Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लॉकडाऊन : दहावा दिवस

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/03/2020 - 06:10
🗣 90 प्रतिसाद
नमस्कार मिपाकर, आज लॉकडाऊनचा दहावा दिवस. सकाळीच देशाचे पंतप्रधान काय बोलतील म्हणून काळजीनेच टीव्ही लावला. आज देशाला संबोधन करतांना विशेष काही नव्हतं. पण, ५ एप्रीलला रात्री ९ वाजता आपल्या घरातील वीज ९ मिनिट बंद करुन मेनबत्ती, मोबाईल फ्लॅश घराच्या गॅलरीत येऊन लावायचा आहे. भारतातील शक्तीचा परिचय द्यायचा आहे. सोशीयल डिस्टन्स ठेवायचा आहे. आपली एक जगभर लॉकडाऊनमुळे उत्तम प्रतिमा गेली वगैरे. आज अवघ्या दहा मिनिटात हे संबोधन संपलं. खरं तर मला आजचं संबोधन अजिबात पटलं नाही. मागचा अनुभव पाहता लोक आता काय करतील त्याची काळजी वाटली. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या उत्तम सहकार्याबद्दल कौतुक करुन पुढेही आपण तितक्याच जोमाने ही लढाई लढू. डॉक्टर्स आणि सर्व स्टाफ देशभर उत्तम सेवा देत आहेत. आणि आपणच विषाणुच्या या लढाईत जिंकणार आहोत आपलं सहकार्य हेच यश आहे, वगैरे काही तरी असायला होतं असं वाटलं. लोकांनी आपल्या घरातच थांबावं. अजूनही विषाणुचा कहर कमी झालेला नाही. जितका लोकांशी संपर्क टाळता येईल तितका टाळावा असेच सुचवावे वाटते. योग्य खबरदारी हीच आपली काळजी आहे. आता आपणही लॉकडाऊनला आता सरावलो आहे. सुरुवातीचे एक दोन दिवस गोंधळाची स्थिती होती. आता आपण विषाणुच्या लढाईत जरा नियंत्रण मिळवत होतो, जरा लोक जागरुकपणे सहकार्य करीत होते असे वाटत होते की, दिल्लीतील 'जमातच्या सदस्यांनी' देशभर एक भितीदायक वातावरण करुन टाकले. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज देशातल्या रुग्णांची संख्या अडीच हजारापर्यंत पोहचली आहे. अजूनही आपण भारतीय लोकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अजिबात घराबाहेर न पडणे हा सर्वोत्तम उपाय आहे. बाकी, घरातच पडीक असल्यामुळे सध्या तरी काही विशेष नाही. पुस्तकं चाळणे, एखाद्या पानात रमलो तर पुढे वाचायचं. नाही तर ठेवून द्यायचं. वाट्सॅपवर काहीच्या काही ढकलपत्रांना आवर घालणे. गप्प राहणे, तान न घेणे. हे पाळतोय. मंडळी, आपण गेल्या दहा दिवसात वेगळं काय केलं. एकूणच सध्याच्या परिस्थितीवर आपल्या सभोवती काय सुरु आहे, काय केलं पाहिजे, आणि आपलं काय सुरु आहे त्यासाठी लॉकडाऊनच्या धाग्याचा प्रपंच.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 46129 views

🗣 चर्चा (90)
च
चौथा कोनाडा Fri, 04/03/2020 - 13:57 नवीन
दिव्यांची एवढीच चर्चा सुरु आहे तर आपण का मागे रहायचे दिवा लावायला ? Image removed. दीपज्योती नमोस्तूते ||
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Fri, 04/03/2020 - 14:01 नवीन
६ एप्रिलला नासाचे फोटो येतील भारतातील लोकांनी लावलेल्या दिव्यांचे. बघू त्यात कोरोना व्हायरस दिसतो की ॐ .
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/03/2020 - 17:25 नवीन
भारी होता. =))) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 04/03/2020 - 15:27 नवीन
१. मा. पंतप्रधान आणि केंद्र शासनाने विविध माध्यमांच्या मार्फत करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसते (फोनची कॉलर ट्युन, हेल्पलाइन्स, न्युज चॅनल इ.) . यात अशी नेहमी कुठली माहिती वगळली गेली आहे जिचा मा. पंतप्रधानांच्या आवाहनात उल्लेख असायला हवा होता? २. मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामध्ये आणि केंद्र शासनाने दिलेल्या माहितीमधे अवैज्ञानिक, दिशाभूल करणारे किंवा समाजाचे नुकसान करू शकेल असे नेमके काय आहे? मा. पंतप्रधानांचे आवाहनः
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 04/03/2020 - 15:35 नवीन
फोनची कॉलर ट्युन
>> मी कधीच ट्यून वापरत नाही. पण परवा अचानक फोन कंचा समस आला की तुमचे २१ रु कापले आहेत. हे आपल्या सर्वांचेच 'करोना जनजागृती संदेश ' याबद्दलचे आहेत का?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Fri, 04/03/2020 - 15:36 नवीन
९ वाजता आणि ९ मिनिटे ह्यात वैज्ञानिक काय आहे? दिव्यांचे नंतर बघू.
  • Log in or register to post comments
ज
जानु Fri, 04/03/2020 - 15:40 नवीन
काही कृती शासन चुकीच्या पद्धतीने करीत आहे असे बऱ्याचदा सर्व सामान्य माणसाच्या मनात येते. पण राजकीय नेते त्यात त्यांना काय अपेक्षित आहे ते सांगत नाही. हे अगदी तसेच असते की एक कवी आपल्या मनात आलेल्या भावनांना वाट मोकळी करून पटकन एक सुंदर कविता कागदावर उतरवत जातो, नंतर अनेक समिक्षक त्यावर कित्येक वर्ष खर्डे घाशी करत असतात. ता. क. डॉ. साहेब कृपया वैयक्तिक नाही. मोदी कवी नाहीत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/03/2020 - 16:36 नवीन
व्वा! काडी टाकावी तर अशी. एका काडीत तिघेजण ( कवी, मोदी व प्राडॉ ) :) कृ.ह.घ्या.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 04/03/2020 - 16:45 नवीन
अधेमध्ये एखादा निरर्थक दिसणारा का होईना पण इव्हेंट, कार्यक्रम देणं मानसिकदृष्ट्या महत्वाचं असावं. हाच विचार या प्लॅनमागे असावा.
मागच्या वेळी थाळ्या वाजवून कोरोनाला पळवलं असं ओरडत होते किंवा तो गेला म्हणत होते. अंधश्रद्धा भरपूर आहे. चार पाच हजार लोकांना घरी बसवून काही होत नाही, संशयीत लागण झालेल्या चार पाच जणांना एका ठिकाणी वेगळे थोपवणे गरजेचे आहे पण तेच शक्य होत नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 04/03/2020 - 16:49 नवीन
९ वाजता आणि ९ मिनिटे
पुन्हा हे न्युमरॉलजी/गुरुचा शुभांक वगैरे झालंच. वैज्ञानिक झाडाला अध्यात्माचं आळं.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/03/2020 - 16:56 नवीन
कंकाका, नवग्रह शब्द वापरा की. ज्योतिषालापण मग यात ओढता येईल. ;)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 04/03/2020 - 17:15 नवीन
एरव्ही ढकलपत्र आले की चिडचिड होते, मात्र आज आलेल्या ढकलपत्रांनी तुफान मनोरंजन केले. काही ढकलपत्रांमधला उपहास ईतका उच्च दर्जाचा होता की लोकांना तो उपहास असेल अशी पुसटशी शंका न आल्याने ते मेसेज "नॉर्मल" मेसेज समजून भाबडेपणाने* इतरांना पाठवत होते.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/03/2020 - 17:25 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 04/03/2020 - 17:42 नवीन
भोळीभाबडी जनता आणि त्यांचा विश्वास. आता अंगारेसुद्धा येतील. केरळमधले एक म्हातारे जोडपे तांदूळ आणि फणसाची सागुती खाल्ल्याने बरे झाले असा त्यांचा दावा आहे. 'आपल्या' नाचणीच्या भाकरीला मागणी वाढेल बहुतेक.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 04/04/2020 - 07:11 नवीन
गोमुत्राच काय झाल ? त्यावरील संशोधन कुठवर आल? http://thewirehindi.com/13462/committee-research-cow-gobar-gomutra/ बाकी कहीही म्हणा ह्यावेळी ही मोदींच्या आईचा फोटो बघण्यास खुप उत्सुक आहे. त्यातुन एक वेगळी स्फुर्ती मिळते.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 04/03/2020 - 17:46 नवीन
प्रतिक्रिया वाचून मनोरंजन झाले. स्वतःचा अजेंडा रेटताना किमान 'आपण सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहोत आणि पुढे काय होणार आहे / होऊ शकेल' हे थोडेतरी ध्यानात घ्यावे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/03/2020 - 17:51 नवीन
टीव्हीवर बातमी चालू होती की संपूर्णपणे वीजेचा वापर कमी केला तर वीजसंचावर परिणाम होऊ शकतो. या विषयातले जाणकार खरी काय ते माहिते देतील. लोकमतची बातमी इथे. सेठ निर्णय घेण्यापूर्वी वेगवेगळ्या विभागाशी चर्चा करतात की नाही ? की आपलं एकट्याचच घोडं अचानक हाकत असतात असा विचार येतो अशावेळी. ०दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 04/03/2020 - 17:55 नवीन
जाणकार तज्ञ माहिती देईपर्यंत तरी स्वतःचे घोडे आवरा.. ..असा विचार येतो अशावेळी. =))
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/03/2020 - 18:08 नवीन
ऊर्जा मंत्रालयाचे संबंधीत सर्व विभाग त्यासंदर्भात तयारी करत असून कुठलीही अडचण येणार नाही असंही मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे वाक्य वाचायच राहिलं असावं. अगदी शेवटचच वाक्य आहे ते. अगोदरच्या सगळ्या बातमीचे रसभंग करणारे. ;)
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 04/03/2020 - 19:17 नवीन
टीव्हीवर बातमी चालू होती की संपूर्णपणे वीजेचा वापर कमी केला तर वीजसंचावर परिणाम होऊ शकतो.
रोज रात्री अकरा बारा वाजता वीज संच बिघडतात ही नवीन माहिती कळली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
य
यश राज Fri, 04/03/2020 - 19:49 नवीन
म्या काय म्हण्तोय ज्या वेळेस १ तास् भर 'अर्थ हवर' शेलेब्रेट करत असत्यात त्यावेळेस पण असेच उर्जा मण्त्रालय हादर्लेले असत्ये का? नाही म्हण्जे ९ मिनटात एवढा फरक पडणार म्हनुन विचारलाय..... https://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/Lights-to-go-off-for-lsquoEarth-Hourrsquo/article16625317.ece https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-makes-it-to-Earth-Hour-City-Challenge/articleshow/45846298.cms
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/04/2020 - 05:51 नवीन
Image removed. आपलं काम आहे, जे दिसतं ते लोकांसमोर ठेवणे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 04/05/2020 - 09:48 नवीन
छोटासा बदल - जे सोयिस्कर दिसतं ते लोकांसमोर ठेवणे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 04/04/2020 - 08:29 नवीन
मागच्या वर्षी रात्री साडे आठ ला "अर्थ अवर" म्हणून एक तास दिवे बंद करताना असले प्रश्न लोकांना का आले नाहीत याचा विचार व्हावा. https://gadgets.ndtv.com/others/news/earth-hour-2019-time-theme-india-da... https://currentaffairs.gktoday.in/earth-hour-2019-04201967558.html कदाचित ते पुरोगामी पणाचे लक्षण असल्याने त्याबद्दल कोणी काही बोलले नाही.
  • Log in or register to post comments
P
pspotdar Sat, 04/04/2020 - 09:29 नवीन
https://24coaches.com/ac-electric-locomotives-roster-the-wam-class/ https://24coaches.com/electric-locomotive-roster-the-wag-series/ Goods trains are running on 25kV alternating current traction throughout nation, probably Indian Railway power grid is not attached to National Grid.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 04/04/2020 - 15:10 नवीन
आपले दुवे २०१५ आणि २०१६ चे आहेत. रेल्वेचे ग्रिड पूर्ण वेगळे आहे. रेल्वेची स्वतःची वीज केंद्रे सुद्धा आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Nabinagar_Thermal_Power_Project
  • Log in or register to post comments
P
pspotdar Sat, 04/04/2020 - 16:37 नवीन
in Executive Summary - IR has been procuring electricity as an ordinary consumer for its traction applications despite being the largest single user of energy in the country. Accordingly, it has been paying higher tariffs for energy duly taking the burden of distribution losses, cross subsidy and other surcharges of Power Distribution Companies (DISCOMs). http://www.indianrailways.gov.in/Mission_41K.pdf
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 04/04/2020 - 16:58 नवीन
हो पण त्यांचे ग्रीड वेगळेच असते. महाराष्ट्रात वीज बंद झाली असताना सुद्धा बहुसंख्य वेळेस रेल्वे चालूच राहते. फारच क्वचित असे होते कि रेल्वेची वेगळी लाईन सुद्धा ट्रिप झाली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 04/04/2020 - 15:02 नवीन
*प ढ त मू र्ख* १) हर हर महादेव ही गर्जना करून युद्ध जिंकता येत नाही हे महाराजांनाही माहित होते. २) निव्वळ चले जाव ची घोषणा देवून इंग्रज पळून जाणार नाहीत हे महात्मा गांधींनाही माहित होते. ३) निव्वळ तळ्याचे पाणी पिल्याने जातीयता नष्ट होणार नाही हे बाबासाहेबांनाही माहित होते. ४) निव्वळ रक्त मागून स्वातंत्र्य मिळणार नाही हे सुभाषबाबूंनाही माहित होते. ५) निव्वळ जय जय रघुवीर समर्थ म्हणून हिंदू एकत्र येणार नाही हे रामदास स्वामींनाही माहित होते. ६) याचप्रमाणे दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे मोदींनाही माहित आहे. या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते हे ज्यांना समजत नाही त्यांना रामदास स्वामी पढतमूर्ख म्हणतात.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 04/04/2020 - 18:38 नवीन
लोकाना मानसिक पातळीवर एक आणण्यासाठी हे सर्व करावे लागते हे मान्य परंतू वरील उदाहरणात एकाही लीडर ने " महामारी" सारखे अत्यंत गम्भीर प्रकरण भावनेच्या जोरावर हाताळले असेल असे वाटत नाही. वरील सर्व उदाहरणे मानव निर्मित समस्यांची आहेत. सध्याचे प्रकरण यापेक्शा वेगळे आहे. ते एक नैसर्गिक संकट आहे .लोकाना काय वाटते यापेक्षा सध्यातरी कोणता उपाय अधिक महत्वाचा आहे हे महत्वाचे. तो मोदीनी ओळखला आहे स्वीकरला ही आहे. पण ज्या प्रमाणे शरीराचे ऑपरेशन हे शरीर चालू ठेवून करावे लागते तसे मानवी व्यवहार काही पातळीवर दया तर काही बाबतीत मानव अधिकार वगैरे स्थगित ठेवून करावे लागते. काही विशिष्ट समाजाला घाबरून जर कठोर पणा आणण्याचे धाडस मोदीनी दाखविले पहिजे जसे इंदिराजीनी दाखविले होते .
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sun, 04/05/2020 - 08:05 नवीन
भारताला (हिंदुस्तानाला) विज्ञानवादी,उच्च शिक्षित पंप्र. ची गरज आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 04/05/2020 - 04:41 नवीन
वाह डॉ .. अगदी बरोबर.. हे सगळे प्रतीकात्मक आहे. हे जाणून घायचे नाही आणि कुचेष्टा कार्याची ते सुद्धा अश्या गंभीर परिस्थितीत अशी घाण सवय लोकांना असते ... कारण एकाच पराकोटीचा साध्यचय्या सरकार आणि सत्ताधारी पक्षाचा विरोध... मग संधी मिळेल तिथे नुसतंय टपल्या होण्याच्या किंवा फुसक्या सोडायच्या " झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही जागे करता येत.." हेच bagaha पृथ्वीराज चव्हाणांचे विधान... रामायण आणि महाभारत बरोअबर इतर का नाही दाखवला... अरे हुशार नेत्या .. एक तर त्या मालिका या केवळ मनोरंजन साठी होत्या काही धर्म प्रसारासाठी नाही... आणि आहेत इथे ८०/१०० हिंदू त्यामुळे त्यांचं इतिहासावर किंवा संस्कृतीवरील कार्यक्रम दाखवले तर येवढए का झोंबत बे ! वरील ५/६ उदाहरणात अजून एक जुने उद्धरण बाळासाहेब ठाकरे यांचे .. रस्त्यावर नमाज पडायला आलेल्या जनते मुळे रहदारी चा खोळंबा होतो पण त्यावर त्यावेळचे सरकार गप्प ( भावना दुखव्याला नको) पण त्यावेळी सरकारला हे नाही समजले कि हा एक सामाजिक नागरिक प्रश्न आहे यात हिंदू मुस्लिम काही नाही मग याला उत्तर म्हणून बाळासाहेबांनी "महाआरती " ची घोषणा केली आणि सगळ्या हिंदूंना आवाहन केलं कि तुम्ही पण आरती साठी रस्त्यावर या आणि आडवा... त्यावेळी बाळासाहेबांना हे हि माहिती होतं कि असं नमाजसारखं महारारती वैगरे हिंदू धर्मात नाहीये... ती केवळ सरकारला त्यांचा येडे पणा दाखवून देण्यासाठी
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 04/04/2020 - 16:56 नवीन
केंद्रीय उर्जा मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/04/2020 - 17:29 नवीन
संपूर्ण वीज बंद करू नका असा MSEB कडून अधिकृत मेसेज बील App वर येत आहे केवळ माहितीस्तव. मेन स्विच बंद करू नका. आता आम्ही सर्व लाइट बंद करणार नव्हतोच, कृपया हे सांगू नका. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Sun, 04/05/2020 - 06:04 नवीन
अथवा अजून काही होऊ. मी माझ्या घरात टीव्ही, कम्प्युटर बंद ठेवणार आहे. रिकामा ताण नको.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 04/05/2020 - 07:32 नवीन
हे योग्य वाटतंय !
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 04/05/2020 - 08:03 नवीन
स्टॅबिलायझर जोडलेले नसलेले कोणतेही उपकरण बंद ठेवलेलेच बरे. म्हणजे मला असं वाटतंय. मी काही यातला तज्ञ नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 04/05/2020 - 15:38 नवीन
फोटोशोप अगाध विषय आहे त्यात वेळ घालावा। बुद्धिभेद ही महाबला आहे. व् भारतीय लोक त्यात माहीर आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 04/05/2020 - 08:28 नवीन
मी कारस् ९ मिनिटे सुरू ठेऊन कारचे पार्किंग लाईट लावणार आहे. हॅझार्ड लॅम्पपण लावणार आहे. एवितेवी बॅटरी चार्चिंगसाठी ते करायला लागणारच होते म्हणा. ९ मिनिटांचा असाही सदुपयोग करावा म्हणतोय. कोणाला असेच काही सदुपयोग सुचत असतील तर सुचवा
  • Log in or register to post comments
भ
भागो Sun, 04/05/2020 - 08:35 नवीन
Switch-off Bharat: Power distracts, absolute power distracts absolutelyR. SURYAMURTHY AND G.S. MUDUR - 05 Apr 2020 https://epaper.telegraphindia.com/textview_326743_14936160_4__1_05-04-2020_71_0.html
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा