Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आम्हाला फक्त विकास हवाय... !

आ
आशु जोग
Wed, 02/18/2015 - 10:44
💬 86 प्रतिसाद
महाराष्ट्रामधे काही पत्रकारांचे लिखाण गंभीरपणे वाचले जाते. काही जणांच्या लिखाणात नवी माहिती मिळते तर काहींच्या लिखाणात नवा विचार मिळतो. अशाच एका जाणकार पत्रकाराचा एक लेख वाचनात आला. त्यातल्या दोन वाक्यांनी काळजाला हात घातला. मोदींच्या बाबतीत बोलताना ते म्हणतात एक म्हणजे हे मत आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला आहे असे त्यांनी मानले. दुसरे वाक्य याचे कारण देशात बहुसंख्येने वाढलेल्या तरुण मतदारांना हिंदुत्व, निधर्मीवाद या थोतांडी वादांमध्ये काडीचाही रस नाही. त्यातही प्रचंड संख्येने शहरात साचलेला हा नवा मतदार वृत्तीने मनापासून धर्मनिरपेक्ष आहे. ती धर्मनिरपेक्षता तो जगतो आहे. आपला सहकारी, जेवणाचा डबा पुरवणारा वगैरे कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे हे पाहण्याची गरजही त्याला वाटत नाही अनेक पत्रकारांचे हे प्रातिनिधिक मत असू शकते त्यामुळे यावर गांभीर्याने विचार झाला पाहीजे आणि म्हणूनच पुन्हा एकदा मनात विचार आला की खरोखर तरुण मतदारांनी मोदींना मत का दिले. विकास की राजनिती चालत असेल तर मग राज ठाकरेंची विकासाची ब्लू प्रिंट आणि उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत दाखवतात तो टॅब का चालला नाही. धर्म वजा करून केलेला विकास आमच्या देशात स्वीकारला जातो का ! १६ मेपूर्वीचे वातावरण काय होते आठवून पहा. देशात २६/११ सारखे हल्ले होत होते. १३/०२ सारखे पुण्यात स्फोट होत होते. या हल्ल्यांमागे धर्माचे तत्त्वज्ञान होतेच. शिक्षणासाठी धर्माच्या आधारावर स्कॉलरशिप, लोनची सुविधा. याच्या जाहीराती टिव्हीवर झळकत होत्या. या देशातल्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क .... त्या वेळच्या पंतप्रधानांचे हे वाक्य जनता विसरली नव्हती. बाँबस्फोट झाल्यावर सत्ताधारी नेते अथवा त्यांचे सहकारी दहशतवाद्याच्या घरी जावून त्याच्या माता पित्याचे सांत्वन करीत. काही मदतही जाहीर करीत. जनतेच्या मनात त्यामुळे असुरक्षितता होती. या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. ही गोष्ट जनता विसरली नव्हती. कुठलाही विकास हा एका बाँबस्फोटाने ठप्प होतो. जम्मू-काश्मीरमधील हिंदूंना देखील आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले. तेव्हाचे सरकारही त्यांना वाचवू शकले नाही. हे जनता पाहत होती. आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे. महाराष्ट्रात अगदी कुठल्याही शहरात रेल्वे स्टेशनवर उतरा. रीक्षावाल्यांची फौज आपल्यावर चाल करून येते. त्यांचा हुलिया पाहून आपण भारतात आहोत की पाकिस्तानात असा प्रश्न पडतो. रेल्वे स्टेशन्स, एस टी स्टँड् तसेच निरनिराळ्या पुलाच्या कडेला आणि पुलाखाली उभ्या राहीलेल्या अभारतीय वास्तू पहा. त्यांचा विस्तार वाढतो आहे. तिथे सर्व भारतीयांना आत जायला परवानगी आहे का ! सगळंच भीतीदायक आहे. त्यामुळे अशा भितीदायक वातावरणात हिंदूत्त्व न टिकवता जर कोणी विकासाच्या गप्पा मारत असेल तर त्यावर जनता विश्वास कसा ठेवणार ! त्यामुळे दहशतवाद्यांना बाँबस्फोट करू द्या आपण आपला विकास करुया असे म्हणण्यातला फोलपणा जनता जाणते. तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13300 views

💬 प्रतिसाद (86)
व
विकास Fri, 02/20/2015 - 23:33 नवीन
जे कोणी "आरे" करतील त्यांच्याशी! :) उदा. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दहशतवादी, भारताच्या हितसंबंधात अडचण आणणारे वगैरे... कोणिही. (आत्ताचे लेटेश्ट उदाहरण म्हणजे श्रीलंका निवडणुका आणि आत्ता श्रीलंकेबरोबर केला गेलेला अणुकरार). असो.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/26/2015 - 11:32 नवीन
आरेला कारे म्हणताना तुम्ही हवा तो अर्थ काढा.. आशु तै ना असा अर्थ नक्कीच अभिप्रेत नव्हता. त्यामुळे तुमची सहमती बघुन उंचावलेल्या भिवया वरील प्रतिसादाने किंचित बसल्या तरी
हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्वाचेच दुसरे नाव हिंदूत्व म्हणून त्या अर्थाने(च) ते देखील समर्थनीयच आहे.
हे वाक्य सुद्धा दु:खदायीच आहे. पण असो. चालायचेच!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/26/2015 - 13:39 नवीन
पाहिजे तो अर्थ काढला की दु:ख वाटायचेच! नुआन्स हा प्रकार फक्त आयव्हरी टावरातील विचारजंतांपुरताच राखीव ठेवायचा असतो ही ढोंगी शिकवण मिळाल्यावर दुसरे काय होणार?
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 02/26/2015 - 15:09 नवीन
हे वाक्य सुद्धा दु:खदायीच आहे. पण असो. चालायचेच! अहो पण परत त्यातून मला अभिप्रेत असलेला अर्थ हा सावरकरांचा आहे, ज्यांनी ती टर्म "कॉईन" केली... आता अनेकांना हिंदूत्वच काय पण राष्ट्रीयत्वपण मान्य नसते. पण तो वेगळा चालू रहाणारा वाद आहे. त्यात आपण "आरे ला कारे" करायला नको. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 02/19/2015 - 05:58 नवीन
balderdash noun 1. senseless, stupid, or exaggerated talk or writing; nonsense. 2. Obsolete. a muddled mixture of liquors. हा लेख वाचून सदर शब्द अगदी अनाहूतपणे आठवला!
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 02/19/2015 - 06:26 नवीन
वा!! आपल्या विरोधी मत असेल तर सेन्स्लेस ? एकदा सेन्स्लेस म्हंटले की खंडन करण्याची जबाबदारी येत नाही !
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 02/19/2015 - 06:08 नवीन
विकास म्हणजे काय ? ते नीट माहीत नसल्याने वाराणसी ... विकास असे कै च्या कै संबंध जोडले जातात. चकाचक रस्ते आणि पॉश मॉल्स ही विकासाची व्याख्या असेल तर सॉरी .. आपण एका पातळीवरुन विचार करत नाही असे म्हणावे लागेल. हिन्दुत्व आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत! कोणी सत्यदेव म्हणते कोणी सत्यनारायण , इतकाच फरक! इतके परखड्पणाने नव्हे पण देशातील तरुणाईला हे ही हवे होते आणि सहिष्णु भारतीय ( पुन्हा हिन्दू म्हणत नाही , दोन्हीचा अर्थ एकच ! ) असल्याने त्याला हिन्दुत्व हा शब्द स्वीकारण्याऐवजी " विकास" शब्द स्वीकारला इतकेच ! ( खोण्ग्रेसनी आपल्या लोकांचे इतके ब्रेन वॉशिन्ग करुन ठेवले आहे की लोक स्वतः ला हिन्दू म्हणून घेताना लाजतात ) इत्यलम !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/19/2015 - 11:01 नवीन
बजेट नंतर अच्छे दिन येणार आणि "विकास" होईल का ते पाहणे रोचक ठरणार आहे ! महाराष्ट्राचे मात्र बुरे दिन सुरु होणार आहेत ! उपनगरवासीयांची वीज महागणार

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sat, 02/21/2015 - 03:11 नवीन
श्री.कुबेर गुजराथी यांचे ज्येष्ठ सुपूत्र चि. विकास आणि श्री शब्दप्रभू मराठे यांची एकमेव सुकन्या चि. सौ. कां. अस्मिता यांचा विवाह १ मे रोजी, संपन्न करण्याचे ठरवले आहे. आपण या विवाहास उपस्थित राहून वधूवरास शुभार्शिवाद देण्याचे करावेत ही णम्र विनंती.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 02/23/2015 - 06:09 नवीन
महाराष्ट्रात अगदी कुठल्याही शहरात रेल्वे स्टेशनवर उतरा. रीक्षावाल्यांची फौज आपल्यावर चाल करून येते. त्यांचा हुलिया पाहून आपण भारतात आहोत की पाकिस्तानात असा प्रश्न पडतो.
तुम्ही ज्या देशात राहता तेथील संस्कृतीशी मिळून मिसळून राहण्याचे, तेथील स्थानीक संस्कृतीचा आदर करण्याचे महत्व आहे ते मी मुळीच नाकारत नाही. कष्ट करून जगणार्‍यांना केवळ हुलिया वरून परस्पर पाकिस्तानी ठरवणे, जराशी खटकणारी बाब आहे. आज आफ्रिका, युरोप, आमेरीका, ऑस्ट्रेलीआ सिंगापोर मलेशीया इंडोनेशीया, फिजी, मयन्मार, अशा अनेक खंड आणि देशातून मूळचे भारतीय वंशाचे लोक पिढ्यान पिढ्या राहतात ते आता तेथील नागरीक आहेत. हिंदू परंपरा वेश्भूषा सांभाळून त्यांच्या स्वतःच्या देशावरच प्रेम करतात. त्या देशातील स्थानिक बहुसंख्यकांनी केवळ कुणी भारतीय वेषभूषा करते परंपरा पाळते म्हणून त्यांना देशद्रोही समजून वंशवादी वागणूक द्यावी हे योग्य होईल का ? अधून मधून इतर देशात भारतीय वंशाच्या नागरीकांना वंशवादाचा सामना करावा लागल्याच्या बातम्या येतात त्यांचाच कित्ता आपण भारतात गिरवणे कित्पत उचीत आहे ?अलिकडे आमेरीकेत सुरेशभाई पटेल नावाच्या माणसावर हुलीया पाहून तेथील पोलिसांनी जखमी केले हे आदर्श आहे का ? भारतात नेपाळी आणि नैऋत्य भारतातील भारतीय नागरीकांना हुलीया आणि धर्म पाहून वेगळेपणाची वागणूक देणे योग्य होईल का ? गुन्ह्याबद्दल कायदे करा, कायदे मोडणार्‍यांना जरूर शासन करा. जे इमाने इतबारे कष्ट करून खातात त्यांच्या हुलीयावरून नाहक संशय हि परस्पर अनावश्यक अविश्वास निर्माणकरणारी भूमीका म्हणून धागाकर्त्याने आपली भूमीका पुन्हा एकदा तपासून पहावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Mon, 02/23/2015 - 10:04 नवीन
कष्ट करून जगणार्‍यांना केवळ हुलिया वरून परस्पर पाकिस्तानी ठरवणे, जराशी खटकणारी बाब आहे. तुम्ही अजून कष्ट करणार्‍यांपर्यंतच आहात हे पाहून गम्मत वाटली. मोहम्मद बिन कासिम येऊन गेला हे माहीत नाही का तुम्हाला
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Tue, 02/24/2015 - 15:27 नवीन
वाद विवाद करताना कायम आक्रमक आणि जोरजोरात बोलल पाहिजे असा एक विनाकारण गैरसमज आहे . या गैरसमजाला छेद देणाऱ्या काही अपवादापैकी एक म्हणजे योगेंद्र यादव . खाली एक क्लीप देत आहे . थोडी मोठी आहे . साधारण २० मिनिटाची . ज्याना कमी वेळ असेल त्यांनी १० व्या मिनिटा पासून बघायला पण हरकत नाही . पण मी हि क्लीप सर्वांनी पहिल्यापासून बघावी अशी जोरदार शिफारस करेन . याचे मुख्य कारण म्हणजे चर्चेत सहभागी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या argument बघितल्यावर सत्तेचा दर्प , अहंकार कसा असतो हे वारंवार जाणवत . दुसर म्हणजे केंद्रीय सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे पंजाब , राजस्थान , उत्तर प्रदेश आणि हरियाणा सारख्या राज्यातल्या हजारो शेतकर्यांना युरिया मिळत नाहीये आणि ज्याना मिळतोय तो हजारो रुपये मोजून . कुठल्याही शेतकऱ्यासाठी युरिया च महत्व काय असत हे वेगळ सांगण्याची गरज नाही . हा एक गंभीर प्रश्न आहे . पण माझ्यासारख्या आयवरि टॉवर मध्ये राहणाऱ्या माणसाला याबद्दल काही माहित नाही याची लाज वाटली . दुसर म्हणजे मोदी सरकार ने आपल्या जाहीरनाम्यात एक वचन दिल होत . पण आता मोदी सरकार ने सर्वोच्च न्यायालयात आम्ही अस काही करणारच नाही अस शपथपत्र दिल आहे . ते काय आहे ते क्लिप बघितल्यावर कळेल . या सगळ्यावर योगेंद्र यादव जे अभिनिवेश विरहित , शांत argument देतो ते बघण्यासारख आहे . विशेषतः एका बाजूला रविशंकर प्रसाद जो आक्रस्ताळा आरडा ओरडा करतो त्या पार्श्वभूमीवर तर हे मुद्द्यावर आधारीत argument अजूनच उठून दिसत . या चर्चेत अशी एक वेळ येते की रवी शंकर प्रसाद चा दर्प उतरतो आणि एक तर तो उठेल किंवा रडायला लागेल अस वाटायला लागत . बघा हि क्लिप नक्की . बाकी अच्छे दिन वैगेरे बद्दल फारस काही बोलण्यासारखे आहे असे वाटत नाही https://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=HPyOkBNwoSk#t=543
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/24/2015 - 16:20 नवीन
सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की माझा कोणत्याही पक्षाला / व्यक्तीला विनाशर्त (मिपाच्या भाषेत "बेशर्त") पाठींबा नसतो / नसेल... जे खरे वाटेल आणि व्यावहारीक आहे त्याला असतो. हे गृहितक स्प्ष्ट करून तुम्ही दिलेल्या क्लिपबद्दलची खालची मते आहेत. १. योगेंद्र यादव हे अनेक वर्षांपासून कसलेले व्यावसायीक टिव्ही प्रेझेंटर आहेत. चेहरा सरळ ठेऊन आणि आवाज ताब्यात ठेऊन दुसर्‍याला कसे चिडवावे या त्यांच्या व्यावसायीक शिक्षणाच्या भागात ते कसलेले तज्ञ आहेत हे त्यांनी अगोदर अनेक वर्षे वारंवार सिद्ध केलेले पाहिले आहे. याबाबतीत रविशंकर प्रसाद कमी पडले हे निर्विवाद. पण, मी बोलण्याच्या पद्धतीपेक्षा बोलण्यातील माहितीच्या खरेपणाला जास्त महत्व देतो. कारण देशाच्या भवितव्याच्या बाबतीत डिबेट जिंकण्यापेक्षा खरेपणाने जमिनीवरचे काम करणे जास्त मदत करते. २. जमीनीच्या किंमतीबद्दल योगेंद्र यादव यांनी वादाच्या पहिल्या भागात "कायद्यात X२ असे गुणोत्तर आहे आणि हरियाणा सरकारने कोर्टात त्याविरुद्ध X१ किंमतीचे अ‍ॅफिडेविट केले" असा स्पष्ट आरोप केला. पण नंतर "कायद्यात X१ ते X२ अशी तरतूद असून राज्य सरकारला त्यामधला नक्की आकडा ठरवायची मुभा आहे आणि हे कलम/सूट वापरून हरियाना सरकारने X१ किंमतीचे अ‍ॅफिडेविट कोर्टात केले" हे सत्य मान्य केले. माझ्या मते ही चलाखी झाली... किंवा सोप्या मराठीत "खोटे बोलणे" झाले. माझ्या अनुभवात सत्याने वागणारा अगदी आक्रस्ताळी माणुससुद्धा परवडला... पण शांतपणे, चेहरा मख्ख ठेऊन खोटे बोलणार्‍या (आणि म्हणून समोरच्या माणसाची सहजपणे दिशाभूल करु शकणार्‍या) माणसाइतका धोकादायक माणूस सापडणे कठीण. व्यवहारात अश्या माणसांपासून फार सावधगिरीने रहावे हे मी बोटेच नाही तर आख्खा हात पोळून घेऊन शिकलो आहे. असो. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
श
शलभ Wed, 02/25/2015 - 07:58 नवीन
क्लिप बघितली नाही. पण तुमचे प्रतिसाद आवडले आणि पटले. :)
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या गुरुवार, 02/26/2015 - 11:01 नवीन
सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की माझा कोणत्याही पक्षाला / व्यक्तीला विनाशर्त (मिपाच्या भाषेत "बेशर्त") पाठींबा नसतो / नसेल... जे खरे वाटेल आणि व्यावहारीक आहे त्याला असतो. हे गृहितक स्प्ष्ट करून तुम्ही दिलेल्या क्लिपबद्दलची खालची मते आहेत. आम्ही पण हेच म्हणून सांगतो एक्का साहेब की तुम्ही जो अर्थ काढलाय तो बरोबरच आहे आणि तांत्रिकदृष्ट्या त्यास काही प्रतिवाद नाही. पण माझ्या मते, यादव इथे म्हणतायत की "निवडणूकीच्या दरम्यान X२ गुणोत्तर देणार अशी दवंडी पिटवली आणि सरकारात आल्यावर मात्र X१ चे प्रतिज्ञापत्र दिले", हा विश्वासघात झाला. (हेच "टोलमुक्त महाराष्ट्र" बद्दलपण, पण ते इथे अवांतर ) बाकी तुम्ही चलाखी वगैरे म्हणताय ते तेवढे मान्य नाही. खूप पूर्वीपासून यादव यांना पाहिल्यास लक्षात येते की कमीत कमी जे मांडत आहेत त्याचे क्रॉस-वेरिफिकेशन करता येते. त्यांना इमेल केल्यास मुद्देसूद उत्तरे येतात की जी पडताळून पाहता येतात (या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही आपचे किंवा त्यांचे समर्थक असण्याची गरज भासत नाही, हे आवडलं). इतर लोकानुनयी विचारवंतांच्यापेक्षा यादवांची मते जास्त सुस्पष्ट असल्याने त्यांच्याबद्द्ल तसा आदर आहे. इथे त्यांनी फक्त हरियानाचे मुद्दे मांडून "माननीय कॅबिनेट मंत्री" यांना ठाऊक नाही काय ? हे आवडले नाहीच. कारण मला खरंच उत्तरे हवी असतील तर या फोरम पेक्षा इतर मार्ग आहेतच की. इथे ते फक्त त्याच्या विवादकौशल्याचा वापर करून समोरच्यास अडचणीत आणण्यासाठी "त्यांना माहित असलेल्या" पण "वस्तुनिष्ठ" मुद्द्यांचा वापर करतायत असे वाटले. शरद पवार किंवा मोदी असल्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी हवेत खरंतर. :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/26/2015 - 15:07 नवीन
मला वाटतं की या क्लिपबाबतीत मी माझा मुख्य मुद्दा परत स्पष्ट करायची गरज वाटते. तर... या जगात असत्य सरळ सरळ फार कमी वेळा बोलले जाते. कारण ते लगेच पकडले जाते. बहुतेक वेळा अर्धसत्य बोलून आपला मतलब साधला जातो. असे करणारे लोक जास्त धोकादायक आणि अविश्वासू असतात. शिवाय चेहरा गंभीर ठेऊन अर्धसत्य हेच पूर्ण सत्य असल्याचे ठासून सांगणारे अत्यंत धोकादायक असतात, ते केव्हा कोणाचा गळा केसाने कापतील हे सांगणे अशक्य असते. ते कोणाचाही (अगदी त्यांचा समर्थक गैरसोईचा झाला तर त्याचाही) केव्हा कसा सफाईने खातमा करतील हे कळणे मोठे कठीण असते. दुर्दैवाने अश्या चलाखीचे भारतीय लोक हुशारी / राजकारण समजून मोठे कौतूक करतात. आजवर तशीच चलाखी त्यांच्यावरच वापरून त्यांच्या कमरेचे काढून घेतले जात आहे याचे भान त्यांना नाही. उद्धटपणा मला अजिबात आवडत नाही. तरीही, एकवेळ उर्मट पण प्रामाणिक माणूस परवडला. पण शांतपणे / प्रेमळपणे अर्धसत्य सांगणार्‍यापासून मी फार फार सावध राहतो." आता त्या क्लिपबद्दल थोडे... त्या डिबेटमध्ये रविशंकर यांच्या पदाशी तडक संबंध नसलेले, त्याबाबत खोलवर माहिती नसणार याची बर्‍यापैकी खात्री असणारे तीनचार मुद्दे यादव यांनी मांडले. १. डिबेटच्या नॉर्म्सच्या दृष्टीने हे गैर आहे, हे यादवांसारख्या कसलेल्या डीबेटरला माहीत नव्हते हे शक्य नाही. असे मुद्दे मांडायचे असल्यास अगोदर तसे सर्व संबंधीतांना सांगणे आवश्यक असते. कारण मगच सर्वजण आपले पुरावे बरोबर आणून खर-खोटे सिद्ध करू शकतात. हे मत रविशंकर यांनी मांडल्याचे क्लिपमध्ये आहेच आणि त्याचे यादव यांनी खंडनही केलेले नाही (कारण ते खंडन करू शकले नसते). २. त्या मुद्द्यांपैकी एक कसा चुकीचा आहे हे रविशंकर सांगू लागल्यावर यादवांनी तो मुद्दा मागे घेत खरी वस्तूस्थिती मान्य केली. यात यादवांनी मोठेपणा दाखविला नाही तर चोरी सापडल्यावर संभावितपणे आपली बाजू सांभाळली, हे कळले तर बरेच काही कळले. आता इतर मुद्देसुद्धा तसेच अर्धसत्ये असल्यास आश्चर्य वाटणार नाही ! वरच्या घटनेतून मी काय शिकलो ? पूर्ण सत्य पाहिले असता चुकीचा असलेला एक मुद्दा अर्धसत्याचा (म्हणजेच खोटेपणाचा) आधार घेत केवळ टीव्ही डिबेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्यासाठी वापरणार्या... विशेषतः अश्या माणसाला की जो "मी प्रामाणिकपणापेक्षा जास्त प्रामाणिक आहे" अशी स्वतःची उघड जाहिरात करतो... माणसावर मी जपूनच विश्वास ठेवेन ! जो माणूस केवळ डिबेट जिंकण्यासाठी राष्ट्रीय टिव्ही चॅनलवर अर्धसत्य सांगू शकतो तर मग ऑफिसच्या दारामागे काय करू शकेल ? असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही... आणि मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना माझ्यामते विश्वासार्हता गमावतो ! असो, मला प्रत्येक गोष्टीचे (माणूस आणि त्याच्यामागचे वलय विसरून) कोण म्हणाला यापेक्षा जास्त तो "काय म्हणाला ?, का म्हणाला ? आणि कसे म्हणाला ?" यावरून मग मत बनवायची सवय आहे. कारण त्यामुळे आपण "बनण्याची" शक्यता कमी होते :) इतरांना इतर अनेक मार्ग बरोबर वाटू शकतात हे सुद्धा मान्य आहेच. असो. या बाबीवर इतकेच पुरे.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग गुरुवार, 02/26/2015 - 05:45 नवीन
रविशंकर प्रसादचे बोलणे ऐकून अतुल भातखळकर काकांची आठवण झाली. तेही काही उत्तर सुचलं नाही की तुम्हाला जनतेनी नाकारलेले आहे असे वाक्य ठोकून देतात.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर गुरुवार, 02/26/2015 - 05:52 नवीन
*lol* *LOL*
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/25/2015 - 02:20 नवीन
@तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.>>> =))))) आत्मभ्रामक स्वार्थप्रपिडित आशुजोगबाबा, आपणास लवकरच "अकाली दीर्घजीवी मति-मंदत्व प्राप्त होणार आहे ".... असे सांगुन मी माझे ११ शब्द संपवतो. :-D हल्ली सर्वत्र, प्रचंड विनोदी लिहितायत ही मोदिसमर्थकं! =))
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Wed, 02/25/2015 - 12:17 नवीन
मी पण ११ च शब्द ल्ह्यायला पायजे होते ब्वा.. वरती कळकळीने मोठ्ठे मोठ्ठे पर्तिसाद लिहले ते सगळे तशे वायाच गेले बघा. :)
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 02/25/2015 - 07:33 नवीन
लोकसत्तेतला लेख जास्त सत्याच्या जवळ आहे असे वाटते.. बाकी
हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही
अशा विधानांनी खूप करमणूक झाली..
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/26/2015 - 10:33 नवीन
असे लेख मोदींनी वाचले तर म्हणतील... "असे समर्थक असले तर विरोधकांची काय गरज ???!!!" *dash1* , *help* , *dirol* , +D
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या गुरुवार, 02/26/2015 - 10:47 नवीन
+१ .. हे तर ते आधीच म्हणत असतील.. :))))
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 02/26/2015 - 13:09 नवीन
+१... अन तेही दिवसातून दोन वेळा!!
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Sun, 03/08/2015 - 16:02 नवीन
टोपी घालायला इन्कार यासाठीच होता... विपरीत परिणाम झाला असता
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/26/2015 - 15:49 नवीन
http://www.misalpav.com/comment/669613#comment-669613 हा विकास शोधताय कै? ;)
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 02/27/2015 - 12:43 नवीन
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sat, 02/28/2015 - 08:23 नवीन
ज्यांनी मत दिले त्यांनी आपण मत कशाच्या आधारे दिले याचे फॉर्म भरून दिलेले आहेत का ? बाकी ईकासाचं म्हणत असाल तर डान्सबार आणि गुटख्यावर बंदी घातल्यापास्नं गावागावचं इकासपुरूष लैच खवळलेलं हैत.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sun, 03/01/2015 - 03:02 नवीन
खटासि खट, तू बावला हो गया क्या ?
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Mon, 03/02/2015 - 09:41 नवीन
@ वरचे दोन्ही, कृपया शांत बसायचे काय घ्याल ? गहन विषयावर काथ्या चालू आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 03/02/2015 - 12:52 नवीन
आपुलाची वाद आपणासी! :)
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Mon, 03/02/2015 - 18:02 नवीन
एका खटासि दुसरा खट संवादतो त्याला म्हणतात खटासि खट
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 02/28/2015 - 21:58 नवीन
प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष व त्यास पर्याय म्हणून उभरते नवे प्रभारी नेतृत्वास जनता एक डाव संधी देते लोकसभेत मोदी विधानसभेत दिल्लीत आप ला जनतेने संधी दिली. मोदींच्या विजयात त्यांचे स्टार प्रचारक राहुल गांधींचा महत्वाचा हात आहे. मोदी व संघाच्या विचारसरणीचा मनापासून तिरस्कार करणारे सुद्धा राहुल चे भाषण विचार आचार पाहून मोदींच्या पक्षाला जनतेने मत दिले .लालू माया मुलायम ह्यांना जनता विटली आहे मात्र विधानसभेत जातीचे व स्थानिक मुद्यांचे राजकारण ह्या लोकांना फायद्याचे ठरते .
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Sun, 03/01/2015 - 18:48 नवीन
प्रभारी नेतृत्वास का प्रभावी !
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sun, 03/01/2015 - 19:20 नवीन
अहो, तुम्हाला काहीच माहीती दिसत नाही. एका नमोरुग्णाने सांगितलं की केजरीवाल यांना नमोंनीच मदत केलीय दिल्लीत. नमोंचं कसं असतं की जो नडला त्याला ते विसरत नाहीत. केजरी पण नडले. मग नमो गाझी शहांना म्हणाले, इसे मेजॉरिटी से चुनके लायेंगे तो इसे पाच साल की सजा होगी । ४९ दिन तो कैसे भी निकालेगा, उसके बाद ये भागना चाहेगा, लेकीन मेजॉरीटी के कारण भाग नही सकेगा । फिर हरेक दिन उसे मेण्टल टॉर्चर होगा । इसे हम पांच साल के लिए यही सजा देंगे ।
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Sun, 03/01/2015 - 19:54 नवीन
ते बाकीचं शेपूट नका वाढवू लोक हो लोकसभेच्या निवडणूकीला मतदारांचा काय मूड होता तेवढेच मी मांडत होतो. बाकीच्या चर्चांचे आय पी एल मी सवडीने आणिनच :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 20 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 21 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 27 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा