शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?
आज सगळ जग डेवलप होतय ,
इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय ,
अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय |
तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय ,
रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय,
दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप ||
असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?
मोठाले यापरी ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात,
देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात |
पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार
न फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, ||
त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास ,
अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास |
आज तोच झाला खाक अन् त्याची स्वप्न झाली राख,
आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक ||
पाणी नव्हत त्याच्या आडात तरी शेती केली जोमात,
शेवटी अवकाळी आला अन् तोंडातला घास घेउन गेला,
हाच तो सुखाचा घास नाही आज त्याच्या पोराच्या पोटात |
त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप,
असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप ||
टिप :
ही कविता मा.बो. वर आधिच प्रकशित आहे , अनिथ या माझ्याच आय डी ने. धन्यवाद.
आता बाकी काही बोलायची गरजच नाही !!त्यासाठीच दिलाय तो प्रतिसाद