लॉकडाऊन : चौदावा दिवस
एखादी गोष्ट आपल्याला हवी असते , व ती अगदी अनपेक्षित रित्या आपल्याला मिळते तेव्हा आपली जी परिस्थिती होते तीच सध्या आपली या लॉकडाऊन मध्ये झालीये. आपल्याला अचानक का होईना पण सुट्टी मिळालीये. पण ते २-3 दिवस असतं तर ठीक होतं. आता २ आठवडे झालेत , अजून एक आठवडा बाकीच आहे. त्यातही सध्याची परिस्थिती पाहता ही सक्तीची सुटी आणखी वाढते की काय ? अशी धास्तीही आहे. बरं घरात बसून रोज नवी करमणूक तरी काय शोधायची हा प्रश्न आणखी त्रासदायक. पण त्यावर ईलाज पण आपणच शोधायचाय.
आपल्यातले बरेच लोक असे आहेत की जे कधीकाळी काहीतरी छंद जोपासत होते , कलागुणांना वाव देत होते पण करियर व ईतर गर्दी गोंधळात ते सगळं मागे पडत गेलं. मनातून आपल्याला हे सगळं जाणवत होतंच पण “वेळ नाही” या कारणाखाली आपण आपल्याच आवडीच्या गोष्टींपासून फारकत घेतलेली होती. सतत वेग व घाई मध्ये आपण बांधले गेलो होतो. पण या कोरोना रुपी निन्द्काने आपल्याला सक्तीचा का होईना , आपल्यासाठी , आपल्या कुटुंबासाठी , आपल्या छंदांसाठी वेळ मिळवून दिला आहे . त्याचा मस्त वापर आपण करून घेऊ शकलो तर ही लढाई आपण खऱ्या अर्थाने जिंकलो अस म्हणता येईल.
परवा मी डॉ आनंद नाडकर्णी सरांचं भाषण ऐकत होतो त्यात त्यांनी खूप छान विचार सांगितला. ते म्हणतात की आपण जर या बंदीकाळात स्वत:मध्ये काहीच Value-addition केली नाही तर आपण हा सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने मिळालेला वेळ निव्वळ वाया घालवला असे होईल.
आणि खरं पाहिलं तर फक्त छंद असंच कशाला , आपण आणखीनही काही गोष्टी करू शकतो. आपल्या घरी आपले आई वडील असतील ,मोठी किंवा वयस्कर माणसं असतील त्यांना आपण काही छोट्या छोट्या पण उपयोगी गोष्टी शिकवू शकतो. रामदासांच्या “जे जे आपणांसी ठावे ..... “ या प्रसिद्ध ओळींप्रमाणे आपल्याला येत असणाऱ्या काही गोष्टी , ज्या भलेही आपल्याला छोट्या वाटतात पण इतरांकरता त्या तितक्या सोप्या नसतील त्या त्यांना शिकवू शकतो. अगदी फोनपे , गुगलतेज कसं वापरावं , ऑनलाईन बुकिंग करणे , पैसे भरणे , मराठी मध्ये टाईप करणे , विडीओ कॉल कसे करायचे ईतक्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवू शकतो. याच्यातून त्यांना झालेला आनंद पाहण्यात सुद्धा खूप मजा येईल तुम्हाला. मी तर आमच्या बऱ्याच Whatsapp गृप वर सांगितलं की कोणाला हे काही शिकायचं असल्यास मला फोन करा मी शिकवेन. सहज वेळ निघून जातो शिकवण्यात.
आपल्याला काही गोष्टी येत नाहीत असं आपल्याला या Quarantine आधी लक्षात आलं असेल कधीतरी पण वेळेअभावी आपण त्याकडे लक्ष दिलं नसेल , तर त्या गोष्टी आपण आत्ता करू शकतो , शिकू शकतो.
रोजच्या रामरगाड्यात आपण सर्वात जास्त दुर्लक्ष केलेली गोष्ट म्हणजे आपली तब्येत , आपलं शरीर . या सक्तीच्या सुटीत आपण आपल्या तब्येती कडे , शरीराकडे लक्ष द्यायला शिकू , शरीराला व्यायामाची सवय लावू.
थोडक्यात काय आहे ? “रोज युद्धाचा प्रसंग आम्हा !!” असा सूर काढत बसण्या पेक्षा “सुखदुःखे समे कृत्वा” अश्या नजरेतून आपण या वेळाकडे पाहिलं तर दिवस खूप सुसह्य जाईल.
आपल्यातले बरेच लोक नोकरीपेशा असतील , बरेच उद्योजक असतील . आपल्या सगळ्या लोकांना हा वेळ एक खूप छान “ठेहराव” देणारा आहे. आपण आपले रेज्युमे अपडेट करू शकतो , लिंक्ड इन प्रोफ़ाईल नीट करू शकतो. जे लोक स्वत:चा धंदा / उद्योग करतात , आपण आपले पुढील “बिजनेस प्लान” ठरवून त्याला कागदावर मांडून ठेवू शकतो.
इतकंच कशाला ? आपल्याला या वेळाने “किती कमी संसाधानात व पैशात” आपण आपला निर्वाह करू शकतो हे सुद्धा शिकवलंय. याचा वापर करून आपण येथून पुढे आपल्या पैशांचा , आपल्या संसाधनांचा सुयोग्य व उचित वापर कसा करू शकतो हे पण शिकू शकतो , शिकवू शकतो.
शेवटी काय आहे ? रडत बसणाऱ्या माणसाला दिवस सरत नाही अन काम करणाऱ्या माणसाला दिवस पुरत नाही अशी स्थिती आहे.
मी सुद्धा हे Quarantine सुरु झाल्यापासून बरेच छोटे छोटे उपक्रम केले . मुलासोबत चित्रकला , त्याला रंगवहीत रंगवायला शिकवणे.
स्वयपाकाची आवड असल्याने नवे पदार्थ करून बघितले ,
कॅलीग्राफी खूप आवडते तर ती करून पाहतो रोज. ईतकच काय बोरू व शाईने लिहून पहावं अस मनात आलं , ते ही करून बघितलं.
मी स्वत: Corporate Trainings देतो विविध आस्थापनांत . त्या करता काही नवीन कोर्सेस बनवता येऊ शकतात का ? असा विचार केला , आपल्या मिपा वरच्या मोद्काशी बोललो व तसा नवीन कोर्स तयार केला. काही नवनवीन गोष्टी UDEMY सारख्या एका जबरदस्त संकेत स्थळावरून शिकलो , शिकतोय.
मला स्वत:ला RUNNING करता यायचे नाही , तर या १०-१२ दिवसाचा उपयोग करून घेऊन , वेगवेगळ्या Marathoner मित्रांकडून सल्ले व मार्गदर्शन घेऊन नीट पाळायला शिकलो. २०० मीटर पळालो की दम लागायचा , आता 3 वगैरे किमी हळू का होईना पण सहज पळता यायला लागलंय.
करायला गेलं तर खूप आहे फक्त त्या एका मुक्त नजरेनी बघायची गरज आहे. आलेला प्रत्येक क्षण हा “कसा घालवायचाय?” असा विचार केला तर २४ तास घालवणं मुश्कील होऊन बसेल , पण तेच त्या ऐवजी जर आलेल्या प्रत्येक क्षणात “स्वत:ला कसं जास्तीतजास्त गुंतवून ठेवायचंय ?” असा विचार केला तर २४ तास काय २४ दिवसही कमी पडतील असं मला वाटतं.
शेवटी काय संत एकनाथ म्हणतात तसं ..
माझ्या मनाचें तें मन । चरणीं ठेवावें बांधून
मग तें जाऊं न शके कोठें। राहे तुमच्या नेहटें
मनासी तें बळ । देवा तुमचें सकळ
एकाजनार्दनी देवा । मन दृढ पायीं ठेवा !!
आपण आपल्या स्वत:शी , स्वत:च्या मनाशी मैत्री केली की वेळ अपुरा पडेलच ... आपण या संकटातून सगळे सहीसलामत बाहेर तर पडूच , पण एका नव्या स्वत:शी आपली ओळख झालेली असेल.
आपलाच –
ज्याक ऑफ ऑल .
०६ एप्रिल २०२०
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmirमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmirमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmirकरायला गेलं तर खूप आहे फक्त त्या एका मुक्त नजरेनी बघायची गरज आहे.अगदी अगदी. पण वेळ आणि आयुष्य पुरत नाही. इथलं आयुष्य १२० करा. --------- स्टफ्ड टमाटे आवडले. ऐनवेळी टुथपिक न मिळाल्याने टमाट्यांनी वाईट वाटून न घेता हसत आहेत. ------- चित्रंही छान. -------- चौकटराजाने डोला मारून प्रतिसाद दिलाय तोही आवडला.+१