Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

न्याय झाला, पण...!

अ
अँड. हरिदास उंबरकर
Wed, 11/29/2017 - 12:09
💬 144 प्रतिसाद
न्याय झाला, पण..! मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. जणआक्रोशाचा प्रचंड दबाव असल्याने सरकारलाही हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा लागला. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी सबळ पुरवा नसल्याने दोषींना फासावर लटकविण्याची न्यायालयीन लढाई तशी सोपी नव्हती. परंतु, ऍड. उज्वल निकम यांनी परिस्थतीतीजन्य पुराव्याच्या आधारावर मजबूतपणे युक्तिवाद केला. परिणामी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. यामुळे कोपर्डीच्या पीडितेला न्याय मिळाला असं म्हणता येईल. परंतु, हा न्याय अजून अपूर्ण आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावर दोषी अजूनही उच्च न्यायालयात अपील करू शकतात. त्यानंतरही शिक्षा प्रलंबित ठेवण्यासाठी अनेक उपाय दोषींकडे आहेत. त्यामुळे, कोपर्डी घटनेतील आरोपी ज्या दिवशी फासावर लटकविल्या जातील तेंव्हाच पीडितेला पूर्णतः न्याय मिळेल. 'मनुष्यप्राणी' असा शब्द उच्चारून माणूस देखील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्युक्त केल्या जाते. मात्र मनुष्य हा प्राणी विचारशील, समाजशील असल्याने त्याच्याकडून माणूसपण जपले जाण्याची अपेक्षा केल्या गेली आहे. नैतिकता सभ्यता सद्सदविवेकबुद्धी असे सद्गुण जपत माणूस रानटी अवस्थेतून आजच्या संगणकयुगापर्यंत वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते, शिवाय माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा एक नवा टप्पा गाठल्याच्या गप्पाही मारल्या जातात. परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असून त्याच्या स्वभावातील रानटीपणा विकृत होत असल्याचे अवतीभवती सातत्याने घडणाऱ्या घटनांवरून जाणवत राहते. कोपर्डीच्या घटनेत जो अमानुषपणा या नराधमांनी केला तो प्राण्यातील रानटीपणालाही लाजवणारा होता. एखाद्या बलात्काराच्या घटनेचे वर्णन करू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना देऊन एका निष्पाप अल्पवयीन मुलीची नृशंस हत्या केली. नरभक्षक प्राण्याला जसं गोळ्या घालून ठार मारल्या जातं तसेच या माणसातील जनावरांना तात्कळ गोळ्या घालून यमसदनी पाठविल्या जावं, अशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. परंतु आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्व जनावरणांनाही मारण्याची परवनगी देत नसल्याने दोषींच्या विरोधात ट्रायल सुरु झाली. आणि आज अखेर या प्रकरणात न्याय आला. न्यायलायाच्या निकालाने समाजमन निश्चितच सुखावले आहे. कोपर्डी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक केल्या जातेय. दोषींना फासावर लटकविण्याचा निर्णय देऊन न्यायालयाने फक्त पीडितेला न्याय दिला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण महराष्ट्रातील जनतेच्या दुःखावर मलमपट्टी केली आहे. मात्र जखम अजून पूर्ण बरी झालेली नाही. दोषींना फासावर लटकविण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे. शिवाय यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठीच्या उपयांवरही मंथन करावे लागणार आहे. कोपर्डीसारख्या अमानवीय बलत्कारच्या घटनेत 'न्याय झाला' एवढाच शब्द वापरून हा विषय संपणार नाही तर अनेक गंभीर मुद्दे यासोबत जुडलेले आहेत. शिक्षेची सुनावणी आणि अंलबजावणीत लागणाऱ्या मोठ्या कालावधीमुळे शिक्षेविषयी जनमानसातील धाक आणि विश्वासर्हतेचा प्रश्न जसा समोर येतो तसाच महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्नही अजेंड्यावर घ्यावा लागेल. कोपर्डीत एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात जणक्षोभ उसळला होता. कोपर्डीच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी ज्यावेळी करण्यात येत होती. त्याच्या मागे अशी घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केल्या जात होती . आज कोपर्डीच्या प्रकरणात न्याय झाला, न्यायालयाने त्यांचे काम चोख बजावले. थोड्या उशिराने का होईना दोषी फासावर लटकविल्या जातील, आणि पीडितेला पूर्ण न्याय मिळेल. मात्र लोकांची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. कोपर्डी घटनेच्या निकालाने अशा विकृत प्रवृत्तीवर जरब बसेल, असं ठामपणे म्हणता येणार नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशात कायदे बदलले जागरूकता झाली. तरी कोपर्डीची घटना घडली. यानंतरही बलात्काराचे गुन्हे गुन्हे घडतच आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायद्यासोबत मानसिकता ही बदलावी लागणार आहे. समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्री विषयीचा भोगवादी दृष्टिकोन हेचं अशा विकृतींना जन्म देते. बलात्काराच्या विकृत विचारांचा जन्म मेंदूतून होतो, त्यामुळे उपचारही मेंदूवरच करावे लागतील. विकृत आणि मुजोर मानसिकेतला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी कोठारातील कोठार शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र न्यायप्रक्रियेतील विलंब या उद्देशाला काही प्रमाणत हरताळ फसतो.सत्र न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा दिल्यापासून उच्च ते सर्वोच्च न्यायालय आणि नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या प्रवासात दोषीला सवलती तर मिळतात शिवाय शिक्षा अंलबजावणीत उशीर होतो. अर्थात, प्रोसिजर आवश्यक आहेच परंतु या प्रक्रयेलाही काही कालमर्यादा असावी. सत्र न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयात अपील, नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशी सारखी शिक्षा कायम ठेवल्यानंतर तरी अंलबजावणीत विलंब होऊ नये. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणातच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. संपूर्ण गुन्हेगारी मानसिकतेवर जरब बसावा यासाठी हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे किमान हा हेतू सफल होण्यासाठी तरी अशा खटल्यांमध्ये कालमर्यादा ठरवनियात यावी. आज कोपर्डी घटनेतील निकाल लागला आहे. दोषींना फाशीची शिक्षा देऊन न्यायालयाने मुजोर प्रवृत्तीला जरब बसविण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले, यात शंका नाही. परंतु कोपर्डीच्या दोषींना फासावर लटकावयला १२ वर्ष लागणार असतील तर कायदाचा धाक कसा निर्माण होईल. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशभारतील कायदे बदलण्यात आले होते, या धर्तीवर फाशीच्या शिक्षेअमलबजावणी संदर्भात कालमर्यदा निर्धारित करून त्यानुसार कोपर्डीतील आरोपीना फासावर लटकविल्या गेले तर कोपर्डीच्या पीडितेला खरा न्याय मिळेल..!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25950 views

💬 प्रतिसाद (144)
व
विशुमित गुरुवार, 11/30/2017 - 09:22 नवीन
<<<'कायद्यासमोर सर्व सामान' हे आपल्या न्यायव्यवस्थेचे मुलभुत तत्व आहे.>>> ==>> +१
  • Log in or register to post comments
अ
अश्विनी मेमाणे गुरुवार, 11/30/2017 - 09:47 नवीन
प्रतिसाद छान.मनात असाच वाटत होतं कुठेतरी...तुमच्या शब्दात अजून क्लिअर झालं
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/30/2017 - 10:00 नवीन
एखाद्या प्रकरणात 'न्याय' झाला नसेल तर त्याला तपास आणि पुराव्यांची कमतरता कारणीभूत असू शकेल.. जात नक्कीच नाही. काही विशिष्ट प्रकरणातच कसा न्याय होतो व काही विशिष्ट प्रकरणात तपास व पुराव्यांची कमतरता कशी राहते (किंवा जाणूनबुजून ठेवली जाते) हे नक्कीच संशयास्पद आहे. इथे जातीचा नक्कीच संबंध आहे.
  • Log in or register to post comments
स
सिंथेटिक जिनियस गुरुवार, 11/30/2017 - 08:30 नवीन
श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद योग्य आहे.बलात्कार विनयभंग यालाही जात असते हे या निकालाने दाखवून दिले.पिडीत मुलीची आई फक्त मराठा समाजाचे आभार मानते यातच सगळे आले.वास्तवात या प्रकारात आठवले ,प्रकाश आंबेड्कर यांनी आरोपी दलित आहेत म्हणून हयगय करु नका असेच सांगितले होते.पिडीत कुटुंबाला भेटायला आठवले आंबेड्कर जाणार होते पण जातदांडग्यांनी त्यांना भेटू दिले नाही. फार काही लिहीत नाही पण श्रीगुरुजी यांनी समाजमनाचा धांडोळा त्यांच्या प्रतिसादात उत्तमपणे लिहिला आहे ,त्याची पोच म्हणून हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 11/30/2017 - 11:10 नवीन
| सिंथेटिक जिनियस तुम्ही जर पूर्वीचे टफी असाल तर तुमच्या मनातील जळजळीचा अंदाज आला आहे मला. सातारला आल्यावर बोलू.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 11/30/2017 - 09:17 नवीन
अधिवक्ते हरिदास उंबरकर, तुम्ही म्हणता की न्याय झाला. पण मला वाटतं की ही केवळ पहिली पायरी आहे. जेव्हा हे गुन्हेगार फासावर लटकत नाहीत तेव्हाच खरा न्याय मिळेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर गुरुवार, 11/30/2017 - 11:41 नवीन
तुम्ही म्हणता की न्याय झाला. न्याय झाला, पण.. या हेडिंग मधेच लेखाचा आशय आहे.. न्याय झाला अस म्हणता येईल.. पण पूर्णता न्याय बाकी असल्याचाच या लेखाचा विषय आहे..
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 11/30/2017 - 14:06 नवीन
लोकहो, वरील संदेशात चूक आहे. कृपया वाक्य असे वाचणे : जेव्हा हे गुन्हेगार फासावर लटकतील तेव्हाच खरा न्याय मिळेल. चुकीबद्दल क्षमा असावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा गुरुवार, 11/30/2017 - 09:43 नवीन
श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद म्हणजे जातीयवादाचा उत्तम नमुना आहे , एखाद्या समाजाविषयी किती घृणा असावी हे यातून दिसत. गांधी हत्येला गांधी वध म्हणणे म्हणजे पुरता ****पणा आहे. अश्या सर्व समाजातील /धर्मातील जातीयवादी विचारांना ठेचून काढलं पाहिजे. हे ज्या ब्रिगेडी विचारांना उठ सुठ नावे ठेवतात त्यांच्या विचारसरणीतील च ह्यांचे विचार आहेत. जर काही घटनांवरून पूर्ण समाजाला दोषी ठरवत असाल तर अश्याच दोन तीन घटनांवरून आर एस एस हि सर्वात मोठी जातीयवादी संघटना आहे असे तुम्ही मानायला हवे. नितीन आगे यांना न्याय न मिळने हि अत्यंत तिडीक आणणारी गोष्ट आहे, सरकार ने फास्ट ट्रॅक न्यायालय आणि विशेष पोलीस पथक स्थापन करून दोषींना फाशी होईपर्यंत पाठपुरवठा केला पाहिजे, जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत पाठपुरवठा सोडता कामा नये. जर कोणताही मराठा नेता किंवा संघटना दोषींना प्रत्यक्ष किंवा अप्रतक्षय पाठिंबा देत असतील त्यांना सुद्धा ठोकून काढलं पाहिजे. ऍट्रासिटी कायदा अजून काही वर्षे पातळ होता कामा नये. प्रत्येक समाजातील जातीयवादी लोक विषारी विचार पसरवत असतात त्यांना वेळीच रोखून कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे, आजकाल भारतात शक्तिशाली, गुंड आणि श्रीमंत लोकांना गुन्हे माफ आहेत असे भासतेय. शब्दबंबाळ आणि विशुमित यांच्या प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/30/2017 - 10:04 नवीन
श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद म्हणजे जातीयवादाचा उत्तम नमुना आहे , एखाद्या समाजाविषयी किती घृणा असावी हे यातून दिसत. माझे सर्व प्रतिसाद परत नीट वाचा. काही प्रकरणात तपाससंस्था जातीवर आधारीत तपास करतात असे मी लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 11/30/2017 - 12:04 नवीन
प्रतिसादाशी प्रचंड सहमत ... दबाव टाकणारे आणि काड्या टाकणारे सगळे ठोकले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 11/30/2017 - 12:42 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 11/30/2017 - 14:08 नवीन
प्रत्येक समाजातील जातीयवादी लोक विषारी विचार पसरवत असतात त्यांना वेळीच रोखून कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे, आजकाल भारतात शक्तिशाली, गुंड आणि श्रीमंत लोकांना गुन्हे माफ आहेत असे भासतेय.
१०० टक्के सहमत. न्याय होणे महत्वाचे तितकेच न्याय झाल्याचे दिसणे देखिल महत्वाचे असते.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 11/30/2017 - 09:56 नवीन
कोपर्डी प्रकरणात न्याय झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी अ‍ॅड निकम यांचे जाहीर कौतूक केले आहे. मग नितीन आगे प्रकरणात सदर तपास अधिकारी, सरकारी वकील यांची जाहीरपणे निंदा केल्याचे वाचनात नाही...या प्रकरणाचा फेरतपास वगैरेच्या पण काही घोषणा ऐकण्यात आल्या नाहीत. एकंदरीत हे प्रकरण असेच बाजूला पडणार आणि न्याय होणार नाही असेच दिसतेय. इथेही अनेकजण 'साक्षिदार फिरलेत, त्याला काय करणार ?' असाच सूर लावत आहेत. बहूधा 'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला' असेच काहीसे अनेकांच्या मनात तर नाही ना अशीच शंका येते. अजूनही वेळ गेलेली नाही. या प्रकरणाचा फेरतपास व्हावा आणि गुन्हेगारांना कडक शासन व्हावे त्याचबरोबर तपासात दिरंगाई, ढिसाळपणा करणार्‍या पोलिसांवर , साक्षीदारांवर दबाव आणणार्‍यांवर, खटला जाणूनबुजून ढिसाळपणे मांडला असल्यास सदर सरकारी वकीलावर आणि जर न्यायालयाने काही पक्षपातीपणा केला असे दिसले तर त्या न्यायाधिशांवरही कारवाई व्हावी आणि न्यायापुढे सगळे समानच आहेत याचा प्रत्यय समाजाला यावा इतकी अपेक्षा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/30/2017 - 10:07 नवीन
इथेही अनेकजण 'साक्षिदार फिरलेत, त्याला काय करणार ?' असाच सूर लावत आहेत. बहूधा 'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला' असेच काहीसे अनेकांच्या मनात तर नाही ना अशीच शंका येते. + १
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 11/30/2017 - 10:25 नवीन
<<<'साक्षिदार फिरलेत, त्याला काय करणार ?' असाच सूर लावत आहेत.>>> ==>> असा सूर लावलेला नाही उलट साक्षीदारांना संरक्षण दिले पाहिजे हि मागणी आहे. <<<बहूधा 'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला' असेच काहीसे अनेकांच्या मनात तर नाही ना अशीच शंका येते.>>> ==>> सरसकटीकरण करून अशी काडी लावू वृत्तीलाच तर विरोध आहे. <<<अजूनही वेळ गेलेली नाही. या प्रकरणाचा फेरतपास व्हावा आणि गुन्हेगारांना कडक शासन व्हावे त्याचबरोबर तपासात दिरंगाई, ढिसाळपणा करणार्‍या पोलिसांवर , साक्षीदारांवर दबाव आणणार्‍यांवर, खटला जाणूनबुजून ढिसाळपणे मांडला असल्यास सदर सरकारी वकीलावर आणि जर न्यायालयाने काही पक्षपातीपणा केला असे दिसले तर त्या न्यायाधिशांवरही कारवाई व्हावी आणि न्यायापुढे सगळे समानच आहेत याचा प्रत्यय समाजाला यावा इतकी अपेक्षा.>>> ==>> हे काम कोणाचे आहे? सरकारचे आहे की नाही? याचा पाठपुरावा करायला सकल जनतेने एकत्र यायला पाहिजे असे कुठे तुम्ही म्हणताना दिसत नाही. आणि मला पडलेला एक प्रश्न अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी, दबाव टाकणारे, सरकारी वकील, न्यायाधीश एकाच जातीचे निघावेत याची वारंवारता किती असावी? उगाच मऊ लागले म्हणून कोपऱ्याने खणायचे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 11/30/2017 - 10:58 नवीन
सरसकटीकरण करून अशी काडी लावू वृत्तीलाच तर विरोध आहे.
मला कठेही एका समाजावर आरोप करायचे नाहीत. पण दुर्दैवाने दलित समाजाच्या बाबतीत न्याय होताना दिसत नाहीये याची खंत वाटते.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 11/30/2017 - 11:56 नवीन
<<<पण दुर्दैवाने दलित समाजाच्या बाबतीत न्याय होताना दिसत नाहीये याची खंत वाटते.>>> ==>> फक्त दलितांबाबतच नाहीतर कोणत्याही समाज घटकांच्या बाबतीत अशा घटना रोखल्या जाव्यात म्हणून आणखी ठोस आणि चांगली उपायोजना काय करता येईल, ह्या साठी सुज्ञ नागरिक म्हणून आपण एकत्र येऊ यात. यावर विचार मंथन होयला हवे.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Sat, 12/02/2017 - 10:16 नवीन
फक्त दलितांबाबतच नाहीतर कोणत्याही समाज घटकांच्या बाबतीत अशा घटना रोखल्या जाव्यात म्हणून आणखी ठोस आणि चांगली उपायोजना काय करता येईल, ह्या साठी सुज्ञ नागरिक म्हणून आपण एकत्र येऊ यात. यावर विचार मंथन होयला हवे.
+1
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 12/04/2017 - 08:41 नवीन
हीच सदिच्छा भावना सर्वदा रहावी नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 12/04/2017 - 19:10 नवीन
खिक्क.. नक्की एक काय ती भूमिका ठरवा की.. स्वतःला सुज्ञ वगैरे पदव्या (स्वतःच) बहाल करून घेताय आणि याच धाग्यात दुसरीकडे हुकुमशाहीची भाषा वापरून धमक्या पण देताय. रोज छापा काटा करून प्रतिसाद लिहीत असाल तर तसे सांगा, तुमचे बुरखे टरकवण्यात वेळ घालवणार नाही. दांभीकपणाचे धरण भरले नाही का अजून..?
  • Log in or register to post comments
M
mayu4u Tue, 12/05/2017 - 07:10 नवीन
ब्राह्मणांना विरोध, कारण ब्राह्मण जातीयवादी. अन्य साऱ्या जाती मिळून मिसळून एकोप्याने राहतात. हे ब्राह्मणच काड्या घालायला येतात. त्यांना ठेचायलाच हवं! (स्वगत: ब्रिगेडचं कन्टेन्ट डेव्हलपमेंट चं काम मिळतं का बघायला हवं!)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 12/05/2017 - 08:17 नवीन
सगळे नाही तर स्वतःला सगळ्यापेक्षा बाय डिफॉल्ट हुशार समजणारे जातीवादी लोकांचा विरोध आहे. बाकी डबल सीट बसून लोकांना ब्रिगेडचे शिक्के मारत फिरण्यापेक्षा काहीतरी पोटापाण्याचे बघा. शिक्षणाचा अधिकार मिळाल्यापासून लोक झपाट्याने पुढे निघून चालले आहेत. आहात कुठे तुम्ही ???
  • Log in or register to post comments
M
mayu4u Tue, 12/05/2017 - 10:10 नवीन
त्याची तुम्हाला चिंता नको. आम्ही व्यवस्थित कमावतो, आणि घेतलेली कर्जं फेडतो सुद्धा. कर्जमाफी हवी म्हणून सम्पाची नाटकं करत नाही. :D
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 12/05/2017 - 08:09 नवीन
खाऱ्या पाण्याच्या धरणाची राहून राहून आठवण येतीय वाटते. मिटक्या मारत डुबक्या मारत बसा.. तुम्ही काय बुरखे फडताय, तुमच्या सायकलींची चेन कधीच पडली आहे. ती आधी बसवा मग पायडल मारा.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 12/05/2017 - 10:08 नवीन
खिक्क.. बिग्रेडी बुरखा फाटला उघडा पडला म्हणून त्रास झाला काय..? मूळ मुद्दा काय आहे ते बघा.. सूज्ञ बिज्ञ असल्याचा आव आणून चर्चा करताना आपण याच धाग्यात स्वतः हिटलरच्या थाटात न्यायनिवाडा करून शिक्षा सुनावली आहे तो दांभीकपणा बघा मग सायकल आणि चेनची काळजी करा.
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 11/30/2017 - 11:47 नवीन
इथेही अनेकजण 'साक्षिदार फिरलेत, त्याला काय करणार ?' असाच सूर लावत आहेत. >> कोणत्या अनेक प्रतिसादात दिसला हा सुर?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 11/30/2017 - 12:12 नवीन
नितीन आगे प्रकरणात न्याय मिळाला पाहिजेच, पण साक्ष फिरवणे कसे रोखणार? अनेक प्रकरणात साक्षीदार कधी धाकाने तर कधी पैशाने साक्ष बदलतात
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 11/30/2017 - 12:41 नवीन
हे 'अनेक' प्रतिसाद आहेत का? आणि त्याच्या पुढेच लिहिलेय ना कि "यातून मार्ग निघाला पाहिजे"... मी आणि विशुमितनी पण तेच लिहिलंय. हा प्रॉब्लेम असणार आहे. त्यावर काहीतरी उपाय किंवा workaround शोधायला हवा.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 11/30/2017 - 13:30 नवीन
उगाच वाद घालण्यात मला रस नाही.. मुद्दा हा आहे की नितीन आगे प्रकरणात ढिसाळपणा झाला आहे, राज्य सरकारने उज्वल निकम सारखे ज्येष्ठ वकील इथे लावले नाहीत. आणि आता जो अन्याय झाला त्याबद्दलही मुख्यमंत्री वा अन्य कुणी नेते एक चकार शब्द बोलले नाहीत की त्यांना काही खंत वाटली नाही (निदान माझ्या वाचनात तरी आले नाही) हे महाराष्ट्राचे आणि जातीभेदविरहीत समाजाची स्वप्न बघणार्‍या सर्वांचेच दुर्देव. असो. यापुढे नवीन मुद्दा असल्याखेरीज चर्चा रेटण्यात मला रस नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
B
babu b गुरुवार, 11/30/2017 - 16:29 नवीन
ॲट्रोसिटी ॲक्ट व रिजर्वेशन यांची अपरिहार्यता लक्षात येते.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 11/30/2017 - 20:31 नवीन
महान आहात आपण! जातीचा विषय निघाला कि विचारांचे ध्रुवीकरण एका दिशेला किती लगेच होते हेच दिसून येतंय यातून! ते पूर्ण वाक्य देतो पुन्हा इथे.. तोडून जे सोयीस्कर घेतलंय आपण...
नितीन आगे प्रकरणात न्याय मिळाला पाहिजेच, पण साक्ष फिरवणे कसे रोखणार? अनेक प्रकरणात साक्षीदार कधी धाकाने तर कधी पैशाने साक्ष बदलतात. यातून मार्ग निघाला पाहिजे, आरोपीना जातीचे अधिष्ठान मिळवून द्यायचा हा जो प्रकार तुम्ही करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी आहे.
हा प्रतिसाद लिहिणार्याची जात कुठली आहे हा विचार न करता वाचला तर यातून कोण हा महान शोध लावू शकेल कि..
'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला'
म्हणजे विचारांचा कल बघा तुमचा कुठे चाललाय, अवघड आहे राव! आणि परत म्हणताय "मला वाद नकोय?" साक्षीदाराने साक्ष फिरवणे हि गोष्ट फार काळापासून डोकेदुखी ठरलेली आहे, पोलिसांना दिलेले स्टेटमेंट ग्राह्य होत नाही आणि मग अचानक न्यायालयात साक्षीदार साक्ष फिरवतो आणि सगळ्या प्रकारावर पाणी फिरते... मी हेच लिहिले होते कि कधी साक्षीदार पैश्याच्या आमिषाने, कधी धाकाने तर कधी न्यायालयाबाहेरच्या तडजोडीने साक्ष बदलतात! न्याय व्यवस्था हे कसे रोखू शकेल यातून मार्ग काढावाच लागेल कारण तुम्हा-आम्हाला काय वाटत यावर प्रकरणाचे निकाल लागत नाहीत ते अशा पुराव्यांवरून आणि साक्षींवरूनच लागतात... यातही तुम्हाला तुमच्या मनासारखे काही दिसले नसेल तर अजून एखादे वाक्य लिहूच शकता! मी मागे एकदा सज्ञान मुलाने किंवा मुलीने त्यांचा जोडीदार (कसला ही असला तरी) निवडला तर त्यात बाकीच्यांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही हे एका धाग्यावर लिहिले होते तर "इथलेच" संस्कृतीरक्षक धावून आले होते. मला मुलं-मुलींची "जात" किंवा "धर्म" कोणता असावा याबाबत आपत्ती नाही. पण इथे आता मराठा समाजावर तोंडसुख घेणारे पलीकडे धाग्यावर मुस्लिम तरुणांसोबत लग्न करू नका हा संदेश देत फिरत आहेत! असला दुतोंडीपणा इथलेच काही निर्लज्ज आयडी करू शकतात आणि तरी पण ते सन्माननीय वगैरे असतात...
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 12/01/2017 - 04:58 नवीन
यांच्या लेखी स्त्रिया मूर्ख, यांच्या लेखी मुस्लिम ख्रिश्चन देशद्रोही, यांच्या लेखी मराठा जातीयवादी, यांच्या लेखी बहुजन हे मेरिट नसलेले व सरकारी जावई, अजून खूप लिस्ट आहे... आणि हो, ज्ञानवंत विचारवंत बुद्धिवंत प्रातःस्मरणीय हेच, ... सकाळी उठून आरश्यात बघून स्वतः चीच आरती उतरवून, आरशाला टिळा लावणारे हेच... सकाळी उठून एक पळीभर गोमूत्र सेवन करून, पूर्व दिशेस आपले मुख करून, लॅपटॉपवर धर्माचे रक्षण करणारे हीच ती पिलावळ....
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 12/01/2017 - 09:15 नवीन
प.ग?, पण हे जे कोणी आहेत ते आरशाला टिळा लावतात ते तुम्हाला कसं कळलं? त्यांच्या आरशात तुम्ही डोकावून पाहायला गेलात आणि दिसायला नको ते दिसलं. बरोबर ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 12/01/2017 - 10:13 नवीन
मला कुणाशी व्यक्तिगत वाद करण्यात काडीचा रस नाही. तसेच कोणत्याही जाती धर्माबद्दल मला कोणताही आकस नाही. माझे काही अगदी जवळचे मित्र जातीने मराठा आहेत. खरं तर मी जात -धर्म काही मानतही नाही. आंतरजातीय / आंतरधर्मीय लग्नाबद्दलही माझा काहीच आक्षेप नाही... हिंदू काय मुस्लिम काय कुणीही कुणाशीही लग्न करावे आनंदात रहावे. पण त्याचवेळी तथाकथित उच्च जातीतले लोक आपल्या घरातील मुलीशी कनिष्ठ समजल्या जाणार्‍या जातीतल्या मुलाने प्रेम केले तर त्याचा जीव घेतात याने तीव्र संताप होतो. आणि काही लोकांचे याला (मला इथे कोणताही मिपाकर अभिप्रेत नाही... पण तुम्ही समाजात लोकांशी बोललात तर तुम्हाला हे नक्कीच आढळेल) उघड वा छुपे समर्थनही दिसून येते हे दुर्देव. 'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला' हा अर्थ मी तुमच्या प्रतिसादातून काढलेला नाही. पण ही भावना समाजात तुम्हाला बर्‍याच प्रमाणात आढळेल ...काही जण अशी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त करतील तर काही जण थोडं सौम्यपणे म्हणतील "पण त्या मुलाचंही चुकलंच.. आता गावात रहातो तर जात पात कळत नाही का त्याला.. प्रेम करताना थोडा विचार करायला हवा ना" . ..(कृपया मला विदा मागू नका.. .. त्या ऐवजी लोकांशी बोला.) एक उदाहरण सांगतो.. माझ्या मित्राचं... तो जातीने कुंभार आणि त्याचा प्रेमविवाह झालेला. एकदा बोलताना तो मला सांगत होता की त्याच्या धाकट्या भावाचे एका मुलीवर प्रेम होते आणि त्याला ते कळाले तसे त्याने भावाला आणि त्या मुलीला बोलावून समजावले आणि संबंध तोडायला लावले...मी त्याला सहज विचारले "तू प्रेमविवाह केला आणि भावाच्या प्रेमात मात्र मोडता घातलास रे.." त्यावर तो म्हणाला "अरे तसं नाही.. ती मुलगी मराठा होती. त्यामुळे ते प्रेम सफल झाले नसतेच ..पण उगाच सगळ्या घरादारावर नस्ती आफत ओढावली असती" .. ही भिती कुठून आली ? वर सांगितल्याप्रमाणे इथे मी कुणा मिपाकराबद्दल बोलत नसून समाजात जे पाहत आहे त्याबद्दल बोलत आहे. कोणता मिपा सदस्य काय विचार करतो, कोणत्या जातीचा आहे , जातीयवादी आहे की नाही वगैरे जाणून घेण्यात मला रस नाही. तरी तुमच्या प्रतिसादाचा संदर्भ घेतला गेल्याने जो गैरसमज झाला त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 12/01/2017 - 10:50 नवीन
प्रतिसादाशी सहमत... म्हणूनच धर्म व जातीच्या नावाखाली चाललेली दलाली नष्ट व्हावी... किंवा लोकांनी धर्म व जातीच्या अफूबाजीतून जागे व्हावे...
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 12/01/2017 - 11:07 नवीन
आमेन!
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 12/01/2017 - 10:55 नवीन
सबंध प्रतिसादाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/30/2017 - 10:19 नवीन

Two tales of two very different murder trials, a Dalit and a Maratha

- Can caste make a difference in the manner in which rape and murder trials are perceived and conducted? Ahmednagar district in Maharashtra has one answer
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 11/30/2017 - 10:30 नवीन
दोन समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल एवढेच हे वृत्तपत्रीय बातमी आणि तुम्ही करत आहात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/30/2017 - 10:45 नवीन
एकाच प्रकारच्या दोन घटनांचे वेगवेगळे निकाल लागल्याने अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 11/30/2017 - 10:56 नवीन
एकाच प्रकारचे कसे काय ? गृहमंत्र्यांचे अपयश आहे हे. दोन्ही प्रकरणे सामान पातळीवरती त्यांनी का हाताळली नाहीत? त्यांच्यावर कोणत्या जातभाईंचा दबाव होता? हे स्पष्ट केले पाहिजे सरकारी प्रवक्त्यांनी. (सरकारी प्रवक्ता तुम्हाला उद्देशून नाही म्हणत मी, गैरसमज नसावा) तुम्ही फक्त दोन्ही प्रकरणाला जातीय रंग देत आहात अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/30/2017 - 11:15 नवीन
दोन्ही प्रकरणातील गुन्हे बरेचसे एकसारखे असले तरी त्यात संपूर्णपणे परस्परविरोधी गोष्टी असल्याने (निकाल, आरोपी व गुन्ह्याचे बळी) जातीय रंग दिसणे स्वाभाविकच आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 11/30/2017 - 12:00 नवीन
तेच तर म्हणतोय मी तुम्हाला फक्त जातीय रंगच दिसत आहे. बाकी काहीच दिसेना.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/30/2017 - 16:08 नवीन
दुर्दैवाने या सर्व घटना तेच (म्हणजे जातीयवाद) सूचित करीत आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर गुरुवार, 11/30/2017 - 15:03 नवीन
न्यायालयाच्या निकलांना जाती-पातीचा रंग देवून वाद विवाद घालणे खरच संयुक्तिक आहे का? आपला वैयक्तिक मुद्दा पटवून देण्यासाठी आपण न्याय व्यवस्थेला च कटघर्यात् उभ करण्याचा प्रमाद करत आहोत, किमान याच तरी भान ठेवायला नको का? काही प्रकरणात न्यायलयाने न्याय दिला नसल्याची भावना काहिनी याठिकानि मांडली.. भेद झाला असल्याचा गंभीर आरोप ही करण्यात आला.. पण न्याय व्यवस्थेत भेदाभेद असता किंव्हा जाती किंव्हा पैशावर न्याय झाला असता तर.. मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तिना न्यायल्यात हजर राहवे लागले नसते.. एका साध्या पत्रावरुन रामरहिम सारखा बाबा जेरबंद झाला नसता.. न्याय जर धर्मा समोर झुकला असता तर आसाराम तुरुंगात खितपत पडला नसता. अशी एक नाही लाखो.. होय मी 'लाखो' च म्हणतोय उदाहरणे आहेत... आणि म्हणुन आजही न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास कायम आहे. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी बांधली असल्याने न्यायदेवता आंधळी असते..असे म्हटले जाते. परंतु हे अंधत्व दिसत नसल्यामुळे नसते, तर कर्तव्यनिष्ठेतेसाठी त्याचा अंगीकार केलेला असतो. जेव्हा कोर्टात न्याय मागण्यासाठी एखादा खटला उभा राहतो तेव्हा न्यायदेवतेने उघड्या डोळ्यांनी पाहताना आपला परका असा भेद न करता निपक्षपातीपणे नैसर्गिक न्याय द्यावा.. न्याय देत असताना न्यायदेवतेने कर्तव्यकठोर असावे. याच भावनेतून न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधली जात असावी!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/30/2017 - 16:11 नवीन
न्यायव्यवस्थेपेक्षा तपासयंत्रणा पक्षपाती तपास करतात असे या घटनांवरून दिसते आहे. शेवटी न्यायाधीशांना समोर ठेवलेल्या पुराव्यांवर आधारीतच निर्णय द्यावा लागतो. समोर ठेवलेले पुरावेच संशयास्पद असतील तर निकाल त्यानुसारच लागणार.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 11/30/2017 - 17:09 नवीन
न्यायव्यवस्थेपेक्षा तपासयंत्रणा पक्षपाती तपास करतात असे या घटनांवरून दिसते आहे. शेवटी न्यायाधीशांना समोर ठेवलेल्या पुराव्यांवर आधारीतच निर्णय द्यावा लागतो. समोर ठेवलेले पुरावेच संशयास्पद असतील तर निकाल त्यानुसारच लागणार.
जस्टीस लोया यांचा संशयास्पद मृत्यू, व त्यानंतर च्या न्यायमूर्तींनी दिलेला निकाल, हे याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/30/2017 - 18:19 नवीन
जस्टीस लोया यांचा मृत्यू अजिबात संशयास्पद नाही हे त्यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या सहका-यांनी स्पष्ट केले आहे.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 11/30/2017 - 19:01 नवीन
जस्टीस लोया यांचा मृत्यू अजिबात संशयास्पद नाही हे त्यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या सहका-यांनी स्पष्ट केले आहे.
संदर्भ द्या.. उलट पत्नी व मुलाला धाक दाखवून मुस्कटदाबी केलीये, त्यांच्या सख्या डॉ बहिणीवर पण दबाव टाकण्यात येतोय, तरीही त्या खंबीरपणे उभ्या आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा