लॉकडाऊन: अठरावा दिवस
नमस्कार ... मिपाकर !!
न भूतो न भविष्यती ...प्रसंग म्हणजे लॉकडाउन....अगदी कल्पनातीत. मी त्यादिवशी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये होतो ( मुंबई मध्ये ) . "लॉकडाउन " ची चिन्हे दिसत होती . मनात अगणित प्रश्न फेर धरून नाचायला लागले. मी तसाच ऑफीस मधून निघालो . घरी कस पोहचायच हा " यक्ष " प्रश्न होता . गावाकडून सारखे फोन येत होते , घरी येण्यासंबधी सारखा आग्रह होत होता . वर्क फ्रॉम होम ची इच्छा होती पण , मला स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे मुंबईत रहायचं कस ? सर्व बंद होत. रोजच्या खाण्या पिण्याचा ही प्रश्न होता.
औरंगाबादला येण्याविषयी आग्रह होत होता . अशातच शेवटच्या क्षणी मोबाइल वर बघितलं शेवटच्या ट्रेन च शेवटच तिकीट होत . शेवटी ईश्वरा ला स्मरून तिकिट बुक केलं शेवटी जीव भांडयात पडला. एकदाचा प्रवास सुरु झाला....
हा प्रवास नेहमीचा नक्कीच नव्हता. भय , चिंता , काळजी व तणाव सोबत घेऊन प्रवास सुरु झाला, अखेर रात्री १ वाजता औरंगाबाद स्टेशन ला उतरलो. माझा भाऊ एवढ्या रात्री मला घ्यायला आला होता.
जीवनात आलेल्या प्रसंगाला धीरानं , सयंमान तोंड दयाव लागतं. मार्ग निघत असतो ह्या आई च्या शिकवणीन अलगद डोळयाच्या कडा ओल्या झाल्या.
ते निश्चितच नकळत ओघळणारे "आनंद अश्रू " होते ....
- अमोल गवळी
========================================================================================
========================================================================================
मी काढलेली व्यंगचित्रे.
+१