अस्वस्थ न्यायव्यवस्था?
अस्वस्थ न्यायव्यवस्था?
विधिमंडळ,कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि माध्यमे या लोकशाहीच्या चार स्तंभांनी राज्यघटनेत अभिप्रेत स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांचे संवर्धन करण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, संसद राजकारण्यांचा राजकीय आखाडा, प्रशासन सत्ताधाऱयांचे बटीक, तर प्रसारमाध्यमांमध्ये आरती ओवाळणारी व्यावसायिकता आल्याचा आरोप आज सर्रासपणे केला जातो. अशा अस्वस्थ वातावरणात न्यायपालिकेची टिकून असलेली विश्वासहर्ता जनसामान्यांसाठी मोठी दिलासादायक आहे. परंतु लोकशाहीचा महतवाचा स्तंभ असलेल्या न्यायदेवतेच्या घरातही अस्वस्थताच असल्याचे चित्र शुक्रवारी संपूर्ण देशाने अनुभवले. स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी माध्यमांसमोर येत सद्यकालीन न्यायव्यवस्थेबाबतचे आपले आक्षेप टीकात्मक पद्धतीने नोंदविले. ज्यांच्याकडून 'न्याय'चा आधार जनतेला आहे, तेच जर न्याय मागण्यासाठी चक्क जनतेच्या न्यायालयात येत असतील तर ही बाब नुसती धक्कदायक नाही तर चिंताजनकही आहे. त्यामुळे जनता संभ्रमात पडू शकते. त्यांचा विश्वास डळमळीत होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण देशात यावर साधक बाधक चर्चा सुरु झाली आहे. आज चारपैकी दोन न्यायमूर्तीनी "आम्ही केवळ ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आहे" असं म्हणत वादावर पडदा पडणार असल्याचे सुचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वोच न्यायालयातील न्यायाधीशांमधील विसंवाद संपण्याचे संकेत आहेत. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी हा वाद लवकरात लवकर संपुष्टात यावा, हीच अपेक्षा.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीश यांच्या कारभारावर टीका केली. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व्यवस्थित चाललेला नाही. न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीही टिकणार नाही. खटले सुपूर्त करताना तत्त्वप्रणाली डावलून प्राधान्य असलेल्या पीठाकडे सोपविली जातात. न्यायालयाच्या कारभाराबद्दल लेखी तक्रार केल्यानंतर त्याकडेही दुर्लक्ष केले गेल्यामुळे अखेर प्रसारमाध्यमांसमोर आम्हास यावे लागले, असे स्पष्टीकरण या सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी दिले. एक सर्वोच्च न्यायाधीश आणि 25 न्यायाधीशांचे मंडळ यांनी युक्त असलेल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींची ही व्यथा अनेक गोष्टी उघड करते. सर्वोच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये न्यायदान करण्यासाठी अनेकदा न्यायपीठाची नियुक्ती केली जाते. न्यायपीठ नेमण्याचा अधिकारी सरन्यायाधीशांचा असला तर यासाठी अनेक नियमांचे आणि परंपरांचे पालन अपेक्षित असते. मात्र सरन्यायाधीशांकडून याबाबत मनमानी होत असल्याचा आरोप पत्रपरिषेदत करण्यात आला. त्यामुळे अपेक्षित निर्णय सुकर व्हावा यासाठीच काही विशिष्ट खटले विशिष्ठ न्यायपीठांकडे सुपूर्त केले जात असावेत. तसे होत असेल तर ही बाब गंभीरही आहे आणि चिंताजनकही. त्यामुळे न्यायमूर्तीच्या नियुक्त्या, काही खटले याबाबत न्यायव्यवस्था राजकीय प्रभावाखाली आहे, असा जो आरोप केला जातो, त्याला यातून बळ मिळते. ज्या स्तंभावर लोकशाही टिकून आहे. त्यांना स्वतःचे घटनात्म्क अधिकारक्षेत्र असून यापैकी कोणीही दुसऱ्याच्या अधिकारक्षेत्रात ढवळाढवळ करू नये असा संकेत आहे. अर्थातच या अधिकारांच्या सीमारेषा ठळक नसल्याने त्यांचे सहजतेने उल्लंघन होताना दिसते. परंतु सध्या हे सीमोल्लंघन वारंवार होत असल्याचा रोख न्यायमूर्तींच्या आरोपांवरून समोर येते.
आपल्या पसंतीच्या खंडपीठाकडे संवेदनशील खटले दिले जातात. यावर हा मुद्दा न्यायाधीश लोया यांच्याबाबत होता का, असा प्रश्न उपस्थित केला असता न्यायाधीश जोसेफ यांनी होय, असे त्याचे उत्तर दिले. त्यामुळे, न्यायव्यवस्थेतील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा चर्चेत येतो. सीबीआयचे न्यायाधीश बी. एच. लोया हे सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे न्यायाधीश होते. न्या. लोया हाताळत असलेल्या या खटल्यात भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आरोपी होते. नागपूर येथे एका लग्नसमारंभास न्या. लोया आले असता 1 डिसेंबर 2014 रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर या मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी, कारण तो अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झाला आहे, असे आक्षेप घेण्यात आले. कॅरव्हान या नियतकालिकाने हे संशयास्पद प्रकरण ऐरणीवर आणले आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. सदर प्रकरणाचा न्यायनिवाडा विशिष्ट खंडपीठाकडे दिल्याचा न्यायमूर्तींचा अनुरोध असेल तर हा निरपेक्ष न्यायदानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आक्षेप म्हणावा लागेल. मध्यंतरी अनेक वरिष्ठ न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्या प्रकरणांचे पडसाद ही या नाराजीमागचा एक चेहरा असू शकतो.
न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल, हे न्यायमूर्तींचे वाक्य ही तितकेच सूचक आणि प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला लावणारे आहे. लोकशाही टिकण्यासाठी न्यायव्यवस्था स्वतंत्र्य राहणे किती महत्वपूर्ण आहे, हे घटनाकारांनी घटनेतच विशद केलं आहे. दुर्दैवाने आज न्यायव्यस्थेच्या निरपेक्षपणवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जातेय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी अशा प्रकारे माध्यमांसमोर येऊन मत व्यक्त करणे योग्य कि अयोग्य ? यावर समांतर मतप्रवाह सर्व देशभरातून समोर येऊ लागला आहे. सरकार, विरोधक, जनता सर्व या घटनेनें हादरून गेले आहे. काही चुकीचे घडत असेल तर त्याची दुरुस्ती करण्यात यावीच. पण त्यातून न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. 'विश्वास' हा छोटा शब्द असला, लिहायला आणि वाचायला एक सेकंद जरी लागत असला, तरी तो निर्माण करण्यासाठी दशकं उलटावी लागतात. भारतीय न्यायव्यवस्थेने आपल्या कृतीतून असा विश्वास फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात निर्माण केला आहे. आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाचा गौरव केला जात असेल तर या लोकशाहीच्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी न्यायपालीकेचे विशेषतः सर्वोच्च न्यायालयाचे योगदान जगपातळीवर नावाजलेले आहे. न्यायालयाने कोणत्याही दबावाला बळी न पडता अनेकांना ताळ्यावर आणल्याची अनेक उदाहरणे देता येतील. त्याचमुळे तर जनतेला न्याय व्यवस्थेवर अंतिम विश्वास वाटतो. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी जपून पाऊले उचलावी लागणार आहेत..!!!
💬 प्रतिसाद
(89)
श
श्रीगुरुजी
Sun, 01/14/2018 - 18:38
नवीन
https://m.timesofindia.com/india/justice-loya-death-family-has-no-suspicions-asks-for-issue-not-to-be-politicized/articleshow/62497669.cms
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 05:20
नवीन
ठिक आहे तरीही . विश्वासार्हता प्रस्थापित होण्यासाठी चौकशी वगैरे होईल आणि होऊन गेली तर संशय वादास थारा उरणार नाही. अर्थात अशी चौकशी लगो लग होऊन गेली असती तर त्यावर विरोधकांना येत्या निवडणूकांची वेळ साधून केस पुढे आणून संशयाचे चक्र साधण्याची संधी मिळाली नसती. असो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 01/14/2018 - 18:41
नवीन
न्यायव्यवस्था अस्वस्थ नसून फक्त ४ न्यायाधीश अस्वस्थ आहेत.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 01/14/2018 - 19:24
नवीन
बाय द वे, जर एखाद्या प्रकरणात एखाद्या न्यायाधीशाला इंटरेस्ट असेल, तर तो पूर्वग्रहदूषित नजरेने ते प्रकरण हाताळण्याची शक्यता किती? आणि मग अश्या न्यायाधीशाकडे हे प्रकरण द्यावे का?
पिडा काकांची एक लेखमालिका आठवली.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 05:22
नवीन
अशा शक्यता कमी करण्यासाठी न्यायाधिशाचंच्या निवडी साठी आणि रिटायरमेंटसाठी विशीष्ट अटी असतात, त्रीस्तरीय न्यायालय पद्धती असते + न्यायिक रिव्ह्यू पिटिशन करता येते,
निकाल देताना तो अमुक पद्धतीने का दिला जातो आहे या बद्दल . आधीच्या केसेसचे निकालाचे आधार आणि कायद्यातील नियम निकाल देताना न्यायाधिशांना नमुद करावे लागतात, कमी न्यायाधीश असलेल्या निकालांची पडताळणी अधिक न्यायाधिश असलेल्या बेंच कडून करून घेता येऊ शकते. दोन्ही बाजूंचे वरीष्ठ वकील न्यायालयांमध्ये परस्पर विरोधी मांडणी करत असतात, न्यायालये अनुभववकीलांची वेळोवेळी मदत घेतात, कॉनफ्लीक्ट ऑफ इंटरेस्ट केसेस मध्ये स्वतःस रिक्यूज करून घेऊ शकतात- घेतात अगदी ४ दिवसा पुर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्वतःस एका केस मध्ये रिक्यूज केले-बाजूला करून घेतले, लॉ जर्नल्स मधून निकालांची अभ्यासकांकडून चिकित्सा आणि टिकाही होत असते.
एवढे करून एखाद्या न्यायाधिशाचे वर्तन अगदीच नियम बाह्य असले तर संसदेला विशीष्ट प्रक्रीया आणि बहुमताने अशा न्यायाधिशास बडतर्फ करता येते.
आताशा मुख्य न्यायाधिशांनी अपवादात्मक वापरलेले अधिकार वगळता बहुतांश केसेसचे अलोकेशन संगणकीय रँडम सलेक्शन पद्धतीने होते. (चुभूदेघे)
भारतीय न्यायव्यवस्थेते पुरेसे क्रॉसचेक्स समतोल उपलब्ध आहेत पण तरीही समस्या असतात नाही असे नाही पण शेवटी व्यवस्था विश्वासावर चालतात हे ही लक्षात घ्यावयास हवे. समस्यांचा बाऊ नव्हे तर अभ्यास निदान आणि उपाय योजना अशा पद्धतशीर मार्गाने जावयास हवे असे वाटते
***
पिडा काकांच्या लेखमालेचा दुवा देणार/?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 01/14/2018 - 23:42
नवीन
अधिवक्ते हरिदास उंबरकर,
नरसिंह राव पंतप्रधान असतांना न्यायव्यवस्थेत कंपूशाही ( = कॉलेजियम सिस्टीम) आणली गेली. ही पद्धती पूर्णत: घटनाबाह्य आहे. ही रद्द करून न्यायाधीशांची नियुक्ती थेट परीक्षेद्वारे निवडले जाऊन उत्तरोत्तर बढती मिळून व्हायला हवीये. ज्याप्रमाणे भारतीय प्रशासनसेवा, पोलीससेवा, परराष्ट्रसेवा इत्यादींसाठी केंद्रीय सेवा परीक्षा आयोगातर्फे परीक्षा घेतल्या जातात त्यात भारतीय न्यायसेवेचा समावेश व्हायला हवा.
मोदी सत्तेवर आल्यावर कंपूबाज न्यायाधीशांची ( = कॉलेजियम जजेसची ) चांगलीच गोची झालीये. म्हणून हे तोतयाचं बंड उद्भवलेलं दिसतंय. चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ या चौघांनी आपली आणि न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी स्वत:हून राजीनामा द्यावा या मताचा मी आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 01/15/2018 - 01:48
नवीन
+1
हा अवॉर्ड वापसीचा पुढचा अंक दिसतोय..
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 05:40
नवीन
गोची म्हणता येणार नाही, आनंदाचे वर्णन "हा अवॉर्ड वापसीचा पुढचा अंक दिसतोय.." हे वर्णन अधिक चपखल असावे. न्यायाधिशांनी टेलिव्हीजन अथवा वृत्तमाध्यमातील वृत्तांनी वाहवून जावयाचे नसते, लोकशाही आणि गरिबांना न्याय या तत्वामुळे वृत्तमाध्यम विषयक तत्व जरासे ढिले झाले असले तरीही न्यायाधीशांनी सजग असणे अभिप्रेत असते. वृत्तमाध्यमातील वृत्ते विशीष्ट हेतूने प्रेरीत केली जाऊ शकतात हे काय वरीष्ठ न्यायाधिशांना सांगावयास हवे का ? स्वतःचा निरक्षीर विवेक असावा तो ढळला कि अशी अवघड परिस्थिती निर्माण होते.
न्या. चेलमेश्वर यांचे एम.एन. रॉय मेमोएरीअल लेक्चरचा मागील व्हिडिओ पुढे आला आहे. व्हिडिओतच टिव्हि बातम्यांचा न्या. महोदयांवर प्रभाव पडत असल्याचे दिसते आहे. एम.एन. रॉय हा सरळ सरळ डावा मंच असणे, एका डाव्या नेत्या सोबत पत्रकार परिषदे नंतर भेट. ते व्हिडिओ-भाषणात बोलत असलेल्या काही गोष्टी दखल घेण्या जोग्या असल्या तरी, असे व्यक्त करणे काही बाबतीत पक्षपाती / पुर्वग्रह दुषित ठरत असावे न्यायपालिकेत वरीष्ठ पदावरील व्यक्तीने असे करणे स्पृहणीय ठरते का या बाबत साशंकता वाटते.
रिटायर्ड जस्टीस सोधी यांनी त्यांच्या लेखातून असेच मत व्यक्त केले आहे असे दिसते. त्यांना राजीनाम्यासाठी कंपेल करावे असे म्हणणार नाही पण सल्ला जस्टीस सोधी प्रमाणेच असेल असे वाटते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 05:45
नवीन
या चौघातील दुसरे वरीष्ठ न्या. गोगोई यांचे वडील काँगेसचे मंत्रि राहीले होते. आता ते मुख्य न्यायाधिश झाल्या नंतर अथवा आता सुद्धा त्यांच्या न्यायदाना बद्दल विरोधी पक्षांनी आणि इतर न्यायाधिशांनी संशय व्यक्त करणे चालू केल्यास ते कुठे पहाणार ? शेवटी कुठेतरी विश्वास ठेवायचा असतो हे ज्येष्ठांनाच समजत नाही म्हणजे कमाल आहे.
- Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर
Mon, 01/15/2018 - 07:55
नवीन
न्यायाधिशांनी टेलिव्हीजन अथवा वृत्तमाध्यमातील वृत्तांनी वाहवून जावयाचे नसते, लोकशाही आणि गरिबांना न्याय या तत्वामुळे वृत्तमाध्यम विषयक तत्व जरासे ढिले झाले असले तरीही न्यायाधीशांनी सजग असणे अभिप्रेत असते. वृत्तमाध्यमातील वृत्ते विशीष्ट हेतूने प्रेरीत केली जाऊ शकतात हे काय वरीष्ठ न्यायाधिशांना सांगावयास हवे का ?
>>संस्था ही व्यक्तीपेक्षा नेहमीच मोठी असते, तिचे कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये याची काळजी घेणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पत्रपरिषद घेण्यापेक्षा हा मुद्दा चर्चेतून सोडवता आला असता.
- Log in or register to post comments
द
दिगोचि
Mon, 01/15/2018 - 03:37
नवीन
आजच्या टाइम्स मधे आलेल्या बातमीवरून हे उघड झाले आहे की सुप्रीम कोर्टाचा कारभार गेली २० वर्षे असाच चालला आहे. म्हणजे विशिष्ट खटले ज्युनियर न्यायाधीशाकडे दिले आहेत. मिश्रानी ही परम्परा पुढे चालवली आहे. गेली वीस वर्षे या बद्दल कोणीही का।ई म्ह्टले नाही मग आत्ताच देश व न्यायव्यवस्थेविषयी या चार जणाना का काळजी वाटावी. याचा अर्थ त्यान्चा कर्ता करवीता कोणीतरी आहे ज्याचे डोळे २०१९ च्या सार्वजनिक निवडणुकिकडे लागले आहेत. माझ्या या प्रतिसादाचा अर्थ मी भक्त आहे असे काही उद्धट म्हणतिल तर मी सान्गु इच्छितो कि मी भारतीय नसल्यामुळे मला मतदनाचा हक्क नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 05:55
नवीन
आपण नमूद केलेल्या बातमीचा दुवा
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून निवडले जातानाच किमान पात्रतेची काळजी घेतलेली असते. सर्वसाधारण पणे केसेस संगणक व्यवस्थेतून रँडमली अलोकेट होतात. एखादा विषय अमूक न्यायाधीश व्यवस्थीत हँडल करू शकेल असे वाटल्यास तसे अलोकेशन करण्याचा विशेषाधिकार मुख्य न्यायाधिशांना असतो तो ते वापरतात. मुख्य न्यायाधिशांना काहीच डिस्क्रीशन नसलेल्या शोभेच्या पदाची खरेच गरज आहे का आणि पद केवळ शोभेचे नसेल तर किमान स्वरुपाचे डिस्क्रीषन आणि किमान स्वरुपाचा विश्वास का असू नये. मुख्य न्यायाधिश चुकले वाटले तर स्वतः मुख्य न्यायाधिश झाल्या नंतर केसेस पुन्हा उघडाव्यात किंवा अती संकंट मय परिस्थिती वाटल्यास राष्ट्रपती उपरास्।ट्रपतींना भेटावे. त्यावरही समाधान झाले नाही तर राजीनामे देऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षां नेत्यांना भेटी देऊन
सर्वोच्च न्यायाधीशां विरुद्ध संसदेत बर्खास्तीसाठी प्रयत्नकराण्याचा मार्ग आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
Sun, 01/21/2018 - 10:59
नवीन
सुप्रीम कोर्टाचा कारभार गेली २० वर्षे असाच चालला आहे. म्हणजे विशिष्ट खटले ज्युनियर न्यायाधीशाकडे दिले आहेत. मिश्रानी ही परम्परा पुढे चालवली आहे. गेली वीस वर्षे या बद्दल
सुप्रीम कोर्टाचा कारभार गेली २० वर्षे असाच चालला आहे. म्हणजे विशिष्ट खटले ज्युनियर न्यायाधीशाकडे दिले आहेत. मिश्रानी ही परम्परा पुढे चालवली आहे. गेली वीस वर्षे या बद्दल कोणीही का।ई म्ह्टले नाही मग आत्ताच देश व न्यायव्यवस्थेविषयी या चार जणाना का काळजी वाटावी. याचा अर्थ त्यान्चा कर्ता करवीता कोणीतरी आहे ज्याचे डोळे २०१९ च्या सार्वजनिक निवडणुकिकडे लागले आहेत. माझ्या या प्रतिसादाचा अर्थ मी भक्त आहे असे काही उद्धट म्हणतिल
छे नाही तुम्ही मोदींचा पाणी उतारा करणारं वाक्यं टाकून दिलं असतं तर इथं किमानपक्षी ५० रसवंती पाठिंबा प्रतिसाद देण्यासाठी रांग लागली असती
शिक्कामोर्तब केले गेलेला नाखु बिनसुपारीवाला
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 05:13
नवीन
चर्चेत न्यायालयीन अवमानना होणार नाही या कडे संपादकांचे लक्ष दिसते आहे. असेच लक्ष असू द्यावे. सदस्यांनी टिका करताना संदर्भ द्यावेत किंवा फारतर साशंकता व्यक्त करावी, विनाआधार आरोपबाजी आवर्जून टाळावी.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 01/15/2018 - 11:32
नवीन
न्यायालयाचा अवमान का करू नये? अवमान करून घ्यायची लायकी असलेल्या न्यायालयाचा अवमान का करू नये?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 12:30
नवीन
रास्त टिका आणि अवमान यात फरक असतो. न्यायालयच काय कुणाचाही अवमान करून काय साध्य होते ?
- Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर
Mon, 01/15/2018 - 05:17
नवीन
स्वत:हून राजीनामा द्यावा या मताचा मी आहे.<<
>>सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत चा मुद्दा होता राजीनामा किंव्हा पत्र परिषद घेण्यापेक्षा यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा मार्ग स्वीकारला जायला हवा होता.न्यायालयातील बेबनाव अशा रीतीने जगासमोर आला तर यात आपलं पर्यायाने संपूर्ण देशाचं नुकासन आहे.
- Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर
Mon, 01/15/2018 - 05:19
नवीन
चर्चेत न्यायालयीन अवमानना होणार नाही या कडे संपादकांचे लक्ष दिसते आहे. असेच लक्ष असू द्यावे. सदस्यांनी टिका करताना संदर्भ द्यावेत किंवा फारतर साशंकता व्यक्त करावी, विनाआधार आरोपबाजी आवर्जून टाळावी.<<
>>>ही नम्रतेची विंनती
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 01/15/2018 - 05:23
नवीन
न्यायालयीन अवमान हा कागदी वाघ आहे.
महाधिवक्ता मुकुल रोहटगी यांनी सरन्यायाधीशाना भर न्यायालयात आव्हान दिले होते कि मी सत्य बोलतो आहे माझ्याविरुद्ध हिम्मत असेल तर न्यायालयाची अवमानना केल्याबद्दल कारवाई करून दाखवा आणि जस्टीस खेहार यांची त्यांना हात लावायची हिम्मत झाली नाही.
आज चार न्यायाधीश पत्रकारांकडे कशासाठी आले तर त्यांच्या वरील अन्यायाची वाचा "जनतेकडे" फोडण्यासाठीच ना? मग जनतेने त्यांच्या गैरकृत्याबद्दल चर्चा केली तर याला जबाबदार जनतेला कसे धरता येईल?
अन्यथा त्यांनी हीच तक्रार राष्ट्रपतींकडे करायला हवी होती किंवा सर्वोकंच न्यायालयाच्या सर्वच्या सर्व (२५) न्यायाधीशाच्या बैठकीत तीसुद्धा बंद दरवाज्याच्या आड. (इन कॅमेरा-- जसा विनयभंगाचा खटला चालविला जातो)
नाना पाटेकर यांच्या सिनेमात होते कि एकदा बाई "नटून थटून" खिडकीत बसली तर खालून जाणारे लोक "शुक शुक" करणारच
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 06:00
नवीन
सरजी इथला माझा रेफरन्स मिपाकरांबद्द्ल आहे कारण एका मिपाकरांची पोस्ट आपण पाहिली नसावी ते जरा जास्तच बरळले . न्यायालयीन अवमान बद्दल न्यायालये सर्वसाधारण पणे कारवाई करत नसली तरी जस्टीस कर्नन चे ही उदाहरण आहे ज्यात पदावरील न्यायाधीशास अवमानने खातर जेल देऊन दाखवली गेली आहे त्यामुळे वाघ अगदीच कागदी नाही हेही लक्षात घेणे सयुक्तीक असावे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 01/15/2018 - 06:06
नवीन
करणन यांची केस साफ वेगळी होती. आपले कोणी काहीही वाकडे करू शकत नाही या गैरसमजुतीतून त्यांनी बेलाशक बेकायदेशीर कृत्ये केली होती.
सावकाश लिहितो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 01/15/2018 - 06:11
नवीन
सत्य बोलणे हा न्यायालयाचा अवमान होऊ शकत नाही
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 06:17
नवीन
अहो डॉक तुम्ही मिपाकर साहनांचे आता उडवला गेलेला प्रतिसाद वाचला होता आणि तरीही साहनांच्या प्रतिसादाच्या केसमध्ये तुमचे मत वेगळे आहे असे म्हणायचे आहे ? साहनांकडे जे लिहिले त्यासाठी काय पुरावे होते असतील तर त्यांनी संसदे पुढे जरुर सादर करावेत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 01/15/2018 - 06:41
नवीन
नाही
त्यांचा प्रतिसाद मी वाचला नाही
- Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर
Mon, 01/15/2018 - 07:35
नवीन
नक्कीच, उचित संदर्भासहित सत्य मांडणे हा अपराध होऊ शकत नाही
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 06:04
नवीन
आता स्त्रीयांना कायद्याने या विषयावर अधिक संरक्षण उपलब्ध झाले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अब्यूज मधील सीमारेषा नीटशी लक्षात घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरण्यास करण्यास हरकत नाही. शुक शुक कसे केव्हा कुठे कुणासोबत करता त्या वर बरेच काही अवलंबून असावे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 01/15/2018 - 06:10
नवीन
नाना पाटेकर यांच्या सिनेमात होते
- Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर
Mon, 01/15/2018 - 07:33
नवीन
हीच तक्रार राष्ट्रपतींकडे करायला हवी होती किंवा सर्वोकंच न्यायालयाच्या सर्वच्या सर्व (२५) न्यायाधीशाच्या बैठकीत तीसुद्धा बंद दरवाज्याच्या आड. (इन कॅमेरा-- जसा विनयभंगाचा खटला चालविला जातो)<<
>> चार न्यायाधीशांना सरन्यायाधीशांविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करता आली असती. घटनात्मक व्यवस्थेचा प्रमुख हा राष्ट्रपती असतो. पण तो केवळ नामधारीच. कारण राष्ट्रपती हा राजकीय नियुक्त असतो आणि सर्वसाधारणपणे तो नेमणूक करणाऱ्याच्या विरोधात जात नाही. विद्यमान राष्ट्रपती यास अपवाद आहेत असे मानता येईल असे कोणतेही लक्षण तूर्त दिसलेले नाही. तेव्हा राष्ट्रपतींकडे सरन्यायाधीशांविरोधात तक्रार करण्याचा मार्ग निरुपयोगीच ठरला असता,
मात्र म्हणून न्यायमूर्तीनी अशाप्रकारची पत्रकार परिषद घ्यावी याला समर्थन देता येत नाही. "न्यायधीशाच्या बैठकीत तीसुद्धा बंद दरवाज्याच्या आड" चर्चा करायला हवी होती हे समर्थनीय आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 07:55
नवीन
एक्झॅक्टली न्यायालयीन संसारात तीनच मार्ग आहेत . एक जो आहे तो संसार चालू ठेवायचा समस्या आपाप्सात मिटवा अथवा चुपचाप सहन करा. दुसरा राजीनामा देऊन संसार त्याग करा, तिसरा मार्ग संसदेच्या अधिन आहे एखाद्या जोडीदाराला बाहेर काढण्याचा पण त्यासाठी सत्ताधारी पक्ष तुमच्या बाजूने पाहीजे.
या विशीष्ट केस मध्ये कसे झाले पहा या न्यायाधीशांच्या आणि पाठोपाठ विरोधी पक्षांच्या जाहीर प्रदर्शनामुळे मुख्य न्यायाधीश सत्ताधार्यांच्या मेहरबानी वर अधिकच अवलंबून झाले म्हणजे आता विरोधी पक्ष विरोधात गेला आहे पण सत्ताधारी पक्षाने अचानक पलटी मारली तर सर्वोच्च पद जाऊ शकते अशावेळी सर्वोच्च न्यायाधीश सत्ताधारी पक्षावर अधिक अवलंबून होतो म्हणून हि स्टेप प्रुडेंट म्हणता येण्यासारखी नव्हती.
आणि सरकार आणि सर्वोच्च न्यायाधीशांनी काहीच रिस्पॉन्स द्यायचा नाही ठरवले तर यांना आणि विरोधी पक्षांना टिकेपलिकडे प्रत्यक्षात अॅक्शन काहीच घेता येत नाही. जनतेला पटले आणि झाला तर विरोधी पक्षाचा पुढच्या निवडणूकीत फायदा होईल पण असे राजकारण तुमचा (त्यांचा) मूळ उद्देश होते का ? असेल तर ठिकच.
लोकशाहीत संविधान लोकांच्या इच्छाशक्तीनेच असते. आणि न्याय व्यवस्थाही लोकांच्या लोकशाहीच्या इच्छा शक्तीवर आणि बहुमतावर अवलंबून असते. सक्रीय लोक नियूक्त बहुमताला किती खेटायचे याची एक मर्यादा पडते हे वास्तव शेवटी कुठेतरी स्विकारावे लागते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 08:16
नवीन
भारतीय राष्ट्रपतीची भूमिका स्वतः आणि इतरांना संयम शिकवण्यासाठी पुरेशी सिद्ध झाली आहे असे वाटते. लगो लग नसेल तरी भविष्यातील त्रिशंकुच्या शक्यता राजकीय पक्षांना नाकारता येत नाहीत त्यामुळे राष्ट्रपतीस अगदीच नजर अंदाज करता येते असेही नसावे. ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती असताना राजीव गांधी कडे सॉलीड बहूमत होते तरीही त्यांनी पोस्टल बील वापस पाठवलेच.
सध्याचे राष्ट्रपतीही आधी दिल्लीत वकील राहीले आहेत त्यांना न्यायिक व्यवस्थेतील काहीच गम्य नाही समजणे उचीत नसावे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 01/15/2018 - 08:42
नवीन
घटनात्मक व्यवस्थेचा प्रमुख हा राष्ट्रपती असतो. पण तो केवळ नामधारीच.
राष्ट्रपती हे घटनात्मक राष्ट्रप्रमुख आहेत आणि ते सरन्यायाधीशांना शपथ हि देतात.
शिवाय विद्यमान राष्ट्रपती राजकारणात येण्याच्या अगोदर १६ वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात वकील होते. तेंव्हा त्यांना कायद्याचे मूलभूत ज्ञान नक्कीच आहे. शिवाय राष्ट्रपतींचे स्वतःचे कायदा खाते असते सल्ला देण्यासाठी. राष्ट्रपती महाधिवक्ता solicitor general आणि attorney general यांच्या कडून अधिकृतपणे सल्ला मागवू शकतात.
याहूनही अधिक म्हणजे या चारही न्यायाधीशांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली असता त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसती तर त्यांच्या पत्रकारांकडे जाण्यास नैतिक पाठबळ नक्की मिळाले असते.
तेंव्हा सद्य परिस्थितीत अंतर्गत भांडणे अशी चव्हाट्यावर मांडण्यापेक्षा राष्ट्रपती हे उत्तम मध्यस्थ होऊ शकले असते. शिवाय राष्ट्रपतींकडे तक्रार करण्याबद्दल त्यांना कोणीही दोष देऊ शकले नसते.
- Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर
Mon, 01/15/2018 - 05:25
नवीन
न्यायव्यवस्था अस्वस्थ नसून फक्त ४ न्यायाधीश अस्वस्थ आहेत.<<
>>'न्यायाधीश' हा न्याय प्रक्रियेतील सर्वोच्च महत्वाचा घटक आहे. त्यामुळे हा घटक अस्वस्थ असेल तर पर्यायाने त्याचा परिणाम न्यायव्यवस्थेववर होईल.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 01/15/2018 - 05:49
नवीन
एवढे अस्वस्थ होते तर आपला राजीनामा त्यांनी राष्ट्रपतींकडे सुपूर्द करायला हवा होता. (त्यांनी तो स्वीकारला नसता अशी शक्यता जवळ जवळ १०० % आहे) पत्रकारांना बोलावून न्यायासनाची प्रतिष्ठा यांनी खाली आणली आहे असे मी स्पष्टपणे नमुद करू इच्छितो.
सरकारी अनास्थेमुळे ( हे मी माझ्या पाणबुडीच्या लेखमालिकेत लिहिले आहे) नौदलाच्या पाणबुडीत स्फोट झाला त्याची जबाबदारी घेऊन नौदल प्रमुखांनी(त्यांची चूक नसताना) राजीनामा दिला होता याची इथे आठवण झाली
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 06:12
नवीन
नेमका काय परिणाम होईल ? अशा पत्रकार परिषदा घेऊन अथवा अन्य मार्गाने संशयवादाचे वादळ उठवत ठेवता येऊ शकेल अथवा स्वतः चुकीचे न्यायदान करतील एवढेच ना ? असे करणार्यांना घरचा रस्ता दाखवायचा की नाही की यांचे खरे मानून दुसर्या एखाद्या न्यायाधीशास डच्च्चू द्यायचा याचे अधिकार संसदे कडे आहेत. एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने/ कारणासाठी केली पुन्हा पुन्हा केली तर लोकांनाही कोण किती पाण्यात आहे हे व्यवस्थीत समजते.
- Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर
Mon, 01/15/2018 - 07:40
नवीन
नेमका काय परिणाम होईल ?<<
>> न्यायाधीश न्यायदानाचे काम करतात. ते अस्वस्थ असतील तर न्यादानच्या प्रक्रियेवर प्रभाव पडणार नाही का?
पत्रकार परिषदा घ्यायला समर्थन नाहीच.
तः चुकीचे न्यायदान करतील एवढेच ना ? <<
>> याला "एव्हडेच" म्हणणे योग्य नाही चुकीचे न्यायदान झाले तर न्याय मिळणार कसा? असे जर झाले तर ही गंभीर बाब ठरेल
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 08:21
नवीन
भारतात चुकीचे न्यायदान लक्षात येते, त्याचा रिव्ह्यू होऊ शकतो आणि हेतु पुरस्सर असेल आणि लोकशाहीस पटले नाही तर अशा न्यायाधिशाची गच्छंती संसदे करवी होऊ शकते. आता लोकशाहीत चुकीचा न्याय बहुमताने मान्य केला तर तुम्हाला शेवटी बहुमत मानावे लागते हे वास्तव स्विकारणे सयुक्तीक असावे. लोकशाही (राजकीय व्यवस्था) शेवटी राजकीय दृष्ट्या सक्रीय बहुसंख्यांवर अवलंबून असते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 01/15/2018 - 05:46
नवीन
मला एक विचारायचे आहे कि या कॉलेजियम पद्धतीला कोणता घटनात्मक आधार आहे?
हा न्यायालयाने स्वतः निर्माण केलेला सवता सुभा आहे.
आणि चार वरिष्ठ न्यायाधीश ज्यांनी हे वरिष्ठ आणि कनिष्ठ भेद भाव चालू केला आहे त्यामध्ये एक गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे. पाचवे न्यायाधीश कुरीयन जोसेफ आणि दहावे न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या "सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकीत" सेवाज्येष्ठतेत केवळ १ वर्षाचे अंतर आहे. उलट अरुण मिश्रा हे उच्च न्यायालयात १९९८ साली नियुक्त झाले आणि कुरियन जोसेफ हे २००० साली म्हणजे "न्यायाधीश" म्हणून अरुण मिश्रा हे खरं तर ज्येष्ठ आहेत. (कुरियन जोसेफ हे ख्रिश्चन आहेत म्हणून त्यांची सर्वोच्च न्यायालयात लवकर नेमणूक झाली आहे असे न्यायालयाच्या व्हरांड्यात बोलले जाते.)
दुसऱ्या क्रमांकाच्या जस्टीस चेल्मेश्वर यांचा वकील आणि न्यायाधीश म्हणून अनुभव ४१ वर्षांचा आहे. तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांचा अनुभव ३९ वर्षांचा आहे. नियम म्हणजे नियम हे मान्य करूनही ३९ वर्षे आणि ४१ वर्षे अनुभव यात इतका जमीन अस्मानाचा फरक नाही एवढेच मी निदर्शनास आणू इच्छितो.
केवळ काही नियमांमुळे एखादा माणूस सेवाजेष्ठ होतो हि नियमावलीची चूक आहे.
एकाच दिवशी नियुक्त झालेल्या दोन न्यायाधीशाच्या ज्याला "शपथ अगोदर दिली जाते" तो ज्येष्ठ ठरतो इतकी भंपक नियमावली आहे हि.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Mon, 01/15/2018 - 06:37
नवीन
एक रोचक ट्रिव्हिआ:
२०१५ का १६ साली सरकारने जज नेमणुकीचं एक बिल आणलं होतं ज्यात अपारदर्शी कॉलेजियम पद्धत बाद ठरवून NJAC नामक बॉडीकडे ते अधिकार दिले होते ज्यात सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश, कायदामंत्री, आणि विरोधीपक्षनेता असे लोक असतील. सर्वोच्च न्यायालयाने हे बिल खोडून काढले. ज्या बेंचने हे बिल खोडलं त्यात चेलामेश्वरपण होते ज्यांनी NJAC च्या समर्थनार्थ मत दिलं होतं. सो चार जजपैकी चेलामेश्वर हे NJACचे समर्थक आणि कॉलेजियमचे विरोधक आहेत.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 06:47
नवीन
दुखरी बाजू आहे !
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 01/15/2018 - 07:02
नवीन
वृत्त माध्यमे 'सुपर सेंसीटीव्ह केस' अशी व्याख्या काही केसेस साठी करत आहेत. त्यांच्यासाठी वृत्तांकन मुल्य टिआरपी असेलही. न्याय देवता आंधळी असते. कोणतीही केस कमी अथवा अधिक सेंसिटिव्ह न्याय देवते समोर असू शकत नाही. मुख्य न्यायाधीशांनी कोणत्या केस प्रकारांना हाताळण्यात कोणता न्यायाधीश अधिक वाकबगार आहे ह्याचा विचार करून केसेस सुपूर्त करावयास हव्यात . केस ची वृत्त माध्यमांनी अथवा स्वतळ्च्या पुर्वग्रहांना वाटणारी सेंसेटिव्हीटी लेव्हल पाहून नव्हे.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/15/2018 - 09:06
नवीन
(अ) देशभरातून सर्वोच्च न्यायालयात निवडलेल्या ३१ न्याधिशांमध्ये काही प्रशासकिय कारणांसाठी (उदा: सरन्यायाधिश व कॉलेजियम बनविण्यासाठीची उतरंड) क्रमांक लावणे समजू शकते. पण...
१. जेथे अगदी सरन्यायाधिशांना "वन अमाँग्स्ट इक्वल्स" असे संबोधले जाते अश्या उतरंडीतील अगदी ३१ व्या न्यायाधिशाला...
(अ) कायद्याचे ज्ञान इतरांपेक्षा कमी आहे
आणि / किंवा
(आ) इतर ३० न्यायाधिशांच्या तुलनेने योग्य निवाडा देता येणार नाही
हे म्हणणे किती योग्य आहे ?!
आणि जर ते योग्य असेल तर अश्या न्यायाधिशाची सर्वोच्च न्यायालयाकरिता निवड कशी योग्य ठरेल ?!
२. सद्या चर्चेत असलेल्या चार न्यायाधिशांच्या तक्रारीचा त्याहूनही जास्त मोठा निहित/गुप्त (इंप्लाईड) आरोप असा होऊ शकतो की, सर्वोच्च न्यायलयाच्या खालच्या क्रमांकाच्या न्यायालयातील न्यायाधिश सक्रियतेने अथवा ज्ञान/अनुभवाच्या कमतरतेमुळे चुकीचे निर्णय देतात/देवू शकतात... हे "वन अमाँग्स्ट इक्वल्स" या विधानाच्या सर्वस्वी विपरित तर आहेच पण तथाकथित ज्युनियर न्यायाधिशांच्या पात्रतेवर आणि नितिमत्तेवर संशय निर्माण करणारे ठरेल.
३. सर्वोच्च न्यायालयाच्या,
(अ) खंडपीठ (२ किंवा ३ सभासद असलेले न्यायाधिशमंडळ),
(आ) संवैधानिक पीठ (पाच किंवा जास्त सभासद असलेले न्यायाधिशमंडळ) किंवा
(इ) सद्याच्या पेचावर निर्णय घेण्यासाठी सर्व ३१ न्यायाधिशांची सभा (फुल बेंच, पूर्णपीठ) बोलवण्याची चर्चा चालू होती, तिच्यातही मतदान करावे लागल्यास प्रत्येक न्यायाधिशाला समान व प्रत्येकी एक मत असते...
हे "वन अमाँग्स्ट इक्वल्स" या तत्वातच बसणारे आहे. तसेही, सरन्यायाधिश आणि ३१ वे न्यायाधिश यांचा अनुभव केवळ २-४ वर्षांच्या फरकाचाच असतो.
४. गेली अनेक वर्षे (सर्वोच्च न्यायालयाच्या वैधानिक पीठाने निर्णय दिल्याप्रमाणे), "कोणती केस कोणत्या पीठाकडे द्यावी याचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी सरन्यायाधिश यांचाच आहे".
वरचे मुद्दे विचारात घेता, सरन्यायाधिशांनी कोणती केस कोणा न्यायाधिशाकडे सुपूर्द केली हे कायदा आणि न्यायदानाच्या दृष्टीने गौण ठरते, नाही का ?
(आ) टाईम्स नाऊने आजच जाहीर केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की गेल्या २० वर्षांतल्या देशाच्या दृष्टीने महत्वाच्या पहिल्या १५ क्रमांकाच्या केसेस त्या त्या वेळेच्या सरन्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तथाकथित ज्युनियर कोर्टानाच दिल्या आहेत.
(इ) वार्ताहार परिषदेनंतर लगेच, विचाराला फार वेळ न घालवता, (अ) डी राजा यांनी जस्टिस चलमेश्वरांना त्यांच्या घरी जाऊन भेटणे आणि (आ) विरोधी पक्षांकडून खोचक शेर दिले जाणे, हे पण बरेच काही उघड करते... कदाचित असा बाका प्रसंग "करण्या"अगोदर त्यावर बराच विचार झाला असावा की काय असा संशय घेण्यास बरीच जागा आहे !
एकंदरीत, "वर वर दिसणार्या घटनेपेक्षा खूप काही जास्त या प्रसंगामागे दडले आहे", हे सांगायला खूप बुद्धीमत्तेची गरज नाही, असे म्हणायला हरकत नाही !
***************************
अजून एक...
आजच्या लोकसत्तामध्ये आलेल्या लेखात चक्क खालील समतोल व तार्कीक असलेले मुद्दे वाचले आणि खुर्चीवरून पडायचा बाकी राहीलो ;) :) ...
सरन्यायाधीशांबद्दल असलेले आक्षेप थेट जाहीर करण्यापूर्वी या चौघांनी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण (फुल बेंच) पीठाकडे (जिथे सर्वच्या सर्व न्यायमूर्ती सदस्य असतात) दाद का मागितली नाही?
देशाचे प्रथम नागरिक असलेल्या आणि त्यांची नियुक्ती करणाऱ्या राष्ट्रपतींकडे का गाऱ्हाणे मांडले नाही?
हा पेचप्रसंग चालू असताना कम्युनिस्ट नेते डी. राजा यांच्याशी न्या. चेलमेश्वरांनी गुफ्तगू करणे योग्य होते का?
हा अंतर्गत मामला असल्याचे न्या. जोसेफ आता म्हणत आहेत. मग पत्रकार परिषद घेतलीच का?
कोणताही पेचप्रसंग नसल्याचे न्या. गोगोई आता म्हणत आहेत. मग एवढे अभूतपूर्व पाऊल उचलण्याचे कारण काय?
लोकसत्तासारखे दैनिक असे म्हणते यातच सर्व काही आले, नाही का ?!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 01/15/2018 - 10:35
नवीन
लोक्सत्ता बंद केल्याचा आता मला पश्चात्ताप होणार की काय?
- Log in or register to post comments
म
महेश हतोळकर
Tue, 01/16/2018 - 08:46
नवीन
अख्ख्या लोकसत्तात यांचेच लेख वाचण्यासारखे वाटतात. जवळपास नेहमीच मुद्देसूद आणि अभिनीवेशविहीन लिहीतात. लेखामध्ये व्यक्त केलेलं मत पटलं नाही तरी लेख वाचावासा वाटतो.
- Log in or register to post comments
झ
झेन
Mon, 01/15/2018 - 17:12
नवीन
मला सिरीयसली एक शंका आहे, माझ्या माहिती प्रमाणे बाकी शासकीय सेवेत आपल्या तक्रारींचे निराकरण करण्याची यंत्रणा असते. असे वरिष्ठांची तक्रार करण्यासाठी डायरेक्ट पत्रकार परिषद म्हणजे कोड ऑफ कंडक्टमधे बसणार नाही. तसे न्यायाधीशांना काही नसते का ? का ते 'मोअर इक्वल' असतात ?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 01/15/2018 - 19:41
नवीन
हे सरकारपक्षाचे कारस्थान आहे अशी मला एक शंका येऊन राहिली..
मोदी शहा तेव्हढे धूर्त नक्कीच आहेत..
पुढे जाऊन या न्यायाधीशांची गत शिकारी खुद्द शिकार हो गया अशी होऊ नये म्हणजे मिळवलं
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 01/15/2018 - 22:00
नवीन
आनन्दा,
माझाही हाच संशय आहे. न्या. रंजन गोगोई हे भावी सरन्यायाधीश मानले जात होते (संदर्भ : भाऊ तोरसेकरांचं वक्तव्य). तरीपण त्यांनी बाकी तिघांना साथीस घेऊन पत्रकार परिषद घेतली. याचा अर्थ त्यांना आपल्याला भविष्यात मिळणाऱ्या पदाविषयी खात्री वाटंत नसावी. म्हणजेच मोदी गोगोईंना डावलून कुण्या कनिष्ठ न्यायाधीशास बढती द्यायच्या विचारांत दिसताहेत. या चौघांच्या तक्रारीचा सूरही असाच काहीसा आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 01/16/2018 - 06:06
नवीन
सर्वोच्च न्यायाधिशपद कुणास द्यावे हा राष्ट्रपती म्हणजे सरकारचा अधिकार आहे, आणि परंपरेने ज्येष्ठ न्यायाधिश म्हणून गोगोंईंची संधी मोठी होती आणि आहे.
एन जे एसी का काय घटना दुरुस्तीतून मोठा हस्तक्षेप करण्याची म्हणजे प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूकीत आपले मत मांडण्याची संधी सरकारला होती (जी घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली) तेवढा हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण ते ठरवून करणे सहज शक्य नसावे.
आणि सर्वोच्च न्यायाधीशपदाची संधी सरकारने अथवा कॉलेजीअम ने नाकारली तरी (एकांतात किंवा सार्वजनिक) काही अश्रू ढाळण्यापलिकडे संधी गेलेल्यांना काही करता येते असे नाही. असो
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 01/16/2018 - 14:56
नवीन
मोदी गोगोईंना डावलून कुण्या कनिष्ठ न्यायाधीशास बढती द्यायच्या विचारांत दिसताहेत
हि शक्यता जवळ जवळ नाहीच
सर न्यायाधीश दीपक मिश्रा ०२ ऑक्टोबर २०१८ या दिवशी निवृत्त होत आहेत. न्या. चलमेश्वर हे त्यापूर्वीच म्हणजे २२ जून २०१८ ला निवृत्त होत आहेत. त्यामुळे न्या मिश्रा यांच्या नंतर न्या. रंजन गोगोई हे ज्येष्ठताक्रमानुसार सरन्यायाधीश होऊ शकतील. त्यांची निवृत्तीची तारीख आहे १७ नोव्हेंबर २०१९. या तारखेपर्यंत न्या. जोसेफ न्या मदन लोकूर आणि न्या अर्जन सिक्रि निवृत्त होतील. त्यामुळे न्या गोगोई यांच्या नंतर न्या शरद बोबडे हे ज्येष्ठताक्रमानुसार सरन्यायाधीश होऊ शकतील आणि ते २३ एप्रिल २०२१ पर्यंत त्या पदावर राहतील.
सहसा सरकार न्यायाधीशांच्या ज्येष्ठताक्रमानुसार होणाऱ्या बढत्यांमध्ये ढवळाढवळ करत नाही जरी घटनेप्रमाणे बढतीच्या हा अधिकार राष्ट्रपतींचा असला तरीही राष्ट्रपतींची संमती हि अनियंत्रित आणि अमर्याद नाही आणि त्या संमतीवर न्यायालयाचे मर्यादित प्रमाणावर नियंत्रण राहू शकते असा सर्वोच्च न्यायालयाच्या एका पूर्णपीठाने राज्यपालांना काढून टाकण्याच्या निर्णयावर दिलेला निकाल आहे
कायदे पंडितांसाठी-- खालील दुव्यात वाचता येईल.
discontinuance of the pleasure resulting in removal, the power under Article 156(1) cannot be exercised in an arbitrary, capricious or unreasonable manner.
As there is no need to assign reasons, any removal as a consequence of withdrawal of the pleasure will be assumed to be valid and will be open to only a limited judicial review. If the aggrieved person is able to demonstrate prima facie that his removal was either arbitrary, malafide, capricious or whimsical, the court will call upon the Union Government to disclose to the court, the material upon which the President had taken the decision to withdraw the pleasure. If the Union Government does not disclose any reason, or if the reasons disclosed are found to be irrelevant, arbitrary, whimsical, or malafide, the court will interfere.
https://indiankanoon.org/doc/1471968/
तेंव्हा सरकार अशा नियुक्तीत ढवळाढवळ करेल अशी शक्यता फार कमी आहे. त्यातून राष्ट्रपती स्वतः सर्वोच्च न्यायालयात वकील होते ते अशा गोष्टीला सहज तयार होणार नाहीत आणि अगदी झाले तरी विरोधी पक्षांच्या हातात एक मोठा मुद्दा मिळेल कि सरकार न्यायालयात ढवळा ढवळ करीत आहे. आणि निवडणुकांच्या तोंडावर इतका मूर्खपणा सरकार नक्कीच करणार नाही.
त्यामुळे न्या रंजन गोगोई हे पत्रकारांच्याकडे जातील याचे कारण त्यांचे पद डळमळीत आहे म्हणून अशी शक्यता अजिबात वाटत नाही
राहिली गोष्ट इतर तीन न्यायाधीशांची. ते मुळात पुढच्या एक वर्षात निवृत्त होणारच आहेत. त्यामुळे त्यांना हात लावणे सरकाराला शक्यही नाही आणि असा मूर्खपणा सरकार नक्कीच करणार नाही.
बाकी अनेक लोकांनी अनेक कारणे दिली आहेत वेगवेगळ्या कारस्थानांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा जालावर फिरत आहेत.
असो.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 01/16/2018 - 05:48
नवीन
नेमके लॉजीक कळले नाही , सरकारी पक्ष स्वतः विरुद्ध कारस्थान का करेल ?
धूर्त शब्दाला विनाकारण नकारात्म्क छटा आहे असे वाटते, राजकीय खेळी चातुर्यात शहा मोदी जोडी विरोधकांपेक्षा कमी वाटत नाही तशी प्रत्येक वेळी मात देऊ शकेलच एवढी अती चतुर अथवा अती धूर्त पण वाटत नाही.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 01/16/2018 - 06:06
नवीन
स्वतःविरुद्ध करस्थान नव्हे, पण जे चार न्यायाधीश एकत्र येत आहेत एव्हढी कुणकुण सरकारला लागली असेलच, त्यानंतर त्यांना उसकवून त्यांच्याकडून पत्रकार परिषद करवून घेणे हे सरकारपक्शाचे काम तर नसेल? ज्या प्रकारे डाव उलटला त्या प्रकारे सरकारपक्ष अगोदरच तयारीत होता असे मला वाटतेय.
बाकी - धूर्त हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला नव्हता. चलाख हा शब्द कसा वाटतो?
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »