संघ भाजपाने याचा विस्तार करावा
कदाचित राजकीय दबावातून असेल किंवा सरसंघचालकांची जेनुआईन इच्छा असेल, गेल्या दोन एक वर्षातील सरसंघचालकांची भाष्ये दलितांसोबत सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने संकेत देत होती, पण जमिनीवर काही विशेष घडल्याचे जाणवत नव्हते - कारण सरसंघचालकांची किती इच्छा असेल त्यांचा कार्यसर्त्यांनी ते मनोमन स्विकारण्याचे आव्हान अगदीच लहान नाही. आता उत्तरप्रदेशात दलितांसोबत राजकीय पुढार्यांची समरसता भोजनांची रेलचेल चालु दिसते. राजकीय पुढार्यांचे वागणे हवेत विरु शकते , पण कथित संत मंडळींचा या कार्यक्रमात समावेश करुन घेण्याचा प्रयत्नाची सकारात्मक दखल घेण्यास हरकत नसावी . केवळ एवढेच की या परिघाचा संघाने आग्रहाने ह्याचा विस्तार समस्त भारत भरातील पुरोहीत वर्ग ते शंकराचार्य आणि इतर धर्माचार्यांपर्यंत केला पाहीजे. प्रसिद्ध मंदिरातील नैवेद्याचे आचारी वाढपी ते शंकराचार्य पदा पर्यंत दलित आणि स्त्रीयांना समान संधी हिंदू धर्म देतो आहे हे पाहिले पाहीजे . तसेच जन्माधारीत विषमता वगळलेल्या धार्मिक साहित्याची निर्मिती केली पाहिजे.
ते राजकीय दबावामुळे करत आहेत या तक्रारीत खूप अर्थ नाही . महात्मा गांधी आणि इतर अनेकांनी राजकीय उपरती झाल्यावरच दलित प्रश्नांकडे लक्ष दिले. संघाच्या या प्रयत्नांचा पुर्ण विस्तार होऊन समाजातील दरी संपत नाही तो पर्यंत विरोधकांनी त्रुटी काढण्यातही काही गैर आहे असे वाटत नाही. पण भाजपा अथवा संघाला असे प्रयत्नच करु देणार नाही असा अॅटीट्यूड मात्र बाजूस ठेवला पाहीजे . उदारमतवाद्यां नी किती उदारता दाखवली तरी ते उदार होते तेवढ्यावर सामाजिक उत्क्रांती होत नाही. कर्मठ लोक कर्मठता बाजूला ठेवतात तेव्हा समाज बदलतोय असे खर्या अर्थाने म्हणता येत असावे. अर्थात हे सर्व तात्कालिक अथवा दिखाऊ राहू नये हे तेवढेच खरे.
संदर्भ
*** या विषयावरील माझे धागा लेख ***
* रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?
* संघ भाजपाने याचा विस्तार करावा
* दूध, 'वीरजण' ते तुप आणि परंपरावादाची सुयोग्य जोपासना
💬 प्रतिसाद
(64)
आ
आनन्दा
Sat, 05/05/2018 - 04:40
नवीन
खरे आहे. भाजपा सत्तेत आल्यापसून जे अनेक राजकीय लोक आपला अजेंडा घेऊन संघात घुसले आहेत त्यामुळे संघ पण लवकरच विसर्जित होइल की काय अशी भीती वाटू लागली आहे. पण अजून २० वर्षे काळजी नाही, जोपर्यंत आत्ताची पिढी कार्यरत आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/05/2018 - 10:30
नवीन
लोकसत्ताने उपरोक्त शीर्षकासहीत एक व्हिडीओ दिला आहे . मी व्हिडीओ बघीतला नाही. तो इतरांनी पाहून खात्री करावी. पण इथे स्वतः मोहन भागवत सरसंघचालक पदावर समान संधी बाबत बोलताहेत. मिपा सनातनी अर्थात समान संधीचे तत्व त्यांना अद्याप मान्य नसावे, रुचणे दुरची गोष्ट असावी.
मोहन भागवत जीं मधला समाज सुधारक त्यांच्या अनुयायांनी स्विकारण्यास अध्याप बराच अवकाश असावा .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/05/2018 - 10:31
नवीन
अरे दुवा राहीलाच की
- Log in or register to post comments
प
पुष्कर जोशी
Sat, 05/05/2018 - 16:23
नवीन
जात
10 सप्टेंबर 2016 · सार्वजनिक
36 वाचने
आज पोस्त वर उत्तर देता देता एक सुंदर पोस्ट तयार झाली ..
Main target must be convert VS into AND
जात = Group = गट = संघ = महासंघ हे समाजात राहणारच ते कधीच संपणार नाहीत आणि ते व्यावहारिक पण नाही... फक्त त्यांचे स्वरूप बदलत जाणार...
जसे जसे छोट्या गावाकडून तुम्ही मोठ्या शहराकडे जाल तसे तसे बदललेले स्वरूप तुम्हाला जाणवेल ...
गावात तुम्हाला ब्राह्मण गल्ली दिसेल तर मुंबई मध्ये तुम्हाला दिसणार नाही
मुंबई मध्ये तुम्हाला नेवी नगर दिसेल किवा आरे / LIC कॉलोनी दिसेल ...
जसा जसा काळ पुढे पुढे सरकत जाईल तसा तसा हा बदल होत जाणार
गावात तुम्हाला
ब्राह्मण VS मराठा
तालुक्याला
हिंदू VS मुस्लीम
शहरात तुम्हाला
मुंबईकर VS घाटी, Engineer VS B.com, मराठी vs गुजराथी , शाकाहारी vs मांसाहारी
असा जातीयवाद = Groupism
नक्की दिसेल ..
आपण groupism संपवू शकत नाही तो कोणत्या न कोणत्या स्वरुपात राहणारच !!
आपण फक्त VS ला AND मध्ये बदलू शकतो
ब्राह्मण VS मराठा, हिंदू VS मुस्लीम, मुंबईकर VS घाटी, Engineer VS B.com, मराठी vs गुजराथी , शाकाहारी vs मांसाहारी
ला ब्राह्मण AND मराठा, हिंदू AND मुस्लीम, मुंबईकर AND घाटी, Engineer AND B.com, मराठी AND गुजराथी , शाकाहारी AND मांसाहारी
असे बदलू शकतो ..
विचार करा .. Indian Medical Association किंवा Institute of Engineer's किंवा कालां घोडा students association याना आपण group वादी (जातीय वादी) म्हणालो तर कसे होईल ..
जात / group / संघटना नष्ट करा म्हणालो तर कसे होईल ?
समाजात Indian medical association हे राहणारच त्याचे महत्व आहेच .. पण तुम्ही त्यास Institute of Engineer's मध्ये merge करा असे म्हटले तर चालेल का ?
प्रत्येक संस्था प्रत्येक जात प्रत्येक संघटना प्रत्येक गट (group) याचे समाजात काही न काही तरी योदादन असतेच ते आपण नाकारू शकत नाही ..
गरज आहे तर फक्त VS ला AND मध्ये बदलण्याची !!
- पुष्कर हेमंत जोशी
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 05/05/2018 - 18:47
नवीन
अरे वा, परफेकट व्हाटसप पोस्ट.
फिरू द्या जोमाने.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 05/06/2018 - 07:32
नवीन
इथे प्रत्यक्ष अथवा आडून समान संधी आणि विषमता निर्मूलनास विविध प्रकारच्या युक्तिवादातून विरोध नोंदवणार्या विविध प्रतिसादकांच्या नजरेतून काही गोष्टी निसटताहेत
अजूनही काही क्षेत्रात जन्माधारित विषमता आहेत आणि काही क्षेत्रात समान संधी नाकारल्या जाताहेत आणि / किंवा काही समूहांना भूतकाळात जन्माधारित विषमता आणि शोषणा मुळे समस्यांना सामोरे जाऊन जे मानसिक वेदनाकोष आहेत त्यांच्याकडे प्रतिसादकांचे दुर्लक्ष होत असावे .
दुसऱ्या धर्माने आमच्या धर्मावर केलेल्या अन्यायाच्या वेदनांचे कोष जपायचे, पण धर्मान्तर्गत तयार झालेल्या वेदनाकोषांचे अस्तित्व नाकारायचे असा दुटप्पी पणा स्वतः:चा स्वतः; ला दिसणे जरासे कठीण असते.
वेदनाकोष असलेल्यांचे शत्रूचा शत्रू आपला मित्र या धर्तीवर जे राजकारण होते , त्याच्याही आपल्याला वेदना होतात - हा आपला हुच्च वेदनाकोष असतो ; कारण तुमच्या धर्मान्तर्गत जे लोक तुम्हाला शत्रुवत वाटतं नाहीत ते जाऊन तुमच्या शत्रूशी राजकीय गणितात हातमिळवणी करतात. आता या वेदनांपासून सोडवणूक करण्यासाठी तुम्ही एका नेतृत्व पुढे करता / निवडून देता . कोणत्याही शहाण्या नेतृत्वाला किमान सत्तेत पोहोचताना अथवा सत्तेत गेल्या नंतर सत्ता हस्तगत करणे आणि टिकवणे आणि परधर्मीय शत्रूस राजकीय खिंडीत गाठण्यासाठी आपल्या आतल्यांना आधी आपल्याकडे वळवणे गरजेचे आहे . त्यासाठी आपल्यालातल्याच दुखावल्या गेलेल्यांच्या वेदनाकोषाचे विश्वासार्ह शमन करणे गरजेचे आहे . आणि यासाठी आपल्याच कार्यकर्त्या आणि अनुयायांच्या वर्तनात बदलाची गरज लक्षात येते.
पण त्रांगडे असे आहे कि यांना नेतृत्वात पाठवणाऱ्यांच्या अनुयायांना आपल्या अंतर्गत लोकांचे काही वेदनाकोष आहेत त्याचे विश्वासार्हपणे शमन होणे गरजेचे आहे हे लक्षातच येत नाही; आणि ते आपल्या नेतृत्वाची साथ देतच नाहीत उलट त्यांनाच दूषणे देतात आणि वेगळे पाडतात , यातून शेखचिल्ली गिरीपलीकडे आपल्याच नेतृत्वास कमकुवत करण्यापलिकडे हाती काही लागत नसावे :) . पण त्यांचे जे समजदार नेतृत्व आहे तेच त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या असमंजसपणा आणि आडमुठेपणाने हतबल होताना दिसते अशी हि गमंत आहे .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 05/06/2018 - 07:41
नवीन
आमचे, आपले , तुम्ही , तुमचे हि विशेषणे व्यक्तिग्त रित्या घेऊ नयेत हि विनंती
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 05/06/2018 - 07:47
नवीन
येथील काही प्रतिसादकांच्या हिशेबी आदिवासी आणि दलित एकच असावेत , त्यांच्या समस्या आणि वेदनाकोष एकसारखे असावेत कि काय अशी शंका वाटते . त्यातील एका घटकासाठी काम केले कि आपण आपोआप दुसऱ्या घटका पर्यंत पोहोचतो असा समज आहे का काय अशीही शंका वाटते . आणि वेदनाकोष असलेल्या नाराजांच्या वेदनांशी सोयरसुतक दिसत नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 05/06/2018 - 08:10
नवीन
आता एका प्रतिसादक आहेत , ज्यांना अंतर्गत लोकांचा वेदनाकोष मान्य आहे पण त्याची सोडवणूक एकत्र कुटुंबात करत बसण्या पेक्षा वेगळ्या कुटुंबात जा असे सुचवताहेत , पण वेगळ्या कुटुंबात गेल्याने मनावर नवे ओरखडे नव्या जखमा कदाचित लगेच होणार नाहीत ,-पण आधीच्या जुन्या वेदनाकोषाचे काय आणि ज्यांना एकत्र कुटुंब सोडायचे नाही त्यांचे काय ?
शेवटी तुमचा तुमच्या एकत्र कुटुंबावरही काही भावनिक अधिकार भावनिक नाते असते कि नाही ?
अगदी पाकिस्तानातील शिल्लक हिंदूंचे -एखादा दोन टक्के जे काही आहे -उदाहरण घेतले तर , उच्चवर्णीय हिंदूंनी तो देश जवळपास केव्हाच सोडलाय , शिल्लक असलेले दलित असूनही आणि हिंदू धर्म सोडण्यासाठी प्रलोभने दबाव कारणे सर्वकाही असूनही त्यांनी धर्म त्यागलेला नाही कारण त्यांनी परंपरेने अंगिकारलेली जीवन पद्धती आहे . आमच्या धर्मात राहायचे तर जन्माधारित विषमता सहन करा अन्यथा एका अमुक धर्मात जा , या भूमिकेस काय म्हणावे ? हिंदू धर्म उत्क्रान्त झालेला धर्म आहे तो काही केवळ विषमता पाळणाऱ्यानी तयार केलेला नाही , उलटपक्षी विषमता घुसवणारे उपरे आहेत आणि उपऱयांच्या सांगण्याखातर आपली परंपरेने विकसित जीवन पद्धती कुणी का सोडावी उलट समान संधी नाकारणार्यांना विषमता पाळणाऱयांना त्यांचे वर्तन बदला नाही तर तुम्ही वेगळ्या धर्मात जा -आपली स्वतः:ची चुक नसताना घराच्या बाहेर पडून एबीसीडी पासून नवी सुरवात का म्हणून करावी - आम्ही आमचा हिंदू धर्म समान संधी आणि विषमता निर्मूलन करून पुढे जातो असे का म्हणू नये ?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 05/06/2018 - 16:41
नवीन
हा हा , माहीतगार , आयेम अ प्रॉब्लेम सॉल्वहर , नॉट प्रॉब्लेम एक्सप्लेनर !
ब्राह्मणेतरांनी धर्मांतर करुन अन्य धर्मात जाणे , किंवा नवीन धर्म स्थापन करणे हे साधे सोप्पे सोलुशन आहे !
एकत्र राहुन वाद घालत बसण्या पेक्क्षा स्वतंत्र सुखासमाधाने जगण्यात काय हरकत आहे !
एक सनातनी हिंदु म्हणुन मला माझ्या संमृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे , आता ज्यांना मुळापासुन सारेच हिंदु संस्कार, परंपरा शोषक वाटतात त्यांना हिंदु धर्मात रहाण्याची सक्ती नकोच . रादर दुसर्या धर्मात जावा , त्या परंपरांचा अभिमान बाळगा , त्यांचे पाईक व्हा हाच आग्रह आहे !
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पहा उदा. I shall not perform Shraddha nor shall I give pind. किंव्वा I shall not allow any ceremonies to be performed by Brahmins. किंवा I shall not take intoxicants like liquor, drugs, etc. ,
कोणत्याही हिंदुला ह्या प्रतिज्ञा पटत असतील तर त्याने बौध धर्मात जावे हे उत्तम ! त्याच्या साठी आणि उर्वरीत हिंदु समाजासाठी देखील !
एकत्र राहुन वादावादी करत बसायला काय अर्थ आहे ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 05/06/2018 - 17:07
नवीन
सनातना असो अथवा इंटरप्रीटेशन असो आपला किंवा इतर कुणाचा त्यावर एकाधिकार निश्चित नसावा.
बेसिकली हिंदू धर्म म्हणजे विषमतावादी साणि समान संधी नाकारणारे दाखवतील तो आणी तसाच आहे हि भूमिका पोकळ आणि भंपक आहे.
तसे पहाता फक्त ईश्वर चिरंतन आहे तर तोच तेवढा सनातन असू शकतो बाकी कुणी नाही , आणि ईश्वर हि न्याय्य आणि आदर्श एंटीटी असेल तर विषमतेचे समर्थन करणार नाही आणि समान संधीही नाकारणार नाही . त्यामुळे समान संधी देणारा आणि विषमतेचे समर्थन न करणारा हिंदू धर्म आणि असा हिंदू धर्मीय केवळ सनातनतेच्या जवळ जाउ शकतो
हे आपल्या मनातले वाक्य दुसर्यांच्या तोंडात टाकणे असू शकते . आणि तेही जन्माधारीत विषमतेचे आणि समान संधी नाकारण्याचा हा एक नविन बहाणा किंवा पवित्रा नाही किंवा कसे ? म्हणजे जे अयोग्य प्रथांबद्दल आवाज करतात त्यांना आपण बाहेर चा रस्ता दाखवला की आवाज न करणार्यांच्या बाहेर न पडणार्यांच्या समान संधी नाकारण्यास आपण मोक्ळे .
मी वर सनातनतेची नवी व्याख्या उपलब्ध केली आहे त्या नुसार समान संधी नाकारणार्यांनी आणि विषमतेचे समर्थन करणार्यांनी आनंदाने हिंदू धर्माचा त्याग करावा . समान संधी आणि विषमता नाकारणार्यांनी हिंदू धर्मात फूकाचा वाद घालत बसण्या पेक्षा हिंदू धर्म सोडून हवे तेथे आनंदाने जावे. अशा कोणत्याही प्रवासास लाख लाख शुभेच्छा ;)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 05/06/2018 - 17:53
नवीन
खुद्द बाबासाहेबांनीच दिलेल्या २२ प्रतिज्ञात म्हणले आहे
I renounce Hinduism which is harmful for humanity and impedes the advancement and development of humanity because it is based on inequality, and adopt Buddhism as my religion.
आता ह्या उपर हिंदु धर्मात सुधारणा घडवुन आणणे आणि हिंदुधर्म समानतावादी आहे असे लोकांना कन्विन्स करणे तुम्हाला शक्य वाटत असेल तर तुमच्या आशावादाला आमचा सलाम !
=))))
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 05/06/2018 - 18:49
नवीन
सावरकर म्हणाले म्हणून मी शब्द पूजक नाही आणि आंबेडकर म्हणाले म्हणून मी व्यक्ती पूजक नाही आणि त्या विषयावरच्या निसटत्या बाजू डिटेल मध्ये केव्हातरी; बाकी बाबासाहेबांचा सहभाग असलेल्या घटनेने प्रत्येक सेकंदाला वेगवेगळ्या धर्मात प्रवास करण्याचा आधीकार दिला आहे आणि समानतेचे तत्व राज्यघटनेत ओव्हर आर्कींग आहे त्यामुळे आहे त्या धर्मात किंवा दर सेकंदाला धर्म बदलून त्या त्या धर्मात समता आणि विषमता निर्मूलनाची मागणी करणे आमचा आणि तुमचाही घटनादत्त आधीकार असताना आणि प्रत्येक धर्मीयाला या किंवा त्या निसटत्या बाजू नजरेत आणण्याचे सामर्थ्य असताना, धर्म बदलण्याचे सल्ले देण्या पेक्षा जे आहे त्यातील खळांची व्यंकटी सांडवून प्रत्येक पदरी पसायदान पोहोचवण्याचा आशावाद आत्मविश्वासा सोबत असल्याने आपल्या शुभेच्छांचे सहर्ष स्वागत आणि अनेक आभार.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 10/02/2018 - 10:10
नवीन
केरळातील पौरोहीत्य व्यवसायातून जन्माने ब्राह्मण कमी होत आहेत तर ब्राह्मणेतरांचा सहभाग वाढत असल्याची, या व्यवसायातील जन्माधारीत विषमता दूर होत असल्याची १ , २ हि दोन वृत्ते आश्वासक वाटतात. ( सामाजिक बदल आहे, यात राजकारणाचा संबंध नसावा )
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2