Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गुलाबी कागद निळी शाई....1 अनामिक

प
प्राची अश्विनी
Wed, 06/24/2020 - 07:21
💬 12 प्रतिसाद
गुलाबी कागद निळी शाई Hiiii पत्र पाहून आश्चर्य वाटलं ना? गंमत सांगू, मलाही वाटलं. :) कारण शाळेतलं पत्र लेखन संपल्यावर पुन्हा कधी खरंखुरं पत्र लिहिलंच नाही बघ. तसंही बोअरींगच होतं ते. तिथं हमखास मार्कस् जायचे. मराठीच्या मिस् तर छळायच्याच मला. माझे निबंध आणि पत्र भर वर्गात वाचली जायची. लेखन कसं नसावं याचं उदाहरण म्हणून. सगळे चिडवायचे मग. Science घेतलं आणि सुटले त्यातून. ते जाऊदे. तर काय सांगत होते? हं तर तुला लिहिलेलं पत्र. त्याचं काय आहे, तसा तू मला नेहमी भेटतोस. भेटतोस म्हणजे दिसतोस. कँटीनमध्ये, टी कॉर्नर वर. खरं तर मीच तुला रोज बघते. तू पहातोस की नाही माहित नाही. किंवा असं कोणीतरी तुला पहातं हे तर तुझ्या गावी पण नाही. म्हणजे नसावं. नाहीतर काही तरी response दिला असतासच ना तू इतक्या दिवसात??? सगळे माझे मित्र मैत्रिणी मला तुझ्या वरून चिडवतात. आणि तू? मठ्ठोबा नुस्ता. . त्या दिवशी तू म्हणालास, "अरे वा तुम्हाला पण चहा आवडतो का?" इडियट स्ट्युपीड. मी काय चहा प्यायला घुटमळते का तिथे? इतका कसा तू स्वतः मधे गुंग? Anyway, कळतंय का तुला मी काय म्हणतेय ते? तर मला तू आवडतोस. हं. कळलं? तू काही आपणहून कधी बोलणार नाहीस. त्यामुळे शेवटी मीच विचारतेय , येणार का एकदा कॉफी प्यायला? Coffee or tea. हे प्रत्यक्ष विचारायला थोडी घाबरतेय. म्हणजे Not exactly घाबरतेय. तू नाही म्हटलंस तरी चालेल. पण नंतर खूप awkward होईल बोलायला. मला नाही तुलाच. कारण तुझं काही सांगता येत नाही. इतका लाजाळू तू.. एकतर चहाच सोडायचास किंवा प्यून ला सांगून केबीन मध्येच मागवायचास.. मग जेवढी पाच मिंटं भेटायचास किंवा दिसायचास तेही बंद. म्हणून पत्र. No mail or message. कारण कुणी पाठवलं ते कळेल ना पटकन? पत्राखाली मुद्दामच मी माझं नाव नाही लिहिलंय. तसंही ते तुला माहिती असण्याची शक्यता कमीच. माझ्या बद्दल तुला "तसं" जर काही वाटत नसेल तर तू हे पत्र फेकून दे. अगदी बिनधास्त. Problemच मिटला. पण जर... जर... तुला कुठेतरी काही तरी, अगदी इतकुसं का होईना पण काही वाटत असेल ना... तर Catch me if you can .:) तशी एक हिंट दिलीच आहे मी. तुझी.. गुलाबी कागद निळी शाई

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4867 views

💬 प्रतिसाद (12)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/24/2020 - 08:17 नवीन
चालू द्या....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/24/2020 - 08:38 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 06/24/2020 - 08:42 नवीन
सही!! त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत. अभिवाचन निवांतपणे ऐकेन. आता पत्रं वाचण्याची मजा घेते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/24/2020 - 09:17 नवीन
छान !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 06/24/2020 - 12:33 नवीन
पत्र वचले आणि अभिवाचनही ऐकले. दोन्ही आवडले आता उत्तराच्या प्रतिक्षेत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Wed, 06/24/2020 - 13:36 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 06/24/2020 - 15:07 नवीन
सर्वांना धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 06/24/2020 - 15:52 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 06/24/2020 - 16:36 नवीन
वाचतोय, अभिवाचन सुद्धा जरुर करा.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि गुरुवार, 06/25/2020 - 11:40 नवीन
पत्र लेखनाची माझी संवय अजूनही मी जपून ठेवली आहे. माझी पत्रे मित्रांकडे पोहोचल्यावर मित्र विचारतात कि " तुझे पत्र ? अजूनही ? " माझं त्यावर एकच उत्तर असते, " जोपर्यंत भारत सरकार पत्र  ही संकल्पना पोस्टातून बाद करीत नाही तोपर्यंत मी पत्रे लिहून पाठवीत राहणार. " अर्थात आत्मस्तुतीचा दोष पदरी घेऊन लिहितो कि माझे अक्षर सुंदर आहे. कॅलिग्राफीचा शाईचा पेन वापरतो आणि शाईचं लिखाण असते. पोस्टात जाऊन एकदम तीस चाळीस रुपयांची पत्रे विकत घेतो त्यावेळी पोस्टमन सुद्धा माझ्याकडे आश्चर्याने पाहत असतो. माझ्या काही मित्रांनी माझी पूर्वीची पत्रे जपून ठेवलेली आहेत. पत्राने मजकूर कळविल्यास पुढील फायदे होतात. १) माझ्या मनात काय आहे ते सर्वांना कधीही वाचता येते. २) पत्रे घरातील कोणीही ,कधीही वाचू शकतात. ३) पत्रातील मजकूर चांगला असल्यास त्याचा संग्रह केला जातो. ४) गत काळाच्या आठवणी नीट जपून ठेवण्यासाठी पत्रे  हि चांगली सोय आहे. याउलट फोनवर बोलणे केल्यास १) ऐकणारा सर्वच बोलणे सुसंगतीने सांगेल याची खात्री नाही. २) एकदाच बोलले जाते, त्यामुळे सर्वच गोष्टी नेहमीसाठी लक्षात ठेवणे कठीण असते. ३) कोणत्याच प्रकारचा संग्रह करता येत नाही. म्हणून मी अजूनही मित्रांना / नातेवाईकांना पत्र लिहून पाठवीत असतो.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 06/25/2020 - 11:43 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 06/25/2020 - 15:17 नवीन
धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 21 hours ago
  • सुंदर !!
    6 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा