“आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत”
व्हॉसपवर एक म्येसेज फिर्तो आहे. आमाला लई इचार करनारा वाट्ला. फकस्त आप्ल्या फायद्याकडं नजर आसलेल्या बुद्दीमान लोकांला जरा तरी बुद्दी यावी या कारनाने या टिकानी द्येत हाहे.
=================================================
“आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत”
©कल्पेश गजानन जोशी
देशातली आजची एकंदरीत परिस्थिती पाहता ब्रिगेडीअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा एक सत्य भाकित वर्तविणारा लेख आठवतोय.
गेल्या वर्षी डोकलाम प्रश्नी मा. महाजन सरांचा “आॅपरेशन स्मिअर आणि भारत” हा लेख दैनिक पुढारीला वाचण्यात आला होता.
त्यात त्यांनी स्वत:च्या सैनिकी पेशाला शोभेल असे एक गुढ सत्य मांडले होते. ते गुढ यासाठीच, की ते कुणालाच माहित नव्हते. माहित झाल्यावरही त्यावर कुणी सामान्य व्यक्ती चटकन विश्वास ठेवणार नाही. परंतु त्यांचे ते गुढ आज खरे वाटु लागले आहे.
देशातील अस्थिर राजकिय सामाजिक परिस्थिती व वाढता असंतोष पाहता ब्रिगेडिअर महाजन यांनी वर्तवलेले भाकित स्पष्ट होऊ लागले आहे.
'आॅपरेशन स्मिअर आणि भारत' या आपल्या लेखात ब्रिगेडिअर हेमंत महाजन मांडतात:
“काळ बदलतोय तश्या युध्दनीती बदलत आहेत. शत्रुशी केवळ सीमेवर दोन हात न करता अन्य मार्गांनी कसे खिळखिळे करता येईल यासाठी नियोजनबद्ध डावपेच जगभरातील देश आखत अाहेत.”
"पाकिस्तानही चीनच्या मदतीने भारताला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे. या आॅपरेशनला '१९४५- आॅपरेशन स्मिअर' असे नाव देण्यात आले आहे.”
"तीन वर्षातील भारताची जगभरात उजळलेली प्रतिमा तसेच भारताचे परराष्ट्र व लष्करी धोरण पाहता भारत सरकार काश्मिरप्रश्नी काही नमते घेईल असे वाटत नाही."
"म्हणुनच पाकिस्तान व चीनसारख्या शत्रु राष्ट्रांनी भारताविरोधात इलेक्ट्राॅनिक मिडिया व सोशल मिडियाच्या माध्यमातुन आपले भाडोत्री लेखक, साहित्यीक व पत्रकार कामाला जुंपले आहेत. त्याचेच नाव 'आॅपरेशन स्मिअर'!"
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतात महिला, बालके, दलित, अल्पसंख्य तसेच धार्मिक स्थळे असुरक्षित आहेत, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत अशी सर्वदूर बोंब करणे. थोडक्यात काय तर भारत हा एक असुरक्षित व अस्थिर देश आहे अशी भारताची बदनामी करणे हेच त्या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट. या अभियानासाठी पाकिस्तान, चीन व मध्य पूर्व आशियातील वहाबी उग्रवादी संघटनांकडून तसेच आयएसआयकडून आर्थिक मदत उभी करुन युरोप व अमेरिकासारख्या देशांमध्ये भारताविरुद्ध अपप्रचार सुरु देखिल झाला आहे. आतापर्यंत २१५ कोटी डाॅलर्स यावर खर्च झाले असून २०१९ च्या निवडणुकांआधी यापेक्षा कैक पट खर्च या आॅपरेशन स्मिअरवर खर्च होईल असे भाकित यात दर्शविले आहे.”
आपणांस माहित असेलच, २०१४ ला सत्ता परिवर्तन झाले. भाजप सरकार सत्तेत आले. पण काय आश्चर्य, नवीन सरकार सिंहासनारुढ होत नाही तोच असहिष्णुतेवरुन देशभरात हलकल्लोळ माजला होता.
अनेक दिग्गज नेत्यांनी, साहित्यिकांनी आपली पदके व पुरस्काराचा त्याग केला होता. आॅपरेशन स्मिअरची ही सुरुवात होती का? भारतात असहिष्णुता वाढली आहे ह्याचा कंठशोष करुन कुणाला सांगणे होत होते?
पुढे थोड्याच दिवसांनी रोहित वेमुला प्रकरण घडले. रोहित वेमुलाची आत्महत्या नसुन मर्डर असल्याचा कांगावा केला गेला.
भाजप व विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना यात गोवण्यात आले. या प्रकरणापासुन देशात दलित असुरक्षित असल्याचा ढोल बडवण्यास सुरुवात झाली.
नंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. आतंकवादी अफजलगुरुच्या जयंत्या मयंत्या वामपंथी संघटनांकडून साजरी होऊ लागल्या होत्या. या देशद्रोही कृत्यास विरोध केल्यावर सर्व डाव्या वामपंथी संघटनांनी (काँग्रेससहित) 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे' अश्या फुशारक्या मारल्या. सर्व काही नियोजनबद्ध घडल्यासारखं वाटावं असे हे एक एक प्रकरणं आता विचार करायला भाग पाडत आहे.
जेएनयू प्रकरण शांत होते न होते तोच कश्मिरमध्ये हिंसाचार उफाळला. कारण काय तर मोस्ट वाँटेड आतंकवादी बुरहान वानी याचा भारतीय सैनिकांनी खात्मा केला होता.
बुरहान वानीच्या अंतयात्रेस लाखोच्या संख्येने त्याचे भक्त एकवटले होते व देशविरोधी घोषणा देत होते. या घटनेनंतर कित्येक दिवस कश्मिर खोरे धुमसत राहिले. भारतीय सैनिकांवर व पोलीसांवर दगडफेक होऊ लागली. काही पोलीस व सैनिकांना निर्घृणपणे मारले गेले. याला प्रत्युत्तर म्हणुन आतंकवाद्यांविरोधात नरमाईची भूमिका सोडून भारतीय सैन्याने उग्र रुप धारण केले. शेकडो आतंकवाद्यांना यमसदनी धाडले. याचे दु:ख झाले की काय म्हणुन विरोधी पक्षांसकट तथाकथित लोकशाहीवादी व मानवतावादी लेखक, साहित्यिक व पत्रकारांनी 'मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे' म्हणुन आवई उठवली.
भारतीय सैनिकांना व पोलीसांना एकटे गाठून दगडांनी ठेचून मारले जात होते, त्याचे दु:खाश्रू न ढाळता पॅलेट गनचा वापर करुन दगडफेक्यांना बंदूकितील छर्र्यांमुळे इजा होत आहे, याचे अधिक दु:ख या मंडळींना झाले.
आॅपरेशन संपले नव्हते. आव्हानेही संपली नव्हती.
आतंकवाद आणि नक्षलवादाच्या मुसक्या आवळल्या जात होत्या म्हणुन की काय चीन-पाकिस्तान अस्वस्थ झाले. म्हणुनच भारताला डिवचण्यासाठी गिलगीट-बाल्टीस्तानमधून ओबोर अंतर्गत रेशीम मार्ग तयार करण्यास चीनने सुरुवात केली. एवढेच काय तर डोकलाम वरही कब्जा करण्याचा प्रयत्न चीनद्वारा केला गेला. त्यातुनच डोकलाम विवाद उद्भवला. हा संवेदनशिल विवाद उभा ठाकला असताना चीन युद्धाची भाषा करत होता. चीनचे राष्ट्राध्यक्ष उघड उघड धमकी देत होते. युद्धाला कधी तोंड फुटेल सांगता येत नव्हते. एवढी गंभीर परिस्थिती उद्भवली होती.
भारताचे लष्कर प्रमुख सैन्याची हिंमत वाढवित होते. भारत सगळी आव्हाने पेलण्यास सक्षम असल्याचे सांगत होते. पण त्याचवेळी काही पत्रकार व लेखक चीन किती बलाढ्य व पराक्रमी व भारतापेक्षा शक्तीशाली आहे याचे कौतुक करत होते व भारतीय सैन्याला व युद्धसामुग्रीला कुचकामी ठरवुन भारताचेच खच्चीकरण करत होते. यालाच म्हणतात 'आॅपरेशन स्मिअर'!
पण आम्ही भारतीय नागरीक याला राजकिय खेळ समजुन बसलो आहोत. पण ब्लू व्हेलसारख्या या खेळात अंतत: नाश तर आपलाच नाही ना? याचा विचार करणे गरजेचे झाले आहे.
देशात जे काही घडते आहे ते सामान्य राजकारण नव्हे. राजकारण सत्तेसाठी असु शकते. पण सत्तेवर बसणारा व त्याला बसवणारा (रिमोट कंट्रोल) कोण हेही ठाऊक असावयास हवे. रिमोट कंट्रोल कोणत्या देशातून चालवले जात आहे हेही माहित असावे. कारण सत्तेसाठी राजकारण, राजकारणासाठी पक्ष, पक्षासाठी विचार, विचारासाठी संघटना व संघटनांचा 'जगावर राज्य' करणे हा हेतु असतो.
म्हणुनच कुणी अख्खं जग इस्लाममय करण्याचा विडा उचलतो, तर कुणी ख्रिश्चनमय करण्याचा.
कुणी सेक्युलरिजमचा प्रचार करतो तर कुणी कम्युनिजमसाठी लाल क्रांत्या करतो.
लढाया व युद्धांचे एकमेव कारण संपत्ती, पैसा, साम्राज्यविस्तार किंवा सत्ता एवढेच नसते. ब-याच युद्धांमागे हीच कारणे दिसतात, पण वैचारिक कारणे कधीही स्पष्ट केली जात नाही.
विषम विचारी असणे हेसुद्धा शत्रुत्व निर्माण होण्याचे एक कारण आहे. यातुनच निर्माण होतात संघर्ष व अराजकता. तेव्हा सत्तेमागचे वैचारिक दृष्टीकोनही समजुन घेणे महत्वाचे ठरते. एकदा का ते लक्षात आले की
• आपल्या देशात मानवाधिकाराचे उल्लंघन होतेय म्हणुन आक्रोश करणारे,
• अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन होते म्हणुन दंगा करणारे,
• दलित- मुस्लीम असुरक्षित आहे असे म्हणणारे,
• अफजल गुरुसारख्या आतंकवाद्याला आपला आयडाॅल मानणारे,
• भारत की बर्बादी तक जंग चलेगी म्हणणारे,
• नक्षलवाद्यांना व आतंकवाद्यांना मदत करणारे कोण आहेत व त्यांचा खरा चेहरा कोणता हे उघड होईल.
• २०१४ पासुन आजतोवर देशात कधी नव्हे इतके आंदोलनं व मोर्चे निघाले व निघताहेत.
• २०० वर्षात कधी नव्हे ते भीमा कोरेगांव प्रकरण आत्ताच कसे काय घडले? आता तर भीमा कोरेगाव प्रकरणामागे नक्षली भेजा असल्याचे समोर येत आहे.
• डोकलाम विवाद पुन्हा गरम होणे,
• बिहारमध्ये अचानक जातीय दंगली उसळणे,
• बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंदूवर हल्ले होणे,
• अॅट्रोसीटी कायद्यात अंशत: बदल काय झाला देशात हिंसाचार उफाळणे तसेच,
• कश्मीर खो-यात १३ आतंकवादी मारले गेल्यानंतर लगेच दगडफेक सुरु होणे आपणांस काय सुचित करत आहे?
• नोटाबंदीमुळे कश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांना व आतंकवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद काही काळ ठप्प झाली होती. दगडफेक करणा-या युवकांना कोण पैसे पुरवतो हे सर्वश्रुत झालेच आहे.
तेव्हा २०१९ मधल्या निवडणुका पाहता भारत सरकारला शक्य तितके बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल व मोदी सरकारच्या हाती देश असुरक्षित असल्याचा कांगावा लवकरच केला जाईल असे वाटते.
भारतातील काही वैचारिक गट असे आहेत, ज्यांचे पाठिराखे (किंवा रिमोट कंट्रोल) इतर देशातही आहेत.
भारतातला मुसलमान दुखावला गेला की अरब राष्ट्रे (इस्लामिक राष्ट्रे) धाऊन येतात.
भारतातल्या ख्रिश्चनांवर अत्याचार झाले की युरोपीयन देश मदतीला येतात.
भारतात वामपंथीयांवर अन्याय झाला की चीन पुढे सरसावतो. हे पाठिराखे त्यांचे म्हणणे युनायटेड नेशन्ससमोर मांडतातच शिवाय भारतातही लुडबूड करु लागतात.
नक्षलवाद व दहशतवाद या दोन विषवल्लींना तेच खतपाणी घालतात. खास याचसाठी तर त्यांनी ती पेरली आहेत.
भारताची प्रबळ परराष्ट्रनीती व मोदी सरकारने वाढवलेली मित्र राष्ट्रे यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा व प्रतिभा उंचावली आहे.
नाहीतर युनायटेड नेशन्सला भारतात लुडबुड करण्यास संधी मिळवुन द्यावी हाच त्यांचा कावा असणार.
परंतु सततच्या अपयशामुळेच पाकिस्तान व चीनला आता आॅपरेशन स्मिअरसारखे छुपे युद्ध करावे लागत आहे. याचा सामना प्रत्येक भारतीयाला करावा लागतोय. पण देशात घडणारी प्रत्येक घटना हे राजकारण आहे असे म्हणुन डोळेझाक करणे हे भारताच्या व भारतीयांच्या भवितव्याविषयी घोडचूक ठरेल.
“त्यासाठी आपल्या विवेकबुद्धीने घडणा-या घडामोडींचे अवलोकन करणे आवश्यक आहे.”
© कल्पेश गजानन जोशी
kavesh37. blogspot. com
=============================
आज बुद्दी गहाण ठ्यवली तर उद्या गुलामी करावी लागतेय ह्ये इतिहास सांगतोय, आसं बुद्दीमान लोकच म्हंत्यात बगा !
- दिवसाचे १६ - १८ तास एकही सुट्टी न घेता काम करणारा नेता
- विमानातच झोप घेऊन पुढच्या देशाला भेट देणारा नेता
- स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेऊन देशाला वाहून घेणारा नेता
- नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राईकने दहशत वाद्यांचा कंबरडे मोडणारा नेता
या सर्वांचा फोलपणा जनतेला कळायला लागल्यावर हि नवी लोणकढी आय टी सेल ने काढली आहे.१) पाकिस्तानी लष्कर -पाकिस्तानी लष्कर सीमेवर भारतीय सैनिकांशी थेट युद्ध करते. त्याचबरोबर अतिरेक्यांना प्रशिक्षण व शस्त्रे देऊन भारतात पाठविणे व त्यांच्या माध्यमातून भारतात दहशतवादी हल्ले करणे यामागेही लष्कर आहे.२) इस्लामी अतिरेकी -भारतात घुसून दहशतवादी हल्ले करून जास्तीत जास्त हत्या करणे हे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.३) पाकिस्तानी सरकार -आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांची पाठराखण करणे, दाउदसारख्या अतिरेक्यांना राजाश्रय देऊन दहशतवाद सर्वार्थाने स्पॉन्सर करणे, सातत्याने काश्मिर विषय उकरून भारताची बदनामी करणे इ. च्या माध्यमातून स्वतः नामानिराळे राहून पाकिस्तानी सरकार भारताविरूद्ध युद्ध करीत आहे.४) पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय एस आय -या संघटनेचे व लष्कराचे पाकिस्तानवर खरे नियंत्रण आहे. पाकिस्तानी सरकार तसे नामधारी असते. आय एस आय व लष्कराला मान्य असणारे सरकारच पाकिस्तानमध्ये टिकू शकते. भारतात दहशतवादी कृत्ये करून व छुप्या युद्धातून भारतात अशांतता माजवून भारताचे तुकडे करणे हे आय एस आय चे मुख्य उद्दिष्ट आहे.५) भारतातील निधर्मांध म्हणजेच निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत -भारतीय जनतेचा बुद्धिभ्रम करून वैचारिक गोंधळ माजविण्याचे काम हे करतात. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, दलितांवर अत्याचार, मुस्लिमांवर अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी इ. अस्तित्वात नसलेल्या मुद्द्यावर काहूर माजवून माध्यमांमध्ये भारतावर टीका करणारे लेख लिहिणे, वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या चर्चासत्रातून भारतावर सातत्याने टीका करून पाकिस्तानच्या सुरू असलेल्या कारवायांसाठी भारतच कसा जबाबदार आहे हे ठासून सांगणे, देशद्रोह्यांची पाठराखण करणे, भारतात दलित/मुस्लिम इ. वर अन्याय होत आहे असा गळा काढणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची शक्य तितकी बदनामी करून भारतालाच आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे, इस्लामी दहशतवाद्यांची पाठराखण करून त्यांच्याविरूद्ध असलेल्या जनमानसात असलेली चीड सौम्य करणे, एखाद्या गुन्ह्यात हिंदू आरोपी व मुस्लिम बळी असतील तर आकाशपाताळ एक करून आरडाओरडा करणे, पण आरोपी मुस्लिम व बळी हिंदू असतील तर संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे, न्यायालयाने यांना न आवडणारे निकाल दिले तर न्यायालयालाच आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे, दिवसरात्र अखंड सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून शिव्या देताना भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे असा कांगावा करणे, पाकिस्तानी लेखकांना व कलाकारांना इथे बोलावून व त्यांचे कार्यक्रम आयोजित करून जनतेच्या मनातील पाकिस्तानविषयीचे शत्रुत्व सौम्य करणे . . . या व अशा अनेक मार्गांच्या माध्यमातून हे पाकिस्तान व इस्लामी दहशतवाद्यांना मदत करीत असतात. या सर्वांच्या भूमिकेमुळे जनतेत एक प्रकारचा संभ्रम निर्माण होऊन वैचारिक गोंधळ होतो व त्यायोगे पाकिस्तानला मदत होते. भारतात देशांतर्गतच एकी नाही हा स्पष्ट संदेश जगाला दिला जातो. भारतात घडणार्या अनेक गोष्टी संशयास्पद असून त्यातील काही गोष्टींसाठी पाकिस्तान नसून भारतच जबाबदार आहे असे देशांतर्गत व जागतिक पातळीवर मत निर्माण होते. एकंदरीत भारताची भूमिका जागतिक पातळीवर बचावात्मक करण्याचे महान कार्य हे नग करीत असतात. या ५ स्टेकहोल्डर्समधील सर्वात जास्त धोकादायक स्टेकहोल्डर्स निधर्मांध आहेत. बाहेरून उघड उघड हल्ला करणार्यांपेक्षा आतून वाळवीसारखे पोखरणारे छुपे शत्रू जास्त धोकादायक असतात. यांच्यात काही राजकीय पक्षातील नेतेसुद्धा जबाबदार आहेत. उघड उघड चीनच्या तालावर नाचणारे डावे पक्ष, पाकिस्तानविषयी व अतिरेक्यांविषयी सहानुभूती असणारे खांग्रेससारखे तथाकथित निधर्मी पक्ष, पाकिस्तानमध्ये जाऊन मोदींना हटविण्याची मागणी करणारे मणीशंकर अय्यर व सलमान खुर्शीद सारखे नेते, डोकलाममध्ये चीन व भारताचे सैन्य एकमेकांसमोर युद्धाच्या पावित्र्यात उभे असताना गुपचूप चीनच्या राजदूताची भेट घेणारा पप्पू असे भारताला आतून पोखरणारे अनेक जण या देशात आहेत हे भारताचे दुर्दैव!मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Wakhra Swag | Official Video | Navv Inder feat. Badshah |(आ) आता सद्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांवर महाअभियोग चालवावा या नाटकाचा प्रयोग चालू आहे... नेहमीच्याच यशस्वी कलाकारांसमवेत ! (१) महाअभियोगासाठी दिलेले मुद्दे (आरोप) केवळ ओढूनताणून बनवलेले किंवा केवळ अनुमानात्मक आरोप (far fetched and speculative allegations) आहेत आणि त्यासाठी (सबळ तर सोडाच) कोणतेही पुरावे दिलेले नाहीत... "आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असल्यावर पुराव्यांची गरज ती काय?" :) (२) ही कृती चुकीची आणि अनैतिकसम/अर्ध-अनैतिक (quasi-immoral) असल्याचे खुद्द काँग्रेसच्या अनेक उच्च न्यायालयात वरीष्ठ वकील असलेल्या संसद सदस्यांनी टीव्हीच्या राष्टीय वाहिन्यांवर स्पष्टपणे सांगितले आहे आणि महाअभियोगाच्या अर्जावर सह्या करण्यास नकार दिला आहे. (३) त्या मुद्द्यांवरून बरखास्ती होणार नाही, हे न समजण्याइतके काँग्रेसमधील जानेमाने वकील अज्ञ नक्कीच नाहीत. तेव्हा त्या अर्जाला उपराष्ट्रपतीच केराची टोपली दाखवतील असे दिसते. असे केल्यास, "बघा, बघा, भाजपचे सरकार कसे हिटलरशाही करते आहे. लोकशाही खतरेमे आ गयी" असा गदारोळ करण्याचे सर्व व्यवस्थापन अगोदरच झालेले नसले तरच आश्चर्य असेल ! (४) वादासाठी, जर कारवाई लोक/राज्यसभेपर्यंत पोचली, तर बरखास्तीचा प्रस्ताव पास करून घ्यायला अर्जाच्या बाजूने लाज राखली जावी इतपतही मते नाहीत ! इतकेच काय त्या सर्व पक्षांचे सर्व उमेदवार प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार नाहीत (कारण अनेक सभासदांनी माध्यमांत प्रस्तावाच्या विरुद्ध मत नोंदवले आहे तर अनेक विरोधी पक्षांनी त्या प्रक्रियेतून अंग काढून घेतले आहे). तेव्हा, अर्जदार तो अर्ज उपराष्ट्रपतींनी अमान्य करावा व आपली लाज वाचावी आणि त्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे गोंधळ घालता यावा अशी आशा धरून बसलेले असतील. :) आता हा चक्रव्यूह भेदायला उपराष्ट्रपती कोणती रणनीति वापरतात हे पाहणे रोचक असेल ! :) (५) सह्यांसह अर्ज खूप दिवस आधीपासूनच तयार होता... किंबहुना, तो दाखल करेपर्यंत मधल्या काळात त्यावर सह्या असलेल्या काही सभासदांचा कार्यकालही संपला... असे असताना जस्टिस लोया केसचा निर्णय विरुद्ध गेल्यावर तो अर्ज दाखल करण्यात आला. यावरून, जस्टिस लोया केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी उच्च न्यायालयावर (मुख्यतः मुख्य न्यायाधिशांवर) दबाव टाकायच्या उद्येशाने तो अर्ज प्रथम तयार केला आणि आता निकाल विरुद्ध गेल्याने चिडून मुख्य न्यायाधिश व उच्च न्यायालयाच्या प्रतिमेवर शिंतोडे उडविणे चालू आहे, हे स्पष्ट होत आहे. लोकशाही किंवा गैरलोकशाही मार्गांनी जनतेला उसकवण्यात अपयश येत आहे आणि निवडणूकांत तर सतत पिछेहाट होत आहे. यामुळे, विरोधी पक्ष काकुळतीला आले आहेत आणि "स्वतःचे तेच खरे" अश्या बालहट्टासाठी ते कोणत्याही लोकशाही/वैधानिक संस्थेवर/व्यवस्थेवर दबाव आणण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत... मग तसे करताना भारताची परदेशात नाचक्की करायला लागली किंवा भारतिय संवैधानिक संस्थांना सुरुंग लावायला लागला तरी बेहत्तर... हे परत एकदा सूचीत झाले आहे. परत हे सगळे करताना लोकशाहीला वाचवण्याचा आव आणणे हे कसब तर केवळ असामान्य आहे ! :(
शून्य टक्के
असतानाही महाभियोग चालू असेपर्यंत सरन्यायाधिशानी खटले ऐकू नयेत म्हणून काँग्रेसने आता धोशा लावला आहे. हलकट पणाची किती खालची पातळी गाठू शकतात याचा नवनवीन विक्रम करणे चालू आहे. https://www.hindustantimes.com/india-news/cji-misra-should-consider-recusing-himself-from-judicial-work-congress/story-bTQjvrUhij82olkIPoAZpN.html. http://www.business-standard.com/article/current-affairs/cji-impeachment-motion-congress-asks-misra-to-recuse-himself-from-cases-118042300033_1.html कारण सरन्यायाधीश ऑकटोबर मध्ये निवृत्त होतील त्यानंतर सेवाज्यष्ठतेप्रमाणे सरन्यायाधीश होणारे जस्टीस रंजन गोगोई यांचे तीर्थरूप श्री केशबचंद्र गोगोई काँग्रेसच्या सरकारात आसामचे मुख्यमंत्री होते. जब सैया है कोतवाल तो डर काहे का?