टिपू आणि अकबर
स्विकार्यता, आणि स्विकार्यतेसाठी लेजिटीमसी/योग्यतेचे चित्र उभे करणे ही सर्वकालीन राज्यकर्त्यांची गरज असते म्ग काळ कोणताही असो, अकबराचा , टिपूचा , ब्रिटीशांचा
,महात्मा गांधीचा , की आता मोदी आणि राहुल गांधीचा .
जयंती कुणाचीही साजरी करता येते. - आपली संस्कृती उदार आहे, विघ्नकर्त्यांच्या पुजेसही मान्यता देते - आपण कुणाच्या जयंत्या साजर्या करत आहोत त्या बद्दल इतरांना काही प्रश्नचिन्हे आहेत का या बद्दल सोईस्कर दुर्लक्ष करता येते (किंवा संशयही निर्माण करता येतात) किंवा झाकपाक करता येते पण झाकलेली प्रश्नचिन्हे परत फिरुन येणारच नाहीत असे ही नसावे. महात्मा गांधींची जयंती सगळे जग उत्साहात साजरे करेल पण आफ्रीकेतून प्रश्नचिन्ह येत असते.
सर्वधर्मसमभाव असणे आणि सर्वधर्मसमभावाच्या प्रतिकांचा आदर्श म्हणून स्विकार करणे चांगली गोष्ट आहे. प्रत्येक परधर्मीय धर्मांध असतोच असे नाही, किंवा प्रत्येक आक्रमण धार्मिक उद्देशाने झालेले असते असेही नसावे. व्यापारी समुदायास सर्वकाळी स्रोतांवर नियंत्रण हवे असते आणि आक्रमक राज्यकर्त्यांच्या मागे बर्याचदा व्यापार हीतसंबंधही लपलेले असू शकतात , व्यापारी मदती शिवाय युद्धाचे खर्च अवघड असावेत. पैसे खर्च करुन सैन्य उभे करता येते पण निष्ठा ही गोष्ट केवळ पैसे टाकून मिळत नाही निष्ठा मिळवण्यासाठी अधिक काही वापरावे लागू शकते . ज्या गोष्टी निष्ठा मिळवण्यासाठी वापरता येतात त्यात इतर गोष्टी समवेत धर्माचाही समावेश असतो. पण धर्माचा प्रत्येक वापर लेजिटीमेट/योग्य असतो असे म्हणता येते का ?
टिपू सुल्तान अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील कर्नाटकातील एक शासनकर्ता जो एकाच वेळी ब्रिटीश वसाहतवाद तर स्थनिक राजकिय चढाओढीत निजाम आणि पेशव्यांना तोंड देत होता. (टिपूच्या वेळेस तत्कालीन पेशवा अजाण बालवयात असल्यामुळे सुत्रे खर्या अर्थाने नाना फडणवीस आणि मराठा सरदारांच्या हाती होती) . सविस्तर इतिहास संशोधनासाठी टिपूच्या बाबतीतील ऐतिहासिक दस्तएवजांची उपलब्धता मुबलक आहे. तेवढाच वादही कारण टिपूने एकीकडे वसाहत वादी ब्रिटीशांशी झूंज दिली त्यामुळे त्याच्या या बाजूच्या उदात्तीकरणात फारही गैर नाही. वादाचा मुख्य विषय येतो ती त्याच्या परधर्मीयांसोबतच्या वागण्या बद्दल . त्याचे काही वागणे कमालीचे धर्मांध असहिष्णू होते तर काही वागणे अत्यंत सहिष्णू परधर्म समभावी होते या टिपूकडे पहायचे कसे याचा सहाजिकच संभ्रम होतो. (राजकीय पोळ्या भाजल्या जातात त्या वेगळ्या)
एखाद्या व्यक्तीचे वया सोबत दृष्टीकोण बदलते असू शकतात. आफ्रिकेत असताना वर्णवादी असलेले गांधी उत्तर काळात अधिक मानवतावादी होतात. पुर्वायुष्यात तौलनीक उदार असलेला औरंगजेब उत्तर आयुष्यात अधिक कर्मठ होत जातो. पुर्वायुष्यात कमी उदार असलेला अकबर उत्तर आयुष्यात अधिकच उदार होतो. असे होत असते. अकबरा प्रमाणे उपरती झाली त्याला त्याचे आकलन करु पहाणाराही सहाजिक उदार होऊ पहातो ते सहाजिक आहे.
(पूर्ण आयुष्य मानवता बाळगलेल्यां ना सर्व जन प्रथम क्रमामका देतील पण किमान पूर्वायुष्यत नाही उत्तर आयुष्यात सकारात्मक बदलला म्हणून दुसर्या क्रमांकावर वाल्मिकी अशोक अकबर इत्यादी मंडळींना मान दिला जातो . पण ज्यांचे व्यक्तित्व उत्तर आयुष्यात नकारात्मक दिशेने जाते त्यांना नेमका काय न्याय देणार ? आणि याच कारणाने वयाच्या उत्तरार्धात कर्मठ होत गेलेल्या औरंगजेबाचे आकलन करताना उदारता दाखवणे बर्याच अभ्यासकांना सहाजिक कठीण जाते. )
अमुक धर्मीय राजाकडे तमुक धर्मीय माणूस कामास असणे बऱ्याचदा त्या राजाच्य उदारतेचा निकष मानला जातो , हा निकष परिपूर्ण असतो का ? अशा भूमिका प्रॅक्टिकल तडजोडीचा भाग असू शकतात का ? मुस्लिम राज्यकर्त्यांची दोन - तीन बाबतीत अडचण होत असण्याची शक्यता राहते. स्वकीयांकडूनच बंड होऊन सत्तेस निर्माण होऊ शकणारे अंतर्गत धोके टाळण्याच्या दृष्टीने समतोल साधणे , दुसरे रेव्हेन्यू महसूल गोळा करण्यास लागणारा साक्षर आणि विश्वासार्ह कर्मचारी वर्ग म्हणून हिंदू खासकरून ब्राह्मण वर्गाशी मुस्लिम राज्यकर्त्यांनी अंशतः जुळवून घेतल्याची शक्यता असू शकते का ? आणि अशी केवळ कातडी बचावण्यातून आलेली उदारता सच्ची उदारता म्हणवले जाऊ शकते का ? औरंगजेबाने अमुक ब्राह्मण अथवा मंदिरास दान दिले हे म्हणताना तो दान घेणारा औरंगजेबास तुमच्या घराण्याचेच राज्य राहिला यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी म्हणून दाणा मागतो आणि मग ते दिले जाते असे अटी असलेले दान तडजोडीचे असते कि उत्तर आयुष्यातील अकबरा प्रमाणे सच्ची परधर्म सहिष्णुता असते ?
हीच बाब टिपू सुलतानाचे आकलन करतानाही लक्षात घ्यावी लागते . त्याच्याकडे असलेल्या हिंदू कर्मचारी वर्ग एकतर त्याच्या तडजोडीच्या गरजेतुन अथवा त्याच्या ज्योतिषा वरील विश्वासातून त्याच्या सोबत टिकून होता . इ.स. १७९० पर्यंतचा टिपू सुलतान जबरदस्तीने धर्मान्तरे करणारा च नव्हे तर प्रसंगी परधर्मीयांसोबत क्रौर्याची पराकाष्ठा करणारा व्हिलन म्हणून दिसत राहातो. १७९१ मध्ये ब्रिटिश निजाम आणि पेशवे अशा तिघांनी मिळून शह दिल्या नंतरचा टिपू सुलतान नरमलेला आपली सत्ता वाचवण्यासाठी गरज म्हणून आपल्या बहुसंख्य हिंदू जनतेच्या श्रद्धांशी जमवून घेणारा शासक म्हणून पुढे येतो. पण त्याचे अकबराप्रमाणे विचार बदलले म्हणून नव्हे .
छत्रपती शिवाजी महाराजांची परधर्म सहिष्णुता अकबराप्रमाणे फिलॉसॉफिकल होती असे सांगणारे पुरावे नसावेत पण व्यवहारात होती ती संस्कारजन्य म्हणून पुढे येते . टिपूची उत्तरकालीन व्यवहारातील परधर्म साठी काही करणे हे अंधश्रद्धा मूलक स्वतः:ची सत्ता टिकवण्याच्या गरजेतून येत नाहीना अशी काही अभ्यासकांची शंका प्रस्तुत वाटते . टिपूची जयंती सहज साजरी करून धकवून नेता येईल पण अभ्यासकांची प्रश्न चिन्हे महात्मा गांधींच्या वर्ण वादाच्या समर्थाना विषयी वापस येणार तशी वापस येत राहू शकतात . काही तथाकथित पुरोगामी टिपू सुलतानाचे क्रौर्याकडे त्याची राजकीय गरज म्हणून पहा अशी भलावण करतात या न्यायाने हिटलरचे क्रौर्यही दुर्लक्षावें लागेल जे या पुरोगाम्यांना अवघड जाणारे असू शकावे किंवा कसे.
या धागा लेखाचा उद्देश इस्लामोफोबियाचे समर्थन करणे असा नाही . पण इराक मध्ये याझिदीवर धर्मान्धतेने झालेले अत्याचार हे हि एका वस्तुनिष्ठ वास्तव आहे त्याकडे डोळे झाकूनही चालत नाही . सर्वधर्मसमभावी व्यक्तींचा उदो उदो आवश्य करावा त्यासाठी अकबरा सारखी नि:शंक असलेली अनेक उदाहरणे निवडता येतील किंवा इतर अनेक सुफी संत भारत भर मिळतील; त्यासाठी प्रश्न चिन्हांना वापस आणण्याची क्षमता असलेले (तात्पुरत्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी ठीक ( ?)) औरंगजेबाचे किंवा टिपूचे व्हाईटवोशिंग किती कामास येऊ शकेल या बाबत शंका वाटते. असो .
संदर्भ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राम अष्टकम... :- Sooryagayathri & Kuldeep M Paiमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राम अष्टकम... :- Sooryagayathri & Kuldeep M Pai