Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

माणूस आणि पुस्तक

अ
अनुस्वार
गुरुवार, 12/09/2021 - 14:42
💬 4 प्रतिसाद
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके. थोडक्यात काय अमुक पुस्तक किंवा व्यक्ती मला पूर्ण कळाली, असा दावा आपण करू शकत नाही. एखादा प्रचंड विनोदी प्रसंग रेखाटतांना लेखकाचे हृदय त्या क्षणी कदाचित आकंठ दुःखात बुडालेले असू शकते. आणि वरवर त्रासलेली दिसणारी व्यक्ती मनातून मात्र शांततेच्या सागरात पहुडलेली असू शकते. माणूस आणि पुस्तक कधीच अंतिम कळत नाही. दोन्हींचा जो काही अर्थ गवसेल तो त्या दिवसापुरताच लागू. उद्याचे अर्थ काळाच्या पोटात गडप! म्हणूनच आपण मतं बनवायची नाहीत. मिट्ट काळोखात काजव्याला ही हक्क आहे सूर्य म्हणवून घेण्याचा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2701 views

💬 प्रतिसाद (4)
श
श्रीगणेशा गुरुवार, 12/09/2021 - 18:12 नवीन
विचार आवडला! मना-मनांचा संवाद होणं महत्वाचं.
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार Fri, 12/10/2021 - 23:05 नवीन
मनातलं बोललात. :-)
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 12/10/2021 - 15:27 नवीन
आताशा असंच होतंय, जुन्या पुस्तकांची पेटी उघडली की माझी चिमणी हट्ट धरते,चित्रांचे आवडणार एखादं चित्र बोलकं कर म्हणते.अशीच काही पानं दुधाच्या सायीसारखी मऊसर रूसलेली, संध्याकाळी कातर थकलेली,फुग्यासारखी फुगलेली , केशर ल्यायलीली अबोली मन पाने प्रत्यक्षात वाचायली लावते. थोडा काळ तरी माणसं उलगडतात..पण माणूस आणि पुस्तक कधीच अंतिम कळत नाही. दोन्हींचा जो काही अर्थ गवसेल तो त्या दिवसापुरताच लागू. उद्याचे अर्थ काळाच्या पोटात गडप! म्हणूनच आपण मतं बनवायची नाहीत. मिट्ट काळोखात काजव्याला ही हक्क आहे सूर्य म्हणवून घेण्याचा. +१११
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार Fri, 12/10/2021 - 23:05 नवीन
आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा