काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी .
काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी .
मला माझ्या तरुण वयातच काश्मीर मध्ये जवळ जवळ पाच वर्षे शिक्षणाच्या निमित्याने राहण्याची संधी मिळाली. सर्व जगात पृथ्वीवर स्वर्ग असेल तर काश्मीर असेल ,असे सांगणारा सम्राट किंव्हा ."काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे ." अशा सारखी कानावर पडणारी भाषणे . . पाकीस्तानला उद्देशून त्यांना दम भरण्या साठी केलेली नेते मंडळीची विधाने .भारतीय सेनेचे असणारे काश्मीर मधील कायमचे वास्तव, या वर होणारी सादोदित चर्चा , तसेच धर्माच्या आधारे होणारी हिंसा. अशांती व सर्व कांही , सद्य परिस्थितीत सर्व सामान्य माणसाला काश्मीर बद्दल या पलीकडे जाऊन कोणतीही माहिती असेल असे मला वाटत नाही . अर्थात हे माझे वैक्तिक मत आहे.
पौराणिक कथे नुसार संस्कृत भाषेत "का" म्हणजे पाणी व "शमीरा" म्हणजे सुकवलेला असा अर्थ होतो .ऋषी कश्यप यांनी बारमुला (वराह-मुला) इथे एक प्रचंड मोठ्या तळ्याच्या बाजूला छेद देऊन ते प्रवाहित केले व आपल्या शिष्य गणाला व विद्वान लोकांना तिथे राहण्याची विनंती केली . हा नवीन तयार झालेला भू भाग एक सुपीक माती आणि समशीतोष्ण हवामाना मुळे, तांदूळ, भाज्या आणि सर्व प्रकारचे फळे याने समृद्ध आहे, आणि रेशीम तयार करण्याच्या गुणवत्तेसाठी हि प्रसिद्ध आहे. काश्मीर इतिहासपूर्व कालखंडात येते , तो कधी कधी स्वतंत्र होता, परंतु कांही काळ उत्तरे कडील बॅक्टरीया,टारटेरी, तिबेट आणि इतर डोंगराळ प्रदेशांच्या आक्रमकांनी परागंदा झाला होता . दक्षिणेकडे सिंधु व्हॅली आणि गंगा खोऱ्या पर्यंत त्यांचे वास्तव्य होते.
थोडक्यात याच संस्कृती मधील पाणिनी ज्यांच्या "अष्टाध्यायी" ह्या जगातील सर्व प्रथम व्याकरणाचा सर्वात वैज्ञानिक व निर्दोष ग्रंथ मानला जातो .पतंजली जानी मानव धर्मासाठी योग सामर्थ्याची भेट दिली .सारंगदेव ज्यांना हिंदुस्तानी व कर्नाटकी संगीताचे भीष्म पितामह मानले जातात .आचार्य अभिनव गुप्त हे सर्व काळातील विद्वान आहेत कि ज्यांनी ४६ साहित्यिक अभिजात लिखाण केले आहे कि ज्या मध्ये अभिनव भारती हे समाविष्ट आहे .त्यांची जगातील ८० विद्यापीठात "रास तत्वे " शिकवली जातात . काश्मीर हे खऱ्या अर्थाने सरस्वतीचे मुख्य निवास स्थान समजले जाते म्हणून त्याला"शारदापीठ " असे हि संबोधित केले जाते . पूर्वी विद्यार्थी आपला ज्ञान भाग शिकून काशी मधून उत्तीर्ण होत असे व त्या नंतर तो उच्चं शिक्षण साठी काश्मीरच्या दिशेने आपली पाऊले उचलत असे .बहुतेक सर्वच संस्कृत साहित्याचा उगम हा काश्मीर मधून झाला आहे . संस्कृत कवी कलहंस यांनी १२ व्या शतक मध्ये लिहलेला , सम्राट राजा ललितादित्य यांच्यावर राजतरागिणी नावाचं ग्रंथ खूपच प्रशिध्द आहे . आठव्या शतकातील सम्राट राजा ललितादित्य हा इतका पराक्रमी होता कि त्यांचे साम्राज्य उत्तरेस कॅस्पियन समुद्रा पासून ते दक्षिणेत गोदावरीच्या पात्रा पर्यंत पसरलेले होते कि ज्या मध्ये आसामचा, जे पूर्वेस आहे ,याचा हि समावेश होता .किती भारतीय लोंकाना या पराक्रमी सम्रांटाचे नाव ठाऊक आहे , किती लोकांना माहित आहे कि श्रीनगरची स्थापना सम्राट अशोकाने केली आहे . काश्मिरी साधू महायान याने बौद्ध धर्माचा प्रसार मध्य आशिया ,चीन व जपान मध्ये केला होता .
काश्मीर मधील हिंदू लोकांना पंडित या नावाने संभोधिले जाते. अगदी तुकोबारायांच्या फेट्या प्रमाणे हे लोक डोक्याला फेटा बांधतात . महाराष्ट्रातील कुरोड्या हा पारंपारिक ( तळलेल्या तांदळाच्या गोल शेवया सारखा दिसणारा ) प्रकार मी तिथे अनुभवाला आहे . भारतात सर्वात जास्त संस्कृत भाषा आपल्याला काश्मिरी भाषेत सापडेल . त्र , ज्ञा, ऋ, या सारखे मराठीतील शब्द काश्मिरी भाषेत हि आढळतात . "कुलूप " हा शब्द म्हणणारे भारतिय कदाचित आपण मराठी किव्हा काश्मिरी दोघेच आहोत .
काश्मीर हा कांही जमिनीचा एक निर्जीव तुकडा नसून भारतीय संस्कृतीची अनेक तथ्ये सांगणारा इतिहास आहे . भारता मधील नवीन येणाऱ्या पिढीला हा इतिहास आवर्जून सांगितला पाहिजे . तो त्यांच्या पाठय पुस्तकात समाविष्ट केला पाहिजे .इंग्रजांनी तयार केलेला इतिहास ज्या मध्ये आमचा मूळ इतिहास संपवणे व प्रत्येक भारतीयाला मना मध्ये लाज उत्पन्न करणे हीच त्यांची रचना होती .स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली तरी देखील ह्याच गोष्टी आपण पुन्हा करीत आहोत . पण काश्मीर असा एक मोठा खजिना आहे कि ज्या मधून खरोखरच आपली प्राचीन भारतिय सभ्यता ,संस्कृती बाहेर पडेल व खऱ्या अर्थाने तो भारताचा अविभाज्य भाग असेल .
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साला नशिबाने गंडवलंन...