एकपक्षीय पंतप्रधान
नमस्कार मिंत्रानो ,
मला मराठी टाईप नीट करता नाही.
परंतु तुम्ही मी मांडत असलेला मुद्दा समजून घेऊन कॉमेंट द्याल असं वाटत आहे.
संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी),
,
हा(अश्याप्रकारचा) पंतप्रधानपदी कोणते निर्णय घेऊन तडीस नेऊ शकतो, कि जे
,
युती /आघाडीचा बहुपक्षीय पंतप्रधान (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) घेऊ शकत नाही ?
संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान असण्याचे काय बेनेफिट असतात देशाला ?
लोकांना कसे समजावुन सांगता येऊ शकतील ?
.
जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी) यांच्या कारकिर्दीतील व
.
जीडीपी ग्रोथ (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) यांच्या कारकिर्दीतील तुलना करण्यास रिलायबल डेटा कुठे मिळेल ?
संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान असण्याचे काय बेनेफिट असतात देशाला ?
अगं आई गं...! आज काय खरं नाय. मित्रा, एकपक्षीय पंतप्रधानांच्या बेनीफ़िटवर बोलायचं असल्यास आमच्याकडे आमचे मित्र डॉक्टर.... ते त्यांचं नाव, ते हे आपले, ते आपणास एक पक्षीय पंतप्रधान पंतप्रधानांचे बेनीफ़िट या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करतील. त्यांचं बोलून झालं की... तसं त्यांचं बोलून संपतच नाही, पण त्यांचा उत्साह जरा आवरला की की मग एकपक्षीय पंत्रप्रधानपदाचे तोटे याविषयावर आम्ही सविस्तर बोलू तो पर्यंत ''दिल्ली ते गल्ली'' एक पेशीय सॉरी एक पक्षीय पंतप्रधानाचे कार्य आणि परिणाम वाचत राहा. हलकेच घ्या हो डॉक्टर साहेब. *अटी लागू. *
-दिलीप बिरुटेऐकपेशिय सरकार केंद्रात आसने हे भारता सारख्या असंख्य भाषा आणि संस्कृती आसलेल्या देशासाठी खूप धोकादायक आहे .ऐकपेशिय सरकार म्हणजे काय? हे तुम्हाला तरी कळलं का? हे महाशय कुठल्या आसनांविषयी बोलत आहेत? भारतात प्रथमपासूनच असंख्य भाषा आणि संस्कृती आहेत. मग काय एक पंतप्रधान न नेमता प्रत्येक राज्याचा एक सदस्य असलेलं पंतप्रधान मंडळ नेमायचं का?केंद्रात नेहमीच अस्थिर सरकार असणे हे जनतेच्या खूप फायद्याचं असते .याचं तुम्ही समर्थन करताय? अवघड आहे!ऐकपक्षीय सरकार हुकुम शही कडे झुकू शकत .हिंदी भाषा आसलेल्या pm आसेल तर nonhindi rajyavishyi क्लेश ठेवून निर्णय होवू शकतो आणि सर्वाचा परिपाक लोकशाही नष्टहुकूमशहा बनण्यासाठी बहुमतातलं सरकार लागतं असं कोणी सांगितलं?अवांतर: अशी ही समर्थकांची पहिल्या सारखी दादागिरी आजकाल कोणी खपून घेत नाही.सगळेच कोणा ना कोणाचे समर्थक आहेतच. त्यामुळे हे तुम्हालाही लागू होतं. आता म्हणू नका मी कोणाचंच समर्थन करत नाही. तुम्ही कोणाचे समर्थक आहात हे इथे सगळ्यांना माहित आहेमी समर्थन कुठे केले ते दाखवून द्या.राजेश१८८ यांनी असा प्रतिसाद देऊनही तुम्ही एकदाही त्याचे खंडन केले नाहीत. वर माझ्यावर टिप्पणी केलीत आणि पुढे जे अवांतर लिहिलेत ते तर अनावश्यक होते. मग तुम्ही त्यांच्या प्रतिसादाचे समर्थन करता असे का वाटू नये? का त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळीबार करायचा विचार आहे?सदस्य नवे दिसत आहेत. टंकन चुका स्पष्ट दिसत आहेत.मी कोणाचेही सदस्यत्व किती जुने आहे हे बघत नाही. जालावर खुल्या चर्चेत त्यांनी त्यांचे विचार मांडलेत तर भाषेसकट विचारांवर प्रतिक्रिया येणारच. बाकी त्यांची भाषा सोडून निदान विचारांवर सुद्धा तुम्ही दुसऱ्या प्रतिसादातही एकही टिप्पणी केली नाहीत वर "भारतात ते अवघड आहे. पण हुकूमशाही वृती वाढू शकते." हे म्हणताय म्हणजे कुठेतरी समर्थन आहे हेच दिसून येतंय.लेखप्रपंच यासाठी की एखाद्याच विचार नाही पटले, कदाचीत त्याला व्यवस्थित नाही मांडता आले तर भसकन त्याची बुद्धीमत्ता काढत जाऊ नका.तुम्ही का अंगाला लावून घेताय. तुम्हाला पण भीती वाटतीये बहुतेक. मी आयडी बघून प्रतिसाद देत नाही तर प्रतिसाद काय आहे त्यावर प्रतिक्रिया देतो. काळजी नसावी.काही प्रश्नांची उत्तरे मिपावरील तज्ज्ञ आणि अभ्यासू मंडळींकडून जाणू इच्छितोअश्या व्यक्ती उत्तरे देतीलच, पण माझ्या बुद्धिमत्तेचा वारंवार उल्लेख झाल्यामुळे ती पाजळायची उर्मी दाबून ठेवत नाही.मुद्दा १: विशेषतः संविधानाच्या चौकटीच्या बाहेर विचारसरणी अस्लेल्यालेले पक्ष. विकासाच्या नावाखाली आप आपला अजेंडा राबायचं वगैरे वगैरेअसे पक्षच नव्हे विचारसरणीच कोणत्याही देशासाठी धोकादायक आहे. उदा. कम्युनिस्ट. या विचारसरणीने आणि पक्षाने कुठल्याही देशाचे भले केले नाही. एवढंच नव्हे तर त्यांची विचारसरणी न मानणाऱ्या लोकांना अतिशय क्रूर वागणूक देण्यात आली. विकासाचे नारे काँग्रेससकट सगळ्याच पक्षांनी दिलेत. गरिबी हटाव चे नारे अगदी नेहरू, इंदिरा गांधी ते आत्तापर्यंत समस्त काँग्रेसी नेत्यांनी दिले आहेत. पण अश्या देशात फक्त ३-३.५% लोक आयकर भरणारे असावेत? मग विकासाच्या/ गरिबी हटाव च्या नावाखाली ते कुठला अजेंडा राबवत होते? पण विषय तो नाहीये, प्रतिसाद देणाऱ्याच्या मते एकपक्षीय सरकार असणेच धोकादायक आहे.मुद्दा २: केंद्रात नेहमीच अस्थिर सरकार असणे हे जनतेच्या खूप फायद्याचं होऊ शकते का ?फायदा म्हणजे काय हा मोठ्ठा प्रश्न आहे. या वर्षी माझा आयकर किती कमी झाला किंवा माझे कर्ज सरकारने माफ केले किंवा मला टिव्ही घ्यायचाय आणि या वर्षी सरकारने सेल्स टॅक्स/ जीएसटी कमी केला किंवा तत्सम काहीतरी याला जास्त महत्व असेल तर मग अस्थिर सरकार कदाचित फायद्याचे असेल. कारण या सरकारातील घटक पक्ष मग त्यांच्या त्यांच्या भागासाठी किंवा समाजासाठी त्या त्या पक्षाला लाभाचे ठरतील असे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडू शकतात. अर्थतज्ञ असलेल्या ममो सिंगांच्या सरकारमध्ये लालू सारख्या नेत्याला रेल्वे मंत्री पद मिळाले तेव्हा त्यांनी जे गोंधळ घातले ते नंतर ऑडिट मध्ये उघडकीला आले. एवढंच नव्हे तर लालूनंतर रेल्वेमंत्री झालेल्या ममता बॅनर्जींनी पण लालूंच्या कारभारावर टीका केली. अर्थात ममतांनी पण काही चांगला कारभार केला असं नाही. एवढं असूनही ममो सिंग म्हणा किंवा काँग्रेस त्याबाबतीत फार काही करू शकली नाही. बिहारमध्ये जद आणि राजद मध्ये युती झाल्यावर नितीशकुमारांना किती त्रास सहन करावा लागला हे अलीकडचंच उदाहरण आहे. आता कर्नाटक मध्ये कुमारस्वामी जाहीरपणे रडत रडत कसे विषाचा घोट घेत आहेत हे सांगतात. ही कशाची उदाहरणे आहेत?बहुमताले सरकार आले तर वृत्ती वाढू शकते. हम करे सो कायदा !त्यासाठी बहुमतातले सरकारच लागते असं काही नाही. ते नेत्याच्या वृत्तीवर अवलंबून असतं. एवढ्या मोठ्या देशाला आणि लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी एक कडक प्रशासकच पाहिजे. चीनच्या प्रगतीकडे आता डोळे विस्फारून बघतात पण तिथे काही दशके कोणी ना कोणी एक प्रशासक होता आणि जो येईल त्याने फक्त देशाची प्रगती एवढेच ध्येय ठेवले होते. एक साधी गोष्ट आहे, अगदी एकत्र कुटुंबातले निर्णयसुद्धा जर घरातली कर्ती व्यक्ती खंबीर नसेल तर आपापल्या सोयीने घेतले जातात. त्यात संपूर्ण कुटुंबाला फायदेशीर असेल असे निर्णय असतालीच असं नाही. रशियामध्ये पुतीन बहुमताने निवडून येतात, काय वाईट चाललं आहे रशियाचं? तीच गोष्ट चीनची आहे. या उलट एका कुटुंबाकडे सतत सत्ता असणं हे जास्त घातक आहे. एक प्रशासक चांगला होता म्हणून त्याचे वारसदार तेवढेच किंवा जास्त चांगले असतील असं नाही. लायकीप्रमाणे पद का मिळू नाही? एकाआड पिढी हुशार असते अशी एक म्हण आहे. बापाने कष्टाने उभारलेलं सगळं मुलगा केवळ फुकट मिळाल्याने फुंकून टाकतो अशी उदाहरणे कितीतरी आहेत. यात मोदी का राहुल हा वाद नसावा. राहुल जर तेवढा लायक असेल तर त्याला योग्य ते पद मिळावं, पण ते केवळ पूर्वजांच्या पुण्याईवर नसावं. पन्नाशीला आलेला माणूस अजून नीट बोलायला शिकतोय त्यातही सुधारतोय असं वाटत असतानाच मधेच काहीतरी गोंधळ घालतो हे देशाच्या दृष्टीने घातक ठरणार नाही का? जिथे पुतीन, जिनपिंग सारखे श्रूड नेते आहेत त्यांच्या समोर राहुल किती तग धरू शकेल? एखाद्या उच्चस्तरीय द्विपक्षीय मीटिंग मध्ये राहुलला जागेवर मदत करणारी माणसे कुठून असतील? एखादा महत्वाचा निर्णय स्वतः घेण्याची त्याची क्षमता किती आहे? जर त्यावेळेला १० लोक परस्परविरोधी गोष्टी सांगू लागले तर राहुल काय करेल? असे प्रश्न लोकांना का पडत नाहीत? पंप्र म्हणून फक्त जनतेला आवडणारे निर्णय घ्यायला मिळतीलच असं नाही. काही ठिकाणी चाबूक घेऊन शिस्त लावायला लागते हे त्याला जमेल का? उद्या देशातील समस्त शेतकऱ्यांनी दर वर्षी कर्जमाफी मागितली, वर दीडपट/ दुप्पट हमीभाव मागितला तर पैसा कुठून आणायचा? प्रत्येक गोष्टीला सबसिडी देत राहिलं तर तो पैसे कुठून आणायचा? वर्षानुवर्षे अंबानींच्या घरातला गॅस सिलिंडर आणि त्यांच्या ड्रायव्हरचा गॅस सिलिंडर एकाच भावात मिळत होते. त्याचा विचार कधी झालं का? या तीन राज्यातल्या विधानसभा निवडणूका काँग्रेसने केवळ कर्जमाफीच्या मुद्द्यावर जिंकल्या. एका तरी भाषणात राहुलनी या अडचणींचे कायमचे निराकरण करण्यासाठी शॉर्ट/ लॉंग टर्म प्लॅन (तुम्हाला विचारत नाहीये, काळजी नसावी) सांगितला का? असेल तर लिंक द्यावी (हे तुम्हालाच विचारतोय). म्हणून म्हणतो सरकार कुठलेही असो वृत्ती महत्वाची. पाशवी बहुमत असताना काय झालं बघा, इंदिरा गांधी: ३५२ सीट्स (आणीबाणी), राजीव गांधी ४००+ सीट्स (शाहबानो प्रकरण). हेच नंतर युपीए सरकारमध्ये प्रचंड घोटाळे झाले, स्थानिक पक्षांच्या नेत्यांचं (ममता, लालू ई) वर्चस्व विनाकारण वाढलं. असो, तुम्हाला मुद्दा समजला असेल अशी आशा करतो.ऐकपेशिय सरकार केंद्रात आसने हे भारता सारख्या असंख्य भाषा आणि संस्कृती आसलेल्या देशासाठी खूप धोकादायक आहे .--- ऐकपेशिय ??