अनलॉक १.० ते ५.०
प्रा डॉ बिरुटे सरांच्या सूचनेनुसार नवीन धागा काढत आहे धन्यवाद
https://www.esakal.com/mumbai/mission-begin-again-start-maharashtra-chie...
अनलॉक १.-
हळूहळू सर्व सुरु करणार आहेत
लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे
अनलॉक १.-
हळूहळू सर्व सुरु करणार आहेत
लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे
स्वयंशिस्त
१. मास्क वापरणे
२. मास्क काढावा लागला तरी नंतर लगेच हात sanitize करणे
३. सार्वजनिक ठिकाणी without कव्हर न शिंकणे,न खोकणे ,न थुंकणे
४. गर्दी न करणे (whatsapp सारख्या माध्यमांचा उपयोग करून वार ठरवून घेणे सामान खरेदीसाठ,शक्यतो दुकानदारांना फोन करून जाणे)
५. ऑनलाईन ,घरपोच डिलिव्हरीला प्रोत्साहन देणे ,प्राधान्य देणे
अवांतर - रुग्णसंख्या वाढत असताना देखील लोकडाऊन शिथिल करण्याच्या भारताच्या निर्णयावर जगात आश्चर्य व्यक्त होत आहे असे आज एका वृत्तवाहिनीवर (tv ९) सांगत होते
आत्ता चक्रीवादळाची बातमी सारखी दाखवत आहेत चक्रीवादळामुळे परत त्या त्या ठिकाणी संचारबंदी आहे
निसर्गच लोकडाऊन वाढवण्याचा इशारा तर देत नाहीये ना असे वाटले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegiआता यापुढे म्हणजे, २१ सप्टेंबर २०२० पासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्ये आणि इतर गर्दी संख्या १०० इतकी मर्यादेसह परवानगी देण्यात येईल. तथापि, अशा मर्यादित मेळावे अथवा गर्दीच्या ठीकाणी मास्क घालूनच परवानगी असेल. सामाजिक अंतर, थर्मल स्कॅनिंग आणि हात धुण्यासाठी किंवा सॅनिटायझरची तरतूद मागील पानावरुन पुढे सुरु राहील.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे की 30 सप्टेंबर 2020 पर्यंत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील आणि काही नियमित वर्ग अटी ठेवून चालू राहतील, जिथे आवश्यकता वाटल्यास तिथे . राज्ये / केंद्र शासित प्रदेश 50 % पर्यंत अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्यांना शाळेत एका वेळी ऑनलाईन शिकवणी, आणि संबंधित कामांसाठी बोलविण्याची परवानगी देऊ शकतात.
इयत्ता 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या कंटेन्ट झोन बाहेरील भागात, त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. हे त्यांच्या पालक / पालकांच्या लेखी संमतीच्या अधीन असेल. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मिशन किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर मंत्रालयांमध्ये नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण घेण्यास परवानगी असेल.
राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (एनआयईएसबीयूडी), भारतीय उद्योजक संस्था (IIE) आणि त्यांचे प्रशिक्षण घेणार्यांना देखील परवानगी दिली जाईल. केवळ संशोधन (पीएचडी) आणि प्रयोगशाळा, प्रायोगिक कामांची आवश्यकता असलेल्या तांत्रिक आणि व्यावसायिक प्रोग्रामच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था यांना एमएचएशी सल्लामसलत करून उच्च शिक्षण विभाग (डीएचई) परवानगी राहील.
केंद्र सरकारच्या सल्ल्याशिवाय-परवानगीशिवाय, कोणतेही स्थानिक लॉकडाउन (राज्य / जिल्हा / उपविभाग / शहर / गाव पातळी) राहणार नाही. आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी / मान्यता / ई-परमिटची आवश्यकता नाही. अजून बर्याच गोष्टी आहेत, त्यासाठी अधिकृत केंद्रसरकारचे मार्गदर्शन पाहावे. (छायाचित्र इंडियाटूडेच्या सायटीवरुन साभार) -दिलीप बिरुटे
काय काय सुरु होणार.
एक) राज्यातील रेष्टांरंट, बार पाच ऑक्टोंबरपासून सुरु होणार. दोन) लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु. तीन ) मुंबई एमएमआर क्षेत्रातील उद्योग सुरु. चार) पुणे विभागातील लोकल गाड्या सुरु. पाच) पूर्वी ज्या गोष्टींना मनाई होती त्या सर्व गोष्टींना ३१ ऑक्टोंबरपर्यंत मनाई असेल.काय काय बंदच राहणार.
एक) शाळा-महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोंबर पर्यंत बंद राहणार. दोन) जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृहे, मॉल्स, व्यापारी संकूल बंद राहतील. ( आमच्याकडे सुरु आहे बिंधास्त) तीन) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ( विशेष परवानगी दिलेले वगळून) बंद राहील. चार) मेट्रो बंद राहील. पाच) राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यकम, धार्मिक स्थळे बंद राहतील. मा. आदरणीय मोदीशेठ उगाच लॉकडाऊनच्या भानगडीत पडले. भारतीय जनता आज आकाशवाणीने भयभयीत झाली होती. ज्या त्या राज्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली असती. पण कोणत्याही गोष्टींचा इव्हेंट करायच्या नादात भलतेच काही तरी होऊन जातं. आणि मग आत्मनिर्भर व्हा म्हणून सोडून द्यावे लागते. पुनश्च एकदा हरिओम. माझे कुटुंब, माझी जवाबदारी. -दिलीप बिरुटेमुख्यमंत्री सहायता निधीतील ४३१ कोटी रुपये वापराविना
करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी देणगी दिलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ या खात्यात ४३१ कोटींचा निधी वापराविना पडून आहे. राज्य शासनाकडून सातत्याने आर्थिक अडचणी असल्याचा पाढा वाचला जात असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ खात्यातील निधी वापरला जात नसल्याचा विरोधाभास अधोरेखित होत आहे. https://www.loksatta.com/pune-news/without-using-rs-431-crore-from-cm-assistance-fund-abn-97-2302951/