💬 प्रतिसाद
(6)
र
रंगीला रतन
गुरुवार, 12/07/2017 - 09:58
नवीन
विचार करायला लावणारा लेख.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 12/07/2017 - 11:07
नवीन
मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना अर्थिक सुधारणा झाल्यात हे विसरुन चालणार नाही.
पंतप्रधानपदावर असताना सगळी सुत्रे सोनिया गांधींनी स्वतःकडे ठेवलीत हे उघड गुपीत आहे आणि मनमोहनसिंग यांनीही काहीच कणखरपणा दाखवला नाही हे खरेच. पण कणखरपणाचा सुवर्ण पदकाशी संबंध नाही.
- Log in or register to post comments
म
महेश हतोळकर
गुरुवार, 12/07/2017 - 11:26
नवीन
म्हणजे जगातली २५% (१/४) धरणे भारतात आहेत? संख्येने का आकाराने (पाणलोट क्षेत्राच्या) क्षमतेने?
http://www.icold-cigb.net/article/GB/world_register/general_synthesis/number-of-dams-by-country-members इथल्या माहितीनुसार ९% च आहेत.
बाकी बरेच काही लिहीता येईल. पण टंकाळा...
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Sun, 12/10/2017 - 08:07
नवीन
आकाराने मोठी.
आणि आता जुन्या मोठ्या धरणांचे आयुष्य संपल्यावर नव्याने धरण बांधण्याच्या नव्या योजना बनतात का ?
नसल्या तर का नाही ?
विचार करण्याजोग्या गोष्टी आहेत
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 12/07/2017 - 15:05
नवीन
विद्यापीठामधे सुवर्णपदके पटकवणारे लोक
तुमच्या मूलभूत समजूतीतच चूक आहे.
पाककृती स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या महिलेला प्रत्येक वेळेस उत्तम स्वयंपाक येईलच असे नव्हे.
तसेच एम बी बी एस, एम एस ला सुवर्णपदक मिळवणारा प्रत्यक्ष शल्यक्रियेत नापास होतो असे अनेकदा पाहिले आहे.
सैद्धांतिक ज्ञानात उत्तम असलेला माणूस ( थिअरी पक्की) प्रात्यक्षिकात (practical) पास होईलच असे नाही.
मागच्या पिढीतील असंख्य गुजराती मारवाडी प्रथितयश उद्योगपती हे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नव्हते.
जाता जाता-- मी पण पुणे विद्यापीठात अव्वल(पहिला) आलो होतो. पण तेंव्हा एम डी( क्षकिरण शास्त्र) ला फक्त ६ विद्यार्थी होते.आरक्षित प्रवरा इ विद्यार्थ्यांमध्ये मी पहिला आलो होतो. पण लिहायला काय जाते युनिव्हर्सिटी टॉपर.
तेंव्हा हे "सुवर्णपदक" वगैरेला काही अर्थ नाही.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 12/08/2017 - 14:46
नवीन
या लेखाशी अगदी पुर्ण संबंध नसला तरी एका गोष्टीचे निरिक्षण मला नोंदवावेसे वाटते.
अनेकदा लोकांना आपल्या शिक्षणाचा अगदी गर्व म्हणावा इतका अभिमान असतो. आपण घेतलेले शिक्षण, शाखाच उत्तम आहे असे वाटल्याने दुसरा काही विचार करण्याची , शिकण्याची त्यांची इच्छा नसावी
एक उदाहरण आजच माझ्या बाबत घडले. मी आय टी कंपनीत काम करतो, माझ्या प्रोजेक्ट मध्ये एक जागा खाली आहे, त्याकरिता HR ने internal profile (म्हणजे कंपनीत आधीच असलेली पण सध्या प्रोजेक्टवर नसल्याने उपलब्ध व्यक्ती) पाठवले. पण माझ्या टीममधील लोकांनी त्या उमेदवाराचा विचार करण्यास नकार दिला कारण नऊ वर्षांचा अनुभव असला तरी ती व्यक्ती मुळात बी कॉम शिकलेली होती व पुढे संगणकाचा कसलासा कोर्स केला होता .. इंजिनिअर किंवा किमानपक्षी MCA तरी असावी असा लोकांचा आग्रह.. खरंतर आय टी मध्ये संगणकाशी/आयटीशी संबंधित नसलेले अनेक इंजिनियर (जसे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) असतात ..मग त्यांच्यात आणि बी कॉम झालेल्या व्यक्तीत खरं तर फरक तो काय...
- Log in or register to post comments