच्या कुटुंबीयांना प्रत्येक टप्प्यावर साथ देणार असल्याचे सांगितले. अल्ताफच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि कुटुंबाला एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची आम आदमी पार्टीचीही मागणी आहे. याच वेळी लिंचिंग मध्ये ठार झालेल्या डॉ नारंग यांची भेट घेणे मात्र आप ने कटाक्षाने टाळले होते. ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या योजनेत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला होता. या सर्व कार्यामुळे आपची ताकद उप्र मध्ये वाढली आहे. आणि आता कदाचित उप्र मध्ये समाजवादी + आप असे सरकार येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 12/20/2021 - 04:31 नवीन
महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये एका फेसबुक पोस्टवरून हिंदूंच्या घरांवर, दुकानांवर हल्ले सुरू करण्यात आले आहेत. काही हल्लेखोरांनी पोलिस स्टेशनवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. ३ डिसेंबर रोजी, पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये मुस्लिमांच्या खुनी जमावाने एका श्रीलंकन ​​नागरिकाला ईशनिंदा केल्याचा आरोप करून जिवंत जाळले. जमाव सतत “गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा” अशा घोषणा देत होता.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 12/20/2021 - 04:57 नवीन
महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये एका फेसबुक पोस्टवरून हिंदूंच्या घरांवर, दुकानांवर हल्ले सुरू करण्यात आले आहेत. काही हल्लेखोरांनी पोलिस स्टेशनवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. ह्यासंबंधी बातमी देता येईल का साहेब काही.
३ डिसेंबर रोजी, पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये मुस्लिमांच्या खुनी जमावाने एका श्रीलंकन ​​नागरिकाला ईशनिंदा केल्याचा आरोप करून जिवंत जाळले. जमाव सतत “गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा” अशा घोषणा देत होता.
ह्याचं काय म्हणे ? ही तर जुनी बातमी आहे न ?
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 12/22/2021 - 04:35 नवीन
प्रिन्ट वर होती पण आता गायब आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 12/20/2021 - 14:06 नवीन
मतदारयाद्यांशी आधार कार्डाचा क्रमांक संलग्न करायचे विधेयक लोकसभेने आज पास केले आहे. त्या दृष्टीने निवडणुक आयोगाने २०१४-१५ मध्येच पावले उचलली होती पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली आणि कायद्याच्या संरक्षणाविना मतदारांचे आधार क्रमांक घेणे अवैध आहे असे म्हटले होते. ते कायद्याचे संरक्षण द्यायचा हा प्रयत्न दिसत आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 12/20/2021 - 18:09 नवीन
कायद्याची चौकट आहे ती आधार ऍक्ट, २०१६ अंतर्गत आधीच बनवली गेली होती. सुप्रीम कोर्टाचे म्हणणे होते की "आधार नेमके काय अन कश्यासाठी ?" हे मूलभूत प्रश्न आणि त्यांचा घटनेच्या अनुषंगाने परामर्ष घेऊन सरकारने काय करायचे आहे अन ह्यातून नागरी हक्कांचे संरक्षण होईल (किंवा हनन) होणार नाही असे सांगावे, त्यानुसार मार्च १६, २०१६ रोजी आधार ऍक्ट, २०१६ पास झाला अन आधारला चौकट मिळाली कायदेशीर, आधारचे नेमके स्वरूप माहिती नसल्यामुळेच माननीय न्यायालयाने ते हियरिंग घेऊन जेव्हा सुस्पष्टता प्राप्त केली त्यानंतरच निवडणूक आयोगाला हे करता आले असते (आधार - निवडणूक ओळखपत्र संलग्न करणे) आता गंमत अशी होईल का १.३ बिलियन प्लस लोकांचे आयडेंटिटी इन्फ्रास्ट्रक्चर एकदम अपग्रेड होईल. उगा फोटोशॉपवर आधार काढुन झेरॉक्स देऊन कागद बनवणारे (अन तेच दाखवणार नाही म्हणून ठिय्या देणारेही काही!) रियलटाईम बायोमेट्रीक किंवा क्यु आर व्हेरिफिकेशनमध्ये मजबूत अडकणार, म्हणजे जेल वगैरे ठाऊक नाही पण किमान अश्या लोकांना मतदानातून तरी गाळणी लागेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 12/20/2021 - 18:11 नवीन
कायद्याची चौकट आहे ती आधार ऍक्ट, २०१६ अंतर्गत आधीच बनवली गेली होती. सुप्रीम कोर्टाचे म्हणणे होते की "आधार नेमके काय अन कश्यासाठी ?" हे मूलभूत प्रश्न आणि त्यांचा घटनेच्या अनुषंगाने परामर्ष घेऊन सरकारने काय करायचे आहे अन ह्यातून नागरी हक्कांचे संरक्षण होईल (किंवा हनन) होणार नाही असे सांगावे, त्यानुसार मार्च १६, २०१६ रोजी आधार ऍक्ट, २०१६ पास झाला अन आधारला चौकट मिळाली कायदेशीर, आधारचे नेमके स्वरूप माहिती नसल्यामुळेच माननीय न्यायालयाने ते हियरिंग घेऊन जेव्हा सुस्पष्टता प्राप्त केली त्यानंतरच निवडणूक आयोगाला हे करता आले असते (आधार - निवडणूक ओळखपत्र संलग्न करणे) आता गंमत अशी होईल का १.३ बिलियन प्लस लोकांचे आयडेंटिटी इन्फ्रास्ट्रक्चर एकदम अपग्रेड होईल. उगा फोटोशॉपवर आधार काढुन झेरॉक्स देऊन कागद बनवणारे (अन तेच दाखवणार नाही म्हणून ठिय्या देणारेही काही!) रियलटाईम बायोमेट्रीक किंवा क्यु आर व्हेरिफिकेशनमध्ये मजबूत अडकणार, म्हणजे जेल वगैरे ठाऊक नाही पण किमान अश्या लोकांना मतदानातून तरी गाळणी लागेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 12/21/2021 - 09:47 नवीन
https://www.tv9marathi.com/national/shivsena-leader-vinayak-raut-oppose-aadhar-link-to-voter-id-bill-599767.html/amp ज्या अर्थी, शिवसेना विरोध करत आहे, त्याअर्थी ही योजना, भारतीय जनतेच्या भल्यासाठीच असणार, हे माझे वैयक्तिक मत आहे... निवृत्त नौसैनिकाला मारहाण करणारे, जनतेच्या भल्यासाठी विचार करणे, शक्य नाही....
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 12/21/2021 - 09:49 नवीन
हे कधी झाले?
निवृत्त नौसैनिकाला मारहाण करणारे, जनतेच्या भल्यासाठी विचार करणे, शक्य नाही....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 12/21/2021 - 10:36 नवीन
https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/retired-navy-officer-madan-sharma-attack-case-shivsena-official-among-arrested-266868.html
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 12/21/2021 - 11:02 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh/word-lynching-practically-unheard-of-before-2014-rahul-gandhi-jabs-pm-amit-malviya-replies-back-to-gandhi-hrc-97-2728149/ 1984 मध्ये, इंदिरा गांधी, यांच्या हत्ये नंतर काय झाले? महात्मा गांधी यांच्या हत्ये नंतर, काय झाले? परमपूज्य राहूल गांधी, यांचे बोलणे, मी तरी मनावर घेत नाही ... अर्थात, घराणेशाहीचे पाईक आणि सुशिक्षित लोकांची गोष्ट वेगळी आहे...
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 12/21/2021 - 13:26 नवीन
कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी त्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करावा आणि माफी मागावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी हे काशीत जाऊन छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा गौरव करतात. बोम्मई यांनी हे समजून घेतले पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले आहे. कर्नाटकात वेगळे व महाराष्ट्रात जगावेगळे अशी भाजपवाल्यांची एकंदरीत तऱ्हा असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे. पंतप्रधानांनी काशीमध्ये मांडलेला विचार चार दिवसांनी बंगळुरूत पोहोचला नाही असा खोचक टोलाही शिवसेनेने भाजपला आणि कर्नाटक सरकारला लगावला आहे. काशीत शिवरायांचा सन्मान आणि बंगळुरूत अपमान हे चालणार नाही हे ढोंग आहे. बंगळुरूचे राजभवन गाठा आणि बोम्मईंचे सरकार आता घालवाच, असे शिवसेनेने म्हटले आहे. एक गोष्ट कळत नाही. कोणतातरी उपटसुंभ उठून असले प्रकार करतो म्हणून लगेच राज्य सरकार घालवायचे का? त्याला पोलिसांनी अटकही केली आहे. आणि ते करणारा काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे हे समोर आले आहे. मग त्याच काँग्रेसच्या पाठिंब्याने स्वतः सत्तेत असलेले चालते? जर कर्नाटकात राहणार्‍या कोणा उपटसुंभाने खोडसाळ उद्देशाने हे कृत्य केले म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जात असेल तर मग ते कृत्य करणारा ज्या पक्षाचा सदस्य आहे त्याच पक्षाबरोबर सत्तेत मांडीला मांडी लाऊन बसल्याबद्दल शिवसेनेला पुढचे हजार जन्म सत्तेच्या जवळपासही फिरकायचा अधिकार नाही. बरं २०१० ची एक गोष्ट हे (सं)पादक विसरले का? त्यावेळी स्वतः बाळ ठाकरेंनी २०१० मध्ये नेहरूंनी शिवाजी महाराजांचा अपमान केला होता असा आरोप केला होता. https://www.newindianexpress.com/nation/2010/apr/29/nehru-denigrated-shivaji-says-sena-chief-151117.html . आताचे काँग्रेसवाले त्याच नेहरूंचे गोडवे गात असतात ना? मग शिवाजी महाराजांचा अपमान ज्याने केला त्याचे गोडवे गाणार्‍यांबरोबर सत्तेत राहिलेले चालते? स्वतः शिवसेनावाले सावरकरांचा इतका उदोउदो करत असतात. त्याच सावरकरांचा काँग्रेसवाले पदोपदी अपमान करत असतात त्याचे काय? जनमत पायदळी तुडवून सत्तेत आलेले हे महाभकास आघाडी सरकार म्हणजे खरोखरच महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/21/2021 - 15:39 नवीन
स्वतः शिवसेनावाले सावरकरांचा इतका उदोउदो करत असतात. त्याच सावरकरांचा काँग्रेसवाले पदोपदी अपमान करत असतात त्याचे काय? नॉटीसेनेचे मराठी बाण्याचे कपडे फाटले असुन उरला सुरला हिंदूत्वाचा लंगोट सुद्धा स्वतःच्याच हाताने सोडवुन घेउन ते नागवे झाले आहेत. या नॉटीसेनेची अवस्था पाहुन मेंदू अवयव असलेला कोणी पक्षात असावा का ? याचीच शंका येते. :))) वरती भाऊंचा जो व्हिडियो दिलेला आहे [ वेळ ७: ३३ ] त्यात ते सांगतात की महाराष्ट्रातला मिडिया हे सांगत नाही की छत्रपतींची विडंबना करण्याचे कुकर्म करणारी लोक हे कॉग्रेस पक्षाचेच आहेत. याच कॉग्रेस च्या गोदीत बसुन मोदींना शिव्या देण्याचे उध्योग नॉटीसेनेचे बिनडोक कावळे करत आहेत. जनमत पायदळी तुडवून सत्तेत आलेले हे महाभकास आघाडी सरकार म्हणजे खरोखरच महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हँहँहँ... माझ्या उद्धवला सांभाळा असे बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शेवटच्या शेवटच्या भाषणात अगदी आगतिकतेने सांगायचे ! त्याचे कारण त्यांना आधिच कळले असावे ! असो... मामु म्हणे सध्या अदृष्य स्वरुपात वावरतात म्हणे ! फोटो ग्राफर अन् व्हिडियो ग्राफर देखील त्यांना रेकॉर्ड करु शकत नाहीत ! :))) जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ye Mulaqat Ek Bahana Hai... :- Khandaan
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 12/21/2021 - 16:24 नवीन
ममतांनी भाजपला लक्ष्य करण्याबरोबरच काँग्रेसवरच डल्ला मारायला सुरवात केलेली दिसते. गोव्यात काँग्रेस पक्षाने ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात कुडतोळी (Curtorim) मतदारसंघातून अलेक्सिओ लोरेंको यांना उमेदवारी जाहीर केली होती. ते लोरेंको २०१७ च्या निवडणुकांमध्ये निवडूनही गेले होते. त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यावरही त्यांनी काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. ममतांना विरोधी पक्षांचे नेतृत्व स्वतःकडे हवे आहे हे उघड आहे आणि सध्या तिथे काँग्रेस असल्यामुळे काँग्रेसला तिथून हटविल्याशिवाय ममतांना ते नेतृत्व मिळणार नाही.तेव्हा भाजपविरोधात अंतिम संघर्ष करण्यापूर्वी आधी त्यांचा काँग्रेसविरोधात संघर्ष होणे अपरिहार्य दिसत आहे. त्यातून काँग्रेसलाच तडाखे द्यायला त्यांनी सुरवात केलेली दिसते. आजच कलकत्ता महापालिकेत तृणमूलने १४४ पैकी १३४ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यात गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये ममतांना थोडेफार यश मिळाले तर राहुलच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला भवितव्य नाही हे लक्षात आलेले काँग्रेसचे नेते बाहेर पडून काँग्रेसला आणखी गळती लागू शकेल. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ४० पैकी १७ जागा मिळाल्या होत्या. तसेच २०१९ मध्ये पणजीची जागा पोटनिवडणुकीत जिंकल्यानंतर तो आकडा १८ वर गेला होता. आता त्या १८ पैकी काँग्रेसकडे दिगंबर कामत आणि प्रतापसिंग राणे हे दोन माजी मुख्यमंत्री हेच आमदार शिल्लक राहिले आहेत. त्यातही प्रतापसिंग राणे यांचे वय ८३ असल्याने कदाचित ते निवडणुक लढविणारही नाहीत.तेव्हा काँग्रेसकडे आता दिगंबर कामत हेच एकमेव आमदार नेते राहिले आहेत असे दिसते. एकेकाळी मगोपला मत देणे म्हणजे मागच्या दाराने काँग्रेसला मत देणे हे चित्र मतदारांपुढे उभे राहिले होते त्यातून मगोपला मिळणारी काँग्रेसविरोधी मते भाजपकडे जाऊन भाजपचा फायदा झाला होता.तसेच आता काँग्रेसला मत देणे म्हणजे मागच्या दाराने दुसर्‍या कोणत्या पक्षाला मत देणे हे चित्र उभे राहताना दिसत आहे. गोव्यात तृणमूलला बहुमत मिळेल वगैरे अपेक्षा कोणाचीच नाही. स्वत: ममता बॅनर्जीही तशी अपेक्षा ठेवत असतील असे वाटत नाही. तरीही आता तृणमूलकडे लुईझिनो फालेरो आणि चर्चिल आलेमाव हे दोन माजी मुख्यमंत्री आले आहेत. लुईझिनो फालेरो त्यांच्या नावेळी मतदारसंघातून सात वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत तर चर्चिल आलेमाव बाणावलीमधून चार वेळा तर नावेळीमधून एकदा जिंकले आहेत. त्या दोन जागा तृणमूलला मिळू शकतील.तसेच मगोपबरोबर युती केल्याने आणखी एखादी जागा जिंकली तरी ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत पदार्पणात तीन जागा म्हणजे त्यामानाने बरीच चांगली कामगिरी तृणमूलची होऊ शकेल. त्यातून मग इतर राज्यांमध्येही काँग्रेसला खिंडार पाडायला पाया उपलब्ध होऊ शकेल. त्यातून हळू हळू करत २०२४ मध्ये नाही तरी २०२९ मध्ये तरी प्रमुख विरोधी पक्ष बनायचे ममतांचे मनसुबे असू शकतील.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 12/22/2021 - 04:44 नवीन
युरोपियन एरोस्पेस दिग्गज एअरबसने भारताच्या जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास डिजिटल सेवा फर्म टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची धोरणात्मक पुरवठादार म्हणून निवड केली आहे. टाटा कंपनी अभियांत्रिकी, ग्राहक सेवा आणि उत्पादन क्षेत्रात एअरबसशी सहयोग करेल. एरोस्पेस पुरवठा साखळीचे जागतिकीकरण आणि एक प्रमुख एरोस्पेस हब बनण्याच्या भारताच्या प्रयत्नात हा मोठा टप्पा आहे. एअरबससोबतच्या नवीन धोरणात्मक युतीमुळे पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रणालीमध्ये मोठ्या विमान उत्पादकांसाठी एक प्रमुख पुरवठादार बनण्याची भारताची भूमिका आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 12/22/2021 - 04:55 नवीन
गुजरात दहशतवाद विरोधी पथक ( एटीएस ) आणि भारतीय तटरक्षक दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत ६ पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आले आहे. ड्रगची खेप कराचीतील एका मासेमारी बोटीवर लोड करण्यात आली होती, तिचे अंतिम गंतव्य भारतीय जलक्षेत्रात होते. ही बोट शाहबाज अली नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीची आहे. कराची बंदरापासून सहा नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या फायबर बोटीद्वारे बोटीवरील ड्रग्ज त्याच्या क्रू सदस्यांना पुरवले जात होते . हाजी हसन आणि हाजी हसम अशी दोन पाकिस्तानी तस्करांची ओळख पटली आहे ज्यांनी या बोटीला हिरोईनचा पुरवठा केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेल्या लोकांना ड्रग्स पोहोचवले जाणार होते . त्यांना सूचना मिळताच एटीएस आणि तटरक्षक दलाने त्यांच्या इंटरसेप्टर्ससह गस्त घालण्यास सुरुवात केली. लवकरच 'अल हुसेनी' नावाची बोट त्यांच्या रडारवर आली. बोट कर्मचारी, तेव्हा आढळले स्वत: सर्व बाजूंना वेढला, ते पळून प्रयत्न केला. सप्टेंबर मध्ये गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमधून सुमारे ३००० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. अशा ड्रग कार्टेलमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे लक्षात येताच अदानी पोर्ट्सने पाकिस्तान, तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान आणि इराणमधून येणारा माल हाताळण्यास नकार दिला आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 12/22/2021 - 05:06 नवीन
इस्लामिक पाकिस्तानातील कराची येथील नारायण पुरा भागात दुर्गा मंदिरावर हल्ला करण्यात आला. देवी दुर्गा मूर्तींची तोडफोड करण्यात आली. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी इस्लामवाद्यांनी हिंदू मंदिरांवर केलेला हा ९ वा हल्ला आहे. पाकिस्तानमधील हिंदू मंदिरे सातत्याने तोडली जात आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांविरोधात वक्तव्य म्हणून, पाकिस्तानी कट्टरतावाद्यांच्या जमावाने पाकिस्तानच्या पंजाबमधील गणेश मंदिरावर हल्ला केला होता. त्यानंतर हिंसक जमावाने मंदिराचे काही भाग जाळले आणि मूर्तींची विटंबना केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांनी खैबर पख्तूनख्वाच्या तेरी युनियन कौन्सिलमध्ये असलेल्या कृष्ण द्वार मंदिरावर किंवा करकच्या मंदिरावर हल्ला केला होता. मंदिराला आग लावण्यात आली आणि नंतर हातोडा आणि शस्त्रांनी उद्ध्वस्त करण्यात आले. स्थानिक मौलवी आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम पक्षाचे (फझल उर रहमान गट) समर्थक धर्मांधांनी केलेल्या हल्ल्यात सहभागी होते. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिर पाडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. दुर्दैवाने जगातील कोणतेही हिंदु आप्ल्या पाकिस्तानातील हिंदूंच्या मदतील येत नाहीत. किमान एक इमेल पाकिस्तानी दूतावासाला आणि एक युनोतील मानवाधिकार संघटनेला लिहिणे शक्य आहेच ते पण तेव्हढे ही इतर हिंदु करत नाहीत. हिंदूंनी संघटीत दबाव आणणे आवश्यक आहे. याच वेळी त्रिपुरात कुणीतरी अफवा आली तरी अमरावतीतील दहशतवादी जाळपोळ सुरू करतांना दिसतात.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 12/22/2021 - 05:16 नवीन
असले प्रकार बघितले की सीएए किती गरजेचा आहे हे समजते.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 12/22/2021 - 05:22 नवीन
अगदी सरकारचा पण, कारण सीएएचा बेस बनवायला म्हणून आधी युनिफॉर्म सिविल कोड आणायला हवा, तथाकथित अल्पसंख्याक लोकांना इनहेरीटन्स अँड हेयरशिप मधील सरकारी सुरक्षेची चटक लागली का शिस्तीत सीएए अन एनआरसी लागू केला जाऊ शकतो कारण धर्मस्य मूल अर्थ: अर्थात पैसा हे सगळ्याचे मूळ असल्याचे कौटिल्य सार्थपणे म्हणून गेलाय, माणसाला श्रीमंत व्हायची चटक लागायला हवी (अगदी सात वर्षांपासून भाजप शासन असूनही) पैसा कमावणे पाप आहे ही जी सार्वत्रिक मेंटलिटी आहे, ती मुळात बदलली तर फायदा जास्त होईल, लोक अर्थदास होणे महत्त्वाचे असे कायम वाटत राहते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 12/22/2021 - 05:32 नवीन
पैसा कमावणे हे पाप आहे हे वाटायला लागणे ही समाजवादाची देणगी आहे. अगदी स्वातंत्र्यलढ्यापासून समाजवाद आणणे हे उद्दिष्ट काँग्रेसने ठेवले होते आणि इंदिरा गांधींच्या काळापर्यंत सरसकट राष्ट्रीयीकरणाच्या नावावर सरकारी दरोडेखोरी चालू होती. पण पैसे कमावणे हे पाप आहे हे वाटायला लागणे आणि सीएए-समान नागरी कायद्याचा संबंध कळला नाही. तसेच सीएए सध्या भारतीय नागरीक नसलेल्यांना देशाचे नागरीकत्व देण्यासंबंधी आहे आणि समान नागरी कायदा देशाचे नागरीक असलेल्यांसाठी आहे. त्यामुळे या दोन गोष्टी कोणत्याही क्रमाने केल्या तरी त्यामुळे फरक पडू नये.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 12/22/2021 - 05:45 नवीन
समान नागरी कायदा लागू करणं वाटतंय तेव्हढं सोपं असणार नाही. एक तर अल्पसंख्याक लोकांचा विरोध म्हणजेच भाजपा विरोधी हिंदू लोकही कायद्याला विरोध करणार आणि दुसरं म्हणजे North-East मधील राज्येही ह्या कायद्याला विरोध करतील. सध्याला North-East राज्यांना बाकी राज्यांपेक्षा जास्त अधिकार आहेत. त्यामुळे जरी समान नागरी कायदा आणला तरी North-East राज्यांसाठी काही सवलती द्यावा लागतील.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 12/22/2021 - 06:16 नवीन
हो हिंदू धर्मीय विचारवंत लोक या कायद्याला विरोध करतील पण त्याबरोबरच हिंदूंसाठीच्या कायद्यांचा ज्यांना लाभ होतो ते लोकही समान नागरी कायद्याला विरोध करतील. उदाहरणार्थ हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली हा प्रकार बनवून कर वाचवता येतो. तसे केवळ हिंदूंनाच करता येते इतर धर्मीयांना नाही. अशा एच.यु.एफ ला स्वतंत्र पॅनकार्डही मिळते. त्याचा फायदा घेऊन अनेक लोक कर वाचवत असतात. जर समान नागरी कायदा आला तर एच.यु.एफ रद्दबादल होईल.असे लोक समान नागरी कायद्याला विरोध करतील. काहीही असले तरी जर आपल्या राज्यघटनेप्रमाणे धर्मनिरपेक्षता हे सरकारचे धोरण ठरवले असेल (म्हणजे आपल्याच नागरिकांमध्ये धर्मावरून भेदभाव करता येणार नाही) तर मग परत हिंदूंसाठी वेगळे कायदे, मुस्लिमांसाठी वेगळे कायदे ठेवणे समर्थनीय नाही. काही लोक म्हणतात की मुस्लिम पर्सनल कायद्यामध्ये मुस्लिमांना जेवढ्या सवलती मिळतात त्यापेक्षा हिंदूंना दिल्या जातात. ते कितपत खरे आहे हे मला माहित नाही. ते जरी खरे असले तरी वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगळे कायदे ठेवणे नक्कीच समर्थनीय नाही. त्यामुळे हिंदूंना या समान नागरी कायद्यामुळे अधिक गमाविण्यासारखे असले तरी तो कायदा आणला पाहिजे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 12/22/2021 - 06:24 नवीन
जरा वेळ मिळाला की तुम्हाला व्यनि करतो चंसुकू दादा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 12/22/2021 - 06:04 नवीन
"हिंदू लोकही कायद्याला विरोध करणार" असा कायदा आणणे यात एवढे श्रम खर्ची पडतील आणि त्याला होणार विरोध हा इतका ढोंगी आणि बिलो द बेल्ट असेल कि विचार करून अंगावर शहारे येतात . जिथे सर्वधर्म समभाव याचा अर्थ " ज्याला जे पहिजे ते करा " असा सोयीस्कर रित्या लावला जातो तिथे काय संधी आहे आशय कायद्याला राजकारण बाजूला ठेवून अंध विरोधकानं हे लक्षात घ्यायचेच नाहीये कि जगातील अनेक लोकशाहीत असे कायदे आहेत आणि त्यात त्या त्या देशातील बहुसंख्यान्कांच्या प्रथेचे थोडं पडसाद असू शकतात .. तसेच भारतातील सरकारी धोरणात जरी हिंदूंनी संख्येचं जोरावर इतरांवर अन्याय करू नये हे अतिशय महत्वाचे असले तरी याचा अर्थ हा होत नाही कि देशाच्या प्रथेवर हिंदूंचा प्रभाव असू शकत नाही मलेशिया च्या दूतावासात मशीद असते पण भारतीय दूतावासात देऊळ बंदच तर पोटशूळ ! नको बाबा नको एकदा का त्या राहुल ला आणा रे गादीवर आणि झटपट काय ते सोक्षमोक्ष लावून टाका .. मग प्रशन फक्त हाच राहील कि दुसरा धर्म कोणता स्वीयकार्याचा ते ? .. आपल्याला तर वारुणी आवडते मग चर्च बरे ! हाःहाःहा (आपला घाबरलेला निधर्मी हिंदू)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/22/2021 - 08:04 नवीन
गेल्या काही दिवसात कराचीवुड मधुन २ मोठ्या बातम्या आलेल्या आहेत... एक बातमी तर मला घोडा, पर्शियन मांजरांच्या भेट म्हणुन दिलेली नजरेत आल्याने समजली ! :))) तर दुसरी बातमी जय्या बच्चन यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी जो थयथयाट केला आणि शाप वाणी उच्चारली त्यामुळे समजले [ सप्टेंबर मध्ये मी, बुढ्ढी गुड्डी सठिया गई है ! अशी सही ठेवली होती, त्याची परत आठवण या प्रकाराने मला आली. ] या दोन्ही बातम्यांच्या संबंधीत व्हिडियो खाली देऊन ठेवतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Jaisa Mukhda To Pehle Kahin Dekha Nahin... :- Pyar Ke Kabil
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/23/2021 - 04:53 नवीन
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी काँग्रेस पक्षसंघटना विधानसभा निवडणुक तोंडावर आलेली असताना सहकार्य करत नाही अशास्वरूपाचे ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

#चुनाव_रूपी_समुद्र
है न अजीब सी बात, चुनाव रूपी समुद्र को तैरना है, सहयोग के लिए संगठन का ढांचा अधिकांश स्थानों पर सहयोग का हाथ आगे बढ़ाने के बजाय या तो मुंह फेर करके खड़ा हो जा रहा है या नकारात्मक भूमिका निभा रहा है। जिस समुद्र में तैरना है,
1/2 pic.twitter.com/wc4LKVi1oc

— Harish Rawat (@harishrawatcmuk) December 22, 2021
उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुक जिंकायची काँग्रेसला यावेळी सगळ्यात नामी संधी आहे. मागच्या वर्षी भाजपने सुरवातीला मार्च २०२१ मध्ये त्रिवेंदसिंग रावत यांना बदलून तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री केले. ते विधानसभेचे सदस्य नसल्याने त्यांना सहा महिन्यात पोटनिवडणुक लढवून विधानसभेवर निवडून जाणे भाग होते पण दरम्यानच्या काळात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आल्यामुळे पोटनिवडणुक घेतली जायची शक्यता कमी आहे हे लक्षात आल्यावर तिरथसिंग रावत यांच्या जागी पुष्करसिंग धामी यांना मुख्यमंत्री केले. झारखंडमध्ये तितके प्रभावी न ठरलेल्या रघुबर दास यांना वेळीच बदलले नाही याचा फटका पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये बसला होता. म्हणून त्यापासून धडा घेऊन पक्षाने उत्तराखंड (आणि त्यानंतर कर्नाटक आणि गुजरात) चे मुख्यमंत्री बदलले. महत्वाचा मुद्दा हा की शेजारच्या उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्रीपदावरून बदलायचा विचारही केला गेला नाही पण उत्तराखंडमध्ये मात्र मुख्यमंत्री बदलले गेले. याचाच अर्थ पूर्वीचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत प्रभावी ठरले नव्हते हे पक्षाने मान्य केले. त्यात आतापर्यंत राज्यात एकदाही सत्ताधारी पक्षाने परत निवडणुक जिंकलेली नाही. म्हणजे भाजप यावेळी बॅकफूटवरून सुरवात करणार आहे. अशी नामी संधी काँग्रेसकडे असताना हरीश रावत यांच्यासारखा ज्येष्ठ नेता ही तक्रार करत आहे ही गोष्ट गंभीर आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/23/2021 - 05:41 नवीन
गोवा विधानसभा निवडणुक चुरशीची होताना दिसत आहे. काल आपच्या अरविंद केजरीवालांनी ममता बॅनर्जींवर तोफ डागली आहे. तृणमूल काँग्रेसचा गोव्यात तीन महिन्यांपूर्वीच प्रवेश झाला. त्यांना लगेच मते मिळणार नाहीत. लोकांमध्ये जाऊन काम केले तरच मते मिळतात असे ते म्हणाले आहेत. म्हणजे डिसेंबर २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये ७० पैकी २८ जागा मिळाल्यावर त्यांना थेट पंतप्रधानपदाची स्वप्ने पडायला लागली होती. फेब्रुवारी २०१५ मध्ये दिल्लीत ७० पैकी ६७ जागा मिळाल्यानंतर त्यांना स्वर्ग दोन बोटेच राहिला होता आणि दिल्लीचे कामकाज बघायचे सोडून २०१७ च्या पंजाब-गोवा विधानसभा निवडणुकांवर त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रीत केले होते. एक वेळ अशी आली होती की दिल्लीत डेंग्युची साथ येऊन १२-१५ लोक त्यात मरण पावले असताना नुसते आरोग्यमंत्रीच नाही तर सगळे दिल्लीचे मंत्रीमंडळ दिल्लीबाहेर होते. नंतर दिल्लीत महापालिका निवडणुकांमध्ये दणका बसल्यानंतर नुसता प्रचाराचा धडाका लाऊन देऊन मते मिळत नाहीत तर लोकांमध्ये जाऊन काम करावे लागते याची उपरती त्यांना झाली. असो. तेव्हा केजरीवाल ममतांना जे काही सांगत आहेत ते अनुभवाचे बोल आहेत :) https://www.hindustantimes.com/elections/goa-assembly-election/tmc-doesn-t-stand-anywhere-in-race-aap-s-kejriwal-in-goa-ahead-of-polls-101640155830631.html आता केजरीवालांना ममतांची आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसची इतकी काळजी असायचे काय कारण आहे? काहीच नाही. खरं तर त्यांना ममतांची अजिबात काळजी नाही तर ममतांच्या गोव्यातील अनपेक्षित प्रवेशामुळे आपण गोव्यात शिरकाव करायचा जो प्रयत्न करत आहोत त्याला धक्का बसणार का ही शंका त्यांना सतावत असावी असे म्हणायला जागा आहे. पाच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ममतांनी सध्या चालवला आहे तसाच धुमधडाका त्यांनी केला होता. वर्ष-सव्वा वर्ष आधी प्रचार सुरू करूनही नाव घेण्याजोगा एकही नेता त्यांच्या पक्षात सामील झाला नव्हता. वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक पातळीवर स्वयंसेवी संस्था चालवणारे लोक त्यांच्या पक्षात सामील झाले. ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांची सून श्रध्दाही पक्षात आली. पण त्यापैकी कोणीही मते फिरवू शकायच्या ताकदीचे नव्हते. त्यानंतर पाच वर्षात दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती व्होटबँक बांधायचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला असे दिसते. मागच्या वर्षी झालेल्या जिल्हा परीषद निवडणुकांमध्ये बाणावलीची एकमेव जागा आपने जिंकली होती. परशुरामाने चिपळूणहून मारलेला बाण त्या ठिकाणी पडला आणि समुद्र तितका मागे गेला म्हणून त्या ठिकाणाचे नाव बाणावली हे झाले अशी आख्यायिका आहे. अशा बाणावलीमध्ये सध्या जवळपास ८०% लोक ख्रिस्ती आहेत. पूर्ण गोव्यात जी एकमेव जिल्हा परीषदेची जागा आपने जिंकली ती तिकडची होती. या जिल्हा परीषद निवडणुका झाल्यानंतर दहा दिवसातच मी माझ्या गोव्याच्या वार्षिक वारीसाठी गेलो होतो तिथे जाताना बाणावलीमधूनच पुढे जावे लागले होते. गावात बघावे तिथे आपचे झेंडे आणि केजरीवालांचे फोटो होते. केजरीवाल ही मतपेढी भक्कम करायचा प्रयत्न करत असतानाच नेमक्या त्याच मतांवर डल्ला मारायला ममतांचेही आगमन गोव्यात झालेले दिसते. इतकेच नाही तर लुईझिनो फालेरो आणि चर्चिल आलेमाव हे दोन माजी मुख्यमंत्रीही त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. इतकेच नाही तर केजरीवाल गोव्याच्या ज्या भागात आपले बस्तान बसवायचा प्रयत्न करत आहेत त्याच भागातील हे दोन माजी मुख्यमंत्री आहेत. स्वतः चर्चिल आलेमाव बाणावलीमधून तर लुईझिनो फालेरो शेजारच्याच नावेळी मतदारसंघातून निवडून गेले आहेत. त्यामुळे केजरीवालांना असुरक्षित वाटणे समजू शकतो. त्यातूनही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी आपण लोकांपुढे नक्की कोणते संकेत देत आहोत याची जाणीव या सगळ्या मंडळींना आहे का? जर २०२४ मध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र निवडणुक लढवायची असे बेत असतील पण त्याचवेळी गोव्यासारख्या लहान राज्यातील फार तर २०-२५ हजार मतदार असलेल्या राज्यातील एक-दोन विधानसभा मतदारसंघात एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न हे नेते करत असतील तर मग २०२४ मध्ये समजा सगळ्या विरोधी पक्षांची देशव्यापी आघाडी झालीच तर ती कितपत स्थिर राहणार हा प्रश्न मतदारांना पडला तर त्याला जबाबदार कोण?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/23/2021 - 05:58 नवीन
गोव्यात सध्या इतके आयाराम गयाराम झालेले आहेत कि नक्की कोणाचे काय चालले आहे ते समजणे अशक्य आहे. श्री पर्रीकर येण्याच्या पूर्वी गोव्यात जशी स्थिती होती तशीच येणार आहे. ] १९८७ पासून २००० पर्यंत १३ मुख्यमंत्री आणि दोन वेळेस राष्ट्रपती राजवट लावली होती. दर वर्षी मुख्यमंत्री बदलत असे. त्याबद्दल गोव्यात तेंव्हा एक विनोद प्रसिद्ध होता - मुलगा -- बाबा गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत बाबा -- बाळा, परीक्षेच्या आदल्या दिवशी विचार तेंव्हाचा मुख्यमंत्री कोण असेल काय सांगता येतंय.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/23/2021 - 11:27 नवीन
लुधियानाच्या कोर्टात बॉम्बस्फोट झाला आहे. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांपासूनच पंजाबमध्ये खलिस्तानवादी प्रवृत्ती परत डोके वर काढत आहेत असे दिसते. २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान सर्रास भिंद्रनवालेचे फोटो पंजाबमध्ये वापरले जात होते अशा बातम्या वाचल्याचे आठवते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या काही दिवस आधी बठिंड्यात स्फोट झाला होता आणि त्यात ६-७ जण मारले गेले होते. हा स्फोट डेरा सच्चा सौदाच्या लोकांनी केला असे वाचले होते पण त्यातही त्यांना खलिस्तानवाद्यांची मदत झाली असली तरी आश्चर्य वाटू नये. चार दिवसांपूर्वी गुरू ग्रंथ साहेबचा अनादर करण्याचा प्रयत्न केला म्हणून एकाची हत्या झाली. आता हा लुधियानाचा स्फोट झाला आहे. १९७९ मध्ये शीखांमधील फुटिर संप्रदाय असलेल्या निरंकारी संप्रदायातील काहींची हत्या हे पहिले मोठे कृत्य भिंद्रनवालेने केले होते. त्यापूर्वीही त्याने आणि त्याच्या समर्थकांनी लहानसहान कृत्ये केली होतीच. त्याच प्रकाराची पुनरावृत्ती तर होत नाही ना हा प्रश्न पडत आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुरवातीला केजरीवालांचा आप सत्तेत येणार हे वातावरण होते. पण जानेवारी २०१७ च्या शेवटी इंग्लंडमध्ये राहायला असलेल्या एका खलिस्तान कमांडो फोर्स या संघटनेच्या दहशतवाद्याच्या मोगा येथील घरी केजरीवाल रात्री उतरले होते ही बातमी आली. त्यापाठोपाठ दोन दिवसात बठिंड्यातील स्फोटाची बातमी आली. यातून पंजाबात १९८० च्या दशकाची पुनरावृत्ती होणार ही शंका वाटल्याने त्यानंतर काँग्रेसमागे हिंदू मते एकवटली आणि त्यातून अमरिंदरसिंगांना ११७ पैकी ८० जागा असा मोठा आणि त्यामानाने अनपेक्षित विजय मिळाला. २०१९ मध्ये इंग्लंड आणि कॅनडातील खलिस्तानवादी तत्वांनी रेफरेन्डम २०२० अशी टूम काढली होती. त्याला पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि आपचे नेते सुखपालसिंग खैरा यांनी पाठिंबा दिला होता. https://www.hindustantimes.com/punjab/khaira-s-support-to-referendum-2020-lands-aap-in-a-mess-again/story-sl1HWuXFwxeJDEIhR6xkWM.html . आता शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तीच खलिस्तानवादी तत्वे घुसली होती हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. तेव्हा रात्र वैर्‍याची आहे. अमरिंदरसिंगांनी आपला स्थानिक पक्ष काढायची घोषणा केली पण त्यापुढे काहीही झालेले दिसत नाही. आपला पक्ष काढून अमरिंदरसिंग निवडणुक लढवू देत आणि २०१७ प्रमाणे हिंदू कॉन्सॉलिडेशन होऊन आम आदमी पक्ष हा अतिशय घातक टमरेल गँगचा पक्ष सत्तेपासून दूर राहायला हवा. नाहीतर अमुक फुकट देतो, तमुक फुकट देतो असली आश्वासने देऊन केजरीवाल मतांची झोळी भरतील. जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नसते. दरमहा काही हजार लिटर पाणी फुकट मिळणे आणि वीजेचे बिल कमी येणे याची किंमत ८-१० वर्षात खलिस्तानवादी शिरजोर होण्याच्या रूपात चुकवायला मिळाली नाही म्हणजे मिळवली. खरोखरच रात्र वैर्‍याची दिसत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/24/2021 - 11:31 नवीन
ओवैसी का वीडियो वायरल: जब योगी मठ में चले जाएंगे और मोदी पहाड़ों पर चले जाएंगे, तब तुम्हें बचाने कौन आएगा? https://www.amarujala.com/amp/india-news/aimim-chief-asaduddin-owaisi-controversial-video-warning-the-up-police-cm-yogi-and-pm-modi-in-a-threatening-tone परमपूज्य राहूल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, यावर काय टिप्पणी करतील, ते वाचणे रोचक ठरेल ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/24/2021 - 12:00 नवीन
मोदींच्या भारतात मुस्लीम असणं कसं वाटतं?; फारुख अब्दुल्ला म्हणाले, “भयानक, ते संपूर्ण देशाला…” https://www.loksatta.com/desh-videsh/farooq-abdullah-says-modi-government-making-india-communal-sgy-87-2732408/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS बांगलादेश येथील, हिंदू लोकांची घरे जाळली, तेंव्हा देखील, हे काहीच बोलले नाहीत .. अमरावती येथे दंगल झाली, त्या बाबतीत, हे काहीच बोलले नाहीत ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 12/26/2021 - 08:38 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra/violation-of-new-corona-restriction-in-yavatmal-program-by-shivsena-mla-sanjay-rathod-prajakta-mali-pbs-91-2734202/ 80% लोकांनी, शिवसेनेला मतदान केले न्हवते...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 12/26/2021 - 10:54 नवीन
https://marathi.abplive.com/news/pune/i-came-to-pune-to-thank-those-who-helped-the-people-in-the-corona-crisis-says-aadity-thackeray-1020834/amp प्रचंड सहमत आहे.... निवृत्त नौसैनिकाला मारहाण करणे एका स्त्रीला, "हरामखोर" म्हणणे कितीतरी हिंदूंचे शिरकाण करणारा, टिपू सुलतान, याच्या जयंतीचा उल्लेख करणे अजान स्पर्धा आयोजित करणे "जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा," अशी पोस्टर्स लावणे "केम छो वरली, " असे पोस्टर लावणे ------- सगळेच उघड उघड आहे .... ------ (अर्थात, घराणेशाहीची पुजा करणारे मतदार बरेच आहेत, त्यामुळे, कितीही उघडपणे दिसले तरी, अशी धृतराष्ट्र मंडळी, या गोष्टी नजरेआड करण्याची शक्यता आहे ...)
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 12/26/2021 - 10:57 नवीन
घराणेशाहीची पुजा करणारे मतदार बरेच आहेत.
घराणेशाही हा नवीन प्रकारचा जातियवादच आहे. तथाकथीत पुरोगामी पक्षांत विरोधाभास भयंकर आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 12/26/2021 - 12:15 नवीन
आमच्या काल्पनिक 3-13-1760 ग्रहावर, अशा गोष्टी होतच असतात... सध्या तरी, आमच्या यानाच्या इंधनावरील टॅक्स कमी केले असल्याने, दर शनिवारी, आमच्या ग्रहावर, फेरी मारता येते....
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 12/26/2021 - 11:31 नवीन

हे

अन

"जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा," अशी पोस्टर्स लावणे

"केम छो वरली, " असे पोस्टर लावणे एकाच वेबसाईटवर, एकाचवेळी बोलूनही काहीही न वाटणे ह्यासाठी पहिल्या धारेच्या देशीचा शौक तरी हवा किंवा निर्लज्जपणात पहिला नंबर तरी....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 12/26/2021 - 12:11 नवीन
मी खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते : नाना पटोले https://marathi.abplive.com/news/maharashtra/congress-leader-nana-patole-reaction-on-st-worker-protest-buldhana-district-khamgaon-1021011/amp आत्या बाईला मिशा असत्या तर, काका म्हटले असते ... अशाच तर्हेचे, हे वाक्य आहे.... तरी बरे की, नाना पटोले, कॉंग्रेसमध्येच पदाधिकारी आहेत आणि ह्यांचेच सरकार आहे ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 12/26/2021 - 12:56 नवीन
सेना आमदार तानाजी सावंत बंडखोरीच्या तयारीत! मुख्यमंत्री ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष https://www.esakal.com/marathwada/mla-tanaji-sawant-disappointed-on-shiv-sena-high-command-glp88 बंडखोरीचे लोण पसरत जाणार, हा माझा अंदाज होताच ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 12/26/2021 - 13:48 नवीन
“चांगल्या कामामुळेच धर्मांतरं होतात, कुणीही तलवारीच्या जोरावर…”, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं विधान https://www.loksatta.com/desh-videsh/good-work-influences-people-to-convert-not-fear-says-ghulam-nabi-azad-hrc-97-2734463/lite/ पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये काय झाले? ------- या वर्षाच्या सुरुवातीला, गुजरात विधानसभेने ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा, २०२१’ बहुमताने पारित केला होता, यामध्ये लग्नाच्या माध्यमातून सक्तीने धर्मांतर करणार्‍यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. गुजरातशिवाय उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये देखील धर्मांतर विरोधी कायदे करण्यात आले आहेत..... --------- कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे ....
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 12/26/2021 - 17:52 नवीन
औरंगाबादमध्ये ५३ ख्रिश्चनांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. त्यासाठी ब्राह्मणसभेने पुढाकार घेतला आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/aurangabad-paithan-nathmandir-53-people-renounced-christianity-and-converted-to-hinduism/articleshow/88508222.cms उशीरा का होईना आपल्याला जाग येत असेल तर चांगले आहे. इतिहासकाळात आपण लढाया भरपूर जिंकल्या पण सक्तीने धर्मांतरीत केलेल्यांची घरवापसी करून घेतली नाही ही मोठी चूक झाली. शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरसारख्यांची घरवापसी केली ते एखाद दुसरे उदाहरण सोडले तर त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या काळातही तसे कोणी केले होते असे वाटत नाही. अगदी अटकेपार झेंडे लावणार्‍या पेशव्यांनी सुध्दा या गोष्टीकडे अक्ष्यम्य दुर्लक्ष केले. पहिल्या पिढीतले सक्तीने धर्मांतरीत झालेले परत यायला कधीही तयार असतीलच. खरं तर ते घरवापसीसाठी आसुसलेले असतील. पण आपण ते तेव्हाच केले नाही आणि जशा जशा पिढ्या गेल्या त्यातून घरवापसी आणखी कठीण झाली. आता फुकाच्या धर्मनिरपेक्षतेला भीक न घातला जितके परत येतील त्यांची घरवापसी करून घ्यायलाच हवी. त्यांना कोणत्याही जातीत टाका पण हिंदू असणे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 12/26/2021 - 17:55 नवीन
धर्मभास्कर वाचा, महिन्याला कितीतरी फिरंगी, यवन, किरीस्ताव हिंदुधर्मात परत आल्याच्या बातम्या असतात नीट.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sun, 12/26/2021 - 18:02 नवीन
मसूराश्रमातील शुध्दीसंस्कार असे काहीसे ते सदर असते का? बर्‍याच वर्षांपूर्वी धर्मभास्कर आमच्याकडे यायचे ते वाचायचो. त्यातही दर महिन्याला ५-१० च्या वर आकडा असतो असे वाटत नाही. निदान मी ते मासिक वाचायचो त्यावेळी तरी नसायचा. तो आकडा इतका कमी न राहता घरवापसी इन्स्टिट्यूशनलाईझ व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 12/26/2021 - 18:19 नवीन
आकड्याच्या मला पण कल्पना नाहीत आत्ता, पण मुद्दा इतकाच आहे की प्रयत्न खूप आधीपासून सुरू आहेत.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 12/26/2021 - 19:21 नवीन
+१ पेशव्यांनी प्रयत्न केले, पण अपयशी ठरले. उदा. मस्तानी.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Mon, 12/27/2021 - 04:30 नवीन
माझ्या मते चारीही शंकराचार्यांनी एकत्र येऊन या बाबतीत ची अधिकृत प्रक्रिया काय आहे हे बोलायला हवे. या प्रकाराची, म्हणजे बाकीच्या धर्मातून हिंदूंमध्ये प्रवेश करण्याची अधिकृत क्रिया नसेल तर ती बनवायला हवी. शंकराचार्यांना जो उच्च पदाचा मान दिला आहे, तो त्या साठी आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 12/27/2021 - 05:37 नवीन
शंकराचार्य तर कैकवेळा खुद्द सरकारवरच कडक टीका करताना आढळून येतात, चालतील का असे शंकराचार्य धार्मिक शुद्धीकरण करून लोक परत घरवापसी करवून घ्यायला ? ही एक बातमी पुरी पिठाचार्यांची द्वारका पिठाचार्य असणाऱ्या शंकराचार्यांची जुनी बातमी ही तर राजकीयदृष्ट्या जास्तच स्फोटक आहे, असे शंकराचार्य मंजूर असतील का पण घरवापसी करवून घ्यायला हा मूळ विषय आहे.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Mon, 12/27/2021 - 06:38 नवीन
सरकारवर टीका करणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे तो शंकराचार्यांचा ही असायला हवा. शिवाय जर ते म्हणतात त्याप्रमाणे बिफ हिंदू व्यापारी च विकत असतील तर तो मुद्दा कुणी तरी उचलायला हवाच, तो ते उचलत आहेत. (बीफ बंदी ला माझे समर्थन आहे, असे मुळीच नव्हे. हा मुद्दा धार्मिक नव्हे असे माझे मत आहे. पण त्यांना जर तो धार्मिक मुद्दा वाटत असेल तर त्यांच्या मताचा आदर करायला हवा). पण टीका करताना त्यांना १५ लाख रुपये , कलम ३७० यावर करायची आवश्यकता नव्हती. It is beyond their domain. ते धार्मिक नेते आहेत, राजकीय नव्हे. धर्माने राजकारणात आणि राजकारण्यांनी धर्मात ढवळाढवळ करायचे थांबवायला हवे. शेवटची गोष्ट म्हणजे शंकराचार्यांना कसे निवडले जाते याबद्दल मला काहीही कल्पना नाही (धर्म संसद वगैरे बोलावून शंकराचार्यांना निवडले जाते का?) त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक योग्यतेबद्दल आणि त्यांच्या threat perception assess करण्याच्या योग्यतेबद्दल मला काहीही कल्पना नाही. मी धर्म तज्ञ नाही. पण सध्याच्या परिस्थितीत हिंदू धर्माचे नेते म्हणून त्यांची जर एखादी जबाबदारी असेल आणि ती त्यांना निभावता येत नसेल तर ती त्यांना करून देण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 12/27/2021 - 09:38 नवीन
पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंगांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि अकाली दलाचे बंडखोर नेते सुखद्देवसिंग धिंडसा यांच्या अकाली दल (संयुक्त) पक्षाबरोबर भाजपने युतीची घोषणा केली आहे. भाजपकडे पंजाबच्या शहरांमधील हिंदू मते बर्‍यापैकी आहेत पण नुसती तेवढी मते जिंकायला पुरेशी ठरत नाहीत. तरीही शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान खलिस्तान्यांचा झालेला शिरकाव आणि परवा लुधियानाला झालेला स्फोट या घटनांनंतर हिंदूंची एकगठ्ठा मते भाजपला गेली नाहीत तर मात्र कठीण आहे. अमरिंदर काँग्रेसची किती मते फोडतात हे बघायचे. या युतीला बहुमत मिळेल वगैरे अचाट कल्पना कोणी करणार नाही- अगदी स्वतः अमरिंदरही या भ्रमात असतील असे वाटत नाही. पण काहीही झाले तरी खलिस्तान्यांविषयी सहानुभूती असलेल्या आपचे सरकार पंजाबसारख्या राज्यात बनणार नाही इतपत प्रभाव तरी या युतीचा पडावा हीच इच्छा. https://timesofindia.indiatimes.com/india/bjp-formally-announces-alliance-with-amarinder-dhindsas-party-for-punjab-elections/articleshow/88520419.cms
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 12/27/2021 - 12:18 नवीन
फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी अचानक राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिकामेच होते. त्यासाठी मार्च २०२१ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा जुलै २०२१ मधील पावसाळी अधिवेशनात निवडणुक घेतली जाणे अपेक्षित होते. ती निवडणुक त्यावेळी झाली नाही. या अधिवेशनात मात्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक घ्यायची महाविकास आघाडी सरकारने ठरविले. ही निवडणुक घ्यायची विधानसभेच्या नियमांप्रमाणे एक प्रक्रीया ठरलेली असते. हे नियम http://mls.org.in/pdf/ebooks/Assembly_Rules_10edtion_2015.pdf वर बघायला मिळतील. राज्यपालांच्या सहीने या निवडणुकीची घोषणा होते आणि प्रस्तावित मतदानाच्या तारखेच्या आदल्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतात. नियम ६(५) आणि ६(६) प्रमाणे ही निवडणुक गुप्त मतदान पध्दतीनेच घेतली जावी असे म्हटलेले जरी नसले तरी ते गृहित धरलेले दिसते कारण थेट मतपत्रिकांचाच उल्लेख या नियमांमध्ये आहे. मात्र गुप्त मतदानाने निवडणुक घेतल्यास आपल्यामागे किती मते आहेत (की किती आमदार फुटले आहेत) हे जगजाहीर होईल म्हणून महाविकास आघाडी सरकारने ही निवडणुक आवाजी मतदानाने घ्यावी असे राज्यपालांना पाठविलेल्या शिफारशीत म्हटले आहे. पण नियमांमध्ये ही निवडणुक गुप्त मतदानपध्दतीने घ्यावी असे म्हटलेले असताना आवाजी मतदानाने घेता येईल का या मुद्द्यावर राज्यपालांनी कायदेशीर सल्ला मागितला आहे. त्यावरून नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. यानिमित्ताने एक गोष्ट लिहितो. विधानसभेचे/लोकसभेचे उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला द्यावे असा संकेत असतो. १९९० मध्ये विधानसभा निवडणुक झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेच्या मनोहर जोशींकडे गेले तर उपाध्यक्षपद भाजपला द्यावे असे युतीमध्ये ठरले होते. त्याप्रमाणे भाजपचे अण्णा जोशी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. ते १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्यातून लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि विधानसभा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जुलै १९९१ मध्ये विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणुक झाली होती. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीकडे ९४ आमदार असले तरी युतीच्या उमेदवाराला ८५ मतेच मिळाली होती. युतीच्या ५ आमदारांची विधानसभेवर झालेली निवड उच्च न्यायालयाने १९९० च्या निवडणुकांसाठी प्रचारात धर्माचा वापर केला या कारणाने रद्द केली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्या आमदारांना मतदानाचा अधिकार नव्हता. तरीही आणखी ४ मते युतीच्या उमेदवाराला कमी मिळाली होती. ही मते नक्की कोणाची फुटली यावर शिवसेना आणि भाजपमध्ये थोडा कलगीतुरा रंगला होता. पण मते कोणाची फुटली होती हे आणखी साडेचार महिन्यात छगन भुजबळ आणि शिवसेनेचे इतर १७ आमदार (त्यापैकी ६ घाबरून लगेच परतही आले) बाहेर पडले तेव्हाच स्पष्ट झाले. महाविकास आघाडीकडे १७० आमदार आहेत हे अगदी उच्चरवाने ५० वेळा बोलले जात आहे. त्यामुळे किमान १७० मते मिळवणे महाविकास आघाडीसाठी अगदीच अगत्याचे आहे. त्याहून कमी मते मिळाली तर मात्र आघाडीसमोरील अडचणी वाढतील. तसेच निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये राष्ट्रवादीतून आलेल्या कचर्‍यापैकी थोडा स्वगृही परतला आणि महाविकास आघाडीला १७० पेक्षा जास्त मते मिळाली तर आणखी चांगले.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 12/27/2021 - 15:53 नवीन
चंडिगड महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये ३५ पैकी आपने १४, भाजपने १२ तर काँग्रेसने ८ जागा जिंकल्या आहेत. २०१६ मध्ये महापालिकेत २६ जागा होत्या त्यापैकी भाजपने २० जागा जिंकल्या होत्या तर आपला एकही जागा मिळाली नव्हती. चंडिगडमध्ये चांगले यश मिळाल्यामुळे दोन महिन्यात होणार्‍या पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी आपचा उत्साह आणि हुरूप वाढला असेलच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा