Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

संघी टेरर व फेल्युअर ऑफ जस्टिस !!

ड
डँबिस००७
Fri, 04/05/2019 - 13:12
🗣 36 प्रतिसाद
आता एक दोन दिवसात संघी टेरर व फेल्युअर ऑफ जस्टिस !! ह्या विषयावर वेगवेगळे वक्ते बोलत असलेले व्हिडियो अन्हद ईंडीया तर्फे यु ट्युब टाकण्यात येत आहेत. हिंदु समाजाला बिथरवण्यासाठीच काही खास लोक, मिडीया असे प्रकार करत आहेत. गेले हजारो वर्षे हिंदु समाज सहनशील होता पण आता तो सहनशील राहीलेला नसुन , आतंकवादी झालेला आहे अस ठासुन सांगण्यात ह्या लोकांना काय फायदा आहे हे समजणे अत्यावश्यक आहे. ह्या व्हिडियोमध्ये बोलणार्या वक्त्यांना वरच्या विषयावर बोलण्यासाठी एकत्र केलेल आहे. हे लोक वेगवेगळ्या बॅक्ग्राऊंडचे असुन बरेच हिंदु लोक त्यात आहेत. ह्या व्याख्यानाचा श्रोता वर्ग खुपच छोटा असुनही ह्या व्याख्यानाला खुप मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न आहे. ह्या बोलणार्यात एक आहे निरंजन टकले. हा आता "द वायर " साठी लिहीतो . काही लोक द प्रिंट साठी लिहीतात. प्रत्येक समाजात अत्याचारा विरुद्ध आवाज उठवणारे लोक असणारच , मग त्याला हिंदु समाज अपवाद कसा ठरु शकेल ? अश्या आवाज उठवणार्या लोकांना पोलिस , सरकार मदत देत नसेल तर त्यांना कायदा हातात घेण्याशिवाय काय पर्याय असेल ? समझौता एक्सप्रेस बाँब स्फोट, मालेगाव बाँब स्फोट सारख्या दोन उदाहरणा वरून सर्व हिंदु समाजाला अतिरेकी ठरवण्याचा कट २००७ -०७ सालीच काँग्रेसने रचलेला होता. त्यात दिग्विजय सीग, सुशिल कुमार शींदे , शिवराज पाटील, व ईतर श्रेष्ठ काँग्रेस नेते शामिल होते. ह्या सर्वांमागे पि चिदंबरमचा हात होता हे आता स्पष्ट होत आहे. समझौता एक्सप्रेस बाँब स्फोटावर अनेक खुलासे उपलब्ध झालेले आहेत. त्यात महत्वाचा म्हणजे ह्या बाँब स्फोटात संदिग्ध असलेल्या एका पाकिस्तानी अतिरेक्याला पंजाब पोलिसांनी पकडले होते पण न्यायालयीन कोठडीत टाकण्या पुर्वी १५ दिवसा अगोदरच त्याला सोडुन दिले. त्याचे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले. http://rajatsharma.in/truth-about-samjhauta-express-blast-must-come-out/ मालेगाव स्फोट Interview of Malegaon blast accused Ramesh Upadhyay मालेगाव स्फोट https://www.youtube.com/watch?v=A7_2NDe32AM हेमंत करकरे ह्यांनी कर्नल पुरोहीत ह्यांना मरण यातना दिलेल्या होत्या. How Hemant Karkare tortured Lt. Col. Purohit https://www.youtube.com/watch?v=TMmUa5twaUE तेंव्हाच्या काँग्रेस सरकारच्या आदेशावर ( ह्यात नेत्यांची नावे वर दिलेली आहेतच) तेंव्हा हिंदु समाजाला अतिरेकी ठरवायचा प्रयत्न केला गेला. तो प्रयत्न आता सर्व स्तरावर न्यायालयात फेल गेला. सर्व हिंदु लोक ज्यांच्यावर खटले केले गेले होते ते सर्व लोक निर्दोष सिद्ध झाले. हिंदु समाजाला आता कोर्टा कडुन न्याय मिळालेला असला तरीही अन्याय करणारे मोकळेच फिरत आहेत. पण आता परत ह्या हिंदु आतंकवादाला चालना देण्याच काम करण्यात येत आहे ते कोण करत आहे त्या मागे त्यांचे काय ईरादे आहेत हे कळणे महत्वाचे आहे. ज्यु समाजाच उदाहरण ईथे देता येईल. हिंदु प्रमाणेच गेल्या २००० वर्षांत लाखो ज्युंची हत्या करण्यात आलेली आहे. ( होय लाखो हिंदुंची हत्या करण्यात आलेली आहे ) ह्या ज्युंचा दोष फक्त ते ज्यु होते हा ईतकाच होता. हिटलरच्या जर्मनीतच नव्हे तर पोलंड, रशीया मध्येही ह्या दरम्यान ज्युंची हत्या करण्यात आली . अत्यंत अमानुषपणे वेगवेग़ळ्या पद्धतीने ज्युंना मारण्यात आले. लाखो ज्युंना मारणारे नाझी फक्त काही शेकडोच होते. एका ही ज्युने ह्या मास किलींग विरुद्ध प्रयत्न सुद्धा केला नाही आपला हात उचलला नाही. त्या नंतर स्वातंत्र्य मिळवलेल्या ईझराईल मधल्या ज्युंना ह्या एका गोष्टीचे खुप दु:ख आहे. त्यामुळे ज्यु समाजावर केलेल्या अत्याचाराचा सुड त्यांनी वेळोवेळी उगवलेला आहे. एक समाज म्हणुन हा त्यांचा प्रतिकार होता. हिंदु समाजाला तोडण्याचा प्रयत्न करणार्यांचा प्रयत्न हाणुन पाडला पाहीजे पण त्यापुर्वी आपले शत्रु कोण आहेत त्यांना कोण मदत करत आहे त्यांची मनिषा काय आहे त्यांना काय साध्य करायच आहे हे समजावुन घेणे महत्वाचे आहे. ऑगस्ता वेस्टलँड केस ची एफ आय आर आता कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे. ह्या एफ आय आर मध्ये तिन पत्रकारांचे नाव आलेले आहे . १. शेखर गुप्ता ( द प्रिंट ) २. राजु संथानम ३. मनु पब्बी हल्ली द प्रिंट, द वाय , न्युज लाँड्री सारखे ईंटरनेट वरच्या मिडीया मोदीजी विरुद्ध प्रचार का करत आहेत ह्याच उत्तर तुम्हाला मिळालेल असेल. https://www.youtube.com/watch?v=9O9oVX_iwMQ&t=581s

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 21106 views

🗣 चर्चा (36)
ड
डँबिस००७ Sat, 04/06/2019 - 11:25 नवीन
संपादन मंडळ , हा धागा सर्वाम्ना दिसत नाही का ? काय उपाय आहे ?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 04/06/2019 - 17:39 नवीन
हिंदू लोकांचे वाटोळे हे असले फेक्युलर हिंदू लोकच करतील.. जगाच्या पाठीवर कोठेही हिंदूने आतंकवादी हल्ला करून कोणत्याही निष्पाप व्यक्तींना मारल्याचे उदहारण नाही. हिंदूंना आतंकवादी सिद्ध करून यांना फक्त पब्लिसिटी मिळवणे आणि खांग्रेस शासनात काही पदे, अवॉर्ड, किंवा महामंडळ पदे मिळवने हेच कारण असावे. किंवा हे लोक कोन्व्हर्ट झाले असतील पण लाजेखातर अजूनही हिंदू नावाचा वापर करत असतील. जगाच्या पाठीवर असा कोणताही देश नाहीये जिथे इतक्या जाती जमाती एकत्र नांदत असतील. हे शक्य आहेत ते फक्त हिंदूच्या संस्कृती आणि तत्त्वांमुळे. हे तेच लोक आहेत जे मुस्लिम दहतवादाबद्दल बोलायला लागले कि " दहशतवादाला धर्म नसतो " असे म्हणतात.. पण कुठे तरी लुटुपुटु घटना झाली.. कि पूर्ण 100 कोटी हिंदूंना आतंकवादी म्हणून हिणवतात.. आणि उल्लेख देखील हिंदू किंवा भगवा आतंकवाद असा करतात. पण कधीही मुस्लिम किंवा हिरवा आतंकवाद हा शब्द देखील उच्चरत नाहीत.. असल्या लोकांना हिंदू समाजानेच वाळीत टाकणे गरजेचे आहे. पाम तसें होत नाही.. म्हणून त्यांचा फाजीलपणा अजुन वाढतो.. अश्या गोष्टींना आणि व्यक्तींना हिंदूनीं प्रतिकार नाही केला तर त्यांना रान मोकळेच होईल.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 04/07/2019 - 04:08 नवीन
हिंदू दहशतवादाचा कोणी एक तरी पुरावा देईल काय? काही लोक हिंदू आणि पर्यायाने आरएसएस चा एवढा द्वेष का करतात हेच समजत नाही. त्यातही काही हिंदूंना कट्टर मुस्लिम संघटना, विचार चालतात. पण जरा कुठे हिंदू लोकांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला की मात्र लगेच हिंदू आतंकवादी म्हणून बोंब ठोकण्यात येते. यामध्ये पैश्यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात असावा. राजदीप सरदेसाईंचा दक्षिण दिल्लीत मोठ्ठा बंगला आहे असं म्हणतात. दिल्लीतल्या किमती बघता त्याची किंमत काही करोड मध्ये असेल. कुठून आले असतील एवढे पैसे? माझ्या मते सगळ्यात मोठा दोष आहे त्यांना जे शिक्षण मिळते त्याचा. दुर्दैवाने डाव्या विचारसरणीच्या लोकांनी शिक्षण क्षेत्र काबीज केलं आहे. जनेयु हे एक उदाहरण झालं, पण अगदी मुंबई पुण्याच्या विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात काही वावगे नाही असे वाटणारे विद्यार्थी आढळतील. मी हे स्वानुभवाने बोलतोय, तुम्ही पण तुमच्या आसपासच्या तरुण मुलांशी बोलून बघा. या आधी पण मी बरेचवेळा मिपावरच म्हणलं आहे की रक्ताचा एक थेंबही न सांडता एखाद्या प्रदेशावर ताबा मिळवायचा असेल तर त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर कब्जा करणे हा सगळ्यात सोपा आणि निश्चित परिणाम देणारा उपाय आहे. तुमची तरुण पिढीच जर तुमच्या संस्कृतीला नाकारेल अशी तयार केली तर युद्ध करण्याची गरजच नाही. थोडा वेळ लागेल पण यशाची १००% गॅरंटी आहे. इस्रायलचा विचार केला तर समस्त ज्यूना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे, पण हिंदू मात्र मी हिंदू आहे मी म्हणायला सुद्धा लाजतात. तरुणांना कपाळावर गंध लावणे, देवळात जाणे, राखी बांधणे वगैरे प्रकार अगदीच डाऊनमार्केट वाटतात, मुलींना डोक्यावर पदर घेणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली वाटते. पण तरुण मुस्लिम बघा, मुली हिजाब घालतील व मुले स्कल कॅप घालतील आणि अगदी नेमाने वेळेवर नमाज पढायला जातील. थोडक्यात काही वर्षांनी तुम्ही शाकाहारी आहात किंवा बीफ खात नाही म्हणजे "यु आर मिसिंग समथिंग" असं वाटणारे हिंदू लोक सापडले तरी आश्चर्य वाटायला नको. केरळ हे एक उदाहरण डोळ्यासमोर आहे. कदाचित अजून एक आकर्षणाचा विषय म्हणजे तुम्ही ४ बायका करू शकता. तसेच नुसतं तलाक ३ वेळा म्हणलं की झालं. हे पण एक तरुण मुलांना तसेच पुरुषांना सुद्धा आकर्षण असू शकेल. तसेच समस्त जगात तुम्ही व्हिक्टीम कार्ड खेळायला मोकळे राहता. तुमच्या मूळ देशात तुमच्यावर अन्याय होतोय असं म्हणलं की युरोपीय किंवा अमेरिकी देशांत रेफ्युजी म्हणून सहज नागरिकता मिळते. म्हणजे आधी तुमच्या मूळ देशात विरोधी कारवाया करण्यासाठी पैसे गोळा करायचे आणि विरोध होऊ लागला की व्हिक्टीम कार्ड खेळून इतर देशात आसरा मिळवायचा. मज्जानी लाईफ.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 04/08/2019 - 10:11 नवीन
एक भोंगळ , पसरट ओरड. १) कपाळावर गंध लावून हिंदू म्हणवून घेण्यात असे काय नक्की हशील आहे? २) गंध लावणे किंवा राखी बांधणे याला कोणत्या हिंदू धर्म ग्रंथाचा आधार आहे ते कधीच समजले नाही. ३) हिंदूत्व आणि शाकाहार याचा एकमेकांशी काहीही संबंध नाहिय्ये. सामवेदात ब्राम्हण आणि यज्ञ करणारे यजमान हे दोघेही यज्ञात बली दिलेल्या जनावराचे मांस खात असल्याचा उल्लेख आहे ( गाय ,घोडा, म्हैस (बीफ ) यांसहीत इतर प्राणी सुद्धा ). बर्‍याच हिंदू देवतांना जनावराचा बली हा नैवैद्य म्हणून दिला जातो. कालीका मातेला तर दारू ही नैवैद्य म्हणून अर्पण केली जाते. बीफ खाणे आणि हिंदूत्व यांचा संबन्ध कसा लावता येतो तेही समजले नाही. ४) एका पेक्षा अधीक लग्ने याला हिम्दू धर्माची मान्यता असावी ( कायद्याची म्हणत नाही. धर्माची म्हणतोय) कायद्याने सुद्धा काही अटींसहीत दुसर्‍या विवाहाला संमत्ती दिलेली आहे. याचा हिंदुत्वाशी सम्बन्ध कसा येतो ते ही समजले नाही ५) हिजाब किंवा जाळीची टोपी घालणे किंवा डोक्यावर पदर घेणे याचा हिंदू धर्माशी काय संबन्ध येतो तेही समजले नाही. भारतात पडदा / गोषा / पदर ही पद्धत इस्लामी आक्रमणानंतर आलेली आहे. त्या अगोदर च्या इतिहासात या प्रथेचा कुठेच उल्लेख आलेला नाहिय्ये. कुठल्याच भारतीय शिल्प कलेत मंदीरात पडदा घेतलेली / पदर घेतलेली स्त्री आढळत नाही. उलट नृत्य करणारी,वाद्य वाजवणारी स्त्री श्रुंगार करणारी, वेणी फणी करणारी स्त्री अशा मूर्त्या आढळतात. ट्रेडमार्क साहेब तुमच्या प्रतिसादत कोणताच मुद्दा तुम्ही धड मांडलेला नाहिय्ये. गंध लावणे, डोक्यावर पदर घेणे , मांसाहार करणे , राखी बांधणे , अनेक पत्नी / लग्ने करणे यातील कोणत्या गोष्टीने हिंदुत्व सिद्ध होते ते मांडावे किंवा याही पुढे जाऊन हिंदुत्व हे कसे सिद्ध करता येईल याचे नेटके मुद्देसूद मार्गदर्शन केले तर समाजातील भटकलेल्या हिंदू तरुण मुलांना ते फारच उपयुक्त होईल. जाता एक प्रश्ण विचारतो.: ब्रीटीश सरकारने बंद केलेल्या सती प्रथेच्या पुनरुज्जीवना बद्दल तुमचे मात काय आहे?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 04/09/2019 - 04:19 नवीन
खाली गा. पै. नी उत्तर दिलेलंच आहे त्यालाच पुरवणी म्हणून काही मुद्दे मांडतो. तर प्रथमतः तुम्हाला मुद्दाच समजला नाही. हरकत नाही बऱ्याच "सेक्युलर" म्हणवणाऱ्यांना मुद्दा समजत नाही किंवा समजून घ्यायचा नसतो. माझा मुद्दा हाच आहे की पद्धतशीरपणे गेल्या काही दशकात हिंदू चालीरीती, प्रथा, पद्धती यांच्या विरोधात काम चालू आहे. कदाचित तुम्हाला आत्ता समजणार नाही किंवा पटणार नाही, पण येत्या काही वर्षांत जेव्हा ठळकपणे कळेल तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली असेल. सध्याच्या जमान्यात फारसे कोणी कपाळाला गंध लावून कुठे जात नाही. ऑफिसमध्ये एक कोणी तरुण गंध लावून गेलं की चौकश्या, विचित्र नजरा आणि कदाचित चेष्टाही सहन करायला लागते. पण तेच बोकडासारखी दाढी वाढवलेला, लंडी प्यांट आणि स्कल क्याप घालून आला तरी फार कोणाला विशेष वाटत नाही. रोज मला देवळात जायचं असेल म्हणून मी १० उशिरा येतो म्हणलं की ऑफिसची पॉलिसी आडवी येते पण त्याच पॉलिसीमध्ये मात्र नमाज पढण्यासाठी सूट द्यावी हे लिहिलेलं असतं. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. राखी बांधून, मेंदी लावून शाळेत गेलेलं चालत नाही. याचं काय कारण असावं बरं? हिजाब किंवा जाळीची टोपी घालणे किंवा डोक्यावर पदर घेणे याचा हिंदू धर्माशी काय संबन्ध येतो तेही समजले नाही. हिजाब/ जाळीच्या टोपीचा हिंदू धर्माशी काहीच संबंध नाहीये, तुम्ही कशाला उगाच जोडताय? भारतात पडदा / गोषा / पदर ही पद्धत इस्लामी आक्रमणानंतर आलेली आहे. त्या अगोदर च्या इतिहासात या प्रथेचा कुठेच उल्लेख आलेला नाहिय्ये. बरोब्बर. म्हणजे आपली संस्कृती स्त्रीप्रधान किंवा स्त्रियांना पण सामान दर्जा देणारी होती. त्याचा संकोच इस्लामी आक्रमणामुळे झाला हे तर तुम्हाला मान्य आहे. त्या कालखंडात तलवारीच्या जोरावर आक्रमणं व्हायची. भारतीय राजांनी पण तलवारीच्या जोरावरच आक्रमणं केली. पण मुस्लिम आक्रमणात आणि हिंदू आक्रमणात एक मोठा फरक होता. मुस्लिम नुसते भूभागावर कब्जा करणे, पैसे लुटणे एवढेच न करता स्त्रियांना सुद्धा लुटायचे. त्यामुळेच मुस्लिम आक्रमक आले की हिंदू स्त्रिया लाज वाचवण्यासाठी "जोहार" करायला लागल्या. ज्या काळात "नृत्य करणारी,वाद्य वाजवणारी स्त्री श्रुंगार करणारी, वेणी फणी करणारी स्त्री अशा मूर्त्या आढळतात" त्या काळात सती प्रथा होती का? तर आता तलवारीच्या किंवा शस्त्रांच्या साहाय्याने सरळ आक्रमण शक्य नसल्याने छुपे आक्रमण चालू आहे. दहशतवादी हल्ले, ज्या देशात राहत आहेत तिथेच स्वतःचे घेट्टो बनवून रहाणे, इतर संस्कृतीत मिसळणे तर सोडा पण त्या लोकांना त्यांना पाहिजे तसे राहू न देणे, शरियाच्या मागे लपून सगळे प्रकार चालवणे, शरियाचा आग्रह धरणे, ग्रूमिंग गँग्स पोसणे हे सगळे छुपे हल्ले आहेत. तुम्हाला कदाचित ते जाणवत नसतील किंवा तुम्ही फारसं लक्ष देत नसाल पण म्हणून हे प्रकार चालत नाहीत असे समजणे म्हणजे गॉगल घालून मग अंधार पडलाय असे म्हणणे आहे. गंध लावणे, डोक्यावर पदर घेणे , मांसाहार करणे , राखी बांधणे , अनेक पत्नी / लग्ने करणे यातील कोणत्या गोष्टीने हिंदुत्व सिद्ध होते ते मांडावे मी कुठे म्हणलंय की हिंदुत्व सिद्ध करावे? उगाच नसते अर्थ तुम्ही काढताय. मला तुमचं वय माहित नाही पण निदान २० एक वर्षांपूर्वीपर्यंत तरी रोज संध्याकाळी मुलांना शुभम करोति, रामरक्षा, मारुती स्तोत्र, मनाचे श्लोक शिकवले आणि म्हणवले जायचे. आता किती घरात हे होतं? कदाचित सध्याच्या मुलांना विचारलं तर हे माहीतही नसेल. ब्रीटीश सरकारने बंद केलेल्या सती प्रथेच्या पुनरुज्जीवना बद्दल तुमचे मात काय आहे? ब्रिटिश सरकारने बंद केली होय! मला तर राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरोधात बरंच काम केलं होतं असं वाटायचं. असो, तुमचा दोष नाही, शाळेत शिकवलेच असे जात आहे. म्हणजे त्यावेळेला शासक असल्याने ब्रिटिश लोकांनी सतीविरोधी कायदा लागू केला म्हणून ब्रिटिशांनी बंद केली असं म्हणत असावे. पण सती पुनरुज्जीवित करावी असं तुम्हाला का वाटतंय? आणि ते तुम्ही मला का विचारताय? सती प्रथेवर आपण कधीच "मात" केलीच आहे.
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Mon, 04/08/2019 - 19:51 नवीन
गांधी हत्या कोणी केली ? शिखांचे सामुहिक हत्याकांड कोणी केले ? बिफच्या संशयावरून खून पाडणारे कोण ? काश्मिरी पंडितांना कोणी मारले ? मुंबई रेल्वे बॉंम्बस्फोट कोणी केले ? खलिस्तानचा भस्मासूर कोणाचा ? धर्माची गोळी घेतलेले अडाणी लोक सगळ्याच धर्मात असतात. तिव्रता कमी जास्त असते पण असे लोक असतातच. कुठल्याही ग्रंथात अशा गोष्टींना थारा नाही हीच गोष्ट जोरकसपणे पुढे आणणे हाच यावरचा उपाय आहे. मूळ ग्रथात तसे आहे हे तुम्ही मान्य केले तर फारच कमी मार्ग तुमच्या समोर राहतात.
  • Log in or register to post comments
श
शेंडेनक्षत्र Tue, 04/09/2019 - 05:00 नवीन
>> कुठल्याही ग्रंथात अशा गोष्टींना थारा नाही हीच गोष्ट जोरकसपणे पुढे आणणे हाच यावरचा उपाय आहे. मूळ ग्रथात तसे आहे हे तुम्ही मान्य केले तर फारच कमी मार्ग तुमच्या समोर राहतात. << धर्मग्रंथात काही वाईट नसते हे अत्यंत चुकीचे गृहितक आहे. अनेक धर्मग्रंथात अत्यंत भडक भाषेत हिंसेला प्रोत्साहन असते. बायकांना तुच्छ लेखलेले असते. आणि हे सगळे कमी म्हणून ते अत्यंत जुनाट, संदिग्ध भाषेत लिहिलेले असते. त्यामुळे धर्मग्रंथाना डोक्यावर घेणे बंद करावे. आधुनिक काळातील नियमांकरता धर्मग्रंथ प्रमाण मानणे मूर्खपणाचे आहे. ते देवाने लिहिलेले वा पाठवलेले वा सांगितलेले नसून जुन्या काळच्या विचारी लोकांनी लिहिलेले आहेत. त्या काळात कदाचित ते योग्य असतील पण आज नाहीत. असाच विचार हवा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 05/14/2019 - 08:40 नवीन
धर्मग्रंथात काही वाईट नसते हे अत्यंत चुकीचे गृहितक आहे. अनेक धर्मग्रंथात अत्यंत भडक भाषेत हिंसेला प्रोत्साहन असते. बायकांना तुच्छ लेखलेले असते. आणि हे सगळे कमी म्हणून ते अत्यंत जुनाट, संदिग्ध भाषेत लिहिलेले असते. त्यामुळे धर्मग्रंथाना डोक्यावर घेणे बंद करावे. आधुनिक काळातील नियमांकरता धर्मग्रंथ प्रमाण मानणे मूर्खपणाचे आहे. ते देवाने लिहिलेले वा पाठवलेले वा सांगितलेले नसून जुन्या काळच्या विचारी लोकांनी लिहिलेले आहेत. त्या काळात कदाचित ते योग्य असतील पण आज नाहीत. असाच विचार हवा.
त्रिवार सहमत
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 04/07/2019 - 04:29 नवीन
एवढंच नव्हे तर महाराष्ट्र ज्यांना राष्ट्रीय स्तरावरचे मराठी नेते म्हणून डोक्यावर घेतो त्याच शरद पवार आणि सुशीलकुमार शिंद्यांनी काय केलं ते बघा. मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले ते सगळे हिंदू बहुल भागात झाले. तेव्हा मुस्लिमांच्या विरोधात जनमानस तयार होऊ नये म्हणून त्या गोंधळात शरद पवारांनी १२वा स्फोट मस्जिद बंदर या मुस्लिम बहुल भागात झाल्याची खोटी बातमी देऊन टाकली. त्यावेळेला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर त्यांनी एका चर्चेत खोटं बोलल्याचं पण कबूल केलं. नंतर गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी सॅफ्रोन टेरर म्हणजे हिंदू दहशतवाद ही संज्ञा जाहीररीत्या मांडली. भाजप आणि आरएसएस हिंदू दहशतवाद पसरवतात असा आरोप त्यांनी केला. एवढं होऊनही दोघांनाही त्यांच्या मोठ्या संख्येत असलेल्या हिंदू समर्थकांनी विरोध केला नाही. अजूनही मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक आहेत, यावरून काय ते समजून जा. त्यामुळे धार्मिक आक्रमणाचा धोका अगदी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. वेळीच हिंदूंचे डोळे उघडले नाहीत तर पुढच्या दशकभरात हिंदूंना भारतातच दुय्यम वागणूक मिलाळायला लागली तर आश्चर्य वाटायला नको. हाच धोका युरोपात आणि इतर पाश्चिमात्य देशात आधीच अधोरेखित झाला आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 04/08/2019 - 12:35 नवीन
विजुभाऊ, तुम्ही विचारलेले वरील प्रश्न वाचले. तुम्ही म्हणता तशी ओरड भोंगळ व पसरट आजीबात नाही. काश्मिरातनं हिंदूंचा वंशविच्छेद केला हे सत्य आहे. आणि हा वंशविच्छेद ते हिंदू आहेत म्हणूनंच केला गेलाय. आता तुमचे एकेक प्रश्न बघूया. १.
१) कपाळावर गंध लावून हिंदू म्हणवून घेण्यात असे काय नक्की हशील आहे?
हाच प्रश्न केरळातल्या आणि काश्मिरातल्या मुस्लिमांना का केला जात नाही? कोणी हिंदूने कपाळावर टिळा लावला तर यांच्या पोटात इतकं का दुखतं? तीच गोष्ट कॉन्व्हेंटातल्या शिक्षकांची. मुलींनी मेंदी लावली तर इतका का थयथयाट? ख्रिस्ती धर्माच्या कुठल्या पुस्तकात बिंदी लावू नका म्हणून सांगितलंय? कुरणात कुठे गाय कापायला सांगितलीये? २.
२) गंध लावणे किंवा राखी बांधणे याला कोणत्या हिंदू धर्म ग्रंथाचा आधार आहे ते कधीच समजले नाही.
असा काही आधार नाहीच हे कशावरून? तुम्हांस कळलं नाही याचा अर्थ कमतरता तुमच्यात आहे. ३.
३) हिंदूत्व आणि शाकाहार याचा एकमेकांशी काहीही संबंध नाहिय्ये.
नाहीच्चे मुळी. हा बादरायण संबंध कम्युनिस्टांनी जोडलाय. त्यांना शाकाहाराच्या आडून सर्व हिंदूंना बदनाम करायचंय. ४.
बीफ खाणे आणि हिंदूत्व यांचा संबन्ध कसा लावता येतो तेही समजले नाही.
गाय हिंदूंचा पवित्र पशू आहे. हिंदू त्याचं मांस खात नाहीत. म्हणून बीफ खाणे हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे. ५.
४) एका पेक्षा अधीक लग्ने याला हिम्दू धर्माची मान्यता असावी ( कायद्याची म्हणत नाही. धर्माची म्हणतोय) कायद्याने सुद्धा काही अटींसहीत दुसर्‍या विवाहाला संमत्ती दिलेली आहे. याचा हिंदुत्वाशी सम्बन्ध कसा येतो ते ही समजले नाही
उत्तर सोप्पय. चारचार लग्ने करून मुसलमान उंदरासारखी वीण वाढवतात. याच वाढीव लोकसंख्येच्या आदरे वेगळा पाकिस्तान ओरबाडून काढण्यात आला. त्याचा त्रास हिंदूंना होतो. ६.
५) हिजाब किंवा जाळीची टोपी घालणे किंवा डोक्यावर पदर घेणे याचा हिंदू धर्माशी काय संबन्ध येतो तेही समजले नाही. भारतात पडदा / गोषा / पदर ही पद्धत इस्लामी आक्रमणानंतर आलेली आहे. त्या अगोदर च्या इतिहासात या प्रथेचा कुठेच उल्लेख आलेला नाहिय्ये. कुठल्याच भारतीय शिल्प कलेत मंदीरात पडदा घेतलेली / पदर घेतलेली स्त्री आढळत नाही. उलट नृत्य करणारी,वाद्य वाजवणारी स्त्री श्रुंगार करणारी, वेणी फणी करणारी स्त्री अशा मूर्त्या आढळतात.
अगदी बरोबर. हाच उदारमतवाद वाढीस लागावा म्हणून मुस्लिमांचा राजकीय पराभव करायला हवाय. ७.
गंध लावणे, डोक्यावर पदर घेणे , मांसाहार करणे , राखी बांधणे , अनेक पत्नी / लग्ने करणे यातील कोणत्या गोष्टीने हिंदुत्व सिद्ध होते ते मांडावे किंवा याही पुढे जाऊन हिंदुत्व हे कसे सिद्ध करता येईल याचे नेटके मुद्देसूद मार्गदर्शन केले तर समाजातील भटकलेल्या हिंदू तरुण मुलांना ते फारच उपयुक्त होईल.
तुम्ही खरंच बावळट आहात की केवळ सोंग आणताय? हिंदूद्वेष्ट्यांना हिंदूंना हिंदू म्हणून सुखाने जगू द्यायचं नाहीये. त्यासाठी गलिच्छ युक्त्या वापरण्यात येताहेत. या युक्त्यांच्या सहाय्याने हिंदूंनी हिंदूंचं हिंदुत्व सिद्ध करायचं म्हणताहात? ८.
जाता एक प्रश्ण विचारतो.: ब्रीटीश सरकारने बंद केलेल्या सती प्रथेच्या पुनरुज्जीवना बद्दल तुमचे मात काय आहे?
सतीचा हिंदू धर्माशी कसलाही संबंध नाही. हा विधवेचा वैयक्तिक निर्णय असतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 04/08/2019 - 12:46 नवीन
ट्रेड मार्क,
काही लोक हिंदू आणि पर्यायाने आरएसएस चा एवढा द्वेष का करतात हेच समजत नाही.
त्यांचं खरं लक्ष्य भारतीय राज्यघटना हे आहे. भारतीय राज्य व्यवस्था मोडकळीला येऊन भारताचे तुकडे पडले पाहिजेत असं यांचं स्वप्न आहे. रास्व संघ भारतीय एकात्मता साधू पाहतो म्हणून कुठूनतरी संघाचा द्वेष करायचा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 04/08/2019 - 23:11 नवीन
ब्रीटीश सरकारने बंद केलेल्या सती प्रथेच्या पुनरुज्जीवना बद्दल तुमचे मात काय आहे? हा एक ईंटरेस्टीग टॉपिक आहे ! जेंव्हा ब्रिटीश भारतात आले त्या वेळेला ईस्ट ईंडीया न कंपनी ने आपले बस्तान कोलकत्ता मध्ये बसवले होते. कोलकत्ता भारतातील एक प्रमुख बंदर होते. भारतातुन मसाल्याच्या पदार्था सकट ईतर अनेक सामान परदेशी पाठवले जायचे. भारताचा जीडीपी त्यावेळेला जागतीक जीडीपीच्या ३० - ३२ % होता. भारतासारख्या एका नविन देशात, भारताच्या व्यापारात ब्रिटीश आपले पाय रोउ पहात होते. त्याच वेळेला ईंग्लंड मधील चर्चना भारतात धर्म प्रचारासाठी येण्याची उत्सुकता लागुन राहीली होती . धर्माच्या प्रसारात भारतीय समाजाने उठाव केला , भारतातील राज्यांनी ब्रीटीशांना व्यापारासाठी दिलेली परवानगी काढुन घेतली तर मोठा घाटा होईल ह्या भीतीने ईस्ट ईंडीया कंपनी अश्या प्रकाराच्या चर्च पादरी यांच्या भारत प्रवासा च्या विरुद्ध होती. त्या काळी ईंग्लंडच्या राज्य दरबारात भारताच्या समाजाची , धर्माची चुकीची प्रतिमा करुन भारतीय जनतेला वाचवण्यासाठी ख्रीस्ती बनवणे अत्यावश्यक आहे हे मांडणे चर्चला भाग होते. त्यावेळच्या व्हॉईस रॉयला बंगाल मध्ये ( कलकत्ता मध्ये ) सती विरुद्ध कायदा करायला सांगीतला व दुसर्या दिवसा पासुन बंगाल म ध्ये सती प्रथा बंद झाली असा प्रचार करण्यात आला. सती प्रथा मुळातच फक्त राजस्थान मध्ये प्रचलीत होती. बंगाल मध्ये सती प्रथाच नसल्याने सती कायद्याने काहीही फरक पडला नाही पण अश्या प्रकारे ब्रिटीश राजवटीच्या डोळ्यात धुळ फेक करण्यात आली.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 04/09/2019 - 05:24 नवीन
तेंव्हा हिंदु समाजाला अतिरेकी ठरवायचा प्रयत्न केला गेला. तो प्रयत्न आता सर्व स्तरावर न्यायालयात फेल गेला.
अजमेर शरिफ खटल्यात भावेश पटेल आणि देवेन्द्र गुप्ता यांना न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 04/09/2019 - 10:40 नवीन
अनुप ढेरे, अजमेर शरिफ खटल्यात भावेश पटेल आणि देवेन्द्र गुप्ता यांना न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे. म्हणजे हिंदु समाज ही अतिरेकी आहे अस म्हणायच आहे का तुम्हाला ? अपवाद असु शकतात नाही का ? किंबहुना हिंदु समाजाने अतिरेकी होण्या ईतके अत्याचार सोसलेले आहेत त्या बद्दल तुम्हाला काय म्हणायच आहे ?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 04/09/2019 - 10:56 नवीन
@ अनुप ढेरे अश्या लुटुपुटीच्या घटनांचा रेफेरेंस देऊन तुम्ही हिंदू आतंकवाद आणि भगवा टेरर अश्या गोष्टींचा पुरस्कार करत असताल तर धन्य आहात तुम्ही.. आणि मग हाच न्याय लावायचा इस्लाम ला तर तर आतंकवादाचा कळस म्हणले पाहिजे. पण तो तुम्ही म्हणणार नाही. कारण जेव्हा "त्यांचा" विषय निघतो तेव्हा आतंकवादाचा कोणताही धर्म नसतो, रंग नसतो. मध्यन्तरी, बौद्ध लोकांनी हल्ला करून काही रोहिंग्या मुस्लिमांना मारले होते.. मग आता बौद्ध लोक पण आतंकवादी का?? त्यांच्या आतंकवादातचा रंग कोणता.? लाल कि केशरी? जरा पप्पू, दिग्गु किंवा सुशीलकुमार यांना विचारून त्यांचाही कलर फिक्स करा.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 04/09/2019 - 11:50 नवीन
हिंदु समाज अतिरेकी आहे असं कोणी म्हटलं? पण दशवादी केसेसमधले सर्व आरोपी सुटले आहेत हे चूक आहे एवढचं सांगायचं आहे. उर्मिला मतोंडकरटाइप विधानांचा मीही विरोधकच आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 04/10/2019 - 20:33 नवीन
This Navratri, I pray to Allah that no Laxmi is forced to beg, no Durga is killed in the womb, no Parvati has to give a dowry, no Saraswati is deprived of an education and no Kali has to use Fair and Lovely', Inshallah. हे ट्विट 2017 साली नवरात्रीच्या सुरुवातीला शबाना आझमी ने केले होते . आता ते ट्विट व त्यावर कंगना रणावत सारख्या फायरब्रांड तारकाचे उत्तर ईंटरनेटवर वायरल होत आहे !! हाईट म्हणजे अश्या ट्विट करणार्या लोकांना हिंदु समाजाकडुन कोणताही प्रतिकार / विरोध केला जात नसतानाही हे लोक हिंदु समाजावर असहिष्णु असल्याचा आरोप लावतात !! २०१७ चे ट्विट आता परत आले व त्या वर हिंदु समाजाची तिकट प्रतिक्रिया पाहिल्यावर शबाना आझमीने हे असल ट्विट केल्याचा ईंकार केला, पण नेटीझन्स ने पुरावा देउन शबाना आझमीला तोंडावर आपटल !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 04/11/2019 - 06:50 नवीन
भ्रष्ट कॉंग्रेस पक्षाची खेळी हिंदु समाजाने वेळी ध्यानात घ्यायला हवी आहे !! गेल्या दोन दशका अगोदर POTA (Prevention of Terrorist Act) सारखे कायदे आणणारा भ्रष्ट कॉंग्रेस पक्ष आता एकदम देशद्रोहाचा कायदा रद्द करायला निघाला आहे !! कॉंग्रेसने POTA (Prevention of Terrorist Act) सारखे कायदे आणले पण अतिरेकी घटना कमी करण्याचा प्रयत्न केला नाही ! स्वःताच्या मुस्लिम व्होट बँकवर अतिरेकी होण्याचे आरोप व्हायला लागले तेंव्हा हिंदु समाजाला अतिरेकी ठरवण्याचे कपटी खेळ हलकट कॉंग्रेसी नेत्यांनी केला !! निवडणुकीच्या काळात जनैयुधारी हिंदु बनुन हिंदु देवळांच्या पायर्या झिजवणार्या राहुल गांधीने यु एन ओ मध्ये "हिंदु अतिरेकी जगाला फार मोठा धोका आहे" अस जागतिक मिडीया समोर सांगीतल होत !! ह्याच कॉंग्रेस पक्षाने २०१४ ला जाता जाता कम्युनल व्हॉयलंस बिल नावाचा पुर्णपणे हिंदु विरोधी कायदा आणायचा प्रयत्न केला होता !! भाजपाच्या नेत्यांनी हिंदु समाजाला ह्याची जाणिव करुन द्यायचा प्रयत्न केला होता पण स्वःताच्या स्वार्थापुढे काहीही न बघणार्या हिंदु लोकांनी ईतक्या महत्वाच्या घटने कडेही दुर्लक्ष केले !! मुसलमान समाज हा न शिकणारा पर्याया ने प्रगती करु शकला नसला तरीही स्वःताच्या भल्या बुर्याची जाणिव त्यांना आहे !! त्यामुळे बराच मोठा भाग हा मा नरेंद्र मोदीजीं कडे आशेने बघत आहे !! त्या विरुद्ध सुशिक्षित प्रगतशील हिंदु समाज मात्र आत्म केंद्रित व सामाजीक बांधिलकी पासुन गाफिल राहिलेला आहे !!
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 04/12/2019 - 07:00 नवीन
पोटा वाजपेयींनी आणला होता काँग्रेस ने तो रद्द केला.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 04/12/2019 - 07:46 नवीन
पोटा वाजपेयींनी आणला होता काँग्रेस ने तो रद्द केला. माहिती बद्दल धन्यवाद !! ह्याने काँग्रेसची देश विरोधी विचारसरणी अजुन अधोरेखित होते !! आता तर , सत्तेत आल्यावर, देश द्रोहाचा कायदाही रद्द करणार अशी घोषणा काँग्रेसने निवडणुक घोषणापत्रात केलेली आहे !! हे सर्व फक्त मुसलमान समाजाला डोळ्या समोर ठेउन केलेले आहे ह्यात दुमत नसावे !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 04/12/2019 - 08:09 नवीन
नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, लिलीएट दुबे, अनुराग कश्यप, अमोल पालेकर आदींसह सुमारे ६०० कलाकारांनी 'या निवडणुकीत भाजपला मतदान करू नये', असे आवाहन केलेले आहे ! ह्या निवडणुकीत काही बॉलीवुड कलाकारांनी उघडपणे श्री मोदी विरुद्ध भुमिका घेउन भाजपाला मत देउ नका असे आवाहन केलेल आहे !! भाजपा सरकारने जनते साठी काय केले त्याचा स्वःताच विचार करुन जनतेने आपले व्होट द्यायला पाहिजे तेंव्हा अश्या बायस्ड कलाकारांच्या सल्ल्याची काय गरज आहे ? हा आचार संहितेचा भंग होत नाही ? असो !! भाजपा सरकार विरुद्ध ह्या कलाकारांना काय तक्रार असेल ती असो पण उद्या मोदी सरकारने आणलेल्या विकासाच्या मॉडेलचा उपभोग घेण्यापासुन ह्या कलाकारांनी स्वःताला थांबवले पाहीजे !! उ दा अमोल पालेकरांनी मुंबई पुणे ऐक्सप्रेस वे ने जाणे बंद करावे कारण तो भाजपा सरकारने बांधलेला आहे !!
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Fri, 04/12/2019 - 10:21 नवीन
जर कलाकारांनी सल्ला दिलेला असेल तर ते चूक आहे. जर ते मत असेल तर त्याचा आदर ठेवायला हवा. सल्ला जरी दिलेला असला तर ती एक नैतिक चूक म्हणायला हवी , तरीही आवाहन जर संविधानिक चौकटीत असेल तर तुम्ही त्यावर हरकत घेऊ शकत नाही. बाकी आचारसंहितेबद्दल तो आयोगच जाणे. केवळ काही कलाकारांचा सल्ला ऐकून मतदार निर्णय घेत नसतो. असे असते तर काही जणांचीच तळी उचलून धरणारे न्यूज चॅलेनला काय म्हणाल ? आणि जरी आपल्या विरोधी विचाराचे सरकार सत्तेत असले तरी कोणत्याही नागरिकाचा देशाच्या साधनसंपत्तीवरचा हक्क तसाच अबाधित राहतो कारण अप्रत्यक्ष्यरित्या नागरिकांचाच पैसा सरकार वापरत असते. आणि शेवटी कोण किती बायस्ड आहे हेही आपण ठरवणे माझ्यासाठी तरी अयोग्यच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/12/2019 - 14:19 नवीन
शब्दानुज, बऱ्याच कलाकारांचं म्हणणं असतं की कला आणि राजकारण वेगवेगळे हवेत. अशांनी भाजपला मत देण्याचं आवाहन करणं चुकीचं आहे. भले भाजपचा व/वा मोदींचा कितीही निषेध केला तरी चालेल. ते मतप्रदर्शनाचं आहे व त्याचं पूर्ण स्वातंत्र्य सर्व नागरिकांना आहे. मात्र ज्या कलाकारांना कला व राजकारण यांत फारकत अपेक्षित आहे त्यांनी अमुकेक पक्षास मत देण्याचं वा न देण्याचं आवाहन करणं निखलास चुकीचं आहे. त्यामुळे अमोल पालेकरादि उपरोक्त कलाकार कला व राजकारण एकमेकांत मिसळू पाहताहेत. त्यात काही चुकीचं नाही. फक्त उपरोक्त कलाकारांना कला आणि राजकारण यांच्यात फारकत करण्याचा नैतिक अधिकार नाही. नेमका हाच नियम मोदींना मत द्या म्हणून आवाहन करणाऱ्या शरद पोंक्षे आदि कलाकारांनाही लागू पडतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 04/12/2019 - 12:14 नवीन
कोणत्याही नागरिकाचा देशाच्या साधनसंपत्तीवरचा हक्क तसाच अबाधित राहतो कारण अप्रत्यक्ष्यरित्या नागरिकांचाच पैसा सरकार वापरत असते. हे काही पटले नाही !! कारण गेल्या ७० वर्षांत सलग सत्ता हाती असलेल्या पक्षाने सर्व साधन साम्रुग्री असतानाही विकासाची कामे केलेली नव्हती !! ह्या सरकारने विकासाची कामे केली , त्यामुळे त्या कारणावर ह्या सरकारला मात देता येणार नाही म्हणुन असहिष्णुता वैगेरे शोधुन काढले गेले !! मोदीजींचा ईतकाच तिटकारा असेल तर मुंबई पुणे द्रुत गती महा मार्गा ऐवजी दुसर्या जुन्या रोडने प्रवास करावा !! मोदी नकोत पण सरकारने तयार केलेल्या सुविधा हव्यात , हे चुकीच वागण झाल !! मोदीजींनी भारतीय नागरिकाच्या जिवंनावर ईतका खोलवर ठसा उमटवला आहे की जाणीव पुर्वक प्रयत्न करुन ही कोणी त्यातुन कोरडा रहाणार नाही ! आज आपल्या घरा भोवतालची स्वच्छता हवी आहे याचे कारण स्वच्छतेला दिलेले महत्व !! पंत प्रधानांची सर्व काम करत असताना सुद्धा त्यांनी आपल्या मतदार संघ वाराणसीचा कायापालट करुन दाखवला !! पाच वर्षांत वाराणसी पुर्ण पणे बदलली आहे !! हिच गोष्ट राय बरेली किंवा अमेठी बद्दल झाली नाही !! काम केलेली आहेत त्यामुळे परत पंत प्रधान श्री मोदीजीच बनणार. पण त्यांना विरोध करणार्यांनी आपला विरोध सोडु नये असहकार करुन तो सर्वांना जाणिव करुन द्द्यावा !!
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 04/12/2019 - 17:52 नवीन
अगदी बरोबर.. मोदींचा इतकाच तिटकारा असेल तर ज्यांनी ज्यांनी नवीन घर घेताना 2.5 लक्ष रुपयांची सबसिडी पदरात पाडून घेतलीये त्यांनी पण ती परत द्यावी. च्या मायाला.. हे बर आहे.. म्हणजे सरकार ने ज्या ज्या सुविधा दिल्या त्या वापरायच्या पण मत द्यायची वेळ आली कि मोदिंना विनाकारण शिव्या घालायच्या. आणि त्यांची बाजू घायची ज्यांनी फक्त लावालावी, लूट, भ्रष्टाचार आणि घराणेशाही केली.. वा रे मतदार.. !!! अजुन एक किस्सा. माझ्या मते मोदींच्या सरकार मध्ये रेल्वे चा खऱ्या अर्थाने विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. त्याचाच एक भाग म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस. हि भारतातील नव्याने तयार केलेली आधुनिक, आरामशीर आणि वेगवान रेल्वे. तर असच एकदा ऑफिस मध्ये चाय पे चर्चा करत असताना एक जण तावातावाने सांगत होता. हि रेल्वे फक्त कलर आणि डिझाईन वर फोकस केलेली आहे, आतून सगळे जुनेच सिस्टिम आहे. आणि मोदीनीं या रेल्वे चे नाव वंदे भारत हे जाणूनबुजून ठेवलेय. त्यांना खरेतर वंदे मातरम ठेवायचे होते पण तसें म्हणलेले आम्हाला चालत नाही म्हणून वंदे भारत असे नाव ठेवले गेले.. मनात आले कि याला सांगावे कि वंदे भारत आणि वंदे मातरम हे दोन्ही एकच आहेत. आणि तुझ्यासारख्याला एवढाच त्रास होत असेल तर तू बसू नको त्या ट्रेन मध्ये.. बैलगाडी ने जा. पण हे फक्त मनातच आले.. कारण बोलायच्या आधी संस्कार आडवे आले. - त्याला वाईट वाटू नये.. त्याच्या भावना दुखावल्या जाऊ नये.. इ इ.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 04/13/2019 - 05:24 नवीन
"अमूक तमूक पक्षाला मतदान करू नका. "यापेक्षा , "फलान्या ढिमक्या पक्षाला (प्रचंड बहुमताने ) निवडून द्या" असं असायला नको का ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 04/13/2019 - 09:47 नवीन
"अमूक तमूक पक्षाला मतदान करू नका. "यापेक्षा , "फलान्या ढिमक्या पक्षाला (प्रचंड बहुमताने ) निवडून द्या" असं असायला नको का ? अमूक तमूक पक्षाला मतदान करू नका हे सांगणे सोप्पे आहे, फलान्या ढिमक्या पक्षाला (प्रचंड बहुमताने ) निवडून द्या म्हणताना कोणाच्या तोंडाकडे बोट दाखवणार ? खरतर त्या लोकांची गोची झालेली आहे. पण उपाय नाही कारण , खाल्ल्या मिठाला जागायला पाहीजे ना ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 04/19/2019 - 07:05 नवीन
भाजपाने भोपाळ मतदान क्षेत्रात कॉंग्रेसच्या दिग्विजय च्या विरुद्ध साध्वी प्रग्या सिंगला उभ केलल आहे ! कॉंग्रेसच्या दिग्विजय ला ह्य निवडणुकीत हरवण्याचा विडा साध्वी प्रग्या सिंगने उचललेला आहे !! हिंदु आतंक नावाच्या नविन शब्दाला जन्म देणार्या ह्रा राक्षसा विरुद्ध ८ वर्षे तो अत्याचार सहन करणार्या प्रग्या सिंग यांचा हा संग्राम आहे !! भाजपाच्या ह्या डावा मुळे काश्मिर मधल्या फारुख अब्दुल्ला व ओमार अब्दुल्ला पासुन भारतातल्या अर्बन नक्षल वाद्यांना पत्रकारांना बराच झटका बसलेला आहे ! ह्या लोकांना हिंदु आतंकवाद पुनरुत्जिवित करायचा आहे , त्यासाठी हे लोक कोणत्याही पातळीवर जायला तयार आहेत !! कॉंग्रेसच्या दिग्विजय च्या विरुद्ध साध्वी प्रग्या सिंग ह्या सामन्यात दिग्विजय हरला तरीही विषेश काही होणार नाही कारण ह्या मानसिकतेला धक्का बसणार नाही !! कॉंग्रेसच्या दिग्विजय सींग, सुशिलकुमार शिंदे, पि चिदंमबरम, शिवराज पाटील सारख्या लोकांना शिक्षा होणे गरजेचे आहे ! ह्या लोकांनी कित्येक निरपराध हिंदु लोकांना कित्येक वर्षै तुरुंगात डांबुन त्यांच्यावर अत्याचार करुन अपराध कबुल करुऩ घ्यायचा प्रयत्न केलेला होता ! अश्या सर्व लोकांना धडा शिकवलाच पाहिजे !! मुसलमान धर्मा विरुद्ध बोलण्याची भारतातच काय पण जगात कुठेही कोणाचीही हिंम्मत होत नाही कारण तसा धाक आहे पण भारतात हिंदु बहुल देशात मात्र हिंदु विरुद्ध कोणी काहीही बोलु शकतो काम करु शकतो !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 05/14/2019 - 08:20 नवीन
India’s 1st terrorist was Hindu, says Kamal Haasan, kicks up a storm आयुष्य भर अ‍ॅक्टींग केल्यानंतर शेवटची ऊरलेली वर्षे हा माणुस नेता गीरी करायला उतरलेला आहे. मुळात हिंदु असलेला कमल हसन आता स्वःताला नास्तिक म्हणवतो. (सार्वजनीकरीत्या नास्तिक हे फक्त हिंदु च असु शकतात बाकिच्या धर्मात ही सवलत नाहीय ) आता ह्या नटाला गांधी हत्या करणार्या माणसात एक अतिरेकी दिसतो आणी उघडपणे तो हे म्हणु शकतो की नथुराम गोडसे हा हिंदु अतिरेकी होता. कारण हिंदु हा टीका करण्यासाठी सर्वात सोफ्ट टारगेट आहे. सर्वात खालच्या लेव्हलची टीका करुन ही हा समाज काहीही करत नाही. कोणताही फतवा नाही !! अश्या लोकांना कसा धडा शिकवावा ह्या बद्द्ल समाजात मंथन होणे गरजेचे आहे. https://timesofindia.indiatimes.com/elections/news/indias-1st-terrorist-was-hindu-says-kamal-haasan-kicks-up-a-storm/articleshow/69315777.cms
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 05/14/2019 - 09:34 नवीन
च्यायला, मग भारतावर आतंकी आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानला पैसे पुरवणारा गांधी टेररिस्ट फायनान्सर होता त्याचं काय? -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/14/2019 - 09:54 नवीन
कमल हासनचा निषेध आहेच पण गांधीजींबद्दल इतकी तुच्छतापूर्वक भाषा वापरणार्‍या आणि त्यांना मुद्दामहुन तशी संधी उपलब्ध करुन देणार्‍यांचा मिपावरील प्रव्रुत्तींचा जाहीर निषेध.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 05/14/2019 - 19:57 नवीन
दाखवली तर इतका त्रागा कशाला? चरखा चलाचलाके आणि सत्याग्रहाने इंग्रज भारत सोडून गेले हे कधीच न मानणारा एक देशवासी. स्वतःला देवत्व मिळावे म्हणून हिंदू धर्माची व फक्त हिंदू धर्माची घुसमट करणारा एक कॉंग्रेसी म्हणून गाँधीची ओळख व्हावी असे मनापासून वाटते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 05/14/2019 - 08:56 नवीन
'हिंदू धर्म आणि धर्मीय काळाच्या ओघात सुधारणा स्विकारताना दिसतात, शांततेच्या धर्म आणि धर्मीयांनीही सुधारणा स्विकारणे अभिप्रेत आहे.' असा युक्तिवाद (भूमिका मांडणी) हिंदूत्ववाद्यांकडून येताना का दिसत नसावा ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 05/14/2019 - 12:46 नवीन
'हिंदू धर्म आणि धर्मीय काळाच्या ओघात सुधारणा स्विकारताना दिसतात, शांततेच्या धर्म आणि धर्मीयांनीही सुधारणा स्विकारणे अभिप्रेत आहे.' असा युक्तिवाद (भूमिका मांडणी) हिंदूत्ववाद्यांकडून येताना का दिसत नसावा ? याचा ईथे काय संबंध ? बहुद्दा हिंदु असलेल्या लोकांकडुनच हिंदुंना अतिरेकी ठरवले जाते असे असताना ईतर धर्मीयांनी सुधारणा स्विकारावी अथवा न स्विकारावी याचा ईथे काय संबंध ? हेच ईतर हिंदुंना अत्तिरेकी म्हणणारे ईस्लामला शांतता प्रिय धर्म वैगेरे म्हणतात ! ह्याचा एकच अर्थ निघतो की ह्या भित्र्या लोकांना माहित आहे की ईस्लामला नाव ठेवणे म्हणजे आपल्या जी वावर उदार होणे पण हिंदु विरुद्द काही म्हणा हे षंढ हिंदु काहीही करणार नाहीत. बाळा साहेब असताना एक जरब होती मिसिंग हीम !!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 05/14/2019 - 14:26 नवीन
ह्म्म पण 'थोरल्या ठाकरेंचा' एवढा विसर पडावा ? ठाकरेंमध्ये थोरले कोण ?
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 05/14/2019 - 12:35 नवीन
काडी टाकली आणी भाऊ logout झाले. बहुतेक महासभेचे काम करतात भालचंद्र बरोबर.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा