मरणावरती बोलू काही
तर मिपाकरांनो , आज आपण सर्व एका आगळ्यावेगळ्या , काही प्रमाणात नकोश्या वाटणाऱ्या या मरणावर बोलूयात . कदाचित हा विषय , मला माहित नाही पण याआधी इथे चर्चिला गेलाही असेल पण मी बोका साहेब गेल्यापासून ते आजपर्यंत तोच विचार मनात घोळवत आलोय ...
जगण्याचं कारण इथे प्रत्येकाकडे असतं किंबहुना ते असावंच लागतं, तेव्हा कुठे जगणं जीवन बनतं . पण मरणाबद्दल काय ? त्याच्या बद्दल कुणाकुणाला काय वाटतं ..
मला विचाराल तर मला मरणाकडून फार सुंदर अपेक्षा आहेत .. वयाची अठ्ठाविशी ओलांडण्यापूर्वी मला सीमेवर वीर मरण पाहिजे होतं पण आता ते शक्य नाही . कारण मी ती वयोमर्यादा ओलांडल्यामुळे कुठल्याही सैनिक/पोलीस भरतीसाठी पात्र ठरत नाही .
आता निदान कुढत कुढत अक्षरशः कुणावरतरी ओझं बनून मरायचं नाही आहे . मला मरण हे नैसर्गिक आलेलं आवडेल . कुठलातरी असाध्य आजार होऊन, औषधे खाऊन , मरणासन्न होऊन मरायचं नाही आहे .
मला मरण्यापूर्वी किमान पन्नास झाडं लावून त्यांचं यथासांग संगोपन करायच आहे . ती पूर्णपणे जोमात वाढलेली बघायची आहेत.
रक्तदान करायचं आहे . आतापर्यंत दहावेळा केलेलं आहे . त्यामध्ये सात वेळा मी माझ्या आईसाठी दिलेले आहे आणि तीन वेळा मित्रांसाठी . पण किमान शंभरी गाठायची आहे . आणि मेल्यानंतर माझ्या वापरण्यायोग्य अवयवांचे दान , कुणातरी गरजूला .
मागील गेले तीन वर्षे , आईच्या आजारपणापासून मी नित्यनेमाने वाशीखाडीपुलावर उभा राहून दोनशे रुपयांचा खाऊ समुद्रात अर्पण करतो . सुरुवातीला मी वीस रुपयांचा खाऊ द्यायचो , आता वाढत जाऊन ते दोनशे रुपये झालेले आहेत . आशा आहे कि ते असेच वाढत जाऊन लवकरच दोन हजार रुपये व्हावेत .
चिक्कार दानधर्म करायचा आहे आणि समाधानाने वर जायचे आहे .
तर पन्नास झाडे , रक्तदान , अवयव दान ( मरणोत्तर ) आणि दानधर्म आणि वाराच्याकडून बक्षीस म्हणून एक सुखासीन मरण पाहिजे . कसं ते त्याने ठरवावं पण त्याआधी निदान कर्णाच्या बाजूला नसलो तरी एक पाऊल मागे असावं .. हीच त्या विधात्याकडून अपेक्षा आहे ..
मला मिपाकरांच्या मरणाबद्दलच्या संकल्पना ऐकायला आवडतील .. जेणेकरून मीही ठरवेन कि मरण कसं असलं पाहिजे .. कृपया आपला अभिप्राय इथे नोंदवावा आणि हो उद्या मी नसणार आहे तेव्हा मी आपले अभिप्राय परवा वाचेन बरं का आणि त्यावर प्रतिसादेन . नाताळाच्या आगाऊ शुभेच्छा सर्वाना .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
🗣 चर्चा
(79)
म
मुक्त विहारि
गुरुवार, 12/27/2018 - 12:33
नवीन
उगाच हाल-हाल होऊन मरण्यापेक्षा, शांतपणे ह्या जगाचा निरोप घेणे, कधीही उत्तमच...
- Log in or register to post comments
N
NiluMP
गुरुवार, 01/17/2019 - 12:39
नवीन
कोणाकडे पाहुणे म्हणून गेल्यावर त्याला कंटाळा येईल इतके दिवस आपण कधी रहातो का? तसेच या जगाचे. -- झकास
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Wed, 12/26/2018 - 14:55
नवीन
अहो नाही ओ यशोधरा ताई .. ती बिस्किटे माशे आणि कावळे यथेच्छ ताव मारून खातात .. एकदा मी पाल्रे जी सोडून दुसरी चॉक्लेटवली बिस्किटे आणली होती तर त्यांना कावळ्यांनी तोंडही लावले नाही .. याचा अर्थ ते फक्त खाण्यायोग्य वस्तू असेल तरच खातात , हे माझे निरीक्षण आहे . आणि हो वर म्हंटल्याप्रमाणे मी याआधी बिस्कीट पुड्याची वेष्टने रस्त्यावर फेकून देत होतो पण आता ते थांबवणार आहे . ती सर्व गोळा करून कचरापेटीत टाकत जाईन .
हि सर्व माहिती मी गोळा करत नाही आहे , लोकांचा मृत्यूबद्दल काय दृष्टिकोन आहे ते बघतो आहे . प्रत्येक जीव हा त्याला सामोरा जाणार आहेच पण त्याआधी त्याने कसे जगावे किंवा त्याला कवटाळण्याआधी काय काय करावे जेणेकरून ते सुसह्य होईल हे तपासतो आहे .. बाकी काही नाही
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
Wed, 12/26/2018 - 15:02
नवीन
मी नेहमी गमतीने म्हणतो. कार्यालयात प्रथमोपचार पेटी, औषधे इ. माझ्याकडे असे. कोणी डोकेदुखीची गोळी मागितल्यावर मी बंदुकीची चालेल का म्हणून विचारीत असे.
जन्म ते मृत्यू हा एक प्रवास मानला तर शैशव, विद्यार्जन, अर्थार्जन, विवाह, संतती, मुलांचे शिक्षण, मुलांच्या अर्थार्जनाला सुरुवात आणि मुलांचे विवाह हे या प्रवासातले मु़ख्य टप्पे मानता येतील.
हे सर्व टप्पे पार करण्यापूर्वी मृत्यू ओढवल्यास अवलंबितांची ओढाताण होऊ शकते. असा मृत्यू कविकल्पनांना मागे सारून दुःखदच म्हणावा लागेल.
मी हे सर्व टप्पे आता पार केल्यामुळे मृत्यूला सामोरे जाण्यास मुक्त आहे. कोणताही गंभीर आजार मला झाल्यास मी कोण्तीही उपाययोजना न करता अन्नपाण्याचा त्याग करून स्वतःचे जीवन संपविणार आहे. तसे सर्व जवळच्यांना सांगितले आहे. प्राणांतिक आजार झाल्यावर उपाययोजनेत पैसे उधळणे मला बरोबर वाटत नाही. स्वा. सावरकरांनी हीच पद्धत अवलंबिली होती.
समुद्रात काही टाकणे हे टाकणार्याला जरी भावनिक समाधान देणारे असले तरी ते वृथा आहे, त्याचा कुणालाही उपयोग होत नाही वा गेलेल्या व्यक्तीची स्मृती देखील मागे राहत नाही. असे माझे वैयक्तिक मत आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर दशक्रिया, श्राद्ध इ. विधीत व्यर्थ खर्च न करता स्वकीयांपैकी गरजू विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती ठेवली होती. आमच्या गावी काही व्यक्तींनी आवडत्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ गावच्या ग्रंथालयाला घसघशीत रकमांची नवी पुस्तके विकत घेऊन दिली आहेत.
अर्थात ही माझी वैयक्तिक मते आहेत, तीच श्रेष्ठ असा माझा बिलकुल दावा नाही.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 12/26/2018 - 17:02
नवीन
चांगलं मरण आल पाहिजे ही तर सर्वांची इच्छ्य असते त्यात काही वाईट नाही.पण हे आपण कसं आयुष्य जगतो ह्यावर अवलंबून आहे हे लोक विसरतात .योग्य आहार,योग्य व्यायाम,निरोगी विचार ,निगेटिव्ह पूर्ण टाळणे हे सर्व ज्याला जमलं तो निरोगी जगाला .आपलं होतंय काय जवानी,आणि बालपण आपण आपल्या मर्जीने जगतो बालपण मध्ये जाणीव नसते आणि तरुणपणात जवानीची नशा .आरोग्य ची आठवण येते 30 वर्ष ओलांडल्यावर मग डाएट काय व्यायाम काय त्याचा काही फायदा नाही .मराठी म्हण करून करून दमला आणि देवपुजेला लागला देव पावण्याची बिलकुल शक्यता नाही
- Log in or register to post comments
व
वीणा३
Wed, 12/26/2018 - 16:26
नवीन
जिवंत असे पर्यंत जेवढा जमेल तेवढा करायचं, जास्त त्रास करून घ्यायचा नाही कारण कितीही केलं तरी काहीतरी राहिलं अशाच वाटेल.
माझ्या आई-बाबानी देहदान चा फॉर्म भरून ठेवलाय आणि जवळच्या सगळ्या नातेवाईकांना सांगून ठेवलाय कि फॉर्म इथे आहे त्याच्यावर फोन करा. १०-१२ व करायचं नाही, केलं तर आमचा आत्मा भटकत राहील. अगदीच विचित्र वाटत असेल तर आमच्या १० व्य ला सगळ्या नातेवाईकांना पत्ते खेळायला बोलावं आणि आईस क्रीम खायला दे. आईस्क्रीम आणि पत्ते हा दोघांचा आवडता प्रकार.
अवांतर - मला ना मेल्यावर भूत व्हायचंय आणि ४-५ लोकांच्या घरी जाऊन त्यांची भांडी पाडून दार-खिडक्या उघड्या करून यायचंय. आणि जे काय जग बघायचं राहिलाय ते वरून बघायचंय, तिकीट बुक करा, हॉटेल बघा, कपडे पॅक करा काय कटकट नाही :P
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/27/2018 - 05:23
नवीन
मायला . लैच्च भारी की. बकेट लिस्ट मधे अॅड करायला हवं हे
- Log in or register to post comments
ख
खिलजि
गुरुवार, 12/27/2018 - 12:18
नवीन
एक नंबर लिवलंय ,, विना तै .. लय आवडलंय .. भारी
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
गुरुवार, 12/27/2018 - 01:56
नवीन
लिहायच्या राहून गेल्या.
१. माझा मेडिकल इन्शुअरन्स आहे.
२. माझ्या कौटुंबिक जबाबदार्या पूर्ण करण्याआधी मला न उचलल्याबद्दल निसर्गाचे आभार.
३. एका वेगळ्या विषयावरच्या लेखाबद्दल लेखकाचे आभार.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 12/27/2018 - 05:26
नवीन
या वाक्यांशी १००% सहमत.
बाकी जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याबद्दल विचार न करता "अपना हर दिन ऐसे जियो...जैसे के आखरी हो..." या गाण्या प्रमाणे मजेत जगात राहावे :)
- Log in or register to post comments
ख
खिलजि
गुरुवार, 12/27/2018 - 12:26
नवीन
प्रत्येकाला व्यनि करण्याऐवजी , समस्त मंडळींचे इथेच आभार मानतो .. धन्यवाद
- Log in or register to post comments
म
मालविका
गुरुवार, 12/27/2018 - 16:15
नवीन
पण अजूनही मला समुद्रात बिस्किटे टाकणे विचित्र वाटते . मी खूप भावनिक विचार नाही करत म्हणून असेल कदाचित पण तेच बिस्कीट पुडे गरजूना देणं जास्त बरोबर वाटत . मानसिक समाधान हे कारण कितीही बरोबर असलं तरी हे म्हणजे शंकराच्या पिंडीवर दुधाच्या पिशव्या ओतायच्या नि बाहेर कोणीतरी दुधाशिवाय तडफडतोय त्याबद्दल हळहळायचं . याला अर्थ नाही . अर्थात प्रश्न सर्वस्वी तुमचा आहे .
- Log in or register to post comments
ख
खिलजि
गुरुवार, 12/27/2018 - 16:33
नवीन
अहो मालविका ताई , मी जेव्हा पुलावर उभा असतो तेव्हा तिथे रस्त्यावर फिरणारे गरीब लोकही येतात कि मागायला . मी खुशाल देतो त्यांना , पाहिजे तेव्हढे . आणि उरलेले समुद्रात टाकतो . मासे आणि चिमणी कावळे यांचेही बघायला नको का .. तेव्हढेच नाही तर मी माझ्या हॉलपासून बेडरूममपर्यंत दररोज पाण्याची भांडी भरून ठेवलेली असतात . नेहेमी तिथे कबुतरे, चिमण्या , साळुंक्या , कावळे आणि पोपटही येतात बरे का .. अहो मला हेच तर म्हणायचे आहे , सुख द्यायचे आणि तेच परत मिळवायचे .. या एकाच तत्वावर मी विश्वास ठेवून चाललेलो आहे सध्या . बघू पुढे काय होतंय ते ..
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 12/27/2018 - 17:14
नवीन
कबुतरे जर हॉल, बेडरूम वगैरे ठिकाणी येत असतील तर तिथे इतर कोणीही पक्षी फिरकणार नाही. कावळे कबुतरांच्या जवळही फिरक त नाहीत. साळुंकी एक वेळ ठीक. चिमण्या पण येणार नाहीत, कबुतरे असली तर.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 12/27/2018 - 18:02
नवीन
कबुतरांचा त्रास तर सर्वत्र जाणवायला लागला आहे आज काल आणि मी तरी त्या गोष्टीसाठी त्यांना खाद्य घालणाऱ्यांना जवाबदार ठरवतो...अरे तुम्हाला आवड असेल तर कुत्र्या-मांजरा प्रमाणे पाळा कि तुमच्या घरात का उगाच त्यांना दाणे देऊन दुसऱ्यांना त्रास देता!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/28/2018 - 05:42
नवीन
काय बोलणार?
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Fri, 12/28/2018 - 11:38
नवीन
अहो यशोधरा ताई . मला तुमचे हे म्हणणे पटले नाही बरे का .. कारण मी स्वतः सुट्टीच्या दिवशी निरीक्षण केलेले आहे . कबुतरे, कावळे चिमण्या आणि साळुंक्या सर्व जण आलटूनपालटून येत असतात .. खास करून कावळ्यांनी त्यांच्या निर्भीड स्वभावामुळे स्वयंपाक खोलीच्या खिडकीवर ताबा संगीता आहे . तिथे चिमण्यांची येतात . आणि कबुतरे मात्र हौलच्या खिडकीत आढळतात . मी सर्व खिडक्या मोकळ्या ठेवल्या असल्याने कुणीही तिथे स्वतःचंही कुटुंबे थाटली नाही आहेत . फक्त प्रत्येक खिडकीत एक टाइल ठेवलेली आहे , त्यावर दानपाण्याची व्यवस्था असते . ज्या काही अक्षता ( देवाला वाहिलेले तांदूळ ) मी सकाळी प्रत्येक टाईलवर टाकतो , ते कबुतरे आणि चिमण्या येऊन टिपून जातात .. दुसरे काही नाही ..
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 12/28/2018 - 13:22
नवीन
हॉल, बेडरूममध्ये येणारे पक्षी आता खिडकीवर गेले, प्रगती आहे :)
खिडकीशी पक्षी येऊ शकतात, खाणे रोज ठेवत असाल तर.
आम्ही सुद्धा ठेवतो आणि तिथे सन बर्डस, बुलबुल पासून तुम्ही उल्लेखिलेले सगळे पक्षी येतात, फक्त हॉल, बेडरूम, स्वयंपाक घर इथे येत नाहीत. नाही म्हणायला कावळे प्रयत्न करू पाहतात, कधी कधी.
असो. :)
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Sat, 12/29/2018 - 10:44
नवीन
यशोधरा ताई , मला खिडकीमध्ये येणाऱ्या पक्ष्यांबद्दलच बोलायचे होते .. माझ्या घरात कुठलाही पक्षी येत नाही .. कबुतर किंवा कावळा आला तरीही माझा छोट्या त्यांना बाहेर तत्पर हुसकावून लावतो किंवा आरडाओरडा तरी करतो ..
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sun, 12/30/2018 - 07:05
नवीन
तुम्हीच लिहिले होते बरं का दादा. म्हणून म्हटले. असो.
आता जे काही लिहिले आहेत, की खिडकीपाशी पक्षी येतात, ते पटण्याजोगे आहे. अगोदर लिहिलेले तसे नव्हते. लिहिण्याच्या उत्साहाच्या भरात असे लिहिले गेले, असे समजते, काय? पक्ष्यांची वागायची एक पद्धत असते, त्या बाहेरचे काही सांगितलेत तर ते पटण्याजोगे नाही, इतकेच.
- Log in or register to post comments
व
वेडसर
Fri, 12/28/2018 - 06:04
नवीन
इतकेच सांगू शकेन की मरणाइतका अन्य कुणी सच्चा सखा नाही. मरणाहून अधिक शाश्नत, सत्य असे अन्य काहीही नाही.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Fri, 12/28/2018 - 11:45
नवीन
टर्मिनेटर साहेब , हा जो कबुतरांचा त्रास होतो ना त्याला आपणच जबाबदार आहोत .. जर आपण आपापल्या खीडक्या नीट मोकळ्या ढाकळ्या ठेवल्या तर मला वाटते कबुतरे तिथे संसारच मांडणार नाहीत . स्वतः बघितलेले आहे म्हणून सांगतो . आमच्या इथे लोकांनी कबुतरे येऊ नये म्हणून , जाळ्या लावलेल्या आहेत आणि बरीच अडगळ तिथे मांडून ठेवलेली आहे . मी टॉप फ्लोअरला राहत असल्याने माळ सर्व व्यवस्थित दिसते . होते काय कि , त्यातील बर्याच जाळ्या कालांतराने खराब होतात आणि कबुतरांना म्हणा किंवा चिमण्यांना म्हणा तिथे आयते बस्तान मांडायला वाव मिळतो .. पिलावळ वाढली तर आणि उडून गेली तर ठीक पण काही कारंणाने कावळ्यांनी हल्ला चढवला तर तिथे त्या अडगळीतच घाण होते आणि मला वाटत सणासुदीखेरीज आजकाल कोण अश्या ठिकाणी साफसफाई करत नाही . तेव्हा मग पुढे सर्व घाणीचे साम्राज्य चालू होते .. बाकी मी जे काही करतो ते माझे नित्यकर्म म्हणून करतो आणि पुढेही करत राहीन . धन्यवाद
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Fri, 12/28/2018 - 18:12
नवीन
स्वतःपुरते बोलायचे झाले तर असे काहीतरी करत असताना अचानक मरण यावे, असे वाटते:
.

- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Fri, 12/28/2018 - 18:22
नवीन
बिस्किटे समुद्रात टाकण्याची आयडिया एकदम भारी. ती बिस्किटे मैद्याची-अर्थात ग्लुटेनयुक्त असल्याने खरेतर मुलांनीच काय, कोणीही खाऊ नयेत.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sat, 12/29/2018 - 03:49
नवीन
मी डेस्क टॉप समोर बसलो आहे . यु ट्यूब वर नय्यर चे गीत नटखट मधुबाला सादर करतेय ... हावडा ब्रीज ये "क्या कर डाला तूने दिल तेरा हो गया .. . अन माझे व निसर्गाचं दिल वेगळं राहत नाही ,,,, मान डेस्कवर कलते ......शांतपणे ... बायको स्वयंपाक घरातून येते .." अहो जेवायला चला ...... आय ऍम नो मोअर ... !
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Sat, 12/29/2018 - 10:42
नवीन
जब्बरदस्त कल्पना .. मला आवडली .. मलाही वाटते कि मरण्याआधी माझ्या प्राणप्रिय बायकोला माझी काही कृष्णकृत्ये सांगून मरावं .. वरच्याने एक मुभा दिली पाहिजे , ती हि कि निदान काही मिनिटे आधी तरी कल्पना यावी कि मी जाणार आहे आणि ती शेजारी असावी . तिने काही बडबड करण्याआधी मी तिला सर्व सांगून टाकावे आणि अचानक एक तीव्र कळ आली पाहिजे आणि खेळ खल्लास .. कशी वाटली कल्पना ..
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 12/29/2018 - 15:47
नवीन
कृष्णकृत्ये करू नयेत, केली तर लपवू नयेत आणि लपवली तर कधीही उघड करू नये.
मरताना बायकोला आपली कृष्णकृत्ये सांगितली तर बायकोला आपल्या बद्दल काय वाटेल याचा विचार करून पहा.
ती फारच वाईट असतील तर बायको आपला द्वेष करणार असेल तर मरताना तिला दुःख देऊन काय मिळवणार?
आणि तेवढी वाईट नसतील तर आता आपल्या मनावर आपण ओझं बाळगताय ते तिला आजच सांगून मोकळे व्हा.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Wed, 01/02/2019 - 09:21
नवीन
खरंय , तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे .. विचार केला जाईल यावर , धन्यवाद साहेब .. अमूल्य मार्गदर्शनाबद्दल
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Tue, 01/01/2019 - 07:35
नवीन
मी कमावलेले ९९% पैसे मला हवे तसे खर्च करून (१% अंत्यविधीसाठी शिल्लक ठेवून) मरावेसे वाटेल. कसं आहे ना , प्रत्येकाच्या मनात काही सुप्त इच्छा असतात. काही सुप्त आकर्षण असतात जसेकी दारू , सिगारेट , गांजा , कुठल्या जागेवर जाणे (हिमालय , काशी , कुठले देवस्थान वा कुठला किल्ला दुर्गम जागा वगैरे ) नर्मदा परिक्रमा , पंढरपुरची वारी , वेगवेगळ्या देशातले पदार्थ खाणे , कुठले तरी संगीत ऐकणे , कोणते तरी चित्र डोळे भरून पहाणे , कुण्यातरी व्यक्ती बरोबर वेळ घालवणे , काहीतरी वस्तू खरेदी करणे ,याशिवायही भरपूर काही इच्छा असू शकतात पण काही कारणांमुळे मुख्यतः समाजाचे अदृश्य जोखड असल्यामुळे पूर्ण करायच्या राहून जातात. तर अश्या माझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करून मरण आलेले आवडेल. मग पन्नाशीत का साठीत का चाळीसीत त्याने फरक पडणार नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2