शब्द आणि सूर
कदाचित शब्द निरर्थक ठरले नसतील
पण ते पोचले नाहीत त्या अंतापर्यंत
काही ओळी ओसाड पडल्या खऱ्या
पण त्यांना तर वाटाच नाही सापडल्या
म्हणूनच तर मनातल्या पर्णरेखांना
डायरी जवळची वाटली
कारण त्यांना माहित आहे
मनातून उमटलेल्या सुरांचा प्रवास
चालू असतो निरंतर .....
💬 प्रतिसाद
J
Jayagandha Bha…
Wed, 11/25/2020 - 06:51
नवीन
मस्तच...
- Log in or register to post comments