लॉकडाऊन: सत्ताविसावा दिवस
नमस्कार मिपाकर
कुणीही कधी विचार केला नसेल अश्या परिस्थितीत आपण सर्वजण अडकलो आहे
जर कुणी आपल्याला असे थांबा म्हटले असते तर आपन कधीच थांबलो नसतो पन ते निसर्गाने किंवा मानव निर्मित उपद्रव्या मुळे सर्व जग थोडा वेळ का थांबलो आहे. काही काळ असेना सर्व जण स्वतच्या कुटुंबासोबत किंवा स्वतःसोबत वेळ घालवत आहेत.
काही दिवसापूर्वी प्रशांत चा फोन आला कि लॉक डाउन वरती माझे अनुभव लिहण्याची विनंती केला म्हणून हा छोटासा प्रयत्न करत आहे.
फेब्रुवारी मध्ये ऑफिस च्या कामासाठी अमेरिकेला जायचे होते. चीनमध्ये कोरोनाने विषाणूने ऊहान शहराला विळखा घातला होतो. त्याने अजून बाकीच्या देशात आपले पाय फारसे पसरले नव्हते पण अमेरिकेत एकाला याची लागण झाली होती. त्यामुळे घरामध्ये आणि मनामध्ये थोडी चिंतेचे वातावरण झाले होते. ऑफिस मधून आम्ही बरेच जण या अधिकृत कार्यक्रम ला जाणार होतो आणि करोनाने अजून आपले उग्र रूप दाखवले नव्हते किंवा चीन ने ते लपवले होते. २ आठवड्याचा कार्यक्रम आवरून मि २४ फेब्रुवारी ला मायदेशी परत आलो. योग्य वेळी घरी सुखरूप पोचलो होतो. आत्तापर्यन्त केरळ सोडून कुठेही कोरोनाचा रुग्ण भारतामध्ये सापडला नव्हता. काही दिवसातच ९ मार्च ला न्युज चॅनेल्स वर बातमी झळकली कि पुण्यामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला आणि सर्वांचे काळजाचे ठोके वाढले. जो कोरोना चीन मध्ये होता तो आता आपल्या दारात येऊन पोचला होता. आत्तापर्यन्त या विषाणू ने यूरोपीय देशामध्ये धुमाकूळ घालायला सुरवात केली होती आणि कित्येक लोकांचा जीव सुद्धा घेतला होता.
पुण्याची बातमी समजताच ऑफिसामध्ये चिंतेचे वातावरण सुरु झाले. सरकारी यंत्रणा ची तयारी सुरु झाली होती. कोरोना महामारी पासून देशाला कसे वाचवायचे यावरती प्रयन्त सुरु झाले. आमच्या ऑफिस मध्ये हि तयारी सुरू झाली. जर घरातून काम करायची वेळ आली तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टीची माहिती गोळा होऊ लागली होती. त्यावेळी पुसटशी हि कल्पना नव्हती कि आपल्याला असे कित्येक दिवस घरातून काम करायला भाग पडेल. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च ला जनता कर्फ्यू घोषित केला होता. १७ मार्च ला सर्वाना ई-मेल आला कि १८ मार्च पासून सर्वानी घरातून काम करायचे आहे. मग काय सगळ्याची गडबड उडाली. थोडी फार आधीच तयारी असल्यामुळे आणि आमच्याकडे gotomypc सॉफ्टवेर जे ऑफिस मधील संगणक घरून जोडता येत होते ते आधीच होते तर काहींना लॅपटॉप दिले गेले. पुढील काही दिवस माझे सर्वांचे घरातून ऑफिस सेटअप करण्यात गेले यामधे हा पहिला आठवडा अघोषित लॉक डाउन चा पार पडला. २२ मार्च ला जनता कर्फ्यू होता. या लढ्यामध्ये जे सैनिक डॉक्टर पोलीस सफाई कामगार याना मानवंदना देण्यासाठी हा उपक्रम घोषित केला होत पण हि वादळापूर्वीची कोरोनाचे वादळ रोखण्यासाठी शांतता होती. सरकार ने थोडा उशीर झाला होता पण अगदी योग्य पद्धीतीने लॉक डाउन ची सुरवात केली होती. हा शंखनाद १३० करोड लोकांना या महामारी पासून वाचवण्याच्या लढाईची सुरवात होती. सर्वानी आपल्या सर्व सैनिकांना आपल्या घरच्या बाल्कनी मधून खिडकी मधून टाळ्या वाजवून धन्यवाद दिले . काही अधिक उत्साही लोकांनी रस्त्यावर येऊन जे अपेक्षित नव्हते ते प्रदर्शन केले असो.
गुढीपडावा सणासाठी गावी जायचे होते पण वर्क फ्रॉम होम सेटअप ची जबादारी आल्यामुळे आम्ही मंगळवारी दुपारी जायचे ठरवले होते परंतु काही समजण्याचे आत संपूर्ण देश लॉकडाउन मध्ये गेला होता आणि हा नवीन शब्द आमच्या शब्दकोशात सामील झाला होता. जेव्हा लॉकडाउन घोषित झाला तेव्हा थोडा वेळ वाटले कि शनिवारी का नाही गेला आपण पण नंतर विचार केला कि सर्वानी हाच विचार केला तर सरकारने ज्या उद्देशासाठी हा लॉकडाउन घोषित केला आहे याच्या आपण विरुद्ध वागलो असतो आणि आपल्या गावाकडील घरच्याना अडचणीत आणले असते. त्यामुळे जे होते तो चांगल्यासाठी होते या उक्ती प्रमाणे आम्ही स्वीकार केले पण फक्त मुलाचा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न होता कारण मला घरून काम करण्याची सुविधा होती. बायकोला हि तिची घराची आणि ऑफिस चे काम होते. मग सुरु झाला लॉकडाउन प्रवास . घराचा दरवाजा बंद झाला आणि चार भिंतीच्या आत आमच्या चौघांचा हा प्रवास सुरु झाला . .
सायकलीग ची आवड होत काही वर्षांपूर्वी ट्रायथलॉन चे वेड लागले होते तेव्हा पावसाळ्यात सायकलिंग सराव साठी होम ट्रेनर विकत घेऊन ठेवला होता. नव्याचे नऊ दिवस झाल्यानंतर बेड च्या खाली तो धूळ खात पडला होता. तसा तो वापराने इतकी काही सहज गोस्ट नाही. कारण प्रत्येक वेळीस त्याची टायर बदलणे आणि परत जर आपल्याला बाहेर सायकलिंग साठी जायचे असेल तर परत ती बदलणे खुप त्रासाचे असते. सध्या ऑफिसला सायकलने जात असल्यामुळे ट्रेनर चा फारसा उपयोग होत नव्हता. बाहेर सायकलिंग ची जी मजा आहे ती काही ट्रेनर वापरण्यात नाही हा माझे वैयक्तिक मत आहे त्यामुळे काही दिवसापूर्वी हा ट्रेनर विकण्याचे ठरवले होते पण म्हणत ना जे होते ते चांगल्या साठी तसे याचे झाले. १४ एप्रिल पर्यन्त आता फिटनेस साठी याचीच साथ मिळणार होती. त्याला बेड खालून बाहेर काढून साफ करून आणि सायकलची टायर बदलून घेतली . ट्रेनिन्ग साठी लागणारे स्पीड आणि कॅडेन्स सेन्सर सेटअप करू लागलो. बरेच दिवस वापर नसल्यामुळे स्पीड सेन्सर ची बॅटरी संपली होती . लॉकडाउन मुळे ती मिळण्याची आशा फार कमी होती. तरीही प्रयन्त करून आलो पण काही उपयोग्य झाला नाही. मग थोडी शोधाशोध केल्यावर एक जुनी बॅटरी सापडली त्याच्यामध्ये थोडा जीव होता आणि माझे काम झाले. असा हा अट्टाहास करून घरीच सायकलिंग करण्यास सज्ज झालो.


आमच्या सौ व मुलीला चित्रकला खुप आवड आहे. त्यामुळे त्या दोघीनी चित्रकला वहीचा ताबा घेतला. बघता बघता नवीन नवीन चित्र कोऱ्या पेपर वर उमटू लागली. अडगळीत पडलेले बुद्धिबळ चे सैनिक आणि पट बाहेर आले आणि मुलाला त्यामध्ये आवड निमार्ण झाली. मुलाचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्लिश लिहण्याचा सराव सुरु झाला. बायकोनी कोणता तरी लेख लिहून काढण्या पेक्षा आई ,वडील , गावाकडील माहिती लिहण्याचे लेख दिले. हा उपक्रम खुप उपयोगी पडला. मुलांनि आपल्या बद्दल आणि आपल्या कुटूंबाबद्दल माहिती गोळा करायला सुरवात केली आणि ती कागदावर कशी लिहतात ते पाहण्यात खुप मज्या आली. दररोज एक विषयावर एक पान मराठी आणि इंग्रजि मध्ये लिहण्यासाठी त्याची धडपड सुरु झाली. अडगळीत पडलेले पत्ते काढून कुटूंबाबरोबर संध्याकाळी व्यकय चे खेळ सुरु झाला आणि बालपणीचे उन्हाळाच्या सुट्टीचे दिवस आठवू लागले. मुले लहान असून इतक्या लवकर खेळाचे डावपेच शिकले त्यामुळे खेळ खेळण्यात खुप मजा येऊ लागली. माझ्या मुलाचे खराब पत्ते मिळाल्यावर त्याची प्रतिक्रिया पोट धरून हसायला लावत होते . हरयाला लागल्यावर मुलीचे संतप्त होणे मुलाचा हा निरागस पण इतक्या जवळून पाहायला मिळत होता अशा आनंदच्या क्षणांना सोबत घेऊन छान असे झोपी जाऊ लागलो आहे.


स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी भरपूर वेळ मिळू लागला त्यामुळे असे नव नवीन उपक्रम हाती घेऊ लागलो होतो आमच्या सौ ना आधी स्वयंपाकाची तशी फारशी आवड नव्हती पण ती आता मुलासाठी इंटरनेट वरून बघून आणि व्हाट्स अँप स्टेटस साठी दररोज नवीन पदार्थ घरी बनू लागले होते . म्हणत ना जेव्हा आपण स्वयंपाक मनापासून केला कि त्याची चव काही वेगळीच असते. आणि आई हि स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटूंबासाठी स्वयंपाक करत असते त्यामुळे त्याला वेगळी अशी गोडी असते. पण मला त्याची चिंता वाटू लागली कारण असे चमचमीत पदार्थ आणि जेवन आणि घरी बसुन वजन वाढले तर काय करायचे. खुप प्रयन्त करून ९० किलो चा ७५ किलो ला वजनाचा काटा आणला होता. अमेरिका ट्रिप नंतर आकडा ८० कडे धाव घेत होता. त्यासाठी सायकलिंग आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी वाढवावी लागणार होती. माझी मुलगी स्वयंपाकाचे धडे सौ कडून शिकू लागली. एक दिवस चपातीचे कणिक मळून दिली . एक दिवस चपाती केली. मुलीच्या हाताची चपाती खाण्याचा आनंद शब्दात लिहणे अवघड आहे. मुलाने मनापासुन दररोज देव पूजा करू लागला होता. दूरदर्शन ने लोकांसाठी रामायण आणि महाभारत मलिका सुरु केल्या होत्या व आम्हाला या मलिका आमच्या भूतकाळात घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी आमच्या गावात एकच दूरदर्शन संच होता त्यामुळे तो पाहण्यासाठी तासान तास रांगेत उभे राहून व नतर गर्दीमध्ये बसून आम्ही ह्या मालिका सुरवातीला पहिल्या होत्या. नंतर घरोघरी दूरदर्शन संच आले होते. त्यामुळे आता दिवसाचे सकाळचे २ आणि संध्याकाळचे २ तास कसे जायला लागले कळलेच नाही. त्यातच मोगली हि मालिका पण सुरु झाली मुलांनाही यामध्ये गोडी निर्माण झाली आणि त्याचे निरागस असे प्रश्नांना उत्तर देताना त्याच्यामध्ये आमचे बालपण दिसू लागले.



पाच एप्रिल ला देशाचे पंतप्रधान यांनी सायंकाळी आपल्या घरी बालकनीमध्ये दीप लावण्यास सांगितले. यावरती बरेच उलट सुलट चर्चा सुरु झाली. पण मला वाटते लॉक डाउन मध्ये अडकले लोकांमध्ये एक प्रकारची ऊर्जा आणि मनातील मरगळ काढण्यासाठी केलेला हा प्रयन्त असेल असे मला वाटले. सर्व लोक सकाळपासून सायंकाळची आतुरतेने वाट पाहत होती. सर्वानी आपल्या बालकनी मध्ये छान असे सजवले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदानं आणि उच्छाह दिसत होता आणि हेच या काळात गरज होती.आणि या कोरोनाच्या महामारी मध्ये सर्वांची साथ हवी होती.
!!तमसो मा ज्योतिर्गमय!!या श्लोका प्रमाणे या महामारीच्या अंधकारातून आपल्याला हा दीप प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे प्रतीक होते
आमच्या इंडो ऍथलेटिक सोसायटी चे सदस्य व्हाट्स अँप ग्रुप वर दररोज आपले फिटनेस ऍक्टिव्हिटी ची पोस्ट करतात त्यामुळे एकमेकांना प्रोच्छाहन मिळून थोडा का होईना आणि कोणताही का होईना व्यायाम होत असतो . लॉक डाउन मध्ये घरच्या घरी वेगवेगळे व्यायाम प्रकार सर्वानी सुरवात केले . कोणी दोरी उड्या मारू लागले, कुणी सूर्यनमस्कार, कुणी घराच्या घरी चालू लागले. हे पाहून मी थोड्या उड्या , सूर्यनमस्कार सुरु केले. या वर्षाच्या सुरवातीला जसे सर्वजण ठरवतात तसे मी वर्षेच्या शेवटी प्रयन्त १०० सूर्यनस्कर घालण्याचे ठरवले होते. पण कामामुळे ( खरे तर आळसामुळे) ह्याची तयारी राहून गेली होती आणि नवीन वर्षाचा संकल्प बाजूला पडला होता. एक दिवस अवधूत गुरव च्या स्टेटस ला मेसेज होता हनुमान जयंतीला त्याने सर्वाना सूर्यनमस्कार घालण्याचे व किती घातले हे पाठवायला सांगितले. हा पोस्ट वाचून मला माझ्या नवीन वर्षाचा संकल्प आठवला आणि ठरवले कि आपण त्या दिवशी जमतील तेवढे सूर्यनमस्कार घालायचे आणि अवधूत ला रिप्लाय केला आव्हान स्वीकारले. मग काय थोडी थोडी तयारी सुरु केली. हनुमान जयंती दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदा ५१ सूर्यनमस्कार घातले व माझा सोबत मुलांनी २१ सूर्यनमस्कार घातले. लॉक डाउन मुळे माझ्या नवीन वर्षाचा संकल्प च्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती. ५१ सूर्यनमस्कार ची पोस्ट ग्रुप वर केली तर सुशील मोरे नि ७५ सूर्यनमस्कार ची पोस्ट टाकली आणि सांगितले कि १०० लवकरच करणार आहे. मी हि ठरवले कि १०० सूर्यनमस्कार करू. जेव्हा आपण एकादी गोष्ट करायची म्हटली आणि स्वतः मधला आळस झटकून कामाला लागला कि अशक्य अशी कोणतीही गोष्ट राहत नाही . याचिच प्रचिती आली वर्षाच्या शेवटी पूर्ण करण्याचे ध्येय ११ एप्रिल ला १०१ सूर्यनमस्कार तेही ३५ मिनिटामध्ये पूर्ण केले. थोडा अभ्यास आणि इंटरनेट वरील एक्स्पर्ट चे विडिओ पाहिल्यावरती लक्ष्यात आले कि थोडे अजून सूर्यनमस्कार योग्य पद्धतीमध्ये केले पाहिजे त्यासाठी सराव सुरु केले.
अश्या पद्धतीने हा लॉकडाउन चा काळ स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासोबत आनंदात जात आहे. ह्या लॉक डाउन मुळे काही लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टर आणि पोलीस यंत्रणांवर खुप सारा भार पडला आहे. व्यासायिक पुढील आव्हानां कसे सामोरे जायचे याचा विचार करत आहेत शेतकरीच्या फळे भाजीपाला शेतात अडकून पडला आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीची काळजी आहे. अदृश्य अश्या विषाणू ने सर्व जगाला वेठीस धरले आहे.
निसर्गातील मनुष्य असा प्राणी आहे ज्याने स्वतःच्या बुद्धिमत्तेवर निसर्गावर मात करण्याचा प्रयन्त सुरु केला आहे. पण त्याचा धोका वेळीच ओळखून स्वतःला सावरण्याची हीच वेळ आहे नाहीतर मनुष्य स्वतःचा अंत करण्यास स्वतः जबादार असणार आहे.
मानवजात कितीही प्रगत झाली तरी निसर्गाच्या अमर्यादित,अदभुत शक्तिपुढे तो किती खुजा आहे हेच वारंवार समोर आले आहे. त्यामुळे निर्सगाचा आदर हा झालाच पाहीजे.
घरी राहा !! सुरक्षित राहा !!
स्वतः आणि कुटूंबासोबत सुंदर वेळ व्यतीत करा !!
-अजित पाटील


आमच्या सौ व मुलीला चित्रकला खुप आवड आहे. त्यामुळे त्या दोघीनी चित्रकला वहीचा ताबा घेतला. बघता बघता नवीन नवीन चित्र कोऱ्या पेपर वर उमटू लागली. अडगळीत पडलेले बुद्धिबळ चे सैनिक आणि पट बाहेर आले आणि मुलाला त्यामध्ये आवड निमार्ण झाली. मुलाचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्लिश लिहण्याचा सराव सुरु झाला. बायकोनी कोणता तरी लेख लिहून काढण्या पेक्षा आई ,वडील , गावाकडील माहिती लिहण्याचे लेख दिले. हा उपक्रम खुप उपयोगी पडला. मुलांनि आपल्या बद्दल आणि आपल्या कुटूंबाबद्दल माहिती गोळा करायला सुरवात केली आणि ती कागदावर कशी लिहतात ते पाहण्यात खुप मज्या आली. दररोज एक विषयावर एक पान मराठी आणि इंग्रजि मध्ये लिहण्यासाठी त्याची धडपड सुरु झाली. अडगळीत पडलेले पत्ते काढून कुटूंबाबरोबर संध्याकाळी व्यकय चे खेळ सुरु झाला आणि बालपणीचे उन्हाळाच्या सुट्टीचे दिवस आठवू लागले. मुले लहान असून इतक्या लवकर खेळाचे डावपेच शिकले त्यामुळे खेळ खेळण्यात खुप मजा येऊ लागली. माझ्या मुलाचे खराब पत्ते मिळाल्यावर त्याची प्रतिक्रिया पोट धरून हसायला लावत होते . हरयाला लागल्यावर मुलीचे संतप्त होणे मुलाचा हा निरागस पण इतक्या जवळून पाहायला मिळत होता अशा आनंदच्या क्षणांना सोबत घेऊन छान असे झोपी जाऊ लागलो आहे.


स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी भरपूर वेळ मिळू लागला त्यामुळे असे नव नवीन उपक्रम हाती घेऊ लागलो होतो आमच्या सौ ना आधी स्वयंपाकाची तशी फारशी आवड नव्हती पण ती आता मुलासाठी इंटरनेट वरून बघून आणि व्हाट्स अँप स्टेटस साठी दररोज नवीन पदार्थ घरी बनू लागले होते . म्हणत ना जेव्हा आपण स्वयंपाक मनापासून केला कि त्याची चव काही वेगळीच असते. आणि आई हि स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटूंबासाठी स्वयंपाक करत असते त्यामुळे त्याला वेगळी अशी गोडी असते. पण मला त्याची चिंता वाटू लागली कारण असे चमचमीत पदार्थ आणि जेवन आणि घरी बसुन वजन वाढले तर काय करायचे. खुप प्रयन्त करून ९० किलो चा ७५ किलो ला वजनाचा काटा आणला होता. अमेरिका ट्रिप नंतर आकडा ८० कडे धाव घेत होता. त्यासाठी सायकलिंग आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी वाढवावी लागणार होती. माझी मुलगी स्वयंपाकाचे धडे सौ कडून शिकू लागली. एक दिवस चपातीचे कणिक मळून दिली . एक दिवस चपाती केली. मुलीच्या हाताची चपाती खाण्याचा आनंद शब्दात लिहणे अवघड आहे. मुलाने मनापासुन दररोज देव पूजा करू लागला होता. दूरदर्शन ने लोकांसाठी रामायण आणि महाभारत मलिका सुरु केल्या होत्या व आम्हाला या मलिका आमच्या भूतकाळात घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी आमच्या गावात एकच दूरदर्शन संच होता त्यामुळे तो पाहण्यासाठी तासान तास रांगेत उभे राहून व नतर गर्दीमध्ये बसून आम्ही ह्या मालिका सुरवातीला पहिल्या होत्या. नंतर घरोघरी दूरदर्शन संच आले होते. त्यामुळे आता दिवसाचे सकाळचे २ आणि संध्याकाळचे २ तास कसे जायला लागले कळलेच नाही. त्यातच मोगली हि मालिका पण सुरु झाली मुलांनाही यामध्ये गोडी निर्माण झाली आणि त्याचे निरागस असे प्रश्नांना उत्तर देताना त्याच्यामध्ये आमचे बालपण दिसू लागले.



पाच एप्रिल ला देशाचे पंतप्रधान यांनी सायंकाळी आपल्या घरी बालकनीमध्ये दीप लावण्यास सांगितले. यावरती बरेच उलट सुलट चर्चा सुरु झाली. पण मला वाटते लॉक डाउन मध्ये अडकले लोकांमध्ये एक प्रकारची ऊर्जा आणि मनातील मरगळ काढण्यासाठी केलेला हा प्रयन्त असेल असे मला वाटले. सर्व लोक सकाळपासून सायंकाळची आतुरतेने वाट पाहत होती. सर्वानी आपल्या बालकनी मध्ये छान असे सजवले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदानं आणि उच्छाह दिसत होता आणि हेच या काळात गरज होती.आणि या कोरोनाच्या महामारी मध्ये सर्वांची साथ हवी होती.
!!तमसो मा ज्योतिर्गमय!!या श्लोका प्रमाणे या महामारीच्या अंधकारातून आपल्याला हा दीप प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे प्रतीक होते
आमच्या इंडो ऍथलेटिक सोसायटी चे सदस्य व्हाट्स अँप ग्रुप वर दररोज आपले फिटनेस ऍक्टिव्हिटी ची पोस्ट करतात त्यामुळे एकमेकांना प्रोच्छाहन मिळून थोडा का होईना आणि कोणताही का होईना व्यायाम होत असतो . लॉक डाउन मध्ये घरच्या घरी वेगवेगळे व्यायाम प्रकार सर्वानी सुरवात केले . कोणी दोरी उड्या मारू लागले, कुणी सूर्यनमस्कार, कुणी घराच्या घरी चालू लागले. हे पाहून मी थोड्या उड्या , सूर्यनमस्कार सुरु केले. या वर्षाच्या सुरवातीला जसे सर्वजण ठरवतात तसे मी वर्षेच्या शेवटी प्रयन्त १०० सूर्यनस्कर घालण्याचे ठरवले होते. पण कामामुळे ( खरे तर आळसामुळे) ह्याची तयारी राहून गेली होती आणि नवीन वर्षाचा संकल्प बाजूला पडला होता. एक दिवस अवधूत गुरव च्या स्टेटस ला मेसेज होता हनुमान जयंतीला त्याने सर्वाना सूर्यनमस्कार घालण्याचे व किती घातले हे पाठवायला सांगितले. हा पोस्ट वाचून मला माझ्या नवीन वर्षाचा संकल्प आठवला आणि ठरवले कि आपण त्या दिवशी जमतील तेवढे सूर्यनमस्कार घालायचे आणि अवधूत ला रिप्लाय केला आव्हान स्वीकारले. मग काय थोडी थोडी तयारी सुरु केली. हनुमान जयंती दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदा ५१ सूर्यनमस्कार घातले व माझा सोबत मुलांनी २१ सूर्यनमस्कार घातले. लॉक डाउन मुळे माझ्या नवीन वर्षाचा संकल्प च्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती. ५१ सूर्यनमस्कार ची पोस्ट ग्रुप वर केली तर सुशील मोरे नि ७५ सूर्यनमस्कार ची पोस्ट टाकली आणि सांगितले कि १०० लवकरच करणार आहे. मी हि ठरवले कि १०० सूर्यनमस्कार करू. जेव्हा आपण एकादी गोष्ट करायची म्हटली आणि स्वतः मधला आळस झटकून कामाला लागला कि अशक्य अशी कोणतीही गोष्ट राहत नाही . याचिच प्रचिती आली वर्षाच्या शेवटी पूर्ण करण्याचे ध्येय ११ एप्रिल ला १०१ सूर्यनमस्कार तेही ३५ मिनिटामध्ये पूर्ण केले. थोडा अभ्यास आणि इंटरनेट वरील एक्स्पर्ट चे विडिओ पाहिल्यावरती लक्ष्यात आले कि थोडे अजून सूर्यनमस्कार योग्य पद्धतीमध्ये केले पाहिजे त्यासाठी सराव सुरु केले.
अश्या पद्धतीने हा लॉकडाउन चा काळ स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासोबत आनंदात जात आहे. ह्या लॉक डाउन मुळे काही लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टर आणि पोलीस यंत्रणांवर खुप सारा भार पडला आहे. व्यासायिक पुढील आव्हानां कसे सामोरे जायचे याचा विचार करत आहेत शेतकरीच्या फळे भाजीपाला शेतात अडकून पडला आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीची काळजी आहे. अदृश्य अश्या विषाणू ने सर्व जगाला वेठीस धरले आहे.
निसर्गातील मनुष्य असा प्राणी आहे ज्याने स्वतःच्या बुद्धिमत्तेवर निसर्गावर मात करण्याचा प्रयन्त सुरु केला आहे. पण त्याचा धोका वेळीच ओळखून स्वतःला सावरण्याची हीच वेळ आहे नाहीतर मनुष्य स्वतःचा अंत करण्यास स्वतः जबादार असणार आहे.
मानवजात कितीही प्रगत झाली तरी निसर्गाच्या अमर्यादित,अदभुत शक्तिपुढे तो किती खुजा आहे हेच वारंवार समोर आले आहे. त्यामुळे निर्सगाचा आदर हा झालाच पाहीजे.
घरी राहा !! सुरक्षित राहा !!
स्वतः आणि कुटूंबासोबत सुंदर वेळ व्यतीत करा !!
-अजित पाटील
घरी राहा !! सुरक्षित राहा !! स्वतः आणि कुटूंबासोबत सुंदर वेळ व्यतीत करा !!+१११ सुंदर लेख हो पाटील साहेब. आता वेळ आहेच तर शेतीत नवीन काय काय प्रयोग केले आणि त्याचे अनुभव लिहून काढा..!!