आज जडी-बूटी दिवस
वर्षाऋतुत आकाशातून अमृत धारा बरसतात. धरतीच्या कोखातून जीवनदायनी वनस्पती प्रगट होतात. भारतात १८,००० च्या वर औषधी वनस्पती आहेत. पण दुर्भाग्य या घटकेला फक्त ११०० वनस्पतींचा उपयोग आयुर्वैदिक औषधीत वापर होतो. याचा विपरीत चीन मध्ये तिथल्या १३००० वनस्पतींचा उपयोग चीनी हर्बल मेडीसीन मध्ये होतो. आज आयुर्वैदिक औषधींना जागतिक मान्यता नाही. कारण आधुनिक विज्ञानाच्या कसौटीवर औषधी वनस्पतींना पारखण्याचा प्रयत्न झाला नाही. जास्तीस्जास्त फूड सप्लीमेंट रुपात आयुर्वेदिक औषधी निर्यात होतात.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले. त्याचे मुख्य कारण आंग्ल भाषेत कार्य करणाऱ्या कार्यपालिकेची गुलाम मानसिकता. विदेशी औषधी कंपन्यांचा दबाव आणि राजनेत्यांची अनिच्छा (आज हि जीएसटी एलोपेथी औषधींंवर ४ टक्के आणि भारतात निर्मित आयुर्वैदिक औषधींवर १८ टक्के) विचित्रच आहे ना. एकीकडे आयुर्वेदिक कंपन्यांंची अनुसंधानवर अब्जावधी रुपये खर्च करण्याची क्षमता नाही, दुसरीकडे सरकारस्तरावर कुठलीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ. हि आजची परिस्थिती.
आपले सौभाग्य आजच्या दिवशी आचार्य बाळकृष्ण प्रगट झाले. (महान लोक प्रगट होतात). केवळ कागदी शिक्षण नव्हे तर गंगोत्री ते आसाम पर्यंतच हिमालय, उत्तर ते दक्षिण भारतातील जंगले, आपल्या पायदळी तुटवली. स्थानीयस्तरावर वापरल्या जाणार्या अनेक वनस्पती औषधींचे ज्ञान प्राप्त केले. आजच्या दिवशी त्यांनी आयुर्वेदिक अनुसंधान केंद्र उभारण्याचा संकल्प केला होता. आज पतंजलि रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये ३००च्या वर वैज्ञानिक आयुर्वेदात प्रयोग होणार्या वनस्पती आणि इतर घटक द्रव्यांवर अनुसंधान कार्य करीत आहे. ३००० जवळ वनस्पतींवर सध्या प्रयोग सुरु आहे. पतंजलि फूड पार्क मध्ये होणार्या नफ्याचा एक भला मोठा हिस्सा यावर खर्च होतो. एलोपेथी औषधीत प्रयोग होणारे घटक पदार्थ मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, त्यांचे चांगले व वाईट परिणाम, औषध घेणार्याला माहित असते. त्याच प्रमाणे आयुर्वेदिक औषधांत वनस्पती मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, हे कळल्यावर उत्तम दर्जाच्या औषधींंचे निर्माण शक्य होईल. लोकांचा आयुर्वेदावर विश्वास वाढेल. कमी खर्चात रोगराई दूर होईल. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळेल. भारताचा औषधी निर्यात हि मोठ्या प्रमाणावर वाढेल.
आचार्य बाळकृष्ण यांनी आयुर्वेदावर तथा औषधी वनस्पतींवर अनेक पुस्तके तर लिहली आहेच. त्यांच्या पुस्तकांचे अनेक विदेशी भाषांत अनुवाद हि झालेले आहे. या शिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली ५०,००० पेक्षा जास्त जुन्या संस्कृत आणि आयुर्वेदावर असलेल्या ग्रंथांचे डीजीटलाइजेशन झाले आहे, अजूनही कार्य सुरु आहे. अनेक जुन्या पांडुलिपींचे प्रकाशन झाले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली World Herbal Encyclopedia ज्यात जगातल्या ६०,००० हून औषधी वनस्पतींचे वर्णन असेल, जगातील सर्वात मोठा ग्रंथ (जवळपास १०० खंड) प्रकाशाचे कार्य सुरु आहे. पहिला खंड प्रधानमंत्रीच्याहस्ते काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला होता. भारतातील औषधीय वनस्पतींच्या क्षेत्रात आचार्य बाळकृष्णच्या योगदानाच्या प्रीथर्थ त्यांचा जन्मदिवस जडी-बुटी दिवस म्हणून साजरा करणे सुरु केले आहे. आजच्या दिवशी पतंजलिचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती वितरीत करतात. आज सामान्य जनतेच्या घरातल्या गमल्यांत गिलोय, एलोविरा पोहचली आहे.
आचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवस निमित्त सर्वांना जडी-बूटी दिवसाच्या शुभेच्छा.
आपले सौभाग्य आजच्या दिवशी आचार्य बाळकृष्ण प्रगट झाले. (महान लोक प्रगट होतात)अगंगंगं, लैच खतरनाक. माझं सौभाग्य्, असलं कैतरी वाचायला मिळालं. कंसातलं वाक्य वाचून खात्री पटली. त्या भुरट्या युनिलिव्हरला का असे लोक सापडले नाहीत कोण जाणे.आयुर्वेदिक औषधांत वनस्पती मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, हे कळल्यावर उत्तम दर्जाच्या औषधींंचे निर्माण शक्य होईल. लोकांचा आयुर्वेदावर विश्वास वाढेल. कमी खर्चात रोगराई दूर होईल. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळेल. भारताचा औषधी निर्यात हि मोठ्या प्रमाणावर वाढेल.हे सर्व आंतरराष्ट्रिय स्तरावर मान्य असलेली आधुनिक शास्त्रिय व प्रशासकिय (मानके, तपासण्या, पेटंट्स, इ) प्रक्रिया वापरून करण्याची फार मोठी गरज आहे. सद्या आयुर्वेदाचे बहुतेक व्यावसायिक ( वैद्य व कंपन्या), "हे मी किंवा आयुर्वेदात सांगितले आहे म्हणून विश्वास ठेवा" याच पुराव्यावर चालत आहेत ते बंद झाले पाहिजे. यामुळे, खरोखरच उत्तम असू शकतील अशी आयुर्वेदिक औषधेही, "वैद्यांचे किंवा रुग्णांचे केवळ तोंडी दावे" याच श्रेणीत सामील झालेली आहेत. ही परिस्थिती बदलायला हवी, अन्यथा, आयुर्वेदाला जसे दावे केले जातात असे स्थान मिळण्याची शक्यता नाही.आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सना आधुनिक निदान सोयी, पक्षी सीटी स्कॅन , एमआरआय, एक्स रे वगैरे वापरायला परवानगी असावी का नसावीहा प्रश्न वर वर साधा सोपा वाटला तरी त्याच्या उत्तराचे परिणाम खूप दुरगामी असतील. आयुर्वेद अभ्यासक्रमाबद्दल मला पुरेशी माहिती नाही, अर्थातच, त्या प्रश्नाचे माझे उत्तर, "हो किंवा नाही" असे असू शकत नाही. पण, त्याचे उत्तर शोधण्याची निर्णयप्रक्रिया साधारणपणे खालीलप्रमाणे असायला हवी हे मी खात्रीने सांगू शकेन : (अ) कोणत्या आजारांत कोणत्या तपासण्या उपयोगी असतात ? त्या का उपयोगी असतात ? (आ) त्या केव्हा कराव्या केव्हा करू नयेत ? (इ) केल्या तर त्यांचा कोणता रिपोर्ट अपेक्षित आहे ? (ई) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर किंवा निगेटिव्ह आला तर, त्या प्रत्येक वेळी उपचारासंबंधी काय निर्णय योग्य असतो ? (उ) रुग्णाच्या उपचारांमध्ये त्या निर्णयांचे नक्की काय महत्व असते ? (ऊ) त्या तपासण्या 'केल्या तर' किंवा 'नाही केल्या तर' होऊ शकणारे (रोगाच्या उपचारासंबंधी आणि अर्थिक ) 'फायदे/तोटे यांची गुणोत्तरे' काय आहे ?, इत्यादींना आयुर्वेद अभ्यासक्रमांत कितीसे आणि किती महत्वाचे स्थान आहे यावर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सना या तपासण्या करायला परवानगी असावी की नसावी हे ठरवले तरच ते केवळ शास्त्रियदृष्ट्याच नव्हे तर व्यावहारिकदृष्ट्याही बरोबर असेल. कारण, एखादी प्रगत सुविधा/साधन वापरण्याअगोदर तिच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर तिच्यापासून फायद्यापेक्षा तोटा होण्याचीच जास्त शक्यता असते. पुरेसे प्रशिक्षण नसताना कोणतीही महत्वाची (प्रगत किंवा जुनी) सुविधा/साधने वापरण्याची परवानगी दिल्यास, ती एक प्रकारे, रुग्णाच्या शरिराशी, जीवाशी आणि पैशाशी खेळ करण्यासाठी दिलेली परवानगी होईल, असे म्हटले तर ते चूक होईल का ? रस्त्यावर गाडी चालवण्यासाठीही प्रशिक्षण-परिक्षा-परवाना इत्यादी सोपस्कार पार पाडणे आवश्यक असते, त्यामागे... (अ) गाडी चालविण्याचे ज्ञान/पात्रता नसणार्याने ती चालवू नये, (आ) गाडी चालवण्याने चालवणार्याचे व इतरांचे शक्यतो फायदेच व्हावे, (इ) तोटे झालेच तर ते शक्य तितके कमी व फायद्यांच्या प्रमाणात स्विकार्य असतील इतके कमी असावे, इत्यादी उद्येश असतात, नाही का ? तसेच काहीसे हे आहे. तुमच्या प्रतिसादातले बाकीचे प्रकार, "गैर आणि/किंवा बेकायदेशीर व्यवहार" आहेत, तेव्हा त्याबद्दल टिप्पणी करण्याची गरज नाही.केवळ ह्याच कारणासाठी मला पतंजलीच्या बिझनेस सक्सेसला आत्ताच सेलिब्रेट करून फार मोठी क्रांती झाल्याचे प्रीमॅच्युवर सेलिब्रेशन करायला आक्षेप आहेतयाबाबत मी असे म्हणेन, (अ) भारतात व्यापारी यश मिळवणे आणि (आ) आधुनिक शास्त्रीय संशोधनाच्या बळावर जगभर मान्य पेटंट्स मिळविणे, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. (अ) भारतातील व्यापारी यश : हे सद्या हाती असलेल्या आकड्यांच्या बळावर खात्रीने सांगता येते... व ते पतंजलीने यश मिळवले आहे, यात संशय नाही. जोपर्यंत, पतंजली ते यश सद्य भारतीय वैधानिक (कायदे, नियम, मानके, इ) चौकटीत राहून मिळवत आहे तोपर्यंत त्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद व्हायला विरोध का असावा ? किंबहुना, एखादी "नवीन भारतीय कंपनी", "वैध मार्ग वापरून", "अनेक दशके जगभरात दादा मानल्या गेलेल्या प्रबळ बहुराष्ट्रीय कंपन्यांशी" ... (अ) स्पर्धा करण्याचे धाडस करते, तेव्हा ते मला कौतुकास्पद वाटते. (आ) यशस्वी टक्कर देते, तेव्हा मला साधार आनंद होतो. (ई) आधी दादा असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा व्यापारी हिस्सा (मार्केट शेअर) आपल्याकडे वळवून घेते, तेव्हा मला, एक भारतीय, म्हणून नक्कीच अभिमान वाटतो. हे मुक्त व्यापारी व्यवस्थेतील, बहुतेक सर्व महत्त्वाकांक्षी कंपन्यांच्या उत्कर्षातील, मैलाचे दगड आहेत. सद्या आणि भूतकालातही जागतिक स्तरावर व्यापारी नेतेपदी मानल्या गेलेल्या सगळ्या महाकंपन्यांची वाटचाल अशीच झालेली आहे. पतंजलीने हे टप्पे भारतात, वाटेतले खाचखळगे आणि ठेचा पचवत, भारतीय संवैधानिक चौकटीत राहून, पुरे केलेले आहेत आणि ते करताना, आतापर्यंत भारतीय व्यापाराला आपले राखीव कुरण समजणार्या अनेक भारतीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गोटात खळखबळ माजवली आहे, हे पतंजलीला व्यापारीदृष्ट्या अभिमानास्पदच आहे आणि त्याबद्दल तिचे कौतूक करायलाच हवे. परदेशातून येऊन, इथे बाजार काबीज करणार्या, नव्या-जुन्या कंपन्या, त्यांच्या स्वतःच्या देशांत, याच प्रक्रियेतून गेलेल्या आहेत. परदेशी कंपन्यांच्या इतिहासांना एमबीए च्या अभ्यासक्रमांत स्थान मिळत असतानाच, पतंजलीच्या तिच्या यशाचे हवे तेवढे महत्व मिळत नाही याची माझ्या मते काही खास भारतीय कारणपरंपरा आहे. त्यातील मुख्य कारणे अशी आहेत... * भारतीय लोक भारतीय त्यातही विशेषतः भारतीय परंपरेशी निगडित असलेल्या गोष्टींबाबत अभिमान दाखवण्यात नेहमीच हात राखून असतात. हे परदेशी गोष्टींबाबत दिसत नाही, किंबहुना, पाश्चिमात्य गोष्टी भारतात सहजपणे "अपमार्केट" बनतात. बर्याच शिक्षित भारतीयांमध्ये, भारतीय गोष्टींबद्दल उघडपणे ममत्व दाखवणे "डाऊनमार्केट" समजले जाते. मात्र, तीच गोष्ट पश्चिमेत नाव कमावून परत भारतात आली तर ते मत लगेच १८० अंशांने बदलते. याची अनेक उदाहरणे सांगता येतील. एकोणीसशेसत्तरीच्या दशकापर्यंत मागासलेपणाचे लक्षण समजला जाणारा "योग" जेव्हा पश्चिमेतून "योगा" बनून आला तेव्हा तो "अपमार्केट" झाला. पूर्वी, मिठाने तुमच्या दातांना चरे पडतात (पक्षी : अडाणी भारतीय पद्धत) अशी भारतीय दंतमंजनांची जाहिरातीत चेष्टा करणार्या कंपन्या हल्ली त्यांच्या जाहिरातींत, "तुमच्या दंतमंजन/पेस्टमध्ये मीठ आहे का ?" असे प्रश्न विचारू लागली आहेत आणि त्यांच्या जाहिरातीतल्या स्त्रिया, "हा आयुर्वेद आणि... यांचा बॅलन्स खास आहे" अश्या प्रकारे जनतेचे 'ज्ञानवर्धन' करू लागल्या आहेत ! मुख्य म्हणजे, त्या जाहिरातींमुळे, आवळा, मीठ, "हनी", कोळसा, अॅलो वेरा (कोरफड हो !) इत्यादी गोष्टी हल्ली "अपमार्केट" झाल्या आहेत ! * आपल्या मक्तेदारीत (पक्षी : आर्थिक फायद्यात) कोणा नवख्याने (आणि तेही भारतासारख्या "विकसनशील" देशातील नव्या कंपनीने) हिस्सा मिळवणे हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मानसिक व आर्थिक स्वास्थ्यासाठी परवडण्यासारखे नसते. नीतिमत्ता व वैध कारभाराचे वर वर कितीही गोडवे गात असल्या तरी, अश्या मोठ्या कंपन्या साम-दाम-दंड-भेद वापरून आपल्या नवख्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचे प्रयत्न करतात, हे काही गुपित नाही. आपले नाव गुप्त ठेवून हे करवण्यासाठी, भारतातले तथाकथित उदारमतवादी व त्यांचा प्रभाव असलेली माध्यमे, बाजारात मिळतात, हे काही गुपित नाही... हे पूर्णपणे थांबवणे कोणत्याही मुक्त व्यवस्थेत शक्य असते, तेव्हा त्याबद्दल फारशी तक्रार नाही. दु:ख असे की, तथाकथित भारतीय शिक्षित मंडळी अश्या कंपनांच्या आणि लोकांच्या अपप्रचाराचे बळी होण्यात गैर मानत नाहीत. त्याऐवजी, त्यांच्याकडून, मिळणार्या सर्व माहितीचा सारासारविवेकबुद्धीने विचार करून मगच मत बनविण्याची अपेक्षा, चुकीची होईल का ? मात्र, सद्यातरी पाश्चिमात्य पूर्वग्रह दूर ठेवणे त्यांना जमत नाही, हे खरे आहे. :( **** (आ) आधुनिक शास्त्रीय संशोधनाच्या बळावर जगभर मान्य पेटंट्स मिळविणे : याबाबतीत, पतंजली बाल्यावस्थेत आहे आणि तिला बरीच मजल गाठायची आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ वर्ष दोनवर्षांमध्ये मोजला जात नाही. कारण, यासंबंधीचे मानवी, धोरणात्मक व इतर संसाधन (इन्फ्रास्ट्रक्चर) उभे करण्यातच पाच-सहा वर्षे निघून जातात. तेव्हा आताच पतंजलीच्या याबाबतीतल्या कुवतीवर प्रश्नचिन्हे उभे करणे अन्यायाचे होईल. पतंजलीने, यापुढे ५ वर्षांनंतर प्राथमिक स्तरावरचीही काहीच चमक दाखवली नाही आणि १०-१५ वर्षांनंतरही आयुर्वेदीक औषधे/प्रक्रियांसंबंधी आंतररास्ट्रीय स्तरावरची महत्वाची पेटंट्स मिळवली नाहीत, तर मात्र तशी प्रश्नचिन्हे उभे करणे योग्य असू शकेल. =============== २.थोडक्यात, या संबंधात, "चांगल्या वाटणार्या कामात मदत करता आली नाही तर हरकत नाही, पण निदान खोडा तरी घालू नये", हे तत्त्व बाळगून मी, "Masterly inactivity and watchful expectancy"चे पालन करत आहे.हे कोणा एका गोष्टीसंबंधात किंवा एका व्यक्तीसंबंधात लिहिलेले नाही. "ठाम मतप्रदर्शन किंवा कृती करण्याअगोदर, अधिक माहिती मिळण्याची आणि/अथवा अधिक वेळ देण्याची गरज आहे", अश्या सर्व गोष्टींबद्दल हे तत्त्व मी पाळतो. तांत्रिक भाषेत, "पुराव्यांवर आधारीत निर्णयप्रक्रिया (एव्हिडन्स-बेस्ड डिसीजन मेकिंग)" असे ओळखले जाणारे हे तत्त्व समतोल विचारास आवश्यक असते व ते माझ्या खास आवडीचे आहे.तरीही पतंजलीला जस्ट अनदर कंपनी म्हणून ट्रीट केले तर माझी देशभक्ती परत परत प्रश्नांकित होऊ नये इतक्या विश्फुल थिंकिंग सहित थांबतो.:) हल्ली अस्मितांची गळवे फारच हुळ्हुळी झालेली आहेत यात शंका नाही ! =)) (हे सर्वसाधारण निरिक्षण आहे, खास तुम्हाला नाही, तरीही, हघ्याहेवेसांन) माझ्या प्रतिसादातील सर्व मजकूर कोणा एका व्यक्तिला नसून सर्वसामान्य भारतीय मानसिकतेसाठी आहे, हे सहज समजावे इतपत स्पष्ट लिहूनही, तुम्ही काही गोष्टी स्वतःवर का ओढून घेत आहात, हे मला अगम्य आहे ! अश्या परिस्थितीत प्रामाणिक परखड चर्चा कशी शक्य होईल ? आजच्या प्रस्थापित बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांच्या स्वदेशात जितके महत्व मिळाले, तितकेच पतंजलीच्या यशाचे विश्लेषण करताना मी भारतात मिळावे असे म्हटले आहे... ना कमी ना जास्त. आणि भारतीय माणसाची/संस्थेची योग्य तेवढीही स्तुती करण्यात आपण भारतीय नेहमीच हात आखडता घेतो (यांच्यात फुका खुशामत करणारे पकडलेले नाहीत), हे मी भारतात व परदेशात नेहमीच पाहिले आहे. पतंजलीही या बाबतीत अपवाद नाही. याशिवाय पतंजलीचे प्रवर्तक (promoters) भाजपच्या बाजूने झुकलेले असल्याचे दिसत असल्याने, बर्याच जणांचा हात केवळ आखडलेला राहत नाही तर उगारला जातो, हे काही गुपित नाही. समतोल विश्लेषण करताना असे करणे सत्याचा विपर्यास होईल. पतंजलीच्या प्रवर्तकांचा झुकाव कोणत्याही इतर राजकीय पक्षाच्या बाजूला असला तरी त्याने माझे मत आज आहे तेच असते... राजकिय झुकाव या विश्ष्लेषणात अस्थायी (इम्म्टेरियल) आहे. कोणताही झेंडा खांद्यावर नसल्याने, "आज पतंजलीला तिच्या व्यापारी यशाचे पूर्ण श्रेय देणे" आणि "१५ वर्षांनी, जर तिच्या नावावर पुरेशी आयुर्वेदीक पेटंट्स व आधुनिक कसोट्यांवर उतरलेली रुग्णोपयोगी औषधे/उपचारपद्धती दिसल्या नाहीत तर, तिचा नावावर अपयशाचे खापर फोडणे", यात दोन्हीत मला किंचितही खंत/शरम वाटणार नाही... मात्र, तसे अपयशाचे खापर फोडताना, एक भारतिय कंपनी यशस्वी झाली नाही याची खंत जरूर वाटेल. हे सर्व माझे प्रामाणिक व्यक्तिगत मत आहे, कोणा एकाला उद्देशून नाही.वर डॉ. म्हात्रे यांनी सांगितलेल्या संशोधनप्रक्रियेतून जर आयुर्वेदिक औषधे जाणार असतील तर तीही सुरुवातीला महागच असतील.१. हे शक्य आहे. मात्र, आधुनिक मानकांवर प्रमाणित केलेल्या औषधांच्या मात्रा व परिणामांचे खात्रीलायक नियमन करता येईल. आता, वेगवेगळ्या कंपन्यांच्याच नव्हे तर एकाच कंपनीच्या मात्रे-मात्रेतील औषधाच्या प्रमाणात आणि त्यांच्या परिणामात फरक असणारच नाही याची ग्वाही देता येत नाही... हे रुग्णाच्या उपचाराच्या बाबतीत तितकेसे निर्धोक आणि/किंवा उपकारक नाही. २. सद्याच्या व प्रमाणित औषधांच्या किमतीतला फरक किती असेल हे उत्पादक कंपनी, अनेक कंपन्यांमधिल स्पर्धा आणि सरकारी धोरण यावर अवलंबून असेल. मात्र, आयुर्वेदीक औषधे, नवीन औषधे नसून, केवळ आधुनिक शास्रिय पद्धतिने सिद्ध व प्रमाणित केलेली तीच जुनी औषधे असल्याने; त्यांना मानकबद्ध पद्धतिने बाजारात आणण्यासाठी लागणारा खर्च, "पूर्णपणे नवीन आधुनिक औषधी अणू" बाजारात आणण्यासाठी लागणार्या खर्चापेक्षा, खूप कमी असेल. जसजसा या नवीन स्वरूपात आलेल्या औषधांच्या पात्रतेवर वैद्यकिय व्यावसायिकांचा आणि रुग्णांचा विश्वास बसत जाईल आणि त्यांचा खप वाढत जाईल, तसतसे, "इकॉनॉमिज ऑफ स्केल" या तत्वाने त्यांच्या किमती उतरत जातील.गुळवेलीतून वेगळ्या केलेल्या औषधी द्रव्याच्या गोळ्या, (गुडूची किंवा गिलोय), हळदपुडीतून वेगळी केलेली कर्क्युमिन पूड, खोबरेलातून वेगळे केलेले एम सी टी द्रव्य अशा गोष्टी सध्या प्रचंड महाग आहेत.आयुर्वेदीक औषधांतला मुख्य औषधी अणू वेगळा करून त्याला सर्वेसर्वा औषध म्हणून बाजारात आणणे, हा आयुर्वेदीक औषधपद्धतीसंबंधात अज्ञानी असलेल्या व केवळ पाश्चिमात्य पद्धतीने विचार करणार्या कंपन्या व संशोधकांचा दोष आहे. पाश्चिमात्य औषधे, अणू-स्तरावर संशोधली आणि बनवली जातात. त्या मुख्य अणूचे प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी इतर एखाद्या अणूचा औषधाच्या मात्रेत समावेष केला जातो... पण ते नियमाने नव्हे तर अपवादाने होते. किंबहुना, काही अपवाद बदलता, एकाच मात्रेत दोन औषधे एकमेकात मिसळणे, आधुनिक वैद्यकात निषिद्ध समजले जाते. त्याविरुद्ध, कोणतेच आयुर्वेदीक औषध केवळ एकाच प्रकारच्या अणूने बनत नाही. बहुतेक आयुर्वेदीक औषधे निसर्गात सापडणार्या वनस्पतीजन्य आणि प्राणिजन्य कच्च्या मालापासून प्रक्रिया करून किंवा प्रक्रियेशिवायही बनलेली असतात. अर्थातच, एकाच औषधात, असंख्य अणू असतात. बहुतेक आयुर्वेदीक औषधांचे विशेष वेगळेपण असे की, ती अश्या अनेक अणूंचा समूह असतात की, जे... (अ) निसर्गात एकमेकाच्या बरोबरीने निर्माण होतात, (आ) ते अणूसमूह, ते आस्तित्वात असलेल्या वनस्पती/प्राण्यामध्ये, 'केवळ प्रतिकूल परिस्थिती निर्माण करत नाहीत असेच नव्हे' तर त्यांच्यात 'एकत्रितपणे, एखाद्या रोगाच्या विरोधात काम करणाचे गुणधर्म असतात'. अश्या समूहातून केवळ एक मुख्य कार्य करणारा अणू वेगळा करण्याने, इतर अणूंमुळे होणारा फायदा नाहीसा होतो. इतर अणूंपासून मिळणारा फायदा अनेक प्रकारचा असू शकतो... (अ) मुख्य अणूला त्याच्या कामात मदत करणे आणि/किंवा त्याची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करणे (अॅडिटिव्ह इफेक्ट), (आ) मुख्य अणूमुळे रुग्णावर होणार्या प्रतिकूल परिणामांचे परिमार्जन करणे किंवा त्या परिणामांची तीव्रता कमी करणे (नलिफिकेशन ऑर रिडक्शन ऑफ अॅडव्हर्स रिअॅक्शन्स), (इ) मुख्य अणूसारखा आजारावर तडक परिणाम न करता, रुग्णाच्या सर्वसाधारण आरोग्याला मदत करणे (हेल्थ प्रमोशन इफेक्ट), इत्यादी. वरील परिणाम साधणारे आयुर्वेदीक औषधांतले अणूसमुह, निसर्गामध्ये सहस्त्रो वर्षांच्या चाचणी-त्रुटी (trial and error) पद्धतीने निर्माण झालेले आहेत. आयुर्वेदीक औषधांचे विश्लेषण करणे जरूर आहे यात वाद नाही. त्याकरिता, आधुनिक वैज्ञानिक उपकरणे, नियम, धोरणे व कार्यपद्धती (equipment, norms, policies and procedures) आधीच तयार आहेत. पण, केवळ पाश्चिमात्य एकेरी विचारपद्धती वापरून चिरफाड करून, त्यातला केवळ एक मुख्य अणू वेगळा करून त्यालाच औषध म्हणून वापरणे, आयुर्वेदपद्धतिच्या मूळावरच घाव घातल्यासारखे होईल. हा कळीचा मुद्दा ध्यानात ठेवून आपली नवीन आधुनिक संशोधनपद्धती विकसित करणे, हेच पतंजलीसारख्या आधुनिक संशोधनक्षेत्रात हिरीरीने उतरलेल्या आयुर्वेदीक औषधीकंपन्यांसमोरचे, मुख्य आव्हान आहे.मी pharmacognosy ह्या विषयाची प्राध्यापिका आहे आणि मला मिपा वर हरबल मेडीसीन च्या संशोधनाच्या सुरस कथा सांगायच्या आहेत. लवकरच मी त्या प्रसिध्ध करीन.जरूर प्रसिद्ध करा. "व्यवहारात आयुर्वेदिक औषधे या नावाखाली दिली जाणारी औषधे व केले जाणारे उपचार आणि आयुर्वेदाच्या संहितेत असलेली औषधे/उपचार यांच्यात किती दरी आहे (किंवा नाही) हे, शक्यतो त्या वस्तूस्थितीच्या कारणांसह, तुमच्यासारख्या त्या विषयात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तिकडून लिहिलेले वाचायला नक्कीच आवडेल.माझ्यामते अमुक संहिताप्रमाणे सिद्ध केलेले 'अभयारिष्ट, कुटजारिष्ट, त्रिफळा, त्रिकटु इत्यादि औषधांना कोणत्याही नवीन कसोट्या लावून तपासण्याची गरज नाही.तसे पाहिले तर कोणतीच गोष्ट तपासायची गरज नसते. पण मग, तशी आधुनिक मानके व पद्धतीने सिद्धता न केलेल्या औषधांचे उपयोग हे "केवळ दावे / समजूत" याच स्तरावर राहतील आणि त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार नाही, हे पण नक्की. त्याविरुद्ध, आधुनिक मानके व पद्धतीने सिद्धता करून शक्य तेवढ्या आयुर्वेदिक औषधांची/प्रक्रियांची पेटंट्स भारतीय कंपन्यांनी घ्यावी व भारताच्या परंपरागत ठेव्यांचा, जगाच्या नाकावर टिच्चून, नैतिक व अधिकृत फायदा घ्यावा, असे मला वाटते. याचा अजून एक फार महत्वाचा फायदा म्हणजे, अश्या सिद्धतेच्या प्रक्रियेत, धोकादायक असलेली आणि/किंवा परिणामकारक नसलेली औषधे/प्रक्रिया आपोआपच निवडून वेगळ्या केल्या जातील व आयुर्वेदाच्या आडून केले जाणारे गैरप्रकार बंद होतील... असे होणे रुग्णांच्या दृष्टीने तर वरदानच असेल. तसे न केल्याने झालेल्या/होऊ शकणार्या तोट्यांची काही ठळक उदाहरणे खाली देत आहे... १. योगाकडे असेच दुर्लक्ष केल्यामुळे ते ज्ञान आज प्रताधिकारमुक्त झाले आहे आणि पाश्चिमात्य जगात अनेकांनी योगाचे नाव वापरून त्याच्या खूप बर्या-वाईट आवृत्यांची (versions) दुकाने काढून खिसे भरले आहेत, भरणे अजून चालू आहे. २. काही दिवसांपूर्वी अमेरिकन कंपन्यांनी तर चक्क हळदीचे व बासमती तांदळाचे पेटंट घेतले होते. भारत सरकार व इतर व्यक्तींनी तो प्रयत्न अमेरिकेत खटला चालवून वेळेवर हाणून पाडला नसता तर, आज भारतियांना हळद आणि बासमती तांदूळ पिकविणे व विकणे यासाठी (त्या पेटंट्सचा वापर होतो म्हणून) अमेरिकन कंपन्यांना शुल्क द्यावे लागले असते !सरकारी निवृत्त अधिकारी पेन्शन देऊन पोसतोय आम्ही करदाते त्यामुळे त्यांना पतंजलीत फुकट राबायला काय जातंय? आम्ही आहोतच पोसायला त्यांना.जे काही कायदेशीरपणे मिळत आहे ते मिळवून, त्याबरोबरच कायद्याच्या चौकटीत राहून कोणी त्याच्या विचाराने काही काम करत असेल तर, त्या कृतीबद्दल विखारी टीका करण्याइतपत आक्षेप/विषाद/चीड/इ यावी ?! पेन्शनर लोक पतंजली सोडून, तुमच्या पसंतीच्या एखाद्या संस्थेत काम करत असते, तर ते ठीक झाले असते का ? तुमच्याकडून इतका एकेरी (तुलनेने मवाळ विशेषण ;) ) प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले, म्हणून केवळ हा प्रतिसाद :(सरकारचा पगार खाताना खासगी संघटना कंपन्या इत्यादींचे "काम" करण्यावर कायदा काय म्हणतो ते ही दिल्ली रायसीना स्थित सरकारी नोकरांसाठी
हे एकदा वाचून पहासरकारचा पगार खाताना खासगी संघटना कंपन्या इत्यादींचे "काम" करण्यावर कायदा काय म्हणतो ते ही दिल्ली रायसीना स्थित सरकारी नोकरांसाठीतुमचा काहीतरी मोठा घोळ होत आहे. धागालेखक व्यक्तिगतरित्या काय करतात किंवा त्यांचा काही अजेंडा असो/नसो, याबद्दल माझ्या प्रतिसादात काहीच नव्हते. माझे म्हणणे सर्वसाधारण निवृत्त लोकांनी काय केले / करावे याबद्दल होते. नोकरीत असलेले लोक पगार घेतात व निवृत्त लोक पेन्शन घेतात. कोणताही पेन्शनर त्याने केलेल्या नोकरीच्या नियमानुसार कायदेशीर पेंन्शन नावाचा मोबदला घेत असतो. त्याला "पोसणे" म्हणणे किती चुकीचा व अपमानकारक शेरा आहे हे तुमच्यासारख्या हुशार माणसाला सांगायला नकोच. असो. निवृत्त (किंवा इतर कोणत्याही) लोकांनी कायद्याच्या परिघात राहून कोणतेही काम केले तर त्यावर कोणाचा आक्षेप का असावा ? तसे करणे हा त्यांच्या "मुक्त निवड करण्याच्या (फ्री चॉईस)" हक्कावर आघात होत नाही का ? जर कोठे, "कायद्याचा भंग होत आहे किंवा कायद्याला बगल दिली जात आहे", असे ध्यानात आले तर त्याबद्दल योग्य त्या सक्षम अधिकारी/संस्थेकडे तक्रार करण्याचे मार्ग सर्वांनाच उपलब्ध आहेत. हल्ली आंतरजालावरील संबंधीत संस्थळांमुळे असे करणे खूप सोपे झाले आहे, हे सांगायला नकोच. काही गोष्टी बळजबरीने स्वतःवर ओढून व इतर कारणांनी मारलेले शेरे, त्वेषाच्या भरात केलेले लेखन समजून, दृष्टीआड केलेले आहेत. :) असो. चर्चेचा वितंडवाद होऊ लागल्याने व माझ्यातर्फे वरच्या विषयावर, सद्यातरी, अजून जास्त लिहिण्यासारखे काही नसल्याने, रामराम.सरकारी नोकराना मिळणारे निवृत्ती वेतन हे म्हणजे त्यांना फुकट पोसणे हे म्हणणे अजिबात पटणारे नाही.+१०० तसे म्हणायचे झाले तर मग, एखाद्या खाजगी कंपनीचे समभाग (शेअर्स) विकत घेणार्यांनीही, "आम्ही त्या कंपनीच्या कर्मचार्यांना पोसतो", असे म्हणण्यास हरकत नसेल ! ;) :)