Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग १)

व
वामन देशमुख
Wed, 06/02/2021 - 14:18
🗣 99 प्रतिसाद
जून महिन्याच्या चालू घडामोडींचा पहिला धागा काढतोय. गिधाडी_पत्रकारिता की गिधाडी_रुग्णसेवा जिथे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश करू दिला जात नाही, प्रवेश मिळालाच तर मोबाइल बाहेर ठेवावे लागतात, तिथे माइक, कॅमेरे, लाइट्स इ घेऊन ही बाई मोकाट फिरते.

I am in Bengaluru as we continue our on ground reportage for @themojostory. Inside this COVID ICU nearly every patient is under 40. "Death upon Death, Pain upon Pain, 20 % Mortality in ICU" says Dr Taha Mateen in this searing reality check. Full report: https://t.co/HcMYjSymJ7 pic.twitter.com/TqlPAvy8TU

— barkha dutt (@BDUTT) June 1, 2021
रुग्णालयेदेखील गिधाडी पत्रकारितेत सामील झाली आहेत का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36075 views

🗣 चर्चा (99)
ग
गॉडजिला Fri, 06/04/2021 - 06:36 नवीन
=)) =)) =)) पुणेकर शोभतो ?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 06/04/2021 - 08:45 नवीन
१. एक प्रसिध्द कवी आणि बॉलीवूडमधील गीतकार आहे. त्याने पंतप्रधानांच्या काही धोरणांवर टीका करणारे भाषण दिले म्हणून त्या कवीला तुरूंगात टाकले गेले आहे. तो चांगला दोन वर्षे तुरूंगात राहिला. २. एक पत्रकार आणि पुरोगामी नेता आहे. त्याने आपल्या नियतकालिकात पंतप्रधानांवर टीका करणारे लेख लिहिले म्हणून एका राज्यात त्या नियतकालिकाचे वितरण करायला बंदी आणण्यात आली आहे. ३. एक पुरोगामी नेता आहे. त्याने सरकारविरोधात भाषण दिले. जसे आपण इंग्रजांना भारतातून हाकलून दिले तसे आताच्या सत्ताधार्‍यांनाही हाकलायला हवे असे त्या भाषणात म्हटले. त्या नेत्याविरूध्द देशद्रोहाची केस एका राज्य सरकारने दाखल केली आहे. ४. एक व्यंगचित्रकार आहे. त्याने आपल्या व्यंगचित्रात संसदेची तुलना संडासाबरोबर केली म्हणून त्या व्यंगचित्रकाराविरूध्द एका राज्य सरकारने देशद्रोहाची केस दाखल केली आहे. पुरोगामी डाव्या विचारवंतांनो, देशात कित्ती कित्ती असहिष्णुता वाढत चालली आहे ना? मग काय. सरकार अगदी पूर्ण असहिष्णुतेचे वातावरण देशात पसरवत आहे. आपल्याविरोधात एक शब्द बोललेला सरकारला खपत नाही. मग काय पुरोगामी विचारवंतांनो पिटणार टाळ्या? पण थांबा. डाव्या विचारवंतांनो इतका अतीउत्साह दाखवू नका. हे सगळे प्रकार करणारे सरकार मोदी सरकार नाही बरं का. आणि या प्रकारांमध्ये ज्यांना तुरूंगात टाकले गेले त्यातील बरेचसे तुमच्याच विचारांचे समर्थक होते. ते कोण होते हे बघायचे का? १. तो कवी आणि बॉलीवूडमधला गीतकार होता मजरूह सुलतानपुरी आणि ज्या पंतप्रधानावर त्याने टीका केली होती तो पंतप्रधान होता जवाहरलाल नेहरू. २. त्या पत्रकाराचे नाव होते रोमेश थापर आणि त्याने टीका केली होती तो पंतप्रधान होता जवाहरलाल नेहरू. त्याने लिहिलेल्या लेखांबद्दल त्या नियतकालिकाचे मद्रास राज्यातील राज्य सरकारने राज्यात वितरण रोखले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि रोमेश थापर विरूध्द मद्रास सरकार हा स्वातंत्र्यानंतर पहिल्या अगदी काही वर्षातील गाजलेला खटला होता. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मद्रास सरकारचा निर्णय अवैध आहे असे म्हटले. यावर जवाहरलाल नेहरू सरकारची प्रतिक्रीया काय होती? तर राज्यघटनेत पहिली घटनादुरूस्ती झाली त्यात रोमेश थापर यांचे प्रकरण ' reasonable restrictions on the freedom of speech' यात बसावे याप्रकारे बदल करण्यात आले. ३. तो नेता होता बिहारमधील कम्युनिस्ट नेता केदारनाथ सिंग आणि त्याने टीका केली होती तो पंतप्रधान होता जवाहरलाल नेहरू. त्याने पंतप्रधानांविरोधात टीका केली म्हणून बिहारमधील काँग्रेस सरकारने १९६० मध्ये त्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला भरला. त्या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने तो देशद्रोहाचा आरोप रद्द केला. यातही दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे परवा विनोद दुआवर देशद्रोहाचा खटला भरला गेला होता तो रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने याच केदारनाथ सिंग विरूध्द बिहार सरकार या खटल्याचा संदर्भ दिला होता. त्या खटल्यामध्ये आपल्याच विचारांच्या एका नेत्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला गेला होता हे आता विनोद दुआवरील खटला रद्द केला म्हणून त्यावर टाळ्या पिटणार्‍या कॉमी विचारवंतांच्या गावी असते की नाही कोणास ठाऊक. दुसरी गोष्ट म्हणजे केदारनाथ सिंगवर तो खटला बिहारच्या राज्य सरकारने टाकला होता आणि विनोद दुआवर खटला भरणारा कोणी हिमाचल प्रदेशातील भाजप कार्यकर्ता आहे. या दोन गोष्टी समकक्ष कशा काय? केदारनाथ सिंगांवर १९६० मध्ये बिहार राज्य सरकारने देशद्रोहाचा खटला भरला म्हणून डाव्या विचारांचे लोक नेहरूंवर असहिष्णुतेचा आरोप करत असतीलही. पण आता तेच लोक नेहरू म्हणजे कित्ती कित्ती सहिष्णुतेचा पुतळा होते याचे गोडवे गात असतात. आणि त्या बरोबरच हिमाचलमधील कोणा टिनपाट भाजप कार्यकर्त्याने विनोद दुआवर देशद्रोहाचा खटला भरला तरी त्याचा दोष मोदींवर येत असतो. आहे की नाही मज्जा? ४. ही घटना २०१० मधील आणि त्या व्यंगचित्रकाराचे नाव होते असीम त्रिवेदी. आणि त्याच्याविरोधात देशद्रोहाचा खटला भरणारे सरकार होते महाराष्ट्रातील महाआघाडीचे सरकार- तेच सरकार ज्याच्या कारकिर्दीत सहिष्णुतेचा महापूर वाहायचा. कधीतरी भारताच्या राजकीय इतिहासावर काहीतरी लिहायचे आहे. त्यानिमित्ताने गोळा केलेल्या माहितीतून.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 06/04/2021 - 09:22 नवीन
👌 👍
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 06/04/2021 - 09:23 नवीन
कधीतरी भारताच्या राजकीय इतिहासावर काहीतरी लिहायचे आहे.
👌 👍
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 06/04/2021 - 09:25 नवीन
लगेच ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं, म्हणजे तुम्ही दुटप्पी आरोळ्या सुरूच ! मी कधी म्हणले- १.मोदींचा दोष आहे २. आधीचे सरकार सहिष्णू होते ३. आत्ताचे सरकार असहिष्णू आहे ? एकही गोष्ट "कॉमी विचारवंत" म्हणजे बहुदा मी असें, मांडत नाही आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 06/04/2021 - 09:36 नवीन
एकही गोष्ट "कॉमी विचारवंत" म्हणजे बहुदा मी असें, मांडत नाही आहे.
धन्यवाद. मिपावरील एक सदस्य सोडून जगात एकही कॉमी विचारवंत नाही असा तुमचा म्हणायचा उद्देश असेल तर मी जो भेटेल त्याला पेढे वाटेन. डायनासोर बघितलेला कोणीही आताच्या काळात पृथ्वीतलावर नाही आणि डायनासोरविषयी केवळ त्या काळाशी संबंधित पुस्तकांमधूनच वाचायला मिळते तशी वेळ कधीतरी कम्युनिस्ट विचारवंतांविषयी यावी असे फार फार वाटते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 06/04/2021 - 09:38 नवीन
ताकाला जाऊन भांडे छान लपवता कि !
  • Log in or register to post comments
प
पिनाक Fri, 06/04/2021 - 14:34 नवीन
तुम्ही तुमचे नाव बदलावे ही विनंती. तुम्ही फार जनरीक नाव घेतले आहे. त्यामुळे कम्युनिस्ट असं कुणाला लिहायचं असेल तर कॉमि आणि काँग्रेस वाल्याना काँगी, भाजप वाल्याना भक्त असं म्हणायचे प्रकार होत राहणार. आता एखाद्याने भक्त म्हणून नाव घेतलं तर त्याने स्वतःचं नाव घेतलं जाणे हा आरोप खरा असू शकतो किंवा नसू ही शकतो.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sat, 06/05/2021 - 15:44 नवीन
डायनासोर बघितलेला कोणीही आताच्या काळात पृथ्वीतलावर नाही आणि डायनासोरविषयी केवळ त्या काळाशी संबंधित पुस्तकांमधूनच वाचायला मिळते तशी वेळ कधीतरी कम्युनिस्ट विचारवंतांविषयी यावी असे फार फार वाटते.
फु ट लो!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 06/04/2021 - 09:37 नवीन
कधीतरी भारताच्या राजकीय इतिहासावर काहीतरी लिहायचे आहे. त्यानिमित्ताने गोळा केलेल्या माहितीतून.
+१
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 06/04/2021 - 09:37 नवीन
५. आणिबाणीच्या काळांत तत्कालिन आय. अँड बी. मिनीस्टर, व्ही. सी. शुक्ला ह्यांना वाटले की २० कलमी कार्यक्रमाची महती सांगणारे कार्यक्रम ऑल इंडिया रेडियो व दूरदर्शनवरून प्रसरीत करावेत, व ह्या कार्यक्रमांसाठी हिंदी चित्रपटसृष्टील कलाकारांचा समावेश असावा. त्यांत किशोरकुमारने सहभागी व्हायचे नाकारले. तेव्हा त्याच्यावर ह्या दोन्ही माध्यमांसाठी बंदी घालण्यांत आली. (चित्रपट गीते सर्वदूर जाण्यासाठी तेव्हा ही प्रमुख माध्यमे होती. कॅसेट्सचा जमाना नुकताच येत होता).
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 06/04/2021 - 10:07 नवीन
हो किशोरकुमारवर बंदी घातली होती हा मुद्दा विसरलोच.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 06/04/2021 - 10:26 नवीन
चंसुकु, आणीबाणीत मध्यमवर्ग मात्र खुश असायचा हो . ट्रेन्स/बसेस वेळेवर सुटायच्या. लाच न देता सरकारी कामे व्हायची. गरीब वर्गाला मात्र अतिशय जाच झाला. ज्यामुळे काँग्रेस ७७च्या निवडणूकीत हरली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 06/04/2021 - 10:31 नवीन
आणीबाणीत मध्यमवर्ग मात्र खुश असायचा हो . गैरसमज आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 06/04/2021 - 11:04 नवीन
चंसुकु, आणीबाणीत मध्यमवर्ग मात्र खुश असायचा हो . ट्रेन्स/बसेस वेळेवर सुटायच्या.
ट्रेन्स्/बसेस वेळेवर सुटायच्या म्हणून मध्यमवर्गीय खूष असतील तर त्यांना सरकारी दमनचक्रामध्ये नक्की काय चालू आहे याविषयी काहीच माहिती कळत नव्हती त्यामुळे अशा वरवरच्या गोष्टींना भुलून खूष असतील. कोणालाही उचलून जबरदस्तीने नसबंदी केली जाईल ही भिती असेल तर १९ महिने ट्रेन्स्/बसेस वेळेवर सुटाव्यात यासाठी ती फार मोठी किंमत झाली नाही का? चित्रपट बघून बाहेर पडणार्‍या कोणालाही उचलून नसबंदी केंद्रात नेले गेले अशा घटना आणीबाणीत घडल्या आहेत. दिल्लीहून चंदीगडला बसने एका परिषदेसाठी चाललेल्या बुध्दीजीवी लोकांना पकडून चंदीगडच्या नसबंदी केंद्रात नेले गेले होते. अशा अनेक घटना घडल्या होत्या. आणीबाणीत सी.चिट्टीबाबू हा खासदार तुरूंगात पोलिस मारहाणीत मरण पावला. आणि तो मरण पावला इतका मार त्याने खाल्ला कारण तुरूंगात एम.के.स्टालिनला (तोच स्टालिन-- सध्या तामिळनाडूचा मुख्यमंत्री असलेला) पोलिस मारत असताना तो त्याला वाचवायला गेला म्हणून पोलिसांनी चिट्टीबाबूंनाच बेदम मारहाण केली. जिथे खासदाराचा पोलिस मारहाणीत मृत्यू होऊ शकतो तिथे सामान्यांची काय कथा? स्नेहलता रेड्डीसारख्या अभिनेत्रीचा, विजयन नायर सारख्या कार्यकर्त्याचा असाच पोलिसांच्या अत्याचारांमुळे मृत्यू झाला. गौरकिशोर घोष यासारख्या पत्रकाराचा पोलिस कोठडीत हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाला. तुर्कमान गेटविषयी काही बोलूच नका. अन्यथा झोपडपट्ट्या हटवायला लागल्यावर मेधा पाटकर वगैरे ढोंगी लोकांच्या बरोबरीने हे पुरोगामी लोक उच्चरवाने झोपडपट्टी रहिवाश्यांच्या बाजूने बोलत असतात तेच आता तुर्कमान गेट हटवताना तिथे गोळीबार करून दीड-दोनशे लोकांना इंदिरांच्या सरकारने ठार मारले तरी वर 'आणीबाणीत काहीच अत्याचार झाले नाहीत' असे वर तोंडाने बोलायचे ढोंग दाखवतात तेव्हा डोक्याला प्रचंड शॉट जातो. कधीकधी वाटते की आणीबाणी कित्ती कित्ती चांगली होती हे म्हणणार्‍या समाजवादी ढुढ्ढाचार्यांना मोदी सरकारने खरोखरच अशी जबरस्तीने नसबंदी करायला पाठवावे नाहीतर कोणतेही कारण न देता अनिश्चित काळासाठी तुरूंगात डांबावे. या पुरोगामी पोपटांना तीच भाषा कदाचित कळत असेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 06/04/2021 - 11:09 नवीन
माझ्या शाळेतील दोन शिक्षकांना आणिबाणीच्या काळात २० महिने तुरुंगात डांबले होते कारण म्हणे त्यांचा संघाशी संबंध होता. ते सुद्धा मध्यमवर्गीयच होते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 06/05/2021 - 08:37 नवीन
लाच न देता सरकारी कामे व्हायची हा गैरसमज आहे. कोणतेही सरकारी काम तेंव्हा लाचे शिवाय झाले तर नाहीच परंतु लाच खायला भीती वाटत असल्याने कामे प्रचंड प्रमाणात प्रलंबित राहिली होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 06/04/2021 - 10:24 नवीन
अजून एक. १९९३ मध्ये दूरदर्शनवर खून भरी मांग हा चित्रपट दाखविला होता. त्या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हाची दृश्ये आली की चित्र एकदम स्तब्ध व्हायचे. संवाद ऐकू येत होते, पण चित्र स्थिर रहायचे. शत्रुघ्न सिन्हाचे दृश्य संपले की तेथून पुढे चित्रपट नेहमीच्या वेगाने चित्रपट दिसायला लागायचा. हा मूर्खपणा करण्याचे एकमेव कारण होते की शत्रुघ्न सिन्हा तेव्हा भाजपत होता. कलाकारांचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे भंपक गप्पा ठोकणारे पवारांसारखे अनेक जण त्यावेळी नरसिंहराव मंत्रीमंडळात होते व त्यांनी या प्रकाराविरूद्ध चकार शब्द काढला नव्हता.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 06/04/2021 - 10:30 नवीन
राज ठाकरे ह्यांनी नरसिंह राव ह्यांची २/३ आक्षेपार्ह म्हणता येतील अशी व्यंगचित्रे काढली होती(मार्मिक्/सामना). मात्र देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही की राज ठाकरे ह्यांना ई.डी.ची नोटीस आली.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 06/04/2021 - 11:11 नवीन
असे वर्मावर बोट ठेऊ नका हो शर्मा दुखावेल
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 06/04/2021 - 11:29 नवीन
मग माणसे पाठवून बदडलं असेल. राज सध्या तेच करतो. मनसे किंवा राज विरूद्ध कोणी काही लिहिले की राजची माणसे लिहिणाऱ्याला बदडून माफी मागायला लावतात.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 06/04/2021 - 09:51 नवीन
विनोद दुआ, बरखा, राजदिप आणि रविष ह्या लोकांनी खरंच चूक केल्या असतील तर नक्कीच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, पण उगाच त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल नाही केला पाहिजे. मुळात मोदींच्या उदया मध्ये ह्या लोकांच्या एकतर्फी reporting खारीचा का होइना पण वाटा आहे. ज्या चुका नेहरूंनी केल्या त्याच परत मोदींनी कशाला करायला पाहिजे? हे लोक जेव्हढ मोदी विरुद्ध बोलत जातील तेवढा जास्त फायदा मोदींना होईल.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 06/04/2021 - 10:08 नवीन
ज्या चुका नेहरूंनी केल्या त्याच परत मोदींनी कशाला करायला पाहिजे?
मुद्दा हा की विनोद दुआवर देशद्रोहाचा खटला केंद्र किंवा हिमाचलच्या भाजप सरकारने दाखल केला नसून कोणा स्थानिक टिनपाट भाजप नेत्याने अती उत्साहात दाखल केला आहे हा फरक आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 06/04/2021 - 10:23 नवीन
बरखा दत्त्/रविश कुमार हे लोकांचे प्रश्न पत्रकारितेतून मांडतात असे आमचे मत. ते तोरसेकर्/अनिल थत्ते हे दरबारी पत्रकारिता करतात. कोणी कुठे कट शिजवला? कोणी कोणाला टोला मारला? पवार-फडणवीस भेटीत नेमके काय घडले? वगैरे उत्तर प्रदेशात गंगेच्या किनार्यावर जेथे मृतदेह पुरण्यात येत होते, तेथे जाउन फिल्ड रिपोर्टिंग करणे हे धाडसाचे नाही का ?https://www.youtube.com/watch?v=7F5rXGSifzw की तेथे भाजपा सत्तेवर आहे म्हणून देशद्रोह म्हणणार? सुशांत सिंग रजपूत प्रकरणाचे काय झाले नक्की? सरकार अडचणीत आले की ड्रग्जचे सेवन केलेल्या फिल्मि लोकांना एन.सी.बी. ची नोटीस येते. किती दिवस हा पोरखेळ करणार?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 06/04/2021 - 11:54 नवीन
NCB तर ठीक आहे हो. निदान तिथे खरोखरचा गुन्हा तरी आहे. पण ते SSR खुनाचे प्रकरण कुठे हवेत जिरले काय माहित. बिहार निवडणुकीत सुशांतला न्याय मिळवून देण्याचे वचन दिलेले, काय झाले पुढे ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 06/04/2021 - 12:06 नवीन
भाजपने सुशांतसिंग प्रकरणाचा वापर फक्त ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी केला. यातून आपल्याला काही तरी मिळेल व ते वापरून ठाकरेंवर दबाव आणून त्यांना पायउतार व्हायला भाग पाडू या भ्रमात फडणवीस-चंपा होते. हे प्रकरण सीबीआयकडे दोन महिन्यांनंतर गेले. दरम्यानच्या काळात त्यातील अडचणीचे पुरावे (असलेच तर) पोलिसांनी नक्कीच नष्ट केले असणार. त्यातूनही काही पुरावे शिल्लक राहिले असतील तर ऑक्टोबर मधील फडणवीस-राऊत यांच्या दोन तासांच्या भेटीनंतर त्यावर पडदा पडला असणार कारण त्या भेटीनंतर भाजप नेते एकदम गप्प झाले.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 06/04/2021 - 12:55 नवीन
इथे एकाहून अधिक गल्लती व सरसकटीकरण झालेले आहे.
ते तोरसेकर्/अनिल थत्ते हे दरबारी पत्रकारिता करतात. कोणी कुठे कट शिजवला? कोणी कोणाला टोला मारला? पवार-फडणवीस भेटीत नेमके काय घडले? वगैरे
भाऊ तोरसेकर व अनिल थत्ते एकाच तागडीत मोजणे हे सरसकटीकरण आहे. मोदी २०१४ साली सत्तेवर येण्याअगोदरपासून, म्हणजे २०१३ सालापासून भाऊ तोरसेकरांनी, मोदींच्या विजयाचे निदान केले होते. एक जुने व जाणते पत्रकार असल्याने सामाजिक व राजकिय घडामोडींचे संदर्भ त्यांच्या डोक्यात असतात-- म्हणजे त्यासाठी त्यांना गूगल करावे लागत नाही. त्या जोरावर त्यांना अनेक घटनांमधून पॅटर्न्स दिसतात, जे ते त्यांच्या विश्लेषणांतून मांडतात. अतिशय सीनियर असल्याने आता ते प्रत्यक्ष फील्ड रिपोर्टींग करत नाहीत, त्यांची भूमिका निव्वळ विश्लेषकाची आहे. आता गेल्या काही वर्षांतील त्यांची वक्तव्ये पाहिली, तर त्यांत ते कुठल्या एका पक्षाचे दरबारी आहेत असे अजिबात दिसत नाही. वेळोवेळी त्यांनी पवारांवर टिका केलेली आहे. पूर्वी मार्मिक व बाळासाहेबांच्या परिसरांत वावरल्यामुळे की काय, २०१९ च्या लोकसभा निवडणूका व नंतरच्या विधानसभा निवडणूकांच्या दरम्यान, राज ठकरेंवर बरीच भिस्त ठेऊन होते. त्यांची तेव्हाची वक्तव्ये जणू काही राज ह्यांना सल्ले देत असावेत असे वाटावी अशी होती. नंतर सेनेचे सरकार आल्यानंतर ते अनेकदा सेनेचे सल्लागार होऊ इच्चितात की काय, असे वाटावे, अशा तर्‍हेची त्यांची वक्तव्ये असायची. हे खरे आहे की बहुधा ते मोदींना वाखाणतात. हे सगळे अशासाठी सांगितले, की ते जर कुणाचे दरबारी असतीलच, तर नक्की कुणाचे, मग? खरे तर जुन्या पिढीच्या गंभीर पत्रकारीतेचे ते आता शेवटचे दुवा आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. अनिल थत्तेने स्वतःच अलिकडे जाहीर सांगितल्याप्रमाणे तो ब्रँडींग करतो. 'प्रशांत किशोर अलिकडे जे करत आहे, ते मी केव्हापासूनच करतोय' हे त्याचेच वक्तव्य आहे. आणि त्याचे अलिकडे पुनरागमन झाल्यावर भाऊंनी त्याच्याबद्दल म्हटले होते, की अलिकडे मराठींत जी पत्रकारीता सुरू आहे, त्यांनी उगाच बाळशास्त्री जांभेकरांचे वगैरे नांव न घेता, अनिल थत्तेचे नाव घ्यावे. कारण त्यांचे जे काही आजकाल सुरू आहे, त्याचा महाराष्ट्रापुरता श्रीगणेशा थत्तेने, ८० च्या दशकांत, गगनभेदी चालवून केला.
बरखा दत्त्/रविश कुमार हे लोकांचे प्रश्न पत्रकारितेतून मांडतात असे आमचे मत.
बरखा दत्त, राजदीप इत्यादी पत्रकार कमी व भडक सेन्सेशनल काही सांगणारे असे होते व तसेच आहेत. त्यांतून, यूपीएच्या कारकीर्दींत त्यांच्या राजकीय उचापती उघड झालेल्या होत्या. तेव्हा हे लोक फिक्सर्सचेही काम करत होते. आता त्यांना ती संधी नाही. राहता राहिला प्रश्न त्यांच्या पत्रकारीतेचा. राजदीप त्याच्या कारकीर्दीत अनेकदा चक्क खोटे बोलला हे जगजाहीर झालेले आहे. एकदा तरी त्याने कोर्टांत माफी मागितली आहे. अलिकडेच त्याचे दोन रिपोर्ट्स (शेतकर्‍यांच्या 'आंदोलनां'तील एकाचा झालेला मृत्यूची बातमी, व राष्ट्रपतींच्या बंगाल दौर्‍यांत ते रवींद्रनाथांच्या खुर्चीवर बसल्याची बातमी) खोट्या/ अतिशयोक्त होत्या. ह्यांपैकी राष्ट्रपतींच्या विषयीच्या बातमीची दखल खुद्द राष्ट्रपतींनी घेऊन त्याच्या चॅनेलच्या मालकालाच लिहीले, त्यामुळे आपण दखल घेत काहीतरी करतोय, असे दाखवणे त्या मालकाला भाग पडले. ग्राउंड रिपोर्टीगचेही काही नियम असतात. काही 'बॉटम लाईन्स' असतात, त्या हे दोघेही वारंवार उल्लंघतांना दिसतात. (तुम्ही ज्या मृतदेह पुरण्याची बातमीचा उल्लेख केला आहे, त्याचे निराकरण नंतर झालेले होते. ही तेथील काही जमातींची नेहमीची प्रथा आहे. त्याचा कोव्हिडशी संबंध नव्हता. व ती प्रेते उकरून वर काढतांना एका माणसाला हातोहात पकडण्यात आले - त्याचे काम सीसीटीव्हींत बंदिस्त झालेले होते). हिंदूंच्या स्मशामांत जाऊन तेथे अनेक चिता जळत आहेत, ह्या पाश्वभूमीवर रीपोर्टींग करणे कितपत योग्य आहे? एकतर, ह्यांत त्या देहांचा, त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा सन्मान राखला जात नाही. दुसरे ही अशी दृष्ये परदेशी न्यूज चॅनेल्स आनंदाने उचलतात व तेथे दाखवतात. निव्वळ, भारतांतील कोव्हिडच्या पराकोटीची बातमी म्हणून ते जे जर असे करीत असतील, तर ह्या अगोदर, गेल्या वर्षी अमेरिका, इटली इत्यादी ठिकाणी जो असाच व इतकाच गंभीर हाहा:कार उडाला होता, त्यांच्याही रूग्णालयाच्या व्यवस्था कोलमडून पडल्या होत्या, प्रेते ठेवण्यासही जागा नव्हत्या- त्या सर्व वेळी आपण कुणी अशाच प्रकारची कव्हरेजेस पाहिली काय? मी परदेशांतील अनेक चॅनेल्स पाहू शकतो, व एकही असे काही भयंकर ( gory, morbid) वाटावे, असे दृष्य माझ्यातरी पहाण्यांत आलेले नाही. तेव्हा आक्षेप बरखाच्या फाजिल उत्साहाला आहे. 'जसे आहे, तसे आम्ही दाखवतो आहोत' हे जस्टिफिकेशन अतिशय चुकीचे आहे. साधे उदाहरण घ्या-- कुठलाही अपघात झाला, उदा. गाडीखाली कुणाचा चेंदामेंदा झाला, तर त्या मृत देहाचे दर्शन 'बातमी' म्हणून करू नये, ही साधी पत्रकारीतेची प्रथा आहे. हे सर्व बरखाच्या कव्हरेजेसमधे उल्लंघले गेले आहे. तेव्हा, राजदीप व बरखा ही खरे तर, पत्रकाराने कसे असू नये, ह्याची उत्तम उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 06/04/2021 - 13:15 नवीन
तेव्हा, राजदीप व बरखा ही खरे तर, पत्रकाराने कसे असू नये, ह्याची उत्तम उदाहरणे आहेत.
+९१
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 06/04/2021 - 19:49 नवीन
खरं आहे .. बरखा / रबीश / राजदीप ह्यांनी तटस्थ पत्रकारीतेला सुरुंग लावला. त्यांच्या उमेदीच्या काळात समाज माध्यमे जास्त नसल्यांमुळे ते जे बोलतील / दाखवतील ते सत्य मानले जाइ. आजकाल ते शक्य नाही ... कुठलीही चर्चा फिरुन फिरुन आपल्या अजेंड्यावर घेउन येणे हेच या लोकांचे ध्येय असते .. रबीश कुमार चा मोनोलोग तर अक्षरशः डोक्यात जातो. मागे दिल्लीत दलालांच्या आंदोलकांनी जो गोंधळ घातला त्या दिवशी राजदीप तर रस्त्यावर मस्त फिरत अजुन एका पत्रकाराबरोबर गप्पा मारत "सर्व काही ठीक आहे" वगेरे दाखवायचा प्रयत्न करत होता. स्वतःच्या अपघातात मरण पावलेल्या शेतकर्‍याचा म्रुत्यु गोळी लागुन झाला आहे आनी त्याची जखम मी पाहीली आहे वगेरे धादांत खोटी माहीती त्याने दिली होती .. नंतर दिल्ली पोलीसांनी व्हीडीयो फुटेज सार्वजनीक केल्यावर त्याचे बिंग फुटले .. या लोकांचा अजेण्डा पत्रकार म्हणुन उल्लेख करायला हवा ..
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 06/05/2021 - 10:54 नवीन
मागे दिल्लीत दलालांच्या आंदोलकांनी जो गोंधळ घातला त्या दिवशी राजदीप तर रस्त्यावर मस्त फिरत अजुन एका पत्रकाराबरोबर गप्पा मारत "सर्व काही ठीक आहे" वगेरे दाखवायचा प्रयत्न करत होता. स्वतःच्या अपघातात मरण पावलेल्या शेतकर्‍याचा म्रुत्यु गोळी लागुन झाला आहे आनी त्याची जखम मी पाहीली आहे वगेरे धादांत खोटी माहीती त्याने दिली होती .. नंतर दिल्ली पोलीसांनी व्हीडीयो फुटेज सार्वजनीक केल्यावर त्याचे बिंग फुटले
हेच म्हणायचं होतं. अशा न-पत्रकारावर, त्याने केलेल्या कृत्याबद्धल (खोटी बातमी देणे = अफवा पसरविणे) जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? बंगालातील निवडणुकोत्तर हिंसाचारातील गुन्हेगारांवर, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? दिल्लीतील न-शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराला चार महिने होऊन गेलेत; लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अवमान करणाऱ्याला / इतर दंगेखोरांना, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? आणि हं, विसरलोच... इसवीसन २०२० च्या जानेवारीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वेळी दिल्लीत दंगली झाल्या होत्या, त्यातील गुन्हेगारांवर, जनतेला दिसेल अशी कोणती कारवाई झाली / होत आहे? मी इथे म्हटल्याप्रमाणे, मोदी-शहा त्यांना मिळालेल्या सत्तेचा उपयोग करण्यात पुरेसे कार्यक्षम नाहीत असाच याचा अर्थ होत नाही का? जनतेला दिसेल अशी कारवाई = गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्याची केवळ शिक्षा करून पुरेसे नसते, त्याला वेळेत आणि पुरेशी कडक शिक्षा झाली आहे हे जनतेला समजणे, हेही आवश्यक असते.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 06/04/2021 - 11:33 नवीन
महामहिम अन्नदाता प्रधानसेवक राजयोगी मानवश्रेष्ठ पुरुषोत्तम सध्या पूर्णपणे आपल्याच मनोर्यात मग्न आहेत. सर्व चमचे सध्या शक्तिमान मधील "अंधेरा कायम रहे" प्रमाणे चाटुकारिता करण्यात पूर्णपणे मग्न आहेत. कॉलेज मध्ये असताना कुणी "कपल" निर्माण झाले कि फ्रेंड झोन मधून ते वर कधी येते ह्याची एक लिटमस टेस्ट होती. ती म्हणजे दोघेही एकमेकांच्या सानिध्यांत बिनधास्त पणे अपानवायु निष्कासन करू लागले तर हि मंडळी पिकॉक डान्स मधून बाहेर येऊन पूर्णपणे कपल झाली आहेत असे समजत असत. पण महामहिम नरपुंगव नेतृत्वश्रेष्ठ प्रधानसेवकांच्या इष्क मध्ये समस्त भक्तमंडळींनी सारी हदे पार केली आहेत. सध्या ह्या नारशार्दुलने अपानवायू बाटलीत भरून दिला तरी ह्याला साक्षांत कस्तुरीचा सुगंध येतो असे ह्यांचे कर्तव्यदक्ष मंत्रिमंडळ ट्विट करतील. चाटुकारिता कुठल्या लेव्हल ला पोचलीय पहा. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. एका बाजूला वाईट वाटते आणि दुसऱ्या बाजूला हास्यास्पद. ह्यांतील बहुतेक मंडळी स्वयंप्रकाशित नाहीत. हि रेडियम प्रमाणे आहेत. स्वतःचा प्रकाश नाही त्यामुळे ज्याला प्रकाश आहे तो रिफ्लेक्ट करू कसे बसे आपले अस्तित्व जस्टीफाय करायचे. जावडेकर, रवी प्रसाद, स्म्रिती इराणी, निर्मला ह्यानी मला आधीच ब्लॉक केले असल्याने त्यांची चाटुकारिता मी शोधू शकले नाही पण त्यांनी सुद्धा चरणामृत प्राशन करून आपल्या अस्तित्वाची जाणीव महामाहीमना करून दिली असेलच. शोध घ्यावा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 06/04/2021 - 11:37 नवीन
दहावी आणि १२ वी ची परीक्षा रद्द करणे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. भविष्यात याचे गंभीर दुष्परिणाम दिसणार आहेत.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Fri, 06/04/2021 - 14:35 नवीन
  • Log in or register to post comments
प
पिनाक Fri, 06/04/2021 - 14:35 नवीन
  • Log in or register to post comments
प
पिनाक Fri, 06/04/2021 - 14:36 नवीन
यंदा सर्वानी UPSC चे फॉर्म भरायचे आहेत परीक्षा रद्द झाली तर सर्वजण आपोआप IAS अधिकारी होणार.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 06/04/2021 - 22:02 नवीन
लोन माफी प्रमाणे इथे सुद्धा स्पर्धा निर्माण होणार आहे. CBSE ने परीक्षा माफ केली तर सर्व राज्य बोर्ड कडे दुसरा पर्याय नाही कारण तुमच्या राज्यातील दहावी फेल मुलगा नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाही पण CBSE तील ढकलून पास झालेला मुलगा करू शकेल. आधीच १० वि खालील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला होता आणि आता संपुन शिक्षणाचा बाजा वाजला आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 06/05/2021 - 12:21 नवीन
खुपचं अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे.१०/ १२ ठिक पण प्रात्यक्षिक गरजेची असणार्‍या शिक्षणात काय होणार ?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 06/04/2021 - 16:47 नवीन
पंजाबच्या सरकारने, कोव्हॅक्सिनच्या १००,००० लशी, ४०० रु. प्रति लस ह्या दराने स्वतः खरेदी केल्या. त्यांतील किमान २०,००० लशी त्यांनी सी. एस. आर. च्या नावाखाली, खाजगी इस्पितळांना, १,०६० रू. प्रति लस, ह्या दराने विकल्या. त्या इस्पितळांनी त्या लशी, लोकांना, १,५६० रू.प्रति लस ह्या दराने टोचल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हिंदूस्तान टाईम्स ह्या काँग्रेसशी संलग्न मीडिया- घराने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. आता, ह्या गोष्टीचा गवगवा झाल्यावर पंजाब सरकारने त्या लिकल्या गेलेल्या लशी परत घेण्याचे ठरवले आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 06/04/2021 - 17:32 नवीन
खूप चुकीचे पाऊल होते. HT काँग्रेसवाल्यांच्या मालकीचा आहे माहीत नव्हते. मिंट पण त्यांचाच आहे हे सुद्धा माहित नव्हते. इथे बरीच माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 06/04/2021 - 17:44 नवीन
मिंटही हिंदूस्तान मीडियाचेच आहे, हे मला माहिती नव्हते. दुव्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 06/04/2021 - 22:03 नवीन
सिरम ला १५० रूपये पण मायबाप सरकार १००० रुपयांत विकेल.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 06/04/2021 - 22:56 नवीन
जुही चावला ला दंड . . https://www.pudhari.news/news/National/fined-Rs-20-lakh-to-Juhi-Chawla-by-delhi-high-court/ प्रसिध्दी साठी असले टुकार धंदे करुन वेळ वाया घालवल्याबद्दल असलीच शिक्षा झाली पाहिजे ..
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sat, 06/05/2021 - 02:37 नवीन
जुही चावला पहिली आहे. ते पण ५जी न वापरता. :)
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 06/05/2021 - 08:29 नवीन
अर्थशास्त्र हा एक कोड्यात टाकणारा विषय आहे. अनेक अर्थतज्ञ भारताची अर्थ्व्यवस्था कशी रसातळाला चालली आहे ते सांगत आहेत. जी डी पी कसा घसरत आहे हे ही सांगत आहेत. जी आकडेवारी ते देतात त्यावरुन ते पटते देखील. पण मग महाराष्ट्राचा मे २०२१ चा जी एस टी कर मे २०२० च्या तुलनेत ५९% जास्त आला. ह्याचा अर्थ काय ? https://www.indiatoday.in/business/story/gst-collection-hit-a-record-high-in-april-2021-but-there-is-a-catch-details-here-1800790-2021-05-10 गाड्यांच्या खपाच्या बाबतीतही तेच. विक्री १० ते १५% ने खाली आहे पण महिंद्राची/होंडाची विक्री ९% ने वाढली. https://www.carwale.com/news/india-car-sales-analysed-april-2021/ अर्थव्यवस्था रसातळाला चालल्याचे हे लक्षण बिलकूल नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 06/05/2021 - 16:10 नवीन
GDP पेक्षा आर्थिक वर्गीकरण केले तर चित्र जास्त स्पष्ट होईल . नाही तर श्रीमंत सरकार आणि गरीब जनता हाच प्रकार. १) )देशात वार्षिक दोन लाख कमावणारे किती आहेत. २) देशात वार्षिक तीन कमावणारे किती आहेत असे उत्पादनाच्या चढत्या क्रमाने वर्गवारी करून ती जाहीर केली पाहिजे आणि ते आकडे देशाची आर्थिक स्थिती कशी आहे हे दर्शवण्यासाठी वापरली पाहिजे. सातारा जिल्ह्यात मुकेश अंबानी राहण्यास गेले की सातारा जिल्ह्याचा gdp वाढेल पण लोकांची स्थिती आहे तीच असेल. GDP वरून देशाची अर्थ व्यवस्था माहीत पडेल लोकांची आर्थिक स्थिती नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/05/2021 - 10:55 नवीन
नव्या माहिती प्रसारण धोरण अंतर्गत आज केंद्रसरकारने ट्विटरला शेवटचं पत्र दिलं म्हणे. एकदा काय ते ठरवा आणि कळवा म्हणून. केंद्रसरकारच्या धोरणाविरुद्ध तशीही ट्विटरवर सतत टीवटीव चाललेली असते तेव्हा सरकारला अशा कोणत्या तरी हिताच्या आडून अशा मांध्यमावर नियंत्रण आणने गरजेचे होते. बघू या ट्विटर काय भूमिका घेते ते ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 06/05/2021 - 11:33 नवीन
ट्विटर बरेच घाबरले आहे. Final.pdf म्हणून रवी शंकर प्रसाद ह्यांनी धमकी दिली आता ते Final_२.pdf लिहीत आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/05/2021 - 12:16 नवीन
आजचंच पत्र फायनल होतं. कारण यापूर्वी अनुक्रमे २६ आणि २८ ला केंद्रसरकारने पत्र पाठवले होते. आणि आज शेवटचं पत्र पाठवले. '' नियमावली न पाळण्यामधून भारतीयांना सुरक्षित अनुभव देण्याबद्दल ट्वीटरची बांधिलकी नसल्याचंच दिसून येत आहे. भारतात जवळपास दशकभरापासून कार्यरत असूनही भारतीयांना योग्य प्रकारे त्यांच्या तक्रारीरचं निवारण करता येण्यासारख्या व्यवस्थेला ट्वीटरनं विरोध करणे हे विश्वास न बसण्यासारखं आहे'' (संदर्भ लोकसत्ता) जर ट्वीटरने जर यंव नै केलं आणि त्यंव नै केलं तर आयटी अंतर्गत यंव कार्यवाही करण्यात येईल असा शेवटचा सज्जड दम भारतीय सायबर लॉच्या अधिका-या खलित्याने दिला आहे. ( ट्वीटरला पाठविलेला खलिता क्रमांक एक आणि दोन दुव्यावर वाचायला मिळतील) च्यायला, एवढी काळजी गेल्या दीड-पावने दोन वर्षात भारतीयांची घेतली असती तर जी काही जिवित आणि वित्त हानी भारतीयांची झाली ती झाली नसती असा एक विचार माझ्या 'मन की बात' मधे येऊन गेला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 06/05/2021 - 17:57 नवीन
नीती आयोगाच्या sustainable development goals (SDG) इंडेक्स मध्ये केरळने राज्यांमध्ये आपला अव्वल क्रमांक अबाधित ठेवला आहे. हा इंडेक्स आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणासंबंधीत निकषांवर आधारित असतो. हरियाणा, मिझोराम, उत्तराखंड हे मागील स्कोर पेक्षा सर्वात जास्त प्रगती करणारी राज्ये आहेत. केरळच्या जवळपास बरोबरच हिमाचल, तामिळनाडू, गोवा, उत्तराखंड, कर्नाटक आहे. हे राज्यांबाबतीत. UT मध्ये चंदिगढ आणि दिल्ली वर आहेत. चंदिगढचा स्कोर केरळ पेक्षा चांगला आहे. https://indianexpress.com/article/explained/niti-aayog-sustainable-development-goals-ranks-explained-7343640/#comments
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 14 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 14 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 14 hours ago
  • सुंदर !!
    1 day 14 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा