दि. १३ सप्टेंबर चे मुख्यंत्री ठाकरे जी यांचे भाषण
काल मुख्यमंत्री ठाकरे जी यांनी जनतेसाठी भाषण केले ते तुम्ही सर्वांनीच पाहिले ऐकले.
ते काल जे बोलले त्यात काहीच ठोस असे काहीच नव्हते.
त्यांच्या भाषणात ओज कधीच जाणवत नाही. भाषणातला साधेपणा आवडायचा . त्यात सच्चेपणा वाटयचा.
काल जे जाणवले ते म्हणजे या पूर्वी ते इतके अगतीक होऊन कधीच बोलले नाहीत.
अर्ध्या तासाच्या त्यांच्या भाषणात महाराष्ट्राला भेडसावणारे प्रश्न / कोविड रुग्णांना होणारी खाटांची गैरसोय. याबद्दल ते काहीच बोलले नाहीत.
सरकार चे खरे प्रयत्न काय चालू आहेत याबद्दल संदिग्ध अवस्थेत ठेवले.
दुसरे म्हणजे काल त्यांच्या भाषणातुन जे जाणवले ते हे की हे मराठा आरक्षण चिघळेल चळवळ चिघळेल या भीतिने ते ग्रासले होते.
त्यांचे भाषण ऐकून तुमचे काय मत आहे ते सांगा. साधकबाधक पण निकोप चर्चा होऊ देत.
त्यांचे संपूर्ण भाषण या इथे सापडेल
उद्धव ठाकरें जी ची प्रशासनावर पक्कड सुटली आहे हे जाणवले.
घरी बसून काम करणे ही कदाचित त्याची तब्येतीमुळे मर्यादा असू शकेल मात्र त्या ऐवजी शिवसेनेचा एखादा चांगला प्रतिनिधी पाठवता आला असता.
ठाकरे जी ची ना त्यामुळे ग्राउंड रिपोर्ट सहज मिळु शकतो. प्रशासकीय अधिकार्यांना त्यांचा धाक ही बसू शकतो
आश्चर्य याचे वाटते की शिवसेनेला त्यांच्या पक्षात एकही लायक मंत्री/ सदसय मिळू नये.
विरोधी पक्षात असताना देखील वाजपेयी नी नरसिंह रावांच्या विनंतीला आणि देशाच्या त्या वेळच्या गरजेला ओळखून सहकार्य केले होते
सेनेला स्वतःच्या पक्षात असा कोणीच नेता गवसू नये हे नवल आहे पण इतर पक्षातही जनतेशी थेट संपर्क साधेल असा कोणीच मित्र मिळू नये यात उद्धव ठाकरें जी यांच्य मर्यादा समजून येतात.( खरे तर हे काम आदित्य ठाकरे जी ही करू शकले असते. )
कालच्या भास्।अणातून एकूणच असे चित्र समोर येतेय की शिवसेनेचे सगळेच मंत्री जनतेसमोर येत नाहिय्येत. केवळ राऊत आक्रस्ताळी भाषणे ठोकताहेत. उद्धव ठाकरे जी अगतीक होऊन सगळे नुसते पहात आहेत. व्रुद्ध लियर प्रमाणे
महाराष्ट्र मध्ये पाय रोवले. -- पाय रोवले ?? तुमचा अभ्यास दांडगा आहे. तरिही तुमच्या माहितीकरता सांगतो की ज्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनेचा एक ही आमदार नव्हता त्यावेळी भाजपाचे, महाराष्ट्रातील विविध भागातून १४ आमदार निवडुन आले होते. आणि त्यांच्या बरोबर शिवसेना देखील नव्हती.आणि वर काय ढोंग तर " बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली"-- बाळासाहेब कॉंग्रेसबद्दल काय म्हणाले होते, हे कॉंग्रेसी विसरलेले दिसतात. म्हणून अशी विधाने ते करत आहेत. --