अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: ९४वे साहित्य संमेलन
१. मिपावर साहित्य संमेलनावर धागा नाही हे पाहुन आश्चर्य वाटले ! म्हणजे धागा कदाचित आलाही असेल पण मला तरी दिसला नाही !
२. ह्यावेळी काही अध्यक्षपदाची निवडणुक वगैरे नाही , शिवाय दिब्रिटो, सबनीस सारखा कोणी विवादास्पद अध्यक्ष नाही , जयंत नारळीकरांच्या सारखा अगदीच सर्वसामान्य साहित्यिक अध्यक्ष झाल्यामुळे सगळी मजा गेली राव .
३. मुळात साहित्यसंमेलनाचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग काय ? तिथे सामान्य वाचकांचे मुद्दे चर्चेला घेतले जातात का काही ?
४. साहित्यसंमेलनाला काही सरकारी फंडिंग बिंडिंग असते का ? स्वागताध्यक्ष म्हणुन भुजबळ साहेब दिसले म्हणुन विचार आला की संमेलनाच्या पैशाचे गणित काय ?
५. मिपाच्या धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात , किमान आमचे तरी उडवले जातात म्हणुन ही एक्ष्ट्रा लाईन विनाकारण अॅड केली आहे !
😀
लुनावाल्यांना टाळून पुढे जाणे हे आखिल मराठी साहित्याचे मोठे नुकसान असेल !