लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे लागतील?
माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.
पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. दोघांना सध्यातरी कोणताही आजार नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या लवकरच (२-३ वर्षात) रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपर्यन्त पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल.
४८ व्या वर्षी रिटायर झाल्यास सध्याची जीवनशैली, वाढलेले आयुर्मान पाहता रिटायरमेंट घेण्याआधी किती पैसे लागतील असे आपल्याला वाटते?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे. त्यामुळे चर्चा उरलेले सध्याच्या जीवनशैलीप्रमाणे जगायला आयुष्य जगायला किती पैसे लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.
९२
वर्षाचे आहेत त्यांना भारतीय कायदेतज्ज्ञ परिषदेचे (बार) पितामह म्हणतात आणि त्यांनी हा खटला श्री रामलल्ला विराजमान यांच्यासाठी जिंकून दिला आहे. https://www.business-standard.com/article/pti-stories/k-parasaran-pitamaha-of-india-bar-emerges-hero-in-ayodhya-land-dispute-case-119110901468_1.html एक डॉक्टर म्हणून मी पाहत आलेल्या अनेक गोष्टी/ प्रश्न इ आता येथे मांडत आहे. वय वाढत जाते तसा वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढत जातो. माझा एक सिद्धांत आहे. सरासरी वयाच्या ४४ वर्षांपर्यंत जेवढे उपचार माणसाला लागतात तेवढेच उपचार पुढच्या २२ वर्षात लागतात( म्हणजे ६६ पर्यंत) आणि तेवढेच उपचार पुढच्या ११ वर्षात म्हणजे ७७ व्या वर्षापर्यंत आणि तेवढेच उपचार पुढच्या साडे पाच वर्षात म्हणजे ८३ व्या वर्षापर्यंत आणि पुढे. पहिल्या ४४ वर्षात जेवढा खर्च येतो त्यापेक्षा २२ वर्षात जास्त ( सरासरी दीड पट) खर्च येतो कारण होणारी महागाई आणि असेच पुढे चालते. त्यातून माणसे जास्त जगली तर त्यांना दुर्धर आजार होण्याची शक्यता वाढते. मी घरचेच उदाहरण देत आहे. माझ्या आईला थायरॉईड ग्रंथीचा कर्करोग वयाच्या ७८ व्या वर्षी झाला. कारण ती ७८ वर्षे जगली. आज तिच्या उपचारांसाठी आम्ही ११ लाख रुपये खर्च केले ते सुद्धा टाटा सारख्या निमसरकारी रुग्णालयात (अर्थात हे पैसे आम्हाला परवडत होते म्हणून) आम्ही कोणत्याही तर्हेची "मदत" जी उपलब्ध असून ( आणि आमचे "संबंध"/contacts असून) घेतली नाही. पण देवदयेने ती पूर्ण बरी झाली आहे. यदाकदाचित तिला उद्या केमोथेरपी लागली तर त्याचा खर्च महिना १०,०००/- रुपये आहे. हे पैसे तिच्या निवृत्तिवेतनातुन ती देऊ शकेल. पण अशी सगळीच औषधे भारतात बनत नाहीत आणि हा खर्च महिना लाखात जाऊ शकतो. पूर्वी माणसे इतकी जगत नसत. त्यामुळे असे दुर्धर आजार व्हायच्या आत माणसे परमेश्वर चरणी विलीन होत असत आणि त्यामुळे त्यासाठी होणार खर्च हा मर्यादित होता. आता तुम्ही जास्त जगलात तर असे होणारे दुर्धर आजार जास्त असणार आहेत आणि त्यासाठी होणारा खर्च फार मोठा असू शकतो. एका माणसाने मला याचे उत्तर दिले कि "मला असा आजार झाला तर मी त्यासाठी पैसे खर्च करणार नाही" स्वच्छपणे सांगेन कि मला असे उपचार नकोत. मी त्यांना विचारले कि साहेब असा आजार "तुमच्या पत्नीस" झाला तर तुम्ही त्या "गेल्या" तरी चालतील मी "पैसे खर्च करणार नाही" असे म्हणू शकाल का? यावर त्या माणसाकडे सध्या तरी उत्तर नव्हते. असे अनेक अनुत्तरित प्रश्न माझ्यासमोर येत असतात ज्याची उत्तरे मला माहिती नाहीत आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रत्येक माणसासाठी वेगळे असू शकेल. "आजार आणि मृत्यू" हे कुणाच्याही हातात नाही हे चिरंतन सत्य आहे. त्यामुळे मी २५- ३० वर्षे काम करेन आणि मग निवृत्त होईन आणि संचित पुंजीवर आयुष्य काढेन हा मार्ग सर्वाना पटेल/ परवडेल असे नाही.