त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?
साधारणपणे दहा-बारा वर्षापूर्वी बेंगलोरमध्येच भाड्याच्या घरात राहत होतो. घराची मालकणी शगुफ्ता नामक (नाव मुद्दामुन लिहिले आहे.वस्सकन अंगावर येऊ नये.)एक स्त्री होती. घराचे डिल होण्याअगोदर तोंडात साखर ठेवुन बोलायची.माझे नुकतेच लग्न ठरले होते.गोड तर इतकी बोलत होती कि मी माझ्या होणार्या बायकोचा व तिचाही लग्नाअगोदर फोनवर संवाद घडवुन आणला.
उदा. भाईसाब आप फिकर मत किजिए. आय विल बी अॅट युअर सर्विस.वगैरे. (हेच वाक्य लक्षात राहण्याचे कारण पुढे येईलच.)
पण जेव्हा घरात राहायला सुरवात केली व अॅग्रीमेंट वगैरे सोपस्कार..त्यापेक्षा बेंगलोरच्या रितिनुसार साधारण आठ-दहा महिन्यांचे आगाऊ भाडे अनामत म्हणुन तिला दिले त्यानंतर तिने खरे रंग दाखवायला सुरवात केली. म्हणजे एकदम विलन न बनता काही छोटी मोठी कामे घरात निघाली तर वो आप ही देख लो हेच पालुपद. ( आय विल बी अॅट युअर सर्विस ची ऐशीतैशी )ह्यात ड्रेनेज लॉक होणे, पाण्याचे मीटर खराब होणे असे काही गंभीर समस्या होत्या. मालकीणीचा चार फ्लॅट असलेला इंडिपेंडंट बंगला होता त्यामुळे बाकिच्या भाडेकरुंशी संवाद साधुन ही कामे करावी लागत आणि भाडेकरुही तिने केवळ अर्थप्राप्ती हा निकष ध्यानात घेऊन ठेवले होते. (बॅचलर्स वगैरे).त्यांना मॅनेज करणे अजुन एक दिव्य होते. ती स्वतः दुसरीकडे राह्त होती मालकीणीचा नवरा चांगल्या कंपनीत कामाला होता व एकदा ती उपलब्ध नसल्याने पाणी न येण्याची एक समस्या त्याच्या कानावर घालुन कृपया हीच निराकरण करा अशी विनंती केली असता घर खाली करण्याची धमकी दिली होती त्यामूळे जपूनच बोलणी करावी लागत. ते असो. पुढे त्या घरातुन दुसरीकडे शिफ्ट झालो तेव्हाही तिने पत्नीचा अप्रत्यक्ष पाणउतारा केला. पत्नी ह्याबद्दल तारतम्य बाळगुन विचार करणारी असल्याने तिने ह्याकडे कानाडोळा केला. पण आज बारा वर्ष होत आली आणि ही गोष्ट अधेमधे आठवत असायची.पण सध्या लॉकडाऊनच्या काळात का कुणास ठाऊक माहीती नाही पण सकाळी उठल्या उठल्या प्रातर्विधी उरकतानाच एकदा तरी आठवत राहते(त्या दृष्टीने प्रातःस्मरणीयच) आणि मनस्थिती लगेच बदलते. थोडक्यात प्रेमभंग झालेल्या प्रेमीसारखी मनस्थिती होते.(!) थोडा बारीक विचार केला असता लक्षात आले कि माझा जो काही पाणउतारा केला तो एकवेळ मी विसरलो असतो पण पत्नीचा केलेला पाणउतारा विसरणे अवघड वाटतेय. ह्याबाबतीत खुद्द पत्नीलाच विचारले असता तिने सांगितले कि अश्या गोष्टींचा ती जास्त विचार करत नाही. ती स्वतः दिल्लीत राहीली आहे आणि अश्या गोष्टी आधीही अनुभवल्या आहेत.ते ही असो पण ह्या गोष्टीनंतर गोड बोलणार्या कुठल्याही व्यक्तीवर पटकन विश्वास बसत नाही. लगेच अँटीना चालु होतो कि काहीतरी उद्देश अस्णार. पण अश्या मनस्वास्थ्य बिघडवणार्या आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?
आणि प्रत्येक असफल विवाहाची हीच कथा असते.माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. :)प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल !या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..? धागा हा एका सदस्याच्या मानसिक त्रासासंदर्भात उत्तर शोधण्यासाठी असताना तुम्ही चर्चेला मोहाकडे वळवले आणि नंतर असफल विवाहाचे टुमणे कुठूनतरी शोधून आणले. जर तुमच्या मते "सगळा लेखच निर्णयाच्या प्रक्रियेचा उलगडा होण्यासाठी आहे" तर धाग्यात लेखकाने घेतलेल्या निर्णयाची वस्तुनिष्ट पद्धतीने उकल झाली आणि त्याचा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या लोकांनी त्यांना उपाय सुचवून झाले - म्हणजे योग्य चर्चा झाली आहे. असे असताना असफल विवाह हा मुद्दा आलाच कुठून..? ___________________________ प्रश्नाचे उत्तर न देण्याचा हक्क राखून ठेवत आहे. ___________________________ तुमचे प्रतिसाद नेहमीप्रमाणे असंबद्ध आणि केवळ धागा भरकटवण्यासाठी आहेत हे एव्हाना उघड झाले आहे. त्यामुळे हा ही धागा वाचनमात्र करण्याचा तुमचा प्रयत्न अयोग्य आहे इतकेच नोंदवत आहे.आता उगीच शेपूटगिरी न करता उत्तर द्यायावर तुमच्यापेक्षाही झणझणीत उत्तर देऊ शकतो पण पायर्या खाली उतरून तुमच्या लेव्हलला यायची इच्छा नाही. त्यामुळे पास.मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले !वाह..! __/\__