पुन्हा पुन्हा बलात्कार
लोणावळ्याची घटना सगळ्यांनी वाचली असेल, बातम्यांमध्ये पाहीली असेलच.
आता अशा घटना घडल्या कि आपण चुकचुकतो,थोडफार मत देतो,राग व्यक्त करतो आणि विसरून जातो.
मात्र आपल्या अगदी जवळ घडली कि भांबावून जातो किंवा हादरून जातो.
त्या दोन मुली, ही आणि एक ६ महिन्याची. मुलगी लहान असल्याने आई लग्नाला गेली नाही ७ वर्षाच्या मुलीला वडिलांबरोबर पाठवले. त्या मुलीला डोळ्याने नीट दिसत नाही. एक ऑपरेशन झाले पण विशेष फरक नाही. खर तर आई मुलीला पाठवायला तयार नव्हती. पण मुलीच्या हौसेसाठी वडील घेऊन गेले. तिच्या नशिबी हे भोग होते.
आज ४ दिवस झाले त्या माउलीने जेवण घेतले नाही. शुद्धिवर नसल्यामुळे दवाखान्यात अडमिट आहे. छोट्या बाळाला जवळ घेतले नाही ४ दिवसात.
सर्वात चीड आणणारी गोष्ट म्हणजे पोलिस आणि हॉटेल व्यवस्थापनाचा लबाडपणा. एका चिमुकलीवर ४ जण बलात्कार करतात, जीवे मारतात आणि ह्यांना आपल्या हॉटेलचे नाव सांभाळायचे आहे.
देवा! काय हे प्रसंग कोसळताहेत एकामागून एक.
आपण काहीच करू शकत नाही का?
(संपादित)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?