लोकप्रतिनीधींची निवृत्ती आणि नवे नियम
भारतीय समाजात लोकप्रतिनीधी हा आता समाज कारणापेक्षा व्यवसाय या गटात मोडायला लागला आहे.
यात चुकीचे आहे असे नाही. मात्र आपले लोप्रतिनीधी हे नोकरी असावी तद्वत पेन्शन घेतात. यातही गैर वाटू नये.
मात्र एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. या लोकप्रतिनीधी सेवाशर्तीचे काहीच नियम अटी लागू नाहीत. उदा : निवृत्तीचे वय किमान शिक्षण आर्थीक निकष , उत्पन्न गट वगैरे.
बाकी लोकप्रतिनीधी सोडले तर तर बहुतेक सर्व वेतन भोगी पदांना हे नियम लागू आहेत. लश्करप्रमूख ( सेना प्रमूख) , सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश या सर्व पदांना हे नियम लागू आहेत. इतकेच काय पण राष्ट्रपतीपदाला देखील दोन च वेळा होता येईल अशी अट आहे.
लोकप्रतिनीधी हे जर नजतेचे सेवक म्हणवत असतील तर त्यांना काही नियम लागू असावेत असे वाटते. त्या नियमांमुळे भारतीय राजकारणात एकदम अचानक क्रांती घडेल असे नाही. पण बदलांस सुरवात होईल हे नक्की. उदा : नव्या विचारांना वाव मिळेल, तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळेल, जातीपातीच्या संकुचीत विचारातून राजकारन बाहेर येईल इत्यादी.
माझ्या मते काही नियम असे असू शकतात.
१) लोकप्रतिनीधीला कोणत्याही निवडणुकांसाठी ( जिंको अथवा हरो) फक्त दोनच वेळेस उभे रहता येईल.
२) एखादे पद मिळाले तर त्याच्या कार्यकालाचे ऑडीट जनतेस जाहीर करावे लागेल.
३) एकच निवृत्ती वेतन चालू राहू शकेल.
४) वयाच्या सत्तरी नंतर कोणत्याच निवडणूकीसाठी उभे रहाता येणार नाही
५) एकापेक्षा जास्त जागांवरुन निवडणूक लढवता येणार नाही.
६ ) युती / पक्ष हे निवडणुकीच्या अगोदर निवडणूक आयोगाला साम्गावे लागेल. आणि निवडून आल्यानंतर किमान एक वर्ष त्यात बदल करता येणार नाही.
तुम्हाला काय वाटतय या नियमांमुळे काय बदल घडतील राजकारणात
सेना ही भूमिपुत्र च्या हक्कासाठी लढणारी संघटना आहेहसून हसून पोट दुखलं.