Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

प्रदूषण (२५): महानगर - एक प्रदूषित कारागृह

व
विवेकपटाईत
गुरुवार, 04/12/2018 - 15:36
💬 2 प्रतिसाद

शेरखान जंगलाचा राजा. राजा असला तरी पोट-पाण्यासाठी त्याला शिकार करावीच लागायची. किमान दहा-बारा वेळी प्रयत्न केल्या वर त्याला शिकार गवसायची. कधी सांभर सारखे मोठे जानवर गवसले तर काही दिवस मेजवानी. तर कधी-कधी सस्या सारख्या छोट्या जनावरा वर ही गुजाराण करावी लागे. कधी-कधी कित्येक दिवस उपासमार ही व्हायची. तरी ही शेरखान खुश होता. कुठल्या जनावराचा शिकार करायची हे ठरविण्याचे स्वतंत्रता त्याच्या पाशी होती. आपल्या मर्जीचा तो राजा होता. तो जंगलात कुठेही फिरू शकत होता. पण म्हणतात न, काळ कधीच एकसारखा नसतो. एक दिवस शेरखान शिकारीला निघाला होता. त्याला एका पिंजर्यात लटकलेले जनावराचे मांस दिसले. आयते भोजन समोर दिसल्यामुळे तो पिंजर्यात घुसला आणि कैद झाला. शेरखान शहरातल्या एका प्राणी संग्रहालयात पोहचला. आता चार बाय सहाचा एक पिंजरा त्याचे घर झाले. शेरखानने अनेकदा पिंजरा तोडण्याचा आपल्या संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केला पण पिंजऱ्याच्या लोखंडी सळ्या तोडण्यास तो असमर्थ ठरला. शेवटी नियती समोर त्याने हात टेकले. संग्रहालयात वाघाला पाहण्यासाठी तिकीट विकत घेऊन लोक यायचे. लहान पोरे शेरखानला चिडवायचे, कधी-कधी कुणी पोट्टा दगड हि मारायचा. हे सर्व सहन करण्याशिवाय शेरखानला गत्यंतर नव्हते. तसे म्हणाल तर इथे शेरखानला कसलीच काळजी नव्हती. दररोज दुपारी म्हशीचे किंवा कधी-कधी बकर्याचे शिळे मांस जेवणात मिळत होते. अर्थात निर्धारित खुराकपेक्षा अर्धीच खुराक त्याला मिळत असे. नेहमीच त्याला अर्धपोटी राहावे लागायचे. माणसाच्या संसर्गात आल्यामुळे त्याला रोगराई होऊ नये म्हणून विटामिन, विषाणू नाशक आणि जीवाणू नाशक औषधी त्याच्या खुराक मध्ये मिसळून दिली जायची. शेवटी तो प्राणिसंग्रहालयाचा कमाऊ पूत जो होता. शेरखानला जंगलातल्या दिवसांची आठवण यायची, कुठे प्राण्यांचे स्वादिष्ट ताजे मांस खायला मिळायचे, तर कुठे इथे बेस्वाद शिळे मांस. कधी-कधी तर कित्येक दिवसांचे शिळे. पण नाईलाज होता, भूक भागविण्यासाठी खाणे हि मजबुरी होती. पिंजरा तोडून बाहेर जाणे अशक्यच होते. असेच तीन चार वर्ष निघून गेले एक दिवस मध्य रात्री शेरखानची झोप उघडली, त्याने पाहिले पिंजर्याचे दार उघडे होते. हीच सुवर्ण संधी आहे, इथून निसटायची. शेरखान पिंजर्यातून बाहेर पडला थेट जंगलाच्या दिशेने. अर्धा एक मैल पुढे गेला असेल कि त्याला धाप लागू लागली, तो थांबला. त्याच्या मनात विचार आला, एवढे वर्ष पिंजर्यात काढले, चालताना हि धाप लागत आहे. जंगलात शिकार करण्यासाठी तर कैक मैल चालावे लागते. आता पुन्हा शिकारीसाठी कैक मैल चालणे व धावणे आपल्याला जमेल का? कदाचित नाही. बाकी पिंजरा काय वाईट. बेस्वाद असले तरी जिवंत राहण्यालायक जेवण तर रोज मिळतेच. काही वेळ विचार करून, तो मागे फिरला आणि पुन्हा पिंजर्यात येऊन झोपला. पिंजरा म्हणजे जग हे कटु सत्य शेरखानने स्वीकारले. दिल्ली सारखे महानगर- लाखोंच्या संख्येने धूर फेकणारे वाहन, फेक्ट्रीज इत्यादी, सर्वत्र पसरलेला कचरा त्यात प्राणघातक रासायनिक कचरा हि. पिण्यासाठी सरकारी पाणी पूरवठा एजेन्सीचे घाण पाणी. या सर्वांमुळे पसरणारे रोग. कधी डेंगू, कधी मलेरिया तर कधी चिकनगुनिया. दिल्ली सारख्या महानगरात सर्दी पडसे, एलर्जी, अस्थमा, टीबी, केंसर आणि मानसिक तणावामुळे हृदयरोग होणे तर सामान्य बाब झाली आहे. (माझे हि नाकाचे ऑपरेशन झालेले आहे, हृदयाचे हि बायपास झालेले आहे, रोज अलर्जीची गोळी आणि हृदयरोगचे औषध घ्यावे लागते. शिवाय वातावरणात झालेल्या बदलाने होणारे आजार हि). मला तरी दिल्लीत एक हि माणूस ज्याला इथे राहता दहा एक वर्ष झाली असेल, औषधी न घेणारा अद्याप सापडलेला नाही. तरीही इथे अर्धेपोट का होईना जेवण मिळते. अधिकांश लोक दहा बाई दहाच्या खोलीत कसेबसे संसार थाटतात आणि त्यासाठी १२-१२ तास काम करतात. खरे म्हणाल तर महानगरात कुणीही आपल्या मर्जीने येत नाही, पोटाची भूक त्याला इथे आणते. पण एकदा महानगरात आलेला माणूसाला परतणे शक्य नसते. शेवटी इथेच रोगराई इत्यादींनी खंगत-खंगत तो इहलोकी जातो. महानगरीय प्रदूषणच्या कैदैत माणूस आणि पिंजर्यात कैद शेरखान, दोघांचे जगणे सारखेच.


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1393 views

💬 प्रतिसाद (2)
उ
उगा काहितरीच गुरुवार, 04/12/2018 - 15:45 नवीन
कटू असले तरी सत्य आहे . कितीही वाटले तरी शहरातल्या पिंजऱ्यातच आयुष्य कंठावे लागणार.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 04/12/2018 - 15:57 नवीन
महानगरीय प्रदूषणच्या कैदैत माणूस आणि पिंजर्यात कैद शेरखान, दोघांचे जगणे सारखेच.
डेस्मण्ड मॉरीस नावाचा एक मोठा मानववंश शास्त्रज्ञ आहे. त्याचे "ह्युमन झु" नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात तो म्हणतो - शहरांना सिमेंटची जंगले चुकीचे आहे. कारण शहरातल्या प्राण्यांच्या (माणसांच्या) समस्या जंगलातल्या प्राण्यांमध्ये दिसत नाहीत. शहरातल्या प्राण्यांच्या समस्या या प्राणीसंग्रहातल्या प्राण्यांच्या समस्यांप्रमाणे असतात. म्हणून शहरे ही जंगले नसून प्राणीसंग्रहालये आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 23 hours ago
  • सुंदर !!
    5 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा