ब्राह्मणेतरांचे नेते मात्र ब्राह्मण
सध्या राम आणि रावण यांच्या निमित्ताने निरनिराळे परस्पर विरोधी मुद्दे मांडले जात आहेत. ते ऐकताना सामान्य माणसाचा संभ्रम वाढतो आहे. रावण हा आदिवासींचा राजा होता त्यामुळे तो आमचा राजा आहे असे काही दलित संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे रामाने त्याची हत्या केली हे योग्य केले नाही आणि म्हणूनच दरवर्षी रावण दहन हेही त्यांना पटत नाही. मरणान्तानि वैराणि असं स्वतः राम म्हटले असतील तर दरवर्षी हा वाद उकरून काढून रावणाला का जाळायचं. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती इ. इ.
काहीजणांनी याला आर्य-अनार्य वादही जोडलाय. राम आर्य रावण अनार्य. पण काही अभ्यासकांच्या मते रावणाला त्याची मुले आर्य असं संबोधत असत. तर मग आर्य अनार्य हे मानवी समूह आहेत की ती नुसतीच वैशिष्ट्ये दाखवणारी संबोधने आहेत ?
ashutoshjog@yahoo.com
रामाला मानणारे म्हणतात रामाने वनवासी, आदिवासी जमातींना आपल्याबरोबर घेऊन रावणावर स्वारी केली तेव्हा वनवासींचा नेता रामच.
रावण आमचा असं काही ब्राह्मणेतर म्हणत आहेत. तर काहींचे म्हणणे राम हा क्षत्रिय आणि रावण दशग्रंथी ब्राह्मण. आता कसा सोडवायचा हा गुंता ?
ब्राह्मणेतरांचा नेता मात्र ब्राह्मण हे नंतरही काही उदाहरणात पाहायला मिळते. तमिळनाडूमधे द्रविडी आंदोलन सुरू झाले. त्याचे नेते होते अण्णा दुराई आणि करुणानिधी. करुणानिधी हे लेखक,पटकथा लेखक. आपल्या चळवळीला एक चांगला चेहरा हवा म्हणून त्यांनी एमजीआर म्हणजेच एम.जी.रामचंद्रन यांना आपल्या चळवळीशी जोडून घेतले. पुढे एमजीआर यांची लोकप्रियता वाढू लागली आणि ते मुख्यमंत्री झाले. एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाची सूत्रे त्यांच्या सहकारी जयललिता यांच्याकडे गेली. अशा प्रकारे ब्राह्मणेतर आंदोलनाचे नेतृत्व ब्राह्मण असलेल्या जयललिता यांच्याकडे गेले.
महाराष्ट्रातील ब्राह्मण आज मुख्यतः नरेंद्र मोदींच्या मागे आहेत. या उलट गांधी-नेहरू घराण्यातील लोक आपण काश्मीरी ब्राह्मण असल्याचे अभिमानाने सांगतात.
महाराष्ट्रातील जमीनदारांना, गावोगावच्या पिढीजात सत्ताधार्यांना बर्याच ब्राह्मणेतरांना काश्मीरी ब्राह्मण राहुल गांधी आपले नेते वाटतात.
या देशातील मूलनिवासी म्हणवणारे परदेशातल्या रावणाला मानतात ? आणि ब्राह्मण ज्यांना नेते मानतात ते नरेंद्र मोदी मात्र निवडणुकीच्या काळात नीचली जाती वगैरे गोष्टी बोलतात.
म्हणजे ब्राह्मणेतरांचे नेते मात्र ब्राह्मणच.
असा हा सगळा गुंता आहे.
ashutoshjog@yahoo.com
गांधी-नेहरु घराण्याचा वंशवृक्ष, फिरोजखान वगैरे गोष्टींची स्वतःला खात्री असल्याशिवाय फेकाफेक करू नये आणि लेखातला मुख्य मुद्दा ध्यानात घ्यावा
तो आपल्या अनुयायांचं हित पाहतो आहे का हे महत्त्वाचेयालाच साध्या भाषेत लांगुलचालन असे म्हणतात. नेत्याची एवढी संकुचित व स्वार्थी व्याख्या करणे हीच सद्याची सर्वात मोठी भारतीय समस्या आहे. १. अनुयायांचे दूरगामी हित केवळ व्यक्तिगत किंवा समाजातील एका गटाचा तात्कालिक फायदा साधून होत नाही. असे केल्याने, 'समाजात अंर्तगत तट पडून ते तात्कालीक फायद्यासाठी एकमेकाशी भांडत राहणे' हेच फलित अपेक्षित आहे... व ते सद्या स्प्ष्ट दिसत आहेच ! :( "सर्व समाजाचा सर्वसामावेशक विकास झाला तरच देशाचे व पर्यायाने अनुयायांचे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचे हित साधले जाते" हे जाणून जो काम करतो, त्यालाच खरा नेता म्हणता येईल. २. दूरगामी हित साधताना, नेत्याला आपल्या अनुयायांना वेळप्रसंगी सत्य व वस्तूस्थितीचा कडू घोटही गिळायला भाग पाडून योग्य मार्गावर आणणे जमले पाहिजे. खरा नेता अनुयायांचे हित साधण्याच्या (पक्षी : लांगुलचालनाच्या) पडद्याआडून स्वार्थ साधण्याचा विचारही करत नाही. मुख्य म्हणजे... 'स्वार्थाची लालूच' आणि 'नुकसानाची भिती' यावर अनुयायांना 'ताब्यात ठेवणे' हे तर गुन्हेगारी जगताचे मुख्य लक्षण आहे... लोकशाहीतल्या नेत्यानेसुद्धा तसेच वागावे काय ?!