दिलासा .....
दिलासा .....
भरती असो कि ओहोटी
सगळं काही वाहून न्यावं लागत
कुणाला दिलासा देऊ ?
त्या लाटांना, ज्या कधी थांबू शकत नाहीत
कि त्या किनाऱ्याला, जो कधी चालू शकत नाही !
इंद्रधनू असेल सप्तरंगी
क्षणभंगुरच राहावं लागतं त्याला
कुणाला दिलासा देऊ ?
त्या ढगांना, जे त्याचा निरोप घेऊन येतात
कि त्या पावसाला, जो तिला कधीच भिजवू शकला नाही !
दिवस मग मागून रात्र
सायंकाळ दोघांना पाहावी लागते
कुणाला दिलासा देऊ ?
त्या उन्हाला, जे त्याच्या आठवणी जाळू शकत नाही
की त्या चांदण्यांना, ज्या त्याच्या आठवणींशिवाय दिसू शकत नाहीत !
काल ,आज मग उद्या, असे कितीक वर्ष !
रोज, हा नेमाने रोज येतो
कुणाला दिलासा देऊ ?
तिला? जी अजूनही फक्त त्याची वाट बघत आहे
कि त्याला? जो आजसुद्धा भेटीचे वचनही देऊ शकत नाही !
.....फिझा
💬 प्रतिसाद
च
चाणक्य
गुरुवार, 05/31/2018 - 08:12
नवीन
मस्त. खूप दिवसांनी लिहिलंत.
- Log in or register to post comments
फ
फिझा
Fri, 06/01/2018 - 10:31
नवीन
हो, बऱ्याच दिवसांनी पोस्ट केली कविता ! दखल घेतल्याबद्दल धन्यवाद !
- Log in or register to post comments
ख
खिलजि
गुरुवार, 05/31/2018 - 14:03
नवीन
सुंदर आहे
सिद्धेश्वर विलास पाटणकर
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 06/01/2018 - 05:37
नवीन
वाह,
जबरदस्त लिहिलंय.
- Log in or register to post comments
फ
फिझा
Fri, 06/01/2018 - 10:31
नवीन
धन्यवाद !
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 06/01/2018 - 17:19
नवीन
ओघवती आणि रेखीव
- Log in or register to post comments