चंद्रयान-२
हा माझा 'चंद्र' या टॉपिक वर दुसरा लेख.
नो, आय डोंट हॅव कॉपिराईट ऑन दॅट. किंवा माझा त्यात असा काही विशेष इंटरेस्ट ही नाही.
कारण म्हणजे 'चंद्रयान २' 'झेपावले' आहे. आणखी एक उड्डाण यशस्वी झालं आहे. चंद्रावर काय संशोधन करणार आहे ते मला माहीत नाही.
माझा प्रश्न आहे, कि आपल्या देशात, जिथं बेसिक प्रश्न आहेत (अजुन तरी) त्या देशाला चंद्र मोहीमेची सध्या काय गरज आहे ? म्हणजे थोड्क्यात जे ९७८ कोटी रु जे खर्च झालेत, त्याचे एक्सॅक्ट रिटर्न्स काय आणि कुणाला मिळणार आहेत ? स्वतापुरता विचार करायचा म्हटला, तर याचा मला काय फायदा झालाय ?
जिथं सायंटीफीक ब्रेन ची खरच गरज आहे, जिथं पैशांची खरच गरज आहे , तिथं या दोन्ही गोष्टिंचा वापर न करता, असल्या गोष्टींमधे दोन्ही का वापरल्या (वाया घालवल्या) जातायत ? माझ्यामते हे खरं ब्रेन ड्रेन आहे.
'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम कॅन मोस्ट्ली बी कन्सीडर्ड ओन्ली अॅज अ हॉबी, अँड नथींग मोर ..! आता हे असले "शौक' आपल्या देशाला सध्यातरी (त्याची खरच गरज आहे का ही गोष्ट वेगळी ) किंवा आता बेसीक प्रश्न सुटले आहेत, आणि आता काय करायचा टाइमपास अशी वेळ येण्याआधी परवडण्यासारखे आहेत का ?
स्पेस प्रोग्रॅम मधे भारत जर नसेल, तर काय बिघडणार आहे ? बाकीचे जे देश नाही आहेत, ते काय बंद पडलेत का ?
आता, 'इस्रो' ची आणखी एक सर्वीस आहे, सॅटेलाईट लाँचींग. ज्यामधे २६९ सॅटेलाइट्स लाँच झालेत वेगवेगळ्या देशांचे. त्या प्रगत देशांनीही स्वतः खर्च न करता 'इस्रो' ची सर्वीस वापरुन 'कॉस्ट कटिंग' केलंय. तर आता 'इस्रो' ला त्यामधुन बराच आर्थिक फायदा झाला असेल आणि त्यातुन या मोहीमा केल्या असतील तर माहीत नाही. कारण 'इस्रो' ने मग काय करावे मग हा त्यांचा प्रश्न आहे. मग, गो चंद्रयान (२) !
- उन्मेष
चंद्रावर पोचायला ९७८ कोटी रुपये आणि ४८ दिवस? केवढी ही उधळपट्टी...-- यातील उधळपट्टीचा मुद्दा सोडला तरी, साठच्या दशकात अमेरिका फक्त चार दिवसात चंद्रावर पोहचली होती मग आज सर्व अत्याधुनिक यंत्रणा सोबतीला असताना भारताला चंद्रापर्यंत पोहचयाला ४८ दिवस का लागणार आहेत ?