भारतातील घरकामे आणि परदेशातील घरकामे
मी असे ऐकलंय कि परदेशी राहणारे त्यांच्या घरची कामे स्वतःच करतात कारण तिकडे कामवाल्या बाया मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांचे चार्जेसही खूप आहेत . नोकरी करणाऱ्या स्त्रिया कसे म्यानेज करतात ? लॉकडाऊन चालू झाल्यापासून तर हे प्रकर्षाने जाणवत आहे. सर्व कामे घरीच करावी लागत असल्याने सकाळची ऑफिसची वेळ साधायला खूपच कसरत करावी लागत आहे. तरी ऑफिस असताना रोजचं साधं जेवणच करत आहे पण त्यातही किमान चार पदार्थ (भाजी , भाकरी , भात, आमटी ) करावेच लागत आहेत . परदेशी राहणारे भारतीय हे सर्व जर करू शकत असतील तर मलाच टाइम मॅनॅजमेण्ट जमेना का काय असे वाटून राहिले आहे . मी असेही ऐकलंय कि परदेशी राहणारे रोज स्वयंपाक करत नाहीत पण असं ब्रेड पावावर महिनोनमहीने कोणी काढत नसावेत. शिवाय त्यांची घरेही मोठाली असतात. इथे २ बीचके चा फ्लॅट स्वच्छ ठेवायला नाकी नऊ यायला लागली आहे .भाज्या आणा, भिजत ठेवा , धुवा , निवडा ... पूर्वी हे होतेच पण पण तेंव्हा इतर कामासाठी बाई असल्याने त्याचे काही वाटायचे नाही पण आता मात्र सर्व घरातच करून नोकरी करणे दिव्य वाटू लागलय. पण परदेशी राहणारे मात्र हे लीलया कसे काय पार पाडत असावेत ह्यावर विचार करूसा वाटत आहे.
तर परदेशी मिपाकर हे कसे म्यानेज करतात किंवा भारतात राहणारेही सदया कसे जमवत आहेत ह्यावर चर्चा व्हावी .
परंतु आपण हे जे विधान केलं आहे ते मात्र पटत नाही आणि नुसतेच पटत नाही असे नाही तर आपण कोणत्या आधारावर / अनुभवावर लिहिले आहेत हे विचारावेसे वाटते...म्हणूनच वरती सुरुवातीलाच त्यांचा अनुभव विचारला होता. एखादी गोष्ट त्यांना परवडत नाही म्हणजे सरसकट सर्वांना परवडत नसेल असे नाहीये ना..