Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी एप्रिल भाग २

स
साहना
Tue, 04/06/2021 - 22:16
🗣 205 प्रतिसाद
चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा. - कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे. - बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात. - फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/ - चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-first-for-major-economy-11617634118 - आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu-idli-amma-new-home-workspace-promise-anand-mahindra-7256916/ - बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे. - पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले. - मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे. - एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील. - सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 54288 views

🗣 चर्चा (205)
म
मराठी_माणूस Wed, 04/07/2021 - 07:29 नवीन
सध्याचा ज्वलंत आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न https://www.loksatta.com/mumbai-news/traders-on-the-streets-against-restrictions-abn-97-2438489/
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 04/07/2021 - 07:47 नवीन
तारे तारका यांच्या पोरांच्या नावात रस असणारे रिकामटेकडे खूप आहेत म्हणून ते टवीत करतात अन् लोक वाचतात, व्यक्त होतात. मधे बाळ तैमूरच्या भावाचे नाव काय असेल याचीही चर्चा होती. :( फेसबुक डेटा दाखवणारी वेबसाईट इकडे चालत नाही..! (451 - Unavailable For Legal Reasons )
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 04/07/2021 - 08:13 नवीन
> नावात रस असणारे रिकामटेकडे खूप आहेत सर्वच मंडळी रिकामटेकडी नाहीत. नित्यानंद मिश्रा व्याकरण शास्त्री असून विविध शब्द, त्यांची व्युत्पत्ती आणि अर्थ ह्यांच्यावर लिहीत आहेत आणि अक्खे पुस्तक लिहिले आहे. अनेकदा सामान्य मंडळी सेलिब्रिटींचे अनुकरण करत असल्याने नावांसह अर्थ लोकांसमोर आणणे अवश्य आहे नाहीतर मंडळी "आरव" सारखे घाणेरडे नाव आपल्या मुलांना देतात. (किंवा ईशानी)
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 04/07/2021 - 08:20 नवीन
उत्सुकता, तुम्ही म्हणताय ती नावे घाणेरडी का आहेत?
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 04/07/2021 - 08:28 नवीन
आरव (अक्षयकुमारच्या पोराचे नाव) चा अर्थ होतो वेदनेने विव्हळणे. ईशानी - कापसाचे झाड
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 04/07/2021 - 08:35 नवीन
गल्लत होतेय का? आरव म्हणजे नाद. जसे की गुंजारव म्हणजे भुंग्याच्या गुनगुनन्याचा आवाज. आणि ईशानी हे तर दुर्गेचे नाव, सत्ताधीशीनी या अर्थाने.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 04/07/2021 - 08:43 नवीन
https://twitter.com/MisraNityanand/status/1024109791692697600?s=20 https://www.learnsanskrit.cc/index.php?tran_input=IzAnI&direct=au&script=hk&link=yes&mode=3
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 04/07/2021 - 09:21 नवीन
काही कळले नाही. एखाद्या गोष्टीचा तालबद्ध आवाज म्हणजे नाद. त्यात वाईट काय ते कळले नाही. तेच ईशानी बाबतीत. तुम्ही दिलेलं संस्कृत संकेतस्थळ ईशान चा अर्थ राज्य करणारा (राज्य करणारा ईश, महादेव या अर्थाने) असा दाखवत आहे. आणि ईशानी चा अर्थ मात्र कापसाचे झाड? हे काही कळले नाही. ईशानी हे दुर्गेच्या/महालक्ष्मीच्या १००० नावांमध्ये येते. थोडक्यात ठेवणार्याने आरव म्हणजे नाद आणि ईशानी म्हणजे दुर्गा असे नाव ठेवले असल्यास चूक ते काय? ************* अर्थात बरीच लोकं विचित्र नावे ठेवतात हा मुद्दा मान्य. पार्थिव हे नाव का ठेवले जाते ते अजून समजलेले नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/07/2021 - 15:25 नवीन
रजस्वला, ह्या नावाचा किस्सा वाचलेला आठवतो... एक अतिशय शिकलेले जोडपे, आपल्या मुलीला हे नांव ठेवणार होते ...
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 04/07/2021 - 15:31 नवीन
हे राम
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Wed, 04/07/2021 - 15:53 नवीन
एक अतिशय इंग्रजी शिकलेले जोडपे असे वाचावे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/07/2021 - 16:38 नवीन
काही मुलांचे "शर्विल" असे नाव असते. या नावाला तसा अर्थ नाही. "मृच्छकटिक" नाटकातील एका चोराचे नाव "शर्विलक" असे आहे. तेव्हापासून शर्विलक म्हणजे चोर असे समजले जाते. रिहान, सोहा अशी मुस्लिम वाटणारी नावे सुद्धा ठेवली जातात.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि गुरुवार, 04/08/2021 - 05:27 नवीन
मृण्मयी हे हे नाव ही का ठेवले जाते? अनेकांना संस्कृत भाषा व त्याभाषेतील नावांचा अर्थ माहीत नसेल हे कारण असावे..
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 04/07/2021 - 21:13 नवीन
आर्यन हे नाव ही तसेच.तद्दन फिल्मी नाव वाटते ते. कार्तिक आर्यन चे मूळ आडनाव तिवारी आहे पण तिवारी हे अगदीच गरीब नाव वाटत असल्याने त्याने ते आर्यन असे बदलले.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 04/08/2021 - 11:47 नवीन
नावाचा गुटख्याचा पाऊच प्रसिद्ध होता.अल्पशिक्षित लोक त्याला आयर्न म्हणायचे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/07/2021 - 08:57 नवीन
फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. याच बरोबर हे देखील समोर आले की स्वतः मार्क झुकरबर्ग हा व्हॉट्सअ‍ॅप न वापरता सिग्नल मेसेंजर वापरतोय. :))) ========================================================================= करोनामुळे सामान्य जनतेची पार पुंगी वाजली असुन त्यांच्या नोकरी धंध्याचा पार बाजार उठला असुन अनेक जण आयुष्यातुन उठले असुन अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मध्यम वर्ग पिचला गेला असुन येणार्‍या काळात समाजातील मोठ्या वर्गाची आर्थिक परिस्थीती अजुन खालावली जाणार आहे ! :( जाता जाता :- परवाच माझ्या पेक्षा वयाने मोठा असलेल्या सोसायटी मधील मित्राची बायको भेटली. [ मी आणि बायडी बाहेरुन घरी परत येत असताना. ] माझा तो मित्र हॉटेल लाइन मध्ये आहे. ती म्हणाली तो ८ महिने घरी होता आणि या काळात त्याला पगार मिळाला नाही, तीचा मुलगा कॉलेज मध्ये आहे त्याचा शिक्षणाचा खर्च आणि घर चालवण्याच्या खर्चात बचतीचे जवळपास सगळे पैसे उडाले. आता हा परत मिनी लॉकडाऊन, ती म्हणाली या महिन्याचे वाण सामान देखील देखील तीला टाकता आले नसुन असे कुढत जगण्या पेक्षा एक प्रलय येउन त्यात जाउन कायमचे सुटलेले बरे. :( माझ्या माहितीत असलेल्या अनेकांची अवस्था अतिशय कठीण झालेली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mera Saaya Saath Hoga... :- Mera Saaya
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/07/2021 - 15:21 नवीन
हाॅटेल लाईन, कपडे, भांडी, ह्या व्यवसायांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे ... इतर राज्यांत जर ही परिस्थिति नसेल तर, ह्या गोष्टीला, महाराष्ट्र सरकारच जबाबदार आहे...
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/07/2021 - 09:59 नवीन
महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लसीकरण सुरू आहे आणि येत्या 3 दिवसांनंतर लशींचा तुटवडा होणार आहे. दुसरीकडे अदर पुनावाला म्हणतायेत जूनपासून लसी पुन्हा एकदा एक्स्पोर्ट करू शकतो ... काय कळेना झालंय .. भारतीय नागरिकांना द्यायच्या आहेत की नाही केंद्राला ? नेमका प्रॉब्लेम कुठे आहे ? घोडं अडलंय कुठे ? मुक्ता चैतन्य (फेबुवरुन साभार)
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 04/07/2021 - 15:50 नवीन
केंद्रीय मंत्री यावर काय म्हणत आहेत पहा- https://timesofindia.indiatimes.com/india/deplorable-centre-slams-maharashtra-some-other-states-for-spreading-panic-about-vaccine-availability/articleshow/81952792.cms
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/07/2021 - 18:23 नवीन
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे स्टेटमेंट बेजबाबदार आणि संकुचित वृत्ती चे आहे.देशाचे आरोग्य मंत्री स्वतःची जबाबदारी टाळू शकत नाहीत. राज्यांना टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याचे राजकारण केंद्रीय आरोग्य मंत्री करत आहेत. महाराष्ट्रात देशभरातील करोड लोक राहत आहेत देशातील सर्व राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची संख्या महाराष्ट्रात देशेतील बाकी राज्यांपेक्षा अती प्रचंड आहे. त्या मुळे विविध राज्यातील corona badhit- महाराष्ट्रात महाराष्ट्रात येत असल्या मुळे इथे corona जास्त वाढत आहे. देशातील लोकांना रोजगार देणे ही केंद्राची जबाबदारी आहे ती जबाबदारी महाराष्ट्र ला निभवावी लागत आहे. अनेक देशातून अनेक प्रकारचे covid चे विविध strain mumbai maharashtra मध्ये च प्रवासी लोकांमुळे आले आहेत. बाहेरच्या देशातून दुसऱ्या राज्यातील लोक येत आहेत ती पण मुंबई मध्येच उतरून नंतर त्यांच्या राज्यात जात आहेत. केंद्राला जे सर्व माहीत नसेल तर धन्य ते केंद्र सरकार. आणि धन्य ती bjp जी मेलेल्या माणसाच्या टाळू वरचे लोणी खाण्याचे राजकारण करत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 04/07/2021 - 18:55 नवीन
नेहमीप्रमाणे बिनबुडाचा प्रतिसाद. कोण संकुचित वृत्तीचं आहे ते तर लपूनच नाही.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि गुरुवार, 04/08/2021 - 05:32 नवीन
मायबोली या संकेतस्थळावर हे व इतर काही नेहेमी बाहजपाच्याविरुद्धा लिहीत असत. आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याच्या आरोपावर हे सर्व गप्प आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 04/08/2021 - 19:38 नवीन
आदर भाऊ त बोलले की अमरिका अन युरोप न कच्चा माल थांबवला, आता लशी काय बनत नै म्हणून? https://www.loksatta.com/desh-videsh-news/serum-institute-ceo-adar-poonawalla-said-us-europe-hold-back-raw-material-for-vaccine-pmw-88-2439824/ नमोजी साहेबांनी उगाच सगळीकडे लशी पाठविल्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/07/2021 - 15:55 नवीन
देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट... https://www.loksatta.com/desh-videsh-news/sachin-vaze-writes-letter-to-nia-alleges-anil-deshmukh-anil-parab-asked-him-to-extort-money-bmh-90-2438888/ ह्या चौकशीतून अजून काय काय बाहेर येईल, ते सांगता येत नाही...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/07/2021 - 18:26 नवीन
मीडिया रिपोर्ट गंभीर पण घ्यायचे नसतात . मीडिया रिपोर्ट सत्य स्थिती पासून खूप दूर असतात .. त्या मुळे न्यूज वाले काय सांगतात ते गंभीर पने घेण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 04/07/2021 - 18:58 नवीन
डोळे उघडून बातमी वाचा, मग कळेल कुणी तसा दावा केलाय. मीडियाचा काय संबंध?
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 04/07/2021 - 21:06 नवीन
> “२०२० मध्ये मला पोलिस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू. त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला नागपूरमधून फोनवर सांगितलं होतं. या कामासाठी देशमुख यांनी मला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा दावा वाझे यांनी पत्रात केला आहे. हे वाचून प्रचंड धक्का बसला. फवारांच्या मत्परिवर्तनाची किंमत फक्त २ कोटी रूपये ? बारामतीत इतकी कठीण परिस्थिती ? लोक तर ह्यांना अखिलकोटी ब्रह्मांडनायक समजत होते.
  • Log in or register to post comments
ल
लिओ Wed, 04/07/2021 - 18:46 नवीन
मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे.
एक व्हिडिओ लिंक देत आहे वेळ असेल तर नीट ऐका. २ पैसे जास्त खर्च करुन जर गरजु आणि गरिबाला अन्न मनरेगातुन मिळत असेल, आणि हिच योजना नफा आणि तोटाच्या पट्टिवर मोजायची असेल तर, २०१४ नंतंरची सद्सद् विवेकबुध्दीची व्याख्या पुन्हा शोधावी लागेल https://www.youtube.com/watch?v=6UB9pdhLCiw
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 04/07/2021 - 21:02 नवीन
एकाचे पैसे चोरून दुसऱ्याला रोटी देण्याचे धंदे जास्त दिवस चालत नाहीत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/07/2021 - 22:20 नवीन
संपत्ती ची हक्क मूलभूत हक्क नाही सरकार कधी पण तो हक्क नाकारू शकते.सरकारी सार्वजनिक यंत्रणा,कायदे,सुविधा ह्याचा फायदा घेवून च संपत्ती निर्माण केली जाते. ह्या सर्व यंत्रणाच फायदा न घेता एक रुपया सुद्धा कोणी कमवू शकत नाही त्या मुळे माझी संपत्ती हा प्रकार अस्तित्वात नसतो जो पर्यंत मान्यता आहे तो पर्यंत ती संपत्ती व्यक्ती ची असेल. सार्वजनिक कोणत्याच सुविधा ,यंत्रणा ह्यांचा फायदा घेवू नका ,अगदी बाजाराचा सुद्धा फायदा घेवू नका आणि संपत्ती कमवा मग ती तुमची संपत्ती नाही तर नाही . कोणती ही खासगी मालमत्ता समाज हित साठी सरकार ताब्यात घेवू शकते . आता कोविद काळात खासगी हॉस्पिटल ताब्यात घेण्याचा सरकार ल पूर्ण अधिकार आहे .एका आदेश नी सरकार ती ताब्यात घेवू शकतात.. आणि जागतिक प्रतेक देशातील सरकार नी तो अधिकार कधी ना कधी वापरलेला आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/07/2021 - 21:00 नवीन
गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी असताना गुजरात ला करोना डोस 80 लाख आणि महाराष्ट्र ची लोकसंख्या गुजरात पेक्षा जवळपास दुप्पट 12.30 कोटी असताना करोना डोस 85 लाख याचा अर्थ काय? महाराष्ट्राला जास्तीची लस देणार नाही, gst चे पैशे पण देणार नाही , निधी राज्याला नाही तर देशाला देणार.. lock down करू नका म्हणून पण ओरडणार , केस वाढल्या की तिकडून पण बोंबा मारणार. हा कोणालाच नीच पणा वाटत नाहीये का? जेंव्हा मागे भारतात केसेस वाढल्या तरी त्याला जवाबदार मोदींना मी तरी धरले नव्हते, ना कि करोना मुळे अर्थ व्यवस्था वाईट असताना वाढवलेल्या पेट्रोल वर पण करोना मुळे मी चूक नाहीच हे मत दिलेले.. पण दुटप्पी भूमिका का?
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 04/07/2021 - 21:20 नवीन
जावडेकर मात्र वेगळा आकडा (१ कोटी+) सांगत आहे:

Maharashtra Govt should not play politics over vaccination. Here are the facts: Total number of COVID vaccine supplied to State till date
- 1,06,19,190 ;
Consumption - 90,53,523 (of which 6% wastage - over 5L)
Vaccine in pipeline - 7,43,280. Dosage available - nearly 23 lakhs

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 7, 2021
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/08/2021 - 03:38 नवीन
कालपासुन न्यूज पाहतोय, मला वाटते त्या हि बंद कराव्यात.. पुर्ण मराठी न्यूज चॅनेल वरती - साताऱ्यात लसी संपल्या, पुण्यात ३ दिवस पुरेल असा च फक्त साठा.. मुंबईत चार दिवस पुरतील एव्हड्याच लसी.. मग या न्यूज चॅनेल फेक न्यूज देत असतील तर त्यावर बंदी का नाही? अशीच एक न्यूज.. https://www.hindustantimes.com/india-news/not-enough-covid-19-vaccine-doses-in-state-maharashtra-health-minister-tope-101617779106802.html --- बरं आपण मान्य करू व्यवस्थित लस येतायेत केंद्राकडे.. जसे जावडेकर म्हणतायेत ते मान्य करू.. पण बाकीचे काय, Gst चे पैसे लवकर द्यायचे नाही.. Pm care ला पैसे टाका म्हणुन पण सांगायचे.. Lockdown केला तरी ओरडायचे.. आणि cases वाढल्या तरी ओरडायचे.. हे सुद्धा दुटप्पी पणा नाहीये काय? बाकी काय बोलू.. माझे म्हणणे इतकेच आहे, जेथे जास्त गरज तेथे जास्त लस पाठवाव्यात.. आणि विरोधकांनी राजकारण करू नये.. सत्ता कोणाचीही असो त्याला साथ द्या..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/08/2021 - 03:46 नवीन
Lockdown मला वयक्तिक रित्या फालतू गिरी वाटते.. हे माझे म्हणणे गेल्या वर्षी हि सेम होते आणि या वर्षी हि.. ते का तसे वाटते मला तर लिहितोय... माझे म्हणणे आहे, lockdown हे या साठी पाहिजे कि सरकार ने त्यांच्या कडे असलेल्या सोई सुविधा, सेवा यांच्यात managment करायला, त्याला वाढावायला पुरेसा वेळ मिळावा म्हणुन या lockdown चा वापर करावा.. पण असल्या कसल्याही गोष्टीं न करता lockdown म्हणजे साखळी तोडण्याचे हत्यार असे समजुन एका नंतर एक लॉक डाऊन करने काहीच फायड्याचे नाही.. त्यामुळे केंद्राने केलेले मागाच्यावेळेस आणि राज्याने केलेले आता दोन्ही lockdown मला योग्य वाटत नाही.. जर या lockdown नंतर हि गेल्या वर्षी सारखे आपण आपल्या आरोग्य सेवा सुविधा व्यवस्थित व्यवस्थित वाढवू शकलो नाही तर असे हजार lockdown पण व्यर्थ आहेत करोना रोखायला.. हे माझे वयक्तिक मत आहे.. कोणाला नसेल पटत तर सोडून द्यावे.. पण मोदी नी केले कि बरोबर आणि उद्धव किंवा आघाडी ने केले कि चूक असला दुटप्पी पणा माझ्याकडे नाही..
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 04/08/2021 - 04:09 नवीन
मोदींनी केलेला lockdown हा गरजेचा होता, कारण त्या वेळी करोना बद्दल जास्त माहिती नव्हती. PPE किट नव्हते तर टेस्टिंग ची सुविधाही नव्हती. गेल्यावर्षी सोलापूर , उस्मानाबाद इत्यादी ठिकाणी चा एखाद्या करोना संशयिताचा swab हा सोलापुर हुन पुण्याला यायचा तेही जर तो दुपारच्या आदी घेतला तर,नाहीतर तो दुसऱ्या दिवशी पुण्यात जायचा. पुण्यातही जास्त लॅब नव्हत्या. रेपोर्ट येण्यात कमीत कमी 3 दिवस जायचे. साध्याला अशी परिस्थिती नाही, अगदी एका दिवसात रिपोर्ट येतो. अत्ता लसीकरणाची प्रक्रिया ही चालू आहे, त्यामुळे अत्ता lockdown गरजेचा वाटत नाही. लसीचा खरोखरच तुटवडा चालू आहे, माझ्या गावाकडे गेल्या 3 दिवसांपासून लस नाही म्हणून लोकांना माघारी पाठवत आहेत, आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटतेय की काल आपल्या आरोग्य मंत्र्यांनी आपल्या राज्यात फक्त 3 दिवस पुरेल इतकाच साठा आहे आस सांगितलंय परंतु राज्याच्या काही भागात गेल्या 2-3 दिवसांपासून लसीचा तुटवडा चालू आहे. याचाच अर्थ लस उपलब्ध आहे पण तिचे ग्रामीण भागात योग्य वितरण योग्य नाही. कदाचित मुंबई , पुणे नागपूर साठी डोस साठवून ठेवले असतील.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/08/2021 - 04:41 नवीन
मोदींनी केलेला पहिला lockdown एकवेळ ठीक मानू नंतर तो जो वाढवला तो चुकीचाच.. पहिल्या lockdown लावण्याच्या वेळा याबद्दल बरेच दा चर्चा झाली आहे, ते नाही करत.. मोदींनी केलेला बरोबर आणि आता चुकीचा असले काही नाही.. Lockdown म्हणजे साखळी तुटण्यासाठी केलेले आहे हे किती चुकीचेच आहे हे सर्वांना माहित आहे.. तबाकी गावाकडे तुटवडा आहे हे नशिब सांगितले, कारण न्यूज खोट्या आहेत आणि जावडेकर खरे बोलतायेत असे वाटलेले मला.. टोपे म्हणत आहेत, पुण्या मुंबई मध्ये तीन दिवस पुरेल येव्हडाच साठा आहे, सातारा हे पुण्या पासून जवळ आहे तेथे हि साठा संपला आहे.. कदाचीत शहरी भागाला जास्त साठा allocate केला असेल कारण तेथे जास्त लोक घनता आहे.. माझे मुळ म्हणणे हे आहे. केंद्र, राज्य फलाना राजकारण करू नका.. केंद्राने महाराष्ट्राला अतिरिक्त साठा द्यावा.. आणि नसेल तर ते मान्य करा.. यात कोणी लगेच अपराधी तुम्ही म्हणत नाहीये... पण राज्य सरकार कसे बेजबाबदार हे दाखवण्यात काय हाशील? जसे मोदी जनतेसाठी करतात तसेच इतर हि करत आहेत.. कोविड मुळे ना मोदींना ना उद्धव ला ना कोणालाच लोकांना मरायला सोडायचे आहे असे वाटत नाही.. राजकीय मते वेगळी असतील हि, पण म्हणुन लोकांना कोणी मरू देणार नाही.. पण आताचे राजकारण पाहता.. Lockdown लावले तरी चूक.. करोना केसेस वाढल्या तरी चूक.. पैसे pm care ला द्या.. लसी केंद्राने दिल्यात.. राज्य सरकार चूक हे सगळेच मला चूक वाटत आहे.. मिळून लोकांचे आयुष्य वाचवन्यात सरकार लक्ष देत असेल असे मानतो. आणि आधी वितरणात तूट असेल तर ती भरून काढून जिथे जास्त गरज तिथे जास्त लस असे समीकरण निदान ठेवले जाईल हि अपेक्षा बाळगतो.. असो..
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 04/08/2021 - 19:42 नवीन
लस द्यायची नाही म्हणून!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/08/2021 - 06:24 नवीन
Lockdown मला वयक्तिक रित्या फालतू गिरी वाटते.. जगात एवढे घडतंय तरी आपण हे म्हणता याचे वाटले ..आश्चर्य .. लोकडवून कधी करावा कसा किती प्रमाणात याबद्दल मतभेद असू शकतात पण हा एक उपाय म्हणून विचारच करायचा नाही कि काय? खालील ३ गोष्टी गृहीत धरून पुढे प्रतिसाद देतो १) करोना हेच थोडांत आहे असे काही आपले मत नसावे ...फक्त त्यावर चाल्लेलले उपाय यावर आपण बोलत आहात २) यात राजकरण जरा बाजूला ठेवत आहोत ३) लोकडोवन चे २-३ प्रकार गृहीत धरुयात, जमावबंदी, प्रवास बंदी आणि प्रवासानंतर गृहबांदी ( हॉटेल QUARANTINE ) तर जमावबंदी हा अनेक पैकी एक उपाय कुचकामी आहे असे आपले म्हणेन दिसतंय परंतु तो आपण म्हणता तसा अगदि कुचकामी "नसावा" आपण खालील गोष्ट पण जरा विचारात घ्या - कोणताही साथीचा रोग संपर्क द्वारे पसरतो म्हणून संपर्क कमी करणे हा उपाय जगभर वापरला जातोय - खूप लोकसंख्या आणि जिथे " प्रत्यक्ष गेल्याशिवाय बरीच कामे होत नाहीत " अशी परिस्थिती असेललाय भारतासारख्य देशात वरील बंदी एकीकडे अवयषयक पण आहे आणि ती राबवणे हे पण जास्त अवघड दोन्हि नाही का? - "बंदी " नको असे धोरण सुरवातीला राबवलेल्या स्वीडन सारख्या देशाचे काय झाले ! - रोग फार झपाट्याने पसरलं तर उपचार यंत्रणेवरील भार सांभाळता येणार नाही म्हनुन तो मुळातच पसरवू दयायचा नाही हि रणनीती जगभरचे "हेल्थ डिपार्टमेंट चे तज्ज्ञ वापरात आहेत ते सगळेच चुकीचे ? - परदेशातून आलेल्या परंतु निरोगी असेल्यालनवार सक्तीची केलेली हॉटेल QUARANTINE.. उदाहरण देतो : माझ्य देशातील राज्यात गेली काही महिन्यात झालेल्या रोगप्रसारापैकी जवळ जवळ ९०% हे "परदेशी प्रवासी " होते १०% फक्त स्थानिक प्रसारण .. आता सांगा हे जर हॉटेल QUARANTINE सक्तीचे नसते तर या लागण झालेल्या लोकांनी अजून रोग पसरवलं नस्ता का? जगभर लोकडवून चा त्रास सगळ्यांना होतोय फक्त भारतात नव्हे पण केवळ आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे याला विरोध करणे कितीपत यौग्य आहे? प्रत्येक देशात वेगळे प्रश्न असतात हेच बघा कसा विरोधाभास भारत लशीकरण बऱयापैकी हाताळलं जातंय पण रोग प्रसरण आटोक्यात नाही ऑस्ट्रेलिया: रोग प्रसारण जास्त आटोक्यात पण लशीकरना डगमगतंय ...सरकार म्हणताय यूरोप ने लक्ष पाठवली नाही आणि स्थानिक लास उत्पादनाला वेळ लागतोय .. अमेरिकेत पण सध्या तरी लशीकरण बऱयापैकी हाताळलं जातंय पण रोग प्रसरण आटोक्यात नाही
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/08/2021 - 08:28 नवीन
@चौकस सर, माझे मत तसे का हे हि त्या वाक्याखाली लिहिलेले होते
माझे म्हणणे आहे, lockdown हे या साठी पाहिजे कि सरकार ने त्यांच्या कडे असलेल्या सोई सुविधा, सेवा यांच्यात managment करायला, त्याला वाढावायला पुरेसा वेळ मिळावा म्हणुन या lockdown चा वापर करावा.. पण असल्या कसल्याही गोष्टीं न करता lockdown म्हणजे साखळी तोडण्याचे हत्यार असे समजुन एका नंतर एक लॉक डाऊन करने काहीच फायद्याचे नाही..
करोना थोतांड नाही हे माझे हि मत आहे.. तुम्ही सर्व लिहिलेले बरोबर आहे.. पण फक्त lockdown करणे हे चूक नाही का? Lockdown म्हणजे साखळी तुटते का? टाळ्या वाजवून बाजूला अंतरनाद होऊन करोना मरतो का? थाळ्या वाजवून कोणत्या dr. चे कौतुक होते का? Cosara सारख्या नव्या कंपनीच्या kit साठी वेळ घालवून इतर कंपनीला त्यापासून वेळ लावण्यात काही अर्थ होता का? त्यामुळे आरोग्य सुविधा वाढवणे हेच lockdown मध्ये सरकारला करता आले पाहिजे ते नाही केले तर अशी १००० lockdown काय कामाची असे ते पुर्ण वाक्य आहे माझे.. तुम्ही अर्धेच घेऊन लिहले आहे. जर lockdown मुळे करोना आटोक्यात येत असेल तर ती चूक आहे.. मोदी नी केला तेंव्हा हि माझे हे मत होते तेंव्हा मी मोदीविरोध करतोय असे म्हंटले गेले आता मी हेच बोलतोय तेंव्हा हि राजकारण वाटत आहे.. पण खरेच माझे हे मत राजकीय पक्ष बघुन नाही.. मला माहित आहे, अजूनही lockdown मोदी यांनी केला तर लोक त्याला पाठींबा देतील.. किंवा महाराष्ट्रामुळे असे करावे लागले अशी दुषणे देतील.. पण आपली मते चूक असु शकतील कदाचीत पण ती पक्ष नेते बघुन बदलतात का हे प्रत्येकाने बघावे.. माझे हे मत राजकीय नसून सामाजिक पद्धतीचे आहे.. असो.. माझे मत चूक असु शकेल पण त्यात राजकारण नाहीये.. खरेच फक्त lockdown ने साखळी तुटत नाही.. हॉस्पिटल, खाटा, आरोग्य विषयक किट्स, ज्ञान, लस अश्या अनेक गोष्टी जास्त लोकांसाठी तयार करायला वेळ मिळावा म्हणुन lockdown असावा, ना कि साखळी तुटते म्हणुन.. Lockdown हे करोना ला थांबवू शकत नाही... असो.. राग लोभ नसावा.. माझे म्हणणे नक्कीच जास्त विरोधी नाहीये
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/08/2021 - 09:49 नवीन
१) टाळ्या वाजवून बाजूला अंतरनाद होऊन करोना मरतो का? २) थाळ्या वाजवून कोणत्या dr. चे कौतुक होते का? हे कुठं यात.. आपण फक्त लाकडाउन उपायांबद्दल बोलतोय ना? पण आपण हा विषय काढलातच म्हणून १) "टाळ्या वाजवून " नक्कीचं नाही मरत..केवळ एक सामूहिक मनोबल वाढवण्यास मनुष्य असे काहीतरी सार्वजनिक करीत असतो .. २) "थाळ्या वाजवून" अरे बापरे .. अहो ते ते केवळ प्रतीकात्मक होता हे का कोणी लक्षात घेत नाही ? वैद्यकीय काम करणाऱ्यांना धन्यवाद म्हणून... आणि केवळ भारतातच नाही तर इतर देशात हि असे सार्वजनिक प्रतीकात्मक केलं गेले..जसे मूक मोर्चे किंवा काळ्या फिती किंवा ठराविक रंगाच्या गोष्टी एकाचवेळी सर्वांनी परिधान करणे ई... माफ करा गणेश पण हे घंटानाद वैगरे वरून एकूण जी चेष्टा लोक करातात ना ते हा यातील मुळ मुद्दा ना लक्षात घेता केवळ "या सरकारने" सांगितले म्हणून चेष्टेचा विषय राजकीय हेतूने प्रेरीत होऊन केलेलि केवल टिका वाटते ( अप्लाय मनात नसेल तसे कदाचित ) असो तर लाकडाउन ने साखळी तोडली जाते का.. मी जे अनुभवलंय त्यात हो असे म्हणणे इस्टर ला येथे ४ दिवस एकूण सुट्टी असते त्यामुळे प्रवास वाढतो .. + शाळेला सुट्ट्या ... त्याआधी परत रोग पसरला होता ( २० लाख शहरात १३- २० रुग्ण ) तरी राज्य सरकरने येथे हे शार ३ दिवस लोकडोवन मध्ये ठेवले.. फायदा झालाच .. येथे हे मला नमूद केले पाहिजे कि येथे आरौग खाते २ प्रकारचं रोग पसरनायबद्दल लक्ष ठेवून आहे १) आंतरराष्ट्रीय प्रवासी कि ज्यांच्यावर १४ दिवसाचं हॉटेल QUARANTINE मुले सहज रित्या लक्ष ठेवता येते २) स्थानिक रोग प्रसार ज्याचे स्तोत्र सापडत नाही यातील क्रमांक २ च्या साथीला सरकार जास्त घाबरून आहे, कारण उगम दिसत नाही भारतात कदाचित आता एकूणच इतकं हाताबाहेर जातंय कि कुठलेच उपाय लागू होतं नसावेत .. पण म्हणून सरसकट जगात लोकडॉन हे शस्त्र उपयोगी नाहि असे म्हणू नये एवढेच ..
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 04/08/2021 - 08:25 नवीन
लस अन औषध फरक असतो. हा आरोप तेव्हाच मान्य असता, जेव्हा औषध अस्ते ;) १५ मार्चपासुन केंद्र सरकार ओरडत होते, की कोरोना वाढतोय, गर्दी कमी करा. पण नाही. आता काय कप्पाळ फोडुन ओरडायच? अन जीएस्टीचे पैसे घेउन काय महाराश्ट्र सरकार पैसे वाटणारे का जॉब गेलेल्यांना?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/08/2021 - 10:50 नवीन
गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी असताना गुजरात ला करोना डोस 80 लाख आणि महाराष्ट्र ची लोकसंख्या गुजरात पेक्षा जवळपास दुप्पट 12.30 कोटी असताना करोना डोस 85 लाख उत्तर प्रदेशची लोकसंख्या २३ कोटी, पण डोस मिळाले फक्त ७६ लाख (म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मे). राजस्थानची लोकसंख्या ८ कोटी, पण डोस मिळाले ७८ लाख (म्हणजे महाराष्ट्राच्या दीडपट).
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/07/2021 - 22:27 नवीन
देश संकटा तून जात असताना सुद्धा नीच राजकारण bjp करत आहे ,ह्यांचे आरोग्य मंत्री अत्यंत फालतू स्टेटमेंट देत आहेत महाराष्ट्रात bjp अत्यंत नीच राजकारण खेळत आहे..लोकांना सर्व समजत आहे अंध भक्त अंध च असल्या मुळे त्यांना काही दिसण्याचा प्रश्न च नाही . भारतीय लोकांनी एवढे नीच राजकारण पहिल्यांदाच पाहिले आहे . कधी एकदा लोकसभेच्या निवडणुका होतात आणि ह्या राष्ट्र द्रोही पक्षाचे सरकार हाकलून देतो असे जनतेला झाले आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/07/2021 - 22:35 नवीन
जे धागे काढले जात आहेत ते सर्व अंध भक्त काढत आहेत . चालू घडामोडी म्हणजे मोदी साहेबांचा उदो उदो आणि bjp चे गुणगान करणे हाच अंतर्गत हेतू ह्या लोकांचा आहे मी bjp अंध भक्त नाही असे सांगायचे आणि त्या नंतर फक्त सत्य स्थिती शी विपरीत दावे करून bjp च प्रचार करायचा हा उद्योग येथील ठराविक आयडी करत आहेत... बाकी लोकांनी अशा धाग्या पासून लांब च राहवे ..ह्या अंध भक्तांना आपसात च चर्चा करू ध्या.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/09/2021 - 12:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/09/2021 - 12:50 नवीन
कोविड रोग आटोक्यात आणण्यात आलेले राज्य सरकारचे अपयश, हे सगळे विषय चर्चेला आणले तर, त्यात सामान्य माणसाचा काय दोष आहे? मुळात, पोलीसांना आणि साधूंना त्याच वेळी संरक्षण देणे, ही राज्य सरकारचीच जबाबदारी होती... कोविड पसरू नये ह्यासाठी, योग्य ती खबरदारी घेणे, ही पण राज्य सरकारचीच जबाबदारी आहे...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/08/2021 - 00:33 नवीन
https://www.loksatta.com/nagpur-news/27-show-cause-notice-to-deepali-abn-97-2439186/ ह्या राजवटीत, अजून काय काय बघायला मिळेल, कुणास ठाऊक?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/08/2021 - 04:56 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/union-health-minister-harsh-vardhan-targets-maharashtra-government-on-vaccine-shortage-pmw-88-2439004/ इतर राज्यांपेक्षा, महाराष्ट्राची परिस्थिति गंभीर आहे...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/08/2021 - 05:41 नवीन
डॉ. हर्षवर्धन योग्यच बोलत आहेत. गेले एक वर्ष राज्य सरकारला आरोग्य सेवासुधारण्याची संधी होती. पण बराचसा वेळ नट-नट्यांवर टिपण्णी करणे, उखाड दिया वगैरे.. ज्यात काडीचेही ज्ञान नाही अशा चीन-पाकिस्तान/कश्मिर विषयावर बोलणे/बेळगाव सीमा प्रश्न ह्यात सरकारच्या मंत्र्यांचा वेळ गेला. बाकीच्या राज्यांचे मंन्त्री वर्षभर मान खाली घालुन काम करत असताना महाविकास आघाडीचे मंत्री नको त्या कारणांसाठी हेडलाईन्समध्ये होते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/08/2021 - 05:49 नवीन
राज ठाकरे यांनी एक प्रश्र्न विचारला आहे की, उद्धव ठाकरे यांच्या हातमध्ये राज्य आलंय, की, त्यांच्यावरती राज्य आलंय?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा