Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मोदी[च] का?

र
राघव
Mon, 12/24/2018 - 11:36
💬 67 प्रतिसाद
डिस्क्लेमरः या विषयावरील अनेक धाग्यांमधे हात धुऊन घेण्याची अजिबात ईच्छा नाही. सहज वाटलं म्हणून लिहिलंय. :-) ===================== बर्‍याच दिवसांपासून या चर्चा पाहतोय, धागे पाहतोय.. मोठं कौतुक वाटतंय.. मोदींचं!! लोक किती जागरूक झालेत नाही? माझ्यासारख्या, न्यूज पाहण्याचा / वाचण्याचा जाम कंटाळा असलेल्या माणसाला, मागच्या ४-५ वर्षात किती उत्सुकता असते आता.. पुढे काय याची! नाही, पुर्वी अगदीच नव्हती असं नाही.. पण हे सगळं असंच चालणार.. कुणी काssssही बदल करू शकणार नाही असं अगदी मनावर ठाम बिंबलं होतं! साधारण २००६-२००७ पासून मोदींचं नाव सतत कानावर पडू लागलं. अचानक कोण आलंय हे असं म्हणेतोवर देखील गुजरातच्या सरदार सरोवरातून बरंच पाणी वाहून गेलं असेल! एवढे हे कोण महत्त्वाचे आहेत असं वाटायला लागलं आणि उत्सुकता वाढली. मग त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांचं काम, गुजरातचा गाजावाजा करत होत असणारा विकास, त्यांच्यावर सतत [म्हणजे अक्षरशः सतत] होत असणारी जळजळीत टीका, त्या टीकेला अजिबात भीक न घालता आणखी जोमानं पुढे येणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व... इत्यादी गोष्टी खास उलगडून बघण्याची सवय लागली. टीआरपी वाढणं बहुदा यालाच म्हणत असावेत! इतकी विरोधाभासात्मक प्रसिद्धी क्वचितच कुणाला लाभली असावी. भारतीय राजकारणाच्या पटलावर कोणतेही दुसरे संवैधानिक पद न सांभाळता सरळ मुख्यमंत्री आणि आता प्रधानमंत्री झालेले मोदी, हे बहुदा एकमेव उदाहरण असावं. माझ्या आठवणीत पहिल्यांदा असं व्हायला लागलं कदाचित की, सगळ्या प्रकारच्या बातम्यांमधून विकासाबद्दल बोलणं होऊ लागलं, जे माझ्यासारख्या लोकांना भावलं. २००९ मधेच त्यांचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आलं होतं, पण त्यांनी स्वतःच त्याला नाही म्हटलं. कदाचित भाजपातून असलेला अंतर्गत विरोध आणि अडवाणींच्या नावाला असलेली संघाची पसंती ही कारणं असावीत. अर्थात् काँग्रेसच्या ते चांगलंच पथ्यावर पडलं. कारण यूपीए १च्या कार्यकाळात काँग्रेसच्या विरोधात तेवढं वातावरण वाईट नव्हतं. घोटाळे उजेडात यायचे होतेत. आणि मुख्य विरोधी पक्षाला निवडणुकांत कसं खिंडीत गाठायचं याचा एक नेहमीचा ठरलेला आराखडा होता. काम सोपं झालं. पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून अडवाणींचं नाव आल्यापासून जी धर्मनिरपेक्षतेवरून टीका सुरू झाली ती संपायचं नाव घ्यायला तयार नव्हती. त्यात एनडीएचे घटक पक्ष, संघ यांची सुटलेली जीभ चांगला हातभार लावत होती. संपूर्ण निवडणुका होईपर्यंत युपीएच्या कामकाजाचा लेखाजोखा व मूल्यमापन यावर चर्चाच झालेली लक्षात नाही. असल्यात तरी त्यांना जास्त उठाव नसावा. जनमत बदलण्यासाठी जे सरकारविरोधी मत [वातावरण नाही] तयार व्हावं लागतं, ते झालंच नाही. बारकाईनं मागच्या बातम्यांचा धांडोळा घेतला तर साधारण २०१० च्या मध्यापासून संघ आणि भाजप यांनी रणनितीत बदल केलेला लक्षात येईल. तळागाळातून वातावरण ढवळून काढण्यासाठी संघानं कंबर कसली. धार्मिक मुद्दे जरा बाजूला ठेवण्यात आले. विकासावर चर्चा घडणे सुरू झाले. लोकजागृती का काय म्हणतात त्याला सुरुवात करण्यात आली. जे जे काम यूपीएनं हाती घेतलं, आधी आणि नंतरही, ते ते सर्व लोकांसमोर उघड करून त्यातील नकारात्मक बाबी लोकांपुढे मांडल्या जाऊ लागल्यात. काँग्रेसला अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला आवडत नाही. ते त्यासाठी तयारच नव्हतेत. पुन्हा ते "..पिछले ६० वर्षोंमें काँग्रेसने सिर्फ देशको लूटा है.." म्हणत मोदी पुढे येऊ लागले. सतत नवीन आरोप, खिजवणारी वक्तव्ये, लोकांना भावतील असे भाषणातील मुद्दे इत्यादींनी काँग्रेसला बेजार करून टाकले. त्यांना अशाप्रकारच्या टीकेची सवय नव्हती. "लोकाश्रय" असलेला एकही मुरब्बी नेता मोदींना उत्तर देऊ शकत नव्हता. जे बोलत होतेत ते प्रवक्ते, वकील वगैरे लोक्सना मोदी कुठं खिजगणतीतही धरत नव्हतेत. त्यांनी रोख फक्त पंतप्रधानांवर ठेवलेला. जेव्हा ते पुस्तक आलं "Accidental Prime Minister", त्यानंतर त्यातली वाक्यं धरून मोदींनी गांधी घराण्यावर टीका करायला सुरुवात केली. एवढी जहाल टीका या आधी गांधीघराण्यावर उघडपणे निवडणुकांत कुणी केली नसेल. गांधीं घराण्यापैकी कुणी साधारणपणे एखाद्या न्यूज चॅनलवर येऊन स्वतः कोणतेही खुलासे करत नाहीत. झाकली मूठ असंच त्यांचं धोरण. ते सोडून राहुल गांधींनी स्वतः येऊन बोलण्याचं धाडस केलं आणि ते दान फारच महागात पडलं. जी अन्नसुरक्षा योजना युपीएनं निवडणुकांच्या वेळेस आणली, जेणेकरून निवडणुकांत फायदा मिळू शकेल, तीही त्यांना फळु शकली नाही. याचं कारण तेव्हाची बेताची आर्थिक परिस्थिती आणि १-२ भाजपप्रणित राज्यात तेव्हाच केलेल्या, साधारण त्याच पद्धतीच्या योजनांनी या मुद्द्याची हवाच निघून गेली. पुन्हा केवळ निवडणुकांसाठी केलेल्या, देशाला आर्थिक डबघाईत लोटणार्‍या या योजना, म्हणून विरोधीपक्षांनी रान उठवले ते वेगळेच. युपीए-२ च्या त्या राजकीय चादरीला इतकी छिद्र पाडण्याचा प्रकार झाला की एका बाजूनं ठिगळ लावावं तर दुसरीकडून फाटतंय अशी अवस्था झाली. २०१४ च्या निवडणुकांपर्यंत काँग्रेस इतकी बदनाम झाली की नंतरच्या अनेक निवडणुकांत देखील त्यांना याच टिकेला कसं उत्तर द्यावं हे समजलेलं नव्हतं. रागांच्या हास्यास्पद वक्तव्यांनी त्यात भर पडत होती. तसे काँग्रेसकडून प्रयत्न कमी नव्हतेत कधीच. साधारण प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून सहिष्णुतेचं वादळ उठवायचं त्यांचं तंत्र दिसत होतं. पण प्रत्येक अधिवेशनानंतर ते लगेचच शमत असल्यामुळे असेल कदाचित, त्याचा म्हणावा तसा परिणाम होत नव्हता. पण त्रिपुरा भाजप कडे गेलं आणि अख्खं काँग्रेस, विरोधी पक्ष, काही एनडीएतील घटकपक्ष या सगळ्यांना अगदी खडबडून जाग आली. साधारण २०१८ च्या सुरुवातीपासून रागांनी आपली कात टाकलेली दिसू लागली. अभ्यासपूर्ण वगैरे नाही, तरी त्यांचं बोलणं जरा संयुक्तिक होऊ लागलं. खास मोदीशैलीतीलच शालजोडीतील वक्तव्ये त्यांच्याकडून येऊ लागली. पर्याय म्हणून त्यांना उभं करण्याच्या प्रयत्नांना उधाण येऊ लागलं. पुन्हा धर्मनिरपेक्षतेच्या राजकारणानं पुढाकार घेतल्याचं दिसू लागलं. खरंच, भाजपप्रणित शासन असणार्‍या तीनही राज्यांत कामांबद्दलची आणि पुढे काय करणार याची चर्चा होण्यापेक्षा, गाय आणि धर्म यावरच जोर दिल्या गेला. भाजपही स्वतःचे मुद्दे सोडून असल्याच प्रश्नांवर उत्तरे देत बसण्यात मशगूल झाला. परिणाम जो व्हायचा तोच झाला. छत्तिसगढ मधे जे झाले त्याला पानिपत असेच म्हणतात. मला तर स्वतःला राजस्थानातही असंच होण्यासारखे वाटले होते, पण त्यामानाने काँग्रेस बरीच कमी पडली तिथे. मध्यप्रदेशात भाजपा स्वतःहून हरली असं म्हणावं लागेल. मिझोरम मधे काँग्रेसची वाताहत झाली तरी तिकडे कानाडोळा झाला, कारण २०१९ च्या निवडणुकांमधे तिथून जास्त फरक पडेल असं नाही. तेलंगाणामधे अपेक्षीत निर्णय झालेला दिसतो, तसेच रावांची कल्पकता आणि राजकीय समजही दिसते. असो. या माणसानं भारतीय राजकारणात जो बदल घडवलेला आहे ना तो लाजवाब आहे. त्यांची कल्पकता आणि कामं रेटून पुढं नेण्याची धडाडी भावते. स्वतःची राजकीय कारकिर्द पणाला लावण्यासाठीची हिंमत सध्या या एकाच व्यक्तिमत्त्वात आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अर्थात् निष्पक्षपणे म्हणायचं झालं तर, जे चांगलं त्याचं कौतुक आणि जे नाही त्यावर टिका हेच धोरण असेल. आता कामं कशी झाली, किती झाली याचं मूल्यमापन करणं आलंच. अनेक ठिकाणी, अनेक धाग्यांवर, अनेक चर्चांमधे हे चालूच आहे. उदा: https://www.misalpav.com/node/40256 काही भागात महत्त्वाचे काम नक्कीच झाले आहे, तसेच कल्पनांच्या बाबतीत हे सरकार खूपच प्रयोगशील आहे:- १. रस्ते बांधणी - नॅशनल हायवेज, भारतमाला-सागरमाला हे दोन्ही बर्‍याच प्रमाणात पुढे, रेल्वे वर खास लक्ष. सरकारी अधिकार्‍यांनुसार सर्व ट्रांस्पोर्ट क्षेत्रांत चांगली सुसंगतता. २. आर.टी.ओ. चे, पासपोर्ट सारख्या बर्‍याच कार्यालयातून एजंट्सचे काम कमी. ३. बर्‍याच ठिकाणी कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदरच आधारकार्ड अनिवार्य केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेस महत्त्वाचं पाठबळ. ४. छोट्या उद्योगांवर लक्ष केंद्रीत, जनधन-मुद्रा योजनांचा लाभ. ५. पारंपारिक व अपारंपारिक वीजनिर्मिती क्षेत्रात नजरेत भरेल असे काम, भूतान व नेपाळ यांच्या समवेत ऊर्जा करार. वीजेवर चालणार्‍या वाहनांसाठी स्वस्तात मोटर शक्य, व्यापारी तत्वावर पुढे जाण्यासाठी प्रयत्न सुरू. ६. बांगलादेशचा सीमाप्रश्न संपुष्टात. ७. ईशान्य भारतात [राजकीय फायद्यासाठी म्हटले तरीही] खास लक्ष. ८. बर्‍याच सरकारी प्रभागांत डिजिटायझेशन, पोलीस स्टेशन्स जोडणीचे काम पुढे. ९. संरक्षण खात्यात बर्‍यापैकी पारदर्शकता, अडकलेले बरेच निर्णय पुढे. १०. परराष्ट्र खात्यात चांगले काम, दक्षिण-पूर्व राष्ट्रांसमवेत [चीनचा विरोध असूनही] उत्तम व्यापारी करार ११. तेलसाठे तयार करण्यासाठी सऊदी समवेत करार. १२. आधार कार्ड मुळे बर्‍याच ठिकाणी वाचवलेली पैशाची गळती १३. नक्षलवादी/माओवादी चळवळींवर पायबंद घालण्यात बर्‍यापैकी यश. १४. गेल्या काही वर्षात महागाईला बर्‍यापैकी आवर, इंधन दर वाढूनही घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव बर्‍यापैकी स्थिर. १५. ४.५ वर्षात रेल्वेसाठी भरीव काम १६. जीएसटीची किचकट अंमलबजावणी, वाढलेले करसंकलन १७. प्राप्तिकरदात्यांच्या संख्यावाढीत सातत्य १८. जलवाहतुकीला प्रोत्साहन, गंगा स्वच्छ करण्यावरील भर .. .. काही भागांत काम करणे नितांत आवश्यक, तसेच काही खूप मोठ्या चुका - १. शिक्षणक्षेत्रातला गोंधळ निवारणे. २. स्वास्थ्यसेवा - विशेषतः ग्रामीण भागांत सुधारणे, कुपोषण-गर्भमृत्यू यांचे प्रमाण अजूनही भयावह. ३. विधानसभा राखण्यासाठी म्हणून अत्यंत मोक्याच्या वेळेस पर्रीकरांना गोव्यात हलवणे ही तेव्हाची देशाच्या दृष्टीनं खूप मोठी चूक. अर्थात् नंतर त्यांची तब्येत खराब झाली हे आणिक वाईट. ४. पाकिस्तान सोबतचे संबंध अत्यंत ताणलेले, चीनवर याबाबतीत दबाव आणण्यात अजूनही अपयश. ५. रशिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका यांच्या समवेत आण्विक मदतीचे करार करूनही अजून काम अडकलेलंच. ६. नेपाळ व श्रीलंका या देशांसमवेत करार असूनही चीनचा प्रभाव कमी करण्यात अपयश. ७. काळा पैसा बँकांच्या माध्यमातून सरकारकडे नोटबंदीनंतर जमा, पण संबंधीत आकडेवारी आणि कारवाईचे तपशील अनुपलब्ध. ८. बँकांचे एन.पी.ए. कमी करण्यात अपयश ९. निवडणुकांसाठी विकासावरील प्राधान्य सोडून मधूनच अकारण घेतलेला धार्मिक आधार, देशात पुन्हा असहिष्णूता, धर्मनिरपेक्षता वगैरे मुद्द्यांवर भांडणं. १०. काही नेत्यांचा नको तिथे श्रेय घेण्याचा हव्यास, नको ती वक्तव्ये करण्याची क्षमता आणि पक्षाची विनाकारण डागाळली जाणारी प्रतिमा यावर पायबंद न घालता येणे. ११. स्त्रीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं खूपच कमी काम १२. बर्‍याच योजनांचा एकतर्फी विदा उपलब्ध, जसं मुद्रा योजनेतून दिलेल्या कर्जाचा तपशील उपलब्ध पण किती उद्योग २ वर्षे तरी कमीतकमी चाललेत याचा विदा अनुपलब्ध .. .. .. पण तरीही साधारणपणे असलेली एक सार्वत्रिक समजूत अशी की यूपीए सरकारपेक्षातरी या सरकारनं काम चांगलं केलंय! माझं म्हणणं आहे, ज्या निष्पक्षपणे आपण मोदींना त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारू, त्याच निष्पक्षपणे काँग्रेसला पुढचा रोडमॅपसुद्धा विचारला पाहिजे. जर योग्य रोडमॅप नसेल तर मग हेच सरकार काय वाईट? :-)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 42672 views

💬 प्रतिसाद (67)
M
mrcoolguynice Wed, 12/26/2018 - 13:40 नवीन
इथे चर्चा करणार्‍यांमधले क्ष लोकं, नेहरूंचीही रेषा लहान करण्यात जीव तोडून प्रयत्न करत आहेत, तेही गेल्या अनेक दशकांपासून. असो, राजकारणात ते खपूनही जाऊ शकेल. पण, नेहरूंच्या रेषेपेक्षा, स्वतःच्या मते मोठी असलेली रेषा दाखवणे दूरच, पण, आतापर्यंत एक छोटीमोठी रेषा (किंबहुना, एखादे टिंबही) कोणी दाखवलेले नाही! अशी नकारात्मक अगतिकता, हे भारतिय राजकारणाचे वैशिष्ट्य बनत चालले आहे. :( जसे काय पुढील निवडणूक मोदीजींना नेहरूजींच्यातच लढाईची आहे. असो.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 12/26/2018 - 13:47 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/26/2018 - 14:08 नवीन
इतक्या त्वरीत, माझा मुद्दा (नेहरू-मोदी तर्कट मध्ये आणून सप्रमाण आणि विनोदी पद्धतीने) ठामपणे सिद्ध केल्याबद्दल, अनेक धन्यवाद ! =)) =)) =)) अवांतर : माझा मुद्दा मोदी किंवा अजून कोणाबद्दल नव्हता, तर सद्य राजकिय वास्तवावर होता, हे जाणण्याइतकी हुशारी तुमच्यात आहे असा माझा समज होता. तो समज खोडून काढण्यासाठी तुमचा हा प्रतिसाद असला तर... असो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/26/2018 - 14:14 नवीन
पंडित नेहरूंच्या पणतवाची लायकी त्यांच्या १० % असती तरी लोकांनी त्यांना मान्य केले असते ती ०.१ % ( एक दशांश टक्का) सुद्धा नाही ( जी आहे ती केवळ "पंडित नेहरूंचा पणतु" म्हणूनच आहे. एका बाजूला

बटाटे टाका कि दुसरीकडे सोने निघेल किंवा देशात असणारी एम आर आय मशिन्स जोडली कि वैद्यकीय सेवेत आमूलाग्र क्रांती होईल

अशा तर्हेची आचरट वक्तव्ये करणारा माणूस उमेदवार म्हणून परत परत आमच्या माथी मारला जातो आहे याचेच दुःख आहे. १२५ कोटीच्या देशात एकही लायक नेता काँगेसी लोकांना मिळत नाही? वैचारिक दिवाळखोरीचे उदाहरण यापेक्षा मोठे नसावे. श्री मोदी येतात कि नाही हा प्रश्न बाजूला ठेवला तरी त्यांना पर्याय म्हणून कोण नेता सर्व मान्य होऊ शकेल? निर्नायकी राज्य हे केवळ आपल्या स्थितिस्थापकत्वाने (inertia) अगोदर दिलेल्या पण हळू हळू कमी होणाऱ्या (decelerating) वेगाने चालत असते. जेव्हा वेग वाढवण्याची गरज असते तेंव्हा हा कमी होणारा वेग देशासाठी फार महाग पडू शकेल.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 12/26/2018 - 14:22 नवीन
असू द्या हो. पण अमित शहानी पप्पू ऐवजी राहुलजी असे म्हणायला सुरुवात केली आहे , हे खरे की थोतांड ? जानेवारीत मोदीजी हिसाब देणार हैत म्हणे
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 12/26/2018 - 17:25 नवीन
पूर्णपणे सहमत !!!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 12/26/2018 - 17:51 नवीन
राष्ट्रीय पुत्राची ( भावी पंतप्रधान ) सुमार बुद्धि झाकन्या साठी वय 48 झाले तरी उठसुठ त्यांच्या पंजोबा ,आजी आणि वडिलांचा संदर्भ द्यावा लागतोय या पेक्षा दुर्दैव काय ? राष्ट्रीय पुत्राच्या पूर्वजा मध्ये देश हाकण्याची धमक होती . यदानकदाचित हे महाराज पंतप्रधान झाले आणि पाकिस्तान किंवा चीन च्या राष्ट्रप्रमुखा बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याच्या वेळी हे महाराज पोरकटपणा करणार नाही कशावरुन ? तो विचारच नकोसा वाटतोय .
  • Log in or register to post comments
म
मामाजी Wed, 12/26/2018 - 18:39 नवीन
माफ करा पण मी या मुद्द्यांशी असहमत आहे कारण ज्या परिस्थितीत मोदिंनी सत्ता सांभाळली ती परिस्थिती आपण विचारात घेतलेली नाही असे मला वाटते. जर शून्या पासून सुरू करून शंभरापर्यत पोहोचायच्या ऐवजी जर कोणी पंच्याहत्तर पर्यंत पोहोचला तर आपण म्हणू शकतो की पंच्याहत्तर टक्के काम झाले. परंतू जर कोणी उणे शंभर पासून सुरूवात करून पंधरा पर्यंत पोहोचला असेल तर आपण म्हणू शकत नाही की फक्त पंधरा टक्केच काम झाले. दुर्दैवाने माध्यमं व मोदिद्वेषाने अंध झालेले लोक स्वार्थासाठी ही वास्तविकता स्विकारायला तयार नाहीत व सूई अडकलेल्या तबकडी सारखे मोदि फेल, मोदि फेल करत राहतात..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/26/2018 - 18:57 नवीन
जिस "चाय" का "मजा" पहले से ही "खराब" हो , उसको दोबारा "गर्म" करके पीना "बेवकूफी" है ! '2019' बाकी चालू द्या.,.! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 12/27/2018 - 12:07 नवीन
हा हा .. हे आवडलं !!
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 12/27/2018 - 07:39 नवीन
धाग्यावरील प्रतिसादांचा हळूहळू उतरत गेलेला स्तर आणि चर्चेला लागलेले अनावश्यक वळण बघून वाईट वाटले. असो. कोणाच्या लेखणीला आपण थांबवू शकत नाही. प्रत्येकाला काय योग्य ते समजतेच. त्याबरहुकुम वागायचे का नाही हा ज्याचा त्याचा निर्णय. मागील काही आठवड्यांपासून अनेक ठिकाणी चाललेले जालीय धागे, ब्लॉधागे, काही वैयक्तीक चर्चा आणि वाचनात आलेले न्यूज रिपोर्ट्स, यावरून साधारण काही गोष्टी इतक्यात लक्षात आल्यात - १. मोदींना पाठिंबा दाखवणे म्हणजे - जे काही सरकार करत आहे ते सर्वोत्तम आहे असं [सर्व] मोदीसमर्थक मानतात; हा एक अनावश्यक व चुकीचा निष्कर्ष काढला जातो. २. मोदींना विरोध करणे म्हणजे - जे काही सरकार करत आहे ते खोटं आणि चुकीचं आहे असं [सर्व] मोदीविरोधक मानतात; हा एक अनावश्यक व चुकीचा निष्कर्ष काढला जातो. ३. मोदींना विरोध करणे म्हणजे - काँग्रेस वा रागांना पाठिंबा हाही एक अनावश्यक निष्कर्ष काढून लक्ष्य केले जाते. ४. मोदीसरकारच्या कामावर जेवढे आक्षेप आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आक्षेप हे, भाजपकडून होत असणार्‍या आक्रस्ताळी प्रचाराला आणि अवाजवी श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्याला आहे. या आक्षेप घेणार्‍यांमधे मोदीसमर्थकही आहेत. जर या बाबी नीट सांभाळल्यात तर लोक पुढं काम काय झालं याबद्दल चर्चा करायला तयार असतात. ५. भाजपकडून लोकांच्या अपेक्षा अजूनही - "party with difference" आणि इतरांच्या कोणत्याही पातळीवरील आरोपांना/आक्षेपांना त्यांनी सभ्यतेनेच उत्तरे द्यायला हवीत, अशीच आहे. ६. सतत मागील साठ वर्षांचे पाघरूण घेणे आता बंद व्हावे अशी मोदीविरोधकांची अपेक्षा आहे आणि बर्‍याच ठिकाणी खूप रखडलेली कामे आधी झाली नाहीत असे सांगणे हे बरोबरच आहे, हे मोदीसमर्थकांचे म्हणणे आहे. ७. कोणताही विरोधी पक्ष पुढच्या विकास आराखड्याबद्दल वा योजनांबद्दल बोलतांना दिसत नाही. लोकानुनय करणार्‍या योजनांबद्दल आक्षेप घेणार्‍यात मोदीविरोधकही आहेत. .. .. राजकीय आरोपांना उत्तरे देतांना मोदीसरकारच्या प्रवक्त्यांची जीभ बरेचवेळा घसरते. विरोधी पक्षांकडूनही वाईट पातळीवर टीका होतेच आणि पत्रकारही बरेचदा लोडेड प्रश्न टाकत असतात, ज्यातून अनेक अर्थ निघू शकतात. पण सत्ताधार्‍यांना यासाठी तयार असलेच पाहिजे आणि त्यांनी रोख योग्य जागी ठेवला पाहिजे, हे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 12/27/2018 - 09:14 नवीन
चांगला प्रतिसाद. १+
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/27/2018 - 07:44 नवीन
https://www.mynation.com/news/pappumutra-rahul-gandhi-mha-rvs-mani-kamal-nath-ishrat-jahan-pgfnla सं पु आ च्या कालावधीत सरकारात "सचिव" असणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेले हे आज "मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याने" (श्री कमल नाथ) केलेले वक्तव्य आहे. बिरुटे सर प्रत्येक वेळेस भारताच्या पंतप्रधानांचा "फेकू"म्हणूनच उल्लेख करतात तेंव्हा कुणी काही बोलत नाहीत. त्यांना इतक्या वेळेस निदान एक तरी पुरावा द्या म्हणून सांगितले तसे न करता नुसते प्रच्छन्न आरोप करतात तेंव्हा कुणी काही बोलत नाहीत आणि आता त्यांच्याच काव्याला त्यांच्याच शब्दात कुणी जबाब दिला तर लगेच नाकाला मिरच्या झोंबतात बढिया है!
  • Log in or register to post comments
म
मामाजी गुरुवार, 12/27/2018 - 12:21 नवीन
संपादक मंडळाचा निर्णय शिरसावंद्य. . संपादक मंडळाला विनंती की हे माझे स्पष्टीकरण योग्य वाटल्यास ठेवावे अन्यथा उडवून टाकावे शब्दबंबाळ साहेबांनी कदाचित पप्पूxx ह्या शब्दामूळे याचा उल्लेख थर्डक्लास प्रतिसाद असा केला असावा हे मी गृहित धरतो. .पण शब्दबंबाळ साहेब एक गोष्ट सोयीस्कररीत्या विसरलेत ती म्हणजे मी या शब्दाचा प्रथम वापर केलेला नाही आणि ज्या व्यक्तिने ही शब्दयोजना पहिल्यांदा केली ( कदाचित् त्याचे पारितोषीक म्हणूनही असेल ) त्याच व्यक्तिच्या गळ्यात कॅांग्रेस अध्यक्षांनी मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाची माळ घातलेली आहे.. आता बिरूटे सरांनी जे चहा ची उपमा देउन लिहीले आहे त्याचा अर्थ हा मोदि विरोधकांना मोदि परत सत्तेवर यायला नकोय त्यालाच ऊत्तर म्हणून मी पूढे माझ्या शब्दात लिहीले होते की मोदि समर्थकांना चहा हवाय म्हणजेच मोदि हवे आहेत व ज्याच्या मूळे आपल्याला मध्यप्रदेशात सत्ता मिळवता आली ते पेय आपल्या साठी आहे व त्यातला युवाजोश दाखवण्या साठी टेस्ट द थंडर हे जोडले होते. .
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 12/27/2018 - 17:00 नवीन
सोयीस्करपणे विसरायची कला इथल्या आपणासारख्या काही लोकांकडे चांगली असेल पण मला सध्या तरी त्याची गरज नाही! आपण आधीच्या प्रतिसादात वापरलेला पप्पूxx हा शब्द पूर्ण लिहिला नाहीत हो या प्रतिसादात! का बरे? आणि मूत्र हा शब्द वापरून एका मिपावरच्या आयडीला "टेस्ट द थंडर" म्हणता याची तरी लाज वाटावी माणसाला! नाही म्हणजे शाळेत असताना काही चुकीचं केलं आणि मोठ्ठी लोक ओरडायला लागली कि "त्यानं केलं म्हणून मीपण केलं" असे लहान मुलं सांगतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की "जर त्यानं खड्यात उडी मारली तर तू पण मारणार का?" जर गावाकडे असाल तर "त्यानं शेण खाल्लं म्हणून तू पण खाणार का?" ज्याला समजायचं तो समजतो पण काही (अति)शहाणे त्यात पण मीच बरोबर हे दाखवतात! असो, चालूदे तुम्हा लोकांचं!
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल गुरुवार, 12/27/2018 - 17:08 नवीन
नायतर काय? व्हॉटअबावटरी कर्न्याचा सर्वाधिकार फकस्त पप्पूभक्तांनाच हाय. इतर कोनीबी त्ये क्येल्यास आमाला थयथयाट करन्याचा फुल आधिकार हाये. काय समजून र्‍हायलाय आँ. :)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 12/27/2018 - 19:21 नवीन
तुमचा प्रतिसाद उडवला हे कळलं समजा पण त्याखालचा डॉ खरेंचा प्रतिसाद का उडवला? बार ते उडवले तर मग मूळ प्रतिसाद का उडवला नाही? त्यात कमरेखालची शेरेबाजी नाहीये असं संम ला वाटतंय का? आणि वाटत असेल तर तसे का असावे? लेखकाने मुद्दाम चाय हा शब्द तेथेही हायलाईट केलेला आहे.. की ते दाखवणे म्हणजे व्हॉटअबोउटरी?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा