Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अडनिडी मुलं-३

ज
जेडी
Mon, 12/17/2018 - 18:20
💬 94 प्रतिसाद
दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन . चारच दिवसात म्हणे , मला इथे ऍडमिशन नकोय, तिकडे एसपी , फर्ग्युसन ला मिळतंय का बघ नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही . किंवा इथेच आर्ट्सला घे . इथलया शिक्षकांना काहीच येत नाही , कसले फालतू कॉलेज आहे . मी म्हणाले, आगं फी भरलीय आता ती मिळणार नाही तर तू अकरावी सायन्स कर आणि मग आर्टस् ला घे तर म्हणे नाही मी काहीही अभ्यास करणार नाही, क्लासला तर मुळीच जाणार नाही . मी माझ्या मतावर ठाम आणि ती तिच्या . झाले , अकरावी कशी बशी पास झाली. रिझल्ट बघून मी म्हणाले आता आर्टस् ला घे. तर म्हणे जमणार नाही, काय व्हायचे ते होऊदे पण मी आता आर्ट्सला ऍडमिशन घेणार नाही आणि अभ्यासही करणार नाही . क्लास लावणार नाही. तूच शिकवायचे . मी म्हणाले तू क्लास लाव मला आता तुला मॅथ्स शिकवायला जमणार नाही . तर म्हणे दहावीपर्यंत कशी शिकवत होतीस आणि आता का नाही जमणार ? फेसबुक , मिसळपाव ह्यातून टाइम मिळेल तेंव्हा मला शिकवशील ना ? मला खरेच ते व्याप जमणार नव्हते म्हणून मी कशालाही भीक न घालता ठाम नकार दिल्यावर १ लाख भरून क्लासला ऍडमिशन घेतले पण कोणत्याच क्लासला ना नीट गेली , ना नीट अभ्यास केला. काही म्हणाले तर तूच सायन्स ला ऍडमिशन घ्यायला लावलय, माझी इच्छा नवहती , आता तू बघच . वर्षभर मी अक्षरशः भीतीच्या सावटात काढले. पोरीने काहीही अभ्यास केला नाही . सर्व करून पाहिले - प्रेमाने, धमकवून, पण काहीही उपाय नाही . फक्त एवढेच, तू नुसत्या अकरावीच्या फीचा एवढा विचार का केलास ? वाया गेली असती तर काय होणार होते? प्रॅक्टिकल कधी असायची ते हि माहीत नव्हते . इथले सर्व गावंढळच आहेत, त्यांना नीट इंग्लिशच बोलता येत नाही ... टीचर ला पण इंग्लिश बोलता येत नाही आणि मी कॉलेजलाही जाणार नाही आणि क्लासला हि जाणार नाही . अगदी कौन्सेलर ची मदत घेऊनही पहिली पण काहीच उपयोग नाही . अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटतेय ती म्हणजे , माझी लेक कॉलेजला जायला नाही म्हणत होती कारण कोणीच बरोबर नवहते, सर्व कपल्स आहेत म्हणाली. माझ्या मैत्रिणींना पण आता बॉयफ्रेंड भेटलेत म्हणे . ते रोज कोठे ना कोठे फिरायला जातात , मी त्यांच्याबरोबर गेले कि माझी सिच्युएशन ऑकवर्ड होते . मी आपली समाजवात राहायचे , तू जा . त्यांच्यात मिक्स हो . एकदा सर्व पाषाण लेक ला गेले , तिथे माझी लेक एकटी बाहेर बसून राहिली. बाकी सर्व आत झाडी झुडपात जोडी जोडीने बसायला गेले . ती हताशपणे एकटी बाहेर बसून राहिली . बाकीच्या मुलींना त्यांचे बॉयफ्रेंड सिगारेट ओढायला लावत , नाही म्हणले कि , "बस क्या यार , इतना भी प्यार नाही करती क्या मेरेसे ?" असे म्हणत ." तेंव्हापासून तर लेकीने मित्र मैत्रीचे नावच टाकले . तिच्या वर्गात अजून एक शाळेपासूनची मैत्रीण होती. तिला एस वाय बीकॉम झालेला बॉयफ्रेंड मिळला . कॉलेजचे नाव सांगून त्यांच्यबरॊबर हि अकरावीची पोरगी नुसती फिरणार . बड्डे पार्टीला आपलय दोनच मैत्रिणी बोलावल्या मॅक डीला , त्यात माझी लेक आणि दुसरी एक मैत्रीण बाकी सर्व त्या मुलाचे मित्र . ह्या दोघी चार वाजताच निघून आल्या आणि हि त्या मुलांबरोबर कोठेतरी फिरायला गेली. तिच्या आईने फोन करून विचारल्यावर आमच्या घरी जात आहे असे तिने घरी सांगितले. तिच्या आईचा वाट पाहुन माझ्या लेकीला फोन . लेकीने सरळ सांगितले, आम्ही कधीच चार वाजतच घरी निघून आलोय म्हणून परत त्या मैत्रिणीचा लेकीला फोन, काहीही कर माझ्या आईला तू माझ्याबरोबर असल्याचे सांग. लेक अगदीच गोंधळून गेली. त्याच दिवशी त्या पोरीचा रात्री आठ वाजता छोटा अपघात झाला . सर्व ढोपरे फुटली. तिची आई माझ्या लेकीला झाप झाप झापली , कोठे गेला होतात म्हणून ? नंतर तिच्या वडिलांनी तिला बड्डे गिफ्ट महागडा फोन घेऊन दिला होता , ती कोठेतरी बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली होती तेंव्हा तो हरवला . तिने आईला आमच्याकडे नोटबुक घ्यायला गेल्यावर बॅग स्कुटरला तशीच राहिली आणि त्यातून कोणी काढून घेतला असे सांगितले. तिच्या आईचा परत लेकीला फोन, तुमच्या सोसायटीत फोन हरवलाय तर आईला सांगून सीसी टीव्ही बघा म्हणे, वॉचमन असताना माझ्या लेकीचा फोन गेलाच कसा म्हणे ? माझ्या लेकीचे मला फोन वर फोन , तू लवकर घरी ये, मी तिच्या आईला खरे काय ते सांगतेय . होऊदे दे तिचे कॉलेज बंद . मी लेकीला म्हणले , तू थोडा वेळ थांब मी येऊन काय करायचे ते बघते . घरी गेल्यावर मी तिच्या आईला फोन केला आणि सांगितले कि तुमच्या मुलीचा फोन आमच्या सोसायटीत नाही हरवला . ती कोठेतरी बाहेर गेल्यावर हरवलाय पण भीतीपोटी तिने तुम्हाला मनघडत सांगितले आहे . तुम्ही तिला मारू नका पण नीट विचारलेत तर ती तुम्हाला सर्व सांगेल. बाप आय टी मध्ये मोठ्या पदावर . आई खास मुलींच्या शिक्षणासाठी घरीच. चांगल्या सोसायटीत फ्लॅट , कशाचीही कमी नाही. काय करणार आई बाप? मी तिच्या आईला , उद्या पॅरेण्ट टीचर मीट वेळी भेटू आणि मला तुम्हाला काही सांगायचे आहे असे सांगितले. मी गेले होते , सर्व तयारी करून पण पोरीने आईला माझ्याकडे फिरकून पण दिले नाही आणि आईही फिरकली नाही. काय बोलणार ? काय करायच्या या मुलांचे ? क्रमशः

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25337 views

💬 प्रतिसाद (94)
म
मराठी कथालेखक Tue, 12/25/2018 - 07:33 नवीन
गा पै आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
फक्त काहीतरी हरवल्याची भावना जी येते तिचा निकाल लावायचाय.
आता काही निकाल लावायचा आहे वगैरे नाही. मला फक्त इतर पालकांना असं सुचवायचं होतं की ही पण एक बाजू असू शकते. निदान मुलांना भविष्यात असं वाटू नये निदान इतके हट्ट तरी पुरवावेत. मुख्य म्हणजे जे योग्य आणि कुवतीत बसणारे असतील ते हट्ट पुरवावे.
मला वाटतं की तुमच्या मुलांचे असे किरकोळ हट्ट पुरवून तुम्हाला ते क्षण परत जगता येतील
मी या सगळ्या गुंतागुंतीपासून स्वतःला दूर ठेवलंय. मी विनापत्य जीवनशैली (childfree lifestyle) जगतोय.
  • Log in or register to post comments
ज
जेडी गुरुवार, 12/20/2018 - 17:14 नवीन
मला माहित नाही तुमचे वय काय आहे पण जे आता ३५ च्या पुढे आहेत त्यांची बहुतेंकांची हीच स्थिती असावी असे वाटतेय .
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 12/25/2018 - 07:35 नवीन
मी पण चाळिशीच्या जवळ जात आहे .. चला एकटा नाही तर मी :)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 12/19/2018 - 15:58 नवीन
पहिल्या तीन भागांसाठी मिळून आहे. शिवाय मिळालेले गुण हे त्या त्या प्रश्नपत्रिकेपुरते सत्य असतात. ----- @@@@@ अहो , मान्य. आम्ही कमी बुद्धिमान ते @@@@@ हे वाचून फार वाईट वाटले. मी काही सर्वज्ञ नाही किंवा तुम्हाला कमी लेखतो आहे असेही नाही. मिपावर आपण आनंद घेण्याआठी वा ज्ञानसंपादनासाठी जमतो आणि जमेल तेव्हा एकमेकांना सपोर्ट करतो असा माझा समज आहे. १० गुण मिळाले नाहीत म्हणून तो/ती विद्यार्थी/विद्यार्थिनी कमी बुद्धिमान असे नसते. हे यातून सूचित करायचे होते. १० गुण मिळव हा गोल सेट करणे हे ठीक. पण साध्य झाले नाही म्हणून दूषणे देऊ नयेत तर मिळतील पुढे असा उद्याच्या आशेचा किरण द्यावा. आपण पूर्वीच्या भागातून अनेक उदाहरणे दिली आहेत त्यापैकी अजुन एक मुलगी खुप हुशार, ९९ मार्क्स मिळाले की आख्खे खानदान १ मार्क कोठे गेला म्हणुन विचारणार?त्या एक मार्कचा तिला हिशोब द्यावा लागणार म्हणुन ती मुलगी सतत धास्तावलेली.. तिची आई डॉक्टर किंवा अशीच काही मेडिकल रिलेटेड जॉब करणारी . तिच्या हॉस्पिटलच्या शिफ्ट्स या उदाहरणासाठी हे वाक्य आहे. आपण इथे लिहिण्यात मुळीच चूक केलेली नाही. आपण अडचणीत सापडलो की अनेक वेळा अडचणीत सापडल्यावर इमर्जन्सी सिस्टीम कार्यरत होते आणि परिस्थितीतीचे विश्लेषण करण्याची शक्ती गमावतो. बाहेरील हितचिंतक निरीक्षक योग्य ते विश्लेषण करून आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो असा माझा मी स्वतः अडचणीत सापडलो असतांना मित्रांच्या सल्ल्याने मार्ग काढला आहे. या अनुभवाचा आपल्याला फायदा मिळावा अशा सदिच्छेने मी प्रतिसाद दिलेला आहे. विविध विचारातून मंथनाने चांगले काही निघेल अशी दृढ आशा आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Wed, 12/19/2018 - 17:06 नवीन
सॉरी , काही मुद्दे मला पटले आणि काही नाही त्यामुळे असा प्रतिसाद दिला पण नुसते पालकांनाच जबाबदार धरणे मला थोडे चुकीचं वाटले. पण सॉरी माझ्या कमेंटबद्दल .
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 12/19/2018 - 17:06 नवीन
> "नंतर तिच्या वडिलांनी तिला बड्डे गिफ्ट महागडा फोन घेऊन दिला होता , ती कोठेतरी बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली होती तेंव्हा तो हरवला . " गुगल / अ‍ॅपल चे अकाउंट वापरुन प्रत्येकाला त्याचा फोन ट्रॅक करता येतो प्रत्येक फोनचा IMEI नंबर वेगळा असतो. त्यानेसुद्धा (पोलीसांना कींवा सर्वीस प्रोव्हायडर्सना)फोन ट्रॅक करता येतो. पोलीस कंप्लेंट केली काय? खरच फोन हरवला असेल तर शोधताही येइल. पण पोलीस कंप्लेंट केली नसेल तर फोन विकला असेल किंवा बॉयफ्रेंडला दीला असेल व घरी चोरीला गेला असे सांगीतले असण्याची शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments
ज
जेडी गुरुवार, 12/20/2018 - 17:30 नवीन
ज्या मुलीचा फोन हरवला तिचे वडीलही आयटी मध्ये जॉब करतात , ह्या गोष्टी माहित असतीलच त्यांना
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Sat, 12/22/2018 - 01:08 नवीन
त्यांनी डायरेक्ट CC TV रेकॉर्डींग चेक करण्याची मागणी केली म्हणुन वाटले की या मेथडस माहीत नसाव्यात. शिवाय्स CC TV रेकॉर्डींग बघुन सुद्धा फोन सध्या कुठे आहे हे कळणार नाहीच.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 12/19/2018 - 17:34 नवीन
१ वर्ष कींवा काही महीने मुलीला नोकरी करुन स्वतःचा प्रत्येक खर्च स्वतः भागवायला सांगा. घरुन फक्त जेवण आणी झोपण्याची सोय ईतकेच मीळेल. हॉटेलींग, फीरणे, मोबाईल, ईंटरनेट, कपडे, बाईक, कार ईत्यादी स्वतः कमावलेल्या पैशातुनच भागवायच्या. नोकरी करुन वेळ मिळाला तर कॉलेजला जा / घरुन अभ्यास कर व परीक्षा दे. हजारो मुले हे करत आहेत. नाहीतरी अत्ताही जेमेतेम मार्क मिळत आहेत. जास्तीत जास्त १ वर्ष नापास होईल. पण बाहेरच्या जगचा खरा अनुभव मिळेल ज्याच्यामुळे सध्या घरुन मिळत असलेल्या आर्थीक व मानसीक सपोर्टची कींमत कळेल. पालकांच्या पैशांची कींमत कळेल. ईथे मीपावर असे की त्येक लोक आहेत की ज्यांनी १ लाखापेक्षा कमी पैशांत आपले सर्व शीक्षण पुर्ण केले आहे. तसेच कमी शीक्षण असलेल्यांना काय नोकर्‍या मिळतात हे दीसले की चांगला अभ्यास स्वतःहुन करण्याची प्रेरणा मीळेल. दुसरा उपाय म्हणजे काही समाजसेवी संस्थांमध्ये जाउन काही आठवडे / महीने समाजसेवा करणे. आपल्याच समाजातले लोक काय परीस्थीतीत व कसे जगतात हे पाहीले की आपल्या समस्या कीती फालतु आहेत (शिक्षकांना ईंग्लिश येत नाही / मुले गांवंढळ आहेत / बॉयफ्रेंड / ईत्यादी) याची जाणीव होईल. दुसर्‍याला सल्ला देणे खुप सोपे असते याची जाणीव आहे. मी स्वतः तुमच्या जागी असतो तर काय केले असते हे सांगणे कठीण आहे. तुम्हाला तुमच्या कांसीलरने काय सांगीतले?
  • Log in or register to post comments
ज
जेडी गुरुवार, 12/20/2018 - 17:18 नवीन
प्रतिसाद खूप आवडलाय . अजून एक वर्षे काही नाही झाले तर तोच मार्ग अवलंबायचा ठरवलं आहे . पण मला संधीच दिली नाही चूक सुधारणायची हि भावना आयुष्यभर राहू नये म्हणून एक वर्ष संधी द्यायची ठरवले
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 12/19/2018 - 23:08 नवीन
मुलांचं पुढे काय होईल ते बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे हे मान्य. शिक्षणात अगदी मागे पडलेली मुलं पुढे खूप यशस्वी होतात किंवा उलट सुद्धा. त्यामुळे मुलांबरोबर वेग वेगळ्या प्रकारे वागणारे पालक चुकीचे वाटत नाहीत. शेवटी स्वतःच मूळ कसं वाढवायचं हे ठरवण्याचा हक्क प्रत्येकालाच असतो आणि त्यात काय चांगलं वाईट वाटायचं कारण नाही. पण ह्या लेखात किंवा आसपास पण असं दिसायला लागलाय कि पालक मुलावर ५-१५ लाख वाया जाणार हे गृहीत धरून चालतातय. कष्ट करणाऱ्या मुलावर कोणी पैसे खर्च केले तर चांगलाच आहे, पण दिसतंय कि पोरगं पैसे वाया घालवणार आहे तरीही खर्च चालूच आहे हे काय पटत नाहीये. अर्थात वरती म्हंटल्याप्रमाणे एकदम सोडून देता येत नसावं त्या वयात एक उदाहरण देते. माझा मुलगा ६ वर्षाचा आहे, रोज सकाळी नवरा शाळेत सोडतो. रोज सकाळी उठण्यावरून, दात घासण्यावरून, कपडे घालण्यावरून रडारड. शाळा ८:१० ची आहे, ८:१५ ला गेट बंद होता. त्यानंतर ऑफिस मध्ये जाऊन तिथे एंट्री करून वर्गात जायला लागतं. असं सारखं होत असेल तर प्रिन्सिपॉल कडे जायला लागतं इ.इ. नवऱ्याची तडफड कि शाळेत उशीर होऊ नये, ऑफिस मध्ये जायला लागू नये, त्याच्या रेकॉर्ड वर "लेट असतो " हे येऊ नये. रोज बाप लेकाची भांडण. थोडा उशीर झाला तरी पोरगा नवऱ्यावर ओरडतो तुझ्यामुळे उशीर झाला. परत भांडण नवऱ्याला कितीवेळा सांगून बघितलं कि होउदे उशीर जाऊदे ऑफिस मध्ये, पण त्याने एकदा पण नाय केलं तसं. आणि मध्ये मला १ आठवडा सकाळी सोडायला लागणार होतं, पहिल्या दिवशीपासून मी आपली घड्याळाचा अलार्म लागल्यासारखी फक्त पोराला वेळ सांगत्ये. ८:१५ ला कसेबसे पोचलो शाळेत, पोरगा माझ्यावर ओरडायला लागला, म्हंटलं तुला आत्ताच ऑफिस मध्ये नेते तिकडेच सांग तू का उशीर झाला ते. गप्पा बसला. संध्याकाळी घरी आल्यावर नीट सांगितलं कि मी बाबा सारखी भांडू-ओरडू शकत नाही, पण तू नाही लवकर आवरलास तर तुला उशीर होईल. पुढचे ४ दिवस बिलकुल वादावादी नाही. सगळं वेळेत. बाबा परत आल्यावर ये रे माझ्या मागल्या चालू!!!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 12/20/2018 - 05:43 नवीन
या मालिकेतले तीनही लेख वाचले. भारतात बदललेल्या परिस्थितीची कल्पना आली. तुम्ही एवढे आव्हानात्मक अनुभवकथन मोकळेपणाने केले याबद्दल अभिनंदन व आभार. आभार अशासाठी की माझ्यासारखे अनेक तुलनेत नवे व अननुभवी पालक या विषयावर अधिक गंभीर होतील. विविध प्रतिसादकांचे प्रतिसादही उत्तम आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुमची मुलगी गेल्या काही वर्षांपासून काय वाचते व वाचनात नियमितता आहे का? मला माध्यमिक शाळेत असतानापासून नियमित वर्तमानपत्रे व नियतकालिके जमेल तशी वाचत राहण्याचा खूप उपयोग झाला. प्रसिद्ध पुस्तकं किंवा कादंबर्‍या फारशा कधी वाचायला मिळाल्या नाहीत किंवा त्यासाठी फार प्रयत्नही केले नाहीत. पण वर्तमानपत्रे व नियतकालिकांमधून प्रेरणादायी व प्रयत्नवादाचं महत्त्व अधोरेखित करणार्‍या गोष्टी कळत राहिल्या व त्यांचा सकारात्मक परिणाम होत राहिला. तुम्हाला व तुमच्या कन्येला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तिच्या शिक्षणप्रवासातले हे अवघड वळण पार पडून तिची घोडदौड सुरू होवो ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments
ज
जेडी गुरुवार, 12/20/2018 - 17:35 नवीन
माझ्या मुलीने खूप वाचलंय , जास्तीत जास्त दोन दिवसात १ बुक असे वाचन केलाय . अजूनही करते . तिचेही कलेक्शन आहे . सर्व इंग्लिश . त्यात विम्पी किड्स सेरीसी ते पर्सी जॅक्सन , शेक्सपिअर ..... ते फिफ्टी शेडस ऑफ ग्रे पर्यन्त बरेच काही वाचलंय . आता ऑनलाईनही खूप वाचते. फेसबुक वर नाही पण ब्लॉगस आणि काय काय खूप वाचते . आता मी थोडे कंट्रोल केले आहे बुक्स घेण्यावर नाहीतर एका दिवसात बुक्स वाचून संपवते आणि दुसरे आन म्हणते
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/27/2018 - 07:05 नवीन
तुमच्या मुलीचा प्रॉब्लेम सूर्याच्या पिल्लाची समस्या तर नाहि? प्रचंड कॅलीबर पण कर्तुत्वाला वाव नाहि, असाधारण प्रज्ञा पण चिंतनाला विषय नाहि, बिट्वीन द लाईन्स वाचायची तीव्र दृष्टी पण योग्य केन्व्हास नाहि, फार सखोल जाणीवा पण व्यक्त करु शकणारी कला नाहि... असे अनेक प्रॉब्लेम असतात या मंडळींचे. मग असाच चिखल तयार होतो मनात... आयुष्यात...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/20/2018 - 07:53 नवीन
खूप संयत, सकारात्मक व उपयोगी चर्चा चालू आहे. राजकारणी धाग्यांच्या बहुतांश निष्फळ एकेरी धुरळ्यात हा धागा म्हणजे एक सुखद हवेची झुळूक ठरला आहे ! माझा विषयातला माझे मत व अनुभव सांगायचा मोह आवरत नाही. म्हणून काही... समजायला लागले की मुलांना सर्वप्रथम हे समजाऊन देणे महत्वाचे असते की, (अ) आईवडील, तुम्हाला आयुष्यभर पुरणार्‍या, शिक्षण व कौशल्य, याच दोन गोष्टी मिळवायला मदत करू शकतात आणि त्यांच्या बळावर तुम्ही जगात कुठेही तगू शकाल, उत्कर्ष करून घेऊ शकाल, आपले स्थान निर्माण करू शकाल. (आ)कोणतेही आवडीचे क्षेत्र निवडा, पण त्यात झोकून देऊन स्वतःला अभिमान वाटेल असे कौशल्य मिळवा. पालकांनीही समजून घेतले पाहिजे की, शिक्षण मुख्यतः तीन प्रकारचे असते: (अ) औपचारिक : शाळा, कॉलेज, व्यावसायिक शिक्षण, इ. हे शक्यतो मुलाच्या आवडीशी सुसंगत असले तर, ते आवडीने केले जाते व त्यात यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते. इथे योग्य शिक्षणसंस्था निवडण्यापलिकडे करण्यासारखे पालकांकडे बहुदा फारसे काही नसते. (आ) व्यावहारिक : भारतातिल शिक्षणपद्धती, मुख्यतः "घोका आणि ओका" या पद्धतीवर चालते. या पद्धतीत, माहिती मिळते (पक्षी : घोकली जाते), पण तिचा अर्थ समजला की नाही? तिचा व्यवहारात उपयोग आहे काय? असला तर कसा? या व्यावहारीक प्रश्नांच्या उत्तरांना महत्व नसते. या प्रश्नांची उत्तरे शोधायची सवय मुलांना लहान वयापासून लावण्याने, जीवनातील यश-अपयशामध्ये जमीन अस्मानाचा फरक पाडू शकतो. शाळा-कॉलेजात सामान्य वाटणारे मूल, व्यवहारात खूप यशस्वी होते त्यामागे बहुदा या कारणाचा मोठा हात असतो. या शिक्षणात, "कळत-नकळत", पालकांचा सिंहाचा वाटा असतो... तो वाटा "कळत" अदा केला, तर पालकांच्या आणि पाल्याच्या जीवनातल्या अनेक समस्या मूळातून नष्ट होतात. (इ) आपल्या विचाराची आणि वागणूकीची पद्धत : दुसर्‍याला विचारात घेऊन मगच आपले बोलणे व कृती ठरवावी व करावी, याचे शिक्षण मुलांना जन्मापासून पालकांच्या वागणूकीतून मिळत असते. भूक, शी, शू इत्यादी सोडून, लहान मुलांचा व्यवहार बहुतांश प्रतिक्षिप्त असतो... आपले किती लाड केले जातात? आपण काय केले की लाड केले जातात? आपण कोणत्या स्तरापर्यंत लाड/हट्ट करवून घेऊ शकतो (पक्षी : आपण कोणत्या स्तरापर्यंत पालकांना नमवू शकतो)? हे सर्व मूल मूलभूत प्रतिक्षिप्त व्यवहारप्रक्रियेतून शिकत असते. "मूल घरात आईवडीलांचे ऐकत नाही पण, तेच मूल शाळेतल्या शिक्षाकाचे म्हणणे टाळत नाही", हे दिसते, ते यामुळेच. जीवनातील यशामध्ये, Emotional intelligence (EI), Emotional quotient (EQ) व Emotional Intelligence Quotient (EIQ) यांचा मोठा वाटा असतो असे म्हणतात. या सगळ्या मोठ्या संज्ञांचे सार म्हणजे, "दुसर्‍याला विचारात घेऊन करायच्या यशस्वी कृती ठरवण्याची व त्या अंमलात आणण्याची क्षमता" असे आहे. "चुकीचा हट्ट --> लाड --> अधिक चुकीचा हट्ट --> अधिक लाड" हे दुर्गुणचक्र (व्हिशस सर्कल) मूल मोठे होण्याअगोदर तोडायला शिकणे आणि त्याच्या जागी "चांगले वागणे --> प्रोत्साहनपर मान्यता --> अधिक चांगले वागणे --> अधिक प्रोत्साहनपर मान्यता" हे सद्गुणचक्र (व्हर्चुअल सर्कल) स्थापित करणे; ही पालकांमध्ये आवश्यक असलेली मूलभूत गरज आहे. मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी पालकांनी हे मुलाच्या, अगदी लहान वयापासून, प्रयत्नपूर्वक (प्रसंगी कठोर होऊन), मूल लहान असतानाच, करायला हवे. जसजसे वय वाढत जाते व मूल बाहेरच्या जगात वावरू लागते, तसतसे मुलाचे पालकांवरचे अवलंबन कमीकमी होते आणि या चक्रांवरील त्यांचा ताबा कमी कमी होतो आणि त्याअगोदरच्या अनुभवाचाच प्रभाव महत्वाचा होतो. तेव्हा वेळेतच, (अ) सगळेच लाड आणि किंवा अती लाड योग्य गोष्ट नाहीत आणि (आ) जीवनात नकार आणि अपयश नैसर्गिक असतात आणि ते पचवून पुढे जाणेही नैसर्गिकरित्या करता आले पाहिजे, हे मुलाच्या मनावर, रोजच्या छोट्यामोठ्या प्रसंगांचा उपयोग करून, बिंबवले पाहिजे. या शिक्षणाचा पाया केवळ पालकच घालतात आणि त्याच्या अनुषंगाने मुले त्यावर मजले (घरातला आणि घराबाहेरचा व्यवहार) चढवत जातात. पाया दोषयुक्त (अती/चुकीचे लाड) असला तर वरची इमारतसुद्धा तशीच बनणार ! तेव्हा, या शिक्षणाची मूलभूत जबाबदारी केवळ आणि केवळ पालकांची असते... आणि ती सवय त्यांनी आपल्या विचार व कृतींनी मुलाच्या मनावर, लहानपणापासून, बिंबवायची असते. जसजसे वय वाढत जाते, तसतसे घरातील आणि बाहेरील अनुभवांनी वरचे मजले बनत जातात (मेंटल हार्ड कोडींग)... व ते चांगले असो की वाईट, तोडणे जास्त जास्त कठीण बनते. याबाबतीत, अजून एक फार महत्वाचे असे की, वर वर दिसत नसली तरी जन्मापासूनच मुलांची निरिक्षणक्षमता प्रखर असते. पालकांची वागणूक व पाल्याला दिला जाणारा सल्ला यांच्यातली तफावत/लपवालपवी लहान मुलेही चटकन ओळखतात. तशी तफावत नसेल तरच पालकांच्या शब्दांना वजन प्राप्त होते आणि हे शिक्षण बहुदा आपोआप व विनाअडचण होत जाते. ****** माझे आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक होते. पण, मी स्वतःहून विचारल्याशिवाय घरी कधी बाजूला बसून अभ्यास घेतला असे झाले नाही. गृहपाठ पालकांनी करणे ही संकल्पनाच नव्हती तेव्हा. किंबहुना, असे काही म्हटले असते तर खात्रीने पाठीत दोन-चार धपाटे बसले असते! आमची परिस्थिती निम्न मध्यम वर्गीय होती. भाऊबंदकी नको म्हणून भाऊबंदकी सुरू होण्याअगोदरच वंशपरंपरागत संपत्तीवरचा हक्क दोघांनीही स्वतःहून सोडून दिलेला होता. तसे करणार आहोत असे आम्ही दोन भाऊ लहान असताना, आम्हाला सांगितले होते. थोडी जाण आली तेव्हा, आई-वडीलांनी एकत्र बसवून सांगितले की, "आपण काही श्रीमंत नाही. खाण्यापिण्याचे योग्य लाड होतील, योग्य तितके चांगले कपडे मिळतील. पण फुकाची चैन किंवा आमच्यानंतर वारसाने मिळण्यार्‍या डबोल्याचा विचारही करायची नाही. शिक्षणाकरिता मात्र जेवढा लागेल तितका खर्च करायला मागेपुढे पाहणार नाही, कर्ज काढूनही तो करू." त्या बोलण्याने माझ्या जीवनात गुरुमंत्राचे काम केले आहे. आज मी जो काही आहे, तो त्यामुळेच आहे. नशीबाने माझ्या मुलालाही तो विचार पटला आणि त्यानेही बोट दाखवायला जागा दिली नाही. त्यापुढे जाऊन, शिक्षण व कौशल्याच्या महत्वासंबंधीचा, अजून एक धडा मी अनुभवाने शिकलो, तो असा... समजा शिक्षणावर खर्च करण्याऐवजी पालकांनी मुलाला मोठी रक्कम दिली... अगदी एक पन्नास लाख रुपये दिले असे समजूया. मुलाकडे योग्य शिक्षण, कौशल्य अथवा वैचारिक समज नसेल तर ते सगळे पैसे खर्च करून उडवून टाकायला फारसा वेळ लागणार नाही व नंतर पैसे कमवायची अक्कल आलेली नसल्याने निराशा येण्याचीच जास्त शक्यता आहे. याविरुद्ध, तोच पैसा पाल्याला योग्य शिक्षण व कौशल्य देण्यासाठी वापरला तर तितके किंवा जास्त पैसे पाल्य स्वतःच्या हिमतीवर कमवू शकेल. याशिवाय, जरी काही कारणाने त्याचे ते कमावलेले पैसे बुडाले तर, "ते मी माझ्या हिमतीवर मिळवले होते, मी परत कमवेन", हा आत्मविश्वास जीवनभर पाल्याच्या बरोबर असेल व पाल्य हा आत्मविश्वास पुढच्या पिढीकडे पोचवू शकेल... जे अत्यंत अमूल्य आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेडी गुरुवार, 12/20/2018 - 17:44 नवीन
डॉक्टर तुमचा प्रतिसाद खूप आवडलाय . विचार करत आहे . व्यावहारिक म्हणाल तर माझी मुलगी नको इतकी व्यावहारिक झालीय असे मला वाटते . जसे कि पॉकेटमनी साठवणे . मला जर कधी अडीनडीला लागले तर त्यावर इंटरेस्ट घेणे . घरचे कामही पैशाच्या मोबदल्यात करणे . पणत्या , कानातले , ग्रीटिंग्स , बुकमार्क असले करून विकणे . आईला तुझ्या ऑफिसमध्ये सर्व दाखव म्हणून सेल्समन करतो तशी आर्जवे करणे . मेहंदी अतिशय चान्गली काढते तर ती कोणच्याही हातावर फुकट न काढणे . शाळा कॉलेजच्या मुलांना जर्नल प्रोजेक्ट करून देणे आणि त्याबदल्यात पैसे घेणे . असले बरेच उद्योग करते . अगदी कामवाल्याना बोलणे , मी बोलले नाही तर मला रागावणे असले उद्योग करते . अगदी माझीही तुलना माझ्या एखाद्या ऑफिसमधल्या माझ्या वयाच्या बाईशी करून तिने कसे स्वतःला मेंटेन केलेय ... असले बरेच उद्योग करते .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/20/2018 - 19:32 नवीन
तुमचा लेख, आधिचे प्रतिसाद आणि विशेषतः हा वरचा प्रतिसाद वाचून, माझ्या अंदाजाप्रमाणे, "तुमची मुलगी हुशार आहे. मनात आणले तर काही चांगले करायची क्षमता तिच्यात आहे. पण, तिचा EQ तुमच्या EQवर मात करत आहे. ती तुम्हाला "मॅनेज" करत आहे. मऊ जमीन मिळाल्याने, कोपराने खणत आहे !" हे काळजी करण्याजोगे आहेच, पण ते सर्व तुम्हाला कौतुकाचे वाटत आहे (किंवा तुम्ही शरणागतीने हात टेकले आहेत) असे तुमच्या लिखाणात सतत भासत आहे, जे जास्त काळजी करण्याजोगे आहे. यात, सर्वात काळजीची गोष्ट अशी की, असे करताना ती तिच्या स्वतःच्या भवितव्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे, हे ध्यानात येण्याची पोच तिच्यामध्ये नाही... तशीही ही पोच पालकांनी मुलांना शिकवायची गोष्ट आहे. तिच्या भल्यासाठी, वरच्या प्रतिसादात लिहिलेले एक सत्य तिला स्पष्ट शब्दांत समजाऊन सांगणे जरूरीचे आहे... "आई-वडील तिला जन्मभर पुरणार/पोसणार नाहीत. एका वेळेनंतर तिला स्वतःचे आयुष्य स्वतःच्याच जिवावर कंठायचे आहे. ते चांगले असावे असे वाटत असेल तर त्यासाठी लागणारे योग्य शिक्षण व कौशल्य तिने आताच स्वतःहून मिळवायला हवे... तसे केले नाही तर, नंतर नाईलाजाने जास्त त्रासाचे खडतर आयुष्य भोगणे भाग पडेल. आणि तेव्हा खांद्यावर मान ठेऊन रडायला किंवा आधार द्यायला आई-वडील नसतील. तसेच, आई-वडिलांना जसे ती आता आपल्या हट्टांवर नाचवत आहे तसे इतर कोणी जन्मभर नाचायला तयार होणार नाही. याचा परिणाम ती एकटी पडण्यात होऊ शकतो." माझ्या अंदाजाप्रमाणे, हे शांतपणे व स्पष्टपणे समजाऊन सांगितले तर, ते समजण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. तिला हे समजाऊन देणे जरूरीचे आहे की, तिच्या सद्याची अवस्था काही फार चांगली नाही. त्याकरिता ती स्वतःच्या स्थितीची तुलना तिच्या समवयस्क मुलींच्या आताच्या आणि आजपासून ५ वर्षांनंतरच्या शक्य असणार्‍या स्थितीबरोबर करून पाहू शकते. तिच्या सद्याच्या अवस्थेसाठी तिचे स्वतःचेच विचार व आचार जबाबदार आहेत आणि आजपासून ती काय करेल त्यानेच तिचे भवितव्य कसे असेल हे ठरेल. "तुम्ही (पक्षी : पालक) घोड्याला (पक्षी : पाल्याला) पाण्यापर्यंत नेऊ शकता (पक्षी : संधी मिळविण्यासाठी मदत करू शकता), पण पाणी पिणे-न पिणे व किती प्यायचे (पक्षी : संधीचे सोने करणे न करणे), हे केवळ घोड्याच्या विचारावर व कृतीवरच अवलंबून असते." हे सत्य तिला समजावणे आवश्यक आहे. हे तिने समजून घेतल्यानंतरही, तिच्यामध्ये होणारे सुरुवातीचे बदल तात्कालिक आणि/अथवा "ठीक आहे, करून बघू प्रकारचेच" असतील. त्यापुढे, पालकांनी त्यांच्या कृतीने (तिच्या अवास्तव मागण्यांपुढे न झुकणे व तिच्यातील सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देणे), ते बदल केवळ कायमच ठेवले पाहिजेत असे नाही तर, त्यांचे "व्हर्च्युअल सर्कल" बनवून, दर पुनरावृत्तीमागे अधिकाधिक सबळ बनवले पाहिजेत... ते सकारात्मक बदल नेहमीच्या सवयी बनेपर्यंत तरी. अन्यथा, गाडी परत पूर्वीच्याच दिशेने धावायला वेळ लागणार नाही. असो. माझ्या मनात आलेले विचार तुमच्यापर्यंत पोचवले. पूर्ण परिस्थिती केवळ तुम्हालाच अवगत आहे, तिचा सारासार विचार करून तुम्ही योग्य कृतीचा निर्णय घेण्यास समर्थ आहातच. तुमच्या मुलीच्या उत्तम भवितव्यासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/20/2018 - 20:56 नवीन
व्यावहारिक म्हणाल तर माझी मुलगी नको इतकी व्यावहारिक झालीय असे मला वाटते . जसे कि पॉकेटमनी साठवणे . मला जर कधी अडीनडीला लागले तर त्यावर इंटरेस्ट घेणे . घरचे कामही पैशाच्या मोबदल्यात करणे . पणत्या , कानातले , ग्रीटिंग्स , बुकमार्क असले करून विकणे . आईला तुझ्या ऑफिसमध्ये सर्व दाखव म्हणून सेल्समन करतो तशी आर्जवे करणे . मेहंदी अतिशय चान्गली काढते तर ती कोणच्याही हातावर फुकट न काढणे . शाळा कॉलेजच्या मुलांना जर्नल प्रोजेक्ट करून देणे आणि त्याबदल्यात पैसे घेणे . असले बरेच उद्योग करते . अगदी कामवाल्याना बोलणे , मी बोलले नाही तर मला रागावणे असले उद्योग करते . अगदी माझीही तुलना माझ्या एखाद्या ऑफिसमधल्या माझ्या वयाच्या बाईशी करून तिने कसे स्वतःला मेंटेन केलेय ... असले बरेच उद्योग करते . व्यावहारिकता म्हणजे, योग्य वेळी योग्य कृती निवडण्याची आणि ती अंमलात आणण्याची क्षमता. मुलीने अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर लहानसहान गोष्टी करून पैसे मिळवणे याला मी व्यावहारिकता न म्हणता, तिचा अभाव असे म्हणेन. कारण, यामुळे, तिचे शिक्षण व कौशल्य कमावण्यासाठीचा वेळ क्षुल्लक व गरज नसलेले पैसे कमावण्यात खर्च होत आहे व त्याने भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. माझे उदाहरण देऊन मी माझा मुद्दा जरासा विशद करतो. माझा मुलगा अमेरिकेत एमएस करायला गेला तेव्हा, "एमएस पूर्ण होईपर्यंत पैश्याकरिता काम करायचे नाही, सर्व खर्च मी करेन. पण, त्याने त्याचा पूर्ण वेळ उत्तम GPA मिळविण्यासाठी व पुढच्या करियरसाठी आवश्यक गोष्टींवरच खर्च करायचा" असा आमचा करार होता. तो त्याने कसोशीने पाळला आणि एक पाऊल पुढे जाऊन, एका वर्षाच्या तीन सेमेस्टर्समध्ये उत्तम GPA सकट एमएस पूर्ण केली. तिसर्‍या सेमेस्टरमध्ये आलेली नोकरीची ऑफर, आमच्या करारामुळे, त्याने मला न सांगता नाकारली. त्याच कंपनीने एमएस झाल्यावर परत संपर्क साधून ऑफर दिली, तेव्हाच त्याने मला ती कहाणी सांगीतली ! एमएस करताना, पैसे डोळ्यासमोर ठेवणे ही त्याची आवश्यकता नव्हती आणि तसे करून GPAवर प्रतिकूल परिणाम करून घेणे, ही कृती योग्यही झाली नसती. काम न केल्यामुळे मिळालेला वेळ वापरून त्याने २-५ वर्षे मुदतीचा अभ्यासक्रम एका वर्षात संपविल्याने राहण्याचा खर्च फक्त एका वर्षाचाच झाला (खर्च वाचला) आणि उत्तम GPAमुळे त्याला करियरमध्येही फायदा झाला व पुढे होत राहील. काम करून पैसे मिळविणे आणि त्यामुळे एमएसला २+ वर्षे घालवण्यापेक्षा हा पर्याय अनेक पटींनी फायद्याचा ठरला.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/20/2018 - 23:34 नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे, तुमच्या मुलाच्या बाबतीत शैक्षणिक लक्ष्य निश्चित झालेलं होतं. परंतु जेडीपुत्रीच्या बाबतीत कशाचाच पत्ता नाही. मला वाटतं की शार्क माशाला जसा रक्ताचा वास येतो तसा वास जेडीपुत्रीस येतो. ही खरंतर खूप दिलासादायक गोष्ट आहे. फक्त आलेला पैसा नीटपणे कसा गुंतवावा हे तिला कळंत नाहीये. पैशाचा माग काढणे आणि त्यातनं धंदा उभारणे ही दोन भिन्न कौशल्यं आहेत. माझ्या मते तिला व्यवसाय कसा चालवावा याचं मार्गदर्शन झालेलं बरं पडावं. तीन वर्षांच्या पूर्ण एमबीए ची गरज नाही. ज्यामुळे विचाप्रक्रियेस गती मिळून लक्ष्यनिश्चिती होईल असा एखादा छोटासा कोर्स केलेला चालून जावा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/21/2018 - 16:29 नवीन
परंतु जेडीपुत्रीच्या बाबतीत कशाचाच पत्ता नाही. हेच फार महत्वाचे आहे. तिने विचारशक्ती दाखवून काही मोठा प्रकल्प हाती घेतलेला असता तर तिला चाईल्ड प्रॉडिजी समजून, तुम्ही म्हणता ते, योग्य असते. पण वस्तूस्थिती तशी नाही. शिक्षण व कौशल्य मिळविण्यात खर्च करायचा वेळ, पैसे मिळवण्याच्या (तेही अनियमित आणि थोडेसे) मागे लागून व्यर्थ चालला आहे. इतकेसे पैसे कुठेही गुंतवले तरी पुढील जीवन स्थिर होईल इतके किमान ध्येय साध्य होणे कठीण आहे. चाईल्ड प्रॉडिजी सोडून इतर मुलांनी २५-२७ पर्यंत आपले मूलभूत (कमीत कमी बॅचलर्स) शिक्षण व कौशल्य मिळविणे आवश्यक असते. ३५ वर्षांनंतर कितीही मोठी डिग्री घेतली तरी, एज बार झाल्याने तिचा उपयोग होईलच असे नाही... झालाच तरी, लहान वयाची अनेक मुले तुमच्या पुढे गेलेली असतात... असा सर्वसाधारण अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
प
पलाश गुरुवार, 12/20/2018 - 08:33 नवीन
इथे लिहिलंत ते खरंच छान झालं. चर्चा चांगली चालू आहे. आमच्यावेळी अशी चर्चा वाचायला मिळाली असती तर जरा बरं झालं असतं. मोठं मूल या महिनाअखेरीस बत्तीस वर्षांचं होईल म्हणजे पालक म्हणून माझं तेवढं वय आहे. समस्या प्रत्येक बालक-पालक नात्यात येत असतात. समस्या संपते. आपण बाहेर पडतो तेव्हा आणखी बळकट व खंबीर झालेलो असतो. मार्ग नक्की निघेल. माझ्यामते मुलांना सगळं आपापलं काम करता येणं गरजेचं आहे. हातांनी रोजची सगळी कामं करता येणं हे एक आवश्यक कौशल्य आहे. स्पर्धेचं युग म्हणता म्हणता मुलं हे कौशल्य विसरत चालली आहेत हे मी आजूबाजूला पहाते आहे. अशी कुशल मुलं आव्हानांना चांगली सामोरी जातात, आनंदी असतात हेही एक निरीक्षण आहे. "तू प्राॅब्लेम नीट ऐकून घेत जा. मला कोणीतरी ऐकायला हवं असतं. ती माझी गरज आहे. मधेच थांबवून समस्या सोडवायची घाई करत जाऊ नकोस. ती सुटेल. तू फक्त ऐक थोडा वेळ." हा अगदी अलिकडेच धाकटीकडून मिळालेला अहेर. आपण असं करतो?? .हे सुरवातीला नाही पण नंतर पटलं. ...न ऐकण्याची चूक आता सुधारते आहे. :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/20/2018 - 08:40 नवीन
"तू प्राॅब्लेम नीट ऐकून घेत जा. मला कोणीतरी ऐकायला हवं असतं. ती माझी गरज आहे. मधेच थांबवून समस्या सोडवायची घाई करत जाऊ नकोस. ती सुटेल. तू फक्त ऐक थोडा वेळ." हा अगदी अलिकडेच धाकटीकडून मिळालेला अहेर. तुम्ही नशीबवान आहात. तुमची मुलगी प्रगल्भ आहे !
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 12/20/2018 - 09:19 नवीन
मोठं मूल या महिनाअखेरीस बत्तीस वर्षांचं होईल
हे वाक्य फार आवडलं! एका 80 वर्षांच्या आजींनी आपल्या साठीच्या मुलाला तो कार घेऊन परगावी जाताना विचारलं होतं की "जाशील ना रे बाबा नीट, की मी येउ सोबत?". त्याची आठवण आली! कितीही मोठं झालं तरी ते मूलच!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/20/2018 - 09:26 नवीन
साठी म्हणजे दुसरं बालपण म्हणतात ना, म्हणून विचारलं असेल ! :)
  • Log in or register to post comments
म
मनिमौ गुरुवार, 12/20/2018 - 10:12 नवीन
खूप आवडला प्रतिसाद. मुलं जेव्हा पाच सहा वर्षाची होतात तेव्हाच अवास्तव मागच्यांना प्रेमाने पण ठामपणे नकार दिला पाहीजे. पिअर प्रेशर हा अंत्यत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणी हे प्रेशर अगदी साध्या गोष्टी पासून सुरू होते. प्राथमिक शाळेत तर वेगळे कंपास खोडरबर अशा वस्तू पण मला तिच्यासारखी वस्तू हवीच आहे हे ट्रिगर करतात. वय वाढेल तस या गोष्टीची जागा सायकली;मोबाईल फोन ई वस्तू घेतात. काही हट्टांना वेळीच नाही म्हणणे आणी आपली आर्थिक परिस्थिती मुलांना समजावून सांगणे हे बहुतेक वेळा कामी येत
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 12/20/2018 - 12:56 नवीन
धागा आणि प्रतिसाद यातून उत्तम विचारमंथन सुरु आहे. जेडी यांच्या लेखनातून काही बाबी जाणवल्या १. मुलगी व आई यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. परंतु या संवादातून मुलीला घराच्या आर्थिक, व्यावहारिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीची योग्य जाणीव दिली गेली नाही. संवाद असेल तर ती अजूनही देता येईल. ही प्रेमातूनच येते. एकदा ही जाणीव मनात खोल रुजली की मुलांचा हट्टीपणा आपोआप मावळतो असा अनुभव आहे. २. मुलीला आर्ट्सला जायचे होते तर तिच्या इच्छेचा आदर करायला हवा होता. मग जितके गुण आहेत त्याप्रमाणे जे मिळेल त्या कॉलेजला प्रवेश घेणे अपरिहार्य आहे. हे तिला समजण्यात अडचण कसली ? ३. केवळ पुण्यातीलच कॉलेजेस हवीत असे असण्याची गरज नाही. जवळपासच्या गाव/शहरातील कॉलेजेससुद्धा शैक्षणिकदृष्ट्या उत्तम आहेत. ४. बॉयफ्रेंड वगैरे संस्कृती आवडत नसेल तर पुण्याबाहेरील कॉलेजमध्ये नक्कीच तसं वातावरण मिळू शकलं असतं. एकूणच असं वाटतं की टीन एजच्या मुलांवर काही लादता कामा नये. आजची पिढी आपल्यापेक्षा स्मार्ट आहे आणि त्यांना सोशल मिडियामुळे आजूबाजूच्या वास्तवाची नको इतकी तीव्र जाणीव आहे. तेव्हा आपण पालकांनीही त्यांच्या अडचणी मानसिकता नीट समजून त्यांना पर्याय दाखवावे. जेडी ताई , कृपया टीका असे समजू नये. काही वर्षांपूर्वी याच स्टेजमधून गेल्यामुळे रिलेट होऊ शकले आणि कहो सांगावेसे वाटले, इतकेच.
  • Log in or register to post comments
ज
जेडी गुरुवार, 12/20/2018 - 17:46 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद . आम्ही पुण्यातच राहत असल्याने पुण्याच्या बाहेर जाणायत पॉईंट नाही वाटला आणि हे सर्व अकरावीची ऍडमिशन घेतल्यावर चालू झाल्याने , आदीच पुण्याच्या बाहेरचा विचार करणे शक्य नव्हते
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 12/20/2018 - 14:23 नवीन
१. आपल वागण आणि बोलण यात अंतर पडत नसेल तर मुल आपल्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवतात असा माझा अनुभव आहे. २. आपण जर प्रत्येक बाबतीत आग्रही रहात असू तर मुलही हळूहळू तसच करायला लागतात. ३. बऱ्याच वेळेस मुल भितीपोटी खोट बोलतात. पालकांची भिती न वाटण महत्वाच. ४. घरचे संस्कार बळकट होण्यासाठी त्या संस्कारामागची कारणपरंपरा सांगता आली पाहीजे. ती माहीत नसेल तर तसे स्पष्ट केले पाहीजे. ५. वय वर्षे १२-१५ पर्यंत एखादी शंका पालकांच्या ऐवजी मीत्रमैत्रीणींना विचारली जात असेल तर तो धोक्याचा संदेश समजला पाहिजे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/20/2018 - 15:23 नवीन
पिराताई,
हा बॉयफ्रेंड वाला मुद्दा खरंच अवघड आहे.
सवाष्णींच्या कळपात कुमारिका अवघडायचीच की. हा मुद्दा उद्भवण्याचं कारण म्हणजे बॉयफ्रेंड असल्यावर मुली थोड्या वेगळ्या वागतात. हे जे वेगळं वर्तन आहे त्याची संगती लावणं कुमारिकेस कठीण जातंय. त्यामुळे तिला न्यूनगंड येत कामा नये इतकंच तिच्या मनावर ठसवलं गेलं पाहिजे. स्वत:चा बॉयफ्रेंड करणे हा सद्य परिस्थितीवर उपाय नव्हे. स्वत:त काही न्यून नाही हे तिला पटलं पाहिजे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Fri, 12/21/2018 - 05:04 नवीन
जेडी, (१) क्लासच्या कुबड्या न घेता स्वतहून अभ्यास करायची सवय तुमच्या मुलीला आहे. (२) 12वी पर्यंत सायन्स घेतल्याने तिला बरेच ऑप्शन्स ओपन आहेत (३) बॉयफ्रेंडबाबत विचार स्पष्ट असल्याने कोणत्याही भावनिक गुंत्यात ती अडकलेली नाही (४) तुमच्याशी असलेल्या तिच्या नात्यात मोकळेपणा आहे (५) तिला वाचनाची आवड आहे, कला अवगत आहे. (६) तुम्हाला नको तितकी वाटत असलं तरी ती व्यावहारिक आहे. (तिला फारश्या मित्र-मैत्रिणी नाहीत या पार्श्वभूमीवर ती आपल्यातल्या कलेचा उपयोग कोणाला संतुष्ट करण्यासाठी करून वेळ घालवत नाही. आपल्या कलेचं आणि वेळेचं रुपांतर पैशात कसं करायचं ही अजून एक दुर्मिळ कला तिच्याकडे आहे) या जमेच्या बाजू आहेत. तिचं जे काही चाललं आहे त्यातून ती नक्की मार्ग काढेल. तुम्ही फकत सोबत रहा. काय पर्याय आहेत, त्यातले खरे किती उपयुकत याची माहिती आजूबाजूकडूनही काढत रहा. तिला काय आवडेल, त्याची व्यावहारिकता यावर संवाद साधत रहा. प्रसंगी तिचं मत सपशेल चुकीच वा स्वप्नाळू वाटलं तरी थेट आणि ताबडतोब मोडीत काढू नका. (याचा परिणाम म्हणजे ते मत दृढ होतं) वर डॉ. खरेंनी म्हटल्याप्रमाणे उपदेशाचे बोल दोन मिनिटात संपवा. मी तुमच्याच नावेतली प्रवासी आहे आणि हे करायला मी ही शिकतेय. माझी मुलगी गेल्या वर्षी बारावी झाली. (१) नववी-दहावी - आर्टस घेऊन लिग्विंस्टिक्स करणार (२) दहावी – मला बॉटनी-झुओ खूप आवडतं. पण मी मेडिकल, पॅरामेडिकल नाही करणार. बीएससी करेन (३) अकरावी – सहामाहीनंतरब \\ लिहीते नन्तर
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/21/2018 - 06:03 नवीन
आजकाल बॉय फ्रेंड असणे हे नुसते फॅशनच नव्हे तर आवश्यक झाले आहे अशी स्थिती आहे. माझी मुलगी नववी / दहावीत असताना तिची पण मनस्थिती अशीच होती. नुसतंच बॉय फ्रेंड असणे यात गैर काय आहे असं नव्हे तर बॉय फ्रेंड असलाच पाहिजे अशी काही तरी विचित्र मनस्थिती होती. त्यामुळे तिची एका मुलाशी वाजवीपेक्षा जरा जास्तच मैत्री "होत" होती. (दुर्दैवाने या मुलाची आणि त्याच्या आईची मनोवृत्ती अशी होती कि मुलाला बऱ्याच मैत्रिणी असणे म्हणजे मुलगा स्मार्ट आहे पण मुलीला मात्र मित्र असू नये. आणि आमच्याकडे "पैसे आहेत" मग मुलाला गर्लफ्रेंड असणारच) मी शांतपणे तिला काही गोष्टी समजावल्या-- १ ) पहिली गोष्ट म्हणजे बॉय फ्रेंड असणे यात काही चूक नाही हे मी मान्य केले. (कारण ते तुम्हाला पटत असले/ नसले तरी ती चूकच आहे हे तुम्ही ठसवून सांगितले तर तुमचा संवाद बंदच होतो) २) तिला एक गोष्ट समजावून सांगितले कि अशा गोष्टीत मुलींची भावनात्मक गुंतवणूक(emotional investment) मुलांपेक्षा जास्त असते. येतेच मी मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्या ब्रेक अप नंतर मधू सप्रे या नैराश्याची शिकार झाल्या आणि मिलिंद सोमण आपल्या करियर मध्ये पुढे गेले याबद्दल विस्ताराने सांगितले. ३) जवळचा मित्र असणे हि अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु तो मुलगाच असला पाहिजे असे नव्हे तर एखादी चांगली सरळ मनाची मुलगी असू शकते हे हि समजावून सांगितले ४) आयुष्याच्या या टप्प्यावर मैत्री असणे यापेक्षा शिक्षण जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे मैत्री केली तरी त्यासाठी आपले शिक्षण "पणाला लावणे" यासारखा मूर्खपणा नाही. तेंव्हा कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे (priority) हे आपल्याला समजले पाहिजे. तेंव्हा पूर्ण वेळ केवळ आपल्या बॉय फ्रेंड बद्दल विचार करत बसून मुली आपले नुकसान कसे करून घेतात हे सांगितले. ५) प्रेम करणे अजिबात चूक नाही पण टिनपाट मुलाबरोबर प्रेम करणे आयुष्यासाठी महागात पडू शकते. याचे एक नातेवाईकाच्या मुलीचे उदाहरण समोर ठेवले. यानंतर तिला त्या मुलाच्या आणि त्याच्या आईच्या "पुरुषप्रधान" मनोवृत्तीबद्दल हळूच सांगितले.(you are just an option for them) ६) तुझा प्रेमविवाह झाला तर मला आनंदच होईल पण मुलगा मानसिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सुसंस्कृत असला पाहिजे, बापाच्या पैशाचा माज असणारा नको हेही समजावले. ७) शेवटी हे तुझं आयुष्य आहे आणि आई बाप आयुष्याला पुरत नाहीत. भावनेच्या आहारी जाऊन वेडपट निर्णय घेतला तर त्याचे परिणाम दीर्घ कालपर्यंत भोगावे लागतील हे हि समजावून सांगितले. ८) स्मार्ट दिसण्यासाठी/असण्यासाठी किंवा केवळ "इन थिंग "म्हणून "बॉयफ्रेंड" असणे आवश्यक नाही. कारण टिनपाट मुलींना पण बॉयफ्रेंड असतो. एखादा चांगला मुलगा ज्याच्याशी काही "वैचारिक" पातळीवर संवाद होऊ शकेल असा मुलगा बॉयफ्रेन्ड असावा. केवळ पुरुष आहे म्हणून बॉय फ्रेंड असणे हे जनावरांच्या पातळीवरचे (शारीरिक पातळीवरचे) आहे. ९) वरील सर्व मुद्दे एका वेळेस एकच मुद्दा आणि तो सुद्धा दीड ते दोन मिनिटात संपवणे कारण जास्त बोलत राहिले तर मुले चक्क मनाची कवाडे बंद(shut off) करतात. १०) बायकोला गप्प बसण्यासाठी फार वेळा सांगायला लागले होते. (बायका भावनेच्या आहारी फार पटकन जातात पण त्याचा परिणाम उलट होतो असा अनुभव आहे) तेंव्हा थंड डोक्यानेच काम करावे लागते. हि प्रक्रिया ६-७ महिने चालली होती. सुदैवाने बाप सांगतो त्यात काहीतरी तथ्य आहे हे समजू लागल्यावर तिच्या वृत्तीत बदल झाला आणि हे प्रकरण पुढे गेलेच नाही. यानंतर मुलीला बॉयफ्रेंड असलाच पाहिजे हि संकल्पना भंपक आहे हे पटायला लागले. यानंतर अनेक मुलांशीआणि मुलींशी तिने निखळ मैत्री केली ती मुले घरीही येत असत / येतात. तारुण्यातील मुलगा किंवा मुलगी एखाद्या वेगवान एक्स्प्रेस गाडीसारखे असतात. एकदम "वळवायचा" प्रयत्न केल्यास मोठा अपघात होऊ शकतो एवढेच लक्षात ठेवावे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/21/2018 - 07:47 नवीन
परफेक्ट.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 12/21/2018 - 08:17 नवीन
सुदैवाने बाप सांगतो त्यात काहीतरी तथ्य आहे हे समजू लागल्यावर
अत्यंत महत्वाचा दुर्मिळ फॅक्टर.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/21/2018 - 14:40 नवीन
मुलांना मी मोठा आहे म्हणून तुम्ही माझे ऐकले पाहिजे हे फारसे पटत नाही. (याचे "न बोललेले" उत्तर असे असू शकते कि तुम्ही माझ्यापेक्षा काही वर्षे अगोदर जन्माला आलात त्यात तुमचे काय कर्तृत्व?) पण "कळकळीने" सांगितले कि मला तुमच्या पेक्षा चुका करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा जास्त अनुभव आहे. (I HAVE MORE EXPERIENCE AT BEING WRONG THAN YOU) तर ते "कुठेतरी" पटते "भले ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसले नाही तरी". आणि मुले निदान तुम्ही काय बोलता आहेत त्याचा विचार करू लागतात. विचार केल्यावर बाप सांगतो त्यात काही तरी तथ्य आहे असे जाणवले तर अजून विचार होऊ शकतो खडकावर एकदम भरपूर पाणी ओतले तर त्यावर परिणाम होताच नाही आणि काही काळाने खडक "कोरडा" होतो. याउलट थेम्ब थेम्ब ठिबकत ठेवला तर काही काळाने खडक सुद्धा दुभंगतो.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Fri, 12/21/2018 - 14:59 नवीन
I HAVE MORE EXPERIENCE AT BEING WRONG THAN YOU
वाह !
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 12/21/2018 - 15:31 नवीन
पण "कळकळीने" सांगितले कि मला तुमच्या पेक्षा चुका करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा जास्त अनुभव आहे. (I HAVE MORE EXPERIENCE AT BEING WRONG THAN YOU) तर ते "कुठेतरी" पटते
लाख बोललात. हेच नेहमी वाटतं.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/21/2018 - 16:15 नवीन
लाखमोलाचे शब्द !
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ Fri, 12/21/2018 - 08:34 नवीन
माझ्या मुलाच्या बाबतीत पण असे झालेले! त्याच्या सर्व मित्र मैत्रींनींना घराचे दरवाजे उघडे असल्याने लपून छपून घराबाहेर फारसे काही घडायला वाव उरला नाही. मुलाला मी हेच सांगितलेले की शिकायच्या वयात शिकून घे. पैसे नंतर पुढे कमवायचेच आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 12/21/2018 - 14:01 नवीन
आवो खरे डागदर, आमास्नी येक सांगा बरं. तुमी अंगासंगे मनाचाबी यक्स रे काडत आसता व्हय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Fri, 12/21/2018 - 17:53 नवीन
अतिशय महत्वपूर्ण प्रतिसाद , डॉक्टर तुमचे मनापासून आभार
  • Log in or register to post comments
ज
जेडी Fri, 12/21/2018 - 17:51 नवीन
पहिले दोन लेख मी दहावीचा रेसुलत लागल्यावर लगेचच ऐसी अक्षरे लिहिले होते पण पुढे काही लिहिणे झालेच नाही, वरचे सर्वच प्रतिसाद अतिशय मौल्यवान असून मी नंतरचा लेख तेंव्हाच का लिहिला नाही याचे मला वाईट वाटत आहे . मनापासून धन्यवाद , सर्वच प्रतिसादातून मला खूप काही शिकायला मिळत आहे, मिळेल . माझ्यासारख्या असंख्य पालकांना पण खूप शिकायला मिळेल . विशेष करून दोन्ही डॉक्टरांचे प्रतिसाद मी पुन्हा पुन्हा वाचले , माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल ह्यावर खूप विचार करतीय . ह्या दोन चार दिवसात काही प्रतिसाद मी तिला तसेच्या तसे वाचून दाखवलेत. तिच्या वागण्यात फरक होतोय हे मी अनुभवतेय . इथूनपुढेपण तिचे निरीक्षण करेन . पुन्हा ये रे मागल्या झालेच तर घोड्याला पाणयापर्यंत आणायची तयारीही ठेवेन . पूर्वी मला नुसत्या डोळ्यांना धारा लागत आणि तिचे मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस सुरु होई . आता तसे होणार नाही याची काळजी घेईन . यशोधरा ताई आणि सुधीर कांदळगावकर यांचेही प्रतिसाद मी बारकाईने वाचले आणि मी कोठे कमी पडले ह्यावर पुन्हा एकदा चिंतन केले . चुका झाल्याचं आहेत , सुधारण्याचा नक्की प्रयत्न कारेन . गामांची व्यावसायिक शिक्षणासाठीचा एखादा कोर्स करण्याविषयीच्या सूचनेचा पण विचार केला आहे . पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. इथूनपुढच्या लेखातही मी इतर अनेक मित्र मैत्रीचे किस्से सांगणार होते पण ते सांगावे कि नको ह्याबद्दल मनात संभ्रम आहे कारण ह्याच धाग्यात अतिशय उपयुक्त सूचना मिळालेल्या आहेत .
  • Log in or register to post comments
स
सुचिता१ Sat, 12/22/2018 - 09:49 नवीन
संवेदनशील विषय मांडला तुम्ही, मला व माझ्या सारख्या सूपातल्या पालकांना चर्चेचा खुप उपयोग होणार आहे. प्लिज पुढचा लेख नक्की लिहा . पुलेशु.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Sat, 12/22/2018 - 13:26 नवीन
आमच्यासारख्या सुपातल्यांच्या विचारांना चालना मिळतेय.
  • Log in or register to post comments
आ
आंबट गोड Mon, 12/24/2018 - 08:01 नवीन
बाब म्हणजे.. हल्ली मुले अजिबातच एकमेकांच्या घरी जात नाहीत....सदैव 'बाहेर' भेटायचे ठरवितात...? असे का? घरी म्हणे तुम्ही 'स्टेअर ' करता, अनावश्यक (रीडः भोचक!) प्रश्न विचारता...इ. पण त्या मुळे आम्हाला मुलांचे मित्रच माहिती नाहीत. मी मुलाला व मुलीलाही कितीदा म्हणते...की अरे तुमच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलवा..आपण चांगले काही खायला करु , तुम्ही वेगळे गप्पा मारत बसा हवे तर.. पण नाहीच! कुणी नाही येत म्हणे! तुमचा काय अनुभव?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा